वा ! सामंतकाका,
जेवणं आटोपून आम्ही पण झोपी गेल्यावर मध्य रात्री बारा वाजायच्या पूर्वी किंचीत जाग आल्यावर झोपल्या जागीच पुन्हा घुंघुरांचा तोच आवाज स्पष्ट अस्पष्ट कानावर यायचा.आणि शांत झोप यायची.
लेख फारच आवडला. फार छान नीरिक्षण आणि वर्णन ! मजा आली वाचायला. अजून असे लेख वाचायला नक्कीच आवडतील.
अवांतर : (बरं वाटायचं., भरून घ्यायचो... इत्यादी..) असा सर्व लेख चालू भूतकाळात असताना मध्येच (मध्य रात्रीच हे घाटावरचे " पावणं " पुन्हा परतीच्या मार्गावर बेळगांवच्या दिशेने रात्री बारा वाजताच निघून गेले होते. तो घुंघुरांचा रात्रीचा आवाज त्यांच्या परतीच्या प्रवासाची सप्तसुरात चाहूल देत होता.) ही पूर्ण भूतकाळातील दोन वाक्ये वाचताना अडखळायला झाले.
लेख उत्तमच !
--लिखाळ.
छानच लिहिल आहात. :)
माझ्या घराजवळुन कसबा बावड्याच्या उसाच्या कारखान्याला बैलगाड्या जायच्या.
त्या बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज ऐकताना मस्त वाटायच.
हा आवाज अनेक वर्षे ऐकलाच नव्हता. आणि तो किती मधुर होता हे एका पहाटे कळाले.
पुण्याहुन रात्री निघुन पहाटे ५ च्या आसपास कोल्हापुरात पोहचलो होतो.
स्टॉप वर उतरुन घरी जात असताना वाटेत बैलगाड्यांची रांग लागली. सगळे कारखान्यात उस घालुन परत जात होते.
त्यांचा दिवस सुरु झाला होता. आणि त्यांच्या घुंगरांचा तो अप्रतिम असा आवाज ऐकुन माझा दिवस एकदम फर्मास सुरु झाला.
लेख वाचुन एकदम ती आठव्ण आली :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
लिखाळजी,धनंजयजी, झकासराव
आपल्याला लेख आवडला हे वाचून बरं वाटलं.आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
सामंतकाका,
तुमचा हा लेख मला सर्वात जास्ती आवडला. बैलगाड्यांचं आणि त्या "पावनं" लोकांचं निरिक्षण जबरदस्त केलं आहे. संपूर्ण लेख असा आहे की, लिहिलेलं सगळं डोळ्यांपुढे येत आहे...
सुंदर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्राजुजी,
आपल्याला लेख आवडला हे वाचून बरं वाटलं.आभार
आपल्या कोल्हापुरकडून सुद्धा खूप गाड्या कोकणात माल घेऊन यायच्या.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
मस्त सामंत काका. आमच्या कणकवलीतून आता कोकणाचा अंश जवळपास नाहीसा होत आलेला आहे. पण वेंगुर्ला अजूनही कोकणचे रुपडे बाळगून आहे. खूप आवडते ठिकाण आहे माझे वेंगुर्ला.
जुने लेख उकरून काढायला अन त्यांचा आस्वाद घ्यायला मजा येते.
असं अमित खोजे म्हणतात.
मी आतापर्यंत मिपावर ३५०च्यावर लेख लिहिले आहेत.त्यातील काही लेख तुम्हाला खचितच आवडतील.
सुचना-
मिपावर येणारे ताजे लेख वाचून झाल्यावर आणखी एखादा लेख वाचायला एनर्जी असेल तर माझ्या लेखनातला एखादा लेख हुडकून काढून वाचावा.
(लेखावरचे प्रतिसाद,प्रतिप्रतिसाद,प्रोत्साहन,टीका,वगैरे वगैरे वाचायला मजा येईल)
प्रतिक्रिया
वा !!
चित्र जिवंत केले
छानच लिहिल
आभार
अतिशय सुंदर वर्णन..
आभार
जुने लेख
मस्त सामंत काका. आमच्या
लेखन आवडलं.
सुंदर आठवणी
काय सुरेख लिहिलंय!
धन्यवाद
खूप सुंदर! वर्णन अगदी एक नंबर
डोळ्यांसमोर चित्र उभं केलंत
मस्त आवडले.