गावडेसाहेब,
सुंदर कविता!
भरून आले पाण्याने डोळे, पण
म्हटलं अस खचून जायचं नाही
आयुष्यात अस होतंच राहणार
निराशेचा गुलाम व्हायचं नाही
वरील ओळी सुंदर आहेत...
तात्या.
कितीही येऊ दे वादळं वाटेत माझ्या
असंख्य तुफानाना टक्कर देईन मी
असेल जरी इथे आज अंधार चहूकडे
उद्या उज्वल यशाचा दिवस पाहिन मी
ओळी आवडल्या. आगे बढो!
चतुरंग
फार सुंदर कविता. वाचनखुणांमधे घातले...किप इट अप!
मला कुसुमाग्रजांच्या "कणा"या कवितेतील विद्यार्थ्याच्या "बाण्या"ची आठवण झाली. छोटेसे काव्य असल्याने, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खाली लिहीत आहे:
ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
"गंगामाई पाहूणी आली" गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली
भिंत खचली,चूल विझली, होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेउन सर आता, संगे लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला
पैसे नको, जरा एकटे पणा वाटला
मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून, नुसते लढ म्हणा
धन्यवाद विकासराव,
कुसुमाग्रजांची माझी ही अतिशय आवडती कविता!
प्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे ही कविता फार सुंदर म्हणतात असा माझा अनुभव आहे...
आपला,
(कुसुमाग्रजप्रेमी) तात्या.
छान आहे..
सुंदर...
दुर्दम्य आशावाद
खूप छान काव्य सतीश.
सुंदर कविता
आवडती..