काथ्याकूट: आपण केलेल्या 'चुकांचे' फळ आपल्याला 'याच जन्मी' भोगावे लागते का ?
मित्रहो, जगभरातले धर्मग्रंथ, पुराणे इत्यादी प्राचीन साहित्यात, मानव करत असलेल्या विविध 'पुण्यकर्मांचे' तसेच 'पापांचे' ' फळ त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 'स्वर्गसुख' अथवा 'नरकयातना' या स्वरूपात मिळत असते, असे सांगितलेले दिसते.
तसेच त्या त्या देशातील कायद्याप्रमाणे काही 'चांगले' कृत्य केल्याबद्दल बक्षीस, पुरस्कार, सन्मान इत्यादि, आणि 'गुन्हा' किंवा 'दुष्कृत्य' केल्याबद्दल कमीजास्त कठोर शिक्षा दिली जात असते.
याखेरीज आपल्या रोजच्या जीवनात 'आळस' (- जे करायला हवे ते न करणे) किंवा 'प्रमाद' (- जे करायला नको, ते करणे) यातूनही विविध मनो- शारीरिक व्याधी, ताणतणाव, परस्पर संबंध बिघडणे असे परिणाम घडून येत असलेले दिसतात, आणि त्यांच्या कार्य-कारण भावाविषयीही तर्क करता येतो.
परंतु हा काथ्याकूट वरील तिन्ही गोष्टींविषयी नाही. मग कशाविषयी आहे ? तर :
आपल्या माहितीततल्या लोकांवर जेंव्हा काही गंभीर स्वरूपाचे संकट अकस्मातपणे कोसळते, आणि बघता बघता त्या व्यक्तीचे आयुष्य बरबाद होते - तेंव्हा आपण अवाक होतो, आणि हे कशामुळे घडले असावे, यामागील कार्यकारण भाव काय असावा, असा प्रश्न आपल्याला पडतो.
हे संकट आरोग्यविषयक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे असू शकते.
यावर उपाय म्हणून वैद्यकीय उपचार, गंडेदोरे-ताईत, देवाचा धावा, बाबा-स्वामींची काकळूत, मनो-चिकित्सकांचे उपचार, ज्योतिष, राजकीय नेत्यांची लोकांची ओळख-वशिला, वगैरे प्रयत्न करूनही जेंव्हा कशाचाच काही उपयोग होत नाही, तेंव्हा माणूस हतबुद्ध होतो आणि 'नशिबा' ला दोष देत ते सोसण्याचा प्रयत्न करतो.
तर इतर लोक "त्याच्या अमूक तमूक कर्माचे फळ त्याला मिळते आहे" असा निष्कर्ष काढताना दिसतात.
– मोठ्यांचे ऐकले नाही, वडीलधाऱ्यांचा अपमान केला, आई - वडिलांना घराबाहेर काढले, सुनेचा छळ केला, मित्राची फसवणूक केली, लहान मुलांना मारझोड केली, पूज्य विभूतींविषयी अनुद्गार काढले, नादिष्टपणा- छंदिफंदीपणा - बाहेरख्यालीपणा केला, देशद्रोहीपणा केला …. असे विविध प्रकारचे प्रमाद त्या व्यक्तीवर कोसळलेल्या संकटाला कारणीभूत आहेत, असे मानले जाते.
हा काथ्याकूट त्याबद्दलचा आहे.
लहानपणापासून आपल्यावर जे जे 'संस्कार' आपले पालक, शिक्षक, गुरु वगैरे करत असतात, पुस्तके, प्रवचने, चर्चा, वगैरेतून योग्य-अयोग्य वर्तनाबद्दल आपल्याला जो काही बोध होत असतो, त्याचे पालन कळत-नकळत आपल्याकडून जर घडून आले नाही, तर अशा विविध 'चुकांचे' फळ आपल्याला याचि जन्मी - याचि देही सोसावे लागणार आहे का ?
मंडळी, तुम्हाला काय वाटते ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ऑ?
कॉमी बुवा
इतरांनी काय लिहिले आणि कधी
तुम्ही पाहिला लिहिले, त्यावर
धर्माधिकारी ह्यांच्या
कमाल आहे.
तुमची डावी विचारसरणी एका
काय हास्यास्पद बचाव आहे.
तोंडघशी पडल्यावर या बोटावरची
काहीही बोलायचे उरले नाही की
काॅमी जाऊद्या. त्यांची चूक
व्वा. मानलं तुम्हाला वर एका
मुळ मुद्द्यांवरून...
किंवा एकाच आजारात (तोंडाच्या
??
संसारातील वाईट घटना मात्र
संस्कार आणि पाप-पुण्य
पाप-पुण्य, चूक-बरोबर, चांगले - वाईट वगैरे सर्व मानवी कल्पना ...
खरं तर या जन्मात आठवूनही न
या विषयावर सुरवातीलाच...
@कर्नल तपस्वी: खूप छान लेख आहे तुमचा.
ज्यांना आपण चुका समजतो त्या
@ अहिरावणः चुका आणि त्यांची फळे वगैरे.
'मृत्यु' ही शिक्षा नसून वरदान आहे.
सुरेश भट असेच काही म्हणले होते.
तोडगा असतो. बटवा सैल करा.
काही लोकांनी धाग्याची अगदी
पुनर्जन्मा बद्दल बोलण्याचा
कर्म आणि फळ
त्यात न्याय नाही, उलट जे काय
कर्मविपाक हा स्विकृतीसाठी
पण ही परिस्थिती तुमच्याच
.
स्पष्टीकरण व समर्थन
नाठयारा,
गृहीत धरणे म्हणजे समर्थन करणे नव्हे
तपास वेगळा आणि जजमेंट वेगळे.
अंदाज आणि तपास
अंदाज बांधणे वेगळे.
मी ही थांबतो
हुश्शार लोकांची हुश्शार चर्चा
काही घंटा कळत नाही कोण योग्य कोण अयोग्य.
एक निरिक्षण
+१
अन्यायकारक उतरंड ?
वर्णव्यवस्था = अन्यायकारक उतरंड
जर पूर्वसंचित, पूर्वकर्म
बतोकापि
हे सर्व सिद्धांत आणि
जाउ द्या हो...