महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक टक्केवारीच्या साहाय्याने मी काही मते बनवायचा विचार करतोय. मात्र "हा म्हणाला", "तो म्हणाला" वगैरे सारखी राजकारणी लोकांची मते मी आधार म्हणून घेणार नाहीये. तर्क करताना कोणतेतरी सांख्यकीय गणित त्यामागे असावे असा उद्देश आहे. राजकीय धाग्यांवर बरीच हुशार लोक भरपूर लिखाण करतात. पण त्यासाठी टिव्ही, वर्तमानपत्रे यातील बातम्या यांचा आधार घेतात. मला वाटते हा आधार घ्यावाच पण तो कोणत्यातरी सांख्यकीय विश्लेषणाच्या साहाय्याने तपासून घ्यायला हवा. आपोआपच बिटवीन द लाईन्स वाचायची कला साध्य होऊ शकेल. तसेच ही माध्यमे आपल्याला शेंडी लावायची शक्यता कमी होऊ शकेल.
विधानसभा निवडणूकी बरोबरच टक्केवारीच्या आधारे आपली लोकशाही कुढे चालली आहे त्याबाबत माझे मत मांडायचाही विचार आहे. पण ते कधी जमेल माहीत नाही. किंवा प्रतिसादामध्येच मी त्याबाबत लिहीन.
मी एका धाग्यावर माझी मते मांडली होती. तीच परत देत आहे. त्यानंतर काही मतदारसंघांची उदाहरणे देत आहे. यासाठी अल्फाबेटीकली पहिल्या १० मतदारसंघांचा नमुना म्हणून मी अभ्यास केला व त्यातून वेगळे काहीतरी घडत असल्याचे जाणवणारे चार मतदार संघ निवडून त्याचे तक्ते जोडत आहे. याच पध्दतीने इतर जणं पण यात भर घालू शकतील. पण मतदान टक्केवारी व त्यातून निघणारा अन्वयार्थ असे त्याचे स्वरूप असेल तर बर होईल. सगळ्यांनाच एका वेगळया पध्दतीने विचार करायला किंवा शिकायला मिळू शकेल. इतकेच नव्हे तर बातम्यांवर विसंबून न राहता आपणही थोडेफार विश्लेषण करू शकू.
राजकारणावरील धागा म्हणजे निव्वळ लाथाळ्या, हे मत बदलले तर अशा प्रकारच्या धाग्यावर अनेक हुशार लोकं भाग घ्यायला लागावीत हा या धाग्या मागचा मुख्य उद्देश आहे.
---------------------------------------------
मी 13 Nov 2019 - 11:55 am ला मांडलेली मते पुढे देत आहे.
१. मला तरी असेच वाटतेय की, राकाँ व काँग्रेसच्या साहाय्याने मुख्यमंत्री पद मिळवायचे शिवसेनेने अगोदरच ठरवलेले असावे. अन्यथा निवडणूक निकाल लागण्याची प्रक्रिया चालू असतानाच, सर्व पर्याय खुले असण्याची घोषणा झाली नसती. ती घोषणा, एका प्रदीर्घ घटनेतील एक टप्पा असावी असेच माझे मत बनले. शिवसेनेच्या हातात कोणतीच हुकमाची पाने नव्हती हे आता कळल्यावर, शिवसेनेचा आक्रमकपणा पाहून माझे हे मत जास्त पक्का झालंय. मनसे शिवसेनेचा कट्टर शत्रू. त्यालापण शिवसेनेची मते जाताहेत हे जाणवल्यावर माझा हा संशय जास्तच बळावला. हे तपासायला पुण्याचे उदाहरण पुरेसे आहे.
अजून लढवलेल्या जागांवरची टक्केवारी जाहीर झाली नाहीये. ती मिळाली असती तर जास्त पुराव्यानिशी माझे मत मांडता आले असते. असो.
२. त्यामुळे जिथे भाजपाचा उमेदवार उभा होता तिथे शिवसेनेची बरीच मते राकाँ व काँग्रेसला गेली आहेत. कारण या दोघांचा निवडणूक निकालानंतर पाठिंबा मिळवायचा असेल तर त्यांचे आमदार निवडून आले पाहिजेत ही तर शिवसेनेचीच गरज बनते व भाजपाचे १४४ आमदार होऊ नयेत ही जबाबदारी ठरते. ह्या दोन्ही गोष्टी पवारसाहेबांच्या फायद्याच्या असल्याने त्यांनीही तोंडभरून आश्वासने दिली असणे शक्य आहे.
३. १९६७ पर्यंत काँग्रेसला विरोधकांची भिती वाटत नव्हती. पण लोहियांची विरोधी पक्षांची युती बनवून काँग्रेस विरोधात एकास एक उमेदवार देण्याची नीती यशस्वी होते म्हणाल्यावर, विरोधकांची एकजूट होऊ नये यासाठी डावपेच आखणे हे काँग्रेसचे मुख्य धोरण बनले.
त्यानुसारच पवारसाहेब राजकारण करतात व त्यात ते सद्या तरी सर्वात पाराविना आहेत असे वाटते. यावरून महाराष्ट्रात युती भारी पडतेय म्हणाल्यावर त्यात फूट पाडणे हेच आघाडीचे दिर्घकालीनधोरण असणार यात काही संशय नाही.
थोडक्यात महाराष्ट्रातील निवडणुकांत काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित लढणे व शिवसेना व भाजपाने वेगवेगळे लढणे हा एक मार्ग आहे जो आघाडीला सत्तेपर्यंत नेऊ शकतो.
जर युती तुटली असेल तर ती फक्त ताणली जात राहील एवढेच फक्त पाहावयाचे आहे व परत जोडली जाऊ नये यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. त्यासाठी शिवसेनेचे सरकार यावयाची जरूरी नाही.
४. परत निवडणुका झाल्या तर त्या शिवसेना व भाजपाने एकत्रित लढवू नयेत एवढीच आघाडीची इच्छा किंवा ध्येय असावे असे वाटतेय. यासाठी प्रथम राज्य यांना बाजूला केले. या राज्यच त्रासातून शिवसेना खूप मागे खेचली गेली. बाळासाहेबांची पुण्याईही कामी येऊ शकली नाही. त्याचा फायदा त्यांना २०१४ पर्यंत झाला. फोडा व झोडा पध्दतीत नेहमी रागीट माणसाला हाताशी धरले जाते. कारण रागाच्या भरात त्याच्यावर कब्जा मिळवणे सोपे असते. त्यामुळे यावेळी राऊतांद्वारे शिवसेनेला जाळ्यात पकडण्यात आलेय. राऊतांवरचा ऊध्वजींचा विश्वास हे हत्यार वापरले गेलंय.
५. पण मोदी उदयानंतर सगळंच गणित फिसकटायला लागलेय. शिवसेनेच्या बळावर मोठे होण्याची अगतिकता भाजपाची राहिलेली नाही. भाजपचे वाढते बळ त्याचा पुरावा आहे. त्यामुळे परत निवडणुका झाल्या व शिवसेना वेगळी लढली तर त्यांची आघाडीला गेलेली मते परत फिरतील.
भाजपकडे या वेळेस इच्छुक जास्त झाले होते व जागा २०१४ पेक्षा कमी झाल्या होत्या. पण परत निवडणुका झाल्यास, लढायच्या जागा १५६ वरून २८८ झाल्यामुळे बंडखोरांचा प्रश्न सुटेल. भाजपातील लाॅयल कार्यकर्ते त्यामुळे खूश झाल्याने पुढच्या निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढेल, जी शहांची नेहमीचीच रणनीती आहे.
६. जर शिवसेनेने पुढील निवडणुकीत आघाडीशी हात मिळवणी केली तर भाजपाला ते हवेच असेल. धृवीकरण भाजपाला नेहमीच फायद्याचे ठरत आले आहे.
काँग्रेस विरोधातील आपला अवकाश शिवसेना आपणहून सोडून देत असेल तर भाजपा नक्कीच खूश होईल. भाजपा यापध्दतीनेच मोठी होत आली आहे. मात्र यासाठी संधीची वाट बघत बसायला लागते व त्यासाठी खूप पेशन्स लागतो. तो मोदी शहांकडे नक्कीच आहे असे वाटते.
७. थोडक्यात, भाजपा, काँग्रेस व राकाँ यांचे पुढील धोरण निव्वळ वेळकाढूपणाचे असेल असे वाटते. यासाठी एखादी कोर्टकेस वगैरे सारखा उपाय योजणे हा मार्ग मस्त. जो काँग्रेस नेहमीच अवलंबते. फक्त कोणाकडे तरी बोट दाखवता आले की झाले.
राऊतांनी बोलणी पवारांशी केली. ते आता पवारांकडे बोट दाखवत असतील. पवार बोट दाखवताहेत काँग्रेसकडे. काँग्रेस बोट दाखवतीय केरळ काँग्रेसकडे.
८. पण
जास्तीचं काहीही न देता शिवसेना जवळ येत असेल तर भाजपा ही संधी साधेल असं वाटते.
दीड दोन महिने फडवणीस संपले संपले असं वाटत असताना परत उभे राहतात, असं बऱ्याच वेळेस झालंय. या वेळेसही हे होऊ शकते.
या वेळेसही फडणवीस यांनी समारोपाच्या वेळी युतीच सरकार बनवेल असं म्हणूनच ते थांबले आहेत.
९. असंच होणं योग्य असेल. कारण राजकारणात डाव ओळखून प्रतिडाव टाकावा लागतो. बाकी सगळे गौण याचे भान राखावे लागते. जर युती तुटावी हा डाव असेल तर युती टिकवणे हाच प्रतिडाव असतो. शिवसेना कशी वागली याबाबत सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांना येणारा राग नेत्यांना पोटात ठेवावा लागतो.
भाजप पुढेमागे युती तोडेलही. पण ती सोयीची वेळ ते ठरवतील. पवार साहेबांनी त्यांच्या सोयीने निवडलेली वेळ भाजपाने साधणे शहाणपणाचे ठरणार नाही.
अर्थात हे सर्व राजकारणी माझ्यापेक्षा नक्कीच हुशार असणार म्हणा. :)
---------------------------------------------------
२०१९ विधानसभेच्या टक्केवारीच्या गमतीजमती
१. अक्कलकुवा (1)
आघाडी
युती
इतर दखलपात्र पक्ष
२०१४ ला नागेश पडवी यांनी भाजपातर्फे उभे राहून १८.६८% मते मिळवली होती. तर आमश्या पडवी यांना ५.९१% मते मिळाली होती. खरं तर या जागेवर भाजपाने जास्त मते मिळवली असूनही ही जागा शिवसेनेला सोडायला लागली. मागच्या वेळेचा भाजपा उमेदवाराला ऐनवेळी माघार घ्यायला लावल्यावर त्याने चिडून जाऊन बंडखोरी केली. तरीही या वेळेस शिवसेनेला ४०.२१ टक्के मते मिळाली. मतांची ही वाढ आश्चर्यकारकच आहे.
खरे तर २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेस२७.७८ टक्के व काँग्रेसला ३६.७९ टक्के मते मिळाली होती. म्हणजे आघाडीला एकूण ६४.५७ टक्के मते मिळाली होती. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली होती व काँग्रेस जिंकणार हे नक्की होते. त्यात परत युतीमध्ये बंडखोरी झालेली. म्हणजे अगदीच एकतर्फी अशी ही लढत होती. पण या वेळेस काँग्रेसला ६४.५७ टक्क्यांच्या ऐवजी फक्त ४१.२६ टक्केच मते मिळाली. म्हणजे युतीकरूनही मागच्या वेळेपेक्षा फक्त ४.४७ टक्के एवढीच वाढ?
मग राष्ट्रवादीची २७.७८ टक्कें पैकी ४.४७ काँग्रेसला मिळाली असतील तर राष्ट्रवादीची उरलेली २३.३१ कुढे गेली ?????
२०१४ साली शिवसेना व भाजप यांना एकत्रित २४.५९ टक्के मते मिळाली होती. त्यात परत भाजपाचा बंडखोर उभा होता. म्हणजे मते मागल्यावेळेपेक्षा कमी व्ह्यायला पाहिजे होती. पण शिवसेनेला मिळाली चक्क ४०.२१ टक्के. काँग्रेसपेक्षा फक्त १.०५ टक्के कमी. अगदी नशीब बलवत्तर म्हणून ही जागा कॉग्रेसला मिळालेली आहे.
निवडणूक निकालानंतरच शिवसेना राष्ट्रवादीजवळ आली असं का समजायचे?
-----------------------------------------------------------------------
२. अहमदनगर शहर (225)
आघाडी
युती
इतर पक्ष
इथे राष्ट्रवादीचा उमेदवार उभा होता. २०१४ ला आघाडीला एकत्रित ४६.१२ टक्के मते होती या वेळेस ती ४७.३३ टक्के झाली. म्हणजे आघाडीचा धर्म काँग्रेसने पाळला असे म्हणावे लागेल.
मात्र २०१४ ला युतीला एकत्रित मते ५१.८७ टक्के असताना शिवसेनेला ४१.१९ टक्के मतेच मिळाली आहेत. शिवसेनेला अपेक्षेपेक्षा१०.६८ टक्के मते कमी मिळालेली आहेत. याचा अर्थ भाजपाची २४.०८ टक्के पैकी १०.६८ टक्के मते फुटली आहेत. पण त्याचा दुसरा अर्थ असा की, भाजपाच्या अंदाजे १४ टक्के लोकांनी युती धर्म पाळलेला असावा.
२०१४ साली चारही प्रमुख पक्ष एकत्र लढल्यामुळे या चौघांनीच ९७.९९ टक्के मते मिळवली होती. बाकीचे सगळे मिळून २ टक्के होते. त्यात बसपा ५व्या क्रमांकावर होती व तिला ०.३५ टक्के मते होती. मात्र २०१९ साली या सर्व पक्षांना पालवी फुटलेली दिसून येते. याला कारण भाजपाची फुटलेली मते आहेत हे निश्चित होते.
याचाच दुसरा अर्थ असा की, भाजपाची मते राष्ट्रवादीकडे गेलेली नाहीत.
------------------------------------------------
३. अकोला पश्चिम (३०)
इथे प्रथमदर्शनी असं वाटतं की काँग्रेसने वंचितशी आघाडी केली असती तर काँग्रेस जिंकली असती. त्यामुळे वंचितचा फायदा भाजपाला झाला अशीच सर्वसाधारण समजूत असते. पण २०१४ ची टक्केवारी पाहिली तर चित्र वेगळेच दिसते.
युती
आघाडी
बीबीएम व वंचित
शिवसेनेची मते भाजपाला मिळालेली नाहीत तर ती चक्क काँग्रेसला गेलेली दिसत आहेत. (काँग्रेसचा पण पाठिंबा मिळेल असे तोंडी आश्वासन राष्ट्रवादीकडून शिवसेनेला मिळाले होते की काय?) तसेच भाजपाची मतेही ३ टक्के कमी झालेली दिसत आहेत. ही का कमी झाली याचा विचार भाजपाला करावाच लागेल.
तर वंचितच्या समावेशामुळे पूर्वीच्या बीबीएमची काही मते (मुख्यत्वेकरून मुस्लिम मते असावीत) काँग्रेसकडे वळलेली दिसत आहेत. याचा अर्थ वंचितमुळे काँग्रेसच फायदाच झालेला दिसून येतो. अन्यथा काँग्रेसची मते ४.४९ टक्क्याने कमी झाली असती.
त्यामुळे वंचीत व ओवेसी एकत्र आले तर भाजपाचा फायदा होतो तर वंचीतने ओवेसींची साथ सोडली तर काँग्रेस व राष्ट्रवादीचा फायदा होतो. असाही अर्थ काढता येऊ शकतो. २०१९ ला तरी वंचितमुळे लोकसभेला भाजपाचा व विधानसभेला काँग्रेसचा फायदा झालेला दिसून येतो. काँग्रेसच्या वाढलेल्या १६.४१ टक्के मतांचा असा हिशोब लावता येतो.
-------------------------------------
टक्केवारीच्या आधारावरील हायपोथेसीसची उभारणी
येथे आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. याच टक्केवारीच्या आधारे बातम्यांचा अर्थ लावता येऊ शकतो. उदाहरणासाठी एका बातमीचा अर्थ लावायचा प्रयत्न करू.
लोकसभा निवडणुकांचा निकाल आल्यावर वंचितची आघाडीशी बोलणी चालू असल्याची बातमी आली होती. तसेच वंचितनी ओवेसींचा संबंध सोडल्याचे पण जाहीर केले होते. वंचितने ओवेसींशी संबंध तोडले तरच जागावाटपाबद्दल बोलणी करता येतील अशी एखादी अट आघाडीने वंचितला घातली होती की काय अशी दाट शंका येतीय. त्यानुसार वंचितने ओवेसींशी संबंध तोडल्यावर आघाडीचे काम झाले होते. आता वंचितशी आघाडी करायची जरूरी नव्हती यास्तव त्यानंतर वंचितला फक्त आशेवर ठेवण्यात आले, जेणेकरून वंचितने परत ओवेसींशी संगनमत करू नये.
ही फक्त शंका आहे. पण तशीच एखादी गोष्ट परत घडली की दाट शंका येणारच ना?
एनडीएशी संबंध तोडले तरच पुढची बोलणी करता येतील अशी अट शिवसेनेला घातली गेली होती. शिवसेनेने पण ती अट पाळण्यासाठी सावंतांना परत बोलावून घेतले. त्यानंतर चर्चेचा घोळ चालू ठेवून शिवसेनेला आशेवर ठेवले. आता भाजपानेच युती तुटली असल्याच जाहीर केल्यावर मात्र सगळंच बदललं आहे. शरद पवारांनी तर स्पष्टच सांगून टाकलंय की, शिवसेनेला सरकार बनवायला पाठिंबा देण्याबाबत त्यांची व सोनियांची अजून चर्चाच झालेली नाही.
एक अंदाज असाही आहे की, राष्ट्रवादीला सरकार व्हावं असं वाटतंय. तसे झाले तर राष्ट्रवादी पुढील निवडणुकीपर्यंत आपली ताकद आणखी वाढवू शकेल.
तर काँग्रेसला राष्ट्रवादीचा संशय येतोय. निवडणुकी अगोदरच शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये काहीतरी संगनमत झालेले आहे. संगनमत असायला हरकत नाही पण ते संगनमत काँग्रेसच्या मुळावर येत असेल तर काँग्रेसला कसे चालेल. तसे पुरावे मतदान टक्केवारीतून काँग्रेसला मिळाले असावेत. सरकार स्थापन झाले तर आणखी काय काय होईल काय माहीत? मला वाटते यामुळेच युती तुटेपर्यंत सोनियाजी शरदरावांच्या नाटकात काम करत राहिल्या. नंतर मात्र त्यांनी त्यांच्याबाजूने नाटकावर पडदा टाकला.
टक्केवारीच्या आधारावरील हायपोथेसीस समाप्त. :)
| पक्ष | २०१४ | २०१९ |
| राष्ट्रवादी | २७.७८ | |
| काँग्रेस | ३६.७९ | ४१.२६ |
| एकूण | ६४.५७ | ४१.२६ |
| पक्ष | २०१४ | २०१९ |
| शिवसेना | ५.९१ | ४०.२१ |
| भाजप | १८.६८ | |
| एकूण | २४.५९ |
| पक्ष | २०१४ | २०१९ |
| अपक्ष | ४.५१ | १२.६९ |
| आप | २.०२ | |
| एकूण | ४.५१ | १४.७१ |
| पक्ष | २०१४ | २०१९ |
| राष्ट्रवादी | २९.७९ | ४७.३३ |
| काँग्रेस | १६.३३ | |
| एकूण | ४६.१२ | ४७.३३ |
| पक्ष | २०१४ | २०१९ |
| शिवसेना | २७.७९ | ४१.१९ |
| भाजप | २४.०८ | |
| एकूण | ५१.८७ | ४१.१९ |
| पक्ष | २०१४ | २०१९ |
| aimim | ४.०४ | |
| वंचित | १.६९ | |
| बसप | ०.३५ | १.७२ |
| एकूण | ०.३५ | ७.४६ |
| पक्ष | २०१४ | २०१९ | वध/घट |
| भाजपा | ४६.७७ | ४३.२३ | |
| शिवसेना | ७.३९ | ||
| एकूण | ५४.१६ | ४३.२३ | -१०.९३ |
| पक्ष | २०१४ | २०१९ | वध/घट |
| काँग्रेस | ६.४० | ४१.७० | |
| राष्ट्रवादी | १८.८५ | ||
| एकूण | ५४.१६ | ४३.२३ | +१६.४१ |
| पक्ष | २०१४ | २०१९ | वध/घट |
| बीबीएम | १६.७२ | ||
| वंचीत | १२.२१ | ||
| एकूण | १६.७२ | १२.२१ | -४.४९ |
वर्गीकरण
वाचने
76569
प्रतिक्रिया
176
मिसळपाव
प्रतिक्रिया
विश्लेषण पटते आहे.
अप्रतीम विश्लेषण !
छान विश्लेषण केलेत..
राज यांनी फार चुका केल्या
In reply to छान विश्लेषण केलेत.. by आनन्दा
अवांतर, आपण मिपाकर वाटत नाही.
In reply to छान विश्लेषण केलेत.. by आनन्दा
आम्ही जुने नाही हो.. आम्ही पण
In reply to अवांतर, आपण मिपाकर वाटत नाही. by जॉनविक्क
9+ वर्षे दिसली म्हणून जुने म्हटले हो
In reply to आम्ही जुने नाही हो.. आम्ही पण by आनन्दा
भाजपाला ८०च्या आत ठेवायचे
In reply to छान विश्लेषण केलेत.. by आनन्दा
मस्त विश्लेषण.
मायबोलीवरील माझी पोस्ट इथे
तुमचे विष्लेषण आणि त्यामगिल
शिवसेना के दो नेताओं की हत्या
In reply to तुमचे विष्लेषण आणि त्यामगिल by गणेशा
अहो, मी केलेलं विश्लेषणच
In reply to तुमचे विष्लेषण आणि त्यामगिल by गणेशा
मुळात नवा आणि जरा भरोस्याचा
In reply to अहो, मी केलेलं विश्लेषणच by शाम भागवत
बरोबर
In reply to अहो, मी केलेलं विश्लेषणच by शाम भागवत
बरेचदा राजकीय विषयावर सामान्य लोक व्यक्त होत नाहीत
अगगोबाई :)
In reply to बरेचदा राजकीय विषयावर सामान्य लोक व्यक्त होत नाहीत by जॉनविक्क
राज ठाकरेंच्या त्रासातून मुक्तता
वंचितची मते कमी झाली का?
मतदानाच्या टक्केवरीबद्दल
नक्कीच , माझ्या ओळखतील्या
In reply to मतदानाच्या टक्केवरीबद्दल by सचिन
हे बघा काही उपयोग होतो आहे का ..........
येथले सगळे अंदाज चुकले.
अर्थात हे सर्व राजकारणी
In reply to येथले सगळे अंदाज चुकले. by पाषाणभेद
Wait & Watch
Wait & Watch
Wait & Watch
अजितदादा बोल्डनेस साठी प्रसिद्ध आहेत (थोडा तोल जातो)
मी अजित पवारांच्या संदर्भात
नक्कीच, आणी नेमका हाच वर्ग आत्ता राजकारणी जसं वागत आहेत
In reply to मी अजित पवारांच्या संदर्भात by शाम भागवत
ह्या ध्रुविकरणाचे
In reply to मी अजित पवारांच्या संदर्भात by शाम भागवत
छान विश्लेषण. .....
छान विश्लेषण केलेले आहे ..
https://youtu.be/CLUzgIURz24
जुने नाटक नव्या संचात?
चला कोणीतरी उद्धव ठाकरे या
In reply to जुने नाटक नव्या संचात? by शाम भागवत
आपण सगळयांनी ऐकावे असे
जबरदस्त ध्रुविकरण झालय.
+1
In reply to जबरदस्त ध्रुविकरण झालय. by शाम भागवत
मला
In reply to जबरदस्त ध्रुविकरण झालय. by शाम भागवत
रोजगार निर्मिती ही म्हटलं तर
In reply to मला by जॉनविक्क
जानराव
In reply to मला by जॉनविक्क
रोजगार निर्मिती यावर उत्तर
In reply to मला by जॉनविक्क
म्हणजे आज रोजच्यासारखं दुपारी
In reply to रोजगार निर्मिती यावर उत्तर by शाम भागवत
मि सुध्दा ह्या प्रकाराला
In reply to रोजगार निर्मिती यावर उत्तर by शाम भागवत
उद्धव ठाकरे मला पाहिजे होते
In reply to जबरदस्त ध्रुविकरण झालय. by शाम भागवत
मागच्या ७.५ वर्षे सत्ता होती.
In reply to उद्धव ठाकरे मला पाहिजे होते by शाम भागवत
२०२९ च्या लोकसभा निकालापर्यंत
In reply to मागच्या ७.५ वर्षे सत्ता होती. by अमरेंद्र बाहुबली
फडणवीसांच्या निवडणूक
In reply to मागच्या ७.५ वर्षे सत्ता होती. by अमरेंद्र बाहुबली
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to फडणवीसांच्या निवडणूक by टीपीके
असू दे हो.
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
@टीपीके,
In reply to फडणवीसांच्या निवडणूक by टीपीके
म्हणजे एकूणच
In reply to @टीपीके, by शाम भागवत
२-४ उद्योग नक्कीच गेले. कारण
In reply to म्हणजे एकूणच by टीपीके
अच्छा, म्हणजे हे गुजराथला
In reply to २-४ उद्योग नक्कीच गेले. कारण by शाम भागवत
हे सगळे मुद्दे मविआच्या
In reply to अच्छा, म्हणजे हे गुजराथला by टीपीके
कारण मविआ सरकारने काही
In reply to २-४ उद्योग नक्कीच गेले. कारण by शाम भागवत
कारण मविआ सरकारने काही हालचालच केली नाही.सहमत, वेदांता फॉक्सकॉन पळवल्यावर मविआ चे मामू एकनाथ शिंदेनी सांगितले होते ना? मोदीजी ह्याहून मोठा देणार आहेत म्हणे प्रकल्प?मनोरंजक प्रतिसाद....
In reply to कारण मविआ सरकारने काही by अमरेंद्र बाहुबली
म्हणजे प्रकल्प पळवला असे का?
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
लोकं स्थलांतर का करतात?
In reply to म्हणजे प्रकल्प पळवला असे का? by अमरेंद्र बाहुबली
टाटा चा एवढा मोठा उद्योग
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
विश्लेषण करणे,
In reply to टाटा चा एवढा मोठा उद्योग by सुबोध खरे
उद्योग
In reply to २-४ उद्योग नक्कीच गेले. कारण by शाम भागवत
"आमच दिया" ऐवजी आमचा दसरा असे
@जॉनविक्क
शाम सर उत्तम _/\_
व्यवसाय सुलभतेचा निर्देशांक
सर टोबी,
हा धागा महाराष्ट्राच्या
In reply to सर टोबी, by शाम भागवत
@ शाम भागवत
In reply to सर टोबी, by शाम भागवत