✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गाण्यांशी निगडीत आठवणी

द
देवदत्त यांनी
Mon, 12/31/2007 - 01:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10633 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Mon, 12/31/2007 - 02:07 नवीन

छान लेख..

देवदत्तराव, तुमचा लेख छान आहे आणि सांगितलेल्या आठवणीही छान आहेत! तुमच्या आठवणींशी निगडीत अशी काही गाणी आहेत का? हो, अगदी भरपूर आठवणी आहेत! 'सालस' ही आमची एकेकाळची प्रेयसी! तिचं-आमचं जमत असतानाची गोष्ट. भर पावसाळ्यात हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी (सांगून विश्वास बसणार नाही, परंतु होय, आता आम्ही अंमळ स्थूल आहोत परंतु कॉलेज जीवनात बर्‍यापैकी आकारात होतो, भरपूर व्यायामबियाम करायचो आणि तेव्हा मित्रमैत्रिणींच्या सोबत बरेचसे गडकिल्ले चढलो-उतरलो आहोत!) पावसाळी कुंद वातवरणात गरमगरम चाय पितांना वॉकमनवर लावलेलं 'दिवाना हुआ बादल' हे गाणं आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केलं होतं! आम्हा दोघांना जरा निवांतपणा मिळावा म्हणून एका झोपडीवजा आडोश्याला आमच्या इतर मित्रमंडळींनी आम्हाला दोघांना जरा चहा पिण्याकरता (!) मोकळं सोडलं होतं! तेव्हा त्या रसरशीत पोरीचा आम्ही हळूच एक मुकाही घेतला होता! साला आयुष्यातला पहिलावहिला मुका! आणि त्याच्याशी निगडीत 'दिवाना हुआ बादल' हे गाणं! अब क्या बताऊ आपको देवदत्तराव! जाने दो....! कालांतरानं नशीबाची दानं आमच्या बाजूने पडली नाहीत आणि सालस आम्हाला दुरावली! अगदी कायमची... परंतु आजही 'दिवाना हुआ बादल' हे गाणं लागलं की आम्ही जेव्हा 'दिवाना हुआ तात्या' या वयाचे होतो तेव्हाचे दिवस आठवतात! :) अवांतर - सालसची आणि आमची प्रेमकहाणी आम्ही मनोगतावर लिहायला घेतली होती आणि तिला मनोगती मंडळींचा अक्षरश: अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता! कालांतराने मनोगत सुटलं आणि सालसची कहाणी लेखनातही अधूरीच राहिली! आता पुन्हा ती कहाणी कुठेच लिहिणं होणार नाही. मनोगताशिवाय आम्ही ती इतरत्र कुठेही लिहू शकत नाही/लिहिणार नाही! आपली इच्छा असल्यास ती अधुरी कहाणी इथे वाचा! (हे लेखन आमच्या ब्लॉगावर ड्राफ्ट स्वरुपात सेव्ह केले होते ते आज अचानक निमित्त मिळालं म्हणून प्रकाशित करत आहे!) देवदत्तराव, अजूनही अशी अनेक गाणी आहेत ज्यांच्यासोबत आमच्या सुखदु:खाच्या अनेक आठवणी कायमच्या जोडल्या गेलेल्या आहेत! असो... छ्या! देवदत्तराव, वर्षाअखेरीस तुम्ही सालसची आठवण करून द्यायला नको होतीत! चुकलंच तुमचं!.... आपला, (दिवाना आणि हळवा!) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 01/01/2008 - 00:59 नवीन

सालस...

तात्या, तुमच्या सालसला तुम्हीच काय पण आम्ही पण विसरणार नाही. पुढच्या भागांची सगळेच वाट बघत होते. पण.... जाऊ द्या झालं... पण एक विनंति आहे, पुढचे भाग येऊ द्या. बर्‍याच दिवसात तुमचे काही नविन नाही. बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
द
देवदत्त Tue, 01/01/2008 - 14:46 नवीन

तात्या, आपल

तात्या, आपली आठवण लिहिल्याबद्दल धन्यवाद. तुमची ती कहाणी मी वाचेन लवकरच. छ्या! देवदत्तराव, वर्षाअखेरीस तुम्ही सालसची आठवण करून द्यायला नको होतीत! चुकलंच तुमचं!.... उम्म्म... थोडं फार चुकलंच. :) पण वर्ष अखेरीस चालेल हो. नवीन वर्षात पुढे मग विसरून जायचं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 01/01/2008 - 01:21 नवीन

माझी पहिली आठवण... गाण्याची...

तशी आवडलेली, वेड लावलेली गाणी बरीच आहेत... पण सर्वात जुनी आठवण... मी ५-६ वर्षांचा असेन. आमच्या शेजारी एक डॉक्टर राहतात. त्यांच्या कडे त्या वेळी एक 'रेडिओग्राम' होता (म्हणजे त्या वेळचा २-ईन-१. त्याच्यात एका बाजूला रेकॉर्ड प्लेयर असायचा आणि एका बाजूला रेडिओ). त्या तबकडीवर ऐकलेले पहिले गाणे... 'अनाडी' मधले नूतन आणि राज कपूर वर चित्रित झालेले 'वोह चाँद खिला, ये तारे हसीं...' हे गाणे. विशेषतः त्यातला 'अकॉर्डियन' चा पीस. अंगावर काटा आल्याचीही तीच पहिली आठवण. तिथेच आणि त्याच वयात ऐकलेले दुसरे गाणे, पं. भीमसेन जोशींचे 'मन हे राम रंगी रंगले..' हे भजन. आजतागायत तो आवाज विसरू शकलेलो नाही. हे दोन्ही प्रसंग माझ्या आठवणीत स्पष्ट कोरलेले आहेत. आजही नुसते डोळे मिटले तरी ते दोन्ही प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात. फोटोग्राफिक मेमरी म्हणतात तसे. http://www.youtube.com/watch?v=DCKCUkXBS44 बिपिन.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Tue, 01/01/2008 - 14:53 नवीन

योगायोग?

गेले कित्येक महिने असला लेख लिहायचे मनात होते. निदान स्वतःच्या आठवणींकरीताही. आताच विविध भारती वर ऐकले की त्यांनी ३ जानेवारीच्या कार्यक्रमात श्रोत्यांना त्यांच्या गाण्याशी जोडलेल्या आठवणी सांगण्यास विचारले आहे. एकाच वेळी दोन्हींकडून हे व्हावे हा योगायोग म्हणावा का? (नाहीऽऽऽऽऽऽ.. मी त्यांची कल्पना चोरलेली नाही. नाहीऽऽऽऽऽऽ.. :D )
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 01/01/2008 - 21:01 नवीन

माझ्या काही आठवणी!

गाण्यांच्या आठवणी किंवा असे म्हणा "आठवणीतील गाणी" असा एक कार्यक्रम गेले वर्षभर मी आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर(आधीची मुंबई 'ब') ऐकत आलोय. १)शाळेत आमच्या वर्गात एक नवी मुलगी आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तासाला तिला बाईंनी गाणे म्हणायला सांगितले. तिने म्हटलेले गाणे माझेही आवडते होते. मात्र मी ते कधीच म्हणत नसे कारण ते माणिक वर्मांनी गायलेले असल्यामुळे साहजिकच ते एका स्त्रीचे गाणे आहे असे मी समजत असे. असो. तर गंमत ही की तिने नेमके तेच गाणे गायले. त्याचे शब्द होते "क्षणभर उघड नयन देवा" आणि हे ऐकताच सगळ्या वर्गाने माझ्याकडे हसत हसत माझ्याकडे दृष्टी वळवली. त्यावेळी मी डोळे मिटून ते गाणे ऐकत होतो. :-) २) आमच्या घरी जेव्हा पहिला ट्रान्झिस्टर रेडिओ आणला तेव्हा तो सुरु केल्या केल्या जे पहिले गाणे लागले ते होते "सुलताना सुलताना काहे घबराना(असेच काहीसे होते.)". पुढचे आठवत नाही. ३)तेरी प्यारी प्यारी सुरतको बद्दलची आठवण इथे वाचा.
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 01/02/2008 - 04:34 नवीन

सुलताना

कहीं ये वोह तो नहीं? :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
प
प्रमोद देव Wed, 01/02/2008 - 08:34 नवीन

सही फरमाया आपने!

वोईच है ये! शुक्रिया नंदनमियाँ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
म
मुक्तसुनीत Wed, 01/02/2008 - 03:17 नवीन

लेखाबद्दल आभार

मला हा लेख आणि ही संकल्पनाच खूप आवडली. प्रत्येक गाण्याबरोबर एकेक आठवण ही आहेच. मग ते गाणे "बेदर्दी बालमा तुझको" असो किंवा "दर्द्-ए-डिस्को" असो. आपल्या जडणघडणीत , आयुष्याच्या प्रवासामध्ये ऐकलेल्या गाण्यांचा एक फार मोठा हिस्सा आहे. कणेकरांनी एके ठिकाणी म्हण्टले आहे , आमची पिढी रेशनच्या तांदूळांवर , डालडाच्या तूपावर आणि शंकर-जयकिशनच्या गाण्यांवर वाढली. तपशील बदलले तर प्रत्येकाचे हे वाक्य होईल. आजही कुणी आजोबा सैगलच्या आठवणीत रमतात, तलतच्या नावाने कुणाला हुंदका येतो आणि कुणाच्या नातवा-पणतवाचे (!) "शारुक् खान्" च्या "दर्दे डीस्को "शिवाय जेवण पूर्ण होत नाही. संगीताशिवाय आपण कधीच नव्हतो आणि नाही. अगदी मारकुट्या मास्तरांचे , तिरसट काकांचे , खाष्ट सासूचे "स्वतःचे" असे एखादे गाणे असतेच. वर्षांमागून वर्षे जातात , प्रस्तराचे एकमेकांवर जसे थर जमत जातात तसे , आपल्यावरूनसुद्धा काळानुसार बदलत्या संगीताचे थर जमतात. बेगान्या देशात आयुष्य काढताना , आप्तस्वकीयांपासून तात्पुरते किंवा कायमचे दूर असताना उब असते कधीकाळी ऐकलेल्या , प्रेम केलेल्या गाण्यांची. कितीतरी गाण्यांच्या कितीतरी आठवणी आहेत. कायकाय सांगायच्या ? एकेक गायक , एकेक संगीतकार , एकेक गीतकार खजिनेच्या खजिने ठेऊन काळाच्या पडद्याआड गेले आहेत. कितीतरी ख्याल गायकाना बैठकीत ऐकले , काही गझलनवाझांच्या मैफली अगदी काही फूटांवरून ऐकल्या. कितीतरी रात्री रंगल्या. कितीतरी प्रवास , कितीतरी गप्पा गाणी, गायक , संगीत, गीतकार , आणि त्यांची सृष्टी यांच्या सहवासात गेले आहेत. शेवटी, हरिवंशराय बच्चन यांचे आत्मचरित्राचे शीर्षक आठवते : "क्या भुलूं , क्या याद करूं ! "
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 01/02/2008 - 09:22 नवीन

मी एक गाण॑

मी एक गाण॑ शोधतो आहे लहानपणी छायागीतमध्ये ऐकलेल॑, त्यात किशोरकुमार आणि माला सिन्हा आहेत्.'आरारारारा तोड ना दिल बेकरार का..' असे काहीसेसे त्याचे शब्द होते.फार मस्त गाणे होते.त्यात शेवटी माला सिन्हा इतकी फाकडू लाजते की वाह! कोणीतरी प्लीज पिक्चरचे नाव सा॑गा.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 01/09/2008 - 01:27 नवीन

बहुदा

'बाँबे का चोर' असावा. रवीचं संगीत आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 01/11/2008 - 10:15 नवीन

बगळ्यांची माळ फुले

मी ६वीत असेन तेव्हा. संध्या़काळी शाळेतून घरी आलो आणि गाणे रेडीओवर चालू होते 'छेडीती पानात बीन थेंब पावसाचे ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात' काहीही अर्थबोध झाला नाही. मग काही वर्षे गेली . मी कोकणात माझ्या गावी गेलो होतो. उन्हाळा होता. आणि वळवाची एक सर येऊन गेली व परत ऊन आले. आलेले ढग थोडे पुढे गेले. मी घरातून बाहेर आलो. आणि जे काही दृश्य दिसले त्याने मला वरील ओळींची अनूभूती दिली. आजूबाजूला गळणार्‍या थेंबांनी मला ''छेडीती पानात बीन'' म्हणजे नेमके काय याची अनुभूती दिली आणि त्यानंतर मी गाणे खरे रसिकतेने ऐकू लागलो. या घटनेला मी माझा पुनर्जन्म समजतो. कारण त्या घटनेने मला रसिकतेची देणगी दिली. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
झ
झंप्या Sat, 01/12/2008 - 07:23 नवीन

दत्त्या,

दत्त्या, सही विषय रे!! मलापण सत्या मधले 'गोली मार भेजेमे' ऐकले की आमच्या गँगजी आठवण येते बघ! -सबका डॉन एक
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 18:57 नवीन

चांद सा मुखडा

यूं शरमाया. रुपारेल कॉलेज, मुंबई च्या वार्षिक सोहळ्यात फिशपाँडचा कार्यक्रम चालू होता. प्र. रा. वि. सोवनी सुप्रसिद्ध विद्नानलेखक आमचे आवडते प्रा तेव्हा अँकरिंग करीत. त्यांनी एका ब्यूटी क्वीनला रंगमंचावर बोलाविले. तिला फिशपाँड आला होता. ती रूपगर्विता ताबडतोब मंचावर गेली. मग प्रा. नी फिशपाँड गाऊन दाखविला. चांद सा मुखडा क्यूं शरमाया ....... अरे हट. तुझे एप्रिल फूल बनाया.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 01/14/2008 - 18:34 नवीन

शाहिर

शाहिर साबळे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर आधारीत "माझी मैना गावाकडं राह्यली,माझ्या जिवाची होतीया काह्यली" हे गाणे कोणाकडे आहे का?किंवा ते कुठे मिळेल?(अल्बमची माहीती वगैरे...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा