संध्याकाळी गप्पा मारताना नाना (वामनसुत)त्यांच्या लहानपणच्या आठवणी सांगत होते. त्यांना आम्ही त्या लिहून काढण्याचा आग्रह धरला. २,३ दिवसांनी त्यांनी लिहायला सुरुवात केली. ४,५ पाने लिहून झाल्यावर मला वाचायला दिली. मी त्यांना मिसळपाववर लेखांच्या स्वरुपात प्रकाशित करु असे सांगितले तोपर्यंत त्यांना मिपा किंबहुना मराठी संस्थळे आणि त्यावर लिहिले जाणारे लेखन यांची माहिती नव्हती. ते आपलं मला नाउमेद करायचं नाही म्हणून म्हणाले कर तुला हवे तर प्रकाशित. त्यांच्या नावचा वेगळा आयडी काढून मुद्दामहूनच त्यांची आयडेंटीटी उघड न करता मी 'व्हेळातले दिवस'टंकले.पहिल्याच लेखाला आलेले प्रतिसाद पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि हळूहळू त्यांची ह्या माध्यमाशी आणि मिपाशीही ओळख होत गेली आणि आलेल्या प्रतिसादांनी हुरुप येऊन ते पुढचे भाग लिहित गेले,आपल्या लेखाचे प्रतिसाद किती झाले आहेत? ह्याची चौकशी माझ्याकडे करु लागले आणि मग आम्ही रोज १ भाग प्रकाशित करुन स्मृतिगंध ते जर्मनीत असेपर्यंत पूर्ण करण्याचे ठरवले. जशी आपणा सर्वांना स्मृतीगंध वाचण्याची चटक लागली होती तशी त्यांना प्रतिसाद पाहण्याची ,
१५ दिवस त्यांच्याबरोबर मीही टाइममशिनमध्ये बसून ७०,७५ वर्षे मागे गेले. स्मृतीगंध पूर्ण होताना पाहणे हा माझ्यासाठीही एक आनंददायी अनुभव होता, आपणा सर्वांच्या प्रेमाने, कौतुकाने आम्ही भारावून गेलो आहोत,असाच लोभ असू द्या.
स्वाती व दिनेश
१५ दिवस त्यांच्याबरोबर मीही टाइममशिनमध्ये बसून ७०,७५ वर्षे मागे गेले. स्मृतीगंध पूर्ण होताना पाहणे हा माझ्यासाठीही एक आनंददायी अनुभव होता, आपणा सर्वांच्या प्रेमाने, कौतुकाने आम्ही भारावून गेलो
स्वातीताई आपण नानांना लिहित केलत कारण हा अनुभव आपल्या मिपाकरांनीही शेअर करावा अशीच आपली इच्छा असणार! आम्हालाही खुप आनंददायी वाटल. स्मृतीगंध असाच दरवळत राहो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
एक मोठे काम केले आहेत तुम्ही. ते अर्धवट ठेवू नका. अकरा भागांमध्ये (तेही इंटरनेटच्या हिशेबातले) एकूण एका पिढीचा कालखंड बसवण्याची कसरत काय असते ती ठाऊक आहे.
हे सारे लेखन वाचनीय जरूर झाले आहे. तसे मी वेळोवेळी लिहिलेही आहे. पण त्याहीपलीकडे हे लेखन अपूर्णतेची हुरहूर लावून जाते. ते त्याचे यश जरूर आहे. पण अपूर्णतादेखील इतकीही नको. आणखी काही स्मृतिचित्रे असतील. नेमके प्रसंग असतील, घटना असतील. किंवा कदाचित आत्ताच्या लेखनातही अशा घटना, प्रसंग दृष्टीतक्षेप टाकल्याच्या स्वरूपात आली असतील. त्यांचा विस्तार होऊ शकतो. जरूर विचार करा.
चांगले लेखन वाचायला दिल्याबद्दल कृतज्ञ.
नाना, सर्व लेख वाचले. माझ्या वडिलांच्या आयुष्याचा पट डोळ्यासमोर आला. आयुष्यभर वणवण करून "संध्याकाळी' कृतार्थ जीवन जगत आहात, हे वाचून अत्यानंद झाला. आपण खरेच खडतर आयुष्य जगला आहात. मात्र, हार न मानता झुंजत राहिलात म्हणूनच जिंकलात. हे लेख म्हणजे केवळ तुमच्या आयुष्याची माहिती नाही, तर माझ्यासारख्या असंख्य तरुणांना कष्टाला पर्याय नाही, हे ठासून सांगणारे पाठ आहेत, असे वाटते. आमची पिढी बरीच सुखावह आहे. तुमच्यासारखे कष्ट, दोन-दोन, तीन-तीन नोकऱ्या कराव्या लागत नाहीत. किंबहुना केल्यास चांगलेच; पण कुणाला त्याची गरज वाटतेच असे नाही. असो. लिखाण खूप ओघवते आहे. तुमच्या आयुष्यात आणखी काही नाट्यपूर्ण प्रसंग घडले असतील. ते एकत्रित बांधून त्याचे आत्मचरित्रपर पुस्तक करावे, असे वाटते.
यापुढेही असेच कृतार्थ जीवन जगा. आपल्याला दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!
फारच छान! असेच आम्हीपण आमच्या वडिलांना लिहीण्यासाठी उद्युक्त केले आहे.
आधीच्या पिढ्यांनी वास्तवीक असे नक्की लिहून ठेवावे. तो केवळ कुटूंबासाठीच नाहीतर काही अंशी समाजासाठी साठा आहे. कारण त्यातून अनेक गोष्टी, संस्कार, संस्कृती, त्यातील बदल आपल्याला कळू शकतात. विशेष करून स्वातंत्र्याच्या आधी आणि जवळपास जन्माला आलेल्या पिढीने बरेच बदल पाहीले आहेत: बैलगाडीपासून ते विमानापर्यंत, जगाशी नाते नसलेल्या खेड्यापाड्यापासून ते शहर-परदेशापर्यंत, चौकात जाऊन गांधीहत्येनंतरचे भाषण एकाच रेडीओवर सगळ्या गावाने ऐकण्यापासून ते स्वतःच्या बेडरूममधे मुलांकडून आंतर्राष्ट्रीय फोनवरून लॅपटॉप आणि इंटरनेट वापरण्याच्या सुचना घेई पर्यंत, एकत्र कुटूंबापासून एकाकीपणा अनुभवेपर्यंत आणि अर्थातच स्वातंत्र्याच्या पहाटे आदर्शांच्या स्वप्नांपासून ते अनेक अर्थाने त्या स्वप्नभंगापर्यंत...
काय बोलू आणखी??
स्वातीताई, वामनसूत तुझे सासरे असणार याची साधरण कल्पना आली होती. पण काही बोललो नाही कोणालाच.
असो... लेखन समाप्त नको.. चालू राहुदे.
काकांना... धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
तुमचे लेखन, विशेषतः हा शेवटचा भाग वाचताना सारखं 'जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले, तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले' आठवत होतं. तीच नम्र कृतार्थतेची भावना. लेखमाला संपली म्हणून एखादी सुरेल मैफल संपल्यासारखं थोडं वाईट वाटतं आहे, पण हे लेख वाचायला मिळाले याचा आनंदही मोठा आहे. आमच्यापर्यंत ही लेखमाला पोचवल्याबद्दल स्वातीताईचे विशेष आभार.
जणू प्रभातचा एखादा सुंदर चित्रपट पहात आहोत असे वाटले....
लेखकाचे हार्दिक अभिनंदन!!
आता लिहायला सुरवात केली आहे तर ते या मालिकेनंतर खंडित होऊ नये ही प्रार्थना!!!
पुढील लेखनासाठीही शुभेच्छा!!
ति.नाना, अप्रतिम लेखमाला.. =D>
जवळ जवळ ५० वर्षाच्या काळखंड अगदी चित्रमय उभा केलात...नतमस्तक..
फ्रांकफुर्ट मध्ये तुम्हाला २-३ वेळा भेटलो पण पत्ता लागू दिला नाहीत.. आणि स्वाती आणि दिनेश त्यांच्याकडे मी नंतर बघतो X( ....
'व्हेळ' हे नाव दिनेश कडून ऐकल होते पण लक्षात नाही आले ~X( .... आजच्या लेखात "फ्रांकफुर्ट''आले तेव्हा जरा शंका आली.. :W 'जे.के सोडून क्रॉम्टनग्रीव्हजमध्ये' वाचल्यावर खात्रीच झाली.. #o L)
अतिशय अप्रतिम लेखमाला हे परत परत सांगावेसे वाटते.. =D> =D> =D> आणि आपल्याला भेटता आले आणि आपल्याशी गप्पा मारता आल्या या बद्दल मी स्वत।ला नशिबवान समजतो..
(नशिबवान)केशवसुमार <:P
बाकी स्वाती आणी दिनेश.. आपण पाळलेली गोपनियता धन्य आहे!!
अवांतरः ति.नाना, आता मला खायला मिळालेल्या तुमच्या हातच्या लोणच, भरल्या मिरच्या आणि मसाल्याची आमटी या पाककॄती सर्व मिपाकरांना निदान वाचायला द्या.... सर्व मिपाकरांना टूकटूक.. :P
(पुन्हा नशिबवान)केशवसुमार <:P
अगदी भारावुन गेलो. काय लिहु तेच सुचत नाही. अगदी पहिल्या भागापासुन या लेखमालिकेने वेड लावलं होतं. अगदी साध्या सोप्या ओघवत्या शैलीत आपल्या जिवनाचा पट उलगडुन दाखवला. लिखाणातही तोच साधेपणा. अगदी सुरेख. लोकांना वेड लावायला काहीतरी भव्यदिव्यच लागते असे मुळीच नाही.
तुमचे अनुभवाचे बोल अजुन येउद्यात.
(नतमस्तक) सुक्या (बोंबील)
एवढेच केवळ शब्द आहेत आपल्या लेखमालेला.
तुम्हाला आमचा नमस्कार. :)
स्वाती ताई तु ही ग्रेट आहेस. :)
मिपावर स्वातीताईंच्या रेसिपी आणि प्रवासवर्णनांनी मिपाकरांना आपले केले आणी तुम्ही तुमचा जीवन वृत्तांत साध्या सोप्या भाषेत आम्हाला सांगितलात आणि आम्हा मिपाकरांशी असलेली आपुलकीची नाळ अजुन घट्ट केलीत.
तुमच्या ह्या सुंदर लेखमालेसाठी तुम्हाला धन्यवाद . :)
सहजरावांशी शब्दशः सहमत आहे ...
>>उत्कृष्ट लिखाण. लिखाणातुन जवळचे वाटत असलेले नाते प्रत्यक्षातही तितकेच जवळचे निघाले आम्ही मिपाकर खरोखर >>भाग्यवान आहोत.
+++++++++++++++१, हेच म्हणतो ...
आंतरजालावरची एक अत्यंत नितांतसुंदर लेखमाला म्हनुन मी ह्याचा अवश्य उल्लेख करेन ...
खुपच रोचक आणि गतीशील लिखाण होते, जणुकाही आम्ही एखाद्या निवांत संध्याकाळी जेवण झाल्यावर "आजोबांच्या गोष्टी" ऐकत आहोत असेच वाटत होते.
महत्वाचे म्हणजे काळ इतका जुना असुनसुद्ध त्यातले डिटेल्स आहे तसे अगदी तारखेनिशी लिहल्याने फारच "क्लास" झाले आहे लिखाण ...!
बाकी आख्ख्या लेखमालेतुन कधीच स्वातीताई आणि दिनेशदादा ह्यांचा चुकुनसुद्धा "उल्लेख" आला नाही हे लिखाणाचे यश म्हणावे लागेल, अगदी शेवटच्या भागात हा सुखद धक्का दिलात ....
आजोबा, आता इथे थंबु नकात ....
ही लेखमाला संपली तर संपुद्यात, अजुन दुसरे असेच काहीतरी हाती घ्या ...
आम्हाला तुमचे लिखाण आवडते, अजुन असेच येऊद्यात ...
------
( वामनसुतांचा फॅन ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
आजोबा, आजपर्यंत रोज व्यसन लागल्यासारखंच तुमचं लिखाण, नव्हे कथन, वाचत होते. आता रूखरूख लागली आहे की रोज तुमचं लिखाण वाचता येणार नाही. पण तुम्ही आम्हा नातवंड, पोरा-सोरांना नाऊमेद करणार नाहीत अशी आशा आहे. तुमचं आणखी जास्त लिखाण वाचायला आवडेल.
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
बाकी आख्ख्या लेखमालेतुन कधीच स्वातीताई आणि दिनेशदादा ह्यांचा चुकुनसुद्धा "उल्लेख" आला नाही हे लिखाणाचे यश म्हणावे लागेल, अगदी शेवटच्या भागात हा सुखद धक्का दिलात ....
आजोबा, आता इथे थंबु नकात ....
ही लेखमाला संपली तर संपुद्यात, अजुन दुसरे असेच काहीतरी हाती घ्या ...
आम्हाला तुमचे लिखाण आवडते, अजुन असेच येऊद्यात ...
डान्याशी १०००१% सहमत
(वामनसुत आजोबांच्या लिखाणाचा पंखा )घाशीराम कोतवाल
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
फारच सुंदर वर्णन.... आयुष्याच्या प्रवासाचे.
आपण भरपूर कष्ट केलेत तरी इतकं साधं, सुंदर वर्णन..... कुठेही कटुता नाही.
खरंतर प्रतिक्रियेसाठी शब्द जुळवावे लागताहेत.
रेवती
काय प्रतिसाद देऊ असं झालंय.शब्दच उरले नाहीत.
स्वाती ताई यांचे आभार.
वामनसुत यांना साष्टांग दंडवत ___/\___
आपण आपल्या अशाच लेखांनी मिपाला आणि मिपाकरांना समृद्ध करावे. =D> =D> =D>
नारायणराव, आपली मैफल मस्त रंगली. तिची समाप्तिही आपण तितक्याच समर्थ भैरवीने केलीत.
पण आता इथेच थांबू नका. अशाच वेगवेगळ्या मैफिली सादर करत चला.
पुढील लिखाणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
अतिशय सुरेख अशी लेखमाला होती ही. सगळे भाग संपल्यावरच प्रतिसाद देऊ म्हणून थांबले होते, पण ही लेखमाला सुरुच रहावी असे वाटत होते, हे मात्र खरे. अतिशय साधे सुधे पण मनापासून केलेले प्रांजळ लिखाण खूप भावले. अजूनही काही जरुर लिहा. वाचायला खूप आवडेल.
स्वातीताई , तू सगळे भाग टंकून आमच्यापर्यंत पोहोचवलेस याबद्दल तुझेही खूप खूप आभार.
सुंदर लेखमाला. आपल्या या संपूर्ण लेखमालेला हा माझा एकमेव प्रतिसाद. आपले एकामागोमाग एक नोकर्या, व्यवसाय बदलणे आणि प्रत्येक नवीन व्यवसायात यश संपादन करणे हे माझ्यासारख्या तरुणाला एक आदर्श आहे. आपल्यासारखे सरळमार्गी, उद्यमी व्यक्तीमत्व माझ्यासाठी कायमच प्रेरणादायी आहे.
आपल्याला लिहीते केल्याबद्दल स्वातीताईंचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
(प्रभावित)
पुण्याचे पेशवे
एका कर्तृत्ववान व्यक्तीच्या जीवनाचा प्रवास, त्याच व्यक्तीच्या शब्दात वाचून धन्य झालो.
स्वतःच्या जीवना बद्दल इतक्या तटस्थपणे इतके उत्तम लेखन केलेत.
फार आवडले!
श्रीकृष्ण सामंत व आपण अशी बुजुर्ग माणसे मिपावर वावरत रहावीत.
धन्यवाद!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
एका कर्तृत्ववान व्यक्तीच्या जीवनाचा प्रवास, त्याच व्यक्तीच्या शब्दात वाचून धन्य झालो.
हे लिखाण आम्हा सर्व युवा वाचकांना मार्गदर्शक ठरेल. धन्यवाद :)
अतिशय सुंदर लेखन. स्वातीताई तुमचे आभार मानाचे तेवढे थोडेच. अप्रतिम कथन. लेखमाला कधीच संपु नये असे वाटत होते. वामनसुत आम्ही आपले पंखे.
(वामनसुतांचा पुढील लिखाणांच्या प्रतिक्षेत)दिपक.
नंदनने म्हटल्या प्रमाणे :
लेखमाला संपली म्हणून एखादी सुरेल मैफल संपल्यासारखं थोडं वाईट वाटतं आहे, पण हे लेख वाचायला मिळाले याचा आनंदही मोठा आहे. आमच्यापर्यंत ही लेखमाला पोचवल्याबद्दल स्वातीताईचे विशेष आभार. स्वाती ताइने लिहिल्या प्रमाणे टाइम मशीन मधून ७०-७५ वर्ष मागे नेलं सगळ्या मिपाकरांना.
ही पूर्ण लेखमाला, आजोबांचा जीवन प्रवास आणि सगळ्या गोष्टी विलक्षण सहजतेने लिहिणं.
काय प्रतिसाद देणार यावर. खरं तर रोज लहान सहान गोष्टींनी मनाला - स्वतःला आणि इतरांना खूप त्रास करुन घेतो आम्ही आत्ताच्या पिढीतले सर्व. तुमच्या दशांशाने सुद्धा कष्ट, त्रास किंवा अडचणी आल्या नसतील. तुमच्या कृतार्थ आयुष्याकडे पाहून आमचे त्रास आणि आकांक्षा फार लहान वाटायला लागल्या. काही निराळाच झटका देऊन गेला हा अनुभव.
तुमचं लिहिणं तर अप्रतिम आहेच. पण त्यातली सहजता आणि दिसून येणारी एक शांत विचारधारणा ही अत्यंत परिणामकारक आहे.
सगळी लेख माला इतकी भावली मिपाकरांना याचं महत्त्वाचं कारण त्यातून दिसणारं तुमचं व्यक्तिमत्व काही विशेष आहे, वेगळं आहे.
सर्व विचारांचे, लिखाणाचे इतके 'क्लिशे' तयार झालेले असताना हा एक सुखद धक्काच होता.
आजोबा - एकच विनंती. आता काही तुम्हाला योग्य वाटेल, आवडेल अशा गोष्टींवर जास्त तपशील वार अजून लिहा.
इतकी हुरहुर चांगली नव्हे.
तुम्हाला आम्ही धन्यवाद काय देणार ... इथल्या किती तरी नातवंडांना खूप आनंद दिलात तुम्ही...
सगळे भाग संपले की शेवटच्या भागातच प्रतिक्रिया द्यायची असे ठरवले होते...
अप्रतिम लेखमाला...
इतक्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन तुम्ही आयुष्याच्या या टप्प्यावर पोचला आहात..हा सगळा प्रवास आम्हा सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे....
तुमची लेखणी अशीच चालु राहुदेत...
इंटरनेटच्या माध्यमातून हे सर्व लिहिताना धाकट्या सुनेचे ( मिपाकर स्वाती दिनेश )टंकलेखन व लेखांच्या जुळणीकरता सहाय्य घेतले आणि हा स्मृतीगंध आपणासमोर आणला.
हा रहस्यभेद खासच... :-)
हॅटस ऑफ टु यु ... आणि स्वातीताई :-)
-स्मिता श्रीपाद.
नानासाहेब,
मिपा हे संस्थळ काढून किती कृतकृत्य वाटलं हे शब्दात सांगू शकत नाही. आपल्यासारख्या वडिलधार्यांचा मिपावर असाच नेहमी कृपाशीर्वाद रहावा एवढीच नम्र विनंती...
मिपावरील आपल्या लेखनाची ही एक टर्म संपली असं म्हणायला हरकत नाही. परंतु यापुढेही आपले असेच स्वान्तसुखाय लेखन मिपावर सुरू रहावे एवढीच विनंती..
इथूनच नमस्कार करतो..
स्वातीचेही आभार...
आपला,
(कृतकृत्य) तात्या.
खरडवही व पोस्टहापीसची सुविधा सुरु झाल्यावर आलेल्या खरडींना जरूर उत्तरे देईन.
नानासाहेब, ही सुविधा आपल्याकरता सुरू करायची राहिली त्याबद्दल क्षमस्व. आता ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. तरीही काही अडचण आल्यास कृपया मला अवश्य कळवा.
तात्या.
फारच सुरेख.. आयुष्य म्हणजे आजवरच्या श्वासांची बेरीज न्हवे तर ; श्वास विसरयला लावणारया , रोखून धरलेल्या क्षणांची बेरीज..
आपल्या आयुष्यातील अशा क्षणांच्या स्मृती व त्यांचा स्मृतीगंध फारच भावला... पुढील लेखनासाठी शुभेच्छा
जाता जाता इतकेच म्हणेन..
भले बुरे जे घडून गेले,
विसरुन जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर..
कसे कोठूनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतूर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर..
.....
सुरेख लेखमाला ! !
संपली म्हणून खूप वाईट वाटले.
तुम्हाला आणि स्वातीताईंना अनेकानेक धन्यवाद.
(देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.)
लेखमाला संक्षिप्त झाल्याने चुटपुट लागली आहे.तरीही आपले अनुभव नव्या पिढीसमोर मांडल्याबद्दल आभार.
इतर सर्व प्रतिसादकांप्रमाणेच मलाही लेखकाच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना वेगळ्या काढून अधिक विस्तारपूर्ण लिहिल्यास वाचायला खूप आवडेल.
(लेखकाशी जवळचे नाते असूनही त्रयस्थ दृष्टीकोन बाळगून टंकन केल्याबद्दल टंकलेखिकेचे कौतुक आणि आभार)
अप्रतिम लिहिल आहे रोज वाचायचि सवय झालिय .किति विविधता आहे,एकाच आयुश्यात.म्हटल तर सरळ ,पण खाचखळग्यानि भरलेल.स्वातिचे॑ हि अभिनन्दन .रोज पाटपूर्रावा केल्याबद्द्ल्.पुन्हा एकदा अभिनन्दन
फार सुंदर लेखमाला झाली. या आधीचे तीन भाग अजून वाचायचे राहिले आहेत, ते लवकरच वाचतो. शेवटचा भाग उत्सुकतेने आधीच वाचला.
वरील प्रतिसादांतील सर्वांशी सहमत आहे. विशेषकरुन नंदन, विकास आणि सहज यांच्या प्रतिसादाला अजूनच सहमत :)
सहज म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही जवळच्या ओळखीचे निघाल्याचे पाहून सुखद धक्का बसला. आनंद झाला.
हे आईवडिल आणि वहिनीच्या आशीर्वादांचेच संचित.
ज्यांच्याप्रति आयुष्यभर कृतज्ञ राहावे अशी माणसे आयुष्यात लाभणे ही सुद्धा श्रीमंतीच आहे असे मला वाटते.
प्रत्येक भाग वाचनीय होता आणि यापुढे सुद्धा आपले लेखन वाचायला आवडेल. आम्ही सर्व वाट पाहू.
स्वातीताईने मिपावर हे सर्व लेखन आणले यासाठी तिचे सुद्धा आभार.
-- लिखाळ.
प्रतिक्रिया
स्मृतीगंधाची घडणी !
टाईम मशीन
वामनसुत आणि स्वाती आणि दिनेश...
कृतार्थ जीवन
अप्रतिम.
फारच छान!
विकास दादा
हॅट्स ऑफ!!!!
तू दिलेले गीत माझे...
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सहमत
सहमत.. मी
सुरेख लेखमाला!
जहबहराहा...
काय प्रतिसाद देउ. .
-
हेच म्हणणे.
+१
+२
अप्रतिम !
अप्रतिम
अगदी अगदी ...
+१
+१
+२
बाकी
फारच सुंदर
अगदी असेच
सर्व प्रतिसदांशी १००% सहमत्त
एक सुंदर मैफल!
अतिशय
सहमत
प्रेरणादायी
वामसुतांनो! फार सुंदर लेखन!
+१
फार छान
केवळ
अजून लिहा!!
सुंदर..
नानासाहेब,
तात्या, ग्रेट!
खरडवही व
फारच सुरेख
सुरेख
खुपच सुंदर...
अप्रतिम लेखमाला....
चुटपुट
सहमत
वामनसुत ,स्वति दिनेश
सुंदर लेखमाला..
फार सुंदर