मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तीळ गुळ घ्या , गोड गोड बोला

बापू मामा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बरे बोलता सुख वाटते ! हे तो प्रत्यक्ष कळते ! आत्मवत् परावे ते ! मानित जावे ॥ कठिण शब्दे वाईट वाटते ! हे तो प्रत्ययास येते ! तरी मग वाईट बोलावे ते ! काय निमित्त्ये ॥ आपणास चिमोटा घेतला ! तेणे कासाविस झाला ! आपणावरुन दुसर्‍याला ! राखत जावे ॥ पेरिले ते उगवते !बोलण्यासारिखे उत्तर येते ! तरी मग कर्कश बोलावे ते ! काय निमित्त्ये ॥ श्री मद् दासबोध् दशक १२,समास 10 तीळ गुळ घ्या ! गोड गोड बोला ॥ shivthar ghal

वाचने 11010 वाचनखूण प्रतिक्रिया 8

विकास Mon, 01/14/2013 - 21:46
तुम्हाला आणि मिपा कुटूंबाला संक्रांतीच्या शुभेच्छा! दासबोधातील त्याच दशक-समासातील अजून थोडे: आपल्या पुरुषार्थवैभवें । बहुतांस सुखी करावें । परंतु कष्टी करावें । हे राक्षेसी क्रिया ॥ २७ ॥ दंभ दर्प अभिमान । क्रोध आणी कठिण वचन । हें अज्ञानाचें लक्षण । भगवद्गीतेंत बोलिलें ॥ २८ ॥

बापू मामा Sun, 01/20/2013 - 17:19
या सारख्या किती तरी ओव्यांतून समर्थांनी बोलणे, वागणे मार्दवपूर्ण, नेमस्त असावे असा उपदेश केलेला आहे, जसे कठीण शब्द बोलो नये I कठीण आज्ञा करू नये I कठीण धिरत्व सोडू नये I काही केल्या II राखे सकलांचे अंतर I उदंड करी पाठांतर I नेमस्तपणाचा विसर I पडणार नाही II सकळास नम्र बोले I मर्यादा धरून चाले I सर्व जन तोषविले I तो सत्वगुण II सकळ जनांसी आर्जव I नाही विरोधाचा ठाव I परोपकारी वेची जीव I तो सत्वगुण II नीच उत्तर सहाणे I प्रत्योत्तर न देणे I आला क्रोध सावरणे I तो सत्वगुण II शब्द कठीण न बोले I अतिनेमेसी चाले I योगी जेणे तोषविले I तो सत्वगुण II नम्रपणे पुसो जाणे I नेमस्त अर्थ सांगो जाणे I बोला ऐसे वर्तो जाणे I उत्तम क्रिया II