च्यामारी काय काय दिव्य केलित रे भो ! लै भारी !
संत्या लटकला तेव्हा खतरनाक भिती वाटली असेल नै.
आमचा एक ओळखीचा असाच आमच्या मराठवाड्यातल्या म्हैसमाळच्या डोंगरावरच्या दरीत कोसळुन गेला होता, पोरासोरांच्या हाती रडणे सोडुन काही लागलेच नव्हते, पोलिसांना पण बॉडी २ दिवसांनी मिळाली होती. :( . थँक गॉड फॉर संत्या.
वा ! वा !
धमु... तु व तुझे मित्र तर सेम आहात रे :) पुढील वेळी आम्हाला ही बोलवा !
बाकी रिस्क मोठीच घेतली होती तुम्ही लोकांनी !
लेखन देखील मस्त झाले आहे !
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
त्या बोगद्यातून येणारा सुर्यप्रकाश एकदम स्टेजावर उभ्या असलेल्या खास कलाकारावर टाकलेल्या स्पॉटलाईटप्रमाणे दरीतल्या भातखाचरांवर पडला होता. बाकीचं झाकोळून आलेलं आसमंत, एकाच ढगाच्या रुपेरी कडा, आणि हिरव्यागार दरीतल्या पोपटी भासणार्या भात-खाचरांचा ऊन्हाने न्हाऊन बदललेला सोनेरी अवतार. ऊन्हाच्या काही चुकार तिरिपी इकडे तिकडे सांडलेल्या, नुकत्याच स्वच्छ धुवुन काढलेल्या हिरव्या-पोपटी पानांवरती रेंगाळलेले टपोरे थेंब चमकवत ह्या सगळ्या निसर्ग-खेळाची शोभा वाढवत होत्या.
ढाक्या.. काय मस्त दिसत असेल रे ते दृश्य!
"गुमनाम है कोई...बदनाम है कोई..."
ही हा हा.. अमल्याने सहीच टाकला!
अजुन एक सिगारेटचं पाकिट
आम्ही सिगरेटच्या थोटकांची मातीत भाल्यासारखी रोऊन काढलेली रांगोळी
वा वा
खिचडी खाऊन वर चहा पिऊन जी काही ताणून दिली,
रात्री १२-१ वाजता खिचडी खायला अन् चहा प्यायला काय मज्जा आली असेल!
घरी पोहोचलो तर ५ मिनिटं मला कोणी आत घ्यायलाच तयार नाही... पॅन्टवर शेवाळं लागलेलं, ओल्या कपड्यांच्या कुबट वास, हाता-तोंडाला अजुनही कुठेकुठे माती राहिलेली, चेहर्यावर प्रचंड थकवा.....
पण डोळ्यात समाधान होतं, काहीतरी आव्हान पेलून ते पुर्ण केल्याचं. थकलेल्या चेहर्यावर लढाई जिंकुन आलेल्या मावळ्यासारखा गर्व होता, आणि जिवंत परत आलो ह्या समाधानामुळे डोळ्यात पाणीही
उतरतानाचा प्रवास लयीच थ्रिलींग.. ढाक्या मस्तच अनुभव.. खूपच आवडला आणि ३ भाग ते पण लवकर टाकण्यात यश आल्याबद्दल अभिनंदन!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
कौतुक माझे नाही तर महागुरुंचे करा!
:)
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
तुफान लिहलयं रावं!
"गुमनाम है कोई...बदनाम है कोई..." आधीच जंगल, त्यात अंधार, त्यात टरकलेली ! हे लेकाचं सरळपणानं कधी काही करतच नाही
सही रे (बरी गाणि सुचतात अशावेळी)
"ए...मी नाय काय केलं हां...हे कमळ्या आपोआपच सांडतंय सारखं"
मस्तचं भाउ मित्रांमधली खास पुणेरी प्रतिक्रीया
पण डोळ्यात समाधान होतं, काहीतरी आव्हान पेलून ते पुर्ण केल्याचं. थकलेल्या चेहर्यावर लढाई जिंकुन आलेल्या मावळ्यासारखा गर्व होता, आणि जिवंत परत आलो ह्या समाधानामुळे डोळ्यात पाणीही
भडकमकर क्लास लावलेस वाटतं =))
ट्रेक मात्र सही... होता आणि लिहलायसंपण मस्तं आवडला
(ट्रेकप्रेमी) शेर्पा चेतन (अगदी तात्यांच्य इश्टाईलमध्ये)
भलामोठा काळपट ढग सुर्याला आपल्या मागं दडवण्याचा प्रयत्न करत होता.
झाकोळून आलेलं आसमंत, एकाच ढगाच्या रुपेरी कडा, आणि हिरव्यागार दरीतल्या पोपटी भासणार्या भात-खाचरांचा ऊन्हाने न्हाऊन बदललेला सोनेरी अवतार. ऊन्हाच्या काही चुकार तिरिपी इकडे तिकडे सांडलेल्या, नुकत्याच स्वच्छ धुवुन काढलेल्या हिरव्या-पोपटी पानांवरती रेंगाळलेले टपोरे थेंब चमकवत ह्या सगळ्या निसर्ग-खेळाची शोभा वाढवत होत्या.
हळुहळु हा सोनेरी-रुपेरी रंग कधी तांबूस होत गेला आणि त्यात अंधाराचं काजळ कधी मिसळत गेलं हे कळलंच नाही.
अंधारानं चांगलेच हातपाय पसरलेले.
सावल्या आणि उंच गवताने निर्माण केलेला दिशाभ्रम
ढाक बहिरीतल्या वरील शब्दरचनांनी आम्हाला भुरळ घातली आणि आपला प्रवास आम्ही अनुभवत गेलो.
अमल्याचं "गुमनाम है कोई...बदनाम है कोई..." वातावरणातील गूढता वाढवते. संत्याचं लटकणे, परतीचा मार्ग सापडत नसल्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता.
आणि लढाई जिंकलेल्या मावळ्याचा चेहरा तरळून गेला.
अप्रतिम वर्णनाचे अनुभव लेखन आवडले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धमु मस्तच लिहिले आहेस. तिन्ही भाग वाचले. अतिशय सुंदर शब्दात केलेले वर्णन चित्रमय झालेय. डोळ्यासमोर जीवंत चित्र उभे करण्याचे सामर्थ्य तुझ्या शब्दात आहे.
शेवटचा भाग तर अगदी खासच आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारे आणि रोम रोम फुलवणारे वर्णन ... खरे तर वर्णन कसले ते, तुझ्या बरोबर सहप्रवासी आहोत असे वाटण्याइतपत ... त्रिमिती चित्रपटासारखे, साक्षात अंगावर येणारा अनुभव.
जाऊ दे ! खरे तर नि:शब्द झालोय!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
धन्यवाद मंडळी...
माझं हे वेडंवाकडं काहीबाही लिहिलेलं गोड मानून घेतलंत, कौतुक केलंत, आवडलंही तुम्हाला...बस्स, आणखी काय हवं आपल्याला?
शरुबाबा, चकव्याचा किस्सा आम्हालापण सांग ना :)
धमु मस्तच लिहिले आहेस. तिन्ही भाग वाचले. अतिशय सुंदर शब्दात केलेले वर्णन चित्रमय झालेय. डोळ्यासमोर जीवंत चित्र उभे करण्याचे सामर्थ्य तुझ्या शब्दात आहे.
शेवटचा भाग तर अगदी खासच आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारे आणि रोम रोम फुलवणारे वर्णन ... खरे तर वर्णन कसले ते, तुझ्या बरोबर सहप्रवासी आहोत असे वाटण्याइतपत ... त्रिमिती चित्रपटासारखे, साक्षात अंगावर येणारा अनुभव.
जाऊ दे ! खरे तर नि:शब्द झालोय!
बास...बास....बास......
साक्षात गुरुदेवांनी ही अशी पावती द्यावी ह्याहुन मोठं काय बक्षीस असावं आमच्यासाठी? ह्याचसाठी केला होता अट्टाहास...लेखाचा शेवट गोड व्हावा :)
गुरुदेव, आमचा हा अनुभव तुमच्या चरणि अर्पण !!!!
एकदम सह्ही मी ह्या विकांताला छोट्याश्या ट्रेक ला जाउन आले तर रविवारचा अख्खा सोमवार दमलेय म्हणून बसले होते..कसं केलत रे एवढं तुम्ही मानलं बॉ तुम्हाला...
लिहिलयस खूप मस्त असं वाटलं आम्ही पण चालतोय एक बॅटरी घेऊन तुमच्या बरोबर.....
इतक्या ओघवत्या भाषेत ट्रेक लिहिलयस की बस!
प्रकाशचित्रे चुकल्याची रुखरुख वाट्ली पण तुझ्या वर्णनाने काही अंशी तरी सूर्यास्त डोळ्यांसमोर उभा केला!
एकदम मस्त.
(स्वगत - ह्याच्या वर्णनातली काही वाक्यं खात्रीच देतात की अजूनही हा धमाल्या सु.शि. ची पारायणे करत असणार! ;) )
चतुरंग
तो चित्रपट पाहिल्यासारखे वाटले.
वाचतांनाच जी एफ झाली. तुझ्य निधड्या छातीला व रसाळ ओघवत्या वर्णनाला त्रिवार वंदन.
आम्ही आयुष्यात एवढे साहस केले नाही. तरी संत्या व कमळ्या तुमच्याबरोबर कसे हे कोडेच आहे.
पण पुढला ट्रेक जरा ऑर्गनाइज्ड असू देत. पोटोबाची आबाळ करू नका.
तरी एक प्रश्न राहिलाच. शिध्यातील ब्रँड कोणता होता?
सुधीर कांदळकर.
धमाल्या , जियो मेरे यार. एकदम थरारक अनुभव. धाडसी ट्रेक केला तुम्ही राव.
आणि लेखाबद्द्ल तर काय लिहावे? अप्रतिम. डोळ्यासमोर प्रत्येक प्रसंग उभा राहतोय. प्रत्यक्षात जो अनुभव जगलास तो हुबेहुब लेखात उतरवलास. अनुभव जबरा असला तरी कथा रंगवून सांगायची हातोटी सगळ्यांकडेच असते असे नाही. तू तर ते काम ही झकास केलंस.
आणि ते ढग आणि सुर्याचे वर्णन ... वा वा क्या बात है ! खल्लास.
-- पक्या
धमाल्या जबरा अनुभव आहे बाबा तुझा. आमालाबी असं दर्याखोर्यातुन भटाकायला एके काळी लै आवडायचं पण "एक प्रकरण" लै महागत पडल्याने आम्ही कानाला खडा लावला ...
हे सर्व वाचायला मजा येते पण हे सर्व अनुभवताना किती लागते व किती नशा चढते ते फक्त करणारे जाणतात ...
असो. तुझ्या नजरेने माझी पण "ढाकचा बहिरी" ची सफर पुर्ण झाली ...
सुर्यास्ताचे वर्णन केवळ "झ...का...स !!!"
मस्त वातते रे दिवसभर पायपीट केल्यावर एखाद्या खोपच्यात पार आडवे पडून सुर्यास्त बघण्यात. फोटॉ नाही टाकलास, पण त्यात तुझी चुक नाही, ती वेळच अशी असते की कशाकशाचे भान रहात नाही मग फोटो काढणे तर दुरच ....
जेवढे आपल्या चिमुकल्या डोळ्याने बघता येते तेवढे नजरेत साठवुन घ्यायचे, फोटो वगैरे सर्व फॉर्मालिटी झाल्या ...
बाकी तुमची टीम झकास होती . बहुतेक सर्व "गँग" मध्ये तु वर्णन केलेल्या व्यक्ती सापडतातच ....
त्याशिवाय मज्जा पण येत नाही म्हणा ...
"कॅम्प फायर" केल्याशिवाय ह्या व्रताची सांगता होत नाही, मस्त "शेकोटी" पेटवायची मग त्या उबेत व प्रकाशात गाणी म्हणा, गप्पा ठोका किंवा इतर काही "असात्विक कार्यक्रम" केल्याशिवाय "ट्रेकिंग" पुर्ण होते असे मी मानत नाही ...
ट्रेक ऑर्गनाईज असणे वगैरे मी मानत नाही, त्यात मजा नाहीच !!!
मस्त .... अजुन असतील तर टाक [ आम्ही आपलं सगळ्यात शेवटी प्रतिक्रीया देतोच ...]
अवांतर : सवडीने आम्ही पण "आमच्या माथेरान डोंगराच्या चढणीची कथा" टाकूच ...
अतिअवांतर : च्यायला अपली एक अशी मस्त गँग काढून कुठेतरी जायला पाहिजे. लै धमाल येईल ...
विजूभाऊम्च्या डोक्यात आहेत थोडे प्लॅन, बघू काय होतेय ते !!!
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
(स्वगत - ह्याच्या वर्णनातली काही वाक्यं खात्रीच देतात की अजूनही हा धमाल्या सु.शि. ची पारायणे करत असणार! )
खर्रं की काय? कुठली वाक्य हो? सांगा ना, सांगा ना! आमच्या सु.शि. ची छाप आहे म्हणता ह्यातल्या वाक्यांवर? लै भारी!
कित्ती वर्षं झाली बरं सु.शि. वाचायलाच नाही मिळाला :( परत एकदा पुस्तकांचं कपाट उचकायला हवं बॉ!
सुधीरकाका,
तरी एक प्रश्न राहिलाच. शिध्यातील ब्रँड कोणता होता?
आमचा एक नियम आहे. कोणत्याही गड-किल्ल्यावर जाताना / खुद्द तिथे दारु नेणे / पिणे नाही. ह्यामागे २ कारणे आहेत. एक म्हणजे भावनिक...महाराजांच्या गडा-किल्ल्यांवर सह्याद्रीच्या कुशीत कित्येक मावळ्यांनी जीवाची कुरवंडी केली राखणीपायी..तिथे जाऊन दारु प्यायची? थुत् तिच्यामायला त्या पिण्यार्यांच्या!
दुसरं कारण म्हणजे दारु पिऊन झिंगल्यावर तोल सांभाळणे अवघड होऊन बसल्यावर नसते जीवाचे खेळ होऊन बसतात्..ते टाळण्यासाठी! :)
संत्या आणि कमळ्या खरंच आमच्या कंपूत मिसाळलेच कसे हे कोडं अजुनही सुटलेलं नाही. पण बरं होतं ते होते ते...आमच्या आचरटपणाला थोडासा शहाणपणाचा लगाम घालायचे बिचारे :)
डान्या...
लेका नुसतेच संदर्भ काय देतोस? लिही की मेल्या...'ते प्रकरण' वर काहीतरी!
- (ढाक्या) ध मा ल.
हा भाग वाचायचा राहुनच गेला होता बघ.
जबरदस्त लिहिल आहेस रे.
सुर्यास्ताच वर्णन खल्लास.
कित्येक वाक्य वाचुन गडबडा लोळेपर्यंत हसलो रे. :)
तुझी लिखाणाची शैली छान आहे रे.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
प्रतिक्रिया देण्य़ास उशीर झाल्या बद्दल दिलगिर आहोत.
धमाल राव आपला लेख वाचून धमाल आली.जबरदस्त लिहिले आहेस.
सुंदर लेखन.अभिनंदन.
बाकी आपल्या फ़ोटोग्राफ़सवरून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
विशेषत: कोंडेश्वराचे मंदिर पाहून.........
आपल्यासारखाच ढाक बहिरी ट्रेक करायला आम्ही काही पोरे पोरे ९५च्या उन्हाळ्य़ात गेलो होतो.
नुसताच ढाक नको म्हणून राजमाची-ढाक असे करायचे ठरले.
पहिल्या रात्री लोणावळ्यातून सुरुवात करुन पहाटे राजमाचीला पोहोचलो.
तिथे एक दिवस मुक्काम करून दुस-या दिवशी दुपारी ढाक कडे प्रयाण केले.त्यातच आमच्यात २-३ नवखे होते
त्यांना हे काही झेपेल असे वाटले नाही.त्यांनी राजमाचीवरुनच परतीची वाट पकडलि.
राहीलो आम्ही ४ जणच. रमतगमत वाटचाल करत,वाट शोधत,चुकामुक वगैरे सर्व होऊन कोंडेश्वराच्या मंदिरात पोहोचयला बराच उशीर म्हणजे साधारण संध्याकाळचे सात वाजले
असावेत. ब-यापैकी अंधार पडला होता.मंदिरात पोहोचता पोहोचता वाटेत संघाच्या मुलांचा एक ग्रुप भेटला.
त्यातल्या दोघा तिघांनी इथे एक वाघ फ़िरतोय,कालच रात्री इथे एक गाय मारलीय ,तुम्ही चोघेच आहात,तेंव्हा काळजी घ्या वगैरे सांगून
आमची पार तंतरून टाकली.आता वाघ वगैरे फ़िरतोय म्हंटल्यावर आम्ही सर्वचजण जाम हादरलो होतो.
बरोबर कांदा कापायची सुरी सोडली तर एकहि हत्यार नव्हते.हि संघाची पोरे तर मस्त पैकी छ-याची बंदूक घेउन फ़िरत होते.
आता काय करायचे अशाच विवंचनेत सर्व मंडळि होती.
कोंडेश्वराच्या मंदिरातच स्वयंपाक उरकून जेवणॆ करून घेतली.मंदिराला तेंव्हा दार वगैरे नव्हते.त्यामूळॆ गाभा-यात झोपायचे ठरले.
आत जाउन बघितले तर गाभा-यालाही दरवाजा नाही.एक मोठा पत्रा लावून गाभारा बंद करायचि सोय.
तोच पत्रा कसाबसा आतून उभा केला.त्याला आधाराला आमच्या सैक लावल्या.
दिवसभर भटकल्यामुळे सगळॆच जण दमले होते.तरी पण प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आळीपाळीने जागायचे ठरवले.
प्रत्येकी ३ तास जागायचे ठरले.एकाला आधीच ताप चढला होता,त्याने हे जागणॆ वगैरे आपल्याला जमणार नाही म्हणून हात वरती केले.
त्यामुळे राहीलो आम्हि ३ जणच.माझी जागायची वेळ रात्री १२ ते ३ अशी ठरली.मी ३ वाजता दुस-याला उठवायचे आणी बाकी त्याने सांभाळायचे ठरले.
त्याप्रमाणे आमची निजानीज झाली.
आमचा पहीला जागणारा चाप्टर निघाला.त्याने १०.३० वाजताच मला उठवून बारा वाजले आता तुझी पाळि म्हणुन स्वत: झोपी गेला.
मी पण आपला उठून पहारा देत बसलो.बर गाभा-यात तर गुडूप अंधार.एक वातीचा दिवा जळत ठेवला होता.
खुद्द गाभा-यातच झोपलो होतो त्यामूळॆ सिगारेट वगैरे प्यायची काहि हिंमत झाली नाही.बाहेरून चित्रविचित्र आवाज येत होते.
उगाच नसते भास होत होते.माझी तर पार तंतरून गेली होती. कशीबशी ३ वाजायची वाट पहात बसलो.आता वाजतील,मग वाजतील
करत अंदाजे ३ एक तासाने पुढच्याला उठवायला गेलो.त्याने हातातले घड्याळ पाहून मला सांगितले कि आताशी १ वाजतोय.मी ३ वाजल्याशिवाय उठणार नाही.
मी पहिल्यावर चडफ़डत परत ३ वाजायची वाट पहात बसलो.३ वाजता त्याला उठवायला गेलो तर भाई मुडद्यासारखा झोपला होता.अजिबात दाद देइना.
आताशा मलाही झोप अनावर होत होती,बसल्या बसल्या तशीच झोप लागली.पहाटे ६ च्या आसपास गावक-यांच्या आवाजाने जाग आली.
बाहेर ब-यापैकी उजाडले होते.बाहेर येउन पहिले गावक-यांकडे चौकशी केली.तेंव्हा तिथे वाघ वगैरे असला काही प्रकार नाही कळाले.
आपला जाम पोपट झाला हे पाहून फ़ार चिडचिड झाली.लगिच आत येउन ह्या बाकीच्यांना लाथा घालुन उठवले.
रात्रभर झोप नाही.आधिच २ दिवसाचे कष्ट.पाहून ढाकची भैरी रद्द करायचा निर्णय घेतला.काय सांगा ढाक करून परत येता येता संध्याकाळ व्हायची
आणि परत इथे मुक्काम करायला लागायचा.
तसेच तिकडुन जांबोरीला जाउन ST ने तळॆगांव व तिथून लोकलने घर गाठले.
त्यांनंतर ढाक भैरी करायचा योग परत काही आला नाही.या आधी २ वेळा तिथे गेलो होतो.परंतु चतुरंग हयांनी म्हंटल्या प्रमाणॆ
कडा चढताना 'पोटात गोळा येणे', 'आईचे दूध आठवणे' असे वाक्प्र्चार प्रत्यक्ष अनुभवता येतात आणि वरुन खाली उतरताना तर 'तोंडाला कोरड पडणे', 'जिवाचा थरकाप होणे' अशांची दोस्ती होते! ह्याच्याशी १००% सहमत.
आम्ही पायथ्यापर्यंत पोहोचलो खरे पण थोडेसे स्थूल असल्यामुळॆ गुहेत प्रवेश करताना जाम लागली होती.तो प्रकार काही जमला नाही.
त्या गुहेत नक्की काय आहे हे आज आपले फ़ोटो पाहून कळाले.
अभिज्ञ .
प्रतिक्रिया
दॅट्स लाईक धमु स्टाईल
जबरी
वाह राजे !!!!
वा ! वा
जब्राट
त्या
"मृगजळाला
सही वाक्य!!!
खतरी
सही
सुरेख झाला प्रवास !!!
थरारक!
शाब्बास
मस्तच रे....
चकवा
शरुबाबा
अरे सही
चित्रमय आणि रोमहर्षक!
अक्षरक्षः
चित्तथरारक...
आभार.....
च्यामारी लई भारी
वॉ,
काय सुंदर लिहिलयस रे
सुपर्ब धमाल्या!
थ्रिलर थ्रिलर म्हणतात ......
धमाल्या ,
फारच छान
मस्त रे ...
धन्यवाद
अरे धमाला
हेच,
सुंदर लेखन.