२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती. या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्ट ही माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज". या पुस्तकाचे लेखक आहेत - डॉ वासुदेव व्यंकटेश देशमुख. संपादकांना योग्य वाटल्यास हा धागा ठेवावा अथवा उडवावा.
श्री दत्त व प्रभू रामचंद्र हे दोन्ही भगवान विष्णूंचे अवतार होते. एक कृत युगातले तर दुसरे त्रेता युगातले. प्रभू रामचंद्र हे स्वामी समर्थांचे उपास्य दैवत. पुढील कथेतून स्वामी समर्थांची दत्तभक्ती दिसून येते.
एका प्रसंगी आंबेजोगाईच्या परिसरात काही ब्राह्मण दत्तदर्शनाच्या इच्छेने तप करत होते. समर्थांना ओळखून त्यांनी आपला हेतू सांगून त्यांचे साह्य मागितले. समर्थांनी त्यांना "भाव दृढ करा" असे सांगून ते ही त्यांचेजवळ बसले. एक प्रहर रात्र उलटल्यावर दत्तप्रभू गारुड्याच्या रूपात पत्नी, पाच मुले, हल्यावर लादलेली गोणी,हातात पाच कोंबडे व बोकड अशा परिवारासह तेथे येऊन थांबले.त्या वेळी बरोबरच्या स्त्रीला "भूक लागली" असे म्हणून स्वयंपाक करायला सांगीतले.तिने एक चूल मांडून तीवर एक हंडी चढविली व कोंबडे , बोकड त्यात कापून घातले तरी हंडी भरत नाही असे पाहून क्रमाक्रमाने तो हल्या व पोरेही कापून त्यात घातली.तरी हंडी भरेना तेव्हा ते पलिकडे बसलेले परदेशी (तपाला बसलेले ब्रह्मण) आहेत असे त्याचे बोलणे ऐकून ब्राह्मण पळून गेले.समर्थ मात्र शांतपणे बसून राहीले, कारण हे कोण आहेत हे त्यांनी ओळखले होते.तेव्हा ते सर्व दृष्य नाहीसे होऊन तिथे श्री दत्तस्वरूप प्रकट झाले. त्यावेळी समर्थांनी त्या ब्राह्मणांनाही दर्शन द्यावे अशी प्रर्थना केली.पण ते सकाम भक्त आहेत त्यांची आत्मसाक्षात्काराची योग्यता नाही असे दत्तप्रभूंनी सांगीतले.पुढे श्रीसमर्थांच्या वाक्यास्तव त्या ब्राह्मणांचे स्वप्नात समाधान केले असे वर्णन आहे.
श्री समर्थ रामदास स्वामींची पुढील आरतीही त्यांच्या दत्तभक्तीची साक्ष देते -
विधीहरीहर सुंदर दिगंबर झाले|
अनसूयेचे सत्त्व पहावया आले|
तेथे तीन बाल करूनि ठेवले|
दत्त दत्त ऐसे नाम पावले||१||
जय देव जय देव जय दत्तत्रेया|
आरती ओवाळू तुज दत्तत्रेया||धृ||
तीनही देवांच्या युवती पतीमागे आल्या|
त्यांना म्हणे वळखूनी न्या आपल्याला|
कोमल शब्दे करूनी करुणा भाकिल्या|
त्यासी समजाविल्या स्वस्थानी गेल्या||२||
काशी स्नान करवीर क्षेत्री भोजन|
मातापुरि शयन होते प्रतिदिन|
तैसे हे अघटित सिद्ध महीमान|
दास म्हणे हे तो नव्हे सामान्य||३||
प्रतिक्रिया
पंजाबी दत्त (सुनील दत्त वगैरे ) हे तेथील सारस्वत ब्राह्मण आहेत. त्यांच्या दत्त या आडनावाचा आणि दत्त या दैवताचा फारसा संबंध नाही. दत्त हा शब्द दाता या अर्थाने वापरला जात असावा. चारुदत्त, शिवदत्त, वासवदत्ता वगैरे नावे हिंदु संस्कृतीत पुरातन आहेत.
दत्त/ दत्ता असे आडनाव लावणार्या बंगाल्यांचाही संबंध दत्त या दैवताशी नसावा पण नक्की माहित नाही.
सुनील दत्त हा हुसैनी ब्राह्मण किंवा मोहयाल ब्राह्मण या पोटजातीतील आहे. या दत्त समुदायाचा पूर्वज राहिब दत्त याने करबलाच्या लढाईत इमामांच्या बाजूने लढून आपली सात मुले कुर्बान केली होती. त्यानंतर त्यांचे व विशेषतः शिया मुस्लिमांचे घनिष्ट संबंध प्रस्थापित झाले व भारतात परतल्यावर ते स्वतःला हुसैनी ब्राह्मण म्हणवून घेऊ लागले. यातील अनेक लोक बिहारमध्ये स्थाईक होऊन तेथील भूमिहार ब्राह्मण या समाजातील पोटजात म्हणून मिसळून गेले. या लोकांना 'आधा हिंदू आधा मुसलमान' असे म्हणतात कारण त्यांच्या आचार-विचारात हिंदू-मुस्लिम प्रथापरंपरांचा संगम दिसून येतो. हुसैनी ब्राह्मण मोहरम, रोजे, उपवास, मातम करतात आणि बाकी चालीरीती हिंदूंप्रमाणे असतात. मुस्लिमांशी रोटी-बेटी संबंधही यांच्यात मान्य असतात. म्हणूनच सुनील दत्तचा विवाह नर्गीसशी होऊ शकला. त्याचा मुलगा संजय याने पहिली पत्नी हिंदू केली व घटस्फोटानंतर केलेली दुसरी बायको (मान्यता) ही मुस्लिम आहे.
सुनील दत्त मोहयाल ब्राह्मण आहेत असे वाटते. मोहयाल ही सारस्वत ब्राह्मणांची शाखा असल्याचे कुठेतरी वाचले होते. चू. भू दे. घे. माहितीबद्दल धन्यवाद.
परंतु
मुस्लिमांशी रोटी-बेटी संबंधही यांच्यात मान्य असतात. म्हणूनच सुनील दत्तचा विवाह नर्गीसशी होऊ शकला. त्याचा मुलगा संजय याने पहिली पत्नी हिंदू केली व घटस्फोटानंतर केलेली दुसरी बायको (मान्यता) ही मुस्लिम आहे.हे पटले नाही. दोन्ही विवाह हे अरेन्ज्ड मॅरेजेस नाहीत. सुनील दत्तचे नर्गीसवरील प्रेम आणि तिच्यासाठी मदर इंडियाच्या वेळेस त्याने पत्करलेला धोका वगैरे ठाऊक आहे. तेव्हा मुस्लिमांशी रोटी-बेटी संबंध मान्य आहेत म्हणूनच ही लग्ने झाली असा दावा करता येत नाही. अशाप्रकारे अनेक कलाकारांमध्ये हिंदू मुस्लिम विवाह झालेले आहेत. असो.
दत्त हे भगवानाचे रूप फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उत्तर भाग येथेच ठाऊक आहे>>>
तुम्ही फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकातच फिरला आहात हे कळले! (ह.घ्या)
दत्तमंदीरे भारतभर आहेत.
(रशिया/अमेरिका/इन्डोनेशिया याबद्दल मला देखिल माहित नाही)
दत्तमंदीरे भारतभर आहेत
शक्य आहे. पण माझ्या ओळखीतील कुणालाही (मराठी / उत्तर कर्नाटकी सोडून) दत्त माहीत नाहीत.
असो. माहितीबद्दल धन्यवाद.
गुजराथी लोकांना पण दत्त माहीत आहे. मध्यप्रदेशात अनेकांना दत्त माहीत आहेत, मध्यप्रदेशात अनेक दत्तमंदीरेही आहेत.
कोण स्वामी समर्थ ?
..
एकच जाहला समर्थ ...बाकी सगळे शून्य
त्रैलोक्यास पडे ठावे। सामर्थ्य जयाचे॥ समर्थ रामदासस्वामी


प्लीज भावना दुखावून घेऊ नका.मनातले लिहितो..
कसल्या या कथा?
"भूक लागली", हंडी भरत नाही म्हणून पोरेही कापून त्यात घातली.
कधी काय म्हणे बापऋषी भडकले, उडव आईचे मुंडके...आयजीच्या जिवावर भक्ती..?
चिलया बाळाचे पण असेच काहीसे.ऊठसूट पोरांना अन्न म्हणून वापरुन कसली आलीय परीक्षा. त्यांचा जीव काय तुमच्या फुकट मालकीचा झालाय का की घडा भरायला,पाहुण्याला रिझवायला घाला त्याचे मांस? स्वत: दत्त आले आणि आम्ही ओळखले तरी आम्ही आमच्या पोराला असल्या पाहुण्यांसाठी बिस्किटपुडा आणायला पण खदेडणार नाही.जाव दे.
आणि सगळेजण पळाले ते सकाम आणि जे बसले ते निष्काम? तर मग ते न पळण्याचे कारण दिलेय की त्यांनी यांचे खरे रूप ओळखले होते.म्हणजे जिवाची खात्री अतएव अभय समजले म्हणून बसले एरवी पळालेच असते?क्षमेसह विचारतो.
सहमत.
बरं. समजा या कथेत सर्व काही मायावीच होते आणि फक्त भक्तांना घाबरवून जिवाची भीती घालून परीक्षा पहायची होती म्हणून पोरांना हंडीत घातले आणि इतरांना भिववले. तरी शेवटी कथेचा संदेश काय?परमेश्वर दर्शनासाठी प्रसंगी पोरांनाही भक्ष्य करा?की पती चे पोट भरण्यासाठी पोटची पोरे सप्लिमेंटरी अन्न म्हणून सोबत घ्या आणि भुकेला कमी पडली तर वापरा?
हे means "निष्काम"?
काय आहे हे?
समर्थ रामदास स्वामी आणि दत्तभक्ती असा लेखाचा विषय आहे. त्यासंदर्भातील कथा आहे. कथेतून संदेश वगैरे मला तरी द्यायचा नाहीये. आपल्या मताचा आदर आहे.
शुचितै,तुम्हाला personally कथेतून संदेश द्यायचा नाही हे समजलंय हो अर्थातच. मी मूळ लेखकालाच म्हणतोय.तुम्ही स्वत:वर घेऊ नका हो.
बादवे: हपीसात काही FYI संदेश येतात तशी तुम्ही उगीचच For Your Information Only..(no action required) संगितली असेल कथा फक्त तर मग काहीच म्हणणं नाय. :)
गवि, संतसाहित्य, स्वामी समर्थ संप्रदाय आदि गोष्टींचा अभ्यास करणारेदेखील अभ्यासक असतात. कदाचित त्या लोकांना ही माहीती उपयोगी पडू शकेल.
मला तर ही गोष्ट आवडली. तर्कदृष्ट्या काय आवडलं विचाराल तर स्वामी समर्थांवरची तसेच दत्तात्रेयांवरची श्रद्धा अधिक दृढ होण्यास मला मदत झाली. सकाम भक्ती ही कनिष्ठ हे कळलं. देव कधी कधी स्वप्नात येऊन दृष्टांत देतो यावर विश्वास दृढ झाला. सर्वांना या गोष्टी पटाव्यात असा आग्रह नाही. प्रत्येकाचा पिंड भिन्न असतो. पण मला या गोष्टी आवडू नयेत असा दुराग्रहदेखील बरोबर नाही.
तुम्ही तसा दुराग्रह धरताय असं माझं म्हणणं नाही. असो.
आरती तर सुंदरच आहे.
की कीतीही वाईट प्रसंग आले, दीसले, जाणवले तरी परमेश्वराला सकाम भक्तीने शरण जाण्यापेक्षा नीश्काम भक्तीने शरण जाणेच योग्य.
बाकी या कथेमधे परमेश्वर दर्शनासाठी पोरांना हंडीत घाला,प्रसंगी पोरांनाही भक्ष्य करा पती चे पोट भरण्यासाठी पोटची पोरे सप्लिमेंटरी अन्न म्हणून सोबत घ्या आणि भुकेला कमी पडली तर वापरा अथवा कोणताही हिसाचार बीभीत्सपणा करणे आवश्यक आहे असे कूठेतरी लीहिले आहे काय ?
सकाम भक्त आहेत त्यांची आत्मसाक्षात्काराची योग्यता नाही (म्हणजेच नीश्काम भक्ती सत्य दाखवते) असा धडधडीत उघड संदेश कथे मेधे दीलेला आहे ते सोडून गाढवासारखे जे लीहले नाहिये ते तात्पर्य मानयला काय तूम्ही भ्रमीश्ट झालात काय ? भल्त्याच गोश्टी सूचतात तूम्हाला interpret कराय्ला ?
लेको साधी सरळ तात्पर्य सांगणारी गोश्ट आहे आणी कथेतील ऊघड व्यक्त केलेले तात्पर्य सोडून बाकी सगळच तूम्ही चाटताय की ?
सकाम म्हणजे नक्की काय काम? अन निष्काम म्हणजे नक्की काय करायचे नाही?
शंका: केवळ कोणालातरी देव दिसला असं वाटून कोणी लोकांची खांडोळी करून त्याला जेवायला वाढले तरी आक्षेप घ्यायचा नाही असा निष्कर्ष निघू शकतो...कारण समजा एखाद्या अडाणी माणसाने यावर विश्वास ठेवला तर ...? आणि आजच्या जगातही आपण असे बळी दिल्याचे वाचतोच ना? मग अशा प्रकारच्या कथा अंधश्रद्धा पसरवतात याला तुम्ही आक्षेप कसं घेता? तुम्ही किती ठिकाणी या कथेतून असा अर्थ निघतो जो योग्य आहे असं सांगत फिरणार?
ह्यावर स्पश्ट सागंता येते की ?भक्ती नीश्काम असेल तर कोणालातरी न्हवे तर प्रत्येक नीश्काम भक्ताला देव दीसेल आणी अशा द्रूश्यातील फोलपणा जाणवेल अनूभवाला येइल.
शंकासमाधानः आणी जे महामूर्ख अज्ञानी आहेत ते अर्थातच ह्याला हिंसाचार म्हणून वीरोध नाही का करणार ? मग कशाला अंधश्रद्धा पसरतील. अंधश्रद्धा ह्या नेहमी मूर्ख अनूयायी अथवा वीरोधक याच्याकडून सतपूरूशांबाबत घडलेल्या misinterpretation मूळे जन्माला येतात.
उदाहरण म्हणून वरील बोल घ्या - म्हणे समजले म्हणून बसले एरवी पळालेच असते आरे महामूर्खा जिवाची खात्री नसणारे पळणारच की त्यात अनैसर्गीक काय आहे ? पण ज्या नीश्काम भक्तीमूळे तूम्हाला सत्यस्वरूप दीसले, जीव आणी शिव यांचे एक्य अनूभवाला आले, जेथे आत्म्याचे अमरत्व कळाले तेथे जीवाची भीतीच रहातच नाही अशा स्थीतीत पळून नाही गेले यात तूम्हाला उपहास करण्यासारखे अनैसर्गीक काय जाणवले बूवा ?
सकाम म्हणजे नक्की काय काम? अन निष्काम म्हणजे नक्की काय करायचे नाही?
ह्यावर एक स्वतंत्र लेख लीहावा लागेल. इथे वीषय मावणार नाही.
<<<आणी जे महामूर्ख अज्ञानी आहेत ते अर्थातच ह्याला हिंसाचार म्हणून वीरोध नाही का करणार ?
आणि समाजात असे अज्ञानी अन महामुर्ख लोक ते तुम्ही म्हणता तसे निष्काम वगैरे लोक यांचे प्रमाण काय असावे असं आपलं मत आहे? अंधश्रद्धा का पसरते? अजुनही लोक असे बळी का देतात?
माफ करा पण अजिबातच समजत नाहीये म्हणुन पुन्हा विचारतेय?
याच्याकडून सतपूरूशांच्या शीकवणूकीच्या अथवा त्यांनी दीलेल्या ज्ञानाच्या व्याख्येच्या misinterpretation मूळे जन्माला येतात.
उदा:- ज्ञानेश्वरीमधे एक ओवी अशी आहे... जो जे वांछील तो ते लाभो प्राणीजात |
आता तूम्हीच थोडा वीचार करा वरील वाक्य जगाच्या ज्ञात अज्ञात इतीहासात कधी सत्य ठरले ? की सगळ्यानाच जे हवे ते मीळालेय ? हे अशक्यच नाही काय ?म्हणजेच १ माणूस म्हणाला मला अमूक गोश्ट मीळो, दूसरा म्हणाला कूणालाच कधीही काही न मीळो आता हे साध्य होइल काय ? कींबहूना
मग कोणत्या अर्थाने माऊली अशी म्हणाली आणी त्याचे कारण व साध्य ह्यामधे मतमतांतरे लोकांच्या बूध्दी प्रमाणे नींर्माण होणारच, म्हणजे सर्वच श्रधाळू पण १ सोडून एतर सर्व अंधश्रध्दाच की, मग या वरून माझेच खरे ह्या साठी वाद आणी स्वतःच्या मताच्या सामर्थ्यासाठी पून्हा आपलीच अंधश्रध्दा कूर्वाळने आलेच. अंधश्रद्धा ह्या नेहमी मूर्ख अनूयायी अथवा वीरोधक याच्याकडून सतपूरूशांच्या शीकवणूकीच्या अथवा त्यांनी दीलेल्या ज्ञानाच्या व्याख्येच्या misinterpretation मूळे जन्माला येतात. आणी मनूश्याच्या भौतीक गरजांच्या आगतीकतेवरती पोसल्या जातात. म्हणून या व्यक्ती तीतक्या प्रक्रूती सदरात मोडतात... म्हणूनच यांची व्याप्ती प्रचंड आहे. आपल्या क्रूती श्रध्दा आणी अनूभवांचे सावध आणी डोळस नीरीक्षण हा एकमेव यापासून लांब रहण्याचा मार्ग आहे.
कदाचीत हे ऊत्तरही तूम्हाला संपूर्ण समाधान देऊ शकणार नाही कारण त्याच्या समाधानासाठी अंधश्रध्देचा अनूभव व अभ्यास आणी तसाच तीतका नसला तरी श्रध्देचा अनूभव आणी अभ्यास उपयोगी पडेल.
समाजात असे अज्ञानी अन महामुर्ख लोक ते तुम्ही म्हणता तसे निष्काम वगैरे लोक यांचे प्रमाण काय असावे.
मोजणी केली नाही. पण निष्काम लोकांचे प्रमाण नीश्चीतच अत्यल्प असावे. तसेच हे प्रमाण कलीयूग अथवा इतर यूगांशी संबधीत अजीबात नाही. मूळात हा फरक ओळखणे थोडे कठीन काम आहे. म्हणजे जसे केवळ हलचाल केली नाहीये म्हणून दोन व्यक्ती मधील नेमकी कोणता व्यक्ती स्वप्न पहात आहे हे ठाम ठरवता येते काय ?
> आणी जे महामूर्ख अज्ञानी आहेत ते अर्थातच ह्याला हिंसाचार म्हणून वीरोध नाही का करणार ? मग कशाला अंधश्रद्धा पसरतील.
म्हणजे उद्या समजा तुमचा शेजारी असा क्लेम करतो की तो विष्णूचा अवतार आहे. मग तो त्याच्या मुलांना कापून हन्डित घालतो आणि मग बायकोला म्हणतो की अत्माशुन्याची मुलं पण कापून घाल. याला तुम्ही विरोध करून "महामूर्ख अज्ञानी" ठरणार की तुमचे मूलं कापून देणार?
- अक्कलशून्य
माझा या प्रतिसादावर आक्षेप आहे. हा फार वयैक्तिक होतो आहे. समं कडे तशी तक्रार करते आहे.
त्याना मला - अक्कलशून्य म्हणायचा पूर्ण अधीकार आहे, मी सूध्दा इथे वयैक्तीक नाव घेऊन कोणावर तरी अशी टीका केली आहेच.
पण त्यानी माझे या पानावरील सर्व प्रतीसाद वाचले असतील तर त्यांच्या शंकाना योग्य ऊत्तर आहेच. बाकी लोक फार मोठ्मोठ्याना misinterpret करतात मग मला कोणी गाढ्व म्हटले तर राग कूठवर धरणार ?
मला मुलांचा संदर्भ खटकला. असो.
मुलांचे संदर्भ तुम्हाला खटकले असते तर असले बिन्डोक लेख तुम्ही लिहिले नसते.
लेख बिन्डोक आहे की नाही यापेक्शा तात्पर्य काय आहे हेच अभ्यासा, ऊपयोगाला ते येते.. बाकी गोश्टी फक्त वाद करतात.
पंचतंत्र माहीत असेलच त्याची ऊपयूक्तता पण कळत असेल.. आता त्या गोश्टवाचून शेवटी काय बिन्डोकपणा आहे कोल्हा कधी बोलतो काय एव्ह्डेच अकलेचे तारे ऊधळता येणे अपेक्षीत आहे काय ?
उद्या खेड्यातल्या एखाद्या गावात एखाद्या मान्त्रिकने या गोष्टी चा दाखला देऊन जर मूल कापायला सांगितल तर लोक करणार नाहीत काय?
बाय डिफॉल्ट, पंचतंत्र तील गोष्टी या गोष्टी आहेत हे भोल्या भाबड्या लोकांना ही माहीत असते. या दोन गोष्टींची तुलना करणे म्हणजे संत्रे आणि सफरचांदाची तुलना करणे होय.
उद्या खेड्यातल्या एखाद्या गावात एखाद्या मान्त्रिकने या गोष्टी चा दाखला देऊन जर मूल कापायला सांगितल तर लोक करणार नाहीत काय ?
तूम्हाला असे म्हणाय्चे होते काय की एखाद्या मान्त्रिकने या गोष्टीचा दाखला न देता जर मूल कापायला सांगितल तर लोक वीरोध करणार नाहीत काय ?
मला वाटते सफरचंद आणी टॉमेटोची तूलना न करण्या इतपत भारतीय खेड्यातील लोकही हूशार आहेत.
मला मुलांचा संदर्भ खटकला. असो.हे काय नविनच? मुलांचा संदर्भ तुम्हाला आणि तुमचे समर्थन करणार्या अक्कलशुन्यांना चांगलाच आवडलेला दिसतो.
मी फक्त कथेचे तात्पर्य काय असावे या बाबत बोललो आहे.
मला नावडने आणी आवडने ह्याने तूम्हाला ते कळण्यास मदत झाली की तूम्हीबी झिन्ग्ल्यावानी न्हाइत्या इचारात भर्कट्ताय ?
तात्पर्य काही का असेना लहान मुले कापण्या विषयी दुर्लक्ष करावे असे तुमचे आहे काय?
तात्पर्य काही का असेना लहान मुले कापण्या विषयी दुर्लक्ष करावे असे तुमचे आहे काय ?
जो तात्पर्याकडे दूर्लक्ष कर्तूया, त्याच्या लहान मुले कापण्याकडे लक्ष जाण्याला कीती म्हून म्हत्व द्यायचा ? जो सोन सोडून लोखंड मौल्यवान समजतूया. सून्दर नदीकीनारा सोडून लैघान पाण्याचे डपकेच जास्त पसंत करतूया, हीरे सोडून दगड जमवतूया... तेजस्वी रूपेरी कीनार सोडून ढगाचा काळेपणाच जास्त न्याहाळतूया........
श्री. आत्मशून्य,
तुम्हाला नरमांस आवडते का ? त्याची पाकॄ संस्थळावर देउ नये अशी विनंती आहे.
आत्मशून्यजी,
Your quote:
>>>>>>>>>
त्याना मला - अक्कलशून्य म्हणायचा पूर्ण अधीकार आहे, मी सूध्दा इथे वयैक्तीक नाव घेऊन कोणावर तरी अशी टीका केली आहेच.
>>>>>>
आपण मला काही न समजलेल्या गोष्टींबाबत महामूर्ख बावळट म्हणालात पण आम्ही माट्र वयैक्तीक नाव घेऊन कोणावर टीका केलेली नाही याची नम्र नोंद आमच्या आणि शुचितैंच्या उपरिनिर्दिष्ट संवादातून आपल्याल येईलच. आपली श्रद्धास्थाने दुखावली गेल्यावर निष्कामतेचा एक भाग असलेले निष्क्रोध राहणे कठीण असते हे मी समजून घेतो.
माझ्या महामूर्ख बावळट डोक्यात इतपत तरी समजूत ठेवल्याबद्दल मी जगन्नियंत्याचे (अश्रद्ध असलो तरी जमेल तसे) आभार मानतो.
(बावळट) गवि
मी सूध्दा वैयक्तीक बाबीत जाणार न्हवतो पण मी आपले नाव लीहिले कारण पहीला प्रतीसाद आपल्यालाच द्यायचा होता आणी चर्चेला अशी भडक सूरूवात करून लोकांची reaction बघायची होती की लोक मला टीकीचे धनी जास्त करतील की त्यानी कथेमधील तात्पर्याकडे लक्ष दीलेले नाही हे जास्त बघतील आणी मी या पानावरच एका प्रतीसादात तसे स्पश्ट केलेले आहेच तसेच जर आप्ल्याला तो अनावश्यक अपमान वाटत असल्यास मी त्याबद्दल माफी पण मागतो.
निष्कामतेचा एक भाग असलेले निष्क्रोध राहणे कठीण असते हे मी समजून घेतो :
क्रूपया गैर समज बाळगू नका व मला गांधीवादी तर मूळीच बनवू नका, एथे अर्जूनाने केलेले संपूर्ण यूध्द नीश्काम गणले जाते, तेवां निष्कामतेबाबत एका जाणकाराकडूनच माहीती घ्या म्हणजे अशी अंधश्रध्दा टळेल
ठीक. गैरसमज मिटला. धन्यवाद.. :)
पण जाती व्यवस्थेची किड आणी त्यासोबत अध्यात्माला चीकटलेला PRESENTATION मधील अवघड्पणा मूळेच लोक भरकट्त्यात, भडकत्यात, नावे ठेव्त्यात, तात्पर्य इसरत्यात, आन नेमके हेच टाळून आपलेच ज्ञान पून्हा पाश्चीमात्य संस्क्रूती आप्ल्याला Ageless Body Timeless Mind, The Monk who sold his ferari अथवा ओशो चे पूस्तकमधून इकत घ्यायाला लावते. आन ते आप्ल्याला लै झ्याक वाटते, कारन त्यात त्याने तात्पर्यावरच भर दीलेला अस्तूया. ते बीभीत्स अथवा भडक वंगाळ भाग गाळून टाक्त्याती. आहे टाळायाला आप्ले आपनच शीकायला पायजेल :)
भूगोल साहेब हा इन्शूरन्स मॅटर न्हवे की क्लेम करावा ? शूध्द प्रचीती ही क्लेम आणी प्रीटेन्शन रहीत असते. त्याला रोकडा अनूभव म्हणतात.
जसे मी म्हणालो अंबा गोड असतो , असा गोड असतो, तसा गोड असतो, पण तो तूम्ही खाललाच नसेल तर ती फक्त जाहीरातच ना ? आता तो खाल्लाच नसेल तर त्याच्या गोडपणाची (शेवटी फक्त) कल्पना करायला अक्कल लागते. पण प्रत्यक्षात खाल्ला तर त्याची चव अनूभवायला अक्कलशून्यता पूरेशी असते.
आणी हो ऊत्तर द्यायचे राहीलेच की ?
ते फार सोप आहे, जर माझ्याकडून नीष्काम भक्ती आचरली जात असेल तर कोणत्याही फ्रॉड क्लेम करणार्यच्या बापाची पण हीम्मत नाही को तो मला हे पट्वू शकेल की मी माझ्या मूलांचा बळी द्यावा. म्हणून म्हटले ना थोडे सावध आणी सजगपणे नीरीक्षण करा आणी तूमच्या मनातील अंधश्रध्दा तत्काळ दूर होतील.
शिल्पा ब तै हे घ्या misinterpretation चे अजून एक ताजे ऊदाहरण की लोक स्वतःच्या मताचा अनूनय कसा करतात.
फारच गंभीर्यानी घेतला. ते फक्त गवी आणि इतरांना महामूर्ख ठरवन्याबद्दल होते.
> ते फार सोप आहे, जर माझ्याकडून नीष्काम भक्ती आचरली जात असेल तर कोणत्याही फ्रॉड क्लेम करणार्यच्या
> बापाची पण हीम्मत नाही को तो मला हे पट्वू शकेल की मी माझ्या मूलांचा बळी द्यावा. म्हणून म्हटले ना थोडे सावध > आणी सजगपणे नीरीक्षण करा आणी तूमच्या मनातील अंधश्रध्दा तत्काळ दूर होतील.
हे आर्ग्युमेंट फारच "सॉलिड" आहे. म्हणजे एखादा जर बळी द्यायला पटवू शकला नाही तर तुमची भक्ति निष्काम होती. पण जर यदा कदाचित त्याने तुम्हाला पटवले आणि तुम्ही बळी दिलात आणि नंतर कळले की तो फ्रॉड होता, तर हे होऊ शकलं कारण की तुमची भक्ति निष्काम नव्हती.
शून्याचा सराव हाय. तवा तस काय बी समजू नका
हे आर्ग्युमेंट फारच "सॉलिड" आहे. म्हणजे एखादा जर बळी द्यायला पटवू शकला नाही तर तुमची भक्ति निष्काम होती. पण जर यदा कदाचित त्याने तुम्हाला पटवले आणि तुम्ही बळी दिलात आणि नंतर कळले की तो फ्रॉड होता, तर हे होऊ शकलं कारण की तुमची भक्ति निष्काम नव्हती.
नाय तस न्हाय ते, नीष्काम भक्ती ही जर तर गोश्टीस्नी थारा नाय देत.
"आरे गगनविहारी बावळटा आणी इतर मूर्खहो"अशी सूरूवात केली तर लोक माझ्याबद्दलच वाद करतील की मी त्यासोबत मांडत असलेल्या वीशयाकडे लक्ष देतील आणी त्त्याचे तात्पर्य यावर चर्चा करतील असो गगनविहारी साहेब तूमचा आणी इतरांचा अपमान करायची माझी इछा,भावना नाही त्यासाठी हा माफीनामा.
बाकी करमणुक होतेय.
अनसूयेचे सत्त्व पहावया आले|
तेथे तीन बाल करूनि ठेवले|

चिलया बाळाची गोष्ट खुप लहानपणी वाचली होती पण आता आठवत नाही...कोणी सांगेल का? केवळ गोष्ट म्हणुनच हो..
http://shimagaphag.com/general_phag/general_7.html इथे सापडेल
धन्यवाद.
हम्म....विचित्र कथा आहे....त्या काळात चीलायाच्या आईला मांस मिळाले नाही? बरं नाही तर नाही पण म्हणून एका गोसाव्याला जेऊ घालायला बाळालाच कापले? अशा कथा विकृत आहेत असं माझं मत. बाकी असो.
लहानपणी या गोष्टीमुळेच मला घरी कोण पाहुणा जेवायला आला तर भिती वाटायची.
मी माझ्या मुलांना ही गोष्ट अजिबात सांगणार नाही.
तुम्ही मिपाला आपल्या ब्लॉगसारखे वापरणे थांबवले नाहीत हे तर वाईट आहेच पण चक्क स्वामींबद्दल अशा अघोरी कथा (अफवा?) पसरवणे कृपया थांबवावे. काही मूर्ख लोक आता (२०१० मध्येही) आपल्या मुलाचा बळी द्यायला मागेपुढे बघत नाहीत. असल्या गोष्टींना आळा घातला पाहिजे.
२) तर्कदृष्ट्या काय आवडलं विचाराल तर स्वामी समर्थांवरची तसेच दत्तात्रेयांवरची श्रद्धा अधिक दृढ होण्यास मला मदत झाली.
तर्कदृष्ट्या? तार्किकदृष्ट्या विचार केला असता गगनविहारी, शिल्पा ब यांनी सांगितल्याप्रमाणे अनुमाने निघतात. तुमचे विचार ही आंधळी भक्ती आहे, त्याला तर्क म्हणून तर्काला बदनाम करू नका. ती फार महत्त्वाची आणि उपयुक्त गोष्ट आहे.
३) सकाम भक्ती ही कनिष्ठ हे कळलं.
प्रत्येक भक्ती किंवा कृती ही सकामच असते. निष्काम भक्तीचे उदाहरण देउ शकता का?
माझी आधीची प्रतिक्रिया उडविण्यात आली आहे पण आशा करते आपण ती वाचून तिच्यापासून बोध घेतला असेल.
तर्काचा ठेका तुम्ही घेतल्यासारखेच तुम्ही बोलताय.
तीच गोष्ट मिपाची. मिपाचा ठेका घेतलाय काय तुम्ही कोणी किती लिहायचं हा नियम केलाय काय तुम्ही?
उदाहरण तुम्हाला देणार नाही. करायचं ते करा.
हा धागा आणि त्यावरील तुमचे काही प्रतिसाद वाचले. त्यातल्या नक्की कुठल्या प्रतिसादाबद्दल बोलत आहात ते माहित नाही. शिवाय मी वाचल्यापूर्वीच उडवली गेली असेल तर काही करु शकत नाही. असो.
तर्काचा ठेका ? मी योग्य गोष्टींसाठी योग्य ते शब्द वापरण्याचा आग्रह धरतोय. तुम्हाला माझे पटत नसेल तर शब्दकोषात पाहून तपासू शकता.
मिपाबद्दल: तसा ठेका असता तर फार बरे झाले असते.
कोणी किती लिहावे असा नाही पण मिपावर काही एका किमान दर्जाचे साहित्य प्रसिद्ध व्हावे असे वाटते.
उदाहरण तुम्हाला देणार नाही. करायचं ते करा
तुम्हाला समजलं नसेल तर सांगा की. त्यात काय?
+१ पेन यांच्याशी सहमत आहे.
पण अजून एक प्रश्न .. किमान दर्जा काय आहे?
भीषण