लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सेवानिवृत्ती नंतरच्या गोष्टी ज्यांनी माझे मन प्रफुल्लित ठेवलं त्यांपैकी एक म्हणजे मराठी कवीता. शाळेत असताना कवीता फक्त टक्के वाढवण्यासाठी वाचल्या. त्यातील थोड्या लक्षात राहील्या बाकी आयुष्यात टक्के टोणपे खाताना विस्मृतीत गेल्या.
सेवानिवृती मुळे वेळच वेळ आणी मराठी पुस्तके, मासिके व अतंरजाला वर वाचण्यासाठी भरपूर साहित्य. जितेंद्र अभिषेकी आवडते आणी " कट्यार व हे बंध रेशमाचे ", नाटकां मुळे जवळून पाहण्याची संधी मिळाली.त्यांचा व बोरकरांचा जवळचा संबध. ते बोरकरांचा उल्लेख नेहमी करायचे. पु ल देशपांडे आणी सौ सुनीताबाईचें यू ट्यूबवर कवीता वाचन आणी मुलाखती व चर्चा पाहिल्यावर उत्सुकता वाढत गेली.
बा भ बोरकरांच्या कविता ,अतंरजाला वरचे लेख वाचत गेलो तसे तसे त्यांचे बहू आयामी व्यक्तित्व आणी प्रतीभा कळू लागली.
३० नोव्हेंबर...
पद्मश्री बा. भ. बोरकर
यांची जयंती !
गोव्यातल्या बोरी गावचे बोरकर बाकीबाब म्हणून ओळखले जायचे. फक्त २० वर्षांचे असताना त्यांचा पहिला कविता संग्रह "प्रतिभा" १९३० साली प्रसिद्ध झाला.१९३४ साली बडोद्यातील वाङ्मय परिषदेच्या अधिवेशनात 'तेथे कर माझे जुळती' या काव्यगायनाने कवी म्हणून ते ओळखले जाऊ लागले .
अवघ्या विसाव्या वर्षी काव्य प्रतीभेला संसार थाटण्यासाठी ललकारणारे बोरकर,
शृगांरा़ला अश्लीलतेचा यत्किंचितही स्पर्श होऊ न देणारी "जपानी रमलाची रात्र" ही कवीता ,
"तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात"
"ती" दोन दिवसा करता दुर गेल्यानंतर अस्वस्थ होणारे
तू गेल्यावर फिके चांदणे
घरपरसू ही सुने सुके
आणी
तेवढेच आयुष्याच्या संध्याकाळी,"विसाव्याच्या क्षणी" विरक्त होत त्याच सखीला म्हणतात
"सले कालचीं विसरून सगळी
भले जमेचें जिवीं स्मरूं,
शिशुहृदयाने पुन्हा एकदा
या जगतावर प्रेम करूं."
आयुष्याची उजवण झाली म्हणत तीच्या घरचे तुळशीचे पान आणी तीनेच काढलेल्या आडतल्या पाण्याची तुलना तीर्था बरोबर करतात.
"असावीस पास, जसा स्वप्नभास,
जीवीं कासावीस झाल्याविना,
तेव्हा सखे आण तुळशीचे पान,
तुझ्या घरी वाण नाही त्याची….
तूच ओढलेले त्यासवें दे पाणी,
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजें,"
आयुष्यातील असंख्य चढ उतार पाहिल्यानंतर सुद्धा,
" मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ति नको मज मुक्ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा "
म्हणणारे बोरकर जीवनाच्या अंतिम फेरीत म्हणतात,
नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी ",
पं जितेंद्र अभिषेकी यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की बोरकरांची कवीता म्हणजे शब्द आणी सूर जणू हातात हात गुंफून येतात, संगीत त्यांच्या कवीतेतच असतं .वयाच्या प्रत्येक पडावावर त्याच्यां कवीतेचे रूप बदलत गेल्या सारखे वाटते.
अप्रतीम फक्त ऐवढच म्हणू शकतो. काही आवडलेल्या आणी कसं जगायचं याचे मार्गदर्शन करणार्या काही कवीता त्यांच्या जन्म दिनी खाली दिल्या आहेत.मिपाकर साहित्यप्रेमी त्यांनी आगोदरच वाचल्या आसतील.
*१. जपानी रमलाची रात्र*
तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात
रतीरत कुक्कुट साकुंडीवर आरोहूनी माड
चोच खुपसुनी फुलवीत होता पंखांचे झाड
अद्भुत पंख्यासम भिंतीवर आंदोलुनी छाया
लावित होत्या ताप जगाचा नकळत विसराया
धूप ऊसासत होता कोनि रजताच्या पात्री
विचित्र रेशिमचित्रे होती रसावली गात्री
तुझा पियानो यक्ष जळातील होता निजलेला
मनात गुंफित स्पर्श-सुखांच्या स्वप्नांचा झेला
अन् म्युसेची कवने होती माझ्या हातात
प्रतिचरणाला करित होती धूम्रवेल साथ
जळत ऊसासत होते त्यासह अंतरात काही
होता चिमणा श्वान लोकरी घोटाळत पायी
तोच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोळ
आलीस मिरवीत जाळीमधुनी नागिणीचा डौल
करांतुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले
जळता गंधक पांच उकळता याही रंगलेले
अभिष्ट चिंतुनी आम्ही त्यांचे भिडवियले काठ
सुरेहुनी तु गडे भाजिले ओठांनी ओठ
स्पर्शे तुझिया आणि पियानो थरारला सारा
मज सम त्याच्या कानशिलाच्या झणाणल्या तारा
गंधर्वांच्या दुहिता जमल्या करित पुष्पवृष्टी
हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी
पोहू लागले तुझ्या रेशमी अलकातील मासे
हवा जाहली जड पा-यासम अंगातील वासे
आणि तरंगत डुलु लागली नौकेसम शेज
तो कांतितुन तुझ्या निथळले फेनाचे तेज
नखे लाखिया दात मोतिया वैडूर्यी नेत्र
अवयव गमले चपल चिवट की मयवनीचे वेत्र
कात सोडिल्या नागिणिचे ते नवयौवन होते
विळख्याविळख्यातुनि आलापित ज्वालांची गीते
गरळ तनुतील गोठुन झाले अंतरात गोड
कळले का मज जडते देवा नरकाची ओढ
डोळे बांधुन खेळत होते जीवन मायावी
अंधपणातच वितळत होते भूत आणि भावी
तुझ्या जपानी भाषालिपिसम अगम्य सुन्दरता
असुनि हाती उरली दुर्लभ आली ना हाता
आजही तुज शोधता कधी ती रमलाची रात्र
पाठितुनि जंबिया मधाचा घाली काळजात!
२ तू गेल्यावर फिके चांदणे...
तू गेल्यावर फिके चांदणे
घरपरसू हि सुने सुके
मुले मांजरापरी मुकी अन
दर दोघांच्या मध्ये धुके
तू गेल्यावर या वाटेने
चिमणी देखील नच फिरके
कसे अचानक, झाले नकळे
अवघे जग परके-परके
तू गेल्यावर घरात देखील
पाऊल माझे अडखळते
आणि आटूनी हवा भवतीची
श्वासस्तव मन तडफडते
तू गेल्यावर दोन दिवसास्तव
जर हि माझी अशी स्तिथी
खरेच माझ्या आधी गेलीस
खरेच माझ्या आधी गेलीस
तर मग माझी कशी गती?
३. कांचनसध्या....
पिलांस फुटुनी पंख तयांची
घरटी झाली कुठे कुठे,
आता आपुली कांचनसंध्या
मेघडंबरी सोनपुटें.
कशास नसत्या चिंता-खंती
वेचू पळती सौम्य उन्हे,
तिमिर दाटता बनुनि चांदणें
तीच उमलतील संथपणे.
सले कालचीं विसरून सगळी
भले जमेचें जिवीं स्मरूं,
शिशुहृदयाने पुन्हा एकदा
या जगतावर प्रेम करूं.
उभ्या जगाचे अश्रु पुसाया
जरी आपुले हात उणे
तरी समुद्रायणी प्रमाणें
पोसूं तटिची म्लान तृणें.
इथेच अपुली तीर्थ-त्रिस्थळी
वाहे अपुल्या मुळी-तळी,
असू तिथे सखि! ओला वट मी आणिक तूं तर देव-तळी.
शिणुनी येती गुरें-पाखरें
तीच लेकरें जाण सखे,
दिवस जरेचे आले जरी
त्या काठ जरीचा लावू सुखें...!
४. संधीप्रकाशात अजुन जो सोने...
आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो क्षण अमृताचा,
जे जे भेटे ते ते दर्पणींचे बिंब, तुझे प्रतिबिंब लाडेगोडे…
सुखोत्सवें असा जीव अनावर, पिंजर्याचे दार उघडावे,
संधिप्रकाशांत अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो यावी…
असावीस पास, जसा स्वप्नभास, जीवीं कासावीस झाल्याविना,
तेव्हा सखे आण तुळशीचे पान, तुझ्या घरी वाण नाही त्याची….
तूच ओढलेले त्यासवें दे पाणी, थोर ना त्याहुनी तीर्थ दुजें,
वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल; भुलीतली भूल शेवटली…
५. स्वर्ग नको सुरलोक नको
स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ति नको मज मुक्ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा
शोक हवा परि वाल्मिकिच्या परि सद्रव अन् सश्लोक हवा
हर्ष हवा परि स्पर्शमण्यापरि त्यांत नवा आलोक हवा
शंतनुचा मज मोह हवा अन ययातिचा मज देह हवा
पार्थाचा परि स्नेहविकंपित स्वार्थ सदा संदेह हवा
इंद्राचा मज भोग हवा अन चंद्राचा हृद्रोग हवा
योग असो रतिभोग असो अतिजागृत त्यात प्रयोग हवा
आयु हवे आरोग्य हवे यशभाग्य तसा प्रासाद हवा
श्लाघ्य हवे वैराग्य तयास्तव त्यांत विरोध विषाद हवा
तापासह अनुताप हवा मज पापासह अभिशाप हवा
शिळांत पिचतां जळांतुनी मज निळा निळा उःशाप हवा
मार्क्साचा मज अर्थ हवा अन् फ्रॉइडाचा मज काम हवा
या असुरां परि राबविण्या घरिं गांधींचा मज राम हवा
लोभ हवा मज गाधिजमुनिचा अखंड आंतर क्षोभ हवा
पराभवांतहि अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षोभ हवा
पार्थिव्यांतच वास हवा परि दिव्याचा हव्यास हवा
शास्त्रांचा अभ्यास हवा परि मानव्याचा ध्यास हवा
विश्व हवे सर्वस्व हवे अन् मृत्यू समोर सयंत्र हवा
शरांत परि ही विव्हळतां तनु उरांत अमृतमंत्र हवा
हविभुक सुरमुख मी वैश्वानर नित्य नवा मज ग्रास हवा
हे सुख दुर्लभ वाढविण्या मज चौर्यांशीत प्रवास हवा
६. तापल्या आहेत तारा
तापल्या आहेत तारा तोंवरी गाऊन घे
स्वप्न आहे लोचनीं हें तोंवरी पाहून घे
रे फुलांचा बाण आहे, अमृताची वेदना
नी सुखाच्या आंत आहे शापणारी यातना
त्राण आहे तोंवरी सप्राण हें साहून घे
आग आहे लागलेली अंतरींच्या मोहळा
आणि आकाशांत आहे आसवांचा सोहळा
चालल्या आहेत धारा तोंवरी न्हाऊन घे
वादळीं अंधारल्या पाण्यांतुनी तेजाळुनी
कामिनी आवेगवेडी येत आहे दामिनी
जाग आहे तोंवरी रे दीप हा लावून घे
बोरकरांची आवडती कविता "समुद्र बिलोरी ऐना", त्याच्या अंतिम क्षणी सौ सुनीताबाई देशपांडे यांनी त्यांची अंतिम इच्छा म्हणून दाखवली आसे स्वतः सौ सुनीताबाई ने एके ठिकाणी नमूद केले आहे.
बोरकरांची लोकप्रिय आणी माझी आवडती गाणी जी मी नेहमी ऐकतो.
अनंता तुला कोण पाहू शके,
कशी तुज समजाऊ सांग,
दिव्यत्वाची जेथ प्रचिती,
नाही पुण्याची मोजणी,
झिणी झिणी वाजे बिन,
पांडुरंग त्राता-पांडुरंग दाता
आशा या आवडत्या कवीला ,
बा.भ.बोरकरांच्या स्मृतीला सादर अभिवादन!
प्रतिक्रिया
छान.
सुरेख एकदम
पुल आणि सुनीता बाईंनी "पोएट"
आवडते कवी बाकीबाब. त्यांची
कवींचे कवी असे कां म्हणतात .....
छान
संपादक मंडळाला विनंती..
उत्तम आणि समयोचीत धागा.
नशीबवान आहात
नै हो.. मी श्रीपाद जोशी नाही.
कमनशिबी जोशी......
धन्यवाद, मोदक .... बोरकर
मस्तच कविता,_/\_
बोरकरांच्या अनेक चित्रदर्शी
सर्वच वाचकांचे धन्यवाद
अतिशय सुंदर धागा
रास्त शंका....
वाहवा!
बाकीबाब
माऊलीच्या संजीवन समाधी
वा !
वाह, सुंदरच !
प्रतिभा आणि प्रतिमा - १९७८