✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बंदपीठाचा धसका.

क
कपिल काळे यांनी
Wed, 11/19/2008 - 09:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4634 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

म
महेश हतोळकर Wed, 11/19/2008 - 10:10 नवीन

खरयं....

मी पण ती पुरवणी वाचत नाही. सोमवारी सकाळी इतकं उदासवाणं वाचायला नको वाटतं...
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/19/2008 - 10:53 नवीन

+१

पूर्वी एक वाक्य ऐकलेलं होतं, कुत्रा माणसाला चावला तर बातमी होत नाही, माणूस कुत्र्याला चावला तर होते ती बातमी! खरोखर चांगल्याचं कौतुक किती वेळा होतं, दिसतं, समोर येतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर
म
महेश हतोळकर Wed, 11/19/2008 - 10:10 नवीन

प्रकाटाआ.

दोनदा आल्याने.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 11/19/2008 - 19:59 नवीन

उकाटाआ

दोनदा न आल्याने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर
म
मैत्र Wed, 11/19/2008 - 11:37 नवीन

एक संधी आहे...

आजकाल तिथे उदास गोष्टी वाढल्या आहेत हे खरं... पण सामान्य माणूस असे अनुभव घेत असतो... ज्यात सहन करणे याशिवाय काहिच दुसरा पर्याय नसतो. जर इतकं मोठं वृत्तपत्र एक संधी देत असेल तर काय वाईट आहे त्यात? गेल्याच आठवड्यात मी आमच्या घराजवळ राहणार्‍या एका वयस्कर काका काकूंनी कोणाला तरी मदत केली ते त्या बाइंनी लिहिलं आणि मग आम्हाला समजलं... चांगलं वाटलं. जर अपघात चोर्‍या वाइट अनुभव जास्त छापले जात असती तर ती वस्तुस्थिती आहे हे लक्षात घ्या. छान छान गोड गोष्टीसाठी करण जोहर छाप सिनेमे आणि मासिकं वगैरे आहेतच की.. धमाल करायची असेल तर मिपा आहे. वाइट अनुभव घेतलेल्या व्यक्तीला ते इतक्या मोठ्या स्तरावर मांडून काही हलकं वाटत असेल तर नक्कीच चांगलं आहे.तरीसुद्धा आता असे अतिशय तपशीलवार वाइट अनुभव वाढले आहेत हे खरं... ब्लॉग्ज मध्ये लोक अशा शेकडो गोष्टी किंवा विचार लिहितात. ज्यांचं विश्व त्या पेपर पलीकडे फारसं नाही त्यांच्या साठी तो एक खुला ब्लॉग आहे...
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Wed, 11/19/2008 - 19:46 नवीन

पेला अर्धा भरलेला आहे!!

मैत्र दु:खी लोक ह्या जगात खूप आहेत. त्यांच्या प्रति मी सहॄदय आहेच. त्यांचे दु:ख हलके होते हा मुद्दा ठीक आहे. पण त्यामुळे बाकीचे अजून दु:खी होतात त्याचे काय? हे म्हणजे पेला अर्धा रिकामा अश्या सारखे झाले. माणूस जगतो कश्यासाठी, दु:खासाठी? की चांगल्याच्या आशेवर? वॄत्तपत्राचे काम काय? लोकांचा हुरुप वाढवणे? की त्यांची आठवडयाची सुरुवातीला त्यांना नको त्या काळजीत ढकलणे? दु:खी माणसांची दु:ख नुसती लिहून कशी हलकी होतील? थोडं बरं वाटेल, पण अश्या परिस्थितीचा सामना करण्याचे बळ , समाजातील चांगले शोधण्यात मिळेल. मग हा टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार हे एवढे मोठे वॄत्त्पत्र का बरे करत आहे? http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 11/19/2008 - 20:01 नवीन

आता तर

आता तर वैद्यकिय महाविदयालयात ऍनोटोमी च्या पुस्तकांएवजी “बंदपीठ” अभ्यासाला लावणार असे एकले आहे. कारण प्रत्येकाचे अनुभव, इस्पितळातील रसभरीत वर्णने, आजारांची नवनवीन नावे, शरीराच्या विविध अवयवांची आणि नीला- धमन्यांची शास्त्रीय नावे, अस्थिभंगाचे अनेक प्रकार हे सगळं फ्रेश, ताजं दर आठवड्याला दोन रुपयात मिळतं , मग कशाला ती ऍनोटोमीची जाडजूड पुस्तकं वाचा बुवा? ह्या बंदपीठाने लोकांना एवढं शिक्षीत केलंय की, हल्ली डॉक्टर लोक उपचार करायला घाबरु लागले. रुग्णाचे नातेवाइक बरोबर बंदपीठाचा ताजा अंक आणतात सोबत. त्याबरहुकुम उपचार होतायत ना हे बघायला.
=)) =)) =)) =)) टाळ्या ... बाकी पोलिस टाईम्स आणि संध्यानंद हे पेपर मिक्स करून वाचले तरी चालेल... - दैनिक टारानंद
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 11/19/2008 - 20:14 नवीन

मी अनेकदा

मी अनेकदा मुक्तपीठ वाचतो. काही अनुभव-कथा या लोकांनी कशी मदत केली हे सांगणार्‍या असतात तर काही अनुभव दु:खद असतात. मुक्तपीठ ठीक असते. दुपारचा चहा पिताना मी पाचदहा मिनिटे मुक्तपीठावर चक्कर टाकतो. काही लेख-अनुभव एकदम 'ललित' असतात. ते वाचूनसुद्धा करमणूक होते. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 11/19/2008 - 21:21 नवीन

लेखकाशी सहमत.

फक्त दैन्य दाखवण्यासाठीच ही दैनिकं छापली जातात. आता आपल्या आजूबाजूच्या सगळ्या आजारी माणसांची संख्या मोजायला गेलं तर काय होइल? समोरच्या घरातले आजोबा वयपरत्वे आजारी. नवरा आजारी म्हणून आज्जी आजारी. वरच्या मजल्यावर राहणारे काका वजन कमी असल्यामुळे तर काकू वजन ज्यास्त असल्याने आजारी. खालच्या मजल्यावरची तीन चार कुटुंबे तीथे सध्या रहातच नाहीत. मग आमच्या आसपास फक्त आजारी लोक आणि भयाण घरंच आहेत असं म्हणायला हवं. मला वाटतं पूर्वी नातेवाईक भेटत, निमित्ताने का होईना. आजकाल फारसं जाणं येणं नाही राहीलं, मग मन मोकळं करायला वृत्तपत्रांच्या पुरवण्यांचा वापर सुरू आहे. रेवती
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 11/20/2008 - 04:01 नवीन

>>फक्त

>>फक्त दैन्य दाखवण्यासाठीच ही दैनिकं छापली जातात. त्यांना 'दैन्यिके' म्हणावे काय? :-?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
क
कपिल काळे गुरुवार, 11/20/2008 - 05:28 नवीन

असेच छापत

असेच छापत राहिले तर मात्र तसे नामांतर करावे लागेल http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
न
नंदन गुरुवार, 11/20/2008 - 06:18 नवीन

दैन्यिके

दैन्यिके सहीच! :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
अ
अनंत छंदी गुरुवार, 11/20/2008 - 19:05 नवीन

खरच आहे

अहो त्यांना दैन्यिकं म्हटले तरी चालेल, नव्हे धावेल. बर्तमानपत्र चालवून विकतचे दैन्य घेण्याचा अनुभव माझ्या पदरी आहे. म्हणजेच हे अनुभवाचे बोल आहेत. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
अ
अनिल भारतियन Wed, 11/19/2008 - 21:50 नवीन

काय लिहावे

काय लिहावे ?<अनिलstrong> न आवडले तर न वाचावे..आवडले तर सोडू नये.असे म्हणणे सोप्पे आहे. आपण या दैनिकाला पत्र पाठवायचे का ? बघा हं..पटत्येय का ? हल्ली आई वडिलांचे दु:ख ऐकायला वेळ नाही..वॄद्धाश्रम भरलेत तर लोकांचे दःख काय ऐकायचे ? कदाचित जेव्हां आपण दु:खी होऊ ना, तेव्हां आपल्याला सहानुभूतीची गरज लागणार नसावी. आपल्याला ना गाडी ओढावी लागत्. ना दारोदार फिरून का।ईतरी विक्री करावी लागत. दु:ख आहेच कुठे ? जिकडे तिकडे चकचकीत मॉल्स, मल्टीप्लेक्स व त्यात जाणारे भारतीय नागरिक आहेत. चोहोकडे आनंद पसरला आहे. मग हे लोक का रडत आहेत ? त्यांना हे अनुभव का आले ? छे. अशा लोकांना या जगात राहण्याचा काहीही अधिकार नाही. अरे तुमची दु:खे आम्हांला का सांगता ? चहा पिता पिता मस्तपैकी नाष्टा करतांना वाचवत नाही हे. आम्हाला राहू दे ना आनंदात. .. आम्ही काय देणे लागतो हो या लोकांचे ?
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Wed, 11/19/2008 - 21:58 नवीन

असे मी म्हणतच नाही

दु:ख नाही असे मी म्हणतच नाही. नीट वाचा. त्या दःखितांच्या प्रति मी सहॄदय आहेच. पण त्या दु:खाचा सामना करण्याची क्षमता कशी येइल ते बघावे. इथे अनुभव लिहिल्याने दु:खितांची दु:खे नाहिशी होणार आहेत का? थोडा दिलासा मिळेल, दोन चार फोन येतील. पण आपला लढा आपल्यालाच लढायचा असतो, तिथे कोणी मदत नाही करत. माझ्या तरी मते त्यांनी समाजातील चांगुलपणाचे अनुभव वाचले तर त्यांची इच्छाशक्ती वाढेल. जगण्यासाठी काही प्रेरणा मिळेल. अर्धा पेला रिकामा असला तरी अर्धा भरलेला असतो हे कळू दया की समाजाला. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 11/19/2008 - 23:12 नवीन

माझा असा

माझा असा अंदाज आहे.. की मुक्तपीठ ला एक थीम आहे.. एका पुरवणीत एकाच टाईपचे अनुभव्कथन असते.. कदाचित दर सोमवारी बदलत असेल.. परवाच्या पुरवणीत सगळे अपघात होते.. त्यामुळे खूप तोचतोचपणा वाटत असेल.. मला मुक्तपीठ आवडतं वाचायला.. नेहेमीच टाकाऊ नसतं.. त्यामुळे वाचते.. तुम्ही जे म्हणताय, अपघात्,हल्ले,स्फोट, ई गोष्टींची रेलचेल पेपरमधे १ ल्या पानावर तर असतेच! हल्ली या गोष्टीच वाढल्यात त्याला काय करणार.. अरे तो बोल्डचा टॅग कोणीतरी बंद करा रे.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 11/20/2008 - 03:57 नवीन

(विषय दिलेला नाही)

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
घ
घाटावरचे भट गुरुवार, 11/20/2008 - 03:59 नवीन

झाला बंद

झाला बंद टॅग!!!!
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 11/20/2008 - 04:21 नवीन

एक संकेतस्थळ

http://goodnewsindia.com/ नावाचे एक संकेतस्थळ बरेच वर्षे चालू होते अजूनपण आपण पाहू शकता मात्र ताज्या बातम्या देणे बंद झाले आहे कारण ज्या व्यक्तीने ते चालू केले ती व्यस्त आहे २०१० पर्यंत!
  • Log in or register to post comments
क
कलंत्री गुरुवार, 11/20/2008 - 19:20 नवीन

मेरी आवाज सुनो.

लेख खुपच छान आहे. ८७/८८ ला एका कंपनीत लागलो होतो. तेथे एक सदगृहस्थ होते आणि चुकुन कधी विचारले गेले की, " **** कसे काय चालले आहे?" असा प्रश्न विचारता क्षणीच कमीत कमी २ तास त्यांच्या भुत आणि वर्तमानातील अडचणीचा पाढा वाचला जाई. बरे त्यांची गाडी थांबवणे अशक्यच होते. एकदा / दोनदा असा अनुभव घेतल्यानंतर त्यांना पाहता क्षणीच मी पळ काढत असे. अर्थात हीच पद्धत अनेकांनी अनुकरलेली होती. अपघात, फजिती, फसवणूक इत्यादी बातम्यानी दिवस वाईट जातो हेही नकी. अवांतर : परवाच सकाळी एक बातमी वाचली. ( लोकसत्ता) पिंप्रीच्या डॉ. तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवुन बलात्कार. दिवसभर बलात्काराची व्याख्या काय असते यावरच विचार करत होतो. शेवटी मेंदु शिणला म्हणून बरे, नाहीतर मिपावाल्यांना शिणवले असते हा भाग वेगळा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 11/21/2008 - 09:59 नवीन

अरे वा!

अरे वा! वाचलं पाहिजे एकदा! :)
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 11/21/2008 - 12:05 नवीन

मुक्तपीठ ...

आणि सकाळच्या इतरही पुरवण्या वाचनीय असतात .. दुर्दैवाने तुम्ही अपघात, आजारपण वगैरे विषय असलेली पुरवणी वाचली असावी .. पु.ल. नी अशा योगाला "जल-शृंखला योग " असे नाव दिले आहे .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा