मदर्स आर मॉन्स्टर्स, किल देम ऑल. दॅटस माय कमांडमेंट.
मला बेसिकली लेख माला नीट कळाली नाही. संपुर्ण वाचुनसुद्धा युजींना काय झाले होते ते झेपले नाही. पण हे वाक्य वाचुन तो माणूस ठार वेडा होता असेच वाटले.
सर्व लेखमाला वाचून एकच जाणीव झाली कि ही लेखमाला वाचण्यापूर्वीचा मी आणि ती वाचल्यानंतरचा मी हे १००००००००००००००००% सारखेच किंबहुना 'सेम्'च आहोत .... मला पामराला कसलाच बोध झालेला नाही ...
पु. लं. च्या 'असा मी असामी' मधील नेमके "इट्स यू इन द आय ऑफ यू इन द यू." हेच शब्द प्रथम डोक्यात आले.
नक्की कशासाठी असल्या स्वयंकेंद्रीत तत्ववेत्त्यांना इतका भाव द्यायचा?
त्यापेक्षा 'इतरां'ची सेवा करणारे डॉ. बाबा आमटे, प्रकाश आमटे आणि इतर अनेक लोक मला तरी शिरसावंद्य वाटतात. उलट हे असले भंपक तत्वज्ञ ऐकले की उपरोल्लेखित लोकांबद्दलचा आदर शतगुणित होतो.
विषयांतर वाटेल पण जर 'कोsहं कथमिदं जातं' वगैरे प्रयोजन शोधणे हेच जर तुमचे 'मिशन' असेल तर तुम्हाला जीवन कळलेच नाही असे वाटते. एकटेच कुठल्यातरी अगम्य, अमूर्त, अज्ञात विचारांच्या गर्तेत अक्षम्यपणे घुटमळत आहात. ना धड इहलोक ना धड परलोक ....
कुणालाच, कुठलेच प्रत्युत्तर द्यायचे नाही हे ठरवले होते. हे प्रत्युत्तर नाही. इतर दुसरा कुणीही माणूस मधे न आणता फक्त स्वत:शी खाली जे लिहीलंय त्याचा विचार करा (तेवढंच हातात आहे म्हणून) -
"तुम्ही" वगळता इतर कुठल्या मार्गानं तुम्हाला जग दिसतं?
हा किंवा आधीचा प्रतिस्सद हा व्यक्तिशः कोणाविरुध्द नाही.
मानवी देहाची आणि मेंदूची मर्यादा असल्याने तुमचा प्रश्न क्षणभर निरुत्तर करणारा वाटेल. पण त्याच मानवी मेंदुला हेदेखील समजते की आपल्याला जग 'ह्या' मार्गाने दिसतंय, पण इतरांना ते तसेच आणि त्याच मार्गाने दिसेल असे नाही. मग इतरांना ते कसे दिसतय हे पण शोधू या. शक्य झाल्यास 'त्यां'च्या मार्गाची अनुभूती घेवू या. अशाच विचारांमुळे मला त्या (पक्षी डॉ. बाबा आमटे आणि इतर लोकांचा) जगाकडे बघण्याचा मार्ग कळला, भावला.
किंबहुना शब्द्च्छल बराच करता येईल, पण सांगण्याचा मुद्दा हा की त्यांचे विचार मला बदलू शकतात, एक चांगली द्रुष्टी देवू शकतात, जे करण्यात असले एककल्ली तत्वज्ञ निदान माझ्या बाबतीत तरी सपशेल पराभूत झालेले दिसतात.
अहो पण मग दुसर्या कोणालाच मधे न आणता फक्त 'मी'च जग कसं दिसतं म्हणून पाहू लागलो तर मग माणूस म्हणून 'माझ्या' अस्तित्वाला काय अर्थ उरणार? मग मी युजींबद्दल काय वाचणार किंवा मत नोंदवणार ?
परत त्यांची एक एक विधानं जी आपण उद्ध्रुत केली आहेत ती केवळ 'त्यां'ची आहेत मग आपण कशाला ऊहापोह करायचा?
लहानपणापासून 'आपली' दृष्टी व विचार हे इतरांकडून संस्कारीत झाले नाहीत तर मग आपण माणूस म्हणून समाजात कसं वावरणार? जर त्या संस्कार कर्त्यांनाच आपण दोष देवू लागलो (e.g. Mothers are monsters ...) तर मग आपण आदीमानवाच्या दिशेने नाही का जाणार? माणूस म्हणून जगताना एव्हढं अलिप्त कसं राहता येईल?
कुणी सांगितलं तुम्हाला तुम्ही माणूस आहात म्हणून? सगळे म्हणतात आपण माणसं आहोत. त्याची काय गॅरण्टी पण??
आणि ही "अस्तित्वाचा अर्थ" ही काय भानगड असते ब्वॉ??
ते मदर्स मॉन्स्टर, किल देम वगैरे गांभिर्यानं घेऊ नका. युजींना ऐकून कुणीही स्वत:च्या आईचा खून केलेला नाही. करणार नाही. अशी गर्दी खेचणारी वाक्ये फेकत राहातात असले लोक.
मानव असण्याचाच पत्ता नाही, आणि आदीमानवाकडं मागे कुठं जाताय?
जान्दो यार! सो जाता मै अब.
ते मदर्स मॉन्स्टर, किल देम वगैरे गांभिर्यानं घेऊ नका. युजींना ऐकून कुणीही स्वत:च्या आईचा खून केलेला नाही. करणार नाही. अशी गर्दी खेचणारी वाक्ये फेकत राहातात असले लोक.
गांभीर्याने घेउ नका म्हणजे? कोणीही माणूस माथेफिरु सारखा काहीतरी बरळतो आणि ते गांभीर्याने घेउ नये? तसे असेल तर तो संपुर्ण माणूसच गांभीर्याने घेण्याचा लायकीचा नाही असे नाही का वाटत तुम्हाला?
आणि गर्दी खेचणारी वाक्ये म्हणजे? या वाक्याने तर तुम्ही युजींना अगदी राखी सावंतच्या रांगेत बसवले. ती सुद्धा गर्दी खेचणारी वाक्ये फेकते? मग युजी नावाचा माणूस इतर कोणाही भंपक माणसापेक्षा वेगळा कसा? ते तर ऐहीक सुखाच्या पलीकडे गेले होते ना? मग त्यांना गर्दी खेचणारी वाक्ये कशाला फेकावीशी वाटली. शिवाय ते एकांतप्रिय होते, गर्दीला टाळायचे असे तुम्हीच कुठेतरी लिहिले आहे. मग गर्दी खेचणारी वाक्ये कशाला फेकायला लागतात? सगळे बाप *डवे असतात किंवा सगळ्या बहिणी ** असतात अश्या अर्थाची विधाने पण केली आहेत काय त्यांनी? नाही म्हणजे आइला जर राक्षस म्हणून सगळ्या आयांना मारण्याचा आदेश देउ शकतात तर असेही काही बोलले असतील कदाचित, गर्दी खेचण्यासाठी.
या वाक्याची पाठराखण करण्याचा तुमचा प्रयत्न अगदी च अंधानुकरणाच्या पातळीतला वाटतो. राग मानून घेउ नका पण या वाक्याने या माणसाची आख्ख्या आयुष्याची पुण्ण्याई (काही असेल तर) अगदी धुळीला मिळवली असे वाटते. असे काहीतरी होण्यापेक्षा आहे ते बरे आहे. नको ती कलॅमिटी आणि नको ती नसती एनलाइटमेंट.
युजींच्या पुण्याईच्या गोष्टी करताय म्हणजे वाचलेल्या लेखांतलं अक्षरसुध्दा कळलं नाही हे स्पष्टच आहे; पण तरीही फूट्भर लांब प्रतिसाद देताय. काहीही कळलेलं नसताना तुम्हाला गप्प बसवत नाही.
यु वील नेव्हर नो अन्टील एव्हरीथिंग इस इन्जेक्टेड, टॉट टू यू सर !
युजींच्या पुण्याईच्या गोष्टी करताय म्हणजे वाचलेल्या लेखांतलं अक्षरसुध्दा कळलं नाही हे स्पष्टच आहे;
पाप पुण्य युजी मानायचे नाहीत. माझे काही तसे विचार नाहीत. तुम्ही लिहिलेले निम्मे लेख डोक्यावरुन गेले हे तर मी आधीच सांगितले आहे. युजी या व्यक्तीने काही पुण्य कमावले असेल तर ते या वाक्याने धुळीला मिळाले असे मी म्हणालो. तसे युजींना वाटते की नाही किंवा वाटले असते की नाही हे माझ्मासाठी गौण आहे.
पण तरीही फूट्भर लांब प्रतिसाद देताय.
मी ४ फूट पण लिहु शकलो असतो. आईला (या नात्यला) राक्षस म्हणणार्या, सगळ्या आयांना मारण्याची भाषा करणार्या माणसाबद्दल किती लिहावे तेवढे कमीच आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्यांनी असे केले असावे असे माझे स्पष्ट मत आहे. गर्दी खेचण्यासाठी ते असे काहीबाही बोलायचे असे तुमचे मत आहे. पहिले मत खराब आहे, दुसरे तर फारच वाईट आहे. गर्दी खेचण्यासाठी अशी काहीतरी मुक्ताफळे उधळणार्या माणसाबद्दल फारसे चांगले मत बनवत नाही.
तुम्हालाही हे मत पसंत नसावे असे वाटते. तरी त्याचे समर्थन करता?
काहीही कळलेलं नसताना तुम्हाला गप्प बसवत नाही.
जे कळाले त्याच्यावरच मत प्रदर्शन करतो आहे. आईला राक्षसीणीची उपमा देण्यामागे आणि सगळ्या आयांचे शिरकाण करण्याचा आदेश देण्यामागे काही समर्थनीय कारण असेल तर आम्हा पामरांना सांगावे? नसेल तर तुम्हाला गप्प बसवत नाही?
मग??
तुमच्या किंवा जगातल्या सगळ्यांच्याच पॅरेण्टसनी काय वेगळे केले आहे??
हां, टेस्ट ट्यूबमधुन एखाद्याचा जन्म झाला असेल तर ते वेगळे..
डू यू सिरीयसली नो एनिथिंग अबाऊट युवर बर्थ एक्सेप्ट ऑल दॅट रबिश वेदान्तीक स्टफ पूट बाय सम मॅडीज??
कुलकर्णी साहेब, ते 'जाउ द्या' तुमच्यासाठी नव्हते.
पालकत्व, मनुष्यजन्म याबद्दल 'भुन्कणारा कुत्रा' आणि ते ऐकून पिसाळलेला डुप्लिकेट कुत्रा या पेक्षा वेगळे काय बोलणार? (की भुन्कणार?)
सगळेच बार्किन्ग डॉग आहेत याची इतकी खात्री असेल तर इथे प्रतिक्रिया देणार्यान्चे भुन्कणे का उगाच इतके मनावर घेताय?
मूकवाचक,
तुम्हीसुध्दा अश्लाघ्य भाषा तोंडात आणलीत त्याबद्दल आभार.
यामुळं काय होतं माहीत आहे?? पुढेपुढे चांगली भाषा, वाइट भाषा असा भेदच उरत नाही.
संस्कृतीने मेंदूमध्ये तयार केलेली, आणि सतत टिकून राहाणारी चांगले आणि वाईट ही विभागणीच ढासळू लागते.
मला माहितीय, हे तुम्हाला मान्य होणार नाही.
कारण तुम्ही युजींचा पॅरेण्टस आणि डम्पिंगचा मुद्दा स्वत:होऊन इथं आणलात, मी तुमच्या आणि सगळ्यांच्याच पॅरेण्टशीपबद्दल बोललो - ते तुम्हाला झोंबलं. अक्षरश: इतकं, की तुमच्या, एका विवेकानंद प्रेमीच्या आणि "डु गुडर्स" जमातीतील एकाच्या तोंडातही शिव्या आल्या.
त्यामुळे तुमचा पिसाळलेला ड्यूप्लिकेट कुत्रा हा शब्द माझ्यावर काडीचाही परिणाम करू शकत नाहीय.
एकतर मिसळपाव पेड साईट नाही.
मी मागे तसा कौल टाकला होता तो उडवण्यात आला.
आणि क्षुल्लक मुद्यांवरून प्रशासकांच्या दाराची घंटी वाजवणं आणि त्यांना सतत व्यत्यय आणणं गैर आहे.
धागा वाचनमात्र करून टाकल्यास उत्तम.
तुम्ही रजनीशांचे चेले आहात असं कळतं. तुम्हाला लेखमालेमुळे झालेला त्रास तर स्पष्टच दिसतोय. ध्यान वगैरे करत असाल, आणि लेखमालेमुळे शारीरिक त्रास होत असेल तर कळ काढा - त्याचा चांगला परिणाम होतो.
फक्त पिंक टाकायच्या खूमखुमीतून प्रतिसाद दिला असेल तर, मी पण तुमच्यासारखीच एक पिंक टाकलीय असं समजून गप्प बसा.
आय रिसाईन फ्रॉम धीस वन्स अॅण्ड फॉर ऑल !
ते विजूभाऊंसाठी हो! तुमी न्हवं ते!
ज्याचं त्याचं नाव लिहीतोय उत्तर देताना.
व्यक्तीगत काही लिहायचे असल्यास व्यनी करावा /ख व मध्ये लिहावे . स्वागत आहे
असो.
कोणाचा चेला असणे यापेक्षाही स्वतःला का समजले ते महत्वाचे.
आणि जे समजले ते कितपत अमलात आले ते महत्वाचे.
अर्थात प्रत्येक समजलेले अमलात आणलेच पाहिजे असे नाही.
ज्यानी मानवी जीवन व्यर्थ आहे. जगाकडे एक त्रयस्थ म्हणून पहा कशातच गुंतू नका असे सांगितले
त्या स्थित्प्रज्ञाना पु लंनी त्यांच्या तुजे आहे तुजपाशी मध्ये एकदम झकास उपमा दिली आहे.
गवत कागद आणि मिठाई एकसमान मानायचे
कशाचा आनन्द घ्यायचा नाही , कशातच गुंतायचे नाही , अंगाला काही लागून द्यायचे नाही. कधीच न पाहिलेल्या तथाकथीत मुक्तीसाठी सध्या जगतोय ते नाकारायचे. या जगण्याचा तिरस्कार करायचा . अशाना कोणीतरी " ये चलते फिरते प्रेत" असे म्हम्टलय त्याची आठवण झाली.
रजनीशाना नावे ठेवली म्हणून काही वाटले नाही ती नावे ठेवताना तर्कदृष्ट्या नावे ठेवली असती तर बरे झाले असते.
उगाच आईनस्टाईनला त्याने कधीच वजन उचलण्याच्या स्पर्धेत भाग घेतला नाही म्हणून कमी लेखण्याचा प्रकार होतो.
अर्थात मुद्दे संपले की गुद्दे येतात.
असो.
बाकी स्वतःचा प्रतिसाद देवून धाग्याचा टी आर पी वाढवायची ही आयडीया मस्त
विजूभाऊ,
मी लिहीलेल्या लेखमालेवर मी बिलकुल प्रतिसाद देऊच नये अशी तुमची अपेक्षा असेल तर सॉरी !
मी प्रतिसाद देणार नाही तर कोण देणार???
तसे पाहाता तुमचेही तीन प्रतिसाद इथं आहेत; म्हणून मी काही तुम्हाला टीआरपी वाढवायची मस्त आयडीया आहे असे म्हणालो नाही.
असो.
कशाचा आनन्द घ्यायचा नाही , कशातच गुंतायचे नाही , अंगाला काही लागून द्यायचे नाही. कधीच न पाहिलेल्या तथाकथीत मुक्तीसाठी सध्या जगतोय ते नाकारायचे. या जगण्याचा तिरस्कार करायचा . अशाना कोणीतरी " ये चलते फिरते प्रेत" असे म्हम्टलय त्याची आठवण झाली.
कुणीही चालतं फिरतं प्रेत नाहीय. युजी नाही किंवा मीही नाही. तुमच्याकडं कसल्या आठवणी आहेत तो तुमचा प्रश्न!
रजनीशाना नावे ठेवली म्हणून काही वाटले नाही ती नावे ठेवताना तर्कदृष्ट्या नावे ठेवली असती तर बरे झाले असते.
कसले तर्क हो?? तर्क वापरून वापरूनच त्या मूर्खानं सगळ्या बट्ट्याबोळ केलाय; आजच्या आध्यात्मिक क्षेत्रात चाललेला बाजार सुरू होण्यासाठी, आध्यात्मिक गुरू हे रंडीबाज असतात हा वैश्विक समज निर्माण होण्यासाठी
रजनीश/ओशो या पक्का मारवाडी असलेल्या माणसानं "बुध्दत्वप्राप्त व्यक्ती" च्या लेबलाखाली केलेला धंदाच कारणीभूत आहे.
गुद्दे वगैरे काही येत नाहीत; तुम्ही तिकडं/आम्ही इकडं!
संपूर्ण लेखमालेसाठी मन:पूर्वक धन्यवाद. प्रत्येक लेख वचल्यावर बरेच प्रश्न मनात यायचे, काही वक्तव्य करावीशी वाटायची पण शेवटी म्हटलं की तो जास्तकरून एक स्वसंवादच असेल. त्यामुळे तिथेच थांबलो. असो. पण युजी या व्यक्तीची अओळख करून दिल्याबद्दल फार फार आभार.
लेखमालेसाठी मन:पूर्वक धन्यवाद!
लेख वाचल्यावर प्रश्न यायचे, पण ते तुम्हाला विचारुन काय फायदा, म्हणून सोडुन दिले.
अवांतरः ते नाडी वगैरे थोडे खटकले, पण चरित्रात लिहिले आहे म्हटल्यावर....
माहितीपूर्ण लेखमाला.
नेति नेति चा विचार एका लांब टोकापर्यंत नेलेला हा माणूस वाटला.इतका की पार कडेलोटच.
पण मग विचार नाकारणारा आयुष्यभर (भाषण , गप्पा , मुलाखती) विचार कसे मांडत राहीला ?
(बाकी चमत्कार वगैरे पटले नाही.जावू दे.)
पण तुमच्या लेखनाने विचार करायला लावला. लिहीत रहा. धन्यवाद.
लेखमालेबद्दल आभार.माहीत नसलेल्या एका व्यक्तिमत्वाबद्दल कळले.
स्वतःच्याच धुंदीत जगणार्या आणि त्याबद्दल ठोस भूमिकाही असणार्या अश्या व्यक्तिमत्वांबद्दलचे लिखाण नेहेमीच वाचनीय होते.
अवांतरा बद्दल क्षमस्व!
पण ह्या धाग्यावर कोड गंडला आहे का? लेखकाने काही एच्टीएमल कोड टाकले आहेत का? आख्ख्या पानाचं स्ट्रक्टरच मोडलंय. इतर कुणाला प्रॉब्लेम आहे का?
व्हय रे नायल्या! कित्ती रे हुश्शार तू!!
या प्रतिसादानंतर कोड गंडला आहे,
http://www.misalpav.com/node/15020#comment-251047
आणि आधी तो ठीक होता; याचा अर्थ सदर प्रतिसादकर्त्याच्या स्वाक्षरीतला कोड हुकलेला आहे.
<परा मोड सुरू>आपल्यालाही एच्टीमेल समजतं हे दाखवण्याच्या क्षीण प्रयत्न <परा मोड बंद>
मेहनत घेऊन लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. सगळे वाचले नाही. दुसर्या का तिसर्या भागात महेश भट वगैरे नावे बघितली आणि धागा बंद केला. पण नंतरचे काही वाचले. बरेच प्रश्न आहेत डोक्यात. सवडीने बोलू.
"यु.जी." लेखमालेचा विषयच मुळात तुमच्या डोक्यात आला होता त्याचवेळी त्याचे स्वागत Pros & Cons रितीने होईल इतपत आराखडा तुम्ही मनी मांडला असणारच. शिवाय कितीही झाले तरी स्वामी, गुरू, बाबा, बुवा, आध्यात्म हे विषयच चर्चेच्या दृष्टीने अंगार असल्यासारखे आहेत. लेखकाला प्रतिसादांना उत्तर देताना आलेले नैराश्यही त्रयस्थाला जाणवण्याइतके स्पष्ट आहे, आणि ते तर अगदी पहिल्याच लेखापासून सुरू झाले होते. असे असले तरी श्री.यशवंतरावांनी मध्येच ही लेखमाला खंडित न करता, अगदी उपसंहारापर्यंतचा तिचा प्रवास, तितक्याच उत्साहाने आणि प्रभावी लेखनाने इथे पूर्ण केला आहे.; त्याबद्दले ते नि:संशय अभिनंदनास पात्र आहेत.
त्यांची त्यांच्या विषयावर एक नितांत श्रद्धा आहे, ते ज्ञानच असेल अशीही त्यांची भावना नाही वा आग्रह नाही. शेवटी भौतिक घटनेप्रमाणे श्रद्धेचे किंवा ज्ञानाचे अस्तित्व हे जगात घडत असलेल्या घटनांवर निर्भर असते. एखादा ओशो शिकवणीला/परंपरेला स्वतःच्या प्रांगणात जागा देत नाही, तर ओशो हे श्रद्धास्थान असणारा युजी किंवा जे यांच्या पंक्तीला जाणार नाही. दोघांच्या श्रद्धा तिसर्या कुणालातरी अमान्य. कारण त्याच्या ज्ञानाचे कंगोरे त्याला असल्या गोष्टीतील फोलपणा जाणवून देत असतील. ह्या मतभेदाच्या फळ्याच खरंतर ज्ञानप्राप्तीचे सोपान ठरू शकतात....जर तिघेही एकत्र आले तर !!! अन् नेमके हेच होत नसते.
इन्द्रा
>>ह्या मतभेदाच्या फळ्याच खरंतर ज्ञानप्राप्तीचे सोपान ठरू शकतात....जर तिघेही एकत्र आले तर !!! अन् नेमके हेच होत नसते>>>>
हे वाइच्च उमागलं न्हाई.
म्हणजे दरवेळी परस्परविरोधी तत्वांची मोळी बांधता येईल काय ? बांधावी का ?ही मतभेदाची फाळकुटं एकमेकाच्या डोकीत मारण्यापेक्षा , तसेच फळ्या जोडून समन्वयवादी कडबोळी शिल्पं बनविण्यापेक्षा , आपापली फाळकुटं घेऊन चालू पडणं शहाणपणाचं नाही काय ? ( नाहीतरी दोन ओंडक्यांची सागरात कुठं ना कुठं भेट होती म्हणतातंच की. तेव्हा जरा सांभाळून बाजूबाजूनं जावं की झालं)
"....आपापली फाळकुटं घेऊन चालू पडणं शहाणपणाचं नाही काय ?..."
~ खरंय ! ज्यावेळी वादाचे मुद्दे संपतात आणि आपल्याला कुठेतरी अस्पष्टशी अशी का होईना जाणीव व्हायला लागते की वृथा भिंतीवर धडका मारून आपलाच कपाळमोक्ष होण्याची शक्यता आहे, त्यावेळी श्री.अडगळ म्हणतात तसे आपले फाळकूट घेऊन वादमंडपातून चालते व्हावे. कोणत्याही धर्माची वा श्रद्धेची शिकवण कशीही आकर्षक असो, मानवासाठी बुद्धिप्रामाण्य हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे असे मानणारे खूप आहेत. साधू, गुरु, बाबा आदी स्थळे ही केवळ आत्मिक समाधानासाठी असतात, जिची गरज ज्याला भासते तिला विरोध करण्यात काही हशील नसते. कारण त्याने तो झेंडा स्वत:च्या बुद्धीने दिलेल्या कौलावरच घेतलेला असतो. समाजजीवनाशी आपली नाळ अतूट असते, आपण तिच्याशी फटकून वागूच शकत नाही, हे मान्य व्हावे. पण काही परिस्थितीत, श्री.अडगळांचे तत्व "नाहीतरी दोन ओंडक्यांची सागरात कुठं ना कुठं भेट होतेच. तेव्हा जरा सांभाळून बाजूबाजूनं जावं की झालं"....हेच शहाणपणाच लक्षण ठरतं.
इन्द्रा
अविनाशजी,
ते तर सर्वात जुनं हत्यार आहे..
मुलांना मुलं तर कुठंही मिळू शकतात हो, मुलांना मुली सहजी मिळत नाहीत
मुलांना मुली आणि मुलींना मुलं पुरवायचा आणि बुध्दत्वप्राप्त व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली चाललेले आध्यात्म, साधना या लेबलखाली धंदा करणारा रजनीश/ओशो हा जगातला सर्वात हुशार मारवाडी होता..
आणि तुम्ही शब्दतरी जरा नीट वापरत जा हो,
होमो सेक्सी?? ;-) काय आहे हे?
अविनाशराव,
रजनीश आध्यात्माच्या नावाखाली लोकांच्या आयाबहिणींना स्वत:च्या बेडरूममध्ये घेत असेल,
त्या "आध्यात्मिक" गोष्टीसाठी पैसे वसूल करत असेल
आणि त्यावर तुमची/जगाची काहीच हरकत नसेल तर यापुढे चिडणार नाही बुवा मी तरी
अत्यन्त आदरणीय , विचारप्रवर्तक महाराष्ट्र विचारमन्थक. श्री श्री श्री श्री यशवंतकुलकर्णी साहेबाश्री साह सो.
आपणास नमस्कार. _/\० आपले विचार थोर आहेत. आम्ही पामर त्याच्या पासंगाला देखील पुरेसे ठरत नाहिय्ये.
या उप्पर आपण नेहमीच आम्हा पामराना तथाकथीत थोर विचारवन्तान्तांच्या विचारांचे मार्गदर्शन करावे.
बाकी कोन कोणाच्या कोणाला कुठे घेत असे यात ई आर पी वाढवून आम्हाला कसलेच समाधान लाभत नाहीय्ये. त्यामुळे तुमच्या धाग्याचा टी आर पी आम्ही कशाला वाढवू?
न्यटनचा गतीविषयक नियम समजून न घेता त्याने मांजरासाठी आनि पिल्ला साठी दोन वेगळे दरवाजे केले याची चर्चा करणे हे कशाचे लक्षण आहे हे अजून समजले नाहिय्ये.
असो.
गेट वेल सून.
अवांतर: अष्टावक्र गीता या वर रजनीशानी जे भाष्य केले आहे त्याबद्दल काही सांगाल का? फार बरे होईल. आपल्यासारख्या ज्ञानी बहूवाचक इसमाने काही मार्गदर्शन करावे ही विनन्ती
महेश भट्टांचे नाव या मालिकेत आल्यावर इंटरेष्ट बराचसा निघून गेला. महेश भट्ट इम्रान हाश्मीवरही चरित्र लिहू शकतात.
आपल्या मुलाबाळांना सोडून, कामधंदा न करता आयतं खाणार्या माणसाबद्दल सहानुभूतीही वाटत नाही. आदर बाजूला राहीला. :(
असो. हे व्यक्तिगत मत झालं.
प्रतिक्रिया
मदर्स आर मॉन्स्टर्स, किल देम
हे सगळे कसे कॉस्मॉस वाटते ना
१००००००००००००००% सहमत
कुणालाच, कुठलेच प्रत्युत्तर
क्षणभरच निरुत्तर ... पण क्षणभरच
सागर पराडकर, तुमच्या
?
कुणी सांगितलं तुम्हाला तुम्ही
आता मात्र मी पूर्ण नि:शब्द ....
एवढ्या लवकर कसचे नि:शब्द
ते मदर्स मॉन्स्टर, किल देम
युजींच्या पुण्याईच्या गोष्टी
युजींच्या पुण्याईच्या गोष्टी
जाऊ द्या
मग?? तुमच्या किंवा जगातल्या
थोडे लक्षात घ्या
मूकवाचक, तुम्हीसुध्दा
प्रशासक महोदय
प्रशासकांना कशाला त्रास देताय हो??
विजुभाऊ, तुम्ही रजनीशांचे चेले आहात
पिंक टाकायचा हेतू मुळीच नाही ...
सागर पराडकर, ते विजूभाऊंसाठी
क्षमस्व ...
ते विजूभाऊंसाठी हो! तुमी
विजूभाऊ, मी लिहीलेल्या
संपूर्ण लेखमालेसाठी मन:पूर्वक
असेच म्हणतो.
लेखमाला आवडली
गुड जॉब
+१
+२
माहितीपूर्ण लेखमाला. नेति
लेखमालेबद्दल आभार.माहीत
आणखी एक बुवा..
धन्यवाद! आपकी नजर और निरमा
अवांतरा बद्दल क्षमस्व! पण
व्हय रे नायल्या! कित्ती रे
(विषय दिलेला नाही)
मेहनत घेऊन लेख लिहिल्याबद्दल
श्रद्धा आणि ज्ञान
>>ह्या मतभेदाच्या फळ्याच
दोन ओंडक्यांची भेट
धागा वाचनमात्र करावा ही
यु.जी. कृष्णमूर्ती होमो
अविनाशजी, ते तर सर्वात जुनं
होमो सेक्सी??.ठिक
अरे हो का ?
रजनीश आध्यात्माच्या नावाखाली
अत्यन्त आदरणीय ,
महेश भट्ट