मोडकराव,
अनुभव चांगला लिहिता आहांत तुम्ही. पावसाचा आणि पाण्याचा प्रश्न ही एक भेसूर समस्या आहेच. तुमच्या अनुभवाबद्दल आम्ही अनादर मुळीच दाखवित नाही.
परंतू, एकदा म्हणता,
गेल्या काही दिवसांपासून पाऊस या भागात बरसलेलाच नाही.
आणि एकदा म्हणता,
पावसानं चिखलमय केलेल्या पायवाटेवर अनेक फुलांची उधळण निसर्गानंच करून ठेवलेली.
म्हनजे दुष्काळ आनि पावसानं चिखलमय केलेली वाट एकदम एकाच वेळी?
काय वाचकांच्या मेंदूचा भुगा करायचं ठरवलंय काय राव?
एक काय ते निश्चित करा ना...
:)
माझी वाक्ये...
गेल्या काही दिवसांपासून पाऊस या भागात बरसलेलाच नाही. जो काही झाला तो अगदी माती भिजवण्यापुरताच.
बरसणं आणि माती भिजवण्यापुरता पाऊस होणं यातला फरक या दोन सलग वाक्यात पुरेसा व्यक्त झालेला आहे. अगदी थोड्याशा शिडकाव्यानंतरही खडकाळ भागात पायवाटेवर येऊन साचलेल्या पाण्याने चिखल होतो हा माझा अनुभव आहे.
बरसणं आणि माती भिजवण्यापुरता पाऊस होणं यातला फरक या दोन सलग वाक्यात पुरेसा व्यक्त झालेला आहे. अगदी थोड्याशा शिडकाव्यानंतरही खडकाळ भागात पायवाटेवर येऊन साचलेल्या पाण्याने चिखल होतो हा माझा अनुभव आहे.
मग असेल बुवा! आता तुमचा अनुभव आहे म्हटल्यानंतर मग काय!
तरी स्पष्टीकरण देऊन आमच्या मनातला गोंधळ दूर केल्याबद्दल आभार!
पाऊस बरसणे आणि रिमझिमणे यांत फरक आहे.
या भागात पाऊस रिमझिमल्याने अधूनमधून थोडिशी हिरवळ आहे पण शेतीभाती आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्याइतका बरसणारा पाऊस अद्यापि झाला नव्हता.
साती
प्रतिक्रिया
पाण्याचा प्रश्न
बरसणं...
बरसणं आणि
बरसणे आणि रिमझिमणे