✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नक्की किती पैसे पुरेसे?

उ
उडन खटोला यांनी
Tue, 12/30/2014 - 11:49  ·  लेख
लेख
नुकतीच मी स्वेच्छानिव्रुत्ती घेतली. एका मल्टिनॅशनल कम्पनी मध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर २० वर्षे काम केले . सुमारे २० लक्ष रुपये बॅन्केत एफ डी स्वरुपात आहेत , त्याचे १०% व्याजानुसार सुमारे १६५००/- रुपए प्रतिमहिना व्याज येते. माझे वय सद्या ५० आहे . तरी हे पुरेसे आहेत का? व याव्यतिरिक्त कुठे सेफ गुंतवणूक करता येइल? मी कोकणातील खेडेगावात राहत असुन महिना खर्च साधारण १००००/- आहे, यामध्ये १+१ जेवन व स्वताचे वडिलोपार्जित घर व शेती तसेच माझा खान व "पाना"चा खर्च समाविष्ट आहे , माझ्याकडे एक मोटरबाईक असून तिचा वापर मी जवळच्या अन्तरावर प्रवासासाठी करतो. तरी मी काय करावे ? यावर जाणकरानी गाम्भीर्याने सल्ला देणे ,अशी नम्र विनन्ती आहे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
130145 वाचन

💬 प्रतिसाद (199)

प्रतिक्रिया

(No subject)

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 12/31/2014 - 17:44 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

निर्लज्ज मित्राची गोष्ट सांगा

वपाडाव
Wed, 03/30/2022 - 14:07 नवीन
निर्लज्ज मित्राची गोष्ट सांगा...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

चहावाल्यांचा व्यवसायही तेजीत

रेवती
Wed, 12/31/2014 - 16:37 नवीन
चहावाल्यांचा व्यवसायही तेजीत असल्यासारखा दिसतोय सध्या! जर तुम्ही तो व्यवसाय सुरु करणार असाल तर माझ्याकडे मोठे गाळणे आहे स्टीलचे! ते देते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हे बघा... गुंतवणूकदारदेखील

अनुप ढेरे
Wed, 12/31/2014 - 17:48 नवीन
हे बघा... गुंतवणूकदारदेखील मिळाले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

च्यावाले कुठं गाळणं वापरत

वैभव जाधव
Wed, 12/31/2014 - 20:21 नवीन
च्यावाले कुठं गाळणं वापरत असतेत का? फडकं लागतय त्यांना. मी देतो ते. :) (फुल्ल लाईफटाइम)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

रद्दीवाला हा एक सोल्लिड धंदा

अभिजित - १
Wed, 12/31/2014 - 19:54 नवीन
रद्दीवाला हा एक सोल्लिड धंदा आहे. जबरी फायदा असलेला. आमचा इथे ३/४ रद्दीवाले बघितले. पैसेवाले आहेत. एकाचा १० माजली tower मध्ये व्यापारी गळा आहे. भाड्यावर दिलेला. स्वताचे दुकान वेगळे. एकाचा मसाला धंदा आहे . एकाचा गाड्या पुरवण्याचा धंदा आहे. आणि हे सगळे धंदे यांनी फक्त राद्दीवर सुरु केले आहेत. जेव्हा रद्दी १० /११ किलो असते तेव्हा हे फक्त ६/७ किलो दाखवतात. उपाय म्हणून मी त्यांना माझ्या काट्यावर वजन करायला लावतो , मी रद्दी विकतो तेव्हा ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मंडळी

उडन खटोला
Tue, 12/30/2014 - 19:00 नवीन
प्रोफाईल मध्ये दिलेली माहिती टीपी म्हणून दिली होती ,पण हा धागा मी सीरियसली काढलेला आहे . माझा प्रश्न जेन्युइन असून चर्चेतून इतरानाही मार्गदर्शन होईलच!
  • Log in or register to post comments

उडन खटोला साहेब

सुबोध खरे
Tue, 12/30/2014 - 19:37 नवीन
उडन खटोला साहेब आपले आयुर्मान जर ८० वर्षे धरले तर अजून आपले ३० वर्षे खर्च होणार हे गृहीत धरावे लागेल. औषधोपचारावर वयाच्या चाळीस वर्षापर्यंत जेवढा खर्च होतो तेवढा पुढच्या वीस वर्षात होतो तेवढाच पुढच्या दहा वर्षात होतो तेवढाच पुढच्या पाच वर्सःत होईल हे आपल्याला गृहीत धरावे लागेल. शिवाय वैद्यकीय खर्च केवळ आपल्यावर नाही तर आपल्या पत्नीसाठी सुद्धा करावा लागेल. आणी हा खर्च दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आप मेलं आणी जग बुडलं हे आपल्या पत्नीला चालणार आहे काय हे विचारून घ्यावे.( वाटेल ते झाले तरी पैसे खर्च करणार नाही असे आपण स्वतः बद्दल म्हणू शकाल परंतु असे आपल्याला आपल्या पत्नीबाबत करता येईल काय?) बरेच वरिष्ठ नागरिक एकदाच मेलो म्हणजे सुटलो असे म्हणतात परंतु आपले हाड मोडले, गुडघे धरले, पक्षाघात झाला इ तर्हेच्या तर आपण जिवंत राहता आणी परावलंबी होता याचा ते विचार करीत नाहीत. तो लक्षात आणून दिल्यावर आपली विचारसरणी भुसभुशीत पायावर आहे हे त्यांच्या लक्षात येते. आपले मांडीचे हाड मोडले तर त्याची शल्य क्रिय़ा आपल्याला करावीच लागेल. तेंव्हा शिल्लक रकमेवर आयुष्य काढता येईल हे गृहीत धरणे बरोबर नाही. माझ्या अनुभवात तीन वरिष्ठ नागरिक असे आहेत कि जे व्याजाच्या रकमेत भागत होते तेंव्हा आनंदात होते.यातील एक नागरिक - एक मोठा वैद्यकीय खर्च आला कि शिल्केतून पैसे काढावे लागले आणी हे गणित फसले. पुढे रोजचा खर्च भागेना म्हणून मुंबईतील आपली जागा विकून ७२ व्या वर्षी पुण्याला राहायला गेले आणी वर मिळालेल्या रकमेतून हा खर्चाचा मेळ बसविता आला. आपल्याकडे अशी कोणती स्थावर मालमत्ता असेल तर गोष्ट वेगळी. मुले जरी अतिशय गुणी असतील तरीही वृद्धापकाळात त्यांच्या पुढे पैश्याच्या साठी हात पसरणे हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय पुरुषाला अत्यंत क्लेशदायक असते. यावर अधिक काही अनावश्यक पण टाळता न येणारे खर्च आपल्याला करावे लागतील ते बर्याच वेळेस गृहीत धरलेले नसतात. यात जवळच्या नातेवाईकातील समारंभ (लग्न साखरपुडा इ) यासाठीचा जाण्यायेण्याचा आणी आहेराचा खर्च. दर वर्ष किंवा अगदीच काही नाही तरी दोन तीन वर्षातून एखादा प्रवास यात्रा याचा खर्च आणी तेथे होणारी आपल्या पत्नीची खरेदी हे आपला अर्थसंकल्प कोलमडवू शकतो. वरील गोष्टी गृहीत धरून मला आपल्याला एक सल्ला द्य्वासा वाटतो. जोवर आपले हात पाय चालते आहेत तोवर किंवा वयाच्या ६५ वर्षपर्यंत आपला रोजचा खर्च निघेल इतपत मिळकत असेल अशी नोकरी व्यवसाय ई चालू ठेवावा. म्हणजे आपली जीवन शैली दोन पायर्या खाली आणायला लागणार नाही. अन्यथा नाचणीची भाकरी आणी आंबील खाऊनहि लोक जगतातच कि.
  • Log in or register to post comments

+१००००

vikramaditya
Tue, 12/30/2014 - 21:39 नवीन
नुसत्या व्याजावर जगण्याची जीवनशैली माणसाला निश्र्क्रिय बनवते. नस्ती रिस्क आणि उठाठेवी (/स्ट्रेस) नसलेले काम करावे, अ‍ॅक्टीव रहावे आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

उद्बोधक चर्चा

रमेश भिडे
Wed, 12/31/2014 - 02:10 नवीन
अतिशय उद्बोधक अन माहितीपूर्ण चर्चा सुरू आहे. धागाकर्ते व प्रतिसादकांचे आभार!
  • Log in or register to post comments

अवघड प्रश्न आहे ..

पहाटवारा
Wed, 12/31/2014 - 04:44 नवीन
अवघड प्रश्न आहे .. कारण, फक्त जेवण्-खाण, कपडे-लत्ते अशा प्राथमिक गरजा पूर्ण करुन रहाणे अशीच तुमची निवॄत्त झाल्यानंतरच्या आयुश्याची कल्पना असेल, तर ऊत्तर मिळवणे शक्य आहे..पण मला वाटते, असेच जगत रहाणे.. फार अवघड आहे. तेव्हा जर तुम्ही याव्यतीरिक्त काय करायचे ते ठरवले असेल तर त्याचा हि हिशेब या जमा-खर्चात येणे आवश्यक आहे.. अन ते जर ठरवले नसेल, तर व्यक्तीशः मला तर तोच प्रश्न आधी सोडवला पाहिजे असे वाटते. अवांतर :मागे एकदा कुठल्याश्या म्यानेजमेंट वाल्या एका वर्कशोप मधे, त्याच्या सूत्रधाराने एक प्रश्न सर्वांना विचारला: "समजा - कुठल्याश्या अचाट नशीबाच्या पलटण्याने तुम्च्या सर्व आर्थिक गरजा भागतील अशी मिळकत तुम्च्या ऊरलेल्या आयुश्यात मिळत राहिल आणी वर पुढ्च्या पीढ्यांसाठीहि भरपूर तरतूद होईल अशी परीस्थीती जर झाली, तर तुम्हि सध्या जे काम करता आहात तेच कराल कि अजून काहि कराल ?" ऊपस्थीत एकानेहि , हेच काम कराल असे म्हण्ट्ले नाहि.. मला निव्रुतीचा विचार मनात आला कि नेह्मी हेच वाटते.. जेव्हा-केव्हा ती वेळ येईल तेव्हा आर्थिक बाजू-बरोबर, ह्या प्रश्नाचे ऊत्तरहि तयार ठेवायला हवे, अन त्यासाठी जर काहि पूर्व-तयारी करायची असेल, तर तीहि आर्थिक पूर्वतयारी ईतकीच गरजेची असेल.. असो.. आपल्याला शुभेच्छा ! -पहाटवारा
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसाद वाचले. यांत एकच

कंजूस
Wed, 12/31/2014 - 05:16 नवीन
सर्व प्रतिसाद वाचले. यांत एकच मुद्दा आहे महिना सोळा हजार रु पुढे पुरणार नाहीत काहीतरी करा आणि आणखी दहा वर्षे कमवा. परंतू समजा एखाद्याने ठरवले असेल आता यापुढे काहीच हातपायडोके हलवायचे नाही तर या सोळा हजाराचे काय करायचे ते त्यांना सांगावे.
  • Log in or register to post comments

.

hitesh
Wed, 12/31/2014 - 07:49 नवीन
१६ हजार खाऊ पिऊ मध्येच संपतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

पिऊ चे माहीत नाही

पैसा
Wed, 12/31/2014 - 10:52 नवीन
पण त्यांची कोकणातली शेती आहे. म्हणजे भात, उडीद आणि भाज्या ते घरीच पिकवू शकतात. तेही करायचे नसेल तर दोघांना काटकसरीने रहायला ५००० रुपये महिना लै झाले. महाराष्ट्रातले माहीत नाही. पण आमचे गोव्यातले रेशन कार्ड हल्लीच रिन्यु केले. रेशनवर काय आहे बघू तरी म्हणून गेले तर १०० रुपयात ८ किलो तांदूळ आणि २ किलो गहू सरकार कृपेने मिळाले. पूर्वी तेल साखर इ मिळत असे. आताचे माहीत नाही. कोणत्याही उपचारासाठी सरकारी रुग्णालये, तिथले डॉक्टर्स, औषधे मोफत असतात. फक्त जरा जास्त वेळ थांबावे लागते. कोणत्याही प्रकारचे तज्ञ लागले तर उपलब्ध असतात. मांजर चावल्यावर घ्यायचे इंजेक्शन खाजगी डॉक्टर्सकडे नव्हते म्हणून मला हे कळले. आपण हुच्चभ्रू झाल्यामुळे या गोष्टी आपल्याला माहीतही नसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

आपण हुच्चभ्रू झाल्यामुळे या गोष्टी आपल्याला माहीतही नसतात.....

मुक्त विहारि
Wed, 12/31/2014 - 11:15 नवीन
सहमत... बर्‍याच वेळा आम्ही पण रेशनचे धान्य वापरतो. तसे ते थोडे वेळखावू काम आहे, पण ४ पैसे वाचवायचे असतील, तर वेळेचा त्याग करणे भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आपलेच टॅक्स भरलेले पैसे

पैसा
Wed, 12/31/2014 - 11:19 नवीन
आपलेच टॅक्स म्हणून भरलेले पैसे सरकार रेशनसाठी वापरते. रेशनचे धान्य आणण्यात कमीपणा काय? बरे चांगले सोनामसुरी तांदूळ ८-९ रुपये किलोने मिळत असतील तर का घेऊ नयेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सहमत

एस
Wed, 12/31/2014 - 12:27 नवीन
रेशनचे धान्य म्हणजे टाकाऊबिकाऊ नसते. बर्‍याचदा चांगले असते. थोडे साफबिफ केले की वापरता येते. या गव्हाच्या पोळ्या छान मऊ बनतात आणि तांदळाचा भातही मोकळाढाकळा नाही झाला तरी चवीला तितकाच चांगला असतो असा अनुभव आहे. साखरही मिळते रेशनवर. योग्य, कायदेशीर मार्गाने पैसे वाचवणे आणि ते चांगल्या कार्यासाठी वापरणे - अगदी स्वत:च्या मौजमजेसाठी, हौसेसाठीही वापरणे यात काही गैर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

@ पैसाताई आणि स्वॅप्स - वर

प्रसाद१९७१
Wed, 12/31/2014 - 12:40 नवीन
@ पैसाताई आणि स्वॅप्स - वर कोणीच रेशनचे धान्य का वापरले असा प्रश्न विचारला नाहीये. तुम्हीच का एकदम डीफेन्सीव आणि जस्टीफाइंग मोड मधे जाताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

एकदम बरोब्बर

एस
Wed, 12/31/2014 - 12:43 नवीन
मै तब नहीं था, बट अब्भी उस मोड में जाके मी माघार घेता हय. स्वॉरी ७१साहेब! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

नाही

पैसा
Wed, 12/31/2014 - 12:51 नवीन
असे तुमच्यासारखे कोणीतरी बोलेल याचा विचार मी केला होता. पण काहीजणांना रेशनचे धान्य वापरणे डाऊन मार्केट वाटते. किंवा माझ्या केसमधे रेशनवर किंवा सरकारी हॉस्पिटल्समधे बरे काही मिळत असेल हेच मला माहीत नव्हते. कमी दराचे धान्य गरीब लोकांसाठी असते ते आपल्याला बाजारभावाने घेणे परवडत असताना आपण का घ्यावे असाही काही जण विचार करू शकतात, म्हणून लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

रेशनच्या तांदळाच्या इडल्या

प्यारे१
Wed, 12/31/2014 - 13:25 नवीन
रेशनच्या तांदळाच्या इडल्या छान होतात म्हणे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

>>>रेशनच्या तांदळाच्या इडल्या छान होतात

एस
Wed, 12/31/2014 - 13:32 नवीन
हो का पैसाताई? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ते तांदुळावर आहे ना!

पैसा
Wed, 12/31/2014 - 13:54 नवीन
मी आणले ते रोज वापरायचे सोनामसुरी होते. बाजारात ५० रुपये किलोने मिळतात, बारीक तांदूळ. पण इडलीसाठी फार चांगले नाहीत. इडलीसाठी जरा जाड, थोडेफार फोलपट शिल्लक असलेले तांदूळ चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

+१

कपिलमुनी
Wed, 12/31/2014 - 13:34 नवीन
इडल्या छान होतात
हो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आमचं रेशन कार्ड पांढरं आहे.

काळा पहाड
Wed, 12/31/2014 - 18:06 नवीन
आमचं रेशन कार्ड पांढरं आहे. त्यावर काही मिळत नाही ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

.

hitesh
गुरुवार, 01/01/2015 - 02:02 नवीन
काळ्या पहाडाचं पांढरं कार्ड !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

कोणत्याही उपचारासाठी सरकारी

विलासराव
Sat, 01/10/2015 - 11:33 नवीन
कोणत्याही उपचारासाठी सरकारी रुग्णालये, तिथले डॉक्टर्स, औषधे मोफत असतात. फक्त जरा जास्त वेळ थांबावे लागते. कोणत्याही प्रकारचे तज्ञ लागले तर उपलब्ध असतात. मांजर चावल्यावर घ्यायचे इंजेक्शन खाजगी डॉक्टर्सकडे नव्हते म्हणून मला हे कळले. आपण हुच्चभ्रू झाल्यामुळे या गोष्टी आपल्याला माहीतही नसतात. माझ्या कानाचे नोव्हेंबर २०१३ ला ऑपरेशन झाले. बाहेर खर्च जवळपास ५०००० सांगीतला. मेडिकल विमाही होता. पास झाला असता की नाही या भानगडीत न पडता सरळ पालीकेच्या दवाखान्यात भरती झालो. ऑपरेशन खर्च ५०० रुपये . काही बाहेरची औषधे मीलुन ३००० खर्च झाले. दिवसातुन दोनदा चहा, दुध -ब्रेड, दोनदा गरमागरम साधे जेवण दवाखान्याकडुन. ८ दिवसाने घरी आलो. मी वयाच्या ३५ व्या वर्षी काम करायचे बंद केले ते ३१ डिसेंबर २००५ साली. गरजा अतिशय कमी. रेग्यूलर मेडिटेशन करतो.एक फ्लॅट आहे १३ लाख आजची किंमत. ज्याला कामधांदा शिकवला तो चुलतभाउ आजपर्यंत पैसे देतोय खर्चायला. ज्यादिवशी नाय देणार तेंव्हाच तेंव्हा ( एकतर परत काम कारायच नाही तर नर्मदे हर!!). वरती सर्व गृहीतके इतके वर्ष जगु यावर आधारीत आहेत. जगुच याची काय शाश्वती? मलाही भरपुर सल्ले मिळतात तेही न विचारता. पण आम्ही आपल्या निर्णयावर ठाम. जे काय समोर येईल त्याला तयार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आता हा धागा उडनटोला यांनी तीन

कंजूस
Wed, 12/31/2014 - 13:56 नवीन
आता हा धागा उडनटोला यांनी तीन मातब्बर (संस्थळे)ठिकाणी उघडून मिळालेल्या सल्ल्याने काळजीपूर्वक नदी ओलांडणार आहेत. काही ठिकाणी पाचसहा वर्षाँपूर्वी झालेल्या अशाच चर्चेचे संदर्भही सभासदांनी दिले आहेत. त्यामुळे सोळा हजार रू/महीना पुरतील का? चे उत्तर आताच्या काळातील नवीन गुंतवणूक/मौजमजा वगैरे पर्यायांपुरते सिमित ठेवायला हवे असे वाटते.
  • Log in or register to post comments

बँक ऑफ महाराष्ट्र होणार विलीन

मंदार कात्रे
गुरुवार, 01/01/2015 - 13:44 नवीन
बँक ऑफ महाराष्ट्र होणार विलीन? प्रसाद पानसे, पुणे देशातील बँकिंग व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करताना स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, सेंट्रल बँक आणि कॅनरा बँक या सात बँकांमध्ये इतर सर्व सरकारी बँका विलीन केल्या जाण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामध्ये पुण्यात मुख्यालय असलेली महाराष्ट्र बँक (बँक ऑफ महाराष्ट्र) ही सेंट्रल बँक ऑफ इंडियात विलीन केली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पुण्यात शुक्रवार आणि शनिवारी 'ज्ञान संगम' ही बँकिंग परिषद होत आहे. मोदी हे फक्त शनिवारी उपस्थित असतील. अर्थमंत्री अरुण जेटली, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्यासह सर्व राष्ट्रीय व खासगी बँकांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आदी उच्चाधिकारी या मंथनामध्ये सहभागी होणार आहेत. बँकांच्या विलिनीकरणासाठी मोदी यांनी याबाबत राजकीय इच्छाशक्ती दाखवून पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर संपूर्ण बँकिंग व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल केले जाणार आहेत. 'विलिनीकरण करताना बँकिंगप्रणाली (सॉफ्टवेअर) आणि प्रादेशिक विस्तार विचारात घेतले जाणार आहेत. त्यानुसार सात प्रमुख बँकांमध्ये (मेगा बँक) इतर १९ बँकांचा समावेश करण्यात येणार आहे,' अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी 'मटा'ला दिली. या विलिनीकरणानंतर मेगा बँकेत 'बासल ३' या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आवश्यक भांडवल उपलब्ध होईल; तसेच खासगी बँकाबरोबरच या राष्ट्रीय बँकादेखील आंतरराष्ट्रीय बँकांशी स्पर्धा करू शकतील, अशी आशा धोरणकर्त्यांना असल्याचे सूत्रांनी नमूद केले आहे. किफायतशीर पर्याय बँकांना कोणतीही देशव्यापी प्रणाली विकसित करताना सॉफ्टवेअरसाठी कोट्यवधी रुपये खर्ची पाडावे लागतात. हा अनावश्यक खर्च टाळून सर्वसाधारणपणे एकाच कंपनीचे, एकाच प्रकारचे सॉफ्टवेअर वापरणाऱ्या बँकांचे एकमेकांमध्ये विलिनीकरण करण्यात येणार आहे. विशिष्ट भागात एखाद्या बँकेच्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या शाखा बंद करण्याची वेळ येऊ नये, यासाठी हे नियोजन करण्यात आल्याचे समजते. विलिनीकरणाचा 'रोडमॅप'... विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकांच्या विलिनीकरणाचा 'रोडमॅप' पुढीलप्रमाणे असू शकतो. ('मेगा बँक' आणि त्यात विलीन होणाऱ्या संभाव्य बँकांची नावे या क्रमाने) सेंट्रल बँक ऑफ इंडिया : बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, अलाहाबाद बँक कॅनरा बँक : सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक स्टेट बँक ऑफ इंडिया : या बँकेच्या पाच संलग्न बँका. उदा. स्टेट बँक जयपूर अँड बिकानेर पंजाब नॅशनल बँक : विजया बँक, देना बँक बँक ऑफ बडोदा : आयडीबीआय बँक, युनायडेट कमर्शियल बँक बँक ऑफ इंडिया : ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब अँड सिंध बँक
  • Log in or register to post comments

ही बातमी या चर्चेत का?

क्लिंटन
गुरुवार, 01/01/2015 - 13:55 नवीन
ही बातमी पेपरमध्येही वाचली पण या चर्चेशी त्याचा संबंध आणि ती बातमी इथे द्यायचे प्रयोजन नक्की काय हे समजले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे

+१

नाखु
गुरुवार, 01/01/2015 - 15:16 नवीन
कदाचित यापैकी कुठल्या बँकेत धागाकर्त्याची ठेव तर नाहीना ? याची उठा"ठेव" असावी *SCRATCH* (ह्.घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

यातून सामान्य माणसाला काही

चिनार
Fri, 01/02/2015 - 09:48 नवीन
यातून सामान्य माणसाला काही फायदा होईल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे

दृष्टिकोन

देशपांडे विनायक
Fri, 01/02/2015 - 06:32 नवीन
माझे वय ७२ पूर्ण २०१० साली मी रिक्षासाठी रोज १०० रुपये खर्च होणार नाही असे गृहीत धरले नन्तर आठवड्यात ७०० झाला का खर्च रिक्षावर असा विचार करू लागलो आता महिन्यात ३००० झाला का खर्च असा विचार करताना घाबरत आहे कारण आता तेवढा खर्च सहज होऊ शकतो असे जाणवू लागले आहे आपले खर्चाचे अंदाज चुकले कि धडधड वाढते साठवलेले पैसे खर्च करताना विचार करावा लागतो याचे वाईट वाटते १६५०० रुपयात जगणे शक्य आहे पण यापुढे जगताना जगण्याची पातळी बदलणे भाग पडेल तुमचे शरीर ही पातळी स्वीकारेल एकवेळ पण मन ? तुमचे मन जर स्विकारणार असे वाटत असेल तर तुम्हाला हा प्रश्न का पडला हे मी समजू शकत नाही १६५०० रुपयात जगण्यासाठी सगळा दृष्टिकोन बदलणे मला गरजेचे वाटते
  • Log in or register to post comments

काय ठरले मग शेवटी ?

आयुर्हित
Fri, 01/02/2015 - 15:08 नवीन
काय ठरले मग शेवटी? उडन खटोला यांना नक्की किती पैसे पुरेसे आहेत? कोणते तांदूळ वापरावे व कोणता खर्च टाळावा?
  • Log in or register to post comments

अतिशय उत्तम धागा !

विटेकर
Mon, 01/05/2015 - 10:18 नवीन
फार सुरेख आणि मोलाची चर्चा या निमित्तने झाली आहे. मला एक जाणवते आहे की बर्‍याच जणांना वेळेआधी निवृत्त व्हायचे आहे( त्यात मी देखील आलो! ) आणि म्हणूनच या धाग्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. पण असे का ? अधिकाधिक कर्तृत्व दाखवून विजिगिषु वृत्तीने जगण्याची भारतीयांची उमेद खचत चालली आहे का ? गेल्या आठवड्यात अश्या दोन बातम्या ऐकल्या की ज्यांनी वेळेआधी निवृत्ती स्व वीस वर्षापूर्वी स्वीडन मध्ये काम करत असताना तिथले कर्माचारी मला प्रमोशन नको असे म्हणत तेव्हा मला फार आश्चर्य वाटे. मला वाटे , या लोकांकडे विजिगिषु वृत्ती नाहीच. पण खरे कारण होते , कितीही सामान्य पातळीवर काम्करणारा कामगार असला तरी त्याच्याकडे गाडी / घर आणि खाण्यापिण्याची चंगळ असे ! वरच्या पातळीवर जाऊन अधिक काम करावे अधिक पैसे मिळवावेत असे सामान्य स्वीडीश कामागाराला वाटत नसे, काही मोट्व्हेशनच नसे ! आज आम्हा भारतीयांची ही स्थिती आली आहे का ? आणि असे असेल तर भारत म्हणून ही स्थिती चिंताजनक वाटते ! व्याजावर जगणारी नोन- प्रोडक्टीव लोकांची अधिकाधिक संख्या म्हणजे समाजावरील वाढ्णारा भार ! शिवाय समाजाच्या पैशाने मिळवलेली स्किल सेट्स वाया जाणार हे ही एक नुकसानच ! आपल्याला काय वाटते ?
  • Log in or register to post comments

१००% सहमत

क्लिंटन
Mon, 01/05/2015 - 10:22 नवीन
व्याजावर जगणारी नोन- प्रोडक्टीव लोकांची अधिकाधिक संख्या म्हणजे समाजावरील वाढ्णारा भार ! शिवाय समाजाच्या पैशाने मिळवलेली स्किल सेट्स वाया जाणार हे ही एक नुकसानच
१००% सहमत आहे.सगळेच व्याजावर जगायचे ही 'महत्वाकांक्षा' बाळगून असतील तर त्या समाजाचे कठिण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

१००% असहमत.

मराठी_माणूस
Mon, 01/05/2015 - 14:08 नवीन
१००% असहमत. लोकांच्या मुलभुत जगण्याच्यी हक्कावर आघात केल्यासारखे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

सुधारणा:जगण्याच्या वाचावे

मराठी_माणूस
Mon, 01/05/2015 - 14:09 नवीन
सुधारणा:
जगण्याच्या
वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

@क्लिंटन

सुबोध खरे
Wed, 01/07/2015 - 13:00 नवीन
@क्लिंटन १०० % सहमत माणूस वयाच्या ५८ किंवा ६० व्या वर्षी एकदम निरुपयोगी होतो हे मुळातच मला अमान्य आहे. अगदी एका बँकेच्या कारकूनाबाबत सुद्धा हे सत्य आहे( आमच्या माहितीतील एका कारकुनाने केलेल्या तक्रारीला उत्तर देताना मी हे म्हटले होते. कोणत्याही कामाला कमी लेखणे हा हेतू नाही) याच माणसाने रडारड केली अहोआम्हाला कोण विचारतो? तीच खर्डेघाशी करीत आयुष्य काढले. मी त्यांना फक्त थोडासा प्रयत्न करण्यास सांगितले. काही काळानंतर हाच माणूस मुथूट फायनान्स मध्ये अधिकारी म्हणून रुजू झाला. मी त्याला विचारले असता तो म्हणाला बँकेत सोन्यावर कर्ज देताना आलेल्या अनुभवाचा फायदा झाला आणि येथे नोकरी मिळाली. नाहीतरी दिवसभर घरी बसून बायकोच्या डोक्याशी कटकट करण्यात काय फायदा आहे? तेवढेच चार पैसे मिळतात आणि थोडी हौस मौज करता येते. ( अर्थात हे माझ्या सांगण्याने झाले असे मी मुळीच म्हणत नाही बहुधा घरी बसण्याचा कंटाळा आल्यामुळे झाले असावे). माझ्या सारखा माणूस ज्याने बारावी नंतर दहा वर्षे शिक्षण घेतले आणि आता २१ वर्षे अनुभव जमा झाला आहे. एके दिवशी मी पूर्ण निवृत्त होणे म्हणजे मिळवलेल्या ज्ञानाचा आणी अनुभवाचा अपव्यय आहे. जेंव्हा माझी आर्थिक गरज संपेल तेंव्हा मी आठ तास मानेवर खडा ठेवून काम करू नये हे ठीक आहे पण नुसतेच काहीही न करणे हा ज्ञानाचा आणी अनुभवाचा शुद्ध अपव्यय आहे. मी ते काम माझ्या सोयीनुसार चार तास विना मोबदला/ मोबाद्ल्यासहित करत राहणे आवश्यक आहे असे माझे म्हणणे आहे. ज्याने अगदी चपराशाची नोकरी केली आहे तो सुद्धा बरेच काही विधायक काम करू शकतो. वीस वर्षे नोकरी करायची आणी तीस वर्षे फुकट बसून खायचे हा शिद्ध अपव्यय आहे जो आपल्या सारख्या विकसनशील राष्ट्राला परवडणारा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

खरे साहेब - आमच्या सारख्या ४

प्रसाद१९७१
Wed, 01/07/2015 - 13:34 नवीन
खरे साहेब - आमच्या सारख्या ४ ते ६ वर्ष इंजिनीरींग शिकलेल्या आणि नंतर आयटी मधे हमाली करणार्‍या माणसांबद्दल काय मत आहे. माझ्या सारख्या सरकारी कॉलेज मधल्या माणसानी तर सरकारचे चांगलेच नुकसान केले आहे. किंवा आयआयटी मधे शिकुन नंतर भिकार कादंबर्‍या पाडणार्‍या किंवा फक्त गुरे हाकणार्‍या माणसांचे काय करायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हा

पैसा
Wed, 01/07/2015 - 14:01 नवीन
याच मुद्द्यावर विरुद्ध बाजूने लिहायला आले होते. बसून खाणे म्हणजे काय? फक्त शारिरीक गरजा पुर्‍या करणे म्हणजे बसून खाणे म्हटले तर ठीक. पण एखादी बाई स्वतःच्या मुलांना नीट खायला प्यायला घालून त्यांच्यासाठी क्वालिटी वेळ देत असेल, एखादा माणूस शेती करायला जात असेल (यात तुमची गुरे वळणे सुद्धा आले), किंवा एखादा माणूस स्वतःच्या कला, छंद यासाठी वेळ देत असेल तर तेही अनुत्पादक समजायचे का? आयायटीत शिकून २० वर्षात आपण समाजाचे देणे फेडले आहे आता स्वतःसाठी जगावे असे कोणाला वाटले तर काही चूक नाही. अनेक नोकर्‍यांमधे खरे स्किल, क्रिएटिव्हिटी यांची अजिबात आवश्यकता नसते. बँकेतले कारकुनापासून ते अगदी जनरल मॅनेजरपर्यंत, काही प्रमाणात शिक्षक, सरकारी नोकर, आयटीवाले लोक वगैरे लोक निव्वळ पाट्या टाकतात. अ च्या जागी ब आला म्हणून काही फरक पडणार नसतो. उलट ५०००० पगार घेणार्‍या कारकुनाबदली १०००० पगार घेणारा नवा कारकून आणि निवृत्त माणसाला २०००० पेन्शन देणे एम्प्लॉयरला नक्कीच परवडते. बरे कंटाळत काम करणार्‍या एका माणसाऐवजी दोन माणसे खूश रहातात. घरात वेळ जात नाही म्हणून बँकेत चकाट्या पिटायला जाणारे लोक कमी पाहिले नाहीत. त्यांना एखाद्या कामाला जितका वेळ लागतो त्याच्या अर्ध्याहून कमी वेळात एखादा एफिशियंट माणूस तेच काम संपवतो. अशां निव्वळ टैमपास करणार्‍यानी घरी बसलेले बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

असहमत

विटेकर
Wed, 01/07/2015 - 15:57 नवीन
काही प्रमाणात असहमत ! १.प्रॉदक्टीव काम म्हणजे मूल्यवर्धन ! केवळ अर्थार्जन हा उद्देश असू नये तसेच केवळ स्वान्त सुखाय ही असो नये. माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत आता मी बसून खाणार , मला हवे तेच करणार किंवा काहीच करणर नाही , आपण कुणाच्या बापाचे देणे लागत नाही ! ही वृती घातक आहे ! अशा वृत्तीमुळे समाजाचे नक्की नुकसान होते . धर्मो रक्षिती रक्षितः ! तेच समाजाचे ही ! तुम्ही समाजासाठी असाल तरच समाज तुमच्यासाठी असेल. २. मुले संभाळणे हे अतिउच्च कोटीचे मूल्यवर्धन आहे. ३. डॉक्टरसाहेब म्हणाले तसे ... अगदी मानेवर खडा ठेऊन आठ तास काम करण्याची आवश्यकता नाही , कदाचित ४ तास/२ तास , आपली शरीर प्रकृती साथ देईल इतपत करावे पण मूल्यवर्धन होईल असे कोणते तरी काम करावे. असुदे अन्न सेवू नये वडिलांचे ही ! ४. आप्ले शिक्षण सोडून अन्य काम करुच नये हे चुकीचे आहे. आय आय टी मधून बाहेर पडल्यावर कादंबरी लिहून समाजाची साहित्यिक/ सांस्कृतिक अभिवृद्धीमध्ये भर घालणे हे मूल्यवर्धनच ! ५. कोणीही मनुष्य समाजाच्या कामासाठी निरुपयोगी नाही... प्रत्येकाला सोयीचे आणि करता येण्याजोगे काम समाजात असते. नाक्षरं मंत्ररहीतं नमूलंनौषधिम् | अयोग्य पुरुषं नास्ति योजकस्तत्रदुर्लभ : | |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आयायटीत शिकून २० वर्षात आपण

आदूबाळ
Wed, 01/07/2015 - 16:16 नवीन
आयायटीत शिकून २० वर्षात आपण समाजाचे देणे फेडले आहे आता स्वतःसाठी जगावे असे कोणाला वाटले तर काही चूक नाही.
समाजाचं देणं? ते कसं मोजायचं ब्वा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

रफली विचार करा

पैसा
Fri, 01/09/2015 - 10:55 नवीन
एका मुलाला आयायटीत शिकवायला सरकारला किती खर्च येतो. आणि त्या शिक्षणाचा उपयोग तो कसा करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

पैसा ताई

सुबोध खरे
Fri, 01/09/2015 - 10:13 नवीन
पैसा ताई अगदी सरकारी खात्यात कारकून असेल तरी तो एखाद्या समाजसेवी संस्थेचे हिशेब लिहिण्यासाठी आपले दोन तास देऊ शकेल मग त्यात तो पैसा घेऊ शकेल किंवा सेवा म्हणून निःशुल्क काम करू शकेल. सकाळी लवकर उठून बायकोला कटकट करायची. वरिष्ठ नागरिकांबरोबर प्रभातफेरी मध्ये नवी पिढी कशी वाया चालली आहे आणि एकंदर सगळे कसे कठीण होत आहे यावर चर्चा करीत रहायचे, अथ पासून इति पर्यंत वर्तमान पत्र वाचायचे नंतर २५ रुपयाच्या व्याजाची एन्ट्री मिळवण्यासाठी बँकेत जाऊन इतर लोकांचा खोळंबा करायचा किंवा पेन्शन जमा झाले कि नाही याचा एक तारखेपासून बँकेत धोशा लावायचा.पाव टक्का जास्त व्याज मिळते म्हणून जवळच्या बँकेतून पैसे लांबच्या बँकेत भरायचे. दुपारी झोप येत नाही मग घरच्यांवर आणि बायकोवर चिडचिड करायची. आठवड्यात एखादे नाटक पहायचे बाकीचे दिवस फुकट असतील ते सर्व कार्यक्रमाला हजेरी लावायची. संध्याकाळी परत मित्रांबरोबर चकाट्या पिटायच्या आणि रात्री परत किरकिर करायची. यापेक्षा आपण काहीतरी सृजनशील काम करावे नुसते निवृत्त झालो म्हणून काहीच करायचे नाही हे बरोबर नाही. आपल्याला गायनाचा छंद असेल (किंवा चित्रकलेचा छंद) तरी आपण फार तर एक तास घालवू शकाल. आपण मल्लिकार्जुन मन्सूर नव्हे कि त्यात आपले आठ तास जातील. समाजसेवा करतो हे म्हणणे सोपे आहे त्यासाठी आपला पिंड तसा असावा लागतो. सरकारी कारकुनी करणार्याचा पिंड अशाकाही मुशीतून घडतो कि बायकोने वाण्याकडून साधी लसुण घेऊन या सांगितले तरी ते माझे काम नाही या विचाराने यांच्या कपाळावर आठ्या पडतात मग समाजसेवा तर लांबच राहिली. उत्पादक काम म्हणजे त्यातून पैसेच मिळाले पाहिजेत असे नाही. कारकूनसुद्धा जर एखाद्या संस्थेचा जमाखर्च व्यवस्थित करून देत असेल तर त्याचा नक्कीच उपयोग आहे. माझ्या पुरते बोलायचे झाले तर मला डॉक्टरी शिवाय दुसरे काहीच येत नाही. उगाच गाणी ऐकेन फोटोग्राफी करेन वगैरे गोष्टी काही २ तासांच्या वर करता येतील असे वाटत नाही. मग पैश्याची गरज संपेल तेंव्हा कोणत्याही धर्मादायी रुग्णालयात फुकट काम करता येईल किंवा वैद्यकीय विद्यार्थ्यांना फुकट शिकवता येईल. समाजसेवा हा आपला पिंड नाही. बाबा किंवा प्रकाश आमटे यांसारखी माणसे फार थोर आहेत त्यांच्या चपलेशी सुद्धा बसण्याची आमची लायकी नाही हे जाणून आहे. पण पूर्ण निवृत्त होऊन हात पाय चालत असताना काहीच न करणे हा राष्ट्राच्या साधन संपत्तीचा अपव्यय आहे असे मी समजतो.राम नाही पण वानरसेनेतील एक वानर किंवा खार तरी होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

क्या बात है... सही रे सही

अर्धवटराव
Fri, 01/09/2015 - 10:49 नवीन
राम नाही पण वानरसेनेतील एक वानर किंवा खार तरी होऊ शकतो.
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एग्झॅक्टली!

पैसा
Fri, 01/09/2015 - 10:52 नवीन
हेच म्हटले मी! प्रसाद यांच्या प्रतिक्रियेत लिखाण, किंवा गुरे सांभाळणे याबद्दल हेटाळणीचा सूर दिसला म्हणून मुद्दाम विचारले की घरी बसणे म्हणजे नेमके काय अभिप्रेत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी स्पेसिफिक होतो पैसा ताई.

प्रसाद१९७१
Mon, 01/12/2015 - 12:43 नवीन
मी स्पेसिफिक होतो पैसा ताई. -आयाआय्टी सारखे शिक्षण घेउन गुरे ( म्हणजे ऑफिसमधली माणसे ) राखणे म्हणजे त्या शिक्षणाचा उपयोग न करणे असे नाही का? डॉक्टर साहेबांच्या उदा मधला कारकुन , कारकुनाचीच कामे करत होता. पण इंजिनीयरींग करुन मग आयटी मधे हमाली करणे हा त्या शिक्षणाचा उपयोग करणे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अगदी मस्त! हेच म्हणते........

रेवती
Sun, 01/11/2015 - 03:57 नवीन
अगदी मस्त! हेच म्हणते..........म्हणजे इथे मिपावर म्हणते. प्रत्यक्ष त्या त्या माणसांना जाऊन म्हटले तर काय होईल हा विचार केलेला बरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

राम नाही पण वानरसेनेतील एक

प्रसाद१९७१
Mon, 01/12/2015 - 12:45 नवीन
राम नाही पण वानरसेनेतील एक वानर किंवा खार तरी होऊ शकतो.
खारीनी खार झाले तर अपव्यय नाही पण रामानेच खार व्हायचे ठरवले तर नक्कीच अपव्यय आहे. माझे उदाहरण ह्या बाजूने बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा