मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मामाचं पत्र

श्रीगणेशा ·

Bhakti Mon, 08/08/2022 - 18:20
चांगलं पत्र,बरेचदा असे लिखाण अनेकदा वाचतो.पण तेवढ्या पुरतेच भारावतो.ह्या भारावण्याच्या दशेतून बाहेर पडून हळूहळू या गोष्टी अमलात आणून मग एका टप्प्यावर आपसूकच हे सर्व घडत जाते. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे!

In reply to by Bhakti

श्रीगणेशा Tue, 08/09/2022 - 08:04
धन्यवाद भक्ती! विचार कृतीत उतरवणं अवघड. आणि खरं आहे, वेळेसोबत सर्व गोष्टी आपसूकच समजतात, अमलात आणाव्याच लागतात. परंतू, विद्यार्थीदशेत याची व्यवस्थीत जाणीव झाली तर पुढचा प्रवास बराचसा सोपा होतो.

कर्नलतपस्वी Tue, 05/30/2023 - 14:31
एक क्वार्टर संपायला आली ना. सोरी, संपायला आले म्हंजे पंचवीस वर्ष थोड्याच वर्षात संपतील. आजही सत्तर,ऐसी नव्वद च्या गोष्टी करता. पत्र ल ई जुनं झालं. आता ए आय चा जमाना येतोय. काहीतरी नवीन सांगा. हे आसलं पत्र आमच्या पिताश्रीच्या तारेला आडकलेलं बघीतलयं.

श्रीगणेशा Sun, 06/18/2023 - 23:42
धन्यवाद कर्नल साहेब, माध्यमं खूप पूर्वीच बदलली आहेत. ए आय तर काही आमूलाग्र बदल/स्थित्यंतर घडवून आणेल असं दिसतंय. निदान मूलभूत गोष्टी तरी तशाच राहाव्यात, अशी आशा आहे.

Bhakti Mon, 08/08/2022 - 18:20
चांगलं पत्र,बरेचदा असे लिखाण अनेकदा वाचतो.पण तेवढ्या पुरतेच भारावतो.ह्या भारावण्याच्या दशेतून बाहेर पडून हळूहळू या गोष्टी अमलात आणून मग एका टप्प्यावर आपसूकच हे सर्व घडत जाते. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे!

In reply to by Bhakti

श्रीगणेशा Tue, 08/09/2022 - 08:04
धन्यवाद भक्ती! विचार कृतीत उतरवणं अवघड. आणि खरं आहे, वेळेसोबत सर्व गोष्टी आपसूकच समजतात, अमलात आणाव्याच लागतात. परंतू, विद्यार्थीदशेत याची व्यवस्थीत जाणीव झाली तर पुढचा प्रवास बराचसा सोपा होतो.

कर्नलतपस्वी Tue, 05/30/2023 - 14:31
एक क्वार्टर संपायला आली ना. सोरी, संपायला आले म्हंजे पंचवीस वर्ष थोड्याच वर्षात संपतील. आजही सत्तर,ऐसी नव्वद च्या गोष्टी करता. पत्र ल ई जुनं झालं. आता ए आय चा जमाना येतोय. काहीतरी नवीन सांगा. हे आसलं पत्र आमच्या पिताश्रीच्या तारेला आडकलेलं बघीतलयं.

श्रीगणेशा Sun, 06/18/2023 - 23:42
धन्यवाद कर्नल साहेब, माध्यमं खूप पूर्वीच बदलली आहेत. ए आय तर काही आमूलाग्र बदल/स्थित्यंतर घडवून आणेल असं दिसतंय. निदान मूलभूत गोष्टी तरी तशाच राहाव्यात, अशी आशा आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
(विद्यार्थीदशेतील भाचे मंडळींसाठी) ---- विद्यार्थीदशेतील एक टप्पा मागे सरून चढणीचा प्रवास सुरू होईल आता. धुकं असेलही प्रवासात आणि मनातही, पण ते थोडंसं निवळावं म्हणून हे चार शब्द. ---- आरोग्य, सवयी: आरोग्य सर्वोपरी. या वयात हे ध्यानी-मनीही नसतं पण आरोग्याच्या चांगल्या सवयी आतापासूनच लावणं आवश्यक. नियमित सूर्यनमस्कार, ओंकार प्राणायाम अशा सोप्या, छोट्या गोष्टी खूप चांगला, सकारात्मक मानसिक परिणाम करतात, आत्मविश्वास द्विगुणित करतात. पण इथे महत्वाची असते ती नियमितता! चांगल्या सवयी आत्मसात करणं कठीण आणि त्या जपणं महाकठीण!

पुस्तक परिचय: मनात -- भाग १

श्रीगणेशा ·

In reply to by हेमंतकुमार

श्रीगणेशा Mon, 08/01/2022 - 10:00
कुमार सर, अभ्यासपूर्ण लिखाण कसं असावं हे तुमच्या लिखाणातून शिकायला मिळतं _/\_ धन्यवाद.

कर्नलतपस्वी Sun, 07/31/2022 - 10:30
श्रीगणेशा,छान लिहीले आहे. कबीरदासजी नी त्यांच्या बिजका मधे मनाचे अत्यंत समर्पक वर्णन केले आहे. संत रामदासांनी मनाने कसे वागावे हे मनाच्या श्लोकात सांगीतले आहे. लहानपणापासून मनावर यांचे संस्कार केले तर मानसिक व्याधी वर सहज विजय मिळवता येईल. मनाची अवस्था , पाणी ही तै पतला,धुवां ही तै झीण । पवनां बेगि उतावला, सो दोसत `कबीर’ कीन्ह ॥3॥ मनाचा मुलभूत स्वभाव कबीर यह मन लालची, समझै नहिं गंवार। भजन करन को आलसी, खाने को तैयार।। तन की भूख सहज है, तीन पाव की सेर । मन की भूख अनन्त है, निगलै मेरु सुमेरु। मनाने कसे वागावे मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच सोशीत जावे स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांसि रे नीववावे नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे अति स्वार्थ बुद्धी नुरे पाप साचे घडे भोगणे पाप ते कर्म खोटे न होता मनासारिखे दु:ख मोठे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुमची शोधून पाहे मना सांगपा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले नाहीतर मग. मन के हारे हार है, मन के जीते जीत। कहे कबीर हरि पाइए मन ही की परतीत।।" भगवान ही मालीक है.

In reply to by कर्नलतपस्वी

श्रीगणेशा Mon, 08/01/2022 - 10:29
धन्यवाद कर्नल साहेब! तुम्ही हिंदी व मराठी या दोन्ही भाषेत तितक्याच ताकदीने आणि सहजपणे लिहिता _/\_ "भारतीय विचार" या परीच्छेदातील बरचसं लिखाण "मनात" पुस्तकातून घेतलं आहे. आणि खरं तर ते हजारो, शेकडो वर्षांपूर्वीच असामान्य माणसांनी आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी लिहून ठेवलं आहे. आपण फक्त वाचायचं, पुन्हा एकदा.

धर्मराजमुटके Sun, 07/31/2022 - 11:04
तुम्ही तर छुपे रुस्तम निघालात ! एवढे छान लिहिले आहे. उगाच पहिला धागा काढून मिपाकरांची टर खेचायची होती काय :) केवळ राजकारणावर व्यक्त होण्याऐवजी प्रत्येकाने असे काहीतरी वेगळे लिहित रहा ही या निमित्ताने सर्व मिपाकरांना विनंती.

In reply to by धर्मराजमुटके

श्रीगणेशा Mon, 08/01/2022 - 10:49
धन्यवाद धर्मराजमुटके! मिपाकरांची टर वगैरे निश्चितच नाही :-) उलट त्या धाग्यातून प्रेरणा घेऊन लिखाणात सुधारणा करता आल्या. राजकारणावरील धाग्यांचा/चर्चेचा माझा अनुभव -- मी बऱ्याचदा प्रयत्न करूनही मला कधीच चर्चेत सहभागी व्हायला जमलं नाही. (देवकृपा म्हणावी लागेल) लहानपणी दूरदर्शनच्या मराठी वाहिनीवर बहुतेक महाचर्चा नावाचा कार्यक्रम असायचा. विषय केंद्रस्थानी ठेवून, त्यातील व्यक्ती बाजूला करून, समतोल साधत होणारी ती महाचर्चा आजही लक्षात आहे. सध्याच्या काळात सर्वच माध्यमात चर्चेचं स्वरूपच बदलून गेलं आहे. मिपा त्याला अपवाद कसा असेल.

कंजूस Sun, 07/31/2022 - 13:36
त्यामुळे बऱ्याच विचारवंतांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण यात सुखदुःखाचे कप्पे असतात. ते रिकामे करून नव्याने भरता येत नाहीत. बाकी जडजड तत्त्वज्ञान आहे.

Bhakti Sun, 07/31/2022 - 15:05
"कुठलीही गोष्ट वाऱ्यावर सोडा; तिचा नाद सोडून द्या; निसर्गाला अव्यवस्थितपणा आवडत नाही; त्यामुळे ही गोंधळाची अवस्था तात्पुरती असते. जेव्हा मनाचं चलनवलन नियंत्रित असतं, तेव्हा मन स्फटिकासारखं स्वच्छ होतं; चित्त निर्मळ झालेलं असतं. म्हणजेच तिथला गोंधळ निवळलेला असतो", असं पतंजली म्हणतात.
छान!हे आवडलं. चांगला परिचय !

टर्मीनेटर Sun, 07/31/2022 - 22:27
मस्त सुरुवात 👍 पुढील भागाच्या प्रतीक्षेत! वर कर्नल साहेबांनी लिहिलंय
लहानपणापासून मनावर यांचे संस्कार केले तर मानसिक व्याधी वर सहज विजय मिळवता येईल.
ह्याच्याशी पूर्णपणे सहमत! कबीरांचे दोहे पण फार आवडतात. युट्युबवर बऱ्याचवेळा कबीर अमृतवाणी आणि अधून मधून दोहयांवर आधारित काही उर्दू कव्वाली पण मी ऐकत असतो.

चौथा कोनाडा Tue, 08/02/2022 - 18:02
खुप छान सुरुवात !
संत तेच जाणा जगी, दया क्षमा ज्यांचे अंगी| लोभ अहंता न ये मना, जगी विरक्त तेचि जाणा||. इहपरलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी|. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा||" धाकटी मुक्ता, मोठ्या बहिणीसारखी, उद्विग्न ज्ञानेशाची समजूत काढते, मनाची ताटी उघडावी म्हणून.
अगदी समर्पक ! मनात हे गाजलेलं पुस्तक वाचायचं राहिलंय, या निमित्ताने त्या वाचनाची प्रेरणा मिळाली ! आकृतीबंध दिल्यामुळे पुस्तक कसं असेल याची कल्पना आली. धन्यवाद, श्रीगणेशा !

In reply to by चौथा कोनाडा

श्रीगणेशा Tue, 08/02/2022 - 21:18
धन्यवाद चौको! आकृतीबंध फक्त लेखमालेसाठी दिला आहे, पुस्तकातील मला भावलेल्या मुद्द्यांवर, पूर्ण पुस्तकाचा नाही. या लेखात दिलेले, आकृतीबंधातील ५ मुद्दे सोडून, लेखकाने मनाचा व मेंदूचा शास्त्रीय अभ्यास होण्यापूर्वीची अंधश्रद्धेची, गोंधळाची स्थिती; मेंदूरचना; बुद्धीची संकल्पना, विविध मनोविकार अशा बऱ्याच विषयांवर विस्तृतपणे लिहिलं आहे. प्रत्येक वाचकाचा दृष्टिकोन, आवड, आकलन वेगळं असू शकतं. पण पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. लेखकाच्या मते हे पुस्तक सोपं आणि त्यामुळे मानसशास्त्रात पहिल्यांदाच वाचन करणाऱ्यांसाठी अगदी योग्य आहे. मी पहिलं वाचन भरभर केलं. आणि दुसरं वाचन मात्र फक्त भावलेल्या प्रकरणांचंच आणि बारकावे टिपत करत आहे.

चित्रगुप्त Wed, 08/03/2022 - 08:31
लेखमालेची सुरुवात छान झालेली आहे. पुढील सर्व भाग वाचण्याची उत्सुकता आहे. अनेक शुभेच्छा. पतंजलींची योगसूत्रे हा मानवी प्रतिभेचा एक अद्भुत अविष्कार आहे. अवघ्या सत्याणौ सूत्रात मानवी मन आणि अवघ्या ब्रम्हांडाला गवसणी घातलेली आहे. "योगश्चित्तवृत्तिनिरोधः" ही योगाची व्याख्या अगदी सुरुवातीलाच सांगून पुढे 'यम - नियम - आसन - प्राणायाम - प्रत्याहार - धारणा - ध्यान - समाधि' हा अष्टांगयोग विशद केलेला आहे. अभ्यासेच्छुंनी बी के एस अय्यंगार आणि ओशो यांच्या ग्रंथांचे परिशीलन अवश्य करावे असे सुचवतो.

श्रीगणेशा गुरुवार, 08/04/2022 - 06:23
धन्यवाद चित्रगुप्त सर _/\_ लेखकाने "मनात" पुस्तकात "चित्तवृद्धीनिरोध" संदर्भात खालील विश्लेषण केलं आहे:
चित्तवृद्धीनिरोध म्हणजे योग. योग म्हणजे मनाचं संपून जाणं. योग म्हणजे मनाची निर्गुण, निराकार अवस्था असणं. थोडक्यात, मनात कुठलाही विचार नसणं. 'मी' आणि 'माझा' इतका सीमित विचार संपून मनात शांतता निर्माण होणं. जेव्हा माणूस स्वार्थरहित कर्म करतो, मी सोडून इतरांमध्ये एकरूप होतो किंवा एखाद्या कलेत तो रममाण होतो तेव्हा मनाच्या त्या अवस्थेला 'अमनी' (मनरहित) अवस्था म्हटलं जातं.

In reply to by विवेकपटाईत

श्रीगणेशा गुरुवार, 08/04/2022 - 12:31
धन्यवाद विवेकपटाईत!
"चित्तवृत्तीनिरोध" हा उल्लेख आलाच आहे पुस्तकात. ... 'मी' आणि 'माझा' इतका सीमित विचार संपून मनात शांतता निर्माण होणं. ...
"मी" आणि "माझा" हे सामान्य माणसाचं लक्षण आहे, त्यात जगावेगळं काहीच नाही.

In reply to by हेमंतकुमार

श्रीगणेशा Mon, 08/01/2022 - 10:00
कुमार सर, अभ्यासपूर्ण लिखाण कसं असावं हे तुमच्या लिखाणातून शिकायला मिळतं _/\_ धन्यवाद.

कर्नलतपस्वी Sun, 07/31/2022 - 10:30
श्रीगणेशा,छान लिहीले आहे. कबीरदासजी नी त्यांच्या बिजका मधे मनाचे अत्यंत समर्पक वर्णन केले आहे. संत रामदासांनी मनाने कसे वागावे हे मनाच्या श्लोकात सांगीतले आहे. लहानपणापासून मनावर यांचे संस्कार केले तर मानसिक व्याधी वर सहज विजय मिळवता येईल. मनाची अवस्था , पाणी ही तै पतला,धुवां ही तै झीण । पवनां बेगि उतावला, सो दोसत `कबीर’ कीन्ह ॥3॥ मनाचा मुलभूत स्वभाव कबीर यह मन लालची, समझै नहिं गंवार। भजन करन को आलसी, खाने को तैयार।। तन की भूख सहज है, तीन पाव की सेर । मन की भूख अनन्त है, निगलै मेरु सुमेरु। मनाने कसे वागावे मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच सोशीत जावे स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांसि रे नीववावे नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे अति स्वार्थ बुद्धी नुरे पाप साचे घडे भोगणे पाप ते कर्म खोटे न होता मनासारिखे दु:ख मोठे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुमची शोधून पाहे मना सांगपा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले नाहीतर मग. मन के हारे हार है, मन के जीते जीत। कहे कबीर हरि पाइए मन ही की परतीत।।" भगवान ही मालीक है.

In reply to by कर्नलतपस्वी

श्रीगणेशा Mon, 08/01/2022 - 10:29
धन्यवाद कर्नल साहेब! तुम्ही हिंदी व मराठी या दोन्ही भाषेत तितक्याच ताकदीने आणि सहजपणे लिहिता _/\_ "भारतीय विचार" या परीच्छेदातील बरचसं लिखाण "मनात" पुस्तकातून घेतलं आहे. आणि खरं तर ते हजारो, शेकडो वर्षांपूर्वीच असामान्य माणसांनी आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी लिहून ठेवलं आहे. आपण फक्त वाचायचं, पुन्हा एकदा.

धर्मराजमुटके Sun, 07/31/2022 - 11:04
तुम्ही तर छुपे रुस्तम निघालात ! एवढे छान लिहिले आहे. उगाच पहिला धागा काढून मिपाकरांची टर खेचायची होती काय :) केवळ राजकारणावर व्यक्त होण्याऐवजी प्रत्येकाने असे काहीतरी वेगळे लिहित रहा ही या निमित्ताने सर्व मिपाकरांना विनंती.

In reply to by धर्मराजमुटके

श्रीगणेशा Mon, 08/01/2022 - 10:49
धन्यवाद धर्मराजमुटके! मिपाकरांची टर वगैरे निश्चितच नाही :-) उलट त्या धाग्यातून प्रेरणा घेऊन लिखाणात सुधारणा करता आल्या. राजकारणावरील धाग्यांचा/चर्चेचा माझा अनुभव -- मी बऱ्याचदा प्रयत्न करूनही मला कधीच चर्चेत सहभागी व्हायला जमलं नाही. (देवकृपा म्हणावी लागेल) लहानपणी दूरदर्शनच्या मराठी वाहिनीवर बहुतेक महाचर्चा नावाचा कार्यक्रम असायचा. विषय केंद्रस्थानी ठेवून, त्यातील व्यक्ती बाजूला करून, समतोल साधत होणारी ती महाचर्चा आजही लक्षात आहे. सध्याच्या काळात सर्वच माध्यमात चर्चेचं स्वरूपच बदलून गेलं आहे. मिपा त्याला अपवाद कसा असेल.

कंजूस Sun, 07/31/2022 - 13:36
त्यामुळे बऱ्याच विचारवंतांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण यात सुखदुःखाचे कप्पे असतात. ते रिकामे करून नव्याने भरता येत नाहीत. बाकी जडजड तत्त्वज्ञान आहे.

Bhakti Sun, 07/31/2022 - 15:05
"कुठलीही गोष्ट वाऱ्यावर सोडा; तिचा नाद सोडून द्या; निसर्गाला अव्यवस्थितपणा आवडत नाही; त्यामुळे ही गोंधळाची अवस्था तात्पुरती असते. जेव्हा मनाचं चलनवलन नियंत्रित असतं, तेव्हा मन स्फटिकासारखं स्वच्छ होतं; चित्त निर्मळ झालेलं असतं. म्हणजेच तिथला गोंधळ निवळलेला असतो", असं पतंजली म्हणतात.
छान!हे आवडलं. चांगला परिचय !

टर्मीनेटर Sun, 07/31/2022 - 22:27
मस्त सुरुवात 👍 पुढील भागाच्या प्रतीक्षेत! वर कर्नल साहेबांनी लिहिलंय
लहानपणापासून मनावर यांचे संस्कार केले तर मानसिक व्याधी वर सहज विजय मिळवता येईल.
ह्याच्याशी पूर्णपणे सहमत! कबीरांचे दोहे पण फार आवडतात. युट्युबवर बऱ्याचवेळा कबीर अमृतवाणी आणि अधून मधून दोहयांवर आधारित काही उर्दू कव्वाली पण मी ऐकत असतो.

चौथा कोनाडा Tue, 08/02/2022 - 18:02
खुप छान सुरुवात !
संत तेच जाणा जगी, दया क्षमा ज्यांचे अंगी| लोभ अहंता न ये मना, जगी विरक्त तेचि जाणा||. इहपरलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी|. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा||" धाकटी मुक्ता, मोठ्या बहिणीसारखी, उद्विग्न ज्ञानेशाची समजूत काढते, मनाची ताटी उघडावी म्हणून.
अगदी समर्पक ! मनात हे गाजलेलं पुस्तक वाचायचं राहिलंय, या निमित्ताने त्या वाचनाची प्रेरणा मिळाली ! आकृतीबंध दिल्यामुळे पुस्तक कसं असेल याची कल्पना आली. धन्यवाद, श्रीगणेशा !

In reply to by चौथा कोनाडा

श्रीगणेशा Tue, 08/02/2022 - 21:18
धन्यवाद चौको! आकृतीबंध फक्त लेखमालेसाठी दिला आहे, पुस्तकातील मला भावलेल्या मुद्द्यांवर, पूर्ण पुस्तकाचा नाही. या लेखात दिलेले, आकृतीबंधातील ५ मुद्दे सोडून, लेखकाने मनाचा व मेंदूचा शास्त्रीय अभ्यास होण्यापूर्वीची अंधश्रद्धेची, गोंधळाची स्थिती; मेंदूरचना; बुद्धीची संकल्पना, विविध मनोविकार अशा बऱ्याच विषयांवर विस्तृतपणे लिहिलं आहे. प्रत्येक वाचकाचा दृष्टिकोन, आवड, आकलन वेगळं असू शकतं. पण पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. लेखकाच्या मते हे पुस्तक सोपं आणि त्यामुळे मानसशास्त्रात पहिल्यांदाच वाचन करणाऱ्यांसाठी अगदी योग्य आहे. मी पहिलं वाचन भरभर केलं. आणि दुसरं वाचन मात्र फक्त भावलेल्या प्रकरणांचंच आणि बारकावे टिपत करत आहे.

चित्रगुप्त Wed, 08/03/2022 - 08:31
लेखमालेची सुरुवात छान झालेली आहे. पुढील सर्व भाग वाचण्याची उत्सुकता आहे. अनेक शुभेच्छा. पतंजलींची योगसूत्रे हा मानवी प्रतिभेचा एक अद्भुत अविष्कार आहे. अवघ्या सत्याणौ सूत्रात मानवी मन आणि अवघ्या ब्रम्हांडाला गवसणी घातलेली आहे. "योगश्चित्तवृत्तिनिरोधः" ही योगाची व्याख्या अगदी सुरुवातीलाच सांगून पुढे 'यम - नियम - आसन - प्राणायाम - प्रत्याहार - धारणा - ध्यान - समाधि' हा अष्टांगयोग विशद केलेला आहे. अभ्यासेच्छुंनी बी के एस अय्यंगार आणि ओशो यांच्या ग्रंथांचे परिशीलन अवश्य करावे असे सुचवतो.

श्रीगणेशा गुरुवार, 08/04/2022 - 06:23
धन्यवाद चित्रगुप्त सर _/\_ लेखकाने "मनात" पुस्तकात "चित्तवृद्धीनिरोध" संदर्भात खालील विश्लेषण केलं आहे:
चित्तवृद्धीनिरोध म्हणजे योग. योग म्हणजे मनाचं संपून जाणं. योग म्हणजे मनाची निर्गुण, निराकार अवस्था असणं. थोडक्यात, मनात कुठलाही विचार नसणं. 'मी' आणि 'माझा' इतका सीमित विचार संपून मनात शांतता निर्माण होणं. जेव्हा माणूस स्वार्थरहित कर्म करतो, मी सोडून इतरांमध्ये एकरूप होतो किंवा एखाद्या कलेत तो रममाण होतो तेव्हा मनाच्या त्या अवस्थेला 'अमनी' (मनरहित) अवस्था म्हटलं जातं.

In reply to by विवेकपटाईत

श्रीगणेशा गुरुवार, 08/04/2022 - 12:31
धन्यवाद विवेकपटाईत!
"चित्तवृत्तीनिरोध" हा उल्लेख आलाच आहे पुस्तकात. ... 'मी' आणि 'माझा' इतका सीमित विचार संपून मनात शांतता निर्माण होणं. ...
"मी" आणि "माझा" हे सामान्य माणसाचं लक्षण आहे, त्यात जगावेगळं काहीच नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
----
अभियांत्रिकीमधे करियर असूनही पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात रुची जपणारे, किंवा इतर विषयात नाक खुपसणारे, खोऱ्याने सापडतील. अभियंत्यांचा तो अवगुण म्हणावा लागेल, किंवा तार्किक आणि तांत्रिक निश्चिततेचा कंटाळा.

पृथ्वी एक अंतराळयान

भागो ·

यातल्या बर्‍याच गोष्टी वाचल्या होत्या पण इथे त्या अतिशय रंजक पध्दतिने त्या इथे मांडल्या आहेत. खरंतर आपली आकाशगंगा हेच एक मोठे अवकाशयान आहे आणि पृथ्वी त्या मोठ्याशा यंत्राचा एक छोटासा भाग. रच्याकने हा उर्टचा ढग कुठे आहे? पैजारबुवा,

In reply to by विजुभाऊ

भागो Mon, 07/04/2022 - 16:11
उर्टचा क्लॉउड हा सूर्य मालेचा शेवटच टप्पा आहे. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणा परिणाम येथपर्यंत जाणवतो. तर तो आपल्या बरोबरच येणार! आम्ही लहानपणी हे बडबडगीत म्हणत असू. पौडचा म्हातारा, म्हाताऱ्याच कुत्रे, कुत्र्याचे शेपूट, शेपातावरची ऊ शेकोतीला आली.

तुषार काळभोर Mon, 07/04/2022 - 18:07
1 लहानपणापासून अशी चित्रे पाहिल्याने एकूणच अवकाशातील अंतरांविषयी आपला एक गैरसमज असतो. सौरमाला किती प्रचंड मोठी आहे, यासाठी बनवलेले हे वेबपेज: चंद्र जर एका पिक्सेल एवढा असता तर.... 1 नुसतं पृथ्वी आणि चंद्र यातील अंतर किती आहे? वरच्या सारखं नाही. तर असं: 3

In reply to by तुषार काळभोर

तर्कवादी Tue, 07/05/2022 - 17:30
सौरमाला किती प्रचंड मोठी आहे, यासाठी बनवलेले हे वेबपेज: चंद्र जर एका पिक्सेल एवढा असता तर....
हे वेबपेज आवडलं.. धन्यवाद

Bhakti Mon, 07/04/2022 - 20:33
अशी ही आकाशगंगा बघून आपल्याला मुलांचे हात पकडून गर्दीतून वाट काढणाऱ्या कुणा लेकुरवाळ्या माउलीची आठवण येणे साहजिक आहे.
लेख खुप खुप आवडला.

२०२० साली २८ दिवस नेहेमीपेक्षा कमी लांबीचे(शोर्ट) होते. ह्याचीही अनेक कारणे सांगितली जात आहेत. जाऊ देत. आपल्याला महिन्याच्या महिन्याला पगार मिळाला म्हणजे झालं. }}}}} हा .. हा.. हा ...

२०२० साली २८ दिवस नेहेमीपेक्षा कमी लांबीचे(शोर्ट) होते. ह्याचीही अनेक कारणे सांगितली जात आहेत. जाऊ देत. आपल्याला महिन्याच्या महिन्याला पगार मिळाला म्हणजे झालं. }}}}} हा .. हा.. हा ...

विवेकपटाईत Wed, 07/06/2022 - 17:12
चालत राहणे हाच एकमेव विकल्प. प्रवास संपणार की पुन्हा नव्याने सुरू होणार. काहीच माहीत नाही. तूर्त तो पर्यंत आपण एकमेकांचा द्वेष करूया, जमलतर एकमेकांचे जीव घेयुया, क्रिकेटच्या मॅचेस बघूया, सासू सुनांच्या हाणामारीच्या सिरिअल्स बघूया.. भारी लेख.

यातल्या बर्‍याच गोष्टी वाचल्या होत्या पण इथे त्या अतिशय रंजक पध्दतिने त्या इथे मांडल्या आहेत. खरंतर आपली आकाशगंगा हेच एक मोठे अवकाशयान आहे आणि पृथ्वी त्या मोठ्याशा यंत्राचा एक छोटासा भाग. रच्याकने हा उर्टचा ढग कुठे आहे? पैजारबुवा,

In reply to by विजुभाऊ

भागो Mon, 07/04/2022 - 16:11
उर्टचा क्लॉउड हा सूर्य मालेचा शेवटच टप्पा आहे. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणा परिणाम येथपर्यंत जाणवतो. तर तो आपल्या बरोबरच येणार! आम्ही लहानपणी हे बडबडगीत म्हणत असू. पौडचा म्हातारा, म्हाताऱ्याच कुत्रे, कुत्र्याचे शेपूट, शेपातावरची ऊ शेकोतीला आली.

तुषार काळभोर Mon, 07/04/2022 - 18:07
1 लहानपणापासून अशी चित्रे पाहिल्याने एकूणच अवकाशातील अंतरांविषयी आपला एक गैरसमज असतो. सौरमाला किती प्रचंड मोठी आहे, यासाठी बनवलेले हे वेबपेज: चंद्र जर एका पिक्सेल एवढा असता तर.... 1 नुसतं पृथ्वी आणि चंद्र यातील अंतर किती आहे? वरच्या सारखं नाही. तर असं: 3

In reply to by तुषार काळभोर

तर्कवादी Tue, 07/05/2022 - 17:30
सौरमाला किती प्रचंड मोठी आहे, यासाठी बनवलेले हे वेबपेज: चंद्र जर एका पिक्सेल एवढा असता तर....
हे वेबपेज आवडलं.. धन्यवाद

Bhakti Mon, 07/04/2022 - 20:33
अशी ही आकाशगंगा बघून आपल्याला मुलांचे हात पकडून गर्दीतून वाट काढणाऱ्या कुणा लेकुरवाळ्या माउलीची आठवण येणे साहजिक आहे.
लेख खुप खुप आवडला.

२०२० साली २८ दिवस नेहेमीपेक्षा कमी लांबीचे(शोर्ट) होते. ह्याचीही अनेक कारणे सांगितली जात आहेत. जाऊ देत. आपल्याला महिन्याच्या महिन्याला पगार मिळाला म्हणजे झालं. }}}}} हा .. हा.. हा ...

२०२० साली २८ दिवस नेहेमीपेक्षा कमी लांबीचे(शोर्ट) होते. ह्याचीही अनेक कारणे सांगितली जात आहेत. जाऊ देत. आपल्याला महिन्याच्या महिन्याला पगार मिळाला म्हणजे झालं. }}}}} हा .. हा.. हा ...

विवेकपटाईत Wed, 07/06/2022 - 17:12
चालत राहणे हाच एकमेव विकल्प. प्रवास संपणार की पुन्हा नव्याने सुरू होणार. काहीच माहीत नाही. तूर्त तो पर्यंत आपण एकमेकांचा द्वेष करूया, जमलतर एकमेकांचे जीव घेयुया, क्रिकेटच्या मॅचेस बघूया, सासू सुनांच्या हाणामारीच्या सिरिअल्स बघूया.. भारी लेख.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्हाला मनातून अंतराळ वीरांचा हेवा वाटत असेल. लहानपणी अनेक स्वप्ने असतात. त्यापैकी एक म्हणजे अंतराळवीर होण्याचे! जुल व्हर्नचे ‘चंद्रावर स्वारी’ पुस्तक वाचले असणारच. पण पुढे मोठे झाल्यावर तुम्ही अंतराळवीरांच्या ट्रेनिंगची चित्रफित बघितली असेल किंवा हॉलीवूडचे चित्रपट बघितले असतील. मनातल्या मनात तुम्ही विचार केला असेल, “नको रे बाबा, त्यापेक्षा आपला ९ ते ५ जॉब चांगला आहे.” पण.... तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण आपण सगळेच अंतराळवीर आहोत! तुम्ही, तुमची प्रिया पत्नी, चिरंजीव गोट्या, शेजारचे काका-काकू, सोसायटीचा वॉचमन? येस, तो सुद्धा. आणि आपले अंतराळयान आहे पृथ्वी.

मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना श्रध्दांजली - पुण्यतिथी ३

Trump ·

चौथा कोनाडा Mon, 05/16/2022 - 12:01
मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना भावपुर्ण श्रध्दांजली. तात्यांना भेटता आलं नाही याचं कायमच शल्य राहील. हॉटेल मिपा नेहमीच हाऊसफुल्ल राहो!

नगरी Mon, 05/16/2022 - 15:08
कोणालातरी आठवण आहे हे पाहून बरे वाटले. भावपूर्ण श्रद्धांजली,खरेच ग्रेटच माणूस होता

सुक्या Tue, 05/17/2022 - 01:33
कित्येक सिध्दहस्त लेखकांना मिपा वर बोलावुन त्यांनी मिपा एका उंचीवर नेले होते. ईतरांच्या तुलनेत मिपा अजुनही उंचच आहे ..

सौन्दर्य Tue, 05/17/2022 - 22:58
२००८ साली अमेरिकेत आलो आणि माय मराठीचा संपर्क तुटला. घरात जे काही मराठीत बोलायचो तेव्हढेच. मराठीत बोलायची, संवाद साधायची प्रचंड निकड भासत होती आणि माझ्या एका मित्राने (महेश अभ्यंकर) मिपा सुचवले. आधी बिचकत बिचकत नंतर बिनधास्तपणे लिहू लागलो. वाचकांच्या प्रतिक्रियेप्रमाणे लेखनात सुधारणा करू लागलो व आजमितीला ५०-६० लेख कविता लिहून झाल्यात. मिपावरचा वेगवेगळ्या विषयांवरचा लेखकांचा गाढा व्यासंग पाहता इतर कोणत्याही साईटवर जावेसे वाटत नाही. येथे कौतुकाची थाप लाभते तर कधीकधी पाठीत दणका देखील बसतो. कोणताही विषय मिपाला वर्ज्य नाही आणि प्रत्येक विषयावरचे पंडित मिपावर आहेत. कोणतीही नवी वस्तू, तंत्रज्ञान विकत घ्यायचे असो, वापरायचे असो, अचूक असे सल्ले नेहेमी मिळतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे तात्यांनी आपल्यावर मिपा सुरु करून अगणित उपकारच केले आहेत. मी मिपाकर असल्याचा मला अभिमान वाटतो.

श्रीरंग_जोशी Wed, 05/18/2022 - 02:42
मिपासंस्थापक अन मराठी आंतरजालावरचे प्रसिद्ध लेखक स्व. तात्यां अभ्यंकर यांच्या स्मृतीस अभिवादन. तात्या आपल्यात नसले तरी त्यांच्या लेखनाच्या व त्यांनी लावलेल्या मिपाच्या रोपट्याच्या स्वरुपात ते कायमच आपल्यासोबत असतील. सर्व मिपाकरांच्या सहकार्‍याने मिपाची पताका उंचावत ठेवणे ही तात्यांच्या कार्याला उत्तम श्रद्धांजली ठरेल.

कानडाऊ योगेशु Wed, 05/18/2022 - 07:26
तात्यांना सश्रध्द श्रध्दांजली. खादाडी सदर आणि सोबत एका नव्या ललनेचा फोटो व त्यावर "ही आमची अमुक तमुक. हिच्यावर आमचा फार जीव" ही तात्यांची ट्रेडमार्क कॉमेंट नेहेमीच स्मरणात राहिल.

त्यांना कधी भेटायचा योग आला नाही पण माणूस मोठा रसिक आणि दिलदार होता हे त्यांच्या लिखाणातून आणि त्यांच्या बद्दल इतरांनी जे लिहिले आहे त्यातून समजते. पैजारबुवा,

चौथा कोनाडा Mon, 05/16/2022 - 12:01
मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना भावपुर्ण श्रध्दांजली. तात्यांना भेटता आलं नाही याचं कायमच शल्य राहील. हॉटेल मिपा नेहमीच हाऊसफुल्ल राहो!

नगरी Mon, 05/16/2022 - 15:08
कोणालातरी आठवण आहे हे पाहून बरे वाटले. भावपूर्ण श्रद्धांजली,खरेच ग्रेटच माणूस होता

सुक्या Tue, 05/17/2022 - 01:33
कित्येक सिध्दहस्त लेखकांना मिपा वर बोलावुन त्यांनी मिपा एका उंचीवर नेले होते. ईतरांच्या तुलनेत मिपा अजुनही उंचच आहे ..

सौन्दर्य Tue, 05/17/2022 - 22:58
२००८ साली अमेरिकेत आलो आणि माय मराठीचा संपर्क तुटला. घरात जे काही मराठीत बोलायचो तेव्हढेच. मराठीत बोलायची, संवाद साधायची प्रचंड निकड भासत होती आणि माझ्या एका मित्राने (महेश अभ्यंकर) मिपा सुचवले. आधी बिचकत बिचकत नंतर बिनधास्तपणे लिहू लागलो. वाचकांच्या प्रतिक्रियेप्रमाणे लेखनात सुधारणा करू लागलो व आजमितीला ५०-६० लेख कविता लिहून झाल्यात. मिपावरचा वेगवेगळ्या विषयांवरचा लेखकांचा गाढा व्यासंग पाहता इतर कोणत्याही साईटवर जावेसे वाटत नाही. येथे कौतुकाची थाप लाभते तर कधीकधी पाठीत दणका देखील बसतो. कोणताही विषय मिपाला वर्ज्य नाही आणि प्रत्येक विषयावरचे पंडित मिपावर आहेत. कोणतीही नवी वस्तू, तंत्रज्ञान विकत घ्यायचे असो, वापरायचे असो, अचूक असे सल्ले नेहेमी मिळतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे तात्यांनी आपल्यावर मिपा सुरु करून अगणित उपकारच केले आहेत. मी मिपाकर असल्याचा मला अभिमान वाटतो.

श्रीरंग_जोशी Wed, 05/18/2022 - 02:42
मिपासंस्थापक अन मराठी आंतरजालावरचे प्रसिद्ध लेखक स्व. तात्यां अभ्यंकर यांच्या स्मृतीस अभिवादन. तात्या आपल्यात नसले तरी त्यांच्या लेखनाच्या व त्यांनी लावलेल्या मिपाच्या रोपट्याच्या स्वरुपात ते कायमच आपल्यासोबत असतील. सर्व मिपाकरांच्या सहकार्‍याने मिपाची पताका उंचावत ठेवणे ही तात्यांच्या कार्याला उत्तम श्रद्धांजली ठरेल.

कानडाऊ योगेशु Wed, 05/18/2022 - 07:26
तात्यांना सश्रध्द श्रध्दांजली. खादाडी सदर आणि सोबत एका नव्या ललनेचा फोटो व त्यावर "ही आमची अमुक तमुक. हिच्यावर आमचा फार जीव" ही तात्यांची ट्रेडमार्क कॉमेंट नेहेमीच स्मरणात राहिल.

त्यांना कधी भेटायचा योग आला नाही पण माणूस मोठा रसिक आणि दिलदार होता हे त्यांच्या लिखाणातून आणि त्यांच्या बद्दल इतरांनी जे लिहिले आहे त्यातून समजते. पैजारबुवा,
लेखनप्रकार
तात्या १५ मे २०१९ रोजी वारले. साधारणतः २००७ मध्ये मिपाची स्थापना केली. आपल्या सारख्या अनोळखी लोकांना मन मोकळे करण्याचा आणि उत्तमोत्तम लेखनाचा आस्वाद घेण्याचा मार्गे उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांच्या विषयी इतरांनी भरभरुन लिहिले आहे. मला त्यांना शेवटी भेटता आले नाही आणि कोणतीही मदत करता आली नाही यांची खंत वाटते. मटामधील श्रध्दांजली https://maharashtratimes.com/maharashtra/thane/chandrashekhar-abhyankar-passed-away/articleshow/69346718.cms --------------------------- त्यांचे काही निवडक साहित्य येथे देत आहे, नवीन लोकांना ओळख होण्यास मदत होईल.

हे वाचा: शेष प्रश्न

अनुस्वार ·

In reply to by अर्धवटराव

अनुस्वार Sat, 03/19/2022 - 15:19
तुम्हाला सव्यसाची अगोदरच भेटला असेल. नसल्यास तो 'पथेर दाबी' मध्ये भेटेल. पुस्तक मराठीत नाही सापडले परंतु पुष्कळ हिंदी आवृत्त्या 'पथ के दावेदार' या नावाने इ-व्यापार संकेतस्थळांवर अगदी शंभर रूपयांत उपलब्ध आहेत. https://www.amazon.in/Path-Davedar-Hindi-Saratchandra-Chattopadhyay/dp/9389567157/ref=mp_s_a_1_4?qid=1647682831&refinements=p_27%3ASaratchandra+Chattopadhyay&s=books&sr=1-4 https://www.loksatta.com/chaturang/streetvache-rupbandh/article-about-shrchandra-chattopadhyay-novel-pather-dabi-1790827/

In reply to by अनुस्वार

अर्धवटराव Tue, 03/22/2022 - 22:05
सव्यसाची नव्हता सापडला. आता हिंदी आवृत्ती बघतो. सव्यसाची शोधताना एका बंगाली डॉन ची कादंबरी हाती लागली होती. प्रत्यक्ष हा डॉन त्या कथेत वावरत नाहि, पण सगळी पात्र त्याच्या भोवती गुंफली होती.. डोन ची मुलगी आणि जावई, मुलीचा बॉयफ्रेण्ड, पोलीस अधिकारी.. भन्नाट होती कथा.

कर्नलतपस्वी Tue, 03/15/2022 - 08:23
कथा,कवीता,कादंबरी यांचे विषय असतात. मुन्शी प्रेमचंद याचे लेखन गोदान,एक चादर मैलीसी इ. पण त्या वेळच्या कुप्रथांवरच आधारित होते कुठल्याही काळात शेष प्रश्न हा अनुत्तरीतच राहातो फक्त काळा प्रमाणे त्याचे रूप बदलते. छान लिहिलय.

भागो Tue, 03/15/2022 - 08:27
शरच्चंद्र ह्यांच्या सर्व लिखाणाचे मराठी भाषांतर श्री मामा वरेरकर यांनी करले होते/आहे. तो संपूर्ण सेट माझ्या बहिणींनी विकत घेतला होता. मला त्यातून विप्रदास आणि श्रीकांत ह्या अत्यंत आवडलेल्या. पणते दिवस गेले. आता खुद्द बंगाल मध्ये कोणी शरच्चंद्र वाचत नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यांंवर अनेक हिंदी चित्रपट झाले. नोबल प्राईज च्या वेळी रवींद्रनाथंच्या बरोबर शरच्चंद्रांचे नावही चर्चेत होते.

अनिंद्य Wed, 03/16/2022 - 13:44
समग्र शरदचंद्र वाचलेय - इंग्रजी आणि हिंदी भाषांतर. मराठीत त्यांची काही पुस्तके नक्कीच भाषांतरित झाली आहेत. पण कुणी वाचत असेल असे वाटत नाही. पुढच्या पिढीत शरदचंद्र आणि रवींद्रनाथ वाचणारे कुणी उरेल याची खात्री नाही. 'शेष प्रश्न' चे म्हणाल तर जितके जुने तितकेच प्रासंगिक. सध्या काळाचे चक्र उलटे फिरतेय की काय असे वाटायचे दिवस आहेत.

कंजूस Wed, 03/16/2022 - 15:34
कर्नाटकात भैरप्पांचा विषय काय असतो? सध्या मराठी मालिकांत सासू सांगते सुनेला शिक्षण घाल चुलीत. पुन्हा काळ मागे चालला.

In reply to by अर्धवटराव

अनुस्वार Sat, 03/19/2022 - 15:19
तुम्हाला सव्यसाची अगोदरच भेटला असेल. नसल्यास तो 'पथेर दाबी' मध्ये भेटेल. पुस्तक मराठीत नाही सापडले परंतु पुष्कळ हिंदी आवृत्त्या 'पथ के दावेदार' या नावाने इ-व्यापार संकेतस्थळांवर अगदी शंभर रूपयांत उपलब्ध आहेत. https://www.amazon.in/Path-Davedar-Hindi-Saratchandra-Chattopadhyay/dp/9389567157/ref=mp_s_a_1_4?qid=1647682831&refinements=p_27%3ASaratchandra+Chattopadhyay&s=books&sr=1-4 https://www.loksatta.com/chaturang/streetvache-rupbandh/article-about-shrchandra-chattopadhyay-novel-pather-dabi-1790827/

In reply to by अनुस्वार

अर्धवटराव Tue, 03/22/2022 - 22:05
सव्यसाची नव्हता सापडला. आता हिंदी आवृत्ती बघतो. सव्यसाची शोधताना एका बंगाली डॉन ची कादंबरी हाती लागली होती. प्रत्यक्ष हा डॉन त्या कथेत वावरत नाहि, पण सगळी पात्र त्याच्या भोवती गुंफली होती.. डोन ची मुलगी आणि जावई, मुलीचा बॉयफ्रेण्ड, पोलीस अधिकारी.. भन्नाट होती कथा.

कर्नलतपस्वी Tue, 03/15/2022 - 08:23
कथा,कवीता,कादंबरी यांचे विषय असतात. मुन्शी प्रेमचंद याचे लेखन गोदान,एक चादर मैलीसी इ. पण त्या वेळच्या कुप्रथांवरच आधारित होते कुठल्याही काळात शेष प्रश्न हा अनुत्तरीतच राहातो फक्त काळा प्रमाणे त्याचे रूप बदलते. छान लिहिलय.

भागो Tue, 03/15/2022 - 08:27
शरच्चंद्र ह्यांच्या सर्व लिखाणाचे मराठी भाषांतर श्री मामा वरेरकर यांनी करले होते/आहे. तो संपूर्ण सेट माझ्या बहिणींनी विकत घेतला होता. मला त्यातून विप्रदास आणि श्रीकांत ह्या अत्यंत आवडलेल्या. पणते दिवस गेले. आता खुद्द बंगाल मध्ये कोणी शरच्चंद्र वाचत नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यांंवर अनेक हिंदी चित्रपट झाले. नोबल प्राईज च्या वेळी रवींद्रनाथंच्या बरोबर शरच्चंद्रांचे नावही चर्चेत होते.

अनिंद्य Wed, 03/16/2022 - 13:44
समग्र शरदचंद्र वाचलेय - इंग्रजी आणि हिंदी भाषांतर. मराठीत त्यांची काही पुस्तके नक्कीच भाषांतरित झाली आहेत. पण कुणी वाचत असेल असे वाटत नाही. पुढच्या पिढीत शरदचंद्र आणि रवींद्रनाथ वाचणारे कुणी उरेल याची खात्री नाही. 'शेष प्रश्न' चे म्हणाल तर जितके जुने तितकेच प्रासंगिक. सध्या काळाचे चक्र उलटे फिरतेय की काय असे वाटायचे दिवस आहेत.

कंजूस Wed, 03/16/2022 - 15:34
कर्नाटकात भैरप्पांचा विषय काय असतो? सध्या मराठी मालिकांत सासू सांगते सुनेला शिक्षण घाल चुलीत. पुन्हा काळ मागे चालला.
कटाक्ष: भाषा- हिंदी (मूळ बंगाली) लेखक- शरच्चंद्र चट्टोपाध्याय प्रकाशन- डायमंड बुक्स प्रथमावृत्ती- १९३१ पृष्ठसंख्या- २०८ किंमत- ₹१५० ISBN : 978-81-7182-917-1 ओळख: कहाणीचा काळ स्वातंत्र्यपूर्व, वीसाव्या शतकाचा पूर्वार्ध. सगळे कथानक आग्र्यातल्या बंगाली वस्तीत घडते. आशु बाबु, अविनाश, हरेन्द्र, अक्षय आणि इतर ही बंगाली भद्र मंडळी. संस्कृतीचे पाईक आणि पूजक अशा या मंडळींची गाठ पडते कथेची नायिका कमल हिच्याशी (कथेला नायक नाही!). कमल आणि तिचा गायक पती शिवनाथ यांच्या विवाहाची वैधता ते कमलचे कुळ, जात इ.

हे वाचा: चित्रलेखा

अनुस्वार ·

कंजूस Tue, 03/01/2022 - 03:08
एक दारुडा त्याच्याकडून एकच चांगली गोष्ट ( हातातली फुले महादेवाच्या देवळासमोर सांडतात )होते म्हणून तो इंद्रपदावर जातो ही गोष्ट पुराणात आहे.

या पुस्तकावर आधारित याच नावाचा चित्रपट आहे मीनाकुमारी आणि प्रदीपकुमार यांचा. त्यात साहिर/रोशनची अप्रतिम गीतं आहेत. १. संसारसे भागे फिरते हो २. काहे तरसाये जियरा ३. सखी रे मेरा मन उलझे तन डोले ४. ऐ री जाने ना दूंगी आणि सर्वात आवडणारं ५. मन रे तू काहे ना धीर धरे

चौथा कोनाडा Tue, 03/01/2022 - 13:03
सुंदर पुस्तक ओळख !
आज नव्वद वर्षांनंतरही या कादंबरीच्या नवीन आवृत्त्या निघत आहेत हे तिच्या अभिजाततेचे द्योतक आहे.
हे भारी आहे !

कंजूस Tue, 03/01/2022 - 03:08
एक दारुडा त्याच्याकडून एकच चांगली गोष्ट ( हातातली फुले महादेवाच्या देवळासमोर सांडतात )होते म्हणून तो इंद्रपदावर जातो ही गोष्ट पुराणात आहे.

या पुस्तकावर आधारित याच नावाचा चित्रपट आहे मीनाकुमारी आणि प्रदीपकुमार यांचा. त्यात साहिर/रोशनची अप्रतिम गीतं आहेत. १. संसारसे भागे फिरते हो २. काहे तरसाये जियरा ३. सखी रे मेरा मन उलझे तन डोले ४. ऐ री जाने ना दूंगी आणि सर्वात आवडणारं ५. मन रे तू काहे ना धीर धरे

चौथा कोनाडा Tue, 03/01/2022 - 13:03
सुंदर पुस्तक ओळख !
आज नव्वद वर्षांनंतरही या कादंबरीच्या नवीन आवृत्त्या निघत आहेत हे तिच्या अभिजाततेचे द्योतक आहे.
हे भारी आहे !
लेखनविषय:
कटाक्ष: भाषा- हिंदी लेखक- भगवतीचरण वर्मा प्रकाशन- राजकमल प्रकाशन (द्वारा प्रथम प्रकाशित १९९३) प्रथमावृत्ती- १९३४ सध्याची आवृत्ती- २६ वी पृष्ठसंख्या- २०० किंमत- ₹२५० ISBN : 978-81-267-1585-5 ओळख: एका गुरूच्या दोन शिष्यांना 'पाप म्हणजे काय?' असा प्रश्न पडतो. त्याचे निराकरण करण्यासाठी त्यांचे गुरु एका शिष्याला योग्याकडे तर दुसऱ्याला ऐषोरामात आकंठ बुडालेल्या सरदाराच्या संगतीत राहण्याची आज्ञा देतात. या दोन शिष्यांसोबत जीवनाच्या दोन टोकांवर हिंदोळे खात वाचक जे अनुभव घेतो त्यांचा थरार 'गेम ऑफ थ्रोन्स'पेक्षा कमी वाटत नाही.

मुराकामी

पाटिल ·

कॉमी Fri, 02/04/2022 - 22:33
मुराकामी आवडता लेखक म्हणता येण्याइतकी त्याची पुस्तकं वाचली नाहीयेत, पण एक कथासंग्रह वाचलाय तो खूप आवडलेला- आफ्टर द क्वेक. त्यातली हनी पाय ही गोष्ट तर अत्यंत आवडलेली. मुराकामीचं एखादं सणसणीत पुस्तक नुकतंच वाचलंय आणि मुरकामीबद्दल काय लिहू आणि काय नको असं झालंय असं हा लहानसा लेख वाचून वाटलं. मस्त असतं हे असं वाटणं.

लई भारी Fri, 02/04/2022 - 22:51
सुंदर लिहिलंय! एक छोटा कथासंग्रह वाचलाय आणि मुराकामी च्या साहित्याच्या रसास्वादाचे बरेच लेख. त्यामुळे नेहमीच आकर्षण राहिले आहे. बाकी एक विचार नेहमीच येत राहिलाय; बहुधा मुराकामी मूळ लेखन जपानी भाषेत करत असेल आणि आपण वाचतो ते इंग्रजी मध्ये असून इतकं भारी वाटत. मूळ भाषेत किती जबरदस्त असेल! तो फील आपल्याला येणे अशक्य आहे ना :-) भैरप्पा वाचताना पण असच वाटत नेहमी. अर्थात या सगळ्या अनुवाद करणाऱ्यांचे पण कौतुक करावे तितके थोडे.

पाटिल Sat, 02/05/2022 - 09:48
@कॉमी, मस्त असतं हे असं वाटणं >> :-)) खरंय. आफ्टर द क्वेक कथासंग्रह वाचलाय मी. चांगलाच आहे. त्याचा मराठी अनुवादही झालेला आहे. काफ्का ऑन द शोअर जरूर वाचून पहा. जबरदस्त प्रकार आहे. बाकी मग नॉर्वेजियन वूड, The wild sheep chase या ही आहेत, ज्या उत्तमच आहेत आणि आकाराने छोट्याही आहेत. द वाईंड अप बर्ड क्रोनिकल, 1Q84 या कादंबऱ्या थोर आहेत. पण एकसलग तीन चार बैठकींत संपण्यासारख्या नाहीत. प्रत्येकी जवळपास नऊशे पानांचा मजकूर आहे. @ लई भारी, अर्थात या सगळ्या अनुवाद करणाऱ्यांचे पण कौतुक करावे तितके थोडे.>> हो. मुराकामीच्या पुस्तकांना इंग्रजी अनुवादक फार चांगले लाभले आहेत. :-) भैरप्पांच्या पुस्तकांचे उमा वि. कुलकर्णींनी केलेले अनुवाद एकेकाळी भरभरून वाचले आहेत. त्यापैकी 'पर्व' 'मंद्र' आवडली होती. मात्र त्यांची 'काठ' ही कादंबरी विशेष आठवणीत आहे. त्यातल्या त्या प्राध्यापिका अमृता आणि सोमशेखर यांच्या प्रेमसंबंधांनी, फारच भारावून टाकले होते. नंतर एकदा २००८ साली वगैरे म्हैसूरला गेलो असताना, खास चामुंडा टेकडीवरही जाऊन आलो होतो. परंतु त्या कादंबरीतल्या भैरप्पांनी लिहिलेल्या जुन्या शांत चामुंडा टेकडीच्या परिसराची प्रतिमा उगाचच विस्कटून गेल्यासारखे वाटत राहिले होते नंतर.. पण चालायचंच. हे असं होतच असतं ना म्हणजे :-)

कॉमी Fri, 02/04/2022 - 22:33
मुराकामी आवडता लेखक म्हणता येण्याइतकी त्याची पुस्तकं वाचली नाहीयेत, पण एक कथासंग्रह वाचलाय तो खूप आवडलेला- आफ्टर द क्वेक. त्यातली हनी पाय ही गोष्ट तर अत्यंत आवडलेली. मुराकामीचं एखादं सणसणीत पुस्तक नुकतंच वाचलंय आणि मुरकामीबद्दल काय लिहू आणि काय नको असं झालंय असं हा लहानसा लेख वाचून वाटलं. मस्त असतं हे असं वाटणं.

लई भारी Fri, 02/04/2022 - 22:51
सुंदर लिहिलंय! एक छोटा कथासंग्रह वाचलाय आणि मुराकामी च्या साहित्याच्या रसास्वादाचे बरेच लेख. त्यामुळे नेहमीच आकर्षण राहिले आहे. बाकी एक विचार नेहमीच येत राहिलाय; बहुधा मुराकामी मूळ लेखन जपानी भाषेत करत असेल आणि आपण वाचतो ते इंग्रजी मध्ये असून इतकं भारी वाटत. मूळ भाषेत किती जबरदस्त असेल! तो फील आपल्याला येणे अशक्य आहे ना :-) भैरप्पा वाचताना पण असच वाटत नेहमी. अर्थात या सगळ्या अनुवाद करणाऱ्यांचे पण कौतुक करावे तितके थोडे.

पाटिल Sat, 02/05/2022 - 09:48
@कॉमी, मस्त असतं हे असं वाटणं >> :-)) खरंय. आफ्टर द क्वेक कथासंग्रह वाचलाय मी. चांगलाच आहे. त्याचा मराठी अनुवादही झालेला आहे. काफ्का ऑन द शोअर जरूर वाचून पहा. जबरदस्त प्रकार आहे. बाकी मग नॉर्वेजियन वूड, The wild sheep chase या ही आहेत, ज्या उत्तमच आहेत आणि आकाराने छोट्याही आहेत. द वाईंड अप बर्ड क्रोनिकल, 1Q84 या कादंबऱ्या थोर आहेत. पण एकसलग तीन चार बैठकींत संपण्यासारख्या नाहीत. प्रत्येकी जवळपास नऊशे पानांचा मजकूर आहे. @ लई भारी, अर्थात या सगळ्या अनुवाद करणाऱ्यांचे पण कौतुक करावे तितके थोडे.>> हो. मुराकामीच्या पुस्तकांना इंग्रजी अनुवादक फार चांगले लाभले आहेत. :-) भैरप्पांच्या पुस्तकांचे उमा वि. कुलकर्णींनी केलेले अनुवाद एकेकाळी भरभरून वाचले आहेत. त्यापैकी 'पर्व' 'मंद्र' आवडली होती. मात्र त्यांची 'काठ' ही कादंबरी विशेष आठवणीत आहे. त्यातल्या त्या प्राध्यापिका अमृता आणि सोमशेखर यांच्या प्रेमसंबंधांनी, फारच भारावून टाकले होते. नंतर एकदा २००८ साली वगैरे म्हैसूरला गेलो असताना, खास चामुंडा टेकडीवरही जाऊन आलो होतो. परंतु त्या कादंबरीतल्या भैरप्पांनी लिहिलेल्या जुन्या शांत चामुंडा टेकडीच्या परिसराची प्रतिमा उगाचच विस्कटून गेल्यासारखे वाटत राहिले होते नंतर.. पण चालायचंच. हे असं होतच असतं ना म्हणजे :-)
लेखनप्रकार
हारुकी मुराकामी हा सांप्रतकाळातला एक जिनीयस लेखक. त्याचा वाचकवर्ग जगभर पसरलेला. म्हणजे उदाहरणार्थ मुराकामीच्या एखाद्या कादंबरीत टोक्योमधल्या कुठल्यातरी खरोखरच्या ब्रिजचं, लायब्ररीचं किंवा अशाच कुठल्याशा स्थळाचं वर्णन असतं. आणि ते एवढं प्रत्ययकारी असतं की त्याचे वाचक नेटवर त्या स्थळासंबंधी व्हिडिओ किंवा फोटोज् शोधत राहतात..! त्याच्या कादंबऱ्यातली माणसं काही हिरो-बिरो नसतात. पण अशा सिंपलशॉट माणसांनाही मुराकामी फारच ताकदीने आपल्यापुढे पेश करतो.. कल्पनेच्या भल्यामोठ्या कॅनव्हासवर तो पात्रांना मनसोक्त खेळवतो. पात्रांसोबतच आपल्यालाही खेळवतो, जोखतो..!

प्रतिभावंतांच्या तऱ्हा !

हेमंतकुमार ·

अनिंद्य Tue, 01/18/2022 - 11:40
छान संकलन. बरेचदा पुस्तकांच्या मुखपृष्ठावरची चित्रे आशयभंग करणारी असतात. त्यामुळे लेखकाला चित्रकाराची मध्यस्ती नको वाटली तर ते योग्यच.

सर टोबी Tue, 01/18/2022 - 14:17
हा एक चांगला तत्ववेत्ता समजला जातो. मी स्वतः एकेकाळी खूप न्युनगंडामुळे पछाडलेलो होतो आणि रसेलच्या एका छोट्या वाक्यामुळे स्वतःला सावरू शकलो. तर अशा या रसेलने जे काही लिखाण केले त्याची मुळ प्रेरणा म्हणजे त्याची अगतिकता होती. रसेलने बरीच लग्ने केली आणि आपल्या घटस्फोटित पत्नीला द्याव्या लागणाऱ्या पोटगिसाठी त्याला लिखाण करावं लागलं.

In reply to by सर टोबी

हेमंतकुमार Tue, 01/18/2022 - 14:51
सर, रसेल यांचे कुठले वाक्य तुम्हाला भावले हे जाणून घ्यायची उत्सुकता आहेच. अगदी मोडून पडलेल्या व्यक्तीस उभारी देणारी दोन वाक्ये माझी पण खूप आवडती आहेत : १. कुसुमाग्रजांची ‘पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा’ ही कवितेची ओळ आणि २. अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे हे वाक्य : The world breaks everyone and afterwards, some are strong at the broken places ! ( हे बहुधा आत्मचरित्रात्मक आहे).

In reply to by हेमंतकुमार

सर टोबी Tue, 01/18/2022 - 18:16
तंतोतंत आठवत नाहीय परंतु आपलं आयुष्य इतरांच्या तुलनेत कसही असलं तरी ते जगण्यालायक असतं असे काहीसे शब्द होते.

In reply to by सर टोबी

+१ अशाच अर्थाचं एक जपानी गाणं आहे. त्याचा साधारण अर्थं असा आहे की, ज्याप्रमाणे आपण फुलांची तुलना करू शकत नाही की कुठलं फूल चांगलं तर माणसांची का करावी. जसं प्रत्येक फुलाला स्वतःची वैशिष्ट्ये आहेत तशीच माणसांची पण आहेत. फक्त आपल्यातल्या strengths (मराठी?) ओळखून त्याच्यावर काम करा. प्रत्येक क्षेत्रात आपण पहिल्या क्रमांकावर नसू तरी चालेल कारण प्रत्येकजण आपापल्या परीने विशेषच असतो :)

In reply to by मुक्त विहारि

हेमंतकुमार Tue, 01/18/2022 - 16:13
मुवि धन्स. ५ आवडले >> अ-ग-दी ! अंतर्मुख करणारे आहे आपल्याला .... पण या विधानाला छेद देणाऱ्या बऱ्याच घटना जगात घडलेल्या आहेत. कितीतरी प्रतिभावंतांनी त्यांच्या अजरामर कलाकृती/ मूलभूत संशोधन ऐन तारुण्यात केलेले आहे.

तर्कवादी Tue, 01/18/2022 - 17:01
त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर साहित्य क्षेत्रातून टीका झाली
पण यात टीका करण्यासारखं काय होतं ते नाही समजलं.

In reply to by तर्कवादी

हेमंतकुमार Tue, 01/18/2022 - 17:28
पण यात टीका करण्यासारखं काय होतं ते नाही समजलं.
चांगला प्रश्न. माझ्या आठवणीनुसार लिहितोय, चुभु देघे. साहित्य अकादमीचा एखाद्या वर्षी पुस्तकाला पुरस्कार देण्यात एक निकष असतो. त्यात ते अमुक एका वर्षात/कालावधीत प्रसिद्ध झालेले पाहिजे असे काहीतरी आहे. बहुतेक काजळमाया अन्य कुठल्या तरी वर्षात प्रसिद्ध झाले होते. त्यावरून कोणीतरी तांत्रिक हरकत घेतली. हे सगळे होईपर्यंत जीए आनंदाने हरखून गेले होते आणि त्यांनी कधी नव्हे ते त्या रोख रकमेतून दिल्लीमध्ये छानपैकी हिंडून ‘जिवाची दिल्ली’ केली होती. नंतर उद्वेगाने त्यांनी पुरस्कार परत केला.

मित्रहो Tue, 01/18/2022 - 17:13
लेख आवडला विजय तेंडुलकर यांचा किस्सा वाचला होता. त्यांच्या मते घाशीराम नाटकात संगीतामुळे ते नाटक त्यांना हवे तसे राहिले नाही. जी ए कुलकर्णी फारसे कुणाशी बोलत नसत असेही वाचले होते.

कर्नलतपस्वी Tue, 01/18/2022 - 17:34
यांनी मांजर आणि त्याचे पिल्ला करता भिंती मधे दोन ,एक मोठे आणी एक छोटे आसे दोन रस्ते बनवले आसा किस्सा ऐकला होता. खरे खोटे आईनस्टाईन व त्याची माजंरेच सांगू शकतील.

सौंदाळा Tue, 01/18/2022 - 18:00
बर्नाड शॉ चा एक किस्सा वाचला होता. एक इंग्रजी शिक्षक त्यांना भेटायला आला होता आणि गर्विष्ठपणे स्वतःचे इंग्रजी भाषेतील योगदान सांगत होता. तो म्हणाला इंग्रजी भाषेत su ने सुरु होऊन उच्चार 'शु' होणारा एकच शब्द आहे 'sugar' बर्नाड शॉ पटकन म्हणाले 'are you sure?'

हेमंतकुमार Tue, 01/18/2022 - 18:30
रसेल, जीए, आईन्स्टाईन आणि बर्नार्ड शॉ या सर्वांसंबंधीची माहिती / किस्सेआवडले. बर्नाड यांचा अन्य किस्सा मी नुकताच इथे लिहिला होता. इंग्लिश स्पेलिंग आणि उच्चार त्यांच्यातील विसंगती बाबत तर शॉनी अनेक मजेशीर नमुने व त्यावर मल्लीनाथी केलेली आहे.

सुबोध खरे Tue, 01/18/2022 - 20:12
श्री पु ल देशपांडे यांच्या लेखनाच्या पुढच्या प्रक्रिया त्यांच्या पत्नी सौ सुनीता करत असत. एकदा पुस्तक छपाई च्या सुरुवातीची प्रत त्यांच्या हातात आली तेंव्हा त्यात असंख्य चुका होत्या सुनीता बाईंनी विचारलं कि याचं प्रूफ रिडींग कुणी केलं त्यावर छापखान्याच्या कर्मचाऱ्याने सांगितलं कि साहेबानी केलं आहे. सुनीता बाईंनी ते पाहायला मागितलं तेंव्हा त्याच्या पहिल्याच पानात प्रचंड चुका होत्या. ते पाहून श्री पु ल इतके वैतागले होते कि त्यांनी प्रूफ रीडरचे आडनाव "वाघ" होते त्यावर काट मारून "डुक्कर" लिहून प्रूफ परत केले होते. अर्थात सुनीता बाईंनी पुस्तकाच्या छपाईच्या अगोदर प्रूफ रिडींग परत करून घेतले हे सांगायला नकोच.

हेमंतकुमार Tue, 01/18/2022 - 20:55
सर्वांचे किस्से छानच ! ........................... साहित्य-चित्रपट क्षेत्राशी संबंधित दोन दिग्गजांसंबंधी हा एक किस्सा. टागोरांची नष्टनीड नावाची एक कादंबरी आहे. त्यावर सत्यजित राय यांनी चारुलता चित्रपट काढला. त्याचा विषय : नवरा-बायकोच्या जोडीमध्ये बायको वयाने बरीच लहान आहे. त्यामुळे ती तिच्या समवयस्क दिराच्या प्रेमात पडते. अशा तऱ्हेने हा प्रेमाचा त्रिकोण होतो. आता त्यांच्या वास्तव आयुष्याशी कसा योगायोग ते पहा : र. टागोरांचे भाऊ जतींद्रनाथ हे त्यांची बायको कादंबरीपेक्षा तेरा वर्षांनी मोठे असतात. इथे दोन भाऊ आणि कादंबरी असा त्रिकोण होतो. पुढे कादंबरी आत्महत्या करतात. २. राय यांनी जेव्हा अभिनेत्री माधवीला घेऊन चित्रपटाचे चित्रीकरण चालू केले तेव्हा ते तिच्या प्रेमात पडतात ! ते तिच्या पेक्षा 21 वर्षांनी मोठे असतात. इथे राय, त्यांची बायको आणि माधवी असा त्रिकोण होतो. या प्रकाराची कुजबुज खूप वाढल्याने माधवी राय यांच्यापासून दूर होते व त्यांच्या पुढील चित्रपटांत काम करीत नाही.

कानडाऊ योगेशु Wed, 01/19/2022 - 10:19
असामान्यांनी नेहेमी असामान्यांसारखेच वागावे ही अपेक्षा असल्याने अशी असामान्य व्यक्ती जेव्हा सामन्य तर्हेने वागते तेव्हा त्याला तर्हेवाईक पणा म्हणत असावे. सचिन तेंडुलकर चहात पूर्ण बुडवुन बिस्किट खातो आता ह्यात तर्हेवाईकपणा काय आहे हे समजत नाही पण बर्याच जणांनी तो तसा वाटतो हे खरे.

हेमंतकुमार Wed, 01/19/2022 - 10:52
का यो +१ 😀 ....................... .हा किस्सा गिर्यारोहकाचा ... जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींना ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !” अशी ही दिलदार वृत्ती.

कंजूस Wed, 01/19/2022 - 11:33
गावाबाहेर दूर. कारण लोकांना, शेजाऱ्यांना त्यांच्या गाण्याचा व्यत्यय त्रास नको. --------- यावरून आठवलं एक प्रतिभावान पेटीवादक ( त्यांचा एक मुलगाही तीन वर्षांचा पेटी वाजवे. तोही आता प्रसिद्ध आहे) आमचे शेजारीच होते. रोज नाट्यसंगीत सराव करायचे,पेटी ऐकू यायची पण इमारतीमधील फक्त एक रहिवासी दाद देत, आदर बाळगत. पण आम्ही धरून बाकीच्यांच्या मते ते पटी 'बडवत.' म्हणजे कुमार गंधर्वांना शेजाऱ्यांची किती काळजी वाटत होती हे समजेल.

अनन्त्_यात्री Wed, 01/19/2022 - 11:46
रिचर्ड फाईनमन हे एक बहुआयामी क्षमता असलेले प्रतिभावान नोबेल पुरस्कार विजेते क्वांटम भौतिकशास्त्रज्ञ होते. या माणसाला अनेक छंद होते.मॅनहॅटन अणुबाॅम्ब प्रकल्पावर काम करताना तर या हरफनमौलाने चक्क तिजोर्‍या फोडण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास करून त्यात प्राविण्य मिळविले होते व आपल्या या "कौशल्या"चा प्रसाद आपल्या परिचितांना दिला होता!

हेमंतकुमार Wed, 01/19/2022 - 12:36
वरील चर्चेत आलेले कुमार गंधर्व, पिकासो, न्यूटन व फाइनमन हे सर्व किस्से छान ! ..
या हरफनमौलाने चक्क तिजोर्‍या फोडण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास करून त्यात प्राविण्य मिळविले होते
>>> यावरून एक हिंदी चित्रपट अंधुकसा आठवतो आहे. त्यात एक अट्टल कुलूपफोड्या दाखवला आहे(बहुतेक या भूमिकेत अजय देओल असावा). त्या चोराच्या घरात एक मोठा कुटुंबफोटो आहे. त्यात श्री. गोदरेज सुद्धा दाखवलेले आहेत ! चोराचा मित्र विचारतो, “तुझ्या कुटुंबात हे गोदरेज कसे काय बुवा?” यावर चोर म्हणतो, “गोदरेज हे माझे प्रेरणास्थान आहेत. ते जितकी अत्याधुनिक कुलपे तयार करत जातात, तितकाच मी ती कुलपे उघडण्याच्या युक्त्या विकसित करीत जातो ! म्हणून मी त्यांचा ऋणी आहे” ....ऑस्कर वाइल्ड म्हणून गेलेच आहेत, “चोर हा कलाकार असतो, तर पोलिस फक्त टीकाकार”.

हेमंतकुमार गुरुवार, 01/27/2022 - 11:17
आज ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांचे निधन झाल्याची बातमी वाचली आणि दुःख झाले. त्यांच्या दोन आठवणी लिहितो. एकदा आमच्या वैद्यकीय महाविद्यालयात एका परिसंवादात त्यांना बोलावले होते. व्यासपीठावर अन्य काही मान्यवर डॉक्टर बसलेले होते. त्यापैकी एकाने प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार करून स्वतःच्या मुलाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला होता. अवचटांनी त्यांच्या भाषणात या गृहस्थांचे नाव न घेता त्यांच्या गैर कृतीचा जाहीरपणे उल्लेख केला. तेव्हा व्यासपीठावरील काहीजण चपापले होते. परंतु या प्रसंगात अवचटांचे धाडस सर्वांना दिसून आले. .. दुसऱ्या एका प्रसंगात त्यांनी स्वतः वेश्यावस्तीत जाऊन तिथल्या पीडित महिलांची दुःख कशी समजावून घेतली याचा वृत्तांत आम्हाला सांगितला होता. तेव्हा त्या शोषित जगाची आम्हाला अगदी जवळून ओळख झाली. ... विनम्र आदरांजली!

In reply to by हेमंतकुमार

सर टोबी गुरुवार, 01/27/2022 - 13:44
याचं खूप लिखाण मी वाचलं आहे. आपलं वाचन खूप असण्यापेक्षा वाचनाचा आपल्या जीवनात खूप उपयोग व्हावा असा दृषटीकोण असतो. त्या अर्थाने त्यांचा संगोपन हा लेख मला खूप आवडला. माझ्या मुलाला देखील मी अनवट पध्द्तीने शिक्षण दिले. त्याला कधीही शिक्षा किंवा मारहाण केली नाही. त्यांना विनम्र प्रणाम.

हेमंतकुमार Sat, 02/12/2022 - 12:54
मंगेश पाडगावकरांनी तरुणपणी कविता लिहायला सुरुवात केली होती. बीए झाल्यानंतर ते नोकरी करू लागले पुढे नोकरीतील बढतीसाठी त्यांनी उशिराने एम ए करण्याचा निर्णय घेतला. एम. ए. च्या अभ्यासक्रमात त्यांना त्यांचीच एक कविता अभ्यासात होती ! परीक्षेत, त्या कवितेत ‘कवीला काय सुचवायचे आहे', या प्रश्नावरील उत्तर त्यांनी स्वतःच्या मनाने न लिहिता गाइडमधले लिहिले होते. असे केल्यानेच त्या प्रश्नाला चांगले गुण मिळतील अशी त्यांची धारणा होती ! (यशोदा पाडगावकरांच्या आत्मचरित्रातून)

In reply to by हेमंतकुमार

श्रीगणेशा Sun, 02/13/2022 - 19:17
एम. ए. च्या अभ्यासक्रमात त्यांना त्यांचीच एक कविता अभ्यासात होती !
कवीला काय सुचवायचे आहे
विनोदी विसंगती! ---- खूप माहितीपूर्ण लेख व चर्चा _/\_

हेमंतकुमार Sun, 02/12/2023 - 16:16
अशोक शहाणे नावाचा तरुण : नाबाद ८८
* आपल्याच लेखनाची इतकी उपेक्षा करणारा दुसरा कोण लेखक असेल? * ‘आमची पिढी ही षंढांची’ असे ते निखालस म्हणू शकले. या साऱ्यामागे त्यांचे साहित्याचे आकलन, मूल्यभान, नव्या प्रयोगांची ओढ आणि मराठी संस्कृतीवरचे निस्सीम प्रेम होते.

रामचंद्र Mon, 02/13/2023 - 01:22
अमेरिकेचे अध्यक्ष जॉन्सन तसेच रेगन हे काही प्रतिभावंत म्हणून गणले जात नाहीत. पण त्यांचा एक किस्सा पत्रकार वॉल्टर क्रॉन्काइट यांनी सांगितला आहे. एकदा व्हाईट हाऊसमध्ये मेजवानीप्रसंगी क्रॉन्काइट निमंत्रित होते. जॉन्सन यांनी त्यांना आवर्जून आपल्या शेजारी बसवून घेतलं. नंतर क्रॉन्काइट यांच्या लक्षात आलं की जॉन्सन बोलता बोलता आपल्याला मनाई असलेला पदार्थ क्रॉन्काइटच्या पानातून सफाईने बोलण्याच्या नादात घेतल्याचे भासवत खात आहेत. (कारण त्यांच्यावर पत्नी लेडी बर्ड यांची नजर होती.)

हेमंतकुमार Mon, 02/13/2023 - 14:34
हा किस्सा भारी असून तो भालचंद्र नेमाडे यांनी कोसलाच्या सुवर्णमहोत्सवी आवृत्तीच्या प्रस्तावनेत तपशीलवार लिहिला आहे. तो थोडक्यात लिहितो. रा. ज. देशमुख हे तत्कालीन मराठी साहित्यातील मोठे प्रकाशक. त्यांच्याकडे नेमाडे व शहाणे ही दुक्कल गप्पांसाठी जमत असे. देशमुख त्याकाळी खांडेकर, पु ल देशपांडे आणि रणजीत देसाई यासारख्या मातब्बर लेखकांचे साहित्य प्रकाशित करीत होते. परंतु ही दुक्कल मात्र त्या लेखकांवर वैतागलेली होती. या प्रस्थापित लेखकांचे सगळं कसं कृत्रिम, जुनाट आहे असे मत हे दोघे व्यक्त करीत. हे वारंवार ऐकल्यावर देशमुख एकदा त्यांना म्हणाले, “मोठ्या लेखकांची टिंगलटवाळी करणं सोपं आहे. तुम्ही असे एक तरी लिहून दाखवा बरं !” त्यावर नेमाडे म्हणाले, “खांडेकरांसारखी कादंबरी आठेक दिवसात सहज लिहिता येईल”. त्यावर देशमुख म्हणाले, “लिहून दाखवा, बकवास पुरे” नेमाडे म्हणाले की आम्ही लिहू सुद्धा पण आमचं कोण छापणार ? मग देशमुख यांनी शेवटचे सांगितले, “लिहून दाखवा, मी छापतो”. यानंतर मग इरेला पेटून नेमाडेंनी 18 दिवस सलग बसून कोसला लिहिली. असा तो इतिहास !

सुधीर कांदळकर Tue, 03/28/2023 - 13:39
आवडला. जी एंच्या विक्षिप्तपणाबद्दल सुनीताबाईंच्या आणि त्यांच्या प्रकाशित पुस्तकरूपातील पत्रव्यवहारात वाचनीय गमती आहेत. ते नेहमीं रशियन बुद्धिबळपटूंसारखा काळा चष्मा घालीत असे मी ऐकले होते. बाबुराव अर्नाळकर लेखन करतांना रसिकांचा उपद्रव टाळण्यासाठी स्वत:च्या ग्रॅन्ट रोड स्थानकाजवळच्या निवासस्थानी न करतां परळ्च्या आईमाई मेरवानजी स्ट्रीटवरील एका चाळीत तिसर्‍या मजल्यावरील एका खोलीत करीत. नटश्रेष्ठ डॉ. लागूंना एकदा एका गणेशोत्सवात सत्कारासाठी बोलावले होते. तेव्हा त्यांनी गणपतीची मूर्ती आणणे आणि त्याची पूजा करणे ही कशी अंधश्रद्धा आहे यावर बोलायला सुरुवात केली. आयोजकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी माईक सोडला नव्हता. शेवटी भाविकांचा जनक्षोभ टाळण्यासाठी हडेलहप्पी करून त्यांचे भाषण थांबवले गेले आणि कार्यकर्त्यांच्या संरक्षणात त्यांना बाहेर नेले होते. छान लेखाबद्दल लेखकांचे आणि विविध मनोरंजक किश्शांबद्दल प्रतिसादकांना खूपखूप धन्यवाद.

काय एकेक किस्से, मजा आली वाचुन, माझ्याकडचे अजुन काही --एका कार्यक्रमात पं.ह्रदयनाथ मंगेशकरांनी सांगितलेला-- उंबरठा चित्रपटातील "सुन्या सुन्या मैफलीत माझ्या" गाण्याचे रेकॉर्डिंग चालु होते. तेव्हा "पुन्हा पुन्हा भास होत आहे, कुणीतरी आरशात आहे" ही ओळ जब्बार पटेलांना खटकली. एक विवाहीत स्त्री असे म्हणते याचा अर्थ वेगळा निघतोय असे त्याना वाटत होते. कविता सुरेश भटांची असल्याने त्याना नागपूर ला फोन करावा असे ठरले. तितक्यात मंगेशकर कुटूंबाच्या स्नेही शांताबाई शेळके तिथे आल्या. त्यानी विचारले की काय अडचण आहे? प्रकार कळल्यावर त्यानी थोडा विचार केला अणि पटकन म्हणाल्या "अहो सोपे आहे, कुणीतरी ऐवजी तुझे हसु" असे करा. हा बदल ईतका सोपा होता, तरीही गाण्याचा अर्थ सुधारत होता आणि मीटरमध्येही चपखल बसत होता की सगळे अवाक झाले. फोनवर सुरेश भटांनीही लगेच परवानगी दिली आणि रेकॉर्डिंग पार पडले. याला म्हणतात प्रतिभा. असाच दुसरा किस्सा माडगुळकरांचा प्रसिद्ध आहे. त्यांच्या एका गाण्याची ओळ बदलायची वेळ आली आणि थोडा बदल सुचवला गेला तेव्हा ते संगीतकारावर कडाडले "उगीच माझ्या ताजमहालाला तुमच्या विटा लावु नका" आणि स्वतः ओळ सुधारुन दिली. तिसरा किस्सा प्रसिद्ध तबलावादक थिरकवा साहेबांचा. ते वयस्कर झाले होते आणि उ. हबीबुद्दीन खां साहेबांच्या एका कार्यक्रमाला गेले होते. हबीबुद्दीन खां साहेबांचे "मुठिने धिर धिर वाजवणे" फार लोकप्रिय होते. त्यांचे तबलावादन झाले आणि त्यानी स्टेजवरुनच थिरकवाना विनंती केली की "आप कुछ बजावो" आता थिरकवा खरेतर प्रेक्षक म्हणुन आले होते आणि त्यांचा बहराचा काळ संपला होता. तेव्हा असे म्हणणे रिवाजाला धरुन नव्हते. पण आव्हान स्वीकारुन ते स्टेजवर गेले. लेहरा साथ करणार्‍या सारंगियाने आदराने विचारले "खान साब क्या चलन रखु?" म्हणजे किती वेगाने वाजवु? त्यावर बाणेदार थिरकवा म्हणाले "जहासे छोडा उधरसेही लेलो" असे म्हणुन त्यानी त्याच वेगात पुढचे तबलावादन करुन उपस्थिताना बोटे तोंडात घालायला लावली. अवांतर-- हे ज्ञान भांडार लुटण्यासाठीच अल्लारखांनी आपला मुलगा असुन झाकीर भाईना थिरकवा साहेबांकडे गंडाबंधन करुन तबला शिकायला पाठवले. माझ्या गुरुंचे गुरु दाउदखां साहेब एकदा अल्लारखां कडे गेले होते. अल्लारखांचे तेव्हा पुर्ण देशात नाव गाजत होते. आजुबाजुला बरीच मंडळी होती. अर्थात तबला वाजविण्याची फर्माईश झालीच. दाउदखांनी आव्हान देउन २५ गती अशा वाजवुन दाखविल्या की ज्या पुर्ण हिन्दुस्तानात फक्त तेच वाजवत. त्यांच्या पोतडीतील ज्ञान बघुन थक्क झालेले अल्लारखां म्हणाले" खान साब, मै तो सिर्फ पेट के लिये बजाता हुं"

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार Tue, 03/28/2023 - 15:21
तुम्ही लिहिलेले किसे खरोखरच अद्भुत आणि अद्वितीय आहेत. हा प्रतिसाद जणू एका संगीताच्या मैफिलीचा आनंद देऊन गेला !!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सुबोध खरे Wed, 03/29/2023 - 19:40
उस्ताद अल्लारखां साहेब आणि उस्ताद झाकीर हुसेन यांची जुगलबंदी मी स्वतः मुंबईत षण्मुखानंद हॉल मध्ये पाहिली. त्यात उस्ताद झाकीर हुसेन साहेब एक गत वाजवत मग तीच गत उस्ताद अल्लारखां साहेब वाजवत. यानंतर हि गत दोघे दुप्पट वेगाने वाजवत असे तीन वेळेस झाल्यावर उस्ताद झाकीर हुसेन यांची सीमा झाल्यावर त्यांच्या दुप्पट नंतर चौपट वेगाने उस्ताद अल्लारखां साहेब यांनी वाजवली. तेथे असलेले सर्व लोक उभे राहून अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन टाळ्या वाजवत होते आणि उस्ताद झाकीर हुसेन यांनी उस्ताद अल्लारखां साहेब यांचे अक्षरशः पाय धरले. हा अविस्मरणीय प्रसंग पाहताना आमच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते.

सुधीर कांदळकर Tue, 03/28/2023 - 16:23
केवळ अद्भुत रामेसाहेब. तीनही व्यक्ती हृदयात जपलेल्या असल्यामुळे फारच वाचायला मजा आली.

हेमंतकुमार Tue, 03/28/2023 - 16:34
इंग्लंडचे ‘क्रिकेटचे पितामह’ डब्ल्यू जी ग्रेस यांचा एक भारी किसा इथे वाचला. क्रिकेट रसिकांनी जरूर वाचावा ! त्या लेखाचा विषय पूर्ण वेगळा आहे. परंतु एक उदाहरण म्हणून हा किस्सा दिलेला आहे.

सुबोध खरे Wed, 03/29/2023 - 19:50
कविवर्य मंगेश पाडगावकर हे सहसा आपल्या गीतात कोणताही बदल करायला तयार नसत . त्यांचे एक गीत आहे दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झूलायचे. यात एक ओळ अशी आहे. माझ्या या घराच्या पाशी थांब तू गडे जराशी. ते मूळ काव्य थांब ना गडे जराशी असे होते. त्यात बदल करण्यास श्री पाडगावकर तयार नव्हते. कारण थांब ना हे शब्द आर्जवी आहेत असे त्यांचे म्हणणे होते. त्या अर्थाचा विपर्यास होईल असे श्री अरुण दाते यांनी नम्रपणे सांगितल्यामुळे नाखुशीने का होईना पण त्यांनी हे थांब तू गडे जराशी असा बदल करून दिला.

हेमंतकुमार गुरुवार, 03/30/2023 - 10:54
घटना 2005 मधील आहे. त्यावर्षीच्या ‘अंतर्नाद’ मासिकाच्या दिवाळी अंकात ‘सफाई’ ही कादंबरी प्रकाशित झाली होती. त्यावर लेखकाचे नाव कार्तिक कौंडिण्य असे लिहिले होते. कादंबरी सफाई कामगार स्त्री या संवेदनलशील विषयावर असून ती सुंदर आहे. त्या कादंबरीच्या लेखकाचे कधी न ऐकलेले हे नाव पाहून अनेकांना संशय आला होता, की हा काय कोणी नवोदित लेखक असणार नाही; हा तर मुरलेला लेखक दिसतोय ! कादंबरीच्या शेवटी त्या लेखकाचा मुंबईतील पत्ताही दिला होता. मग एक वाचक प्रत्यक्ष त्या पत्त्यावर गेले तेव्हा तिथे कोणीही कौंडिण्य नावाचे राहत नसल्याचे त्यांना समजले. दरम्यान मी देखील त्या लेखकांना कादंबरी आवडल्याचे पत्र लिहून ठेवले होते. तेवढ्यात त्या वरील वाचकांनी मासिकाच्या पुढच्या अंकात लिहिले, की कौंडिण्य नावाचे कोणी लेखक तिथे अस्तित्वात नाहीत: ही काहीतरी थापाथापी आहे. हे वाचल्यानंतर मी ते लिहिलेले आंतरदेशीय पत्र फाडून टाकले. या विषयावर मासिकात काथ्याकूट झाल्यावर संपादकांनी खुलासा केला. त्यात म्हटले होते की या कादंबरीचे लेखक त्याच पत्त्यावर राहतात. परंतु काही कारणास्तव त्यांना खरी ओळख जाहीर करायची नाहीये, तरी वाचकांनी त्याचा आदर करावा आणि साहित्यबाह्य संशोधनात रस घेऊ नये. इथे हा विषय संपला होता. पण माझ्या बाबतीत खरी गंमत पुढे घडणार होती... 2015 मध्ये माझा एक लेख ‘अंतर्नाद’मध्ये प्रसिद्ध झाला आणि तो वाचकप्रिय ठरला. त्याबद्दल मला अनेकांचे फोन, पत्रे वगैरे येत होती. एके दिवशी एक असाच अनोळखी फोन आला. तो एका मान्यवर लेखकांचा होता. मग आमच्या गप्पा झाल्या. त्या ओघात ते मला बोलून गेले, की 2005 मधील सफाई कादंबरी त्यांनीच लिहिलेली आहे ! मग मी त्यांना विचारले की फक्त त्या वेळेसच तुम्ही खरे नाव का लपवलेत? तेव्हा ते म्हणाले, “एखाद्या लेखनाचे मूल्यमापन, ते कोणी लिहिले आहे यापेक्षा ते काय लिहिले आहे यावरून व्हावे ही इच्छा होती. मला यानिमित्ताने बघायचे होते, की एका अनोळखी नावाने लिहून पाहिल्यानंतर वाचकांना कादंबरी कशी वाटते ते, आणि तो प्रयोग यशस्वी झाला”. हे लेखक म्हणजे सुमेध वडावाला (रिसबूड). कालांतराने ही कादंबरी त्यांच्या खऱ्या नावाने प्रसिद्ध झालेली दिसते आहे

हेमंतकुमार गुरुवार, 08/28/2025 - 18:53
चित्रकार शिद फडणीस यांच्या शंभरीनिमित्त पुण्यात जो कार्यक्रम झाला त्याचे एकेक भाग आता युट्युबवर येत असून त्यातून काही छान किस्से ऐकायला मिळत आहेत. मंगला गोडबोले यांनी सांगितलेला हा किस्सा : गोडबोलेंनी पूर्वी असे विधान केले होते की, 1960 -70 च्या दशकात मराठी मध्यमवर्गीय माणसाच्या रसिकतेसाठी फडणीस-वसंत सरवटे-पु.ल. हे ‘ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत !” तेव्हा काही लोकांनी या विधानाला झोडले देखील होते. . . . शिद जेव्हा ऐन तारुण्यात विविध प्रकाशनसाठी चित्रे काढत होते तेव्हा त्यांनी पाडलेला हा एक पायंडा : त्यांनी केशवराव कोठावळे यांना काही चित्रे काढून दिली होती. त्यातली काही नापसंत ठरली होती. परंतु काही दिवसांनी फडणीसांनी नापसंत पडलेल्या 'रफ स्केचेस 'चे सुद्धा बिल कोठावळ्यांकडे पाठवले. कोठावळ्यांनी ते नाराजीने का होईना पण दिले. श्रमांची किंमत हा त्यातला मुद्दा महत्त्वाचा आहे..

अभ्या.. गुरुवार, 08/28/2025 - 19:16
शिद जेव्हा ऐन तारुण्यात विविध प्रकाशनसाठी चित्रे काढत होते तेव्हा त्यांनी पाडलेला हा एक पायंडा : त्यांनी केशवराव कोठावळे यांना काही चित्रे काढून दिली होती. त्यातली काही नापसंत ठरली होती. परंतु काही दिवसांनी फडणीसांनी नापसंत पडलेल्या 'रफ स्केचेस 'चे सुद्धा बिल कोठावळ्यांकडे पाठवले. कोठावळ्यांनी ते नाराजीने का होईना पण दिले. श्रमांची किंमत हा त्यातला मुद्दा महत्त्वाचा आहे.. काहीजण हे पाळतात, बरेच जण नाही. ;) (स्वगतः नाकारलेल्या म्हणजे नापसंत कामाचे पैसे मिळत असते तर आज रोल्स रॉइस मधून फिरलो असतो ना ;) ) पण त्यातली खोच अशी आहे की कित्येक जण एक काम फिनिश करायचे आणि इतर दोन चार वेटेज(हा खास शब्द) ला थोडेफार चेंजेस करुन जरा बरे असे करायचे. मग ते फिनिश काम फायनल होते असे करतात. आणि कस्टमराला उगी तीन चार ऑप्शनमधून चांगले निवडल्याचा आनंद असे.......

हेमंतकुमार Fri, 09/12/2025 - 11:19
अनुमती हा मराठी आणि द सिग्नेचर ही त्याची हिंदी आवृत्ती असे दोन्ही चित्रपट गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेत. हिंदी चित्रपटासाठी गजेंद्रनी कथा पुन्हा स्वतंत्रपणे लिहून काढली व त्यानंतर ते ऋषी कपूरना भूमिकेसाठी विचारायला गेले. त्यांनी कथा ऐकल्यावर लगेच होकार दिला. सर्व काही बोलणी पण झाली. जाताना गजेंद्रनी त्यांना मराठी अनुमतीची सीडी हातात ठेवली आणि बघायला सांगितले आणि गजेंद्र निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषी कपूर यांचा फोन आला की ते त्यात काम करू शकणार नाहीत. त्याचे आश्चर्य वाटून त्यांना गजेंद्रनी विचारले की असं का? त्यावर ते म्हणाले,
“मी मराठी चित्रपट पाहिला. तो विक्रम गोखलेंनी इतक्या उंचीवर नेऊन ठेवला आहे की आता त्याला मी छेडू इच्छित नाही !”
एका बुजुर्ग हिंदी कलाकाराने श्रेष्ठ मराठी कलाकाराला दिलेली ही दाद नक्कीच कौतुकास्पद आहे. ( नंतर अनुपम खेरनी ती भूमिका केली).

अनिंद्य Tue, 01/18/2022 - 11:40
छान संकलन. बरेचदा पुस्तकांच्या मुखपृष्ठावरची चित्रे आशयभंग करणारी असतात. त्यामुळे लेखकाला चित्रकाराची मध्यस्ती नको वाटली तर ते योग्यच.

सर टोबी Tue, 01/18/2022 - 14:17
हा एक चांगला तत्ववेत्ता समजला जातो. मी स्वतः एकेकाळी खूप न्युनगंडामुळे पछाडलेलो होतो आणि रसेलच्या एका छोट्या वाक्यामुळे स्वतःला सावरू शकलो. तर अशा या रसेलने जे काही लिखाण केले त्याची मुळ प्रेरणा म्हणजे त्याची अगतिकता होती. रसेलने बरीच लग्ने केली आणि आपल्या घटस्फोटित पत्नीला द्याव्या लागणाऱ्या पोटगिसाठी त्याला लिखाण करावं लागलं.

In reply to by सर टोबी

हेमंतकुमार Tue, 01/18/2022 - 14:51
सर, रसेल यांचे कुठले वाक्य तुम्हाला भावले हे जाणून घ्यायची उत्सुकता आहेच. अगदी मोडून पडलेल्या व्यक्तीस उभारी देणारी दोन वाक्ये माझी पण खूप आवडती आहेत : १. कुसुमाग्रजांची ‘पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा’ ही कवितेची ओळ आणि २. अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे हे वाक्य : The world breaks everyone and afterwards, some are strong at the broken places ! ( हे बहुधा आत्मचरित्रात्मक आहे).

In reply to by हेमंतकुमार

सर टोबी Tue, 01/18/2022 - 18:16
तंतोतंत आठवत नाहीय परंतु आपलं आयुष्य इतरांच्या तुलनेत कसही असलं तरी ते जगण्यालायक असतं असे काहीसे शब्द होते.

In reply to by सर टोबी

+१ अशाच अर्थाचं एक जपानी गाणं आहे. त्याचा साधारण अर्थं असा आहे की, ज्याप्रमाणे आपण फुलांची तुलना करू शकत नाही की कुठलं फूल चांगलं तर माणसांची का करावी. जसं प्रत्येक फुलाला स्वतःची वैशिष्ट्ये आहेत तशीच माणसांची पण आहेत. फक्त आपल्यातल्या strengths (मराठी?) ओळखून त्याच्यावर काम करा. प्रत्येक क्षेत्रात आपण पहिल्या क्रमांकावर नसू तरी चालेल कारण प्रत्येकजण आपापल्या परीने विशेषच असतो :)

In reply to by मुक्त विहारि

हेमंतकुमार Tue, 01/18/2022 - 16:13
मुवि धन्स. ५ आवडले >> अ-ग-दी ! अंतर्मुख करणारे आहे आपल्याला .... पण या विधानाला छेद देणाऱ्या बऱ्याच घटना जगात घडलेल्या आहेत. कितीतरी प्रतिभावंतांनी त्यांच्या अजरामर कलाकृती/ मूलभूत संशोधन ऐन तारुण्यात केलेले आहे.

तर्कवादी Tue, 01/18/2022 - 17:01
त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर साहित्य क्षेत्रातून टीका झाली
पण यात टीका करण्यासारखं काय होतं ते नाही समजलं.

In reply to by तर्कवादी

हेमंतकुमार Tue, 01/18/2022 - 17:28
पण यात टीका करण्यासारखं काय होतं ते नाही समजलं.
चांगला प्रश्न. माझ्या आठवणीनुसार लिहितोय, चुभु देघे. साहित्य अकादमीचा एखाद्या वर्षी पुस्तकाला पुरस्कार देण्यात एक निकष असतो. त्यात ते अमुक एका वर्षात/कालावधीत प्रसिद्ध झालेले पाहिजे असे काहीतरी आहे. बहुतेक काजळमाया अन्य कुठल्या तरी वर्षात प्रसिद्ध झाले होते. त्यावरून कोणीतरी तांत्रिक हरकत घेतली. हे सगळे होईपर्यंत जीए आनंदाने हरखून गेले होते आणि त्यांनी कधी नव्हे ते त्या रोख रकमेतून दिल्लीमध्ये छानपैकी हिंडून ‘जिवाची दिल्ली’ केली होती. नंतर उद्वेगाने त्यांनी पुरस्कार परत केला.

मित्रहो Tue, 01/18/2022 - 17:13
लेख आवडला विजय तेंडुलकर यांचा किस्सा वाचला होता. त्यांच्या मते घाशीराम नाटकात संगीतामुळे ते नाटक त्यांना हवे तसे राहिले नाही. जी ए कुलकर्णी फारसे कुणाशी बोलत नसत असेही वाचले होते.

कर्नलतपस्वी Tue, 01/18/2022 - 17:34
यांनी मांजर आणि त्याचे पिल्ला करता भिंती मधे दोन ,एक मोठे आणी एक छोटे आसे दोन रस्ते बनवले आसा किस्सा ऐकला होता. खरे खोटे आईनस्टाईन व त्याची माजंरेच सांगू शकतील.

सौंदाळा Tue, 01/18/2022 - 18:00
बर्नाड शॉ चा एक किस्सा वाचला होता. एक इंग्रजी शिक्षक त्यांना भेटायला आला होता आणि गर्विष्ठपणे स्वतःचे इंग्रजी भाषेतील योगदान सांगत होता. तो म्हणाला इंग्रजी भाषेत su ने सुरु होऊन उच्चार 'शु' होणारा एकच शब्द आहे 'sugar' बर्नाड शॉ पटकन म्हणाले 'are you sure?'

हेमंतकुमार Tue, 01/18/2022 - 18:30
रसेल, जीए, आईन्स्टाईन आणि बर्नार्ड शॉ या सर्वांसंबंधीची माहिती / किस्सेआवडले. बर्नाड यांचा अन्य किस्सा मी नुकताच इथे लिहिला होता. इंग्लिश स्पेलिंग आणि उच्चार त्यांच्यातील विसंगती बाबत तर शॉनी अनेक मजेशीर नमुने व त्यावर मल्लीनाथी केलेली आहे.

सुबोध खरे Tue, 01/18/2022 - 20:12
श्री पु ल देशपांडे यांच्या लेखनाच्या पुढच्या प्रक्रिया त्यांच्या पत्नी सौ सुनीता करत असत. एकदा पुस्तक छपाई च्या सुरुवातीची प्रत त्यांच्या हातात आली तेंव्हा त्यात असंख्य चुका होत्या सुनीता बाईंनी विचारलं कि याचं प्रूफ रिडींग कुणी केलं त्यावर छापखान्याच्या कर्मचाऱ्याने सांगितलं कि साहेबानी केलं आहे. सुनीता बाईंनी ते पाहायला मागितलं तेंव्हा त्याच्या पहिल्याच पानात प्रचंड चुका होत्या. ते पाहून श्री पु ल इतके वैतागले होते कि त्यांनी प्रूफ रीडरचे आडनाव "वाघ" होते त्यावर काट मारून "डुक्कर" लिहून प्रूफ परत केले होते. अर्थात सुनीता बाईंनी पुस्तकाच्या छपाईच्या अगोदर प्रूफ रिडींग परत करून घेतले हे सांगायला नकोच.

हेमंतकुमार Tue, 01/18/2022 - 20:55
सर्वांचे किस्से छानच ! ........................... साहित्य-चित्रपट क्षेत्राशी संबंधित दोन दिग्गजांसंबंधी हा एक किस्सा. टागोरांची नष्टनीड नावाची एक कादंबरी आहे. त्यावर सत्यजित राय यांनी चारुलता चित्रपट काढला. त्याचा विषय : नवरा-बायकोच्या जोडीमध्ये बायको वयाने बरीच लहान आहे. त्यामुळे ती तिच्या समवयस्क दिराच्या प्रेमात पडते. अशा तऱ्हेने हा प्रेमाचा त्रिकोण होतो. आता त्यांच्या वास्तव आयुष्याशी कसा योगायोग ते पहा : र. टागोरांचे भाऊ जतींद्रनाथ हे त्यांची बायको कादंबरीपेक्षा तेरा वर्षांनी मोठे असतात. इथे दोन भाऊ आणि कादंबरी असा त्रिकोण होतो. पुढे कादंबरी आत्महत्या करतात. २. राय यांनी जेव्हा अभिनेत्री माधवीला घेऊन चित्रपटाचे चित्रीकरण चालू केले तेव्हा ते तिच्या प्रेमात पडतात ! ते तिच्या पेक्षा 21 वर्षांनी मोठे असतात. इथे राय, त्यांची बायको आणि माधवी असा त्रिकोण होतो. या प्रकाराची कुजबुज खूप वाढल्याने माधवी राय यांच्यापासून दूर होते व त्यांच्या पुढील चित्रपटांत काम करीत नाही.

कानडाऊ योगेशु Wed, 01/19/2022 - 10:19
असामान्यांनी नेहेमी असामान्यांसारखेच वागावे ही अपेक्षा असल्याने अशी असामान्य व्यक्ती जेव्हा सामन्य तर्हेने वागते तेव्हा त्याला तर्हेवाईक पणा म्हणत असावे. सचिन तेंडुलकर चहात पूर्ण बुडवुन बिस्किट खातो आता ह्यात तर्हेवाईकपणा काय आहे हे समजत नाही पण बर्याच जणांनी तो तसा वाटतो हे खरे.

हेमंतकुमार Wed, 01/19/2022 - 10:52
का यो +१ 😀 ....................... .हा किस्सा गिर्यारोहकाचा ... जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींना ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !” अशी ही दिलदार वृत्ती.

कंजूस Wed, 01/19/2022 - 11:33
गावाबाहेर दूर. कारण लोकांना, शेजाऱ्यांना त्यांच्या गाण्याचा व्यत्यय त्रास नको. --------- यावरून आठवलं एक प्रतिभावान पेटीवादक ( त्यांचा एक मुलगाही तीन वर्षांचा पेटी वाजवे. तोही आता प्रसिद्ध आहे) आमचे शेजारीच होते. रोज नाट्यसंगीत सराव करायचे,पेटी ऐकू यायची पण इमारतीमधील फक्त एक रहिवासी दाद देत, आदर बाळगत. पण आम्ही धरून बाकीच्यांच्या मते ते पटी 'बडवत.' म्हणजे कुमार गंधर्वांना शेजाऱ्यांची किती काळजी वाटत होती हे समजेल.

अनन्त्_यात्री Wed, 01/19/2022 - 11:46
रिचर्ड फाईनमन हे एक बहुआयामी क्षमता असलेले प्रतिभावान नोबेल पुरस्कार विजेते क्वांटम भौतिकशास्त्रज्ञ होते. या माणसाला अनेक छंद होते.मॅनहॅटन अणुबाॅम्ब प्रकल्पावर काम करताना तर या हरफनमौलाने चक्क तिजोर्‍या फोडण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास करून त्यात प्राविण्य मिळविले होते व आपल्या या "कौशल्या"चा प्रसाद आपल्या परिचितांना दिला होता!

हेमंतकुमार Wed, 01/19/2022 - 12:36
वरील चर्चेत आलेले कुमार गंधर्व, पिकासो, न्यूटन व फाइनमन हे सर्व किस्से छान ! ..
या हरफनमौलाने चक्क तिजोर्‍या फोडण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास करून त्यात प्राविण्य मिळविले होते
>>> यावरून एक हिंदी चित्रपट अंधुकसा आठवतो आहे. त्यात एक अट्टल कुलूपफोड्या दाखवला आहे(बहुतेक या भूमिकेत अजय देओल असावा). त्या चोराच्या घरात एक मोठा कुटुंबफोटो आहे. त्यात श्री. गोदरेज सुद्धा दाखवलेले आहेत ! चोराचा मित्र विचारतो, “तुझ्या कुटुंबात हे गोदरेज कसे काय बुवा?” यावर चोर म्हणतो, “गोदरेज हे माझे प्रेरणास्थान आहेत. ते जितकी अत्याधुनिक कुलपे तयार करत जातात, तितकाच मी ती कुलपे उघडण्याच्या युक्त्या विकसित करीत जातो ! म्हणून मी त्यांचा ऋणी आहे” ....ऑस्कर वाइल्ड म्हणून गेलेच आहेत, “चोर हा कलाकार असतो, तर पोलिस फक्त टीकाकार”.

हेमंतकुमार गुरुवार, 01/27/2022 - 11:17
आज ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांचे निधन झाल्याची बातमी वाचली आणि दुःख झाले. त्यांच्या दोन आठवणी लिहितो. एकदा आमच्या वैद्यकीय महाविद्यालयात एका परिसंवादात त्यांना बोलावले होते. व्यासपीठावर अन्य काही मान्यवर डॉक्टर बसलेले होते. त्यापैकी एकाने प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार करून स्वतःच्या मुलाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला होता. अवचटांनी त्यांच्या भाषणात या गृहस्थांचे नाव न घेता त्यांच्या गैर कृतीचा जाहीरपणे उल्लेख केला. तेव्हा व्यासपीठावरील काहीजण चपापले होते. परंतु या प्रसंगात अवचटांचे धाडस सर्वांना दिसून आले. .. दुसऱ्या एका प्रसंगात त्यांनी स्वतः वेश्यावस्तीत जाऊन तिथल्या पीडित महिलांची दुःख कशी समजावून घेतली याचा वृत्तांत आम्हाला सांगितला होता. तेव्हा त्या शोषित जगाची आम्हाला अगदी जवळून ओळख झाली. ... विनम्र आदरांजली!

In reply to by हेमंतकुमार

सर टोबी गुरुवार, 01/27/2022 - 13:44
याचं खूप लिखाण मी वाचलं आहे. आपलं वाचन खूप असण्यापेक्षा वाचनाचा आपल्या जीवनात खूप उपयोग व्हावा असा दृषटीकोण असतो. त्या अर्थाने त्यांचा संगोपन हा लेख मला खूप आवडला. माझ्या मुलाला देखील मी अनवट पध्द्तीने शिक्षण दिले. त्याला कधीही शिक्षा किंवा मारहाण केली नाही. त्यांना विनम्र प्रणाम.

हेमंतकुमार Sat, 02/12/2022 - 12:54
मंगेश पाडगावकरांनी तरुणपणी कविता लिहायला सुरुवात केली होती. बीए झाल्यानंतर ते नोकरी करू लागले पुढे नोकरीतील बढतीसाठी त्यांनी उशिराने एम ए करण्याचा निर्णय घेतला. एम. ए. च्या अभ्यासक्रमात त्यांना त्यांचीच एक कविता अभ्यासात होती ! परीक्षेत, त्या कवितेत ‘कवीला काय सुचवायचे आहे', या प्रश्नावरील उत्तर त्यांनी स्वतःच्या मनाने न लिहिता गाइडमधले लिहिले होते. असे केल्यानेच त्या प्रश्नाला चांगले गुण मिळतील अशी त्यांची धारणा होती ! (यशोदा पाडगावकरांच्या आत्मचरित्रातून)

In reply to by हेमंतकुमार

श्रीगणेशा Sun, 02/13/2022 - 19:17
एम. ए. च्या अभ्यासक्रमात त्यांना त्यांचीच एक कविता अभ्यासात होती !
कवीला काय सुचवायचे आहे
विनोदी विसंगती! ---- खूप माहितीपूर्ण लेख व चर्चा _/\_

हेमंतकुमार Sun, 02/12/2023 - 16:16
अशोक शहाणे नावाचा तरुण : नाबाद ८८
* आपल्याच लेखनाची इतकी उपेक्षा करणारा दुसरा कोण लेखक असेल? * ‘आमची पिढी ही षंढांची’ असे ते निखालस म्हणू शकले. या साऱ्यामागे त्यांचे साहित्याचे आकलन, मूल्यभान, नव्या प्रयोगांची ओढ आणि मराठी संस्कृतीवरचे निस्सीम प्रेम होते.

रामचंद्र Mon, 02/13/2023 - 01:22
अमेरिकेचे अध्यक्ष जॉन्सन तसेच रेगन हे काही प्रतिभावंत म्हणून गणले जात नाहीत. पण त्यांचा एक किस्सा पत्रकार वॉल्टर क्रॉन्काइट यांनी सांगितला आहे. एकदा व्हाईट हाऊसमध्ये मेजवानीप्रसंगी क्रॉन्काइट निमंत्रित होते. जॉन्सन यांनी त्यांना आवर्जून आपल्या शेजारी बसवून घेतलं. नंतर क्रॉन्काइट यांच्या लक्षात आलं की जॉन्सन बोलता बोलता आपल्याला मनाई असलेला पदार्थ क्रॉन्काइटच्या पानातून सफाईने बोलण्याच्या नादात घेतल्याचे भासवत खात आहेत. (कारण त्यांच्यावर पत्नी लेडी बर्ड यांची नजर होती.)

हेमंतकुमार Mon, 02/13/2023 - 14:34
हा किस्सा भारी असून तो भालचंद्र नेमाडे यांनी कोसलाच्या सुवर्णमहोत्सवी आवृत्तीच्या प्रस्तावनेत तपशीलवार लिहिला आहे. तो थोडक्यात लिहितो. रा. ज. देशमुख हे तत्कालीन मराठी साहित्यातील मोठे प्रकाशक. त्यांच्याकडे नेमाडे व शहाणे ही दुक्कल गप्पांसाठी जमत असे. देशमुख त्याकाळी खांडेकर, पु ल देशपांडे आणि रणजीत देसाई यासारख्या मातब्बर लेखकांचे साहित्य प्रकाशित करीत होते. परंतु ही दुक्कल मात्र त्या लेखकांवर वैतागलेली होती. या प्रस्थापित लेखकांचे सगळं कसं कृत्रिम, जुनाट आहे असे मत हे दोघे व्यक्त करीत. हे वारंवार ऐकल्यावर देशमुख एकदा त्यांना म्हणाले, “मोठ्या लेखकांची टिंगलटवाळी करणं सोपं आहे. तुम्ही असे एक तरी लिहून दाखवा बरं !” त्यावर नेमाडे म्हणाले, “खांडेकरांसारखी कादंबरी आठेक दिवसात सहज लिहिता येईल”. त्यावर देशमुख म्हणाले, “लिहून दाखवा, बकवास पुरे” नेमाडे म्हणाले की आम्ही लिहू सुद्धा पण आमचं कोण छापणार ? मग देशमुख यांनी शेवटचे सांगितले, “लिहून दाखवा, मी छापतो”. यानंतर मग इरेला पेटून नेमाडेंनी 18 दिवस सलग बसून कोसला लिहिली. असा तो इतिहास !

सुधीर कांदळकर Tue, 03/28/2023 - 13:39
आवडला. जी एंच्या विक्षिप्तपणाबद्दल सुनीताबाईंच्या आणि त्यांच्या प्रकाशित पुस्तकरूपातील पत्रव्यवहारात वाचनीय गमती आहेत. ते नेहमीं रशियन बुद्धिबळपटूंसारखा काळा चष्मा घालीत असे मी ऐकले होते. बाबुराव अर्नाळकर लेखन करतांना रसिकांचा उपद्रव टाळण्यासाठी स्वत:च्या ग्रॅन्ट रोड स्थानकाजवळच्या निवासस्थानी न करतां परळ्च्या आईमाई मेरवानजी स्ट्रीटवरील एका चाळीत तिसर्‍या मजल्यावरील एका खोलीत करीत. नटश्रेष्ठ डॉ. लागूंना एकदा एका गणेशोत्सवात सत्कारासाठी बोलावले होते. तेव्हा त्यांनी गणपतीची मूर्ती आणणे आणि त्याची पूजा करणे ही कशी अंधश्रद्धा आहे यावर बोलायला सुरुवात केली. आयोजकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी माईक सोडला नव्हता. शेवटी भाविकांचा जनक्षोभ टाळण्यासाठी हडेलहप्पी करून त्यांचे भाषण थांबवले गेले आणि कार्यकर्त्यांच्या संरक्षणात त्यांना बाहेर नेले होते. छान लेखाबद्दल लेखकांचे आणि विविध मनोरंजक किश्शांबद्दल प्रतिसादकांना खूपखूप धन्यवाद.

काय एकेक किस्से, मजा आली वाचुन, माझ्याकडचे अजुन काही --एका कार्यक्रमात पं.ह्रदयनाथ मंगेशकरांनी सांगितलेला-- उंबरठा चित्रपटातील "सुन्या सुन्या मैफलीत माझ्या" गाण्याचे रेकॉर्डिंग चालु होते. तेव्हा "पुन्हा पुन्हा भास होत आहे, कुणीतरी आरशात आहे" ही ओळ जब्बार पटेलांना खटकली. एक विवाहीत स्त्री असे म्हणते याचा अर्थ वेगळा निघतोय असे त्याना वाटत होते. कविता सुरेश भटांची असल्याने त्याना नागपूर ला फोन करावा असे ठरले. तितक्यात मंगेशकर कुटूंबाच्या स्नेही शांताबाई शेळके तिथे आल्या. त्यानी विचारले की काय अडचण आहे? प्रकार कळल्यावर त्यानी थोडा विचार केला अणि पटकन म्हणाल्या "अहो सोपे आहे, कुणीतरी ऐवजी तुझे हसु" असे करा. हा बदल ईतका सोपा होता, तरीही गाण्याचा अर्थ सुधारत होता आणि मीटरमध्येही चपखल बसत होता की सगळे अवाक झाले. फोनवर सुरेश भटांनीही लगेच परवानगी दिली आणि रेकॉर्डिंग पार पडले. याला म्हणतात प्रतिभा. असाच दुसरा किस्सा माडगुळकरांचा प्रसिद्ध आहे. त्यांच्या एका गाण्याची ओळ बदलायची वेळ आली आणि थोडा बदल सुचवला गेला तेव्हा ते संगीतकारावर कडाडले "उगीच माझ्या ताजमहालाला तुमच्या विटा लावु नका" आणि स्वतः ओळ सुधारुन दिली. तिसरा किस्सा प्रसिद्ध तबलावादक थिरकवा साहेबांचा. ते वयस्कर झाले होते आणि उ. हबीबुद्दीन खां साहेबांच्या एका कार्यक्रमाला गेले होते. हबीबुद्दीन खां साहेबांचे "मुठिने धिर धिर वाजवणे" फार लोकप्रिय होते. त्यांचे तबलावादन झाले आणि त्यानी स्टेजवरुनच थिरकवाना विनंती केली की "आप कुछ बजावो" आता थिरकवा खरेतर प्रेक्षक म्हणुन आले होते आणि त्यांचा बहराचा काळ संपला होता. तेव्हा असे म्हणणे रिवाजाला धरुन नव्हते. पण आव्हान स्वीकारुन ते स्टेजवर गेले. लेहरा साथ करणार्‍या सारंगियाने आदराने विचारले "खान साब क्या चलन रखु?" म्हणजे किती वेगाने वाजवु? त्यावर बाणेदार थिरकवा म्हणाले "जहासे छोडा उधरसेही लेलो" असे म्हणुन त्यानी त्याच वेगात पुढचे तबलावादन करुन उपस्थिताना बोटे तोंडात घालायला लावली. अवांतर-- हे ज्ञान भांडार लुटण्यासाठीच अल्लारखांनी आपला मुलगा असुन झाकीर भाईना थिरकवा साहेबांकडे गंडाबंधन करुन तबला शिकायला पाठवले. माझ्या गुरुंचे गुरु दाउदखां साहेब एकदा अल्लारखां कडे गेले होते. अल्लारखांचे तेव्हा पुर्ण देशात नाव गाजत होते. आजुबाजुला बरीच मंडळी होती. अर्थात तबला वाजविण्याची फर्माईश झालीच. दाउदखांनी आव्हान देउन २५ गती अशा वाजवुन दाखविल्या की ज्या पुर्ण हिन्दुस्तानात फक्त तेच वाजवत. त्यांच्या पोतडीतील ज्ञान बघुन थक्क झालेले अल्लारखां म्हणाले" खान साब, मै तो सिर्फ पेट के लिये बजाता हुं"

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार Tue, 03/28/2023 - 15:21
तुम्ही लिहिलेले किसे खरोखरच अद्भुत आणि अद्वितीय आहेत. हा प्रतिसाद जणू एका संगीताच्या मैफिलीचा आनंद देऊन गेला !!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सुबोध खरे Wed, 03/29/2023 - 19:40
उस्ताद अल्लारखां साहेब आणि उस्ताद झाकीर हुसेन यांची जुगलबंदी मी स्वतः मुंबईत षण्मुखानंद हॉल मध्ये पाहिली. त्यात उस्ताद झाकीर हुसेन साहेब एक गत वाजवत मग तीच गत उस्ताद अल्लारखां साहेब वाजवत. यानंतर हि गत दोघे दुप्पट वेगाने वाजवत असे तीन वेळेस झाल्यावर उस्ताद झाकीर हुसेन यांची सीमा झाल्यावर त्यांच्या दुप्पट नंतर चौपट वेगाने उस्ताद अल्लारखां साहेब यांनी वाजवली. तेथे असलेले सर्व लोक उभे राहून अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन टाळ्या वाजवत होते आणि उस्ताद झाकीर हुसेन यांनी उस्ताद अल्लारखां साहेब यांचे अक्षरशः पाय धरले. हा अविस्मरणीय प्रसंग पाहताना आमच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते.

सुधीर कांदळकर Tue, 03/28/2023 - 16:23
केवळ अद्भुत रामेसाहेब. तीनही व्यक्ती हृदयात जपलेल्या असल्यामुळे फारच वाचायला मजा आली.

हेमंतकुमार Tue, 03/28/2023 - 16:34
इंग्लंडचे ‘क्रिकेटचे पितामह’ डब्ल्यू जी ग्रेस यांचा एक भारी किसा इथे वाचला. क्रिकेट रसिकांनी जरूर वाचावा ! त्या लेखाचा विषय पूर्ण वेगळा आहे. परंतु एक उदाहरण म्हणून हा किस्सा दिलेला आहे.

सुबोध खरे Wed, 03/29/2023 - 19:50
कविवर्य मंगेश पाडगावकर हे सहसा आपल्या गीतात कोणताही बदल करायला तयार नसत . त्यांचे एक गीत आहे दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झूलायचे. यात एक ओळ अशी आहे. माझ्या या घराच्या पाशी थांब तू गडे जराशी. ते मूळ काव्य थांब ना गडे जराशी असे होते. त्यात बदल करण्यास श्री पाडगावकर तयार नव्हते. कारण थांब ना हे शब्द आर्जवी आहेत असे त्यांचे म्हणणे होते. त्या अर्थाचा विपर्यास होईल असे श्री अरुण दाते यांनी नम्रपणे सांगितल्यामुळे नाखुशीने का होईना पण त्यांनी हे थांब तू गडे जराशी असा बदल करून दिला.

हेमंतकुमार गुरुवार, 03/30/2023 - 10:54
घटना 2005 मधील आहे. त्यावर्षीच्या ‘अंतर्नाद’ मासिकाच्या दिवाळी अंकात ‘सफाई’ ही कादंबरी प्रकाशित झाली होती. त्यावर लेखकाचे नाव कार्तिक कौंडिण्य असे लिहिले होते. कादंबरी सफाई कामगार स्त्री या संवेदनलशील विषयावर असून ती सुंदर आहे. त्या कादंबरीच्या लेखकाचे कधी न ऐकलेले हे नाव पाहून अनेकांना संशय आला होता, की हा काय कोणी नवोदित लेखक असणार नाही; हा तर मुरलेला लेखक दिसतोय ! कादंबरीच्या शेवटी त्या लेखकाचा मुंबईतील पत्ताही दिला होता. मग एक वाचक प्रत्यक्ष त्या पत्त्यावर गेले तेव्हा तिथे कोणीही कौंडिण्य नावाचे राहत नसल्याचे त्यांना समजले. दरम्यान मी देखील त्या लेखकांना कादंबरी आवडल्याचे पत्र लिहून ठेवले होते. तेवढ्यात त्या वरील वाचकांनी मासिकाच्या पुढच्या अंकात लिहिले, की कौंडिण्य नावाचे कोणी लेखक तिथे अस्तित्वात नाहीत: ही काहीतरी थापाथापी आहे. हे वाचल्यानंतर मी ते लिहिलेले आंतरदेशीय पत्र फाडून टाकले. या विषयावर मासिकात काथ्याकूट झाल्यावर संपादकांनी खुलासा केला. त्यात म्हटले होते की या कादंबरीचे लेखक त्याच पत्त्यावर राहतात. परंतु काही कारणास्तव त्यांना खरी ओळख जाहीर करायची नाहीये, तरी वाचकांनी त्याचा आदर करावा आणि साहित्यबाह्य संशोधनात रस घेऊ नये. इथे हा विषय संपला होता. पण माझ्या बाबतीत खरी गंमत पुढे घडणार होती... 2015 मध्ये माझा एक लेख ‘अंतर्नाद’मध्ये प्रसिद्ध झाला आणि तो वाचकप्रिय ठरला. त्याबद्दल मला अनेकांचे फोन, पत्रे वगैरे येत होती. एके दिवशी एक असाच अनोळखी फोन आला. तो एका मान्यवर लेखकांचा होता. मग आमच्या गप्पा झाल्या. त्या ओघात ते मला बोलून गेले, की 2005 मधील सफाई कादंबरी त्यांनीच लिहिलेली आहे ! मग मी त्यांना विचारले की फक्त त्या वेळेसच तुम्ही खरे नाव का लपवलेत? तेव्हा ते म्हणाले, “एखाद्या लेखनाचे मूल्यमापन, ते कोणी लिहिले आहे यापेक्षा ते काय लिहिले आहे यावरून व्हावे ही इच्छा होती. मला यानिमित्ताने बघायचे होते, की एका अनोळखी नावाने लिहून पाहिल्यानंतर वाचकांना कादंबरी कशी वाटते ते, आणि तो प्रयोग यशस्वी झाला”. हे लेखक म्हणजे सुमेध वडावाला (रिसबूड). कालांतराने ही कादंबरी त्यांच्या खऱ्या नावाने प्रसिद्ध झालेली दिसते आहे

हेमंतकुमार गुरुवार, 08/28/2025 - 18:53
चित्रकार शिद फडणीस यांच्या शंभरीनिमित्त पुण्यात जो कार्यक्रम झाला त्याचे एकेक भाग आता युट्युबवर येत असून त्यातून काही छान किस्से ऐकायला मिळत आहेत. मंगला गोडबोले यांनी सांगितलेला हा किस्सा : गोडबोलेंनी पूर्वी असे विधान केले होते की, 1960 -70 च्या दशकात मराठी मध्यमवर्गीय माणसाच्या रसिकतेसाठी फडणीस-वसंत सरवटे-पु.ल. हे ‘ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत !” तेव्हा काही लोकांनी या विधानाला झोडले देखील होते. . . . शिद जेव्हा ऐन तारुण्यात विविध प्रकाशनसाठी चित्रे काढत होते तेव्हा त्यांनी पाडलेला हा एक पायंडा : त्यांनी केशवराव कोठावळे यांना काही चित्रे काढून दिली होती. त्यातली काही नापसंत ठरली होती. परंतु काही दिवसांनी फडणीसांनी नापसंत पडलेल्या 'रफ स्केचेस 'चे सुद्धा बिल कोठावळ्यांकडे पाठवले. कोठावळ्यांनी ते नाराजीने का होईना पण दिले. श्रमांची किंमत हा त्यातला मुद्दा महत्त्वाचा आहे..

अभ्या.. गुरुवार, 08/28/2025 - 19:16
शिद जेव्हा ऐन तारुण्यात विविध प्रकाशनसाठी चित्रे काढत होते तेव्हा त्यांनी पाडलेला हा एक पायंडा : त्यांनी केशवराव कोठावळे यांना काही चित्रे काढून दिली होती. त्यातली काही नापसंत ठरली होती. परंतु काही दिवसांनी फडणीसांनी नापसंत पडलेल्या 'रफ स्केचेस 'चे सुद्धा बिल कोठावळ्यांकडे पाठवले. कोठावळ्यांनी ते नाराजीने का होईना पण दिले. श्रमांची किंमत हा त्यातला मुद्दा महत्त्वाचा आहे.. काहीजण हे पाळतात, बरेच जण नाही. ;) (स्वगतः नाकारलेल्या म्हणजे नापसंत कामाचे पैसे मिळत असते तर आज रोल्स रॉइस मधून फिरलो असतो ना ;) ) पण त्यातली खोच अशी आहे की कित्येक जण एक काम फिनिश करायचे आणि इतर दोन चार वेटेज(हा खास शब्द) ला थोडेफार चेंजेस करुन जरा बरे असे करायचे. मग ते फिनिश काम फायनल होते असे करतात. आणि कस्टमराला उगी तीन चार ऑप्शनमधून चांगले निवडल्याचा आनंद असे.......

हेमंतकुमार Fri, 09/12/2025 - 11:19
अनुमती हा मराठी आणि द सिग्नेचर ही त्याची हिंदी आवृत्ती असे दोन्ही चित्रपट गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेत. हिंदी चित्रपटासाठी गजेंद्रनी कथा पुन्हा स्वतंत्रपणे लिहून काढली व त्यानंतर ते ऋषी कपूरना भूमिकेसाठी विचारायला गेले. त्यांनी कथा ऐकल्यावर लगेच होकार दिला. सर्व काही बोलणी पण झाली. जाताना गजेंद्रनी त्यांना मराठी अनुमतीची सीडी हातात ठेवली आणि बघायला सांगितले आणि गजेंद्र निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषी कपूर यांचा फोन आला की ते त्यात काम करू शकणार नाहीत. त्याचे आश्चर्य वाटून त्यांना गजेंद्रनी विचारले की असं का? त्यावर ते म्हणाले,
“मी मराठी चित्रपट पाहिला. तो विक्रम गोखलेंनी इतक्या उंचीवर नेऊन ठेवला आहे की आता त्याला मी छेडू इच्छित नाही !”
एका बुजुर्ग हिंदी कलाकाराने श्रेष्ठ मराठी कलाकाराला दिलेली ही दाद नक्कीच कौतुकास्पद आहे. ( नंतर अनुपम खेरनी ती भूमिका केली).
लेखनविषय:
लेखनप्रकार
अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात. या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणाऱ्या किश्शांची संख्याही भरपूर असते. अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल !

एक अपरिचित प्रकाशन - सैनिक समाचार

पराग१२२६३ ·

मुक्त विहारि Sat, 01/08/2022 - 11:04
ब्रिटिशांनी, फोडा आणि झोडा, ही नीती उत्तम रीतीने राबवली ... नाहीतर, पहिलेच प्रकाशन, उर्दू भाषेत कशाला केले असते? मुस्लिमांचे लांगूनचालन करणे आणि इतर धर्मियांना जोखडात ठेवणे, ही ब्रिटिश नीती होती. 1857 नंतर, ह्या ना त्या प्रकारे, ब्रिटिशांनी हेच केले...

In reply to by मुक्त विहारि

चौथा कोनाडा गुरुवार, 01/13/2022 - 22:13
तेव्हा उर्दू ही प्रतिष्ठित सर्वमान्य भाषा होती. ब्रिटीश जेव्हा भारतात शिरकाव केला तेंव्हा दुर्दैवाने (हिंदूंच्या) मुस्लीम घराणी दिल्लीत राज्य करीत होती. त्यावेळी उर्दू ही मुलतः लष्करी विभागात वापरली जाणारी भारतीय भाषा होती आणि उत्तरेतील राजव्यवहाराची भाषा असल्याने उत्तरेत उर्दू शिकण्याला आणि त्यात निष्णात होण्यालाही सामाजिक प्रतिष्ठा होती. उर्दू ही फक्त मुस्लीमांची भाषा या वर अलीकडील ३०-४० वर्षात जोरदार प्रचार करण्यात आला.

निनाद Mon, 01/10/2022 - 07:14
शोधाशोध केली पण फॉण्ट पासून अनेक प्रश्न आहेत असे दिसून आले. हे युनिकोड मध्ये पण नाहीये. त्यामुळे वाचता आले नाही.

मुक्त विहारि Sat, 01/08/2022 - 11:04
ब्रिटिशांनी, फोडा आणि झोडा, ही नीती उत्तम रीतीने राबवली ... नाहीतर, पहिलेच प्रकाशन, उर्दू भाषेत कशाला केले असते? मुस्लिमांचे लांगूनचालन करणे आणि इतर धर्मियांना जोखडात ठेवणे, ही ब्रिटिश नीती होती. 1857 नंतर, ह्या ना त्या प्रकारे, ब्रिटिशांनी हेच केले...

In reply to by मुक्त विहारि

चौथा कोनाडा गुरुवार, 01/13/2022 - 22:13
तेव्हा उर्दू ही प्रतिष्ठित सर्वमान्य भाषा होती. ब्रिटीश जेव्हा भारतात शिरकाव केला तेंव्हा दुर्दैवाने (हिंदूंच्या) मुस्लीम घराणी दिल्लीत राज्य करीत होती. त्यावेळी उर्दू ही मुलतः लष्करी विभागात वापरली जाणारी भारतीय भाषा होती आणि उत्तरेतील राजव्यवहाराची भाषा असल्याने उत्तरेत उर्दू शिकण्याला आणि त्यात निष्णात होण्यालाही सामाजिक प्रतिष्ठा होती. उर्दू ही फक्त मुस्लीमांची भाषा या वर अलीकडील ३०-४० वर्षात जोरदार प्रचार करण्यात आला.

निनाद Mon, 01/10/2022 - 07:14
शोधाशोध केली पण फॉण्ट पासून अनेक प्रश्न आहेत असे दिसून आले. हे युनिकोड मध्ये पण नाहीये. त्यामुळे वाचता आले नाही.
भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्रकाशित होणाऱ्या सैनिक समाचार या पक्षिकाचा नुकताच वर्धापन दिन साजरा झाला. सुरुवातीला 16 पानांचे ते साप्ताहिक केवळ उर्दू भाषेतून प्रकाशित होत असे. त्यावेळी या साप्ताहिकाच्या एका अंकाची किंमत होती एक आणा. कालांतराने इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांमधून फौजी अखबार प्रकाशित होऊ लागला. आज इंग्रजीसह 12 भारतीय भाषांमधून हे प्रकाशन प्रकाशित होत आहे. सुरुवातीला फौजी अखबारचे मुख्य कार्यालय सिमल्यात असले तरी त्याचे प्रकाशन अलाहाबादहून होत असे. भारतीय लष्करातील घडामोडींची माहिती जवानांना करून देता यावी या हेतूने फौजी अखबार सुरू करण्यात आले होते.

लिहिणं

श्रीगणेशा ·

पाषाणभेद गुरुवार, 12/30/2021 - 12:30
लिहीलेले अगदी मनापासून लिहीले ते लिहीतांना जे काय सायास करावे लागतात ते केवळ लिहून समजत नाहीत तर ते वाचून अन मग कागदावर लिहून दुसर्‍यांपर्यंत लिहीणे कसे समजेल याचे प्रयत्न करणे अन ते मिळाल्यानंतर त्यांनी उत्तरात काय लिहीले आहे ते उलट टपाली (पक्षी प्रतिसादात) मिळणे हा लिखाण श्रेष्ठ झाल्याची पावती असते असे कुणीतरी लिहीलेले (पक्षी आम्हीच) वाचल्याचे आठवल्याने लगोलग उलट टपाली (मी पयला प्रतिसाद) लिहीले व ते तुम्हास प्राप्त होवून आपणही यावर लिहावे असे लिहून मी दोन शब्द लिहून संपवतो. खरे तर लिहील्याने माणूस जास्त प्रगल्भ होत असतो. बोलणे अन लिहीणे यात जबाबदारीचे अंतर असते. बोलून माणूस मोकळा होतो. परिणाम क्षणीक असतात. परंतु लिहीलेले कायम राहणार असल्याचे बोलणार्‍याला समजत असते. त्यामुळे आपोआप जबाबदारीने लिहावे लागते. छान मनोगत लिहीले आहे.

In reply to by प्राची अश्विनी

श्रीगणेशा Sat, 01/01/2022 - 23:25
धन्यवाद प्राची अश्विनी _/\_ प्रतिसादाला उत्तर म्हणून फक्त धन्यवाद लिहिल्याने मूळ लिखाणाची जाहिरात वाटते खरी, पण इथे प्रतिसादही वाचनीय असतात, त्यामुळे त्यावर प्रतिसाद देणं प्राप्त आहे!

कर्नलतपस्वी Sun, 01/02/2022 - 11:46
दाद(प्रतीसाद) देणं खूप महत्त्वाचं असतं..... यावर ऐक छोटे मुक्तक खुप पुर्वी लिहीले होते ते वेगळे शेअर करतो.

सौन्दर्य Tue, 01/04/2022 - 00:05
२००८ साली अमेरिकेत आल्यावर जवळचे कुटुंबीय सोडल्यास मराठी ऐकायला, बोलायला मिळत नव्हती. पुस्तके त्यांच्या वजनांमुळे खूप आणणे शक्य झाली नव्हती. त्यामुळे मराठीत संवाद साधण्याच्या आत्यंतिक इच्छेमुळे मित्रांना इमेलने विचार कळवायला लागलो. भूतकाळातील घटनांविषयी लिहू लागलो त्यातूनच काल्पनिक कथा लिहू लागलो. मित्रांनी, कुटुंबाच्या इतर मंडळींना ते आवडू लागलं. 'मैफिल-ए-मैत्र' नावाच्या एका ग्रुपवर लिहू लागलो, त्यातून एका मित्राने 'मिसळपाव' सुचवलं, मग येथेही लिहू लागलो. काही दिवाळी अंकात लेख प्रसिद्ध झाले. असं करता करता लिहू लागलो.

In reply to by सौन्दर्य

श्रीगणेशा Wed, 01/05/2022 - 01:51
धन्यवाद सौंदर्य _/\_ मीही सुरुवातीला आठवणी लिहिल्या (अजूनही बऱ्याचदा लिहितो) कारणं त्या लिहिणं बऱ्यापैकी सोपं जातं. मात्र इतरही बरंच काही लिहायचा प्रयत्न आहे.

राघव Tue, 01/04/2022 - 12:50
लिहिणं अगदी आतून धक्का मारून बाहेर येतं ना.. ते खूप समाधान देऊन जातं. या अनुषंगानं काही मागे लिहिलेलं - स्फुट: रचना!

In reply to by अनन्त्_यात्री

श्रीगणेशा Wed, 01/05/2022 - 02:11
धन्यवाद अनन्त्_यात्री _/\_ आपल्या कविता वाचून मराठी भाषा परत एकदा नव्याने शिकत आहे. त्यातील वेगळेपण, खोली आणि कल्पनाशक्ती प्रशंसनीय आहे _/\_

In reply to by राघव

श्रीगणेशा Wed, 01/05/2022 - 01:57
धन्यवाद राघव _/\_ स्फुट: रचना लेख खूप आवडला. लिहिण्याचा खूप बारकाईने विचार केला आहे त्यात _/\_ खरं आहे, आतून धक्का मारून आलेलं लिखाण अगदी नावीन्यपूर्ण, आणि स्वतःला समाधान वाटेल असंच असतं!

टर्मीनेटर Tue, 01/04/2022 - 18:31
मनोगत आवडले 👍 वाचनाची आवड आधी पासूनच असली तरी लिहिण्यातही आनंद मिळतो हा अनुभव मला मिपावरच मिळाला. जमेल तसं इथे काही बाही लिहीत असतो आणि मिपाकर त्यावर प्रतिसाद देऊन पुढे लिहिण्यासाठी माझा हुरूप वाढवत असतात त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत!

In reply to by टर्मीनेटर

श्रीगणेशा Wed, 01/05/2022 - 02:33
धन्यवाद टर्मीनेटर _/\_ आपण मिपाकरांनी दिलेला प्रतिसाद वाचून हुरूप आला आहे. सर्व मिपाकरांचे आभार! आणि प्रतिसादातून खूप काही वाचायला मिळालं!

In reply to by मुक्त विहारि

श्रीगणेशा गुरुवार, 01/06/2022 - 00:08
धन्यवाद मुवि _/\_ आणि आजच्या आभासी जगात मिपावरील बरेच लेखक/वाचक स्वतःची खरी ओळख लपवत नाहीत याचेही विशेष कौतुक वाटते!

पाषाणभेद गुरुवार, 12/30/2021 - 12:30
लिहीलेले अगदी मनापासून लिहीले ते लिहीतांना जे काय सायास करावे लागतात ते केवळ लिहून समजत नाहीत तर ते वाचून अन मग कागदावर लिहून दुसर्‍यांपर्यंत लिहीणे कसे समजेल याचे प्रयत्न करणे अन ते मिळाल्यानंतर त्यांनी उत्तरात काय लिहीले आहे ते उलट टपाली (पक्षी प्रतिसादात) मिळणे हा लिखाण श्रेष्ठ झाल्याची पावती असते असे कुणीतरी लिहीलेले (पक्षी आम्हीच) वाचल्याचे आठवल्याने लगोलग उलट टपाली (मी पयला प्रतिसाद) लिहीले व ते तुम्हास प्राप्त होवून आपणही यावर लिहावे असे लिहून मी दोन शब्द लिहून संपवतो. खरे तर लिहील्याने माणूस जास्त प्रगल्भ होत असतो. बोलणे अन लिहीणे यात जबाबदारीचे अंतर असते. बोलून माणूस मोकळा होतो. परिणाम क्षणीक असतात. परंतु लिहीलेले कायम राहणार असल्याचे बोलणार्‍याला समजत असते. त्यामुळे आपोआप जबाबदारीने लिहावे लागते. छान मनोगत लिहीले आहे.

In reply to by प्राची अश्विनी

श्रीगणेशा Sat, 01/01/2022 - 23:25
धन्यवाद प्राची अश्विनी _/\_ प्रतिसादाला उत्तर म्हणून फक्त धन्यवाद लिहिल्याने मूळ लिखाणाची जाहिरात वाटते खरी, पण इथे प्रतिसादही वाचनीय असतात, त्यामुळे त्यावर प्रतिसाद देणं प्राप्त आहे!

कर्नलतपस्वी Sun, 01/02/2022 - 11:46
दाद(प्रतीसाद) देणं खूप महत्त्वाचं असतं..... यावर ऐक छोटे मुक्तक खुप पुर्वी लिहीले होते ते वेगळे शेअर करतो.

सौन्दर्य Tue, 01/04/2022 - 00:05
२००८ साली अमेरिकेत आल्यावर जवळचे कुटुंबीय सोडल्यास मराठी ऐकायला, बोलायला मिळत नव्हती. पुस्तके त्यांच्या वजनांमुळे खूप आणणे शक्य झाली नव्हती. त्यामुळे मराठीत संवाद साधण्याच्या आत्यंतिक इच्छेमुळे मित्रांना इमेलने विचार कळवायला लागलो. भूतकाळातील घटनांविषयी लिहू लागलो त्यातूनच काल्पनिक कथा लिहू लागलो. मित्रांनी, कुटुंबाच्या इतर मंडळींना ते आवडू लागलं. 'मैफिल-ए-मैत्र' नावाच्या एका ग्रुपवर लिहू लागलो, त्यातून एका मित्राने 'मिसळपाव' सुचवलं, मग येथेही लिहू लागलो. काही दिवाळी अंकात लेख प्रसिद्ध झाले. असं करता करता लिहू लागलो.

In reply to by सौन्दर्य

श्रीगणेशा Wed, 01/05/2022 - 01:51
धन्यवाद सौंदर्य _/\_ मीही सुरुवातीला आठवणी लिहिल्या (अजूनही बऱ्याचदा लिहितो) कारणं त्या लिहिणं बऱ्यापैकी सोपं जातं. मात्र इतरही बरंच काही लिहायचा प्रयत्न आहे.

राघव Tue, 01/04/2022 - 12:50
लिहिणं अगदी आतून धक्का मारून बाहेर येतं ना.. ते खूप समाधान देऊन जातं. या अनुषंगानं काही मागे लिहिलेलं - स्फुट: रचना!

In reply to by अनन्त्_यात्री

श्रीगणेशा Wed, 01/05/2022 - 02:11
धन्यवाद अनन्त्_यात्री _/\_ आपल्या कविता वाचून मराठी भाषा परत एकदा नव्याने शिकत आहे. त्यातील वेगळेपण, खोली आणि कल्पनाशक्ती प्रशंसनीय आहे _/\_

In reply to by राघव

श्रीगणेशा Wed, 01/05/2022 - 01:57
धन्यवाद राघव _/\_ स्फुट: रचना लेख खूप आवडला. लिहिण्याचा खूप बारकाईने विचार केला आहे त्यात _/\_ खरं आहे, आतून धक्का मारून आलेलं लिखाण अगदी नावीन्यपूर्ण, आणि स्वतःला समाधान वाटेल असंच असतं!

टर्मीनेटर Tue, 01/04/2022 - 18:31
मनोगत आवडले 👍 वाचनाची आवड आधी पासूनच असली तरी लिहिण्यातही आनंद मिळतो हा अनुभव मला मिपावरच मिळाला. जमेल तसं इथे काही बाही लिहीत असतो आणि मिपाकर त्यावर प्रतिसाद देऊन पुढे लिहिण्यासाठी माझा हुरूप वाढवत असतात त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत!

In reply to by टर्मीनेटर

श्रीगणेशा Wed, 01/05/2022 - 02:33
धन्यवाद टर्मीनेटर _/\_ आपण मिपाकरांनी दिलेला प्रतिसाद वाचून हुरूप आला आहे. सर्व मिपाकरांचे आभार! आणि प्रतिसादातून खूप काही वाचायला मिळालं!

In reply to by मुक्त विहारि

श्रीगणेशा गुरुवार, 01/06/2022 - 00:08
धन्यवाद मुवि _/\_ आणि आजच्या आभासी जगात मिपावरील बरेच लेखक/वाचक स्वतःची खरी ओळख लपवत नाहीत याचेही विशेष कौतुक वाटते!
लेखनप्रकार
लिहिणं म्हणजे नेमकं काय आणि मी का लिहितो या प्रश्नांचं उत्तर शोधावसं वाटतं कधी कधी, आणि मी लिहायला घेतो. खरं तर, एवढं सांगून हे लिहिणं संपू शकतं एवढं सोपं आणि सहज आहे, किंवा असायला हवं, लिहिणं! एकटेपणा ते एकांत अशा प्रवासात सोबत म्हणून असेल कदाचित, लिहिणं मला जवळचं वाटलं. आणि लिखाणाशी झालेली मैत्री व जवळीक जास्त प्रकर्षाने जाणवली. मी पाहिलेलं आणि पाहत असलेलं भोवतालचं विश्व माझ्या शब्दात मांडणं, आठवणींमध्ये रमणं, आणि त्या लिहिणं मला भावलं.