Skip to main content

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ९)

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 27/04/2021 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
अटलबिहारी वाजपेयी यांची भाची करूणा शुक्ला (७०) यांचे कोरोनामुळे निधन झाले. १९८३ मध्ये त्या सर्वात पहिल्यांदा भाजप मधून मध्य प्रदेश विधानसभेत निवडून आल्या होत्या. २०१३ पर्यंत त्या भाजपमध्ये होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी कॉंग्रेसकडून निवडणुक लढविली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. २०१८ च्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत त्या तत्कालीन मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या विरोधात राजनंदगाव मतदारसंघातून उभ्या होत्या, परंतु त्यांचा पराभव झाला होता. रशियाची स्पुटनिक ही कोरोनावरील लस रशियाकडून आयात करण्यात येत असून मे महिन्यापासून भारतात उपलब्ध होईल. जुलैपासून ही लस भारतात तयार केली जाईल.

वाचने 79640
प्रतिक्रिया 304

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

तुम्ही सक्षम पर्याय तयार करू शकता आणि निवडून पण आणू शकता बाडिस! अजून ३ वर्ष आहेत, आजच्या घडिला!

In reply to by नावातकायआहे

कोणाला उभे करायचे? अखिलेश यादव, परमपूज्य राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, मायावती की प्रियांका वाड्रा हां आता, आलटून पालटून, पंतप्रधान होणार असतील तर गोष्ट वेगळी आहे.... जसे आमच्या 3-13-1760 ग्रहावर होते ....

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोक योग्य वेळ आली की योग्य बदल करतात, काळजी करु नका. लोकांना सरकारविरुद्ध उठाव करायला वेळ लागत नाही. बदल करण्यासाठी फक्त योग्य वेळ पुरेशी नाही. बदल करण्यासाठी योग्य कारणे व योग्य पर्याय सुद्धा असावा लागतो. सध्या बदलासाठी योग्य वेळ नाही व योग्य कारणेही नाहीत. पर्याय तर नाहीच नाही. त्यामुळे बदलासाठी प्रतीक्षा करावी लागेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

या सगळ्या समस्या आहेत हे कोणीच नाकारत नाही. पण या समस्या सुध्दा इतर कोणापेक्षाही मोदीच सोडवू शकतील असा विश्वास अजूनही लोकांना आहे त्याविषयी काय म्हणणे आहे? >>>>> लोक मरत असताना बंगालात रॅली काढनारा समस्या सोडवू शकतो असा विश्वास असणारी जनता अजूनही अस्तित्वात आहे??? किती विनोद कराल??

In reply to by चंद्रसूर्यकुमार

बाकी राज्य सरकार बरखास्त करावे हे तुम्ही सांगत होतात. आता केंद्र लोक मरत असताना निवडणूका लढते होते, पी एम केअरचा हिंशेब नाही, पैसे कुठे खर्च झाले ह्याची आकडेवारी नाही, सर्व बाबतीत केंद्र सरकार अपयशी ठरलेलं दिसत असतानाही तुम्ही केंद्र सरकार हरखास्त कराव अशी मागणी केलेली दिसत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

केंद्र सरकार बरखास्त खरावे अशी मागणी आम्ही अजिबात करणार नाही, कारण लोक मरत असताना निवडणुक लढणारे, पी एम केअरचा हिशेब व पैसे कोठे खर्च झाले याची आकडेवारी न देणारे आणि सर्व बाबतीत अपयशी ठरलेले केंद्र सरकार आमै कायम हवे आहे. आता खुश?

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला हवेय हो. पण जनतेला नकोय ना? लोकांचे किती हाल होताहेत. बेड आॅक्सीजन मिळत नाहीयेत. केंद्र अपयशी ठरलंय, आंतरराषरीय स्तरावरून टिका होतेय. हे सरकार हकलले पाहीजे, जनतेने बंड करून ऊठले पाहीजे असं वरंच कुणीतरी बोललेय ना? अच्छे दिन च्या नावा खाली देशाला भिकेला लावाव का?? की लोकांना वैद्यकीय सुविधे अभावी मारून टाकाल?? लोकांचे पैसे कुठे पी एम केअरच्या नावाने घेऊन कुठे गडप केले कळायला मार्ग नाही. विरोधी सरकार असणारे राज्य प्रयत्नांची पराकाष्टा करताहेत तर त्याना त्रास देणं सुरूय. काय करायचं असं सरकार????

In reply to by श्रीगुरुजी

परमपूज्य राहूल गांधी, ममता बॅनर्जी, मायावती, शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, असे बरेच जण उमेदवार आहेत, त्यापैकी एक निवडला की मग मात्र हमखास भाजपचे राज्य खतम ...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कुठले प्रयत्न हो? ------- ठाण्यातील रुग्णालयात अग्नितांडव! चार रुग्णांचा मृत्यू https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2455949/fire-at-prime-cr… ------------ भंडारा जिल्ह्यात सुरूवात झाली, अजूनही, रुग्णालयातील आगी काही कमी झाल्या नाहीत .... का आता ही पण चुकी केंद्राचीच?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्याच्या सरकाराविरुद्ध जनरेटा, जनतेचा उठाव, जागृती ही काळात आवश्यक ठरणार आहे.>>> +१

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सरकारविरुद्ध "उठाव" ही सस्यस्थितीत नक्षलवादी संकल्पना आहे. ब्रिटिश सरकार हे जनतेच्या पाठिंब्यावर सत्तेत आलं नव्हतं. त्यामुळे त्याला बदलणे जनतेला शक्य नव्हते. जनतेने अशा वेळी उठावाचा रस्ता पकडला. चळवळ आणि उठाव यातला मुख्य फरक हा की चळवळ शांततामय असते (असु शकते). उठाव हा जनतेद्वारा आपलं म्हणणं कळवण्याचा सर्वात प्रक्षोभक आणि loud प्रकार आहे. उठाव साठी इंग्लिश मध्ये खालील शब्द आहेत: insurrection, rebellion, uprising, revolt. जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या सरकारबद्दल जनतेला केसेस करता येतात, चळवळ करता येते, आंदोलन, धरणे करता येतात, पण उठाव ही लोकशाही देशात अलोकशाही संकल्पना आहे. सरकारचे निर्णय तुम्हाला पटले नाहीत म्हणून तुम्ही त्याविरुद्ध revolt करणे म्हणजे बेबंदशाही/chaos आणण्याचा प्रयत्न करणे होय. एका प्राध्यापक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला शब्दांमधला फरक माहीत नसणे आश्चर्यकारक आहे. किंवा मग त्यांचा rebellion होण्यासाठी सक्रिय/अक्रिय पाठिंबा आहे असे म्हणावे लागते. आणि ती वाट चोखळायची तर शेवटी प्राध्यापक डॉक्टर वरवरा राव यांचे वर्तमान हे भविष्य असू शकते.

In reply to by पिनाक

प्राध्यापक महाशय हे लिखाण हेतुपुर्वक मोदि समर्थकाना चिरडीस आणायला लिहित असावेत. काही दिवसान्च्या अन्तराने असा एकच मोठा व्यन्गोक्तीपुर्ण प्रतिसाद लिहायचा आणि मग समर्थकान्ची सुरु झालेली आतिशबाजी मस्त एन्जोय करायची. आणि यामुळे गुलामान्चे पण मोरल वाढुन ते देखिल नव्या जोमाने तुटुन पडतात...तलवार्बाजी चालु... लोक त्यानिमिताने घरी बसत्तात तेवढीच सरकारला मदत

In reply to by सुखीमाणूस

तसं काय नसतं हो. आसल्या एकांगी / विवक्षित अजेंड्याचे प्रतीसाद आले की बहुसंख्य लोक फाट्यावर मारतात. काहीजण प्रतीवाद करतात परंतु असल्या १८८ टाईपच्या प्रतीसादांवर काय बोलावे हाच मोठा प्रश्न असतो. दहावी च्या मराठी च्या पेपर मधला निबंध याउपर त्याचे मुल्य नसते .. समाजमाध्यमांवर आजकाल सगळीकडे नकारात्मक माहीती जास्त फिरते आहे त्यामुळे सध्या तरी जास्त भीती पसरत आहे. लोक थोडे सुधारतील अशी आशा आहे.

In reply to by सुखीमाणूस

आपल्या वाटण्याचा आणि मताचा आदर आहे, पण भवतालची परिस्थिती पाहुन सुखीमाणूस दुखी होत नसेल तर माणूस म्हणुन आपल्या विचार करण्याला काहीही अर्थ नाही असे वाटते. काल नेमकं इथे सध्याच्या सरकारविरुद्ध उठाव केला पाहिजे असं लिहिलं आणि सायंकाळी ''देशात ऑक्सीजन, करोना प्रतिबंधक लशी किंवा रेमेडेसिवीरची कमतरता नाही'' डॉ.हर्षवर्धन यांच्या विधानावर काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री यांनी आश्चर्य व्यक्त केले असून ''जनतेला मूर्ख समजणा-या अशा सरकारविरोधात जनतेने बंड करण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले'' आणि हे खरं आहे. गेल्यावर्षाभरापासून करोनाबाबतीत गाफील राहीलेल्या सरकारला आपल्या पदावर काम करण्याचा अधिकार उरलेला नाही. लोकांनी आता रस्त्यावर उतरुन केंद्रसरकारविरोधात एक मोठे जनआंदोलन उभे करण्याची गरज आहे, त्याशिवाय हे सरकार ठिकाणावर येणार नाही,असे माझ्य व्यक्तीगत मत आहे. एकीकडे लोक किड्यामुंग्याप्रमाणे उपचाराअभावी मरत आहेत, लशीचा उपलब्धता नाही आणि यांना 'लसोत्सव'करावा वाटतो. सत्तेचा उपयोग, स्वतःच्या जाहिरातीसाठी, नसलेल्या गोष्टीच्या जयजयकारासाठी वापर केला जातो, चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमातून पसरवल्या जातात अशावेळी निवडून दिलेल्या केंद्र सरकारविरुद्ध जनतेमधे भ्रमनिरास होतो आहे. लोकांमधे अस्वस्था निर्माण व्हायला हवी, व्यवस्थेविरुद्ध चीड निर्माण व्हायला हवी. एकीकडे भारतीय जनता उपचाराअभावी तडफ़डत असतांना, एक एप्रीलला आसाममधील कोकराझरला मा.मोदी सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित राहतात, रॅलीला उपस्थित राहून त्यांचं पारंपरिक वाद्य वाजवित आहेत असे दिसते. हा असंवेदनशिलतेचा कळस आहे. यावरुन आपल्याला इतिहासातील एका जागतिक गोष्टीचं स्मरण होतं. आजूबाजुला घडणा-या वास्तवचित्रण मांडण्याचा, लोकांमधे जागृती निर्माण करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असतो इतकेच आपल्याला सांगावे वाटते. बाकी, आपल्या मताचा, आपल्या विचारांचा पुन्हा एकदा आदर करुन थांबतो. जय हिंद, जय भारत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकांनी आता रस्त्यावर उतरुन केंद्रसरकारविरोधात एक मोठे जनआंदोलन उभे करण्याची गरज आहे, त्याशिवाय हे सरकार ठिकाणावर येणार नाही,असे माझ्य व्यक्तीगत मत आहे. आपणच हे आंदोलन करण्यास प्रारंभ करावा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत आहे. आतापर्यंत मी भाजपाला मत देत होतो, ते आता पुढच्या वेळी देईनच असे नाही, जनता ह्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

In reply to by प्रचेतस

मी हि काँग्रेस ला संधी देईन जेव्हा - गांधी नेहरू घराणे शाही संपेल - एक देश एक कायदा हे कांग्रेस कबुल करेल - काँग्रेस पाठीत कणा आहे हे दाखवेल - अल्पसंख्याकांचे तुष्टीकरणाचे राजकारण संपवेल

In reply to by चौकस२१२

आणि हो संघ परिवारातील टोकाच्या धार्मिक वाद्यांची आप्ल्यालाल पण घृणा आहेच पण ६०-७० वर्षाच्या काँग्रेसी थेरांपेक्षा ( सुरुवातील देश घडवण्याचा आणि ७१ चा काळ सोडला तर ) भाजपला संधी हा उपाय सध्या तरी चांगला वाटतोय... आणि हो जाता जात या महारोगाच्या लाटेत भाजप काय कोणतेही सरकार असते तर्री भारतातात जे काही घडले आणि घडत आहे ते काही फारसे वेगळे असते असे जर कोणाला वाटत असेल तर अश्या स्वामींचे पाय दाखवावेत .. खरंच धन्य आहे ...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"लोकांनी आता रस्त्यावर उतरुन केंद्रसरकारविरोधात एक मोठे जनआंदोलन उभे करण्याची गरज आहे, त्याशिवाय हे सरकार ठिकाणावर येणार नाही,असे माझ्य व्यक्तीगत मत आहे." खरोखर..सगळे पक्ष गेले खड्ड्यात. पण या परीस्थितीत तुम्ही लोकांना रस्त्यावर उतरायला सांगताय? सिरीयसली?

In reply to by झेन

>>>>या परीस्थितीत तुम्ही लोकांना रस्त्यावर उतरायला सांगताय? सिरीयसली? सध्या रस्त्यावर येऊन केंद्रसरकार विरोधी शांततामय मार्गाने आंदोलन करण्याची ही परिस्थिती नाही. कोणत्याच मार्गाने कुठेही गर्दी होऊ नये, गर्दी करु नये. पण जनतेचा विरोध, भावना, आणि आवश्यकता विविध माध्यमातून सरकार पर्यन्त तीव्र पद्धतीने गेल्या पाहिजेत त्या अर्थाने त्याकडे बघावे. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मग ओरड करायला मोकळे.. https://www.worldometers.info/coronavirus/ इथे पाहिले तर डेथ पर मिलिअन भारताची खुप कमी आहे.. लोकानी रस्त्यावर उतरावे इतकी काही परिस्थिती हाता बाहेर गेली नाहिये..

In reply to by सुखीमाणूस

PPM, PPB, यांचा अभ्यासच केला नसेल तर, त्यांना फक्त आकड्यांतच रस असणार.... 10 PPM is always more than 20 PPB असे आमचे एक गुरू सांगायचे.... त्यांना आकडेवारीतली कुठलीही गोष्ट टक्केवारीवर लागायची .... अर्थात, काही टक्के जनतेला, हे समजणे जरा कठीणच आहे...

In reply to by झेन

करू द्या आंदोलने. चारीधाम यात्रा होणार आहेत की. फक्त प्रोफेसर साहेब, आंदोलनात कमाल ७२ तासापूर्वीचे RTPC निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट घेऊन या. आंदोलक कॉम्रेड्सना sop आणि डिस्टनसिंग पाळायला सांगा. मग नो प्रोब्लेम. (उपहास.) २०१९ मध्ये चारीधाम ला आप्रोक्स ३० लाख भाविक गेले होते. यावेळेस कमी जातील म्हणले तरी ... असो, नवीन काय आहे यात जे सरकारला माहीत नाही. आयेगा तो मोदीही. काही का होऊ दे मग.

In reply to by कॉमी

कुंभ मेल्यासाठी RTPCR नेगेटिव्ह असणे आवश्यक होते हे आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे? Kumbh Mela 2021: Pilgrims Must Show COVID-19 Test Report In Haridwar Negative RT-PCR test report mandatory to enter Kumbh Mela; Health Ministry issues guidelines to prevent Corona in Mela http://newsonair.com/Main-News-Details.aspx?id=414021 Negative COVID RT-PCR test report mandatory for Kumbh Mela: Health Ministry https://www.jagranjosh.com/current-affairs/negative-covid-rtpcr-test-re… मुळात कुंभ मेळा हा सरकारी उत्सव नाहीच तर शतकानुशतके चालू असलेला हा पारंपरिक उत्सव आहे. तेंव्हा सरकारने कुंभ मेळा भरवला हे चूक आहे. कुंभ मेळा भरवायलाच नको होता हे माझे वैयक्तिक मत आहे. बाकी धुळवड चालू द्या

In reply to by कॉमी

उत्तराखंड सरकारने कोरोनाच्य वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमिवर मागिल वर्षाप्रमाणे या वर्षीसुद्धा चारी धाम यात्रा रद्द करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/chardham-yatra-is-cancelled-s…

In reply to by सुबोध खरे

भाजपवर टीका करणे हीच मोठी चूक आहे त्यामुळे टिकाकाराच्या तोंडात कोणती पण वाक्ये कोंबून मुद्दा दुर्लक्षित करून स्वतःचे समाधान करावेच लागणार.

In reply to by कॉमी

सरकारी उत्सव नव्हता. फक्त rtpcr झालेल्यानाच कुंभ मेळ्याला परवानगी दिली होती. कुंभमेळा झाल्यावर सुद्धा उत्तराखंडात इतर राज्यांपेक्षा करोना केसेस वाढल्या नाहीत. कुंभमेळ्यावर अर्थव्यवस्था किती अवलंबून आहे याचा आपण अंदाज केला आहे का? एक लाख वीस हजार कोटी रुपये यात ६ लाख लोकांना रोजगार मिळतोय. https://www.fortuneindia.com/polemicist/why-the-kumbh-mela-is-an-econom… https://economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/kumbh-to-g… हे २०१९ च्या कुंभ मेळ्याबद्दलचे अंदाज आहेत. केसेस कमी असताना सरकारने एक वर्ष घरी बसलेल्या लोकांना परत घरी बसा म्हणणे आपल्याला योग्य वाटतंय? आजच्या तारखे पर्यंत उत्तराखंडात १ लाख ७५ हजार केसेस झाल्या आहेत आणि मृत्यू २५०२ तुलनेसाठी आज केवळ दिल्लीत ३९५ मृत्यू झालेले आहेत. पण तरीही सरकारचे चुकलेच.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तर गेल्याच वर्षी खुप वाइट अवस्था झाली असती. उलट याजागी जर कोन्ग्रेस्सचे सरकार असते तर खुप हाहाकार झाला असता. आठवा ते मुम्बैतील बोम्ब्स्फोट , विविध आतन्कवादी हल्ले आणि तेव्हाच्या सरकारची हतबलता.. https://www.macrotrends.net/countries/IND/india/death-rate इथे पहिले तर दर हजारी म्रुत्युचे प्रमाण २०२० ला २०१९ एवढेच होते. आणि आता २०२१ ला ते वाढु नये ही देवाकडे प्रार्थना आत्ताची परिस्थिती वाइट आहे आणि याचे कारण सरकारचा ढिसाळपणा इतकेच लोकान्चा निष्काळजीपणा हे देखिल आहे.. अश्या अडाणी लोकाना सुरक्शित ठेवण्यासाठी सरकारने जर विविध उपाययोजना केल्या तर निर्बन्ध घातले म्हणुन विरोधक गळा काढायला मोकळे. आत्ता जर बन्गाल मधील निवडणुका पुढे ढकलल्या अस्त्या तर तिथे राष्ट्रपती राजवट आणावी लागली असती मग परत भाजपा निवडुन येणार नाही म्हणुन राष्ट्रपती राजवट लावली असे म्हणले असते... (सन्दर्भ https://www.business-standard.com/about/what-is-president-s-rule How is President's rule imposed in a state? Article 356 of the Constitution of India gives the President of India the power to impose this rule on a state on the advice of the Union Council of Ministers. There are some conditions that the President has to consider before imposing the rule: a) If the President is satisfied that a situation has arisen in which the government of the state cannot be carried on in accordance with the provisions of the Constitution. b) The state government is unable to elect a leader as chief minister within a time prescribed by the Governor of that state. c) There's a breakdown of a coalition leading to the chief minister having a minority support in the House, and the CM fails to prove majority in the given period of time. d) Loss of majority in the Assembly due to a vote of no-confidence in the House. e) Elections postponed on account of situations like natural disasters, war or epidemic. )

In reply to by सुखीमाणूस

विरोधक गळा काढतील म्हणून निवडणूक घेतली ? हे काय कारण झाले ? स्वतःचे काही मत आहे की नाही मग सरकारला ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्त्रियाना घरच्या विरोधाला तोण्ड द्यावेच लागते. बिचार्या निर्मलाजी खुप काम करतायत तरी सासर्च्याना काही पसन्त पडत नाही. काय बै बायकान्चा जन्म वैट

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरकारचा आता भर

लसोत्सवावर

आहे @बिरुटे सर आपल्याला लसीकरणाबद्दल किती माहिती आहे हे मला माहित नाही परंतु आपले हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. करोना हा विषाणूजन्य आजार असल्याने त्यावर आजतरी औषध नाही भारताची लोकसंख्य १३८ कोटी आहे. यापैकी ७० टक्के लोकांना लस दिली किंवा त्यांना करोना झाला तर आपल्याला हर्ड इम्युनिटी येऊन हि महामारी संपेल याचा अर्थ रोज २ लाख लोकांना लस दिली तर पूर्ण लसीकरण होण्यास दीड वर्ष लागेल. इतक्या ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारणे आणि त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा उभारणे हि सोपी गोष्ट नाही. त्यातून लस वाया जाण्याचे प्रमाण ५% गृहीत धरले तर (यातील राजकारणात मी जात नाही). पूर्ण लसीकरणासाठी दोन वर्षे जातील हे गृहीत धरणे आवश्यक आहे. लसोत्सव म्हणण्यासाठी कोणतेही आरोग्य कर्मचारी तेथे दिवाळी करायला आलेले नाहीत. स्वतःचा जीव धोक्यात घालून ते काम करत आहेत. घरात बसून ऑनलाईन काम करून पगार घेत नाहीत एवढे भान आपल्याला असायला हवे होते. आपल्याला सरकारला( कोणत्याही पक्षाचे) मदत करता येत नसेल तर करू नका पण दुसऱ्याचे घर जळत असेल त्यावर पाणी टाकता येत नसेल तर निदान त्यावर टाळ्या पिटू नये एवढे व्यवधान असायला हवे होते.

In reply to by सुबोध खरे

>>>>> आपल्याला लसीकरणाबद्दल किती माहिती आहे हे मला माहित नाही परंतु आपले हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. डॉक्टरसाहेब, वक्तव्य बेजवाबदार आहे, असे सध्याची परिस्थिती पाहुन वाटत नाही. देशात लसच उपलब्ध नाही. लोकांना लस मिळविण्यासाठी रांगा कराव्या लागत आहेत. एकूणच लशीचा तुटवडा असतांना असे उत्सव करण्याची गरज नाही. लशीचा साठा मुबलक प्रमाणात असता तर लोकामधे जनजागृती साठी असे उत्सव केले पाहिजेत, सध्या ही वेळ नाही, असे वाटते. बाकी लशीसाठी लागणारा वेळ वगैरे आपला प्रतिसाद माहितीपूर्ण आहेच. डॉक्टरसाहेब, भारतातील भयावह करोना लाटेसाठी विषाणुचे एक म्युटेशन जवाबदार नाही त्यामागे अनेक कारणे आहेत, पहिली लाट ओसरताच मोठमोठ्या सभा, प्रचंड गर्दीचे सोहळे, कोरोनाचे अनेक व्हेरियन्ट, आणि मंदगतीने होणारे लशीकरण यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याचे मत डब्लू एच ओ ने नोंदवले आहे, या त्यांच्या मताकडे तरी दुर्लक्ष करता येईल. >>>घरात बसून ऑनलाईन काम करून पगार घेत नाहीत एवढे भान आपल्याला असायला हवे होते. हे मत कोणाबद्दल आहे माहिती नाही, पण काही ऑनलाइन काम करणा-यांना पहिल्या लाटेत चेक पोष्टवरच्या ड्यूटीज, घरोघर जाऊन स्क्रीनिंग टेष्टच्या ड्यूटीज, आणि आताच्या ड्यूटीत पर्यवेक्षक म्हणून घरोघर जाऊन नोंदणी करण्याचे काम आहे, त्याच बरोबर विद्यापीठाच्या परीक्षेचं नियोजन नसल्यामुळे थेट वर्गात जाऊनही परीक्षा घ्याव्या लागत आहेत याचंही भान काहींना टिका करतांना असायला हवं. बाकी येत जा डॉक्टरसाहेब मिपावर तुमची मतं काहीही असली तरी आपण डॉक्टर म्हणून भला माणूस आहे, हे माझं मत कायम आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by सुबोध खरे

लसोत्सव म्हणजे काय हे त्यांना माहीत नाही असं थोडंच आहे? इथे कोणताही पारंपरिक उत्सव वगैरे साजरा न करता जास्तीत जास्त लोकांना एका दिवसात किंवा काही दिवसात लस द्यावी आणि असा इव्हेंट केल्यामुळे लोक त्याला जास्त प्रमाणात प्रतिसाद देतात हे पूर्वीच दिसलं आहे. हे याना माहीत नसेल असं थोडंच आहे? मग उगीचच काही तरी गोष्टीवरून का टीका केली असेल ओळखा? बहुधा मिपा वरचे लोक हे सुशिक्षित आहेत आणि आपल्यावर टीका करू शकतात हे त्यांनी गृहीत धरलं नसावं. फेसबुक वर स्वतः च्या प्रदेशातले, धर्मातले, जातीतले, शिळोप्याच्या गप्पा मारणारे, पारावर टेकणारे लोक जास्त. तिथे लोकांना भडकवणं पण सोपं. आपल्या राजकीय, धार्मिक, जातीय आणि सामाजिक समजुती आणि श्रद्धा यातून जो पराकोटीचा द्वेष निर्माण होतो त्याला तिथे खतपाणी घालुन अशा लोकांमध्ये खोटं पसरवणे आणखीनच सोपं. मागे 15 लाखांबद्दल पण अशाप्रकारे फालतू आणि गंभीरतेचा मागमूस नसणारे प्रतिसाद पाडलेच होते की. तेव्हा ही एक मानसिक समस्या आहे हे ओळखून ignore करणे श्रेयस्कर.

In reply to by पिनाक

देशात लसच उपलब्ध नाही. हे विधान चुकीचे असून देशात पुरेशी लस उपलब्ध नाही हे सत्य विधान आहे . याची कारणे सर्वाना माहिती आहेत. झारीतील शुक्राचार्य परदेशात होते त्यांचे नाक दाबल्यावर तोंड उघडले आहे. कॉव्हॅक्सिन हि भारतीय लस उत्परिवर्तित विषाणू साठी सुद्धा उपयुक्त ठरली आहे हे डॉ फाऊची या अमेरिकन तज्ञाने कालच जाहीर केले आहे. लसीकरण हाच एक उपाय आहे असेही स्पष्ट झाले आहे. त्यासाठी "करोना एक थोतांड" या धाग्यावर मी दिलेला सविस्तर प्रतिसाद मला न सांगता आक्षेपार्ह भाग उडवण्या ऐवजी संपूर्णच उडवण्यात आला. परत तसा प्रतिसाद देण्याची माझी अजिबात इच्छा राहिलेली नाही बाकी लॉक डाऊन अनंत काळापर्यंत करणे शक्य नाही हे जनतेला आणि सर्व पक्षातील लोकांना माहिती आहे. त्यांच्या राजकीय धुळवडीत उतरण्याची माझी अजिबात इच्छा नाही. त्या धुळवडीत उतरून आपण "लसोत्सव" असे विशेषण वापरलेत हे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दुखऱ्या नसेवर डाग देण्यासारखे आहे एवढेच नमूद करतो.

पाकिस्तानी अधिकाऱ्याचा भुरटेपणा CCTV कॅमेऱ्यात कैद; दुकानातल्या वस्तूंवर डल्ला https://lokmat.news18.com/amp/videsh/pakistani-embassy-officers-shop-li… ---------------

रामदास यांनी ४ एप्रिल २०१७ या दिवशी मिसळपाव या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेला "आंबा पहावा देठात" हा लेख त्यांच्या नावाचा उल्लेख न करता कायप्पावर फिरतोय. http://www.misalpav.com/node/39378

१८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण होणार! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय! ---------- https://www.loksatta.com/maharashtra-news/free-corona-vaccine-in-mahara… --------- अतिशय उत्तम निर्णय ......

In reply to by मुक्त विहारि

अतिशय चुकीचा निर्णय. मला परवडते लस विकत घ्यायला. मी फुकट गोष्टी घ्यायला काँग्रेस चा मतदार नाही. मी लस फुकट का घ्यावी?

In reply to by पिनाक

बिंधास्त घ्या हे सरकार नंतर, टॅक्स वाढवणारच आहे... तुम्ही टॅक्स भरत असाल तर, फुकट घेणे हा तुमचा अधिकारच आहे

भारत संकटात असताना चीनची मोठी खेळी; शेजारी देशांना जाळ्यात ओढलं https://maharashtratimes.com/international/international-news/china-pla… ----------- परमपूज्य नेहरूंनी दुर्लक्षित केलेला आणि प्रसंगी पाठिंबा दिलेला भस्मासुर, भारताचाच घास घ्यायला टपला आहे.... गेल्या 70 वर्षांत केलेल्या चुकीची फळे निस्तरायला, अजून किती तरी वर्षे लागतील....

In reply to by मुक्त विहारि

सामनाच्या उच्च परंपरेनुसार अत्यंत फालतू बातमी

उत्तराखंड चार धाम यात्रेसाठी तयारी करत आहे. ह्यात नवीन SOP असणार आहेत आणि बहुधा RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट असणार्यांनाच संधी मिळणार आहे. विरोधकांच्या व्हॅलीड टीकेला सुद्धा भिरकावून द्यायचे ? कुंभ मेळ्याचे उदाहरण ताजे असूनसुद्धा. १४-२० मे दरम्यान भारत पिक वर असणार आहे किंवा पीक नुकताच होऊन गेला असणार आहे. त्यात पुन्हा तश्याच गर्दीचे आयोजन का केले जात आहे ? https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/news/india/focus-now-o…

दिल्लीत आता नायब राज्यपाल म्हणजेच “सरकार”; नवा कायदा लागू https://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-will-now-under-leutenen… अतिशय योग्य निर्णय.... अर्थात, ह्या निर्णयावर, काही टक्के जनता नाखूष होणारच....

https://www.loksatta.com/mumbai-news/hawkers-travel-in-central-railway-… ----------- त्यापेक्षा, फेरीवाल्यांकडून टॅक्स गोळा केला तर उत्तम, महिन्याला किमान 10-15 कोटी तरी सरकारी खजिन्यात जमा होतील...

खरोखर RSS च्या वयस्कर स्वयंसेवकाने करोना रुग्णासाठी बेड सोडला का? जाणून घ्या सत्य https://www.loksatta.com/trending-news/fact-check-nagpur-resident-naray… ------------ म्हणून तर, अफवा पसरवणे, हा फौजदारी गुन्हा हवा आणि असा कायदा असेल तर, त्याची अंमलबजावणी पण व्हायला पाहिजे...

In reply to by मुक्त विहारि


पारलीयमेंट्री कमिटीने नोव्हेम्बर २०२० मध्ये हा SWOT रिपोर्ट बनवला होता. त्यात दुसऱ्या लाटेमध्ये काय होऊ शकत आणि काय तयारी गरजेची आहे हे सांगितले होते. यावरून राज्य आणि केंद्र सरकारांना काय काय माहिती तज्ञांनी दिली होती हे कळावे. उत्तरादाखल काय केले गेले हे पाहतच आहोत. https://www.newslaundry.com/2021/04/28/mps-panel-predicted-second-covid…

In reply to by कॉमी

दुर्दैवाने भारतात आरोग्यव्यवस्था ही प्राथमिकता कधीच नव्हती व नाही. सर्व सरकारांनी व जनतेने अत्यंत ढिलाई दाखविली ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by कॉमी

केंद्र सरकारच्या प्रमुख शास्त्रीय सल्लागारांची मुलाखत आज इंडियन एक्स्प्रेसने प्रकाशित केलेली आहे, ती कृपया पहावी. तीत ते म्हणतात, की ही दुसरी लाट इतकी भीषण इंटेन्सिटीची असेल असे भारतांतील व अगदी परदेशांतील शास्त्रज्ञांनाही वाटले नव्हते. "None of the national or global experts, including those at IHME (Institute of Health Metrics and Evaluation at the University of Washington) or LANL (Los Almos National Laboratory in the United States), were forecasting second wave of such vehemence. In fact, many indeed put it (the intensity of the second wave) explicitly lower than the first wave under conditions then present." पुढे ते असेही म्हणताहेत की तीन कारणे (कमीजास्त प्रमाणांत ह्या भीषणतेस) कारणीभूत झाली असावीतः "...three factors are likely to be at play — public behaviour, increased susceptibility of the population, and new variants of the virus" लोकांची वर्तणूक, कमी झालेली प्रतिकारशक्ति, व विषाणूची नवी रूपे.

In reply to by प्रदीप

दुसऱ्या लाटेची भीषणता प्रेडीक्ट झाली नव्हती हे त्यांचे म्हणणे मान्य करण्यासारखे आहे. पण केंद्र सरकारचे सायंटिफिक सल्लागार असे पद असून त्यांनी सरकारला मोठ्ठे जनसमुदाय आणि निवडणुकांबद्दल काहीच सल्ला दिला नाही, कि त्यांनी दिलेला सल्ला पाळला गेला नाही ? मानवी कंट्रोलच्या बाहेरचा सगळा दोष पब्लिक बिहेवियरला देणं मला आजिबात पटलं नाही आहे. पब्लिक बिहेवियर स्रीक्टली एनफोर्स करणे शक्य होते. आणि जिथे हवे असते तिथे स्ट्रीक्ट इन्फोर्समेन्ट दिसते सुद्धा. हिंडसाईट मध्ये काय केलं असतं मध्ये म्हणतात-
Not differently, but more rigorously perhaps. (...) Measures like widespread use of masks and restrictions on large public gatherings should have been more strictly enforced, and abided by.
त्यांचे अराजकीय पद असल्यामुळे त्यांचे राखून बोलणे समजण्यासारखे आहेच, पण मला प्रतिवाद करणे गरजेचे वाटते म्हणून करतो.

In reply to by कॉमी

पण केंद्र सरकारचे सायंटिफिक सल्लागार असे पद असून त्यांनी सरकारला मोठ्ठे जनसमुदाय आणि निवडणुकांबद्दल काहीच सल्ला दिला नाही, कि त्यांनी दिलेला सल्ला पाळला गेला नाही ? निवडणुक वेळापत्रकानुसार घ्यायची का पुढे ढकलायची हा निर्णय केंद्र सरकार किंवा राज्य सरकार घेऊ शकत नाही. या निर्णयाचे अधिकार निवडणुक आयोगाकडे आहेत. राज्य सरकालचा विरोध असूनही विधानसभा निवडणुक आधी घेण्याच्या किंवा पुढे ढकलण्याच्या काही घटना भूतकाळात घडलेल्या आहेत.

In reply to by कॉमी

श्रीगुरूजींनी सांगितल्याप्रमाणे, निवडणूकांबद्दल केंद्र सरकार स्वतःहून काही करू शकत नाही, निवडणूका संबंधी सर्वच प्रोसेसेस निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतात. ह्याविषयी इथे काही चांगली माहिती आहे. पर्याप्त परिस्थितीत निवडणूक आयोग, तेव्हाच निवडणूका पुढे ढकलू शकले असते, जर केंद्राने आणिबाणी (संपूर्ण देशभर अथवा बंगालपुरती) जाहीर केली असती. अथवा, केंद्राने बंगाल विधानसभा बरखास्त करून राष्ट्रपतींची राजवट तेथे लागू केली असती. एक राजकीय पक्ष हा निर्णय सहजपणे घेऊ शकत नाही (पूर्वी एका पक्षाने हे अनेकदा केले आहे, व त्याने त्याची किंमतही मोजली आहे),
मानवी कंट्रोलच्या बाहेरचा सगळा दोष पब्लिक बिहेवियरला देणं मला आजिबात पटलं नाही आहे.
त्यांनी सगळा दोष जनतेच्या वर्तणूकीला दिलेला नाही. तीन कारणे दिली आहेत. त्यांतील, माझ्या अनुमानानुससर, जनतेची वागणूक व म्युटेटेड स्ट्रेन, ही प्रमुख दोन कारणे असावीत.
पब्लिक बिहेवियर स्रीक्टली एनफोर्स करणे शक्य होते. आणि जिथे हवे असते तिथे स्ट्रीक्ट इन्फोर्समेन्ट दिसते सुद्धा.
मला वाटते इथे(च) आपल्या समाजाचा बराचसा प्रॉब्लेम आहे. म्हणजे, सर्व प्रकारच्या नियमांचेच नव्हे तर गाईडलाएन्सचेही पालन जनतेकडून व्यवस्थित करून घ्यायची जबाबदारी सरकारची! मुळात हे असले करणे स्वतः जनतेतून आले पाहिजे. म्हणजे ते ऑर्गॅनिक असेल तरच ते व्यवस्थित पाळले जाईल. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक बाबीसाठी डोळे वटारायला, सरकारी संस्था कशाला हवी? हे स्वतःहून जनता जोंवर करीत नाही, तोंवर कठीणच आहे. आपल्या समाजांच्या एकंदरीत जडणघडणीत बेशिस्त अतिशय भिनलेली आहे. त्यांतून प्रत्येक व्यक्ति, प्रत्येक सरकारी अथवा अगदी खाजगी संस्थापनांबद्दल वाद घालणार-- अनेकदा तर कोर्टांतही जाणार. दुचाकींसाठेवे हेल्मेट वापरणे हा जगांत कुठेही वादाचा विषय होत नाही, ते फक्त आपल्याकडेच आहे. ट्रॅफिक लाईट्सना, वाहने हळूहळू पुढे सरकत रहातात, ते फक्त आपल्याकडेच. ह्यापुढे जाऊन, अनेकांना (मध्यम वर्गीय व त्यावरील वर्गीय) प्रत्येक नियमाससठी काहीबाही अपवाद करून हवा असतो; अन्यथा ते शक्य नसेल तर त्यांतून एखादी पळवाट. तेव्हा, तुम्ही म्हणता तसे 'स्ट्रिक्टली एन्फोर्स' करायचे म्हटले, तर त्यासाठी पोलिसांच्या रिसोर्सवर अति प्रचंड ताण पडेल, त्याचे काय? ते तसे सहजी शक्य नाही. पूर्वीच्या लॉकडाऊनचेच पहा. तेव्हा पोलिस कुणीतरी बाहेर पडला म्हणून मारहाणी वगैरे करत होते, ते फक्त पायी चालणार्‍यांवर, अथवा टू व्हीलर्सवरून जाणार्‍यांवर. कार्समधून फिरणार्‍यांना ते सौम्यपणे सांगत होते, काहीवेळा त्यांतील मंडळी शहाजोगपणे काहीतरी निमीत्ते देत होती, काही वेळा ती हुज्जत घालत होती. ह्याचे कारण पोलिसांची ह्या स्तरांवरील लोकांना अजिबात दहशत नाही, कारण त्यांचे कुणीतरी उच्च्पदस्थ एका फोनकॉलच्या अंतरावर असतात.