एक विलक्षण अनुभव
लेखनप्रकार
आताच दोन आठवड्यापूर्वी जे इ इ मेन चा लागला. मुलाचा निकाल फारसा चांगला आला नाही. तो आय आय टी च्या मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरला. आम्ही सुद्धा दोन दिवस बर्यापैकी निराश होतो. पण यात आपले नैराश्य बाजूला ठेवून मुलाला धीर देण आवश्यक होते त्यामुळे चेहेर्यावर तसे काही दिसू न देता आम्ही त्याला पुढच्या परीक्षांसाठी उत्तेजन देत होतो. तीन चार दिवसात गाडी रुळावर आली.
मुळात आयुष्यात अपयशी होण्याचा मला चांगला अनुभव असल्याने मी जास्त शांत होतो.आणि मी शांतपणे मुलाला जवळ घेऊन सांगितले की तू काही सलमान खान सारखा दारू पिऊन लोकांच्या अंगावर गाडी घालण्यसारखा गुन्हा केलेला नाहीस. जे झाले ते झाले आयुष्यात असे प्रसंग येत राहतात.मुळात त्याने आयुष्यात काय करावे हे त्याचे त्याने ठरवायचे आहे.आईबाप काही आयुष्याला पुरत नाहीत आणि तुम्ही फारतर मुलाला थोडे फार मार्गदर्शन करू शकता.
गमतिची गोष्ट म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया इतक्या सुरस आणि चमत्कारिक होत्या की मला आश्चर्यच वाटले.
१) तुम्ही दोघे डॉक्टर असून मुलाला इतके कमी मार्क कसे मिळाले?.
२) आता मुलाचे कसे होणार?
३) त्याला इंजिनियरिंग झेपणार नाही त्याला बी एस सी ला टाका
४) तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. भरपूर डोनेशन भरून प्रवेश घ्या.
५) त्याला परत बारावीला बसावा
गमतीची गोष्ट हीच आहे कि लोक फुकटचे सल्ले देण्यात एकदम पुढे असतात. हा सल्ला दिल्यावर त्याचा परिणाम काय होईल याचा जरासुद्धा विचार न करता ते बोलत होते.
जे जवळचे मित्र होते त्यांनी फार मोलाचे सल्ले दिले. सगळ्यात महत्त्वाचा सल्ला माझ्या वडिलांनी दिला.जेंव्हा मी त्यांना म्हटले कि लोक सांगत आहेत कि त्याला अभियांत्रिकी झेपेल का ते पहा. त्यांनी एकच सांगितले कि तो इंजिनियर झाल्यावर त्या विषयातच काम करेल असे आज कसे सांगता येईल? जर त्याने उद्या व्यवस्थापन विषय घेतला ( एम बी ए किंवा तत्सम केले) किंवा एखाद्या व्यवसायात शिरला तर त्याला बारावीत किंवा अभियांत्रिकीत किती गुण आहेत त्याचा तो पुढे काय करणार आहे याच्याशी काय संबंध असेल. त्याला अभियांत्रिकीत किती गुण आहेत या पेक्षा त्याला अभियांत्रिकीचे मुलभूत ज्ञान आहे एवढे बस आहे. जर तो सॉफ्टवेअर मध्ये गेला तरीही तो मेकानिकल अभियांत्रिकीच्या ज्ञानच शून्य वापर करेल आणि जर त्याने एम टेक वाहन( ऑटोमोबाइल) किंवा वैमान शास्त्र (एरोनौटीक्स) या विषयात केले तर त्याच्या चार वर्षाच्या अभियांत्रिकी ज्ञानापैकी फार तर २० टक्के ज्ञानाचा उपयोग होईल. तो आयुष्यात पुढे काय करणार आहे हे तुम्हाला कुठे माहिती आहे? एका परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले म्हणून आयुष्यात काहीही फरक पडत नाही.
आमच्या वडिलांनी जमनालाल बजाज येथून व्यवस्थापनाची पदविका घेतलेली आहेत. हे वाचून मला खूप हुरूप आला.
मी इतके दिवस जो विचार करीत होतो त्याला वडिलांचाचआधार मिळतो आहे हे पाहून मला बरे वाटले.माझे एक मत मी पुष्कळ वेळा व्यक्त केले आहे कि शैक्षणिक यश हे फार तर १० % आयुष्यातील यशास कारणीभूत असते.
मी जेंव्हा इतर बर्याच लोकांशी बोललो तेंव्हा अशी बरीच पोळलेली माणसे मला भेटली ज्यांनी स्वतः किंवा त्यांच्या मुलांना उज्ज्वल यश मिळालेले नव्हते आणि त्या सर्वांनी मला हेच सांगितले.
मुळात माझ्या मुलाने जेवढे प्रयत्न करायला पाहिजे होते तेवढे केलेले नव्हते हे मला स्वतःला माहित होते. त्याला आम्ही एक वर्ष अगोदर शाळेत टाकले असल्याने त्याला आपण अभ्यास करावा असा परिपक्व पणा( maturity ) आलेलाच नाही. हे अर्थात समर्थन होऊ शकत नाही हे मलाही माहित आहे कारण काही मुले त्याच्याच सारखी कमी वयाची आहेत आणि त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला आणि उत्तम गुण मिळवले. पण प्रत्येक मुल वेगळे असते हे मला माहित आहे.
माझ्या मुलाच्या मित्रांपैकी काही खरच हुशार असलेली मुले या परीक्षात फारशी चमकू शकली नाहीत अशा काही मुलांच्या घरात एखादा मृत्यू झाला असावा अशी अवकळा पसरली होती. एक मुलगा भिंतीवर डोके आपटून घेऊ लागला. या मुलाच्या बापाचे वजन कमी झाले म्हणून त्याच्या बायकोने त्याला माझ्याकडे पाठविले तेंव्हा मला असे लक्षात आले कि बाप सुद्धा अत्यंत तणावाखाली आहे. त्याला पाहते ४ वाजता जाग येते आणि नंतर झोपच लागत नाही. हे दोघे आईबाप स्वतः अभियंते आहेत.
एका आईने सांगितले कि BITS( बिर्ला इन्स्टीट्युट) ची परीक्षा होई पर्यंत मी थांबले आहे. ती झाल्यावर मुलीच्या दोन मुस्कटात मारणार आहे. एवढ्या सगळ्या सुखसोयी देऊनही परीक्षेत हा निकाल कसा मिळू शकतो हेच मला कळत नाही? या बाई स्वतः आर्किटेक्ट आहेत.या बाईना मी एकच सांगितले कि तुमची मुलगी एखाद्या पान्वाल्याचा हात धरून पळून गेली असती तर? तिला एका परीक्षेत कमी गुण मिळाले तर एवढे अकांड तांडव कशासाठी? जर सुख सोयी किंवा सुविधा दिल्या तर गुण मिळत असते तर अंबानींची मुले आय आय टी मध्ये पहिल्या दहात आली असती.
या दोन्ही आईबापाना मी विश्लेषण करून सांगितले कि एक गोष्ट फार महत्त्वाची आहे कि आपल्या मुलाचे शैक्षणिक यश हा आपण प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत आहात. आपली प्रतिष्ठा मुलाच्या परीक्षेतील यश अपयश यावर अवलंबून असू नये. हे त्यांना पचवणे फार जड गेले.
हि गोष्ट मी मुळात मान्य केली असल्याने (माझी प्रतिष्ठा माझ्या मुलांच्या शैक्षणिक यशावर मुळीच अवलंबून नाही हे मी मुलांना पहिल्यापासून सांगत आलो आहे) तूमच्या मुलाला कमी गुण कसे मिळाले यावर मी शांतपणे त्यांना सांगितले कि अहो तो ढ आहे काय करणार?
अशा कितीतरी घरात मी सुतकी वातावरण बघत आहे जेथे मुलाला चांगले गुण मिळालेले नाहीत. किंवा मुलाने काहीतरी गंभीर गुन्हा केला असल्यासारखे आई बाप त्यांना वागवत आहेत. मुळात आय आय टी मध्ये १४ लाख मुलांपैकी केवळ २००० मुलांना आपल्या आवडीचा विषय मिळतो बाकी दोन ते तीन हजार मुले आवडीचा विषय मिळाला नाही तरी आय आय टीच्या शिक्क्यासाठी तेथे मिळेल तो विषय शिकत असतात. मग आय आय टी मध्ये प्रवेश मिळाला नाही तर आयुष्य फुकट गेले असे लोकांना का वाटत राहते?
आज प्रत्त्येक बस, रेल्वे गाडी, ट्रक वर आय आय टी किंवा वैद्यकीय परीक्षेच्या क्लास ची जाहिरात दिसत आहे. हा स्वप्नांचा बाजार मुलांना कुठे घेऊन जाणार आहे ? कोटा येथे किंवा नारायण इन्स्टीटयुट हैद्राबाद किंवा फिट जी किंवा टाईम अकादमी येथे मुलांना आठवीपासून सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत पूर्ण वेळ आय आय टी च्या क्लास साठी जुंपले जाते. ( आता हेच क्लास सहावी पासून चालू होणार अशी जाहिरात पाहिली) म्हणजे मुलांना तेराव्या वर्षापासून आईबाप या चक्रात ढकलत असतात पाच वर्षे ढोर मेहनत करून शेवटी हातात एक डिग्री पडेल किंवा न पडेल पण त्यात मुलांचे कोवळे वय मात्र नक्कीच नसून चालले आहे.
मी माझ्या मुलाला सांगितले होते किया अभियांत्रिकीत तुला प्रवेश नक्की मिळेल पण तुला नक्की काय व्हायचे आहे हे तुला ठरवावे लागेल.पदवी मिळाल्यावर एक वर्ष तू काहीही केले नाहीस तरी चालेल. नुसता हातात कैमेरा घेऊन भारतभर फिरलास तरी चालेल. त्यात तुला आयुष्य जगायचे शिक्षण मिळेल ते तुला आयुष्यभर उपयोगी ठरेल. एकदा नोकरीला लागला कि माणूस त्या चरकात पिळून निघतो मग थोडे थांबून सिंहावलोकन करायचे असेल तर त्याला उसंत मिळत नाही. ( मी सहा महिने सुट्टी ( चार महिने भरपगारी आणि दोन महिने अर्ध पगारी) घेऊन कोणताही आजार नसताना नुसते घरी बसून काढले आहेत त्यामुळे त्याची किंमत किती अमुल्य आहे हे मला पूर्ण माहिती आहे.
जाता जाता -- माझी पत्नी पुण्यातील एका प्रथितयश खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया काय आहे ते जाणण्यासाठी जाऊन आली होती तेथे तिला एक कागद भरून दिला. आणि तेथे आम्ही दोघे डॉक्टर आहेत हे पाहून त्यांनी सतरा लाख रुपये रोख असा दर सांगितला यातील अर्धे पुढच्या चार दिवसात आणून द्या. गम्मत म्हणजे बारावीचा निकाल अजून लागलेलाच नाही. यावर तिने त्यांना विचारले कि तुमच्याकडे अभियांत्रिकी केल्यावर "प्लेसमेंट" कितीची मिळते त्यावर ते म्हणाले कि चार लाख वार्षिक. यावर मी शांतपणे पत्नीला म्हटले कि मुलाला जेथे मिळेल तेथे प्रवेश घेऊ. चार वर्षे मुलगा घरी बसला तरी चालेल एक लाख रुपये तरीही वाचतील(व्याज वेगळे). विस्तारभयास्तव येथेच थांबतो.
वाचने
57787
वाचनखूण
प्रतिक्रिया
105
शुभेच्छा
शैक्षणिक यश हे फार तर १० %
आम्हाला दहावीला एक धडा होता,
परफेक्ट लिहिलय
In reply to परफेक्ट लिहिलय by स्पा
हम्म...
सगळ्यात महत्वाचे मुलाला काय करायचे आहे, हे त्याचे त्याला ठरवुद्याहे वाक्य कधी कधी फार घोळ करते. मुळात प्रत्येक दहावी व बारावी चा मुलगा खरच एव्हडा विचार करु शकतो का ? म्हणुन मग ते मेंढ्याच्या कळपासारखे होते, व सगळे बावरुन एकाच दिशेला जातात.. मुले खरच बावरतात, असे सरळ तुझे तु ठरव सांगितले की.. खुपदा हे निर्णय त्यांना घेताच येत नाही.. अश्या वेळेस योग्य मार्गदर्शन नक्की हवे..In reply to हम्म... by ब़जरबट्टू
मुळात प्रत्येक दहावी व बारावी
In reply to मुळात प्रत्येक दहावी व बारावी by पिशी अबोली
पटत नाही हो,
In reply to पटत नाही हो, by ब़जरबट्टू
कदाचित तुम्ही म्हणता ते
In reply to हम्म... by ब़जरबट्टू
सहमत.
In reply to सहमत. by प्रभाकर पेठकर
सहमत, निर्णय मुलावर
In reply to सहमत, निर्णय मुलावर by आनन्दा
+१
In reply to हम्म... by ब़जरबट्टू
नवनविन क्षेत्रांची त्याला ओळख
नवनविन क्षेत्रांची त्याला ओळख करून द्यावी, महत्व समजवावं.अगदी सहमत काका.. आणि म्हणूनच आता पालक म्हणून आपल्यालासुध्धा अपडेटेड राहावे लागेल.. :) +१११ आनन्दा.....In reply to नवनविन क्षेत्रांची त्याला ओळख by ब़जरबट्टू
खरं आहे, पण कठीण नाही.
In reply to खरं आहे, पण कठीण नाही. by प्रभाकर पेठकर
आता पालक म्हणून आपल्यालासुध्धा अपडेटेड राहावे लागेल..
औचित्यपूर्ण लेख.
In reply to औचित्यपूर्ण लेख. by सस्नेह
स्नेहांकिता ताई
In reply to स्नेहांकिता ताई by सुबोध खरे
सहमत.
In reply to स्नेहांकिता ताई by सुबोध खरे
__/\__
In reply to औचित्यपूर्ण लेख. by सस्नेह
व्यवस्थापन
उत्तम संतुलित लेख नि विचार!
In reply to उत्तम संतुलित लेख नि विचार! by प्यारे१
बाकी चालुद्या
In reply to बाकी चालुद्या by आत्मशून्य
(No subject)
सुंदर विचारी लेख !
In reply to सुंदर विचारी लेख ! by डॉ सुहास म्हात्रे
तुमचा मुलगा भाग्यवान आहे.
प्रगती महत्त्वाची.
In reply to प्रगती महत्त्वाची. by प्रभाकर पेठकर
+१
In reply to प्रगती महत्त्वाची. by प्रभाकर पेठकर
मनापासुन धन्यवाद पेठकर काका.
In reply to प्रगती महत्त्वाची. by प्रभाकर पेठकर
+१
चला जरा १०वा माणूस हा नियम
मस्त लेख...
मी मुळातच हुशार प्राणी नाही टयामुले
ते १७ लाख रुपये वाचूनच मी
परफेक्ट !
आपल्या मुलाचे शैक्षणिक यश हा आपण प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत आहात.यातील गंभीरता खरेच वाढत आहे. दुर्दैवाने हल्ली तर हि शैक्षणिक प्रतिष्ठा नर्सरी अन बालवाडीपासून दिसू लागलीय. लहान वयातच मुलाला मोबाईल आणि लॅपटॉपशी खेळायला मिळत असल्याने उद्या तो मोठा होऊन नक्कीच आयटी वा कॉम्युटर क्षेत्रात नाव काढेल अश्याही सुशिक्षित पालकांच्या भाबड्या अपेक्षा दिसून येतात. स्मार्ट जनरेशन, आपला मुलगा कमी पडू नये या स्पर्धेत म्हणून नर्सरीमध्येच ६० हजार घाला जेवढे आपल्या वेळी इंजिनरींगला नव्हते घातले. आणि एकदा का हे पैसे घातले की मग त्याने ते वसूल करून द्यावेत हि अपेक्षा आलीच. तसेच आपला "एवढे करून प्लेसमेंट ४ लाखाची" हा मुद्दाही योग्य. माझाही या आधी एका मैत्रीणीशी चर्चून झालेला. एवढे पैसे शिक्षणाला घालूनही जर साधारण याच रेंजमधील इंजिनीअर होणार असेल तर त्या दृष्टीने विचार करताही मग आपल्याच जनरेशनमध्ये ईंजिनीअर झालेले आपणच सरस जे आईवडिलांच्या तुटपुंज्या गुंतवणूकीवर एवढे कमावू लागलो की मुलांच्या नर्सरीसाठी ६० हजार फीज भरायची ऐपत ठेऊ लागलो. थोडक्यात पैसे गुंतवून कॉलेजातील सीट घेता येते पण टॅलेंट विकत घेता येत नाही हे आपल्याला पक्के ठाऊक असूनही आपण हि चूक करतो. किंबहुना या मागेही मग असते ती प्रतिष्ठाच ! अवांतर - मराठी लोकांमध्ये हे प्रमाण जास्त दिसते. मराठी माणसे धंदा करू शकत नाही वा व्यवसायात अपयशी का ठरतात याचेही कारण थोडेफार इथेच. आपण पैसे गुंतवतो ते प्रतिष्ठा कमवायला, पैसे चार कमी कमावले तरी मग चालतात.In reply to परफेक्ट ! by तुमचा अभिषेक
अवांतराशी सहमत.
........
भेटा
सर्वप्रथम डॉक्टरसाहेब तुमच्या
सर्व प्रतिसाद कर्त्यांना
सुंदर विषय
तुमच्या मुलाचे अभिनंदन ! लेख
बाप-लेक
या धाग्या वरील प्रतिक्रया वाचुन
मला विश्वास वाटतो,कि तुमचा मुलगा नक्कीच जीवनात यशस्वी होईल
In reply to मला विश्वास वाटतो,कि तुमचा मुलगा नक्कीच जीवनात यशस्वी होईल by पगला गजोधर
डोनेशन देणार नाही असे मी
In reply to डोनेशन देणार नाही असे मी by सुबोध खरे
जीवनात कौशल्याची शिदोरीच कामी येते, एकदम सहमत.
आवडले
अत्तिशय खरं आणि सुरेख
आमचा हुंडा...म्हणजे मेव्हणा.
छान !
मध्यम्वर्गीय मुलांनी प्रथम जे शिक्षण स्वताच्या पायावर उभे करु शक
In reply to मध्यम्वर्गीय मुलांनी प्रथम जे शिक्षण स्वताच्या पायावर उभे करु शक by प्रसाद१९७१
चांगला सल्ला.
In reply to मध्यम्वर्गीय मुलांनी प्रथम जे शिक्षण स्वताच्या पायावर उभे करु शक by प्रसाद१९७१
+१
In reply to +१ by आत्मशून्य
कलाकलांच्या अनाकलनीय चर्च्या कशा झोडल्या
In reply to कलाकलांच्या अनाकलनीय चर्च्या कशा झोडल्या by सुबोध खरे
माझ्याकडे आपले लिखाण वा हेतु यांवर विशेष भाष्य नाही...
In reply to माझ्याकडे आपले लिखाण वा हेतु यांवर विशेष भाष्य नाही... by आत्मशून्य
जसे अमिशने १५(?) वर्षे बँकींग
In reply to माझ्याकडे आपले लिखाण वा हेतु यांवर विशेष भाष्य नाही... by आत्मशून्य
आशू चा प्रतिसाद आवडला.
In reply to माझ्याकडे आपले लिखाण वा हेतु यांवर विशेष भाष्य नाही... by आत्मशून्य
गाढवा दुतोंडेपणा टाळुन
In reply to गाढवा दुतोंडेपणा टाळुन by निनाद मुक्काम …
पूर्ण सहमत. यद्यपि अमिश
In reply to पूर्ण सहमत. यद्यपि अमिश by बॅटमॅन
अमिश त्रिपाठीचं ते वाक्य
In reply to अमिश त्रिपाठीचं ते वाक्य by आदूबाळ
आर्थिक आघाडी सेफ करून मग हवं
In reply to गाढवा दुतोंडेपणा टाळुन by निनाद मुक्काम …
हा तुमचा एकांगी प्रतिसाद आहे.
In reply to हा तुमचा एकांगी प्रतिसाद आहे. by आत्मशून्य
सहमत.
In reply to सहमत. by llपुण्याचे पेशवेll
थियरी आणि प्रॅक्टिकल
In reply to माझ्याकडे आपले लिखाण वा हेतु यांवर विशेष भाष्य नाही... by आत्मशून्य
फार मोठी चुकीची विचारसरणी आहे.
In reply to फार मोठी चुकीची विचारसरणी आहे. by सुबोध खरे
मुलाचा कलच महत्त्वाचा आहे!
In reply to मुलाचा कलच महत्त्वाचा आहे! by संजय क्षीरसागर
भारी उत्खनन !
In reply to भारी उत्खनन ! by डॉ सुहास म्हात्रे
कसलं उत्खनन
In reply to फार मोठी चुकीची विचारसरणी आहे. by सुबोध खरे
डोक्टर साहेब आपण बरेच प्रश्न माझेवर इम्पोज करत आहात
In reply to मध्यम्वर्गीय मुलांनी प्रथम जे शिक्षण स्वताच्या पायावर उभे करु शक by प्रसाद१९७१
नसल्यास आवड निर्माण करावी.
In reply to नसल्यास आवड निर्माण करावी. by सुबोध खरे
याच्याशी मी सहमत नाही.
In reply to याच्याशी मी सहमत नाही. by आत्मशून्य
अहो असे प्रस्थापितांना
In reply to अहो असे प्रस्थापितांना by असंका
वेळ जात नाही म्हनुण तर उगवतो.
शैक्षणिक यश
लेख आणि पेठकरकाकांचा प्रतिसाद
सेलिंग इन द सेम बोट
वाचतीये आणि हळूहळू मनाची
In reply to वाचतीये आणि हळूहळू मनाची by रेवती
ह्यासाठीच माझी मुलगी जर्मनी
अनुभव आवडला
लेख आवडला
मला १० वीला ८४ साली ६६%
In reply to मला १० वीला ८४ साली ६६% by विलासराव
__/\__
In reply to मला १० वीला ८४ साली ६६% by विलासराव
बाबौ!!
In reply to बाबौ!! by आदूबाळ
गॅप घेणे म्हणजे परिक्षाच न
रच्याकने आयुष्यभर उत्कृष्ट ...
ऋणनिर्देश
In reply to ऋणनिर्देश by सुबोध खरे
अतिषय सहमत. प्रश्नच नाही.
In reply to ऋणनिर्देश by सुबोध खरे
चुकांवर ही लिहा
In reply to ऋणनिर्देश by सुबोध खरे
विनायक प्रभू
In reply to विनायक प्रभू by निनाद मुक्काम …
+११११
In reply to +११११ by प्यारे१
विनायक प्रभू यांनी बरेच लेख