Skip to main content

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ६)

लेखक निनाद यांनी शनिवार, 28/08/2021 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ पाचवा भाग १५०पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने - भाग ६

वाचने 29593
प्रतिक्रिया 152

प्रतिक्रिया

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नेमक राष्ट्र खंबीर असल्याची वाटचाल कुठे दिसतेय?? तुम्हाला नाही दिसणार .. तेव्हा जास्त टेंन्शन घेउ नका ... आपला अजेंडा चालु ठेवा ..

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अनिल देशमुखांच्या क्लीनचिटबदल वाचता वाचता मधेच पंडित नेहरू, इंदिरा गांधी.अरविन्द केजरीवाल... प्रचंड भक्तीय विचारांनी भरलेला प्रतिसाद वाचला. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते कसेही वागायला लागले की भक्त म्हणून त्रास होतोच. भाजप आणि त्यांच्या वागणुकीचा सच्च्या कार्यक्रत्याला त्रास हा होणारच आपला प्रतिसाद वाचता वाचता माझेही डोळे भरून आले. माझे डोळे असेच लालकृष्ण अडवांणींना एका अडगळीत टाकले तेव्हा डबडले होते. ज्या संघाची धावसंख्या केवळ दोन होती, तेव्हा त्यांनी चिवटपणे फलंदाजी करून सत्तेची मजा दिली. ज्यांनी कष्ट करून शेती केली त्या शेतात जोमाने पिक आल्यावर थेट 'लॉ ऑफ़ डिमिनिशिंग रिटर्न्स' सिंद्धान्तावर थेट मालकच बदलून टाकले तेव्हा हंबरडा फुटला होता. इतका दगाबाज हाच पक्ष असू शकतो ही कल्पना आजही सहन होत नाही. -दिलीप बिरुटे (आठवणींनी व्याकूळ) :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लालकृष्ण अडवाणींंना अडगळीत वगैरे अजिबात टाकलं नव्हतं. २००९ मध्ये ते भाजप व रालोआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते व त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजप व रालोआने निवडणुक लढली होती. परंतु त्या निवडै भाजपची अजून घसरण झाली होती. भाजपने २०१४ ची निवडणुक मोदींच्या नेतृत्वाखाली लढून जिंकली होती. त्या निवडणुकीत ८६ वर्षीय अडवाणी सुद्धा खासदार म्हणून निवडून आले होते. पंतप्रधान म्हणून मोदींचेच नाव सुरूवातीपासूनच जाहीर झालेले असल्याने निकालानंतर अडवाणींना पंतप्रधान करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता व मंत्रीपदाचा ताण घेण्यासाठी त्यांचे उतारवय योग्य नव्हते. त्यामुळे त्यांना एखादे मंत्रीपद देणे योग्य नव्हते. २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी त्यांचे वय ९१ वर्षे होते व इतक्या उतारवयात त्यांना खासदारकी किंवा इतर कोणतेही पद देणे हा अन्याय ठरला असता. अडवाणींना २०१४ किंंवा त्यानंतर एखादे पद देणे म्हणजे सुनील गावसकरला २०२१ मध्ये आयपीएल सामन्यात खेळायला लावल्यासारखे ठरले असते.

In reply to by श्रीगुरुजी

अडवाणींना २०१७ मध्ये राष्ट्रपती करता आले असते. पण नंतर त्यांनी यशवन्त सिन्हा सारख्या करामती केल्या असत्या तर सरकार गोत्यात आले असते. अडवाणीं बद्दल वाईट वाटले तरी त्यांचे टायमिंग प्रत्येक वेळी चुकले . नियती !

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नाही , मोदी सारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांला भाजपा सारख्या पक्षातुनच पंतप्रधान पद मिळू शकते. मोदींच्या खानदानतून कोणीही राजकारणात नव्हते. तीच गोष्ट अमित शाहांची. भाजपचे अध्यक्ष असूनही अडवणींनी आपल्या मुलांना कोणतेही मोठे पद दिल नाही फक्त सामान्य कार्यकर्त्यांना च पुढे केलं हे फकस्त भाजपातच होऊ शकतय.

In reply to by रात्रीचे चांदणे

फारच सहनशील लोक बा तुम्ही. फालतू पोस्ट्स ना इतकं व्यवस्थित उत्तर द्यायचं आणि मग तो डू आयडी ते सोडून तिसरच काही तरी चिखलफेक करणार.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

फालतू पोस्ट्स ना इतकं व्यवस्थित उत्तर द्यायचं आणि मग तो डू आयडी ते सोडून तिसरच काही तरी चिखलफेक करणार. वैचारिक बद्धकोष्ठाला उपाय नसतो. तेंव्हा त्यांना कुंथावे लागणारच तुम्ही त्यांच्या निम्न दर्जाच्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करणे सोडावे हि विनंती.

In reply to by रात्रीचे चांदणे

हे फकस्त भाजपातच होऊ शकतय.>>> मनमोहन सिंग, लाल बहादूर शास्त्री हे राजकीय खानदाणातून होते?? अमित शहाचा मुलगा बीसीसीआय च्या छाचड्यावर जाऊन बसलाय हे फकस्त भाजपातच होऊ शकते. आमदार गंगाधर फडणवीस ह्यांचा मुलगा, दाळ घोटाळा फेम शोभा फडणवीस ह्यांचा पुतण्या आपली घराणेशाहा वापरून भाजपातच मुख्यमंत्री होऊ शकतो. बाकी कार्यकर्त्यानी फक्त संतरंज्याच ऊचलाव्यात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जवाहर,,इंदिरा, राजीव, सोनीया ,राहुल (देशाचे नशीब अजुन तरी युवराजांना (जाहिर) वारस नाही), प्रियांका, "जिजाजी", मीराया, रेहन छ्या.... कुठेय राजकिय खानदान? हे तर मान ना मान मै तेरा महेमान! सोनीया मायनो-गांधी (वरील लायनीत "डावीकडुन चौथी") यांना अध्यक्षपदाची निवडणुक तर घेउ द्या मग बोला! बाकी कार्यकर्त्यानी फक्त संतरंज्याच ऊचलाव्यात.>>> त्यांना काही प्रोब्लेम नसेल तर?

In reply to by नावातकायआहे

राणे पिता पुत्र, विखे पाटील पिती पुत्र, शहा पिता पुत्र, फडणवीस पिता पुत्र काकू, राजनाथ सिंह पिता पूत्र, सिंधीया घराणं आणी अनेक ह्याना ते भाजपात असल्याने घराणे शाहीचा नियम लागू होत नाही.

In reply to by रात्रीचे चांदणे

मोदी सारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांला भाजपा सारख्या पक्षातुनच पंतप्रधान पद मिळू शकते. मोदींच्या खानदानतून कोणीही राजकारणात नव्हते. तीच गोष्ट अमित शाहांची. भाजपचे अध्यक्ष असूनही अडवणींनी आपल्या मुलांना कोणतेही मोठे पद दिल नाही फक्त सामान्य कार्यकर्त्यांना च पुढे केलं हे फकस्त भाजपातच होऊ शकतय. + १

In reply to by श्रीगुरुजी

८६ व्या वर्षी अडवाणी मंत्रीपद देणे अयोग्य ठरते पण ८९ वर्षांच्या श्रिधरण ह्याना केरळचा मुख्यमंत्री पदाचा ऊमेदवार घोषीत करणे योग्य ठरते. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी खुश्शाल. तुमचे कितीही डोळे डबडबून आले किंवा डोळ्यातून पॅसिफिक महासागर धबधब्यासारखा कोसळला तरी त्याची पर्वा मी तरी करणार नाही. आता पुरोगाम्यांसारखा आणि काँग्रेस समर्थकांसारखा कोडगेपणा अंगी बाणवायला हवा. एकीकडे आम्हाला अमुक एक मूल्ये प्रिय आहेत असे म्हणायचे पण तीच मूल्ये पायदळी तुडविणार्‍यांचे झेंडे नाचवायचे आणि परत इतरांना प्रश्न विचारायचे हे करायला पराकोटीचा कोडगेपणा असावा लागतो. तसा भाजप समर्थकांनी अंगात बाणवावा असे वाटते. कारण दुसर्‍या बाजूला आम्ही जे कोणी आहोत ते आहोत म्हणून आमचा द्वेष करणारे लोक भरले अपसतील तर त्याविरोधात आपली बाजू अगदी १००% धुतल्या तांदळासारखीच हवी असा आग्रह मी तरी धरणार नाही. कारण तसे केल्याने त्याच विरोधी बाजूला बळ प्राप्त होणार असते. जाताजाता अडवाणींचा विषय काढला आहेतच म्हणून एक गोष्ट लिहितो- अडवाणी (आणि वाजपेयींनी सुध्दा) बलराज मधोकांना काय वागणूक दिली होती हे जरा माहित करून घ्या. पेरावे ते उगवते किंवा गुरूची विद्या गुरूला हा निसर्गाचाच न्याय आहे. जे बीज अडवाणींनी पेरले त्याचे परिणाम स्वतः अडवाणींवर होणे क्रमप्राप्त होते. तरी नशीब अडवाणींना मोदींनी पक्षातून हाकलले नाही. बलराज मधोकांबरोबर नेमके तेच अडवाणींनी केले होते. बलराज मधोक हे सुध्दा वाजपेयींसारखेच एक कुशल संघटक आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नेते, तितकेच तळमळीचे कार्यकर्ते होते. भविष्यात ते आपल्याला स्पर्धक होतील हे जाणून अडवाणींनी १९७३ मध्ये त्यांना पक्षातून हाकलले होते. तेच मधोक कायम जनसंघाच्या विचारांशी एकनिष्ठ राहिले. पक्षाने काढले, पक्षाबरोबर मतभेद झाले म्हणून कधीही पक्षाची जी ध्येयधोरणे होती त्याबरोबर त्यांनी कधीही प्रतारणा केली नाही. आपण आणीबाणीच्या काळात अनिश्चितकाळासाठी बंगलोरला तुरूंगात खितपत पडलो होतो हे विसरून २०१५ मध्ये देशात सध्या आणीबाणीसदृश वातावरण आहे हे म्हणायचे ढोंग अडवाणींमध्ये होते ते मधोकांमध्ये नव्हते. तुम्ही जे इतरांबरोबर करता ते कोणीतरी भविष्यात येऊन तुमच्याबरोबरच करणार हा पण काळाचा न्याय आहे. त्यात तक्रार करण्यासारखे काही नाही. तरीही आता आपला काळ सरला, आपले वय झाले तेव्हा आपण स्वतःहून बाजूला व्हावे आणि नव्या नेतृत्वाला पुढे येऊ द्यावे हे समजून घेऊन अडवाणी वागले असते तर त्यांच्यावर ती वेळ आली नसती. पण टिपीकल भारतीय कुटुंबातल्या खाष्ट सासूप्रमाणे त्यांची वागणूक होती. एकीकडे भारतीय संस्कृतीचे ढोल बडवायचे आणि त्याच भारतीय संस्कृतीत वानप्रस्थाश्रम ही संकल्पना नेमकी त्याच उद्देशाने सांगितली आहे हे सोयीस्करपणे विसरून कसे चालेल?

अनिल देशमुखांना सीबीआयने क्लिन चीट दिलेली नाही असे आता स्पष्ट होत आहे. या निमित्ताने एक गोष्ट लिहाविशी वाटते. सामाजिक माध्यमातून फिरत असलेल्या पीडीएफ संदर्भात सीबीआयने खुलासा केलेला नाही. अनिल देशमुखांवर एक अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे असे सीबीआयने स्पष्टीकरण दिले आहे. अदखलपात्र गुन्हा हा अत्यंत हास्यास्पद प्रकार आहे. जेथे धूर दिसतो तेथे आग असतेच, एवढेच मी सांगू इच्छितो व उद्या खरोखरच अनिल देशमुखांना क्लीन चिट मिळाली तरी त्यात अजिबात आश्चर्य वाटणार नाही. ईडी ज्या त-हेने अनिल देशमुखांना फक्त नियमित नोटीस पाठविण्याची औपचारिकता पार पाडून थंड बसून आहे, हे पाहता हा वेळ काढण्यामागे त्यामागे नक्कीच काहीतरी विशिष्ट हेतू आहे असा संशय येतोय. असो. काय होईल ते पुढील काही आठवड्यात समजेलच. अनिल देशमुखांवर पुढे काही कारवाई होणार की अधिकृत क्लिन चिट मिळून ते फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री होणार ते लवकरच समजेल.

काही गोष्टींंचे पुरावे नसतात ते खटले लढवले जात नाहीत. तोंडावर पडायला होतं. मालमत्ता बेनामी असल्यास ज्याच्या निवावर आहे त्यावर जबाबदारी पडते पैसे कुठून आणले दाखवण्याची.

ईडीच्या नोटीसला साधे चिलट सुद्धा घाबरत नाही कारण ...... मागचे एक प्रकरण पाहा. केंद्रिय मंत्री आणि इतर आहेत. अमुक तमुक ठिकाणी आम्ही भेटलो हे सांगितले तर हॉटेलच्या विजिटर नोंदवहीतील पानेच गायब.

In reply to by कंजूस

प्रताप सरनाईक, संजय राऊतची बायको, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, अनिल देशमुखांचा मुलगा व बायको आणि आता अनिल परब अशांना ईडीची नोटीस मिळाली आहे. यातील प्रताप सरनाईक व संजय राऊतची बायको एकदा ईडीसमोर जाऊन आले, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. एकटे खडसे नोटीस न टाळता नियमित चौकशीसाठी जातात. कदाचित इतक्या वर्षांचे भाजपचे संस्कार असतील किंवा आपल्यावर केल्या गेलेल्या आरोपातून पळवाट न काढता कायदेशीर मार्गाने सुटका हवी असेल, पण ते चौकशी टाळत नाहीत. अनिल देशमुख व कुटुंबियांना ५ वेळा नोटीस पाठवूनही त्यांनी नोटीसीला आणि ईडीला सातत्याने धुडकावून लावले आहे. नोटीस पाठविण्यात आलेले सर्वजण शिवसेना किंवा राष्ट्रवादीचे आहेत. चौकशीला घाबरून या दोनपैकी एक पक्ष आपल्याला पाठिंबा देईल या भ्रमात भाजप असावा. पण तसे होताना दिसत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

राज्य सरकार कडे ही यंत्रणा आहेत पण त्या वापरताना राज्य सरकार दिसत नाही, ह्याचा अर्थ असा नाही की राज्यातील भाजप नेते धूतल्या तांदळाचे आहेत ह्याचा अर्थ हा की केंद्रासारखं गलिच्छ वागणं ह्या पक्षाना पटत नसावं. डूकराबरोबर कूस्ती करून आपल्या अंगाला घाण न लागू देण्याचं धोरण राज्य सरकारने स्विकारलंय. राज्य सरकार निश्चीतच मॅच्युरीटी दाखवतंय ह्यात. पण हे किती दिवस चालेल?? केंद्राचा असाच त्रास सुरू राहीला तर मात्र राज्यातील भाजप नेत्यांचे प्रकरणं बाहेर येतील नी एका दिवसात ईडी सर्वाना क्लिनचीट देईल. तसेच ह्या मागे आणखी एक कारण असावं मोदी २०२४ किंवा जास्तीत जास्त २०२९ पर्यंत राहतील. त्यांच्या नंतर कोण? ह्या साठी भाजपात स्पर्धालहोऊ शकते. केंद्रात आपल्याला स्पर्धक तयार होऊ नये म्हणून अमित शहा मुद्दाम राज्यात फडणवीसला मुख्यमंत्री बनन्यापासून रोखत असावेत. पण आपण राज्यात सत्ता येण्यासाठी काहीतरी करतोय असं दाखवण्यासाठी ह्या ईडीच्या चिठ्ठ्यांचा खेळ मांडला असावा. असं असेल तर अमित शहा खरंच चाणक्य म्हणायला हवे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कोणतीही माहिती नसताना बरळण्यात तुमचे तोंड धरणे अशक्य आहे. राज्य सरकार यंत्रणा वापरत नसती तर १०० कोटींच्या वसूलीच्या प्रकरणात अनिल देशमुख लपूनछपून का फिरत आहेत? सचिन वाझे आणि परमवीर सिंग हे काय केंद्र सरकारचे काम करत होते का?

In reply to by जॅक द रिपर

कोणतीही माहिती नसताना बरळण्यात तुमचे तोंड धरणे अशक्य आहे.~~~~~ सगळी अक्कल नी माहिती मलाच आहे जे मी बरळेल तेच खर. मी जर गंजोडी सुशांत ला चांगला म्हणेल तर तो गंजोडी नाही. असा जो तुमचा आविर्भाव आहे ना तो सुधारणा होण्या पलीकडे आहे. राज्य सरकार यंत्रणा वापरत नसती तर १०० कोटींच्या वसूलीच्या प्रकरणात अनिल देशमुख लपूनछपून का फिरत आहेत? सचिन वाझे आणि परमवीर सिंग हे काय केंद्र सरकारचे काम करत होते का? ~~~ ते आरोप सिद्ध व्हायचे आहेत कोर्टात अजून. भाजपच्या विकृत आयटी सेल चे फॉरवर्ड म्हणे न्याय नसतो. अनिल देशमुखाना क्लिनचीट मिळाल्याच्या बातम्या आहेतच काही दिवसांनी वाझे क्लिनचीट सह बाहेर येतील तेव्हा तुमच्या सारखे लोक तोंडावर आपटलेले असतील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

थंड घ्या मस्त वाट बघतोय रिक्षावाला गाणे बघून घ्या तुमचा संताप नक्की नाहीसा होईल.

In reply to by गॉडजिला

वाट बघतो रिक्षावाला ह्या गाण्याशी मी सहमत नसलो तरी मी तुमच्या पाठीशी आहे. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

दिसत नाही, अहो थंड घ्या मस्त गाणे बघा बरे वाट बघतोय रिक्षावाला... तुमचे सर्व प्रश्न संपून जाते ल

In reply to by श्रीगुरुजी

दुसरी बाजू तुम्हा लोकांना बिलकुल माहीत नाही. देश चुकीच्या दिशेने जात आहे,सामान्य लोकांचे जीवन पुढे खडतर आहे. त्या विषयी कोणी लिहले की त्याला बरळणे असे संबोधने हे आधुनिक अंधश्रद्धा चे उत्तम उदाहरण आहे. अमरेंद्र बाहुबली योग्य तीच बाजू मांडत आहेत.फक्त बुद्धीवर चढलेली जळमटे बाजूला केली की त्यांचे बोलणे योग्य आहे हे पटेल.

In reply to by जॅक द रिपर

भाजपात चाळीस वर्षे निष्ठेने काम केल्याचं चांगलचं फळ मिळतय खडसेंना. आज जे भाजपत निष्ठेने काम करताहेत त्यांनी ह्यातून बोध घ्यावा.

In reply to by जॅक द रिपर

असेल. पण ते प्रत्येक वेळी चौकशीसाठी उपस्थित राहिले आहेत. अनिल देशमुखांप्रमाणे ईडीची नोटीस कचराकुंडीत फेकून लपून बसले नाहीत.

भाजपने अनिल देशमुखाना क्लिनचीट दिली असेल तर ती "राष्ट्रहितासाठी" दिली आहे असे समजावे. त्याने चीनचे कंबरडे मोडले जाणार आहे (ते कसे??? असं जो विचारेल तो देशद्रोही) ;)

सय्यद निजाम नावाचा आरोपी 'तांत्रिक' बनत असे. आर्थिक विवंचना असलेली हिंदू घरे शोधून सय्यद निजाम असा दावा करायचा की तो आपल्या तंत्र विद्याने प्रत्येक समस्या झटपट सोडवेल. तंत्र-मंत्राच्या बहाण्याखाली तो हिंदू कुटुंबांना आमिष दाखवून त्यांचा विश्वास जिंकत असे. आणि नंतर त्या घरातील महिलांना अडकवून त्यांच्यावर बलात्कार करत असे. सय्यद निजाम त्या मुलींकडून त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळत होता आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासही लावत होता असा आरोप केला जातो आहे.

कोलकाता, पश्चिम बंगालमध्ये शंभर रुपयांच्या बनावट नोटा छापण्याच्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त केल्या आहेत. बनावट नोटा छापल्याप्रकरणी पोलिसांनी सलीम खान, फैजान अहमद आणि मजीद हुसेन या तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित असल्याचा संशय आहे. सामान्य माणसाला भारतीय नोटेचा कागद मिळवणे जवळजवळ अशक्य आहे, त्यामुळे बनावट नोटांच्या या कटामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आहे याची पोलिसांना खात्री आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, सामान्यत: पैसे छापण्यासाठी कागद परदेशातून यत असावा.

हिंदूंना कोरोनाची लागण व्हावी, हिंदूंमध्ये कोरोनाचा प्रसार वाढावा अशी काही भाजप नेत्यांची इच्छा दिसते. त्यामुळेच चंपा, राम कदम वगैरे निरूद्योगी मंडळी दहीहंडी, मंदिरे उघडा अशी आंदोलने करताना दिसत आहेत.

बाकी या धाग्यावर चंद्रसूर्यकुमार यांचा एक अभ्यासपूर्ण प्रतिसाद सोडला तर केवळ चिखलफेक सोडून दुसरं काय दिसतं आहे? एक आयडी केवळ द्वेषपूर्ण प्रतिसाद सातत्याने देत असून त्याला संपादक मंडळाचे अभय आहे. यामुळे अनेक जुने आय डी मिपावर येणे बंद झाले आहेत हे त्यांनी मला खाजगीत बोलून दाखवले आहे. जर अशीच चिखलफेक चालू राहिली तर मिपाची स्थिती इतर मरणप्राय/ मृत झालेल्या मराठी संस्थळांसारखी होईल यात मला अजिबात शंका वाटत नाही. अर्थात उत्पत्ती स्थिती आणि लय हि जगाची रीत आहे. परंतु एखाद्या संस्थळाचा/ व्यक्तीचा अकाली मृत्यू पाहवत नाही एवढेच लिहावेसे वाटते.

In reply to by सुबोध खरे

एकाच आयडी मुळे mipa कमजोर होईल हे भलताच तर्क आहे काही लॉजिक नाही त्या मागे. इथे फक्त एकच आयडी अभ्यास पूर्ण लिहत नाही हे वाक्य द्वेष पूर्ण आहे. Bjp सरकार अनेक बाबतीत पूर्णतः फेल झालेले आहे. तरी चुकीच्या निर्णयाचे समर्थन कोण करत आहे. पेट्रोल,दर वाढ,डिझेल दर वाढ,गॅस दरवाढ,१५ लाख अजुन आले नाहीत, काळा पैसा उलट जास्त निर्माण झाला,किती तरी बँका बुडाल्या,कर्ज बुडवे मित्र ऐश करत आहेत,सहकार क्षेत्राची पद्धतशीर वाट लावली जात आहे, कविड नियंत्रण करण्यात पूर्ण अपयशी,कामगार चे संरक्षण काढून त्यांची वाट लावली,एक नाही हजारो चुकीचे निर्णय मोदी सरकार नी घेतले तरी . इथले दहा पंधरा आयडी bjp ची थोरवी च गात असतात.जसे ह्यांचा मेंदू कोणी तरी हॅक केला आहे. आणि त्या आयडी चीच प्रतिक्रिया अभ्यासपूर्ण असतात असे जावई शोध इथे काही जण लावत आहे

In reply to by Rajesh188

हेया धाग्यात दोन भाजप समर्थक आय डींनी शिवागाळ केली. पण डाॅ साहेबांच्या मते भाजप विरूध्द लिहीने वैचारीक बध्दकोष्टता आहे. आणी शिवागाळ करनारे वैचारीक प्रगल्भ आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

थोडं थंड घ्या सोबत वाट बघतोय रिक्षावाला गाणे बघितल्यास आपला राग शांत होउ शकतो.

In reply to by सुबोध खरे

काहीही हं डॉक्टर साहेब. चंद्रकुमार सूर्य यांचं प्रचारी काम असलं तरी ते व्यक्तिगत टीका ते करीत नाही, ही त्यांची जमेची बाजू असते. त्याचं आपलं इतिहास उगाळणे वगैरे कंटाळवाणे असले तरी ब-याचदा त्यांचं लेखन माहितीपूर्ण असतं. वास्तवावर ते अपवादाने बोलतात पण भक्त म्हटले की एवढे तेवढे दोष चालायचेच. पण ते आपले आवडते लेखक आहेत. बाकी, मोदी समर्थकांना विरोध सहन होत नाही. त्यामुळे काही आयडिंना टार्गेट करायचा तुमचा नेहमी प्रयत्न असतो. कारण ते योग्य आणि दूसरी बाजू लावून धरतात. बाकी आपली स्वत:ची लिहिण्याची भाषा आणि तिचा दर्जा, व्यक्तिगत टीका ते अनेकदा पाहिलं आहे, त्यामुळे आपलं रुदन हास्यास्पद वाटतं. सौ चूहे खाकर बिल्ली...! एक मिपाकर म्हणून सांगावे वाटते की मिपावर आयडी येत राहतात जात राहतात, मिपा कोणासाठीही क्षणभर थांबल्याचे पाहिलेले नाही. फटल येरर सोडले तर, त्यामुळे मिपाकर म्हणून आपण उत्तम चर्चा, उत्तम संवाद, व्यक्तिगत टीका न करता, कसे होत राहील यासाठी मिळून प्रयत्न करूया....! एकदा तुम्ही सुधारले की सगळे सुधारतील यावर माझा विश्वास आहे. ;) ( ह.घ्या) -दिलीप बिरुटे (मिपाकर)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर एकदा लिहिलेला प्रतिसाद बदलता येतो का? वरचा प्रतिसाद थोडा बदललेला दिसतोय. का माझा गैरसमज झाला? का दुसऱ्या धाग्यात थोडा बदल करून सेम प्रतिसाद लिहिलाय?

In reply to by रात्रीचे चांदणे

मिपावरचे आपले प्रतिसाद बदलण्याची/ सुधारण्याची सोय फक्त संपादक मंडळाला आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर आयडी येत राहतात जात राहतात, मिपा कोणासाठीही क्षणभर थांबल्याचे पाहिलेले नाही चंद्रकुमार सूर्य यांचं प्रचारी काम असलं त्यांच्या बाबतीत ते उजव्या विचारांचे आहेत किंवा भाजप समर्थक आहेत इथपर्यंत मी समजु शकतो पण प्रचारी काम यात आपला पूर्वग्रह साफ दिसतो आहे. या पूर्वग्रहामुळे अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी केलेले निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण आपण विसरला आहात असे खेदाने म्हणावे लागते. आणि संपादक मंडळाच्या अशा धोरणांमुळे त्यांनी मिपावर विश्लेषण करणे थांबवले आहे हे हि आपल्या लक्षात आलेले दिसत नाही माझी भाषा संयत नसते याचे कारण काही लोकांना त्याच भाषेत समजते हे दुर्दैव आहे. मला भक्त म्हणून हेटाळणी करणारे अनेक लोक आहेत पण मला त्यामुळे शष्प फरक पडत नाही. येथे पराकोटीचे द्वेषमूलक प्रतिसाद आल्यामुळे माझ्या सारखे अनेक लोक भाजप सरकारचे दोष दिसत असूनही लिहीत नाहीत. कारण अशा द्वेषमूलक लिहीणार्या लोकांच्या हाती कोलीत दिले जाईल आणि सभ्य आणि वस्तुनिष्ठ चर्चेचा विचका होईल अशी साधार भीती त्यांना वाटते. मोदी समर्थकांना विरोध सहन होत नाही. कंदाहार येथे प्रत्यक्ष काय झाले याचे कोणतेही विश्लेषण न करता भाजप नेते बुळचट आहेत हाच एक धोशा लावणारे बाहुबली काय किंवा १८८ या दोन आयडी केवळ विखारी प्रतिसाद देत असतात पण ते प्रतिसाद केवळ श्री मोदी विरोधी असल्याने त्यावर कार्यवाही करण्याची इच्छा संपादक मंडळ दाखवत नाही असे अनेक लोक बोलून दाखवतात. त्यांनी जर वितंडवाद सोडून व्यवस्थित चर्चा केली तर त्यांचे प्रतिसाद चुकीच्या गृहितकावर आधारित आहेत असे सहज दाखवून देता येतील. पण तशी त्यांना सूचना देण्याची संपादक मंडळाची इच्छा नाहि असे मी जाहीर पणे बोलण्याचे धारिष्ट्य दाखवतो मिपा कम्युनिस्ट पक्षासारखे किंवा हरिण पुच्छा सारखे व्हावे अशी आपली इच्छा असली तर गोष्टच वेगळी. कधीही येथे( हॉटेलात आलेली माणसे ७ ते १५ एवढीच असतात). सध्या १३ ग्राहक आहेत. हा आकडा कायमचा एक आकडी व्हावा अशी संपादक मंडळाची इच्छा असेल तर गोष्टच वेगळी. मिपा चालू राहील यात शंका नाही. कोणी एक य:कश्चित सुबोध खरे आला काय कि गेला काय त्याने काहीही फरक पडणारा नाही हि वस्तुस्थिती. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

सहमत. कुठल्याही गोष्टीचे अनावश्यक सुलभीकरण करून मूळ चर्चेला फाटा देण्यात वाकबगार असणाऱ्या या मंडळीमुळे चर्चा नावाचा प्रकारच बंद व्हायची वेळ आलेली आहे. नवीन काही शिकण्यासारखे बोलले जात नाही. आईवरून शिव्या देण्याचे प्रकार घडतात. चर्चेचा फक्त टोन च नव्हे, तर मूड सुद्धा सांभाळला जायला हवा, ते होत नाही. एका बाजूचे 4 मुद्दे दिले तर एकतर त्या मुद्यांचा प्रतिवाद व्हायला हवा किंवा ते मुद्दे मानले जायला हवे. ते होत नाही. प्रतिवाद म्हणून व्हाटअबाउटरी वापरली जाते किंवा मग ती व्यक्ती गायब होते. काही जुनेजाणते सदस्य काही तरी एकांगी लिहून पुन्हा आठवड्याभरासाठी गायब होतात. व्यक्तींना अगदी बिनधास्तपणे लेबल्स लावली जातात. एकूण सांगायचं तर चर्चेचा एकूण सूर सांस्कृतिकदृष्ट्या अगदी न्यूनतम स्तरावर आणून ठेवण्यात आला आहे.

In reply to by सुबोध खरे

तसेच, निनाद यांचे प्रतिसादही माहितीपूर्ण आहेत आणि धाग्याला धरून आहेत.

In reply to by राघव

धन्यवाद! धन्यवाद!! नोंद घेतली याचा आनंद वाटला.

In reply to by राघव

निनाद यांचे प्रतिसादही माहितीपूर्ण आहेत आणि धाग्याला धरून (तरून नेत) आहेत

भाजपातील घराणेशाही, तसेच भाजपला ऊघडे पाडनारे प्रतिसाद ही चिखलफेक असते. आमच्या कडे मुद्दे नसल्याने आम्ही पळ काढू, त्या प्रतिसादाना फालतू प्रतिसाद संबोधू, वयक्तिक ऊतरून चिखलफेक करू, शिवीगाळ देखील करू. - अखील मिपा भाजप समर्थक संघटना.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कोका कोला पिऊन वाट बघतोय रिक्षावाला गाणे बघितल्यास आपला राग शांत होउ शकतो त्यावर ताल धरता आला तर दुधात साखर, पहा बरे करून... फायदा तुम्हाला, समाधान तुम्हाला.

चालू घडामोडींचा धाग्यात घडामोडी दिसतच नाहीत. फक्त एकाच विषयावर चर्चा -- तेच पालूपद, दोन्ही बाजूंनी :-) संपादक मंडळींनी अशा कंटाळवाण्या चर्चेसाठी एक स्वतंत्र विभाग सुरू करावा जेणेकरून "चालू घडामोडी" सदरात खरोखर त्या दिवशीच्या घडामोडींची चर्चा होईल. "चालू घडामोडी" सदरात चालू घडामोडी वाचायला मिळतील अशा अपेक्षेने वाट पाहत असलेला (तुलनेने) नवीन मिपाकर :-)

In reply to by श्रीगणेशा

काय आहेत देशात विरोधी पक्षातील नेते,आणि संबंधित लोकांवर इडी केस करते.रोज एका विरोध पक्षाच्या नेत्यांवर,बंगाल,महाराष्ट्र,केरळ ह्या राज्यातील सरकार ना त्रास दिला जातो रोज एक कारण काढून यूपी सारख्या पूर्ण fail राज्याचा उदो उदो. आणि काय आहे चालू घडमोडींवर रोज . किती bjp nete त्यांचे मित्र,ह्यांच्या ed नी कारवाई केली? केंद्र सरकार म्हणजे जोक झाला आहे. Bjp नेते, त्यांचे उद्योगपती बँक बुडवे मित्र ह्यांच्या वर केंद्रीय संस्था ed,cbi he कारवाई करत नाहीत. पण महाराष्ट्र आणि बंगाल मधील विरोधी नेत्यांवर रोज काही ना काही कारवाई चालू आहे.

सहाय्यक आयुक्त ज्या एक स्त्री आहेत त्यांची बोटे यूपी किंवा बिहारी फेरी वाल्यांनी झाटली. काश्मीर च नाही तर सर्व दक्षिण भारत आणि महाराष्ट्र मध्ये ३७० कलम लागू करायची गरज आहे. यूपी,बिहारी ची पोट भरण्यासाठी देशाला स्वतंत्र मिळाले आहे का ? म्हणून माझे स्पष्ट मत आहे. चीन,पाकिस्तान,तालिबान,राम मंदिर,ह्या उत्तरेतील संबंधित प्रश्नांना महाराष्ट्र नी जास्त महत्व देण्याची गरज नाही. ठाकरे सरकार नी सर्व अधिकार वापरून त्या पोट भरण्यासाठी इथे आलेल्या आणि डोक्यावर वसलेला गुन्हेगार जन्म भर कसा तुरुंगात राहील ह्याचा बंदोबस्त करावा. केंद्र ed, CBI,sarv niyam बाजूला करून वापरत आहे ना. राज्याने सर्व नियम बाजूला सारून कारवाई करावी.

चीन,पाकिस्तान,तालिबान,राम मंदिर,ह्या उत्तरेतील संबंधित प्रश्नांना म्हणजे आपला भारत हा एक देश आहे या कल्पनेवर विश्वास नाही असे नक्की दिसतंय...

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोर किल्ल्यावर शेर-ए-पंजाब म्हणून प्रसिद्ध महाराजा रणजीत सिंह यांच्या 9 फूट उंच पुतळा आहे. या अभिमानास्पद पुतळ्याची पाकिस्तानात महाराजा रणजीत सिंह यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. मंगळवारी तेहरीक-ए-लबबाईक हे पाकिस्तानचे कार्यकर्ते होते ज्यांनी पुतळा संकुलात घुसून प्रथम महाराजाचा हात तोडला आणि नंतर घोड्यावर बसलेला पुतळा तोडला. पाकिस्तानात, हिंदु आणि शिख महापुरुषांच्या पुतळ्यांची अनेकदा तोडफोड केली जाते, त्याचबरोबर मंदिरांनाही दररोज लक्ष्य केले जाते आहे. आणि कुणावरही कारवाई होत नाही. भारतातील हिंदु आणि शिख समाज या भयंकर घटनेबाबतीत उदासिन असल्याचे दिसते आहे. महाराजा रणजीत सिंह यांनी पंजाबला एक मजबूत प्रांत म्हणून एकसंध ठेवला. ब्रिटिशांना त्याच्या हयातीत त्यांच्या साम्राज्या जवळ येऊ दिले नाही. महाराजा रणजीतसिंहांनी अफगाणांविरुद्ध अनेक लढाया लढल्या. महाराजा रणजीत सिंह यांनी काश्मीरचे सुभेदार आतमोहम्मद यांच्या तावडीतून काश्मीर मुक्त करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेमुळे घाबरून आत्ममोहम्मद काश्मीरमधून पळून गेला. त्यांनी मुस्लिम युवतीशी लग्न करून तिला हिंदु करून घेतले होते. अमूल्य हिरा कोहिनूर हे महाराजा रणजीत सिंह यांच्या तिजोरीत होता. जगन्नाथपुरीच्या मंदिरात आदरणीय भगवान जगन्नाथ यांना कोहिनूर हिरा अर्पण करण्याची त्यांची इच्छा होती. हिंदू मंदिरांना सोने अर्पण करण्यासाठी महाराजा रणजीत सिंह प्रसिद्ध होते. १८३९ मध्ये महाराजा रणजीत यांचे निधन झाले. त्याची समाधी लाहोरमध्ये बांधण्यात आली आहे. पुढे ब्रिटिशांनी शिखांकडून कोहिनूर हिरा घेतला.

काल श्रीनगरमध्ये जन्माष्टमी साजरी झाली. अगदी रस्त्यावर काश्मीरी हिंदूंनी जन्माष्टमीनिमित्त यात्रा काढली होती. janmashtami हा फोटो श्रीनगरमधील लाल चौकातला आहे. इतकी वर्षे तो लाल चौक म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा होता. ज्यांनी ३० वर्षांपूर्वी काश्मीरी हिंदूंना नेसत्या वस्त्रानिशी काश्मीर खोर्‍यातून हाकलून दिले होते त्यांच्या नाकावर टिच्चून त्यांच्याच अड्ड्यामध्ये हिंदूंनी जन्माष्टमीसारखा सण साजरा करणे हे खूप महत्वाचे आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आता ख्रिश्चनांचे आणि मुसलमानांचे हिंदू धर्मात धर्मांतर करायला सुरुवात करायला हवी. छोट्या छोट्या चकमकी जिंकून युद्ध जिंकले जात नाही. पी एम केअर फंडाचा यासाठी वापर व्हायला हरकत नाही.

आधीच्या ५ भागांत ही बातमी मांडल्या गेली असेल तर लक्षात नाही. कदाचित नेहमीच्या धुरळ्यात बातमी हरवलेली असेल! नीतीआयोगा अंतर्गत ४ वर्षांची National Monetisation Pipeline (NMP) मांडण्यात आली आहे. जवळपास ६ लाख कोटींच्या सरकारी मालमत्तेची पुनराखणी करण्याचा हा प्रयत्न असेल. एका ठिकाणी अडकलेले पैसे सरकारने काढून घेऊन दुसर्‍या नवीन किंवा होऊ घातलेल्या पायाभूत सुविधांसाठी वापरण्यासाठी हे प्लॅनिंग असल्याचे समजते. लिंक

In reply to by राघव

छान योजना! मागील सरकारने गेल्या ७० वर्षात काहीच चांगले काम केले नसून केवळ भंगार जमा केले. आज ह्या भंगाराची किंमत कैक लाख कोटी असून, त्याचा गंज भाड्याने देऊन ६ लाख कोटी मिळणार असे हे सरकार म्हणतंय हे,कसे मिळणार ह्याचा तपशील अजून दिलेला नाही. संसदेतही चर्चा झालेली नाही. नोटाबंदी योजनेतून जसे ३ - ४ लाख कोटी सहज मिळणार होते ( तितके मिळाले नाही ही वेगळी गोष्ट ). हि सुद्धा तशीच काही योजना असावी. " डिटेल्स नही बतायेंगे " हे ह्या सरकारचे घोषवाक्य आहे.

In reply to by आग्या१९९०

खरंय. सरकारला अक्कल नावाची गोष्टच नाही. माहिती अन् तपशील द्यायचाच नाही अन् उगाच आपलं खोट्यानाट्या बातम्या पसरवण्यासाठी नीती आयोग नेमून ठेवलाय! बाकी संसदेत चर्चा वगैरे... म्हणजे विरोधकांनी कितीही गदारोळ संसदेत केला, राडा घातला तरी चर्चा त्या गोंधळात देखील होऊच शकते. विरोधकांना चर्चा करायचीच नसतांना देखील चर्चा झालीच पाहिजे, हा सरकारचा अट्टहास देशाला बुडवणार आहे कधी तरी..!

In reply to by राघव

खरंय. ज्या पायरीवर माथा टेकला त्या जागेवर उद्या एखादा पकोड्याचा गाडा लागलेला दिसेल. सरकारला आत्मनिर्भर रोजगार दिल्याचे समाधान आणि महसूलही. असंही आत जावून गप्पच बसायचे असते. " डिटेल्स नही बतायेंगे " चे लाड सर्वोच्च न्यायालयासमोर चालत नाही,तिथे सगळे भांडे फुटते.

"केंद्र ed, CBI,sarv niyam बाजूला करून वापरत आहे ना. राज्याने सर्व नियम बाजूला सारून कारवाई करावी" तक्रार व आवश्यक माहिती दिल्यास ई.डी. कारवाई करते. महाराष्ट्रात जी ई.डी.ची कारवाई पाहताय त्यामागे किरीट सोमैय्या ह्यांनी ई.डी.ला दिलेली माहिती हे आहे. भावना गवळी असो वा प्रताप सरनाईक,हाताची दहाही बोटे तोंडात जातील अशी संपत्ती ह्या मंडळीनी जमवली. गवळी ह्यांनी ४३ कोटीचे कर्ज बुडवले आहे व अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे. अशीच माहिती विरोधकांना/मीडियाला भाजपा नेत्यांबद्दल असेल तर ती माहिती त्यांनी ई.डी.ला द्यावी. ई.डी काही करत नसेल तर तसे मीडियासमोर येऊन सांगावे. ई.डी कारवाईमागे राजकीय हात आहे का ? अर्थात आहेच. पण सामान्य मतदाराला फरक पडत नाही. घाण जात असेल तर बरेच आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब नमस्कार! तुम्ही व तुमचे हे कसे आहेत?? काय सांगावे अमेरिकन लोकांना ईडा चा त्रास सुरुय आणी मराठी लोकांना ईडीचा त्रास सुरुय. अमेरिकेन आणी मराठी माणसात एक साम्य आहे, दोन्हीही खंबीर आहेत. ते ईडा ला पुरून उरतील आणी हेही ईडी ला पुरून उरतील.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

इथे नावाला राज्य घटना आहे,नावाला कायदे आहेत ,नावाला नियम आहेत. .फक्त दाखवण्यासाठी. बाकी सर्व सावळा गोंधळ आहे .जंगल राज आहे भारतात हो बलवान तो निर्दोष सत्ताधारी हे निर्दोष असतात आणि विरोधी दोषी.. ह्या मध्ये पण dumy असतात. भारतात उत्राम प्रशासन,सा

केंद्रीय संस्था ह्या बटिक आहेत.आज पर्यंत किती bjp नेत्यांवर,खास मित्रांवर ते जावई च आहेत देशाचे. ह्यांच्या वर केंद्रीय संस्थेने काय कारवाई केली. महा चोर तिथेच जास्त आहेत. सरकार बदल की पाहिले काम सर्व अधिकार मंडळी ना बरखास्त करणे हेच काम नवीन सरकार नी करावे. आणि झाडू नाही तर vaccume मशीन लावून देशाची सफाई कारवाई . थोडा पण कचरा जो मोदी सरकार नी केला आहे तो शिल्लक नाही राहिला पाहिजेत