तुमच्या या लेखन मालिकेतील पहीला भाग अगदी आम्ही संगणक अभियंता असूनही भूसापेक्ष स्थीर उपग्रहाप्रमाणे डोक्यावरून छत्तीस हजार किलोमीटर उंचावरून गेला....
पण दुसरा आणि तिसरा भाग खूप छान लिहिले आहेत तुम्ही...
खूप वाईट वाटतं अशा भूक्कड दूरदर्शन मालिका जेव्हा आमची लोकं डोळे फाडफाडून पाहतात... का त्याना कळत नाही की समोरं त्या टी व्ही नावाच्या खोक्यात जे काही चालू आहे ते सगळं आभासी आणि फसवं आहे.... अशा मालिका बनवणं हा काही लोकांचा धंदा आहे हे आपण समजू शकतो... पण पाहणा~यांचं काय... का ते आपली डोकी गहाण ठेवतात....
मला एक प्रसंग मागे घडलेला प्रसंग आठवतो.... मी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो... मी आतल्या खोलीत आराम करत होतो... बाहेरच्या खोलीमध्ये वहीनी कुठली तरी मालिका पाहत होत्या. अचानक वहीनी 'अरेरे' म्हणत विव्हळू लागल्या. मी धास्तावून काय झालं हे पाहण्यासाठी बाहेरच्या खोलीत आलो तर कळलं की वहीनी जी मालिका पाहत होत्या त्या मालिकेची नायिका रीक्षाची ठोकर लागून पडली होती...
मी मित्राच्या घरी असल्यामुळे मला डोक्यावर हात मारुन नाही घेता आला पण मनातल्या मनात त्या वहीनीना नमस्कार मात्र जरूर घातला...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
"बेचैन नायक एकटाच घरात येरझार्या घालत आहे. पाणी घालून येरझार्या वाढवाव्या. दारावरची बेल वाजते. दारापुढून घेतलेला नायकाच्या आश्चर्यचकीत चेहेरा. नायक म्हणतो... "तूम!!..." एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर दार उघडल्यावर समोर दिसतो पोस्टमन. तो पत्र देउन निघून जातो.)
रात्रीची वेळ. नायीका घरात एकटी. भीतीदायक म्युझीक मधे वेळ काढावा. खिडक्यांचे पद्डदे उडत आहेत. नायीका बेडरूमच्या कपाटाचे दार उघडते. एक किंचाळी फ़ोडते. ... ब्रेक. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर कपाट उघडल्यावर समोर दिसते एक झुरळ.)
खलनायकाने नायकाचा खून केलेला दाखवायचे. .... एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरू होताच नायक झोपेतून उठतो. "कैसा ये भयानक सपना...."
पुर्वी झी टि.व्ही. नविन असताना एक 'तारा' नावाची सिरीयल लागायची त्यात अक्षरश: हेच व्हायच. ती कधी संपली ते त्या ताराला नवनीत निशानलाही माहीत नसेल.
सोप ची कथा साबणावर घरसत नेण्याचा मान 'जुनून' नावाच्या भयाकारी सिरीयला जातो.
त्याच्याच पुढे पाउल टाकून तेरा पती सिर्फ मेरा है करण्याचा मान 'स्वाभिमान'ला द्यावा लागेल . या सिरीयलचा शेवट पाहील्याच सांगणारे काही खोटारडे या जगात आहेत.
यात अजुन एका सिरीयलचा उल्लेख करावा लागेल 'चन्द्रकांता' एक राजकुमारी आणि एक राजकुमार यांची परीकथा पण किती खेचावी. त्या दोघांशी काहीही संबध नसलेली क्रुत्तिका देसाई तिन रोल करून पैसा कमवून गेली.
प्रतिक्रिया
खरं आहे तुमचं...
अजुन एक गोष्ट...
झकास निरिक्षण..
सही!!!!!!!!!!!
यक्कू.
decode please
यक्कु पिताजी :)