दिघी - आगरदांडा फेरी बोट
दिघी - आगरदांडा फेरीबोट (श्रीवर्धन ते मुरुड )
आताच (१९ एप्रिल २०१९ ) श्रीवर्धन ते मुरुड जाण्यासाठी मधल्या फेरीबोटीने ( दिघी - आगरदांडा फेरीबोट ) गेलो.
कोकणात सुटीत बरेच पर्यटक अलिबाग - श्रीवर्धन भागात पर्यटनासाठी जातात.
अलिबाग - नागाव - रेवदंडा -कोरलई - बारशिव बीच - काशिद बीच - नांदगाव - मुरुड रस्ता आहे, मुरुड ते दिघी खाडी आहे.
दिघी - दिवेआगर - श्रीवर्धन - हरिहरेश्वर रस्ता आहे. किंवा दिघी - बोर्ली पंचतन -श्रीवर्धन रस्ता आहे.
मुरुड ते दिघी खाडी पार करण्यासाठी एक लाँच सर्विस पुर्वीपासून होती. यातून प्रवासी जात होते पण गेल्या तीनचार वर्षांपुर्वी एक फेरी बोट सुरू झाली ( जंगली फेरीबोट) त्याने कार /बाइक वाल्यांची सोय झाली.
लागणारा वेळ आणि वेळापत्रक उपयोगी पडेल म्हणून माहिती देण्याचा विचार आहे.
फोटो १)
दिघी जेट्टीला उभ्या असलेल्या फेरी बोटीतून -
फोटो २)
श्रीवर्धन एसटी डेपोतील बसचे वेळापत्रक.
या पाटीवरच्या दिघी गाडीची वेळ उपयोगाची आहे. साधारण सवा तासाने (३३ किमि) बस दिघीला पोहोचते. बस स्टँडच्या बाजुलाच जेट्टी आहे. अर्ध्या तासाने फेरी बोट आगरदांडा जाण्यासाठी सुटते.
फोटो ३)
आगरदांडा जेट्टी येथील एक पाटी
(( या पाटीवरचे वेळापत्रक फसवे आहे. फोन नंबरचा काही उपयोग होतो का पाहावे.))
फोटो ४)
जंगली फेरी बोट आगरदांडा धक्क्याला लागताना प्रवाशांची उतरण्याच्या घाई.
------------------------
मागच्या आठवड्यात (१८-२० एप्रिल २०१९ ) श्रीवर्धन आणि रेवदंडा इथे जायचे होते.
सकाळी आठच्या दिघी बसने निघालो. बस समुद्राकडूनच्या शेखाडी - दिवेआगर रस्त्याने जात नाही. वरच्या डोंगरी रस्त्याने बोर्ली पंचातन मार्गे जाते. दोन्ही बाजूस आंब्याची कलमे दिसत होती. इकडचे आंबे अजून काढायला तयार व्हायचे होते. सवा नऊला दिघी जेटीजवळच्या स्टँडला पोहोचलो. बसमध्ये साताठ प्रवासी होते. उतरण्याची घाई करू लागलो तर कंडक्टरने सांगितले पावण दहाला सुटेल फेरी.
फेरीबोटीचे तिकिट ( रु २२) बोटीवरच मिळते. प्रवासी आणि बाइक्स अगोदर चढू शकतात. कार्स शेवटी घेतल्या. त्या रिवर्स करून आत न्यायला सांगतात. साधारणपणे जागा पाहता नऊ दहा कार्स आणि पंधरावीस बाइक्स राहतील इतकी जागा आहे. वरती एक डेकसुद्धा आहे. एकूण छान व्यवस्था आहे. फेरी प्रवासास पंधरा मिनिटे लागतात.
आगरदांडा जेटी हा नवीन धक्का मुरुडबाजुला बांधला आहे. या अगोदर छोट्या लाँचेस राजपुरी धक्का येथे जात. तिथून जंजिरा किला आणि मुरुड गाव/ बस डेपो जवळ आहे परंतू आता आगरदांडा येथेच जातात.
पंधरा मिनिटांत समोरच्या आगरदांडा जेटीला पोहोचलो. एक सिक्ससिटर लगेच भरून गेली. मग दुसरी मिळाली. वाटेत मुरुडकडून येणारी बस दिसली. आगरदांडा जेटी ते मुरुड गाव/बस डेपो दहाबारा किमी दूर आहे. अर्धा तास लागला. हा रस्ता वळणावळणाचा छान आहे. डेपोपाशीच ठाणे बस मिळाली आणि समुद्राच्या किनाऱ्याकडून दृष्य पाहात जात होतो. वाटेत काशिद , बारशिव मिनी बीच, सामिष खानावळी, कोरलई किला,असा पन्नासेक किमिचा प्रवास करून रेवदंड्यात पोहोचलो. पण रस्ता अरुंद आणि खडबडीत आहे. याचाच पुढे कोस्टल रोड होणार आहे. रेवदंडा ते अलिबाग नागाव मार्गे वीस किमी आहे.
वाचने
12724
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
माहितीपूर्ण धागा. धन्यवाद
माहितीपूर्ण.
.
मळलेली वाट सोडून केलेला
दिवेआगार
विमा असतो का?
विमा असतो का वाहनांचा?
माणगाव, वडखळ नाका आगरी
ऊत्तम
पुणे का मुंबई? कारण एसटी फार
एका वेगळाच प्रश्न
In reply to एका वेगळाच प्रश्न by चौकटराजा
आणखी
१) आता ज्येष्ठ नागरिक
फेरी बोटींचं वेळापत्रक M -