मागे इथे गेलो होतो तेव्हाचे फोटो मिळाले तर चिकटवतो.
मी पूर्ण किल्ल्यासाठी वाटाड्या केला नव्हता, फक्त अंधेरीसाठी, त्यामुळे बर्याच ठिकाणी कुतूहल वाटले पण कोणाला काही विचारता आले नाही. तुमचा हा लेख त्यामुळे खूपच पथ्यावर पडला!
लहानपणी इथे गेलो होतो. मार्गदर्शक घेतला होता. इथला भुलभलैय्या मला चांगलाच लक्षात आहे. इतका निबीड अंधार.. तेल ओतण्याच्या जागा.. एका ठीकाणी असलेला एकदम कमी उंचीचा दरवाजा ज्यामुळे मान झुकवून आत यावे लागेल आणि झुकवली मान की उडव मुंडकं.. वगैरे रचना.. हा किल्ला इतके वर्ष अभेद्य कसा राहिला याची साक्ष जागोजाग पटते!!
बाकी लेख उत्तम!
डॉक्टरसाहेब, किल्ल्याचे वर्णन, तुमची शैली आणि छायाचित्रे आवडली. लेख माहितीपूर्ण आणि ओघवता आहे.
>>> खरे तर अनेकदा हा किल्ला चढलोय पण, वयपरत्वे जाणीवाही बदलत जातात असे म्हणतात
- हे वाक्य विशेष आवडले.
आपल्या कीबोर्डमधून उतरलेले [:)] आणखी असेच लेख येथे वाचायला आवडतील.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
अवांतर -- या लेखावरील प्रतिक्रिया पानाच्या मधोमध (सेंट्रली अलाईन्ड) का दिसत आहेत?
आपल्या औरंगाबादेत अजुनही बरेच काही आहे ज्यावर बिरुटेसाहेब भरपुर लिहितील. सुंदर अन सचित्र लेख. आवडला. तुम्ही ज्याला दरी म्हटले आहे त्याला खंदक असे म्हटले जाते. भारतमातेच्या मंदिरात संघाचे अजुनही शिबिरे होतात, अन आम्ही त्याला आवर्जुन हजेरी लावयचो. हत्ती हौदाजवळच्या झाडीत अजुनही मोर आहेत. वडिलांबरोबर कित्येकदा किल्ला चढलो आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.
वा वा प्राध्यापक साहेब,
अप्रतिम लेख. सोबत अप्रतिम छायाचित्रे. क्या बात है !!
खूप आनंद वाटला आपला लेख वाचून. छायाचित्रांमुळे देवगिरीला जाऊन आल्याचे समाधान मिळाले.
आपला,
(हर्षभरित) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
संपादक मंडळास विनंती,
अशा स्वरूपाचे लेख नेहमीच्या लेखमालेव्यतिरिक्त एखाद्या वेगळ्या कप्प्यात साठवून मुख्यपृष्ठावर ठेवता आले तर काही कालावधीनंतरही ते सहजतेने उपलब्ध होऊ शकतील.
नाहीतर होतं काय की नवीन लेखन आल्यावर जुने लेखन मागे मागे जातं, आणि पुन्हा वाचायचा असल्यास किंवा कोणाला लिंक द्यायची असल्यास फार शोधाशोध करावी लागते.
महाराष्ट्रातील किल्ले, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे अशा स्वरूपाचे कप्पे मुख्यपृष्ठावर उपलब्ध झाल्यास फार बरे होईल असे वाटते.
अर्थात ही एक सुचवण आहे.
आपला,
(पर्यायसूचक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
दोन वेळा दौलताबादचा किल्ला पाहिला आहे. लेख अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण आहे. सर्व चित्र नजरेसमोर उभे राहिले. अताथो दुर्गजिज्ञासा या घाणेकरांच्या पुस्तकात या किल्ल्यावर सविस्तर भाष्य केलेले आहे. वेळ मिळाल्यास त्यातील काही गोष्टी मी इथे देतो. त्यात किल्ल्याच्या मागच्या बाजूला अजिबात तटबंदी नसल्याचा उल्लेख आहे. कदाचित तिकडे डोंगर असल्याने असे असावे.
गोवळकोंडा आणि दौलताबादचा किल्ला थोडेफार सारखे वाटतात. का कुणास ठाऊक. बारादरी सारखी गोवळकोंड्यलाही एक इमारत आहे. मात्र दौलताबाद बराच उंच आहे.
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
बरेच दिवसांत प्रा डॉ चा लेख दिसला नाही. >>>
झाल तुझं बोलुन ??
आम्ही गेले सहा महिने विनंती करतोय .....आता पुढल्ल्या औरंगाबाद भेटीत गगांपुरातून , नाहीतर मिलींद कालिजातुन उचलुन आणतो ( ख्यातीप्रमाण !! ) ;)
(अवांतर : हाच तो मटामधील लेख जेथुन आम्ही आंजावर आलो :) )
उत्तम आणि तपशीलवार लिखाण.
देवगिरी किल्ला यादवांनी बांधला असे सर्रास म्हटले जाते तरी तो त्यापेक्षाही खूप जुना-राष्ट्रकूटकालीन असावा. ८ व्या शतकाच्या आसपासचा.
वेरूळच्या अद्वितीय कैलास मंदिराची बांधणी देवगिरीवरच्या समर्थ शासनाशिवाय शक्य नाही. निदान मुख्य किल्ल्याच्या खंदकाचे, भुयारी बोगद्यांचे काम तर नक्कीच राष्ट्रकूटकालीन असावे. इतर तटबंद्यांचा साज नंतरच्या काळात बांधला गेला असावा.
देवगिरी किल्ला यादवांनी बांधला असे सर्रास म्हटले जाते तरी तो त्यापेक्षाही खूप जुना-राष्ट्रकूटकालीन असावा. ८ व्या शतकाच्या आसपासचा.
अगदी बरोबर. राष्ट्रकूट राजा श्रीवल्लभ याने या दुर्गाची उभारणी इसवीसनाच्या आठव्या शतकात केली. पुढे यादव कुळातील वल्लभ यादवाने या बलाढ्य दुर्गाच्या साह्याने आपली राजवट सुरु केली.
एक आख्यायिका : एकेकाळी अदिमाया पार्वती अन भगवान शंकर याच परिसरात सारीपाट खेळायला बसले. त्या डावात पार्वती जिंकली ( एक असं शिल्प वेरुळच्या लेणीत आहे. सवडीनं डकवतो) पण संसाराचा डाव उधळून शंकर वेरुळच्या अरण्यात निघून गेले. देवी पार्वतीनं भिल्लीणीचं रुप घेतलं आणि तीही त्याच अरण्यात वास्तव्यास गेली. शंकर आणि भिल्लीण यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. कोणाचा (डिष्टर्ब ) संपर्क नको म्हणून सर्व देवांना वेरुळच्या डोंगरावर येण्यास शंकरांनी बंदी घातली पण शंकराच्या सहवासाला आतूर झालेली ही देवमंडळी तिथून जवळच असलेल्या डोंगरावर राहावयास आली, तो हाच डोंगर देवगिरी.
-दिलीप बिरुटे
उत्खननात वर आल्यामुळे राहून गेलेला लेख वाचायला मिळाला.
चांगली माहिती.
एकनाथांचे गुरु जनार्दन येथिल किल्लेदार होते ही माहिती नव्यानेच समजली. गुरु जनार्दन सोळाव्या शतकातील तर किल्ला खिलजीने जिंकला तेराव्या शतकातच. म्हणजे ते खिलजीचे (की मोगलांचे?) किल्लेदार होते तर!
प्रतिक्रिया
महीतीपुर्ण
वा
अप्रतिम लेख..
छान छायाचित्रे
छान सचित्र लेख
भुलभलैय्या!
वाहवा!! फत्ते !!
मस्त
सुंदर लेख आणि छायाचित्रही!
उत्तम
वा वा
संपादक मंडळास विनंती
हेच म्हणतो
लेख आवडला
वा!!!!
छान
आभार !!!
सुरेख लेख
सुरेख आणि वाचनीय.
अभिनंदन
बरेच दिवसांत प्रा डॉ चा लेख
बरेच दिवसांत प्रा डॉ चा लेख
आणा आणानाही ऐकले तर गोळी
उत्तम आणि तपशीलवार
देवगिरी किल्ला यादवांनी
मस्त
छान
मोगलांचे नसावेत...
मस्त हो प्रा डॉ