माझी तमाम वाचकांना एव्हढीच विनम्र विनंती की केवळ वरील मुद्द्याला अनुसरून मते द्यावीत कारण पुढील भागांत मी इतर मुद्द्यांकडे वळेनच.
छान उपक्रम दिसतो आहे, पुढील सर्व भागांचे स्वागत आहे! :)
तूर्तास इतकेच, सवडीने विस्तृत प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करीन..
तात्या.
महाभारतात ज्याच्या तोंडी संस्कृत संवाद आहेत तो कर्ण सूतपुत्र (सूत=सारथी) होता. म्हणजे आजच्या काळातील ड्रायव्हर / टांगेवाला समाज.
महाभारतातील पात्रे एकमेकांशी संस्कृतात संवाद साधत होती असे वाटत नाही. महाभारतकारांनी मात्र महाभारताची रचना करताना पात्रांच्या तोंडी संवाद टाकले. पीटर ब्रूक्सच्या महाभारतातील पात्रे एकमेकांशी इंग्रजीत बोलतात म्हणजे भीमाने द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी आपल्या थोरल्या भावाची निर्भर्त्सना फाडफाड इंग्रजीत केली असा अर्थ होत नाही. रामाबाबतही असेच घडणे शक्य आहे, या सर्वाचे श्रेय रचनाकारांना आहे. पात्रांना नाही. याचा अर्थ रामाला किंवा कर्णाला संस्कृत येत नसे असे नसून सदर व्यक्ती एकमेकांशी संस्कृतात संवाद साधत होत्या असे म्हटलेले मी आजपर्यंत कोठेही वाचलेले नाही. असल्यास संदर्भ आवडेल.
वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला ही तद्दन आख्यायिका आहे. रामायणकार वाल्मिकी माणसांना लुटणारे कोळी नव्हते यावर अनेक तज्ज्ञांची मते ऐकण्यास मिळतील. कालीदास नेमका कोण होता याबाबतच अनेक प्रवाद आहेत त्यामुळे तो गुराखी होता का कोण याबाबत ठाम भाष्य करणे अयोग्य वाटते.
जनसामान्यांची भाषा प्राचीन काळी संस्कृत होती यावरही विश्वास ठेवणे कठीण आहे.
असो, याचा अर्थ प्राचीन काळी ब्राह्मणातेरांना संस्कृत शिकण्याची मनाई होती असे नाही पण नंतरच्या काळात ती झाली आणि जर गेल्या काही काळात तो गैरसमज दूर होऊ लागला असेल तर तो दूर होण्यास अजून थोडा वेळ जाऊ द्यावा.
असो, ब्राह्मणेतरांना आज संस्कृत शिकायची संधी असल्याने संस्कृत ज्याला शिकाविशी वाटते त्यांनी अवश्य शिकावी. हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे.
त्यातून एखाद्याने संस्कृत अजीबात कळत नाही असे विधान केले तर मनाला लावून घेण्यासारखे काय आहे ते कळले नाही.
अवांतरः मनोगतावर हीच चर्चा वाचून असाच प्रतिसाद दिला होता. इथे धुमाळी उडालेली दिसते तेव्हा इथेही देते. प्रतिसादांची संख्या दुसर्या पानावर गेल्याने घुसखोरी केली. ;-)
(प्रियालींची युक्ती - मुख्य प्रतिसाद सृला यांना)
संस्कृत भाषा कठिणही नाही, पण सोपीही नाही. कुठल्याही नैसर्गिक भाषेसारखी आहे.
"कमल नमन कर" सारखी वाक्ये सोपी आहेत ती कुठल्याही भाषेत. "आमी रशगुल्ला खाबे. रशगुल्ला खूब भालो." हे सोपे आहे. पण मला कोणी "फाडफाड" बंगाली बोलू लागल्यास खरेच काही म्हणजे काही कळत नाही.
घरगुती भाषा, खरीच वापरायची झाली तर फार गुंतागुंतीची असते. तुमचा संस्कृतचा चांगला अभ्यास आहे म्हणून तुम्ही बहुधा पुढील कल्पना संस्कृतमध्ये बोलून दाखवू शकता.
"पोळपाट पिठीवर सटकला म्हणून लाटणे हातातून निसटले. तेलाच्या वाटीला ते लागले असते तर कट्ट्यावर सगळीकडे तेलच तेल माखले असते. मग कामात काम वाढल्यामुळे बाईची भलतीच चिडचिड झाली असती. ते वेळेतच पकडले हे बरे झाले."
पण ही वाक्ये तुम्ही संस्कृतमध्ये म्हटली तरी कोणाला समजणार आहेत का? अशी वाक्ये तर घरगुती बोलण्यात सहज येऊन जातात. तुम्ही दिलेली वाक्ये सोपी असली तरी रोजवापरात क्वचितच येतील.
संस्कृतचा बाऊ करू नये हे खरेच (कुठल्याच भाषेचा बाऊ करू नये, तसे.) पणे ती दुसर्या कुठल्याही भाषेपेक्षा सोपी आहे, असे म्हटल्यासही बरोबर नाही. बाकी कुठलीही भाषा शिकण्यास लागतो तितका अभ्यास, म्हणजे पुष्कळ अभ्यास, केल्याशिवाय ती अवगत होणार नाही.
तुमच्या प्रकल्पास शुभेच्छा.
अगं प्रियाली होतीस कुठे तू? इथे मी एकटाच मास्तरीण बाईंच्या हातचा मार खात होतो. माझ्या, 'प्रियाली मला वाचव...! धावून ये..." या आरोळ्या तुला ऐकू आल्या नाहीत का?! :)
इथे धुमाळी उडालेली दिसते तेव्हा इथेही देते. प्रतिसादांची संख्या दुसर्या पानावर गेल्याने घुसखोरी केली. ;-)
शाब्बास! बरं केलंस.. :)
त्यातून एखाद्याने संस्कृत अजीबात कळत नाही असे विधान केले तर मनाला लावून घेण्यासारखे काय आहे ते कळले नाही.
सहमत आहे, सहमत आहे, सहमत आहे!
आपला,
(आवडत्या स्त्रीसोबत मनपसंत दारू आणि मच्छीचं जेवण मिळाल्यावर फाड फाड संस्कृत बोलणरा!) तात्या.
:)
परवा मिपावरील एका लेखकू महाशयांनी विधान केले की त्यांना संस्कृत अजिबात कळत नाही. हे म्हणजे थोडेसे प्रसिद्धीचा हव्यास असणारे लोक जसे अधून मधून भडक व सवंग विधाने करून जनतेचे लक्ष वेधून घेतात तसा प्रकार झाला.
कोण हो हे लेखक महाशय? :)
बाय द वे, आपला हा लेख मात्र किंचित भडकून लिहिल्यासारखा वाटतो आहे, कुणाची तरी खरडपट्टी काढण्याकरता लिहिला गेल्यासारखा वाटतोय. भाषाही अंमळ उर्मट वाटते आहे! अर्थात, हे माझं व्यक्तिगत मत!
इतकेच काय माझी मैत्रिण स्वाती जाधव उत्तम संस्कृत पण्डिता आहे. आज तिला मुंबईतील लोक संस्कृतसाठी प्रचंड मान देतात.
मी मुंबईकर असून हे नांव प्रथमच ऐकतो आहे. कदाचित संस्कृत भाषेशी माझा फारसा संबंध नसल्यामुळे असे असेल!
असो..!
पहिल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे एकंदरीत उपक्रम मात्र छान वाटतो आहे. पुढील सर्व भागांना पुन्हा एकदा शुभेच्छा! भाषेमध्ये थोडी विनम्रता आणल्यास अधिक आवडीने वाचला जाईल असे वाटते. अर्थात, पुन्हा हेही माझे वैयक्तिक मत!
आपला,
(मिपावरील काही लेखकू महाशयांपैकी एक!) तात्या. :)
--
संस्कृत भाषा जगासि कळेना,
म्हणोनि नारायणा दया आली हो
देवाजीने परि घेतला अवतार
म्हणति ज्ञानेश्वर तया लागी हो!
@खरडपट्टी काढण्याकरता लिहिला गेल्यासारखा वाटतोय.
ह्या माझ्या खरवडण्याने कोणाच्या तरी बुद्धीवरील गंज खरवडला गेला तर चांगलेच आणि तुम्हाला माझी भाषा उद्धट वाटते पण मराठीची प्रवृत्तीच उद्धटपणाकडे झुकणारी आहे.
हिंदीचा गुळचटपणा तिला ह्या जन्मात जमणार नाही आणि पचणार पण नाही. ह्याचे मुख्य कारण म्हणजे भारतात महाराष्ट्राने जास्त स्वातंत्र चाखले आहे आणि हिंदीने सतत मोगलांची गुलामगिरी झेलली आहे त्यामुळे ती भाषा हुजरेगिरीची आहे.
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
ह्या माझ्या खरवडण्याने कोणाच्या तरी बुद्धीवरील गंज खरवडला गेला तर चांगलेच
बाय द वे, बुद्धीवरील गंज खरवडायचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेता हे माहीत नव्हतं! :)
आणि आधी मुळात तुमच्या बुद्धीवर गंज चढला नाही हे कशावरून?? तुमच्या लेखातील एकंदरीत भाषेवरून तुमच्याच बुद्धीवर संस्कृतच्या अहंकाराचा प्रचंड गंज चढला आहे असे वाटते!
असो..
मराठीची प्रवृत्तीच उद्धटपणाकडे झुकणारी आहे.
तुमच्या उद्धटपणाचे खापर विनाकारण मराठी भाषेवर का फोडताय?? उद्धटपणाची कुठेही झाक न दिसणारी मराठी भाषाही अनेकदा माझ्या वाचनात आली आहे!
हिंदीने सतत मोगलांची गुलामगिरी झेलली आहे त्यामुळे ती भाषा हुजरेगिरीची आहे.
असहमत आहे. हिंदी ही भाषादेखील अत्यंत गोड आहे, नम्र आहे, आदबशीर आहे, आर्जवपूर्ण आहे! तिला सरसकट हुजरेगिरीची भाषा असे म्हणून हिणवणे हे एकतर भाषेबद्दल घनघोर अज्ञानाचे लक्षण आहे किंवा मुजोरपणाचे लक्षण आहे!!
असो, या पुढे मला तुमच्याशी कोणताही वाद घालायचा नाही तसेच तुमची ही लेखमाला वाचायचीही इच्छा नाही.
पुढील लेखनाकरता माझ्या वैयक्तिक शुभेच्छा देऊन प्रतिसाद संपवतो..
तात्या.
@बुद्धीवरील गंज खरवडायचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेता हे माहीत नव्हतं! :)
अहो खरडपट्टी हा शब्द तुमचाच, मी फक्त त्यावर कोटी केली.
तुमच्या लेखातील एकंदरीत भाषेवरून तुमच्याच बुद्धीवर संस्कृतच्या अहंकाराचा प्रचंड गंज चढला आहे असे वाटते!
संस्कृतने अहंकार चढत नाही उलट आपल्याला ह्या जगात अनेक विषय अगम्य आहेत हे कळते. मी तर म्हणतेय, अहंकार सोडा आणि संस्कृतला आपली म्हणा.
तुमच्या उद्धटपणाचे खापर विनाकारण मराठी भाषेवर का फोडताय??
उद्धट हा शब्द पण तुमचाच. खरे बोलले आणि ते मार्मिक असले म्हणजे ते उद्धट बोलले असे तर नव्हे ना...
@हिंदी ही भाषादेखील अत्यंत गोड आहे, नम्र आहे, आदबशीर आहे, आर्जवपूर्ण आहे!
त्यालाच मी गुळचट म्हणाले. हे माझे मत आहे आणि तुम्ही त्याच्याशी असहमत असाल तर मला त्यात काही गैर वाटत नाही. हा मत स्वातंत्र्याचा प्रश्न आहे आणि तुमच्या मतस्वातंत्र्याचा मी आदर करते आहे. प्रसिद्ध विचारवंत व्हाल्तेअर म्हणतो, I disagree with every word you said but I defend with my life your right to say it.
तुमची ही लेखमाला वाचायचीही इच्छा नाही.
जशी आपली इच्छा. मी तुमच्या जागी असते तर आपली मते वेळोवेळी व्यक्त केली असती. चिडून दाखवले नसते. वादाचा मुकाबला संवादाने करायचा असतो भांडण करून पळून जाण्याने नव्हे.
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
@मी मुंबईकर असून हे नांव प्रथमच ऐकतो आहे. कदाचित संस्कृत भाषेशी माझा फारसा संबंध नसल्यामुळे असे असेल!
हे अजून एक विसंगत वाक्य.
हे म्हणजे, मला झांबियाची भाषा येत नाही. कारण कदाचित् मी कधी ती ऐकलीच नाही म्हणून असे म्हणण्यासारखे आहे.
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
"मला झांबियाची भाषा येत नाही. कारण कदाचित् मी कधी ती ऐकलीच नाही म्हणून असे म्हणण्यासारखे आहे."
म्हणजे काय हे मला समजले नाही. कारण जे आपण कानाने ऐकत नाही ते आपण शिकण्याची शक्यता कमी असते ....
कॄपया याचा अर्थ मला समजावून सांगता काय ? मराठीतच सांगितला तर उत्तम कारण संस्कॄत मला तेवढी चांगली येत नाही .
मला बिलकुल येत नाही असे मी म्हणत नाही ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
पण..........
संस्कृतबद्दल सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ही अध्यात्माची भाषा असून ती विशिष्ट जातीशी निगडित आहे.
असे मला तरी वाटत नाही. कोण म्हणालं असं? कोणाचा हि तसा गैरसमज नाहिये. माझ्या बघण्यात तरी असे कोणी आलेले नाही की ज्यांचा संस्कृत भाषेबद्दल आपण म्हणता तसा (गैर)समज/ आहे.
आणि तात्या म्हणतात त्याप्रमाणे, नक्की कोणत्या लेखकू महाराजांना आपण संस्कृत शिकवणार आहात? आणि आपल्याला संस्कृत समजत नाही असा जर कोणी कबुली जबाब दिला तर त्यात "प्रसिद्धिचा हव्यास काय?"
नक्की आपल्याला काय म्हणायचे आहे ते नाही कळले सृ.ला. ताई...
- (सर्वव्यापी)प्राजु
@संस्कृत समजत नाही असा जर कोणी कबुली जबाब दिला तर त्यात "प्रसिद्धिचा हव्यास काय?"
अहो प्राजुताई, प्रत्येक भाषेमध्ये संवादभाषा आणि साहित्यिक भाषा असा प्रकार असतो. कोणी म्हणाले की मला कठिण संस्कृत कळत नाही तर समजू शकते पण कोणी म्हणाले मला संस्कृत अजिबात समजत नाही (महाराष्ट्रात राहून) तर थोडे विचित्रच वाटते कारण बोली मराठीमध्ये सुद्धा सुमारे ७५% शब्द संस्कृत आहेत.
त्याबद्दलचा शांताबाईंचा लेख इथे वाचू शकता.
तरीपण एखादी गोष्ट न कळणे हे आपण कोणीही समजू शकतो पण हे सांगताना ह्या लेखक महाशयांचा जो हेल Tone होता तो मला खुपला.
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
संस्कृत, संस्कृती, जात, धर्म, राजकारण, टीका (खरडपट्टी) सगळे अगदी जमुन आले आहे.
"मम नाम सृष्टीलावण्या । अहं दादरनगरे निवसामि । अहं प्रत्येक-बुधवासरे रेलयानेन
वान्द्रानगरं गच्छामि । अहं युवति । अहं शिक्षिका । अहं अनुवादिका च। अहं भारतीया, महाराष्ट्रीया च। आशा नाम मम माता। अनंत नाम मम पिता।"
अंदाजे अनुवाद असा आहे का? तर मग समजले हे वरचे संस्कृत.
माझे नाव सृष्टीलावण्या. मी दादर नगराची(चा) रहीवासी आहे. मी प्रत्येक बुधवारी रेल्वेने वांद्रे नगर येथे जाते(तो). मी युवती आहे. मी शिक्षीका आहे. मी अनुवादीका (पण) आहे. मी भारतीय आणि महाराष्ट्रीय आहे. माझ्या आईचे नाव आशा आहे. माझ्या वडीलांचे नाव अनंत आहे (किंवा आशा नाव माझ्या आईचे. (व ती) अनंत नावे (ठेवते) माझ्या वडलांना . ;-)) ह. घ्या. केवळ गमंत. कृपया माफी असावी.
भाग २ च्या प्रतिक्षेत.
>>किंवा आशा नाव माझ्या आईचे. (व ती) अनंत नावे (ठेवते) माझ्या वडलांना . ;-) <<
सहजराव १० वी चा संस्कृतचा वर्ग आठवला. :)))))))
सृष्टीलावण्या, एकदम सुंदर उपक्रम सुरु केला आहेस, पुढच्या लेखापासुन कोणतेही वैयक्तिक संदर्भ (संकेतस्थळावरचे अन बाहेरचे पण) येउ देउ नकोस, तिरके प्रतिसाद संस्कृत बद्दलच्या कुतुहुलाबद्दल असु दे, लेखमाला यशस्वी होइल. आणी सगळे (हो सगळे) लोक कौतुकही करतील.
शुभं भवतु |
आम्ही संस्कृताकडे ढुंकूनही पाहणार नाही, च्यायला इथे आम्हाला मराठी नीट लिहिता येत नाही, अजूनही आमच्या -स्व, दीर्घाच्या वेलांट्या नक्की होत नाही, इकडून द्यायची की तिकडून द्यायची, पहिली का दुसरी.........असे असतांना संस्कृत वर लेखन करुन मराठी माणसाला बळजबरी संस्कृताची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे येडगावला जाण्याऐवजी पेडगावला घेऊन जाण्यासारखे वाटते आहे.
अवांतर :- वरील विधाने, अत्यंत नम्रपणे लिहितो आहे. आमच्या भाषेत /लेखनात कोणताही अहंकार जाणवल्यास तो आमच्या या मराठी भाषेचा दोष समजावा. :)
अवांतर :- वरील विधाने, अत्यंत नम्रपणे लिहितो आहे. आमच्या भाषेत /लेखनात कोणताही अहंकार जाणवल्यास तो आमच्या या मराठी भाषेचा दोष समजावा. :)
हा हा हा बिरुटेशेठ, हे बाकी मस्त! :))
आम्हालाही नाचता आलं नाही की आम्ही 'अंगणच वाकडं होतं!' असं म्हणून मोकळे होतो! :)
तात्या.
@आम्ही संस्कृताकडे ढुंकूनही पाहणार नाही,
तुम्ही संस्कृतकडे ढुंकूनही पाहू नका. कारण संस्कृतकडे पाहायची फारशी गरज नाहीच आहे. उलट संस्कृतच तुमच्याकडे प्रेमळपणे बघतेय. ज्ञानोबा म्हणालेच आहेत, घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लांपाशी.
असे असतांना संस्कृत वर लेखन करुन मराठी माणसाला बळजबरी संस्कृताची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे येडगावला जाण्याऐवजी पेडगावला घेऊन जाण्यासारखे वाटते आहे.
संस्कृत आपल्या सर्वांच्या रक्तातच आहे आणि स्वत: बद्दल कोणाला प्रेम वाटत नाही. इथे प्रेम निर्माण करण्याचा संबंधच येत नाही. तुम्हाला दिलीप नाव आवडते म्हणजे संस्कृत आवडतेच आणि माझा प्रयत्न संस्कृत गळी उतरवण्याचा नाही. फक्त तिच्याविषयीचे गैरसमज दूर करण्याचा आहे.
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
मराठी भाषेवर संस्कृतचा प्रभाव असेलही पण सर्वात जास्त प्रभाव आहे तो प्राकृत भाषेचा. ’राजशेखर’ नावाचा प्राकृत कवीने संस्कृत प्राकृतीची तुलना करतांना संस्कृत भाषेला ’कठोर, व राकट पुरुषी, भाषा असे म्हटले आहे. तर प्राकृत भाषेला सुकुमार, व नाजूक कमनीय भाषा म्हटले आहे......असो,
प्राकृत आणि त्याबरोबरच्या मागधी,पाली, महाराष्ट्री, शौरसेनी, पैशाची, अप्रभ्रंशी, जैन महाराष्ट्री...या भाषांच्या कणाकणातून मराठी भाषा सिद्ध झाली आहे, हे आता पुन्हा सांगण्याची गरज नाही, असे वाटते.
त्यामुळे संस्कृतविषयी आम्हाला कधीच प्रेम निर्माण झाले नाही, आणि त्याच्याविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत त्यासाठी कोणाच्या लेखाची वाट पाहावी लागली नाही, पाहणार नाही.
" दिलीप " नावाविषयी......या नावात काही संस्कृतच्या काही खाणाखूणा असतील तर त्या आम्हाला माहित नाही, ’दिलीपकुमार’ च्या नावावरुन दिलीप हे नाव आम्हाला मिळाले आहे :)
दिलीप- रघू- अज- दशरथ- राम--------> ’दिलीप ने सुराज्यासाठी प्रयत्न केले म्हणुन पाचव्या पीढीत ’रामराज्य’ आले.
मिसळपाववर ’दिलीप’ मराठी-बोली भाषेसाठी तळमळून मरमर करीत लिहीत राहील, तेव्हा येणा-या पाचव्या पीढीत ’मराठी’ शिवाय अन्य कोणतीही भाषा महाराष्ट्रात राहणार नाही. म्हणुन हा आमचा प्रतिसाद (टाळ्य़ांचा कडकडाट :) )
जी बहुजनांची भाषा होऊ नये म्हणुन सतत प्रयत्न झालेत. त्या भाषेचा आजच्या काळात काही लोकांना राहून राहून पुळका का येतो कोणास ठाऊक ? त्या भाषेत काही दम असता तर कधीतरी नव्हे, आजतरी ती जीवनव्यवहाराची भाषा झाली असती, त्याबरोबर कविता, चारोळ्या, लेख, नाटक कितीतरी प्रकार आज त्या भाषेत दिसले असते......पण आता मृत भाषेत आता काही नवनिर्मीती होऊच शकत नाही, तेव्हा या मृत भाषेला जीवंत करण्याचा चुकूनही प्रयत्नही करु नये असे मनोमन वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्यामुळे संस्कृतविषयी आम्हाला कधीच प्रेम निर्माण झाले नाही, आणि त्याच्याविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत त्यासाठी कोणाच्या लेखाची वाट पाहावी लागली नाही, पाहणार नाही.
क्या बात है, बिरुटेशेठ! आपण साला सहमत आहोत तुमच्याशी!
’दिलीपकुमार’ च्या नावावरुन दिलीप हे नाव आम्हाला मिळाले आहे :)
हा हा हा! :)
मिसळपाववर ’दिलीप’ मराठी-बोली भाषेसाठी तळमळून मरमर करीत लिहीत राहील, तेव्हा येणा-या पाचव्या पीढीत ’मराठी’ शिवाय अन्य कोणतीही भाषा महाराष्ट्रात राहणार नाही. म्हणुन हा आमचा प्रतिसाद (टाळ्य़ांचा कडकडाट :) )
टाळ्या!!!!! दिलिपशेठचा विजय असो... :)
जी बहुजनांची भाषा होऊ नये म्हणुन सतत प्रयत्न झालेत.
येस्स! आणि हे प्रयत्न संस्कृतच्याच काही हलकट डुढ्ढाचार्यांनी केले आहेत.. हरामखोर लेकाचे!
त्या भाषेत काही दम असता तर कधीतरी नव्हे, आजतरी ती जीवनव्यवहाराची भाषा झाली असती, त्याबरोबर कविता, चारोळ्या, लेख, नाटक कितीतरी प्रकार आज त्या भाषेत दिसले असते......पण आता मृत भाषेत आता काही नवनिर्मीती होऊच शकत नाही, तेव्हा या मृत भाषेला जीवंत करण्याचा चुकूनही प्रयत्नही करु नये असे मनोमन वाटते.
क्या बात है बिरुटेशेठ! पटले आपले म्हणणे! आज आमच्यासारखा सामान्य माणूस या भाषेपासून चार हात दूरच राहू इच्छितो ही वस्तुस्थिती आहे..
बिरुटेशेठ, सुंदर प्रतिसाद...!
आपलाच,
तात्या.
सृष्टीलावण्य....
नमस्कार,
आपण संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे जे कार्य करीत आहात, त्याचे आम्ही स्वागत करतो आणि तुम्हाला या कार्यात उदंड यश मिळो अशी श्री व्याडेश्वरचरणी प्रार्थना करतो.
आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत.
आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत
तुम्हाला माझी भाषा उद्धट वाटते पण मराठीची प्रवृत्तीच उद्धटपणाकडे झुकणारी आहे.
तुमच्या वरील विधानाशी आम्ही पूर्णपणे असहमत आहोत. संस्कृतबद्दल प्रेम असणार्या एका सृजनशील व्यक्तीकडून वरील विधान केले जाते ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे.
ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे-
माझा मराठाचि बोलु कवतुके| तरी ते अमृतातेही पैजा जिंके|
ऐसी अक्षरे रसिकें| मेळवीन ||
अशा अमृताला पैजेने जिंकणार्या मराठी भाषेला उद्धटपणाचे बिरूद चिकटवणे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. आम्ही आपल्या वरील विधानाचा जाहीर निषेध करतो.
ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेवांपासून ते बहिणाबाईंपर्यंत अनेकांनी या भाषेचा अमृतासम असलेला गोडवा समाजात वाटला. आणि अशा परिस्थितीत, स्वतःच्या उद्दामपणाचे खापर मराठीभाषा उद्धट आहे, असे ठरवून तिच्यावर फोडायचे या कृतीचे समर्थन होऊ शकत नाही.
संस्कृत ही देववाणी समजली जाते. जगातील सर्वात प्राचीन भाषांमध्ये तिची गणना होते. संस्कृत ही अतिशय सुंदर भाषा आहे. अनेक भारतीय भाषांची जननी आहे. संस्कृतभाषेला कमी लेखण्याचे कोणालाच काही कारण नाही. पण संस्कृतचे प्रेम इतर भाषांना शिव्या देऊन व्यक्त करणे याला काही अर्थ नाही असे वाटते.
तेव्हा कृपया वरील पद्धतीची विधाने सार्वजनिक व्यासपीठावर होणार नाहीत याची काळजी आपण घ्यावी अशी आपणास हात जोडून विनंती आहे.
आपला,
(मराठीभक्त) धोंडोपंत
संस्कृतप्रचारासाठी पुन्हा शुभेच्छा.
आपला,
(गीर्वाणप्रेमी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
संस्कृतबद्दल प्रेम असणार्या एका सृजनशील व्यक्तीकडून वरील विधान केले जाते ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे.
अशा अमृताला पैजेने जिंकणार्या मराठी भाषेला उद्धटपणाचे बिरूद चिकटवणे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे.
सहमत आहे...
आणि अशा परिस्थितीत, स्वतःच्या उद्दामपणाचे खापर मराठीभाषा उद्धट आहे, असे ठरवून तिच्यावर फोडायचे या कृतीचे समर्थन होऊ शकत नाही.
हा हा हा! हे बाकी खरं बोल्लास रे धोंड्या! :)
पण संस्कृतचे प्रेम इतर भाषांना शिव्या देऊन व्यक्त करणे याला काही अर्थ नाही असे वाटते.
कदाचित हाच सु'संस्कृत' पणा असावा रे धोंड्या! :)
आपला,
(उर्दूप्रेमी!) तात्या.
@तुम्हाला माझी भाषा उद्धट वाटते पण मराठीची प्रवृत्तीच उद्धटपणाकडे झुकणारी आहे.
तुमच्या वरील विधानाशी आम्ही पूर्णपणे असहमत आहोत. संस्कृतबद्दल प्रेम असणार्या एका सृजनशील व्यक्तीकडून वरील विधान केले जाते ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे.पण मुळात उद्धट हा शब्दच माझा नव्हे. मला वाटते की लोकांनी स्वतंत्र मत लिहिले की काही जणांना तो उद्धटपणा वाटतो.
असो. केवळ शब्दाला शब्द वाढत गेला...पण ह्यात भाषेच्या अपमानाचा संबंध येतो कुठे... भाषा कशी जाणवते हा तर भाषाशास्त्राचा विषय आहे... एकाच गोष्टीबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असू नयेत का?
आणि मराठीबद्दल माझे मत हे शेवटी माझे मत आहे त्यावर आपले मत हे असायचेच. मी परत म्हणेन की हा मत स्वातंत्र्याचा प्रश्न आहे.
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
अशा अमृताला पैजेने जिंकणार्या मराठी भाषेला उद्धटपणाचे बिरूद चिकटवणे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे.
सहमत आहे
मराठी थोडी कडक आहे
काञ करणार स्वतंत्र वृत्तीच्या राज्यकर्ते व योद्धयांची भाषा कडकच असणार
हिंदीत गोडवा आहे
लेखिकेला कदाचीत बिहारी युपी कडील गुळमट हिन्दी ऐकायला मिळाली असेल
नशीब तिचेः)
http://www.bhashaindia.com/Patrons/LanguageTech/Marathi.aspx
यांचे म्हणणे वाचा
"Marathi - The Language of Warriors
Marathi is the language of the warrior nation that fought the powerful Mughal Empire to a standstill and established itself as a symbol of the struggle for Indian independence during the 1857 Mutiny "
बाकी चालु द्या
नाना
तो लेखकू महाशय मी तर नव्हे ना?
एका प्रतिसादात तस॑ म्हणालो होतो मी, 'रेडिओवरच्या स॑स्कृत बातम्यासुद्धा कळत नाहीत' अस॑.
च्यायला, 'मजाक मजाक मे इतना बडा लोचा होगा' अस॑ खर॑च वाटल॑ नव्हत॑ हो !
असो,
सृष्टीताई, तुझ॑ स॑स्कृत मला झेपल॑. आता थोडा थोडा आत्मविश्वास वाटतोय. 'ऐकून बघतो रेडिओवरच्या बातम्या' :-)
ह्या निमित्ताने का होईना, एव्हढ्या चा॑गल्या भाषेबद्दल थोडी का होईना आत्मियता निर्माण झाली माझ्यासारख्या दगडाला, तरी बक्कळ आहे.
पुढच्या भागा॑च्या प्रतिक्षेत.
- धमालम् !
जर तू तोच असशील तर तुझे काही खरं नाही!
सृष्टीताईनी तुला स॑स्कृतमध्ये झापला तर तुला काही कळणार तरी आहे का? बाकी माफी मागितली हे योग्यच केलंस!
राजमुद्रा :)
विजुभाऊ,
अहं तत प्रित्यर्थं मिसल पाव ग्रुहे वेटं करिष्यामी
म्हणजे त्यासाठी मी मिपा घरी wait करतो आहे अस॑ आहे का रे?
लय भारी, एकदम विलायती स॑स्कृत वाटल॑. :-)
-अचरटम् धमालम्
अहं तत प्रित्यर्थं मिसल पाव ग्रुहे वेटं करिष्यामी
हा हा हा! मस्त.. :)
बाय द वे, संस्कृतमध्ये मिसळपावला काय म्हणतात हो? :))
विजुभाऊ, तुमचं संस्कृत लै भारी दिसतंय. मग मला एक सांगा,
'तात्या, हा एक नंबरचा हलकट आणि भिकारचोट माणूस आहे'
याचं संस्कृत भाषांतर तुम्ही कसं कराल हो? :)
आपला,
(संस्कृत भाषेचा एक प्रामाणिक विद्यार्थी!) तात्या.
तात्या प्रथम क्रमांकस्य 'भिकारचोटं' अस्ति|
कसले चपखल भाषांतर केले आहे तात्या.. जमले का नाही? (जरा जास्तच ह्.घ्या. कारण मी पण जरा जास्तच चिटवळ्पणा केला आहे.)
पुण्याचे पेशवे
माफ करा सृष्टीलावण्या !
तुम्हाला ज्यांचा प्रतिसाद आला असेल की संस्कृत अजिबात येत नाही तो कदाचित खराही असू शकतो. कारण मी स्वतः ८ वी ते १० वी संस्कृत विषय शिकले. पण मला स्वतःला संस्कृत येत नाही. म्हणजे संस्कृतचे मराठीत भाषांतर करता येते पण मराठीचे संस्कृतमध्ये भाषांतर करता येत नाही. पण मार्कस् मात्र ७५ ते ८० मिळायचे. कारण पेपरमध्ये संस्कृतचे मराठीत भाषांतर करण्यालाच जास्त मार्कस् असायचे, पण संस्कृत सोपी आहे असे मला मुळीच वाटत नाही (कदाचित मी फार हुशार नाही म्हणून असेन). वर दिलेली वाक्य सोपी आहेत म्हणून अंदाजाने समजत आहेत, पण अवघड वाक्ये समजतीलच असे नाही. त्यामुळे ही भाषा सर्वसामान्यांसाठी सोपी नाही कारण, मराठी जे टपोरी शब्द सामावून घेऊ शकते ते संस्कृत सामावून घेवू शकेल? संस्कृत तिच्या खोलात जाऊनच ती शिकावी लागते. मराठी किंवा हिंदीसारखी ती नुसती ऍकून शिकता येणार नाही. जरा इकड्चा शब्द तिकडे झालेला संस्कृतला खपत नाहे.
माझ्या माहितीवरून संस्कृतला देववाणीही म्हणतात, त्यामुळे ती कुठल्याही जातीपातीची होऊच शकत नाही.
एक मात्र खरे की या भाषेला काळाच्या ओघात टिकता आले नाही (जशी मराठी महाराष्ट्राची, गुजराती गुजरातची तशी संस्कृत कुठल्या समुदायाची आहे का? असल्यास क्षमस्व ). याचे कारण म्हणजे संस्कृत जन्माला आल्यापासून जराही बदलली नाही (माझ्या माहितीप्रमाणे ). निसर्गाच्या नियमानुसार जी गोष्ट बदलत नाही ती लोप पावते. मराठी किंवा अन्य भाषा बदलल्या म्हणून टिकल्या. जर तुम्ही एखादा संस्कृत उतारा किंवा श्लोक घेवून तो मराठीत शब्दशः समजवून सांगणार असाल किंवा संस्कृतमधील व्याकरण समजावून सांगणार असाल किंवा मराठी उतार्याचे संस्कृतमध्ये भाषांतर करायला शिकवणार असाल तर उपक्रम स्तुत्य आहे! , कि या लेखातून कुठल्याही भाषेचा अनादर करू नका असे सांगायचे आहे?या लेखनाचे तुमचे प्रयोजन काय आहे? हे नक्की लिहा
राजमुद्रा :)
तुम्हाला ज्यांचा प्रतिसाद आला असेल की संस्कृत अजिबात येत नाही तो कदाचित खराही असू शकतो. कारण मी स्वतः ८ वी ते १० वी संस्कृत विषय शिकले. पण मला स्वतःला संस्कृत येत नाही. म्हणजे संस्कृतचे मराठीत भाषांतर करता येते पण मराठीचे संस्कृतमध्ये भाषांतर करता येत नाही. पण मार्कस् मात्र ७५ ते ८० मिळायचे. कारण पेपरमध्ये संस्कृतचे मराठीत भाषांतर करण्यालाच जास्त मार्कस् असायचे, पण संस्कृत सोपी आहे असे मला मुळीच वाटत नाही (कदाचित मी फार हुशार नाही म्हणून असेन). वर दिलेली वाक्य सोपी आहेत म्हणून अंदाजाने समजत आहेत, पण अवघड वाक्ये समजतीलच असे नाही. त्यामुळे ही भाषा सर्वसामान्यांसाठी सोपी नाही कारण, मराठी जे टपोरी शब्द सामावून घेऊ शकते ते संस्कृत सामावून घेवू शकेल? संस्कृत तिच्या खोलात जाऊनच ती शिकावी लागते. मराठी किंवा हिंदीसारखी ती नुसती ऍकून शिकता येणार नाही. जरा इकड्चा शब्द तिकडे झालेला संस्कृतला खपत नाहे.
१००% सहमत
सृष्टीलावण्या आपण जर इथी संस्कृतचे वर्ग भरवणार असाल तर आमचे नाव पहिले नोंदवा.अवघड असली तरीही शिकायला आवडेल.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
राजमुद्रांशी मी सहमत आहे.
आपली पण तिच्यायला शाळेत असताना संस्कृतची साफ बोंब होती. मास्तरीण बाई काय शिकवत आहेत ते सालं समजायचंच नाही. सगळं डोक्यावरून जायचं आणि जाम झोप यायची! :)
असो...
आपला,
(कालिदासाच्या मेघदूताचा संगीतकार!) तात्या.
राजमुद्राताईंनी जे सागितले ते अगदी योग्य आहे. माझे शाळेत असतांना होते संस्कृत चांगले. मार्क्स सुद्धा चांगले मिळवले मी. काही सुभाषिते अजूनही पाठ आहेत. पण त्यानंतर संस्कृतचा म्हणावा तसा संबंध राहिला नाही. आपण इथे गोष्टी लिहिणार असाल अर्थासहीत, तर मी अगदी मनापासून वाचेन. पण मराठी भाषेला नावे नका हो ठेऊ.. कारण जे काही चार्-दोन शब्द लिहिता येतात मला त्या याच भाषेत. त्यामुळे माझे मराठीवर अंमळ जास्तीच प्रेम आहे. -
(सर्वव्यापी)प्राजु
मत्प्रिय धमाल्या मला तसेच म्हणायचे आहे..
नव्या भाषेतले शब्द आले तर भाषा वाढते म्हणे..हिंदीत बघ तकनीक्(टेक्नीक) त्रासदी(ट्रॅजेडी) कसे चपखल बसतात.
मराठीत बेष्ट / लई ब्येस (बेस्ट) हे झकास शब्द असेच आहेत..
अरे हो काही शब्दांच्या गमती आहेत..
मला परवा शोध लागला की "कजाग" ह शब्द कझाकीस्तान मधला "कझाक"जमात या वरुन आला आहे .( बघ कझाक पुरुष कसे शूर आहेत ते. त्या सगळ्यांच्या बायका कजाग असतात. ....आपण भारतिय आहोत याचे मला आता बरे वाटत आहे)
तुझा भारतिय
विजुभाऊ
उप प्र. "मला खात्री आहे की एवढ्या विवेचनानंतर सुद्धा काही मंडळींना खुसपटे काढण्याची सवय असेल. त्यांच्या
समाधानासाठी पुढील भागात माझी लाडकी "सत्यकाम जाबालीची कथा" देणारच आहे. "
यातला "च" नसता तर चालले असते की..बर जाउदे...त्या जाबाली ला जिवंत करा की त्याची गोष्ट सांगायचे एक सत्य काम होउन जाउदे
मला वाटते त्यांना 'यंदा रास कला'(शिकायची आहे काय?) असे सांगायचे असावे;परंतू नविन सदस्य असल्याने टंकलेखनाच्या चूकिमूळे त्यांनी तसे लिहीले असावे.(ह. घ्या. )
(इनोबा मास्तर)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
प्रतिक्रिया
स्वागत..
महाभारतातील संस्कृत बोलणारी पात्रे
जबरा...
शुभेच्छा
प्रियालीचा विजय असो..:)
कप्पाळ!!
सत्यकाम जाबालीची कथा
:)
कुणाची तरी
असहमत..
मी पण असहमत..
अरे देवा...
म्हणजे काय ?
उपक्रम सुंदर..
कोण म्हणालं असं?
आपल्याला
संस्कृत,
हा हा हा
संस्कृत कळत नाही.
:))
पटले..
मेलास! :)
आमचे कोणीही प्रबोधन करु नये !!
सहमत..
स्वागत, शुभेच्छा, असहमती
सहमत आहे..
हे पण पटले...
अशा
राकट
तो लेखकू
आता धमाल तुझे काही खरं नाही!
ते ......
सत्यकाम जाबली चा बळी..........
च्यामारी..
हाहाहा ....
:))
भाषांतर
:)
वदतोव्याघात
याचा अर्थ होतो...
हा अर्थ मी मागील चर्चेत दिलाय.
माफ करा :) संस्कृत ग्रेटच आहे पण सोपी नाही.
सृष्टीलावण्या क्लासेस
सहमत आहे..
हो.
होय धमाल्या
नमस्कार,
सुस्वागतम्
टंकलेखनाची चूक?
हाहाहा ....