वामनराव खुप सोसलत मुंबईत येउन खरच तुमच्या लिखाणावरुन अस वाटत आहे
एक वेळ जेउन अस दुसर्याच्या घरी राहुन तुम्ही खुप खस्ता खाल्ल्या अस्तील राव
आजकाल कोनी नाहि करत ऍव्हड सख्या भावासाठी पण नाही करत
मानतो तुम्हाला आणी तुमच्या अण्णांना खरच
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
जे काय वाचतो आहे, ते डोळ्याला दिसत आहे, समजत आहे पण कधीतरी संगणक नुस्ता घर्र आवाज काढत तापत असतो, स्क्रीन फ्रीज झाली असते, ना धड चालू असतो ना धड बंद होत असतो, तसे झाले आहे.
चार तास होत आले की आता काय खायचे हा विचार त्रस्त करत असतो.
मागे एकदा प्रवासात एका वयस्कर दांपत्याशी गप्पा मारताना, ते सांगत होते आमच्या लहानपणी (दुसरे महायुद्धाचा काळ) परिस्थीती इतकी बिकट होती, टंचाई होती, गरीबी होती की लहान मुलांना पुरेसे अन्न देउ शकु की नाही असे वाटायचे. आता नातवंडे सांभाळताना इतके जिन्नस त्यांच्या समोर आणून ठेवले असतात पण पुरेसे व योग्य खात नाहीत ही चिंता असते.
ही लेखमाला औरच!
वरील प्रतिसादींशी पूर्ण सहमत आहे. 'भोगले जे दु:ख ज्याला'च्या पलीकडे जाऊन साध्यासरळ भाषेत, कुठल्याही उपदेशा/अभिनिवेशाशिवाय होतं ते असं होतं, हे मांडणारी तुमची लेखमाला - प्रत्येक भागागणिक अधिक आवडायला लागली आहे.
हा भाग वाचुन अगदीच सुन्न झालो. तुमचा भुतकाळ पाहीला की आम्ही आता किती राजेशही जीवन जगतो आहोत हे वाटुन जातं.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
अप्रतिम लेख मालिका.... :)
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
"असे होते दिवस..." अशा नावाचे आत्मचरित्र वाचतो आहे असे जाणवत राहते.
अत्यंत प्रांजळ आणि वास्तव लेखन. खूप आवडले.
('हरून' अरुण वडुलेकरांची आठवण झाली. कुठे आहेत?)
कोणता काळ आहे हा? १९४०?५०?
या लेखनात स्वतःच्या जीवनविषयक अनुभवांसोबत समाजातील घडामोडींचे अथवा भौगोलिक परिस्थितीचे (जसे राजकीय घडामोडी, गोरेगावचा (मुंबईचा) त्यावेळचा विस्तार , बोट सर्विसची शिपिंग कंपनी इ.) वर्णन आले तर हे लेखन त्या काळातल्या समाजजीवनाचा महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल. कृपया सूचनेचा विचार व्हावा.
हलाखी, गरिबी, कष्ट, शिक्षणाची हेळसांड, मुंबईची वाट धरणे, तिथल्या व्यवस्थेत स्वतःला बदलवून चिणून टाकणे हे सगळे प्रकार मला वाटते त्यावेळच्या कोकणवासियांसाठी थोड्याफार फरकाने अनुभवायला येत असावेत. असे जरी असले तरी प्रत्यक्ष अनुभवातून गेलेल्याकडून हे लिहिलेले वाचताना त्यातले बारकावे उमजतात. तुम्ही सांगितलेल्या कोकणातल्या जीवनमानाशी जुळणार्या घटना माझ्या आजोबांच्या तोंडून ऐकल्याचे आठवते.
तुलनेने अत्यंतिक सुखाच्या परमावधीत तर मी लहानपणापासून जगत नाहीये ना? असा प्रश्न मनात येतो आणि अस्वस्थता आणखीनच वाढते!
चतुरंग
आम्ही दोघेजण चौपाटीला गेलो असता माझ्या पायात चपला नसल्याचे त्याच्या लक्षात आले आणि ही गोष्ट त्याने अण्णाच्या कानावर घातली. सकाळी गणपतीच्या देवळात गेलो असता तेथे चपला गेल्या अशी थाप मी मारली तेव्हा काकाजवळ पैसे देऊन अण्णाने माझ्यासाठी चपला घेऊन येण्यास सांगितले.
ह्म्म.. अश्यावेळी त्या चपला नकोत असेच वाटले असेल....पण स्वाभिमान जपण्यालासुद्धा पोषक परिस्थिती लागते असे अनेकदा वाटते.
-- लिखाळ.
श्री. ना. पेंडसे यांची कादंबरी वाचत असल्यासारख वाटत आहे. सहज, सोपी ओघवती भाषा आणि सुन्दर शैली यामुळे सगळ वर्णन अगदी प्रत्यक्ष एखाद्या चित्रपटाप्रमाणे समोर येतय.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
>>.. मी फारच सोपं आणि सहज जगले असं वाटतं आता.
+१, असेच म्हणतो ...
आयला आमचे आयुष्य फारच सोपे आणि सुलभ होते असे वाटायला लागले आहे.
सुंदर लेखमाला, आंतरजालीय साहित्यातील एक वेगळ्याच धाटणीचा अनुभव म्हणुन जरुर ह्याची प्रशंसा केली जावी ...
जाता जाता :
आईनस्टाईनने गांधींबद्दल जसे उद्गार काढले त्याच धर्तीवर मी " कोणी एका काळी हाडामासाचा माणुस अशा प्रकारचे जीवन जगत होता ह्यावर कदाचित पुढच्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत" असे म्हणु इच्छितो ...
अर्थात माझा रोख त्या काळातल्या एकुणच कठिण असणार्या जीवनशैली व त्यासाठी कराव्या लागणार्या अत्यावश्यक तडजोडींवर आहे ...
अजुन येऊद्यात, आम्ही वाचतो आहोत ...
------
(वाचक)छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
या लेखनात स्वतःच्या जीवनविषयक अनुभवांसोबत समाजातील घडामोडींचे अथवा भौगोलिक परिस्थितीचे (जसे राजकीय घडामोडी, गोरेगावचा (मुंबईचा) त्यावेळचा विस्तार , बोट सर्विसची शिपिंग कंपनी इ.) वर्णन आले तर हे लेखन त्या काळातल्या समाजजीवनाचा महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल. कृपया सूचनेचा विचार व्हावा.
वरील विसुनानान्च्या सूचनेचा जरून विचार व्हावा. खुपच सुन्दर लिहिताय तुम्ही. तुमचे लेखन एक अमुल्य ठेवा ठरेल पुढच्या पिढिसाठी.
भांबेड, तिवरे या गावी मी जाउन आलो आहे. या भागाचे शहरीकरण न झाल्यामुळे अजून बकालपणा आला नाही आहे. अजूनही गावपण आहे. हे असेच राहावे असे वाटते.
गणपतीला कोकणात जातो तेव्हा एकदम ताजेतवाने झाल्यासारखे वाटते.
प्रतिक्रिया
खुप सोसलत हो
नेहेमीप्र
मीही
+१ सहमत
स्ट्रगल
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच
सुन्न झालो . . .
अप्रतिम
+१
+२
प्रत्येक
समाजजीवनाचा दस्तैवज
काळ
प्रत्येक लेख वाचतोय!
प्रत्येक भाग
वा.. हा भाग
छान.
बापरे..
+१,
अत्यन्त सुन्दर
अप्रतिम
सुंदर!!!
धन्यवाद
७
भांबेड, तिवरे या गावी मी जाउन