कुत्रत्वाचे नाते (?) नाण्याची दुसरी बाजू
कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. इमानी आहे, प्रेमळ आहे, अमुक करतो, तमुक करतो इ इ आपण https://www.misalpav.com/node/44832 या आणि अश्या अनेक धाग्यावर आणि प्रतिक्रियांमध्ये वाचलेच असेल..
पण ज्या न्यायाने प्रत्येक माणूस एकसारखा नसतो त्याच्या न्यायाने प्रत्येक इतर प्राणी देखील एकसारखा नसतो. उदा. काही बैल आपल्या मालकाशी प्रेमाने वागतात तर काही बैल समोर येईल त्याला डोक्यावर घेतात. मग तो मालक असो वा आणखी कोणी..
मग कुत्रा देखील याला अपवाद कसा असेल??
काही लोक भटक्या तसेच पाळीव कुत्र्यामुळे होणाऱ्या समस्यांकडे कसे काय दुर्लक्ष करू शकतात बुवा?? नाही.. मान्य आहे कि तुम्हाला आणि तुमच्यासारख्या इतर बऱ्याच लोकांना कुत्रा, कुत्री, पिल्ले, त्यांचे झुंड आवडतात तर काहींना ते धार्मिक कारणांमुळे प्रिय आहेत पण.... पण फक्त ते तुम्हाला आवडतात म्हणून त्यांनी निर्माण केलेल्या समस्या तुमच्या सह इतर सर्व 100 टक्के लोकांनी सहन का करायच्या??? आता तुम्ही म्हणाल कि कोणत्या समस्या... तर त्या समस्या खालीलप्रमाणे आहेत.
1) कुत्र्यामुळे आजूबाजूला होणारी घाण वा दुर्गंधी
2) कुत्र्याने चावा घेतल्यामुळे होणारा जीवघेणा आजार - रेबीज. हा आजार होण्यासाठी कुत्र्याने चावणे गरजेचे नाही. त्याच्याशी खेळताना (?) त्याचे लाडे लाडे करताना त्याची लाळ उघड्या जखमेद्वारे आपल्या रक्तप्रवाहात गेली तरी पुरे..
3) कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणारे वृद्ध व लहान मुले.
कोल्हापूर येथील कचरा डम्पिंग च्या बाजूला असणाऱ्या झोपडपट्टी मध्ये एका लहान मुलीच्या उडवलेल्या चिंधड्या डोळ्याने पाहिलेल्या आहेत. अशी हजारो उदाहरणे सापडतील
4) दुचाकी व चारचाकी वाहनांचे होणारे अपघात. यात अनेक जण जायबंदी झाले तर बरेचसे मृत्यमुखी सुद्धा पडले.
माझा एक मित्र अश्याच अपघातामुळे एका पायाने कायमचा अधू झालाय.
5) कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे वयोवृद्ध, आजारी व्यक्ती, विद्यार्थी यांना होणारा त्रास.
आता हे सर्व त्रास मी काही माझ्या मनाचे सांगत नाहीये.. हे सर्व रिअल आहे. आता या सर्व त्रासांच्या मुळाशी न जाता जे काही प्रवचन या धाग्यावर या धाग्यावर दिले गेले जसे कि त्यांना बिस्किटे चारा, दूध पाजा, गोंजारा, प्रेम करा, कुत्रे दिसल्यावर खाली बसा, पळू नका, या सर्वात माणसाचीच चूक आहे इ इ... या सर्व बडबडीला प्रॅक्टिकली काहीही अर्थ नाहीये.!!
मुळातच हि समस्या का निर्माण झाली याची करणे पाहू
1) मनपा आणि इतर govt संस्थांचे लसीकरण व निर्बीजीकरणाकडे केले जाणारे दुर्लक्ष.
2) कुत्राप्रेमी लोकांनी काहीबाही खाऊ घातल्यामुळे त्यांच्या नैसर्गिक वृत्तीत झालेला बदल आणि त्यांचा वाढलेला fertility rate
या दोन गोष्टिकडे साफ दुर्लक्ष करून हे कुत्राप्रेमी इतर सर्वाना बदलण्याचे आवाहन का करतात? म्हणजे तुम्हाला कुत्रे आवडतात म्हूणन तुम्ही त्यांनी निर्माण केलेल्या समस्यांकडे, त्रासाकडे दुर्लक्ष करायचे, आणि इतर सर्वांनी हि तेच करायला पाहिजे अशी बळजबरी का?
आणि तुम्ही जर खरेच कुत्रा प्रेमी असाल तर त्यांनी केलेली घाण देखील साफ करण्याची तयारी दाखवा कि मग..!! कारण ते तुम्ही लोकच आहात ज्यांच्यामुळे सरकारी यंत्रणा सुद्धा भटक्या कुत्र्यांवर कारवाई करायला बिचकते.
तुम्हाला कुत्र्यांना खायला घालायला जमते मग त्यांनी केलेली घाण साफ करायला हात का आखडता घेता?? कि त्या वेळेला कुत्राप्रेम उडून जाते.
भटकी कुत्री सोडून दया अगदी पाळीव कुत्री देखील सकाळी सकाळी फिरवून आणण्याच्या बहाण्याने हागवुन आणली जातात. त्याची दुर्गंधी आणि त्रास हे इतर लोकांनी का सहन करायचा बरे..??
तुम्हाला भटक्या कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घालायला आवडतात मग तुम्ही ते खुशाल करा मी त्याला विरोध करत नाही. पण त्यांचा त्रास जेव्हा इतरांना होऊ लागतो (जसे कि मी आणि अजुन बरेच ) तर मी देखील त्यांना बिस्किटे खायला घालून त्यांच्याशी प्रेमाने वागत बसावे हा अट्टाहास का??
आणि तुम्हा लोकांना इतकेच त्यांची काळजी आणि प्रेम असेल तर मग त्यांना असे रस्त्यावर बोंबलत का सोडून देता? सरळ त्यांना घरी घेऊन जाऊन त्यांचे लाड का पुरवत नाही?
तुम्हाला एका स्कुटर ने कुत्र्याचे पिल्लू उडवल्यावर माणसांचा इतका राग येतो. त्या पिलाबद्दल आणि आईबद्दल इतकी सहानुभूती वाटते तर मग कुत्र्यांमुळे जे अपघात होतात आणि त्यात जे मृत होतात किंवा जायबंदी होतात, रेबीज मुळे मरतात, त्यांची जबाबदारी कुत्राप्रेमी म्हणून तुम्ही घेणार का?? कि तेव्हा देखील माणसाचीच चुकी होती???
आणि शेवटी प्रश्न हा हि येतो फक्त कुत्र्यालाच हि वागणूक का.?? इतर प्राणी देखील आहेत कि इथे..
समजा मला साप आणि नाग आवडतात त्यांच्याशी खेळायला आवडते मग त्यांना मी रस्त्यावर सोडून दिले आणि येता जाता त्यांना उंदीर खायला घातले.. त्यांचे लाड पुरवले.. त्यांच्याशी खेळत बसलो.. आणि तुम्ही तक्रार केली तर तुम्हाला देखील माझ्यासारखेच करायचा सल्ला दिला तर तुम्हाला काय वाटेल??
नाही.. मान्य आहे अतिशयोक्ती होतेय पण माझ्या मते उदाहरण म्हणून बरोबर आहे..
अजुन काही महत्वाच्या गोष्टी -
तुम्ही लोक भटक्या कुत्र्यांना ज्या चपात्या ( रात्री शिळ्या राहिलेल्या फेकून द्यायला नको म्हणून ) खायला देता.. जी बिस्किटे चारता हे कुत्र्यांचे नैसर्गिक अन्न नाहीये.. हे सर्व देऊन मला नाही वाटत कि तुम्ही त्यांचे भले करता.. मिपावर कोणी जाणकार असतील तर अजुन स्पष्टीकरण देऊ शकतील..
भटकी कुत्री तुम्हाला इतकीच प्रिय असतील तर मी वर सांगितलेल्या मुद्द्यांवर विचार करून त्यांना खरी "मदत" करा . त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करा.. जेणेकरून त्यांचे स्वतःचे आणि त्याचबरोबर इतर सर्वाचे जगणे सुसह्य होईल.
धन्यवाद.. !!!
वर्गीकरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
+ १
पूर्वी मनपा वाले भटकी कुत्री
सहमत
बरोबर लिहीलेत
+९९९९९९९९९९९९
तंतोतंत बरोबर
तिसरी-चौथी बाजू -
वामन देशमुख जी..
तसं नाही हो बाप्पू जी.
एकच सांगतो
शब्दा शब्दाशी सहमत आहे बाप्पू!
तुम्ही किनई
सैन्याची मदत करणारे, राखण
सहमत
लाख मोलाचा बात
भटकता कुत्रा हा पाळीव नाहीये.
योगायोग कि अजून काही?
संदर्भ -
आपल्या मताशी पूर्ण सहमत.
भटके कुत्रे मातीत आपलं
परंतु विष्ठा मातीने झाकावी हि
करेक्ट
डँबिस आहे वाटते कुत्रा
+ 111111
कधी मुंबईतल्या आरे कॉलनीत
कुत्रे आपली चतुस्सीमा आपले