✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सद्धगुरु च्या शोधात ............ भाग २ पुढे

स
संजीव नाईक यांनी
Mon, 03/24/2008 - 10:27  ·  लेख
लेख

Book traversal links for सद्धगुरु च्या शोधात ............ भाग २ पुढे

  • ‹ सदगुरु च्या शोधात..
  • Up
  • सद्धगुरु च्या शोधात भाग ३ सन १९२० सालची दुर्लभ पदे. ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5691 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 11:03 नवीन

विष्णूची वाट पाहतो आहे!

पृथ्वीवर अनाचार माजला की सर्व ॠषी मुनी आणि इतर देवादिक मंडळी क्षीरसागराच्या ठिकाणी जाऊन भगवान विष्णुची प्रार्थना करीत आणि नतमस्तक होवून विनवणी करत असत की देवा पृथ्वीवर माजलेला हा अनाचार, दुष्ट प्रवृत्ती या सर्व गोष्टीचा नाश कर आणि आम्हाला भयमुक्त कर. त्या प्रमाणे भगवान विष्णूनी प्रत्येक अवतारामध्ये दुष्ट प्रवृत्तीचा, आसुरी शक्तिचा नाश करुन सर्वाना प्रत्येक वेळी सदाचाराकडे नेण्याचे आर्दश दाखवून दिलेत. सध्याची परिस्थिती पाहता पृथ्वीवर अनाचार माजला आहे असं मानायला हरकत नाही. सबब, आता विष्णूने पुन्हा एकदा अवतार घ्यायची वेळ झाली आहे असंही मानायला हरकत नाही. नाऊ इट इज हाय टाईम, की विष्णूने अवतार घेऊन पृथ्वीवरील सर्व दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सर्व प्राणिमात्रांना सुखी केले पाहिजे! "परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम,| धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||" तरच एका ग्रंथात परमेश्वराच्या तोंडी घातलेले वरील वचन खरे ठरेल. खुद्द परमेश्वर असं कधी कुणला म्हणाल्याचं ऐकिवात नाही आणि एक संजय सोडला तर अद्याप असा पुरावाही दुसर्‍या कुणी दिल्याचं आठवत नाही! असो, तूर्तास विष्णूच्या नव्या अवताराची अगदी काकुळतीने वाट पाहतो आहे. कारण आज दुष्टप्रवृत्तींकडून पृथ्वीवरील अनेक निरागस, निरपराध लोकांचं शोषण सुरू आहे तेव्हा आता विष्णूने अधिक वाट पाहायला न लावता त्याचे, किंवा त्याच्या तोंडी घातलेले वरील वचन सत्य करून दाखवावे! नाहीतर ही केवळ त्याची मिथ्थ्या बडबड ठरेल असे वाटते! असो, संजिवराव, पुढील लेखनाकरता शुभेच्छा! आपला, (विष्णूची वाट पाहणारा!) तात्या. अवांतर - काही संकेतस्थळांवर बराच अनाचार माजला होता ते पाहून आम्हाला अवतार घेऊन मिसळपाव डॉट कॉम सुरू करावे लागले! आता पृथ्वीवरील बरीचशी आंतरजालीय मराठी प्रजा सुखासमाधानाने नांदत आहे! :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 03/24/2008 - 14:42 नवीन

*

*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ठ
ठणठणपाळ Mon, 03/24/2008 - 21:13 नवीन

धोंडा

>नाऊ इट इज हाय टाईम, की विष्णूने अवतार घेऊन पृथ्वीवरील सर्व दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सर्व प्राणिमात्रांना सुखी केले पाहिजे! तात्या, कशाला उगीच स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेताय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रमोद देव Mon, 03/24/2008 - 11:17 नवीन

हाहाहाहाहाहा!

अवांतर - काही संकेतस्थळांवर बराच अनाचार माजला होता ते पाहून आम्हाला अवतार घेऊन मिसळपाव डॉट कॉम सुरू करावे लागले! आता पृथ्वीवरील बरीचशी आंतरजालीय मराठी प्रजा सुखासमाधानाने नांदत आहे! :) :))))))))))))))))))))))))))
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 03/24/2008 - 13:01 नवीन

म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का तात्या?

परित्राणाय जालानाम विनाशायच दुष्कृतां! मराठी संकेतस्थलार्थाय 'मिसळपाव' युगेयुगे!!:)) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 19:06 नवीन

हो हो! :)

मला तसंच म्हणायचंय रे रंगा! :) पण मला तुझ्याइतकं संस्कृत येत नाही रे! साला आपण पडलो एक नंबरचे भिकारचोट, अडाणी आणि गावंढळ! त्यामुळे सभ्य, सुशिक्षित, आणि सुसंस्कृत का कायसं म्हणतात त्या संस्थळावर आमचं पटेना, तिथे आम्हाला जाच वाटू लागला म्हणून मग आम्ही बंड करून, अवतार घेऊन मिपा स्थापन केलं, जे तुमच्यासारख्या दिलखुलास मंडळींच्या जोरावर आणि प्रेमामुळे आजवर सुरू आहे! बाय द वे रंगा, पण तुझ्याइतकं संस्कृत मला येत असतं तर मी 'तात्याक्नवी' असं काहीसं चमत्कारिक नांव नसतं का लावून घेतलं? तो उपक्रमाचा वाश्या जशी '~ नासतो विद्यते भावो..' अशी काहीशी जोरदार संस्कृत डायलॉग असलेली सही करतो तशी सही नसती का केली? :) असो.. आपला, तात्याक्नवी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
आ
आर्य Mon, 03/24/2008 - 15:34 नवीन

हा शोध / मार्ग कुठे नेणार आहे ?

जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली अथवा.............................तेव्हा भगवान विष्णूनी अवतार घेऊन दुष्ट प्रवृत्तीचा, आसुरी शक्तिचा नाश केला. अनेक साधू-संतांनी लोकांना सन्मार्ग दाखवण्याचे हे कार्य पुढे चालवले.हे ईथपर्यंत सगळ ठिक आहे हो. काय खरचं अद्यात्मात गुरुची गरज आहे ? थेट देवां पर्यंत जाणे शक्य नाही ? या क्षेत्रातील प्रदूषण कसे ओळखयचे आणि कसे दूर ठेवयचे? या वाटेवर चालताना मायाजाल कोणते आणी खर्‍याची परीक्षा करणे जरा अवघडच आहे नाही का? पण कालांतराने तुमचे साधक, सधना सोडुन केवळ सिद्धींच्या मगे लागलेत............भोंदू साधू -बाबां विषयी आपण काय सांगू शाकाल? अनेक सद्दगुणी लोक या मुळेही भरडले जातायत. अहो लोकांची स्तिती फार वाईट आहे...आता तर म्हणतात "गुरू वीणकोण लावील वाट?" अनेक चमत्कार, अनेक लीला, एक ठिकाणी गुप्त होणे, दुसर्‍या ठिकाणी प्रगट होणे, दर्शनाला येणार्‍या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होणे, रंकाचे राव होण अशाप्रकारे समाजामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण होण्याच्या दृष्टीने कार्य केले आहे असं तुम्हाला वाटतं? आपण कुठे चाललोय? बाजारात ? भक्ती करुन / नवस बोलून मनोकामना पूर्ण करायला ??? कली युग आहे कली युग......आता अवतार झालाच पाहीजे पण हे प्रश्ण अनूत्तरीत आहेत ..... एखाध्या संप्रदायाचे पाईकपणा स्वीकारणे हे अत्यंत जरुरीचे आहे? प्रत्येकाचे ध्येय व त्यास प्रत्येकाचा मार्ग वेगळा असु शकतो. नराचा नारायण होणे शक्य आहे काय? म्हणजे नक्की काय? विष्णू पदाला पोहचणं "व्यासाय विष्णूरुपाय व्यासरुपाय विष्णवे " स्वर्ग प्राप्ती (कधीही न पाहीलेली गोष्ट), की समाजात देवे / अवतारी पुरुष म्हणून मान्यता ?, अथवा ३३ कोटी देवतांच्या पंक्तीत स्थान ? की फक्त मानसिक समाधान, नक्की काय ? या अर्थातच शंका आहेत्........यातुन कुणालाही दुखःवायचा हेतु नाही. कॄपया यातुन गैर अर्थाने होऊ नयेत ही दत्त चरणी प्रार्थना. आर्य
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 16:46 नवीन

माझं मत..

म्हणजे नक्की काय? विष्णू पदाला पोहचणं "व्यासाय विष्णूरुपाय व्यासरुपाय विष्णवे " व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! चूभूद्याघ्या... बाकी चालू द्या.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आर्य
स
संजीव नाईक Mon, 03/24/2008 - 17:16 नवीन

पण हे प्रश्ण अनूत्तरीत आहेत .....

श्रीमान आर्य यास. आपला प्रश्न योग्य आहे. मला मराठी टाईप करणे. फार जमत नाही मी शिकत आहे. पण हळुहळु आपल्या प्रश्ननाची उत्तरे माझ्या पुढील भागा मध्ये आहे. सध्द्गरुच्या शोधात यांचा अर्थ आपनास नक्की कळेल. स्वर्ग प्राप्ती म्हणजे "मिसळपाव वर ज्या शोधार्थ आपन येतात व मानाला आनंद / मानसिक सुख उपभोगता यालाच "स्वर्ग प्राप्ती " का म्हणूनये? राग धरुनये क्षमस्व आपला संजिव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आर्य
आ
आर्य Mon, 03/24/2008 - 17:57 नवीन

स्वर्ग

स्वर्ग प्राप्ती म्हणजे "मिसळपाव वर ज्या शोधार्थ आपन येतात व मानाला आनंद / मानसिक सुख उपभोगता यालाच "स्वर्ग प्राप्ती " का म्हणूनये? ही जर स्वर्ग प्राप्ती आहे तर तुमचा सद्-गुरु का हवा.......मग उद्या पासुन पुजा -अर्चना बंद का करु नये. का स्वर्ग ही व्याख्या सपेक्ष आहे. प्रत्येकाच्या विचारानूसार, वेळेनूसार, आवडीनुसार बदलते..........मग अस्तीत्वत काय आहे. मला तर वाटतं हे देव आणि पुराणातल्या विश्व निर्मितिच्या कल्पनांनी लोकांची विचार शक्ती कुंठीत केली आहे. तात्या व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! तसे वर वर पहता आपल्या मताशी मी सहमत आहे, पण त्यांची सृजनशिलता मानली पाहीजे. व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! आर्य
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 18:48 नवीन

ओक्के..

तात्या व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! तसे वर वर पहता आपल्या मताशी मी सहमत आहे, पण त्यांची सृजनशिलता मानली पाहीजे. ओक्के बॉस! :) आपला, (व्यासप्रेमी!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आर्य
स
संजीव नाईक Mon, 03/24/2008 - 23:49 नवीन

व्यासप्रेमी व आर्य

महाशय आपण दोघे का भाडतात उगाच आपण आपल्या मनाला लावून का घेतात असअसेल तर आज पासुन माझ चुकते म्हणुन मी लेख बंद करु का? आपला संजिव
  • Log in or register to post comments
आ
आर्य Tue, 03/25/2008 - 10:02 नवीन

क्षमस्व !

प्रिय संजिव, उपरोक्त लेखात मी माझे मत व्यक्त करताना व्यासांचा संदर्भ दिला होता, त्या वर तात्यांनी त्यांचे मत मांडले आहे. आम्ही ऐक मेकांच्या मताचा आदर करीत विचार सहमती दर्शवली आहे. यात कोणीही-काहीही वैयक्तीक रीत्या धेतले आहे असे मला तरी वाटत नाही. (तात्या माझ्या या मताशी सहमत असतील). संजिव, (आपले वय आणि पोंच माहीत नसल्याने केवळ ऐकेरी ऊल्लेख आहे) आपण वाद न घालता संवाद करु. कॄपया विषय पुढे चालुठेवावा...............चू .भू. दे. धे. आपला (ह. भ. प.) आर्य सुचना - ह. भ. प. म्हणजे हरीभक्त भक्तपारायण असा संदर्भ न घेता "हळूच भजी पळवणारा" असे वाचावे.
  • Log in or register to post comments
स
संजीव नाईक Tue, 03/25/2008 - 10:15 नवीन

आपले वय आणि पोंच माहीत नसल्याने केवळ ऐकेरी ऊल्लेख आहे

श्रीमान श्रीयुक्त माननीय मिसळ्पाव परिवार सदस्य..... मी लहान असून आता मिपा वर आताच लिहण्याचा सराव करित आहे. वय वर्ष १००ला ५५ कमी धंदा नोकरी बी.एस्.एन्.एल्. मध्ये मंबई आवडता विषय चास्तू ,ज्योतिष ,टेरो , या विषयी समुपदेश करणे शास्त्रीय द्रुष्टी कोनातून आपला (केवळ एकेरी ) संजिव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा