बौद्धिक दिवाळखोरी
पुरोगामी महाराष्ट्रातील ही घटना फारच वाईट आहे. त्यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे "डान्स बार बंद (?)करून तरूण पिढीली वाचवले" असा दावा करणा-या मा. आर. आर. पाटील यांचा प्रस्तावाला विरोध.
जिल्हा परिषद , पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांना शिक्षणाची अट लागू करण्याचा प्रस्ताव बारगळला हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे . महिला व राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्यांना ८वी पास , तर खुल्या प्रवर्गातील प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्यांना १०वी उत्तीर्ण होणे बंधनकारक करणे असा ठराव राज्य मंत्रीमंडळाच्य बैठकीत आला होता.
बंधनकारक करणे गैर नव्हते . महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे चौथी शिकले होते , तरी त्यांनी उत्तम प्रशासन चालवले , हे अपवादात्मक उदाहरण देत गृहमंत्री आर . आर . पाटील यांनी या प्रस्तावात कोलदांडा घातला ; तर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी त्यांची री ओढली .
खासदार सुप्रिया सुळे सुशिक्षित युवतींना राजकारणात येण्याचे आवतण देत आहेत आणि त्यांचे आबांसारखे सहकारी अशिक्षिततेमुळे महिलांची होणारी फसवणूक सुरूच राहावी यासाठी आटापिटा करीत आहेत . जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनाच शिक्षणाची अट कशाला हवी ? मंत्री , खासदार , आमदार आणि सहकार क्षेत्रातील मंडळींनाही शिक्षणाच्या अटीची सक्ती करा ही आर . आर . पाटील यांची भूमिका योग्य आहे . मात्र त्यांनी उपहासात्मक पद्धतीने ती मांडताना मंत्र्यांना डॉक्टरेट होण्याची अट घाला , अशी पोपटपंची केली . ही अट लावली तर डॉ . पतंगराव कदम आणि डॉ . नितीन राऊत हेच सन्मानाने मंत्रिमंडळात बसू शकतील आणि आबांना तासगावची तर अजितदादांना काटेवाडीची एस . टी . पकडावी लागेल , याचेही भान पाटील यांना राहिले नाही .
महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार चांगला आहे. असे असताना हा विरोध कशाला? ७३व्या घटनादुरुस्तीने जि . प . व पंचायत सदस्यांना अधिकार दिले आहेत . त्याचे आकलन होण्यासाठी किमान शिक्षण जरुरी आहे . केंद्र सरकारच्या शिक्षण हक्क अभियानाचा हेतू भविष्यात सर्व स्तरावर शिकलेली मंडळी येऊन अज्ञानाचा अंधःकार दूर व्हावा ही आहे . परंतु बौद्धिक दिवाळखोरांना हे कसे समजणार ?
वाचने
5066
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
राजकारणात पात्रता सक्तीची करावी.
दोन प्रश्न
In reply to दोन प्रश्न by रमेश आठवले
+१०००००
In reply to +१००००० by चिरोटा
सध्याच्या
जिथे वाहक (कंडक्टर) याची
आबांच्या गप्पा आपण सोडून
In reply to आबांच्या गप्पा आपण सोडून by अत्रुप्त आत्मा
अ.आ.
In reply to अ.आ. by चिंतामणी
तो प्रतिसाद माझ्या प्रश्नाचं
In reply to तो प्रतिसाद माझ्या प्रश्नाचं by अत्रुप्त आत्मा
वरचा धागा मीच लिहीलेला आहे.
In reply to वरचा धागा मीच लिहीलेला आहे. by चिंतामणी
@तो वाचूनसुद्धा मत नाही समजले
In reply to आबांच्या गप्पा आपण सोडून by अत्रुप्त आत्मा
अ.आ.
मी वाचले त्याप्रमाणे,
जिल्हा परिषद , पंचायत समिती व
In reply to जिल्हा परिषद , पंचायत समिती व by नाना चेंगट
+ / - १
गावात अजूनही शिक्षणाचे प्रमाण
.
मला वाटते अट हवी. अगदी आदर्श
दिल्लीत बसलेले
शिक्षण व राजकारण
नविन असल्याने टन्कलेखन जमत
In reply to नविन असल्याने टन्कलेखन जमत by भाग्या
अभिनंदन आणि स्वागत.
तो शिकलेला नसला तरी प्रशिशित हवा
In reply to तो शिकलेला नसला तरी प्रशिशित हवा by चौकटराजा
चौरा