Skip to main content

आत्तापर्यंत काय केलं?

लेखक मनिष यांनी सोमवार, 25/05/2020 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ मिळालाच आहे अनायसे, तर संपवूया कितीतरी वाचायची राहिलेली पुस्तकं, अर्धवट लिहिलेल्या कविता, काही लेख. असंच खूप काही, मनापासून ठरवलं. धावपळीत रोजच्या, बरंच राहून गेलं. डायरीच्या पानांनी मग हक्काने खडसावलं, आत्तापर्यंत काय केलं? अपूरी स्वप्नं दूरुनच खुणावत राहिली दिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली झाडांची पानं गळून गेली, धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली. निष्पर्ण पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला, आत्तापर्यंत काय केलं? ज्यांच्या अंगा-खांद्यांवर खेळलो, त्यांनाच खांदा देऊन आलो. सरणावर थोडा, मीही जळून गेलो. पोरकेपण नि पोक्तपण सोबत राहिले. नकळत अशीच कित्येक वर्षं सरली. थोडीफार उरलेली वर्षं आता खिजवतात, आतापर्यंत काय केलं? काय केलं आत्तापर्यंत?
स्पर्धेत लिहिलेली माझी कविता (क्या उखाड़ लिया?) हिंदी शीर्षक बदलून आणि थोडी सुधारून इथे सामविष्ट करतोय.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 7742
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

एक 'मग' त्या आवर्तनाच्या हाती द्या. मग आत्तापर्यंत काय केलं? सं - दी - प

हे कसं वाटतंय? --> निष्पर्ण पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला मग आतापर्यंत काय केलं --> निष्पर्ण पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारलं मग आतापर्यंत काय केलं

आणि --> थोडीफार उरली वर्षं, त्यांनी आता खिजवलं मग आतापर्यंत काय केलं

लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

मुळ भावना कधी पण श्रेष्ठ.. भले ती ऐकण्यास.. वाचण्यास आडवळण घेत असेल.. प्रत्येक वाचकाची मते वेगळीच असतात.. पण तरी हि क्या उखाड लिया.. म्हणजे आमच्याकडे मराठीत असे म्हणतात.. काय गाजवली तू आता पर्यंत? हे अधिकार भावनेने आहे कुठे तरी.. ज्याला जास्त कळते तो दुसऱ्याला असे बोलतो.. पळस, पाने, वर्षं हि आपल्या पेक्षा अनुभवांनी जास्त ते खडसावतात हे मुळ भावनेत व्यक्त होतेच.. आता पर्यंत काय केलं? हे म्हणजे वरण भात बोलणे झाले.. म्हणजे विचारणारा गप विचारतोय सांग ना काय केले अवांतर : कवी म्हणत असेल अरे लिखू तो क्या लिखू, बोलू तो क्या बोलू... :-)) :-)) मटण लिखा तो वरण चाहिये, वरण लिखा तो तिखापण चाहिये

मस्त