बेनाम बादशाह - आयुष्यात बकवास सिनेमे (थिएटर मधे जाऊन) बघण्याची पापे खूप केली, पण जेवढा संताप/उद्वेग/वैताग ह्या चित्रपटाने आला, तेवढा कुठल्याही इतर सिनेमाने आला नाही. ह्याची कथा साधारण अशी - अनिल कपूर असाच एक अनाथ, मवाली सुपारी घेणारा. एक दिवस सुपारी घेऊन तो (अनोळखी) जुही चावलावर बलात्कार करतो, ती मुर्ख मुलगी इतर काही करण्याऐवजी (जसे बदला) त्याच्या मागे लागते लग्न कर म्हणून. किती हिडिस कल्पना आहे ही?? काही बोलवत ही नाही. हे दोघेही तसे नावाजलेले कलाकार - त्यांनी होकार दिलाच कसा असा सिनेमा करायला? आणि डायरेक्टर कोणी 'के. रवी शंकर' म्हणून...त्याला भेटून एकदा कानाखाली जाळ काढायची खूप इच्छा आहे..किंवा विचारावेसे वाटते, जर असेच तुझ्या मुलीच्या बाबतीत झाले तर काय करशील?? किळसवाणा सिनेमा आहे खरच - जर 'रारंग ढांग' सारख्या कथेला सेन्सॉर परवानगी देत नसे, तर अशा कथेला कशी परवानगी मिळते?? मुर्खपणा सगळाच...
किती हिडिस कल्पना आहे ही??
खरंच...साउथचे सिनेमे भडक असतात माहित होते पण हा काय सिनेमा झाला? कसली गोष्ट?
..
त्यातलं एक टुकार गाणं आठवतंय...( का आठवतंय कोण जाणे ?)
बेवडा अनिल कपूर बोंबलत हिंडत गाणं म्हणत असतो,
" माता कौन पिता कौन,
कचरे के डिब्बे में गिराया गया
कचरे के डिब्बेसे उठाया गया...."
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
लक्ष्य
हा डोक्यात जाणारा सिनेमा नाही...
चांगला आहे...गोष्ट अभिनय गाणी नृत्य ( मै ऐसाही हूं) चगैरे मस्तच....
.
..पण एक मुद्दा नेहमी खटकत / जाणवत असे, ______
ही गोष्ट जर एका एमलेस माणसाला त्याचे ध्येय सापडणे यावर आहे, आणि त्याची एक प्रोमोज मध्ये जहिरात असे की " ही डिस्कव्हर्ड व्हॉट ही वाँटेड इन लाईफ ऍट अमुक अमुक थाउजंड फीट" ( शब्द थोडेफार वेगळे असतील ) अशा अर्थाची काहीतरी....
मग पिक्चर पाहिल्यावर असे वाटले, की ज्या क्षणी त्याने त्याचा आळशीपणा सोडला आणि आय एम ए गंभीररित्या (एकदा पळून आल्यानंतर पुन्हा ) जॉइन केली तेव्हा गोष्ट पूर्ण झाली, ही डिस्कव्हर्ड व्हॉट ही वॉन्टेड इन लाईफ..... मग पुढे तो सैनिक होतो, कारगिल मध्ये पराक्रम गाजवतो की नाही, युद्धात जिंकतो की नाही , मरतो का वाचतो हा प्रश्न लांबचा.... मुख्य सिनेमा कधीच संपला...
( म्हणजे प्रीमाईस यशस्वी होणे किंवा न होणे असा नसून ध्येय सापडणे असा आहे)
हे मी कोणाला कधी बोललो नाही, पण एकदा जावेद अख्तरची मुलाखत चालली होती ,( कोणता सिनेमा चुका सुधारून पुन्हा लिहायला आवडेल? अशा प्रश्नावर त्याने मेरी जंग आणि लक्ष्य या दोन सिनेमांची नावे घेतली होती)) तेव्हा तोही असेच म्हणाला... (म्हटलं बेष्ट... लै खुश झालो...)
लक्ष्य ची स्टोरी स्क्रीनप्ले जावेद चा की फरहानचा? कोणाला माहित आहे का?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
आईबापावर प्रेम करण्याचे दोनच मार्ग. त्यांच्या गळ्यात पडणे नाहीतर त्यांच्या पायांवर लोळण घेणे. मग ते चुकीचं सांगत असोत, बरोबर सांगत असोत, काहीही फरक पडत नाही. 'माफी माँगनेसे आदमी छोटा नहीं हो जाता' हे वर. म्हणजे? काही चुकलं नसेल तरी उग्ग्ग्ग्गाच माफी मागायची? का म्हणून? आणि लग्नासारख्या गोष्टीत मनमानी करायला येणारे आईबाप हा पुरातनकालीन विषय आपण कधी बंद करणार आहोत? (करण जोहरकडून ही अपेक्षा म्हणजे फारच झाले म्हणा!)
त्यात आणि ती डॉक्यात जाणारी करीनाची 'पू'. आणि तिला 'कपडे घाल, कपडे घाल' म्हणून पिडणारा शाहरुख खान. भारतीय संस्कृती जपणारी काजोल. (केवळ काजोल होती म्हणूनच. नाहीतर...)
मस्त!! ह्यावर एक स्वतंत्र लेखच टाका!
अवांतरः ह्या पंजाब्यांचं माहित नाही पण 'पू' म्हंटलं की आमच्या डोक्यात तरी जखमेतुन वाहणारा एक दुर्गंधीयुक्त स्त्राव येतो!!
हा चित्रपट पाहुन अब "प्र्क्षक क्या करे" तेच कळलं नाय.
त्यो अजय देवगण म्हणे त्या (अविवाहित्/कुमारी) काजोलला वाचवतो.
कुणापासुन काय म्हणताय? अर्थातच गुंडांपासुन,ते ही त्यांनी काही "भलतसलतं" करायच्या आत.
आनि तत्काळ लगेच तेच "भलत सलतं" स्वतःच करुन मोकळा होतो, येका रात्रित,ट्रेन मधी.
(थोडक्यात काय, तर तो गुंडांना जे करण्यापासुन अडवतो, तेच स्वतः खुशाल करुन मोकळा होतो.)
आणि तोंडाला काळं लावुन जो पसार होतो, तो पुन्हा गावतच नाय लवकर.
इकडे काजोलला (विवाहपुर्व)अपत्यप्राप्ती होतेच(अपेक्षेप्रमाणे).
आणी तिथुन पुढं काय तर "मनाचा-गुंता", "तरल्-नाती" असला भुक्कड मालमसाला भरलाय.
बाकी गाणी अप्रतिम,(केवळ त्यासाठी शिणुमा पुन्हा पुन्हा बघायची तयारी आहे आपली.)
(हद्द हिच, की, अशा प्रकारे पसार होउन, कित्येक तपांनंतर हे महाशय जेव्हा गावतात त्या काजोलला, तेव्हा ती
बया त्याच्या दोन मुस्काडात देण्याऐवजी,किंवा स्वतःवर आनी त्याच्यावर खजील राहण्याऐवजी खनकळत "नकळत"
पुन्हा त्याच्या वर फिदा. हाय रे कर्मा. काय काय बघाव आता उघड्या डोळ्यांनी.)
तर ह्या शिणुमातुन लेकी-बाळिंना संदेश्/उपदेश येकच,
बायांनो, जो तुम्हाला "वाचवायला" येइल, त्याच्यापासुन जरा "वाचुन"(आणी वचकुनच) रहा.
आपलाच,
मनोबा
'लक्ष्य' पाहून मलाही असंच वाटलं होतं. ध्येय सापडणं आणि यशस्वी होणं या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत खर्या.
आणि कहर वाटली होती ती हृतिकची व्यक्तिरेखा. पूर्वार्धात तो किती बालिशपणे वागतो! प्रीती झिंटा आणि तो एकमेकांच्या खरेच प्रेमात पडले आहेत, की 'बरी मैत्री आहे... सोयीचे आहे झाले' म्हणून ते प्रेमगाणी गाताहेत हेच कळत नाही. त्यांच्यात 'रोमान्स' कुठे दिसतच नाही. दिसते ती फक्त जुन्या मित्रमंडळींबद्दल होते ती सवयीची भावना. एकमेकांना आवडीने 'चालवून' घेणे.
मग एकदम 'कितनी बातें केहनेकी हैं..'मधे रोमान्स. त्यांच्यात इतकं सगळं आठवण्याइतकं घडलं तरी कधी, आपण तेव्हा कुठे होतो... असे प्रश्न पडतात ते गाणं पाहताना.
_मग एकदम 'कितनी बातें केहनेकी हैं..'मधे रोमान्स. त्यांच्यात इतकं सगळं आठवण्याइतकं घडलं तरी कधी, आपण तेव्हा कुठे होतो... असे प्रश्न पडतात ते गाणं पाहताना. _
फार छान वाक्य...
अगदी हेच म्हणतो...
____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
आता थोडं लिहितो
ओम शांती ओम बद्दल...
मी या सिनेमाबद्दल अजिबात अपेक्षा न ठेवता गेलो होतो त्यामुळे मला बरा वाटला... दीपिका तर लै बेष्ट.. श्रेयसने सुद्धा छान काम केले आहे.. ( म्हातारा मात्र अजिबात दिसला नाही, श्रेयस म्हातारा आणि शाहरूख तरूण असलं पहायचं जीवावर आलं खरं)... ते जाऊदेत..
__________
शेवट थोडा अजून योग्य करता आला असता...ते झुंबर पडून अर्जुन मरतो वगैरे ठीकठाक.... मुख्य म्हणजे त्यानंतर हीरोला कळते की खरंच भूत हे सारे प्रकार करत होते... पण ही गोष्ट अर्जुनला कळायला नको का? नाहीतर त्याला इतकेच वाटणार की झुंबर पडायच्या अपघाताने आपण गेलो... मग इतके सारे प्रयत्न करून एवढी गोष्ट पाहून काय उपयोग?
गोष्टीत दुष्टाला शासन हवेच पण त्याला ते कळायलाही हवे तर प्रेमाईस सिद्ध होणार ना...
त्यातल्या झुंबराखाली पडलेल्या अर्जुनला दोन्ही दीपिका दिसतात आणि भूत त्याला त्या त्याच्व्या दुष्कृत्याची जाणीव करून देते आणि त्याची हीच शिक्षा आहे असे म्हणते ... आणि मरता मरता अर्जुन त्याच्या गुन्हयाची कबुली देतो..आणि ते दृश्य सारे लोक ( क्लोज सर्कीटवर पाहतात, किंवा चॆनलवाले ्शूट करून दाखवतात..) मृत्यूबरोबरच एखाद्याची संपूर्ण इमेज / जनमानसातली प्रतिमा संपणे ही मोठी शिक्षा आहे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
मला नाही असं वाटलं.
शांतिप्रिया सांगते की त्याला - मेरी सांसे चल रही थी... असं.
आता हे थोडंच शाहरुखला माहीत असणारेय? म्हणजे ही ओरिजिनल शांती आणि हा तिनं घेतलेला सूड हे अर्जुनला कळणारच. त्यासाठी दोन दोन शांत्या (!) दाखवायची काय गरज आहे?
आता हे थोडंच शाहरुखला माहीत असणारेय?
आता त्याला तर सगळंच आठवतंय म्हणून तर हे सारं करतोय तो...आणि ती काहीही बोलली असली तरी अर्जुनला तर असंच वाटत असणार की ही अभिनय करणारी नटी शाहरूखने शिकवलेले डायलॉग बोलतेय..( मला तरी असेच वाटले)......त्याला तिच्याबद्दल संशय आलेला आहेच...
... त्यामुळे आपल्याला दुसरी मानव दीपिका दिसल्यानंतरच नक्की कळते की हे आधीचे भूतच्...पण त्यांची अर्जुनशी काहीच इन्टरॅक्शन नाही , कारण तो आधीच मरतो... मग भुताचा सूड अगदी पक्केपणे कुठे दिसला ?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ...
कोणती तरि expectional गोष्ट असल्याशिवाय कोणी चित्रपट करत नाही (कमीत कमी चोप्रा family).
अशा गोष्टिंमुळेच तर चित्रपट पहायला लोकं जातात. डोकं - बिकं लावून love story बघायच्या नसतात. त्यासाठी समांतर सिनेमे आहेत. मग चोप्रानीं कोन्या 'मास्तर' च्या जिंदगीवर पिक्चर काढायचा का?
आणि तुमच्या डोक्यात जे प्रश्न आहेत त्याची थोडी फार उत्तरे आहेत पिक्चरमधे...
उदा:: माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" किंवा त्या १५ २० सेकंदातले अमरीश पुरीचे स्वगत.
याचं उत्तर तर लगेच सापडलं असतं... तिच्यासाठी तो 'कुलजीत' का कोण तो ..... कायम तयार असतो.
आणि फसवा-फसवी च्या वर्तनावर जो आपला आक्षेप आहे तो पण काही बरोबर नाही वाटत... १०० पैकी ९५ love story मधे हा प्रकार सुरु असतो.... कोणी काही बापाची परवानगी घेउन असले उद्योग करत नाही.(काही सन्माननीय अपवाद सोडुन). मग चोप्रा दाखवले तर काय बिघडले???
त्यामुळे असल्या पिक्चरला उगाच नावे ठेवण्यात अर्थ नाही.
तुझ्या भावना दुखावल्या असतील तर सॉरी रे बाबा.....
लव्ह स्टोरी पाहताना सुद्धा डोके लावण्याची चूक झाली माझी... धन्यवाद, सल्ल्याबद्दल...
आणि ९५ % लव्ह स्टोर्यांमध्ये कसा प्रकार चालू असतो ते सांगितल्याबद्दल सुद्धा धन्यवाद...
तेवढे या सर्व्हेचे डीटेल्स दे म्हणजे झाले, का इथे सुद्धा डोके लावायचे नाही??
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
काय मास्तर, आता या 'छोट्या' ने तुम्हाला शिकवायचं का?
शेवटी डोकं आहे... कोणी कुठे लावायचं हा ज्याच्या त्याच्या डोक्याचा प्रश्न आहे.
उगाच 'तुझ्या- माझ्या' करुन त्रागा नाही करुन घ्यायचा.
आणि भावनांचं म्हणाल तर त्या 'पिक्चर' सारख्या फुटकळ गोष्टीत लावुन त्यांचा अपमान नाही करायचा!!! ;) ;) :P
>> आणि भावनांचं म्हणाल तर त्या 'पिक्चर' सारख्या फुटकळ गोष्टीत लावुन त्यांचा अपमान नाही करायचा
=))
पण हे मात्र मान्य की मास्तरांमुळेच जाम करमणूक झाली. येऊ द्या.
(टुकार सिनेमांची चाहती) अदिती
मला या ठिकाणी एक नमूद करवेसे वाटते कि चित्रपट पाहताना असल्या तार्किक गोंष्टिंचा विचार करून चित्रपटाची मजा घालवू नये.
व.पु. च्या कुठल्याश्या कथेमध्ये वाचले होते...चित्रपट म्हणजे ३ तासांचे एक सुन्दर स्वप्न. त्यामध्ये हे असेच का, ते तसेच का असे प्रश्न विचारून त्या स्वप्नाची मजा घालवू नये. जर चित्रपटात असे दाखवले कि नायक राकेलच्या रांगेत उभा आहे, तर कसे वाटेल. असे चित्रपट आपण बघु का? अरे आपल्या रोजच्याच जीवनातल्या समस्या पडद्यावर दाखवल्यातर ते पाहण्यासाठि कोण येइल? आणि मुख्य म्हणजे आपल्याला ते आवडेल का?
तसेहि माणसाची प्रव्रुत्ती असते कि त्याला दुसर्याच्या पायात काय अडकले आहे ते बघण्याची उत्सुकता. आणि त्यात गैर काहि नाहि. तेवढेच निवांत क्षण/विरंगुळा आपल्या रोजच्या दगदगीतून आणि कटकटीतून.
स्वप्नात काहिहि घडू शकते राव. त्याचा त्रास नाहि करुन घ्यायचा. त्यामुळे "रजनीकांत"चे चित्रपट पाहताना सुद्धा मी ऍंजाय करतो.
(रजानीकांत केवळ मराठी आहे म्हणून मी तमिळ भाषेतील चित्रपट पाहण्याचे धाडस केले, आणि आपण एक स्वप्न पाहत आहोत एव्हढा एकच द्रुष्टीकोन असल्यामुळे त्याचे चित्रपट आवडले. त्यावेळी "हा असा काय हवेत उडतो" म्हणून मनाला त्रास करून नाही घेतला.)
पण मला, भडकमकर मास्तरांनी लिहिलेले आमरस पुरि चे स्वगत आवडले....स्वप्न पाहण्याचा आणखी एक द्रुष्टिकोन.
प्रत्येकाने आपापल्या द्रुष्टिने स्वप्न पाहावे अशा मताचा मी आहे.
एखाद्या चित्रपटाचे/स्वप्नाचे अशा रितीने काथ्याकूट करणे मलाहि आवडेल.
एखाद्या चित्रपटाचे/स्वप्नाचे अशा रितीने काथ्याकूट करणे मलाहि आवडेल.
लिहा.. मग मीही त्यावर लिहीन की असल्या तार्किक गोंष्टिंचा विचार करून चित्रपटाची मजा घालवू नये
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
एकदम आवडला :)
मला या चित्रपटातील गाणी आणि बराच भाग आवडतो, पण हा शेवटचा भाग अजिबात आवडला नव्हता. त्या परमजीत ची काहीही चूक नसताना (मला नीट आठवत नाही) त्याचा उगाचच पचका केलेला आहे.
मस्त हाणामारी, चिरफाड केलीय... आणि DDLJ मला अजिबात न पचलेल्या पिक्चरपैकी एक आहे.. बाकी आपल्याला रजनीकांतचे पिक्चर आवडतात. डोकं शिणून दमतं आणि हलकं वाटतं बघा...
जी पुढे कुकुहोहै, जप्याकिहोहै सारख्या अनेक सिनेमांमध्ये सुद्धा दिसली.
चो चो (पक्षी चोरी चोरी) जप्याकिहोहैच्या आधिचा सिनेमा आहे. त्यातसुध्दा लग्नाच्या मांडवातुन नायीका नायकाबरोबर पळुन जाते. ही परंपरा या सिनेमाने सुरू केली आअहे असे म्हणले तर????????
त्यातसुध्दा लग्नाच्या मांडवातुन नायीका नायकाबरोबर पळुन जाते.
मुद्दा अमान्य कारण चोरीचोरीमध्ये ती नायकाबरोबर पळून जात नाही तर नुसतीच पळून जाते आणि त्यानंतर तिला बसमध्ये नायक भेटतो...
प्रतिक्रिया
चुकीची दुरूस्ती...
काही खरच डोक्यात जाणार्या सिनेमांच्या कथा -- बेनाम बादशाह
हिडीस बादशहा
अजून एक सिनेमा ...........लक्ष्य..
अस्साच एक
अगदी अगदी
खि खि खि
दिल क्या करे
>>> लक्ष्य
'लक्ष्य'
अगदी
_मग एकदम
आता थोडं
अहं
आता हे
कदाचित
दुसरा धागा
असहमत...
तुझ्या
हा हा!!!
सहमत
हा हा हा
हम दिल चुके????
स्वप्न आणि वास्तव
एखाद्या
हाहाहा! फारच भारी! लेख आणि
धमाल लेख आहे
झ्याक...
मास्तर
दुरुस्ती...
ब्याक इन फॉर्म
:-D
मास्तर फुल्ल फोर्म मध्ये.....
मिपावर कधीकाळी संयतपणे