दिव्याची आवस
लेखनप्रकार (Writing Type)
दिव्यांची आवस
आपण ज्याला 'गटारी अमावस्या' म्हणतो ती खर तर 'दिव्याची आवस' किंवा 'दर्श अमावस्या' आहे. दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरवात होते. आपल्यला श्रावणात उपवास करायचे असतात; नॉनवेज आणि दारू याला हात लावायचा नसतो; अस मानलं जातं. अलीकडे मात्र कितीजण हे पाळतात कोण जाणे. पण गटारी अमावास्या मात्र अनेकजण साजरी करतात. आठवडा-पंधरा दिवस अगोदरच आपल्याला whatsaap वर यासंदर्भातले जोक्स यायला लागतात. आपण ते कधी वाचतो... कधी दुर्लक्ष करतो. पण 'गटारी अमावस्या' याव्यतिरिक्त या दिवसाचे काही महत्व आहे हे आपल्याला माहित नाही आणि सहसा कोणी माहित करून घ्यायचा प्रयत्न देखील करत नाही. मात्र या दर्श/दिव्याच्या अमावस्येची एक कथा/कहाणी आहे. ती अशी....
एका आटपाट नगरातील राजाची सून रोज दिवे घासून चांगली तेलवात करायची. दिव्यांच्या अवसेला चांगला नैवेद्य करून दिव्यांना दाखवायची. एकदा तिला घरात केलेला एक पदार्थ खूप आवडला आणि तो तिने खाऊन संपवला. परंतु आळ उंदरांवर घेतला. याचा उंदरांना राग आला आणि सूड घेण्यासाठी त्यांनी तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात टाकली. त्यामुळे तिची सर्वांनी निदा केली आणि घरातून काढून टाकले. ती निघून गेल्यानंतर त्या घरातील दिव्यांची काळजी कोणीच घेतली नाही. असेच दिवस गेले. दर्श अमावस्येचा दिवस आला. त्या दिवशी राजा जंगलात शिकारीला गेला होता. येताना त्याला उशीर झाला म्हणून तो एका झाडाखाली विश्रांतीला थांबला होता. त्याच झाडावर त्या गावातील सर्व दिवे जमले होते. ते प्रत्येक घरातील केलेली पूजा आणि मिळालेला नैवेद्य याबद्दल बोलत होते. तेव्हा राजाच्या घरातील दिव्याने दु:खी आवाजात राजाच्या सुनेची कहाणी सांगितली आणि म्हणाला ती गेल्यापासून राजाच्या घरातील दिव्यांची वाईट अवस्था आहे. झाडाखालील राजाने हे ऐकले. तो वाड्यावर गेला आणि सर्वाना पुढे उभे करून त्याने विचारले की कोणी सुनेला पाहुण्यांच्या खोलीत जाताना प्रत्यक्ष बघितले होते का? सर्वांनी ते नाकारले. मग राजाने पालखी पाठवून सुनेला परत बोलावून घेतले आणि तिची क्षमा मागितली. तिला साऱ्या घराची मुखत्यारी दिली. त्यानंतर राजाची सून दिव्यांची पूजा परत करू लागली. तर जसा राजाच्या सुनेला दीपक पावला तसा तुम्हा आम्हाला पावो . तिचा आळ जसा टळला तसा तुमचा आमचा टळो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
किमान ही कहाणी आपण आपल्या ओळखीच्या लोकांना सांगायला कांस्य हरकत आहे.
यादिवाशी किसलेला गूळ आणि जास्त प्रमाणात कणिक यात गरम तेलाचे मोहन घालून मळून साधारण पेढ्याच्या आकाराचे दिवे करतात. ते मोदकांप्रमाणे उकडतात. त्याचा दिव्यांना नैवेद्य दाखवला जातो.
आमच्या लहानपणी आई दर दिव्यांच्या अवसेला हे दिवे करायची आणि आम्ही ते गोड दिवे अगदी हौसेने खायचो ते आठवते. आजही या गटारी अमावास्येच्या जोक्सपेक्षा आई करायची त्या दिव्यांच्या आवसेच जास्त अप्रूप वाटत.
(दिव्यांची रेसिपी: किसलेला गूळ दोन वाट्या, जाड दळलेले गव्हाचे पीठ आणि गरम तेल सहा चमचे. चिमूटभर मीठ. सगळं एकत्र मळून लहान गोळे करून दिव्यांच्या आकार करावेत आणि मोदकांप्रमाणे उकडून घ्यावेत)
प्रतिक्रिया
दिव्यांची अमावस्या खूप जणांना
निशाचरजी
दर्श अमावस्या बहुधा कोणत्याही महिन्यात येऊ शकते.
आमच्या घरी गव्हाच्या नाही, पण
दिवे!
बरं झालं लिहीलंत, दिव्यांची
धन्यवाद सूड जी
हो खूप मस्त लागतात हे दिवे
यशोधरा जी
कथा छान आहे, तुमचं लेखन
:)
गेले ते दिवस
लहानपणी ही गोष्ट कहाण्यांच्या
समयोचित लेख !
आई बाजरीचे दिवे पण करायची .
एखादी गोष्ट माहित नाही ...