मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शांतरस

आत्ममग्न

चित्रा ·

सहज 16/03/2011 - 12:20
ही कविता तर जाहीरातीचे बोर्ड (billboard)* पाहून त्यावर रचली असेल तर भन्नाट!! सलाम!! अभिव्यक्तीच्या नव्या व्याख्या, नव्या सीमा इ इ कृपया थोडे समजवून सांगावे. *(मुसु गुर्जींचा शिष्य) सहज

५० फक्त 16/03/2011 - 12:45
माफ करा, पहिलं कडवं समजलं पन एकटीच असतेस पांढर्‍या गजांच्या खिडकीसमोर याचा संदर्भ लागला नाही, वेश्यावस्तीचा संद्रर्भ आहे का, या पांढ-या गजाच्या खिडकीला ?

In reply to by ५० फक्त

गणेशा 16/03/2011 - 15:39
अरे बापरे वेश्यावस्ती चा संधर्भ ? पांढर्‍या खिडक्या आनि याचा संभंध असतो का हे मला नविनच आहे कविता थोडीदार कश्यावर आहे हे विचार करायला लावणारी आहे हे नक्की. पण आपला प्रतिसाद ही तसाच आहे ... तसा अर्थ घेवुन रसग्रहण सांगितले तरी आवडेल मात्र. असो मी कशी वाचली कविता दे देतो .. कविता कश्यावर आहे या पेक्शा ती आपल्या मनातील कुठल्या भावना जागृत करते यातच त्या कवितेचा अर्थ दडलेला असतो असे वाटते मला.. कविता (पहिले कडवे).. पावसाच्या सरीवर आधारीत आहे .. असे मी वाचले .. ती सर आपल्या प्रियकराबरोबर- पावसाबरोबर त्याच्या मागुन जाते .. मागील रंगीत वस्त्रे कदाचीत प्रकाशामुळे/इंद्रधनुष्यामुळे असलेले रंग असतील असे वाटते .. कविता ( दूसरे कडवे ) म्हणजे पावसात भीजणारी एक शुद्ध हरपलेली वेल वाटते .. पांढरे गज म्हणजे पावसाच्या सरी आणि भिजणारी ती वेल असा अर्थ मी घेतला .. असो कविता आवडली मात्र ... अवांतर : १. एकाच कवितेचे वेगवेगळे अर्थ वाचकांनी सांगितले की कधी कधी कवी/कवयित्री ला ही आनंद होतो . २. निऑन रंग कसा असतो हे मात्र मला माहित नाही .. कसा असतो तो ? तरीही मुळ अर्थ कवयित्री ने सांगितल्यास छान वाटेलच

In reply to by गणेशा

अनाकलनीय कवितेचे अनाकलनीय अर्थ लावण्याची गणेशाची अप्रतिम हतोटी वादातीत आहे ! पांढरे गज म्हणजे पावसाच्या सरी हे तर मला बापजन्मात सुचले नसते =))))
आपल्या मनातील कुठल्या भावना जागृत करते यातच त्या कवितेचा अर्थ दडलेला असतो
हे मात्र एकदम भारी लिहिलंय गणेशाने. मला ही कविता वाचुन एकदम ही एखाद्या फेमीनिस्ट मुलीवर लिहिलेली आहे की काय असे वाटले. एखादी फेमीनिस्ट जी की तारुण्यात , कोवळ्यावयात एकदम उच्छृंखल पणे वागत आहे , वाट्टेल ते करत आहे , बेदरकारर्पणे एकदम योलो लाईफ जगत आहे , कोणासोबतही जात आहे , नुसता बॉडी काऊंट वाढवत आहे , सावरण्याची शुध्द सोडा, साधा सावरण्याचा विचारही जिच्या मनाला स्पर्श करत नाहीये तिचावर पहिलं कडवं लिहिलं आहे . अन दुसर्‍या कडव्यात जवानी सरुन गेल्यावर , ३५-४० मधील एकाकी फेमीनिस्ट रेखाटली आहे असे वाटले. पांढरे गज म्हणजे स्वकृर्तृत्वावर घेतलेल्या घराच्या खिडक्या असाव्यात , पण त्या घरात सोबत कोणीच नाही, प्रेम करणारा नवरा नाही, जीव लावणारी पोरं बाळं नाहीत , दोन डझन शुज आहेत , कपाटभरुन कपडे आहेत , पण कितीही रिव्हीलिंग कपडे घातले तरी त्यामागे वय सरुन गेलेलं एकाकी शरीर , त्याचं काळंकुट्टं वास्तव लपवता येण्यासारखं नाहीये , आधीही त्या देहाची शुध्द नव्हती अन आता शुध्द आली तरी काही उपयोग नाहीये . असा अर्थ मला जाणवला . असो. जुनी सुंदर कविता परत एकदा मेन पेज वर आणल्या बद्दल धन्यवाद !.

चित्रा 16/03/2011 - 17:04
दुर्बोध आहे हे मान्य आहे. मात्र कविता बिलबोर्ड बघून सुचली नाही :) गणेश यांचा अर्थ माझ्या मनातल्या अर्थाशी बराचसा मिळताजुळता आहे. थोडा फरक एवढाच आहे: पहिल्या कडव्यातली ती म्हणजे संध्याकाळच्या सूर्यामागे जाणारी त्याची प्रभा. (ऋग्वेदातली उषःसूक्ते ही बरीच प्रसिद्ध आहेत. यांचे मराठी भाषांतर काही वर्षांपूर्वी मी वाचल्याचे स्मरते. तेव्हापासून उषा ही तरूणी, नवयौवना असे केलेले ते वर्णन डोक्यात होते. ) अलिकडेच आम्ही काढलेले हे तीन फोटो देते आहे. संधिप्रकाशाचे रंग बघता बघता दोन मिनिटात काळोख झाला होता. दुसर्‍या कडव्यातली ती सुचली एका थंडीच्या दिवसांमध्ये गोठलेल्या फांदीवरून. कवितेला आधी "सूक्ते" असे नाव देणार होते. पण नंतर बदलले.

In reply to by चित्रा

चित्राताई, उषा वेगळी (सुर्योदयाच्या आधीची) आणि वरील प्रकाशचित्रासंबंधाने तुम्ही लिहिले आहे ती संध्या (सुर्यास्ता नंतरची) पण कविता (आणि प्रेरक प्रकाशचित्रे) छान. आभार

In reply to by वारकरि रशियात

चित्रा 16/03/2011 - 17:48
अगदी बरोबर. पण अर्थात गल्लत केली नव्हती. उषा पहाटेचीच. म्हणून ती कल्पना संधिकाळापर्यंत खेचली. अर्थात बाकी अर्थ नव्हते असे नाही. 'आधुनिकोत्तर' तरुणीही कुठेतरी मनात होती. :)

In reply to by चित्रा

गणेशा 16/03/2011 - 17:56
सूर्य हा प्रियकर आणि त्याच्या मागे जाणारी सांजवेळची त्याची किरणे त्याची प्रेयशी मस्तच वाटले वाचुन .. फोटो ही छान .. दूसर्‍या कवितेशी (कडव्याशी) लागलेला बरोबर अर्थ छान वाटले. तरीही ह्या दूसर्या कडव्यामुळे पहिल्या कवितेला तसा अर्थ लागला माझा नाहि तर तुम्ही सांगितलेले एकदम पटते आहे.. आणि निऑन कलर कसला असतो ते कळाले नसले तरी आता कळाले या सांजवेळे मुळे ... लिहित रहा .. वाचत आहे ...

मुक्तसुनीत 16/03/2011 - 19:16
कविता आवडली. मलाही बिलबोर्ड्सबद्दलच वाटली होती. तुम्ही सांगितलेली पार्श्वभूमी सुद्धा छानच.

रेवती 16/03/2011 - 19:23
दोन्ही कडवी तरुण मुलीवर केलेली असावीत असा अंदाज वाचल्यावर केला. गणेश यांनी सांगितलेला अर्थ खुपच आवडला. फोटू छानच. कविता वेगळी वाटली. निऑन रंगाच्या दरवाजाचा उल्लेख मनाची पकड घेणारा आहे.

पैसा 16/03/2011 - 19:32
कवितेतली लय आवडली. पण तू पार्श्वभूमी सांगितल्यावर कविता नीट कळली! (सकाळी घाईघाईत वाचली तेव्हा कोणी प्रतिक्रिया लिहिल्या नव्हत्या. मला एकदा पुसटंस वाटलं की हल्लीच झालेल्या 'वॉर्डरोब मालफंक्शन' च्या घटनांशी याचा काही संबंध आहे की काय?)

मलाही एका उशरुंखल / बिनधास्त मुलीबद्दल लिहिले आहे अस वाटल , पहिल्या कडव्यात प्रेमात बेहोश होऊन प्रिकराचया मागे सगळ सोडून गेलेली एक मुलगी पण (दुसर्या कडव्यात) धोका होऊन वेश्या व्यासायात / शोषण होऊन कृश झालेली अस काहीस वाटल (नीओन लाइट मुळे कनफूसड)

प्राजु 16/03/2011 - 20:26
फोटो बघितल्यावर कविता एकदम नीट समजली. आधी नीट नव्हती समजली. आधी पुण्यामध्ये मुलांच्या मागे बाईक्सवर चिकटून बसलेल्या, आणि वस्त्र (पक्षी टॉप्स) नीट सांभाळता न येणार्‍या तरूणी, या संदर्भातली असावी असे वाटले. कविता आवडली.

धनंजय 16/03/2011 - 20:37
नैसर्गिक संदर्भ माहीत नसताना अशा स्त्रियांची चित्रे कल्पून कविता खूप आवडली. संदर्भचित्रे बघितल्यानंतर कविता पुन्हा वाचली आणि पुन्हा खूप आवडली.

चित्रा 16/03/2011 - 22:32
कविता आवडल्याचे कळवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. यामुळे खूपच बरे वाटले, एवढेच म्हणते. कवितेचे निघणारे अर्थ वेगवेगळे असू शकतात आणि ते काढण्याचा अधिकार वाचकांना असतोच असे मला वाटते. गणेशा यांचे "कविता कश्यावर आहे या पेक्षा ती आपल्या मनातील कुठल्या भावना जागृत करते यातच त्या कवितेचा अर्थ दडलेला असतो असे वाटते मला.. " हे मला आवडले. त्यामुळे प्राजु, पैसा, माझीही शॅम्पेन, तुम्हाला (आणि खरे तर सर्वांनाच) लागलेले सर्व अर्थ चालू शकावे. सहज, मुक्तसुनीत आणि मेघवेडा यांना बिलबोर्डाचा भास झाला, तोही चालेल. आणि स्त्रियांची जी जी रूपे नजरेसमोर आली तीही चालावीत. (माझ्या मनात दुसर्‍या कडव्यात सर्व भोग भोगून त्यातून बाहेर पडलेल्या प्रौढेचेही रूप होते. )

चित्रगुप्त 14/06/2022 - 20:05
या कवितेतले पहिले कडवे वाचून मनःचक्षुंसमोर एक 'बेदरकार' मुक्त, अवखळ अशी तरुणी तरळली, तर नंतरच्या कडव्यात पुढे अनेक वर्षांनंतरची तीच स्त्री, पण आता एकाकी पडलेली, वृद्ध, रुग्ण, अशी असलेली वाटली. तरुणपणी ऐन तारुण्याच्या भरात "कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे? अशी बेदरकार वृत्ती, तर वृद्धपणी हताशा, उद्विग्नता यामुळे "कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे?" ही स्थिती. चित्रः Angelo Caroselli - Allegory of Youth and Old Age (१६०० - १६१५) .

कवीता वाचली, थोडी कळाली,प्रतीसाद वाचले मग दोन तीन वेगवेगळ्या रूपात दिसली. छायाचित्रे परदेशातली दिसतात. एकूण काय कवीता आवडली.

सहज 16/03/2011 - 12:20
ही कविता तर जाहीरातीचे बोर्ड (billboard)* पाहून त्यावर रचली असेल तर भन्नाट!! सलाम!! अभिव्यक्तीच्या नव्या व्याख्या, नव्या सीमा इ इ कृपया थोडे समजवून सांगावे. *(मुसु गुर्जींचा शिष्य) सहज

५० फक्त 16/03/2011 - 12:45
माफ करा, पहिलं कडवं समजलं पन एकटीच असतेस पांढर्‍या गजांच्या खिडकीसमोर याचा संदर्भ लागला नाही, वेश्यावस्तीचा संद्रर्भ आहे का, या पांढ-या गजाच्या खिडकीला ?

In reply to by ५० फक्त

गणेशा 16/03/2011 - 15:39
अरे बापरे वेश्यावस्ती चा संधर्भ ? पांढर्‍या खिडक्या आनि याचा संभंध असतो का हे मला नविनच आहे कविता थोडीदार कश्यावर आहे हे विचार करायला लावणारी आहे हे नक्की. पण आपला प्रतिसाद ही तसाच आहे ... तसा अर्थ घेवुन रसग्रहण सांगितले तरी आवडेल मात्र. असो मी कशी वाचली कविता दे देतो .. कविता कश्यावर आहे या पेक्शा ती आपल्या मनातील कुठल्या भावना जागृत करते यातच त्या कवितेचा अर्थ दडलेला असतो असे वाटते मला.. कविता (पहिले कडवे).. पावसाच्या सरीवर आधारीत आहे .. असे मी वाचले .. ती सर आपल्या प्रियकराबरोबर- पावसाबरोबर त्याच्या मागुन जाते .. मागील रंगीत वस्त्रे कदाचीत प्रकाशामुळे/इंद्रधनुष्यामुळे असलेले रंग असतील असे वाटते .. कविता ( दूसरे कडवे ) म्हणजे पावसात भीजणारी एक शुद्ध हरपलेली वेल वाटते .. पांढरे गज म्हणजे पावसाच्या सरी आणि भिजणारी ती वेल असा अर्थ मी घेतला .. असो कविता आवडली मात्र ... अवांतर : १. एकाच कवितेचे वेगवेगळे अर्थ वाचकांनी सांगितले की कधी कधी कवी/कवयित्री ला ही आनंद होतो . २. निऑन रंग कसा असतो हे मात्र मला माहित नाही .. कसा असतो तो ? तरीही मुळ अर्थ कवयित्री ने सांगितल्यास छान वाटेलच

In reply to by गणेशा

अनाकलनीय कवितेचे अनाकलनीय अर्थ लावण्याची गणेशाची अप्रतिम हतोटी वादातीत आहे ! पांढरे गज म्हणजे पावसाच्या सरी हे तर मला बापजन्मात सुचले नसते =))))
आपल्या मनातील कुठल्या भावना जागृत करते यातच त्या कवितेचा अर्थ दडलेला असतो
हे मात्र एकदम भारी लिहिलंय गणेशाने. मला ही कविता वाचुन एकदम ही एखाद्या फेमीनिस्ट मुलीवर लिहिलेली आहे की काय असे वाटले. एखादी फेमीनिस्ट जी की तारुण्यात , कोवळ्यावयात एकदम उच्छृंखल पणे वागत आहे , वाट्टेल ते करत आहे , बेदरकारर्पणे एकदम योलो लाईफ जगत आहे , कोणासोबतही जात आहे , नुसता बॉडी काऊंट वाढवत आहे , सावरण्याची शुध्द सोडा, साधा सावरण्याचा विचारही जिच्या मनाला स्पर्श करत नाहीये तिचावर पहिलं कडवं लिहिलं आहे . अन दुसर्‍या कडव्यात जवानी सरुन गेल्यावर , ३५-४० मधील एकाकी फेमीनिस्ट रेखाटली आहे असे वाटले. पांढरे गज म्हणजे स्वकृर्तृत्वावर घेतलेल्या घराच्या खिडक्या असाव्यात , पण त्या घरात सोबत कोणीच नाही, प्रेम करणारा नवरा नाही, जीव लावणारी पोरं बाळं नाहीत , दोन डझन शुज आहेत , कपाटभरुन कपडे आहेत , पण कितीही रिव्हीलिंग कपडे घातले तरी त्यामागे वय सरुन गेलेलं एकाकी शरीर , त्याचं काळंकुट्टं वास्तव लपवता येण्यासारखं नाहीये , आधीही त्या देहाची शुध्द नव्हती अन आता शुध्द आली तरी काही उपयोग नाहीये . असा अर्थ मला जाणवला . असो. जुनी सुंदर कविता परत एकदा मेन पेज वर आणल्या बद्दल धन्यवाद !.

चित्रा 16/03/2011 - 17:04
दुर्बोध आहे हे मान्य आहे. मात्र कविता बिलबोर्ड बघून सुचली नाही :) गणेश यांचा अर्थ माझ्या मनातल्या अर्थाशी बराचसा मिळताजुळता आहे. थोडा फरक एवढाच आहे: पहिल्या कडव्यातली ती म्हणजे संध्याकाळच्या सूर्यामागे जाणारी त्याची प्रभा. (ऋग्वेदातली उषःसूक्ते ही बरीच प्रसिद्ध आहेत. यांचे मराठी भाषांतर काही वर्षांपूर्वी मी वाचल्याचे स्मरते. तेव्हापासून उषा ही तरूणी, नवयौवना असे केलेले ते वर्णन डोक्यात होते. ) अलिकडेच आम्ही काढलेले हे तीन फोटो देते आहे. संधिप्रकाशाचे रंग बघता बघता दोन मिनिटात काळोख झाला होता. दुसर्‍या कडव्यातली ती सुचली एका थंडीच्या दिवसांमध्ये गोठलेल्या फांदीवरून. कवितेला आधी "सूक्ते" असे नाव देणार होते. पण नंतर बदलले.

In reply to by चित्रा

चित्राताई, उषा वेगळी (सुर्योदयाच्या आधीची) आणि वरील प्रकाशचित्रासंबंधाने तुम्ही लिहिले आहे ती संध्या (सुर्यास्ता नंतरची) पण कविता (आणि प्रेरक प्रकाशचित्रे) छान. आभार

In reply to by वारकरि रशियात

चित्रा 16/03/2011 - 17:48
अगदी बरोबर. पण अर्थात गल्लत केली नव्हती. उषा पहाटेचीच. म्हणून ती कल्पना संधिकाळापर्यंत खेचली. अर्थात बाकी अर्थ नव्हते असे नाही. 'आधुनिकोत्तर' तरुणीही कुठेतरी मनात होती. :)

In reply to by चित्रा

गणेशा 16/03/2011 - 17:56
सूर्य हा प्रियकर आणि त्याच्या मागे जाणारी सांजवेळची त्याची किरणे त्याची प्रेयशी मस्तच वाटले वाचुन .. फोटो ही छान .. दूसर्‍या कवितेशी (कडव्याशी) लागलेला बरोबर अर्थ छान वाटले. तरीही ह्या दूसर्या कडव्यामुळे पहिल्या कवितेला तसा अर्थ लागला माझा नाहि तर तुम्ही सांगितलेले एकदम पटते आहे.. आणि निऑन कलर कसला असतो ते कळाले नसले तरी आता कळाले या सांजवेळे मुळे ... लिहित रहा .. वाचत आहे ...

मुक्तसुनीत 16/03/2011 - 19:16
कविता आवडली. मलाही बिलबोर्ड्सबद्दलच वाटली होती. तुम्ही सांगितलेली पार्श्वभूमी सुद्धा छानच.

रेवती 16/03/2011 - 19:23
दोन्ही कडवी तरुण मुलीवर केलेली असावीत असा अंदाज वाचल्यावर केला. गणेश यांनी सांगितलेला अर्थ खुपच आवडला. फोटू छानच. कविता वेगळी वाटली. निऑन रंगाच्या दरवाजाचा उल्लेख मनाची पकड घेणारा आहे.

पैसा 16/03/2011 - 19:32
कवितेतली लय आवडली. पण तू पार्श्वभूमी सांगितल्यावर कविता नीट कळली! (सकाळी घाईघाईत वाचली तेव्हा कोणी प्रतिक्रिया लिहिल्या नव्हत्या. मला एकदा पुसटंस वाटलं की हल्लीच झालेल्या 'वॉर्डरोब मालफंक्शन' च्या घटनांशी याचा काही संबंध आहे की काय?)

मलाही एका उशरुंखल / बिनधास्त मुलीबद्दल लिहिले आहे अस वाटल , पहिल्या कडव्यात प्रेमात बेहोश होऊन प्रिकराचया मागे सगळ सोडून गेलेली एक मुलगी पण (दुसर्या कडव्यात) धोका होऊन वेश्या व्यासायात / शोषण होऊन कृश झालेली अस काहीस वाटल (नीओन लाइट मुळे कनफूसड)

प्राजु 16/03/2011 - 20:26
फोटो बघितल्यावर कविता एकदम नीट समजली. आधी नीट नव्हती समजली. आधी पुण्यामध्ये मुलांच्या मागे बाईक्सवर चिकटून बसलेल्या, आणि वस्त्र (पक्षी टॉप्स) नीट सांभाळता न येणार्‍या तरूणी, या संदर्भातली असावी असे वाटले. कविता आवडली.

धनंजय 16/03/2011 - 20:37
नैसर्गिक संदर्भ माहीत नसताना अशा स्त्रियांची चित्रे कल्पून कविता खूप आवडली. संदर्भचित्रे बघितल्यानंतर कविता पुन्हा वाचली आणि पुन्हा खूप आवडली.

चित्रा 16/03/2011 - 22:32
कविता आवडल्याचे कळवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. यामुळे खूपच बरे वाटले, एवढेच म्हणते. कवितेचे निघणारे अर्थ वेगवेगळे असू शकतात आणि ते काढण्याचा अधिकार वाचकांना असतोच असे मला वाटते. गणेशा यांचे "कविता कश्यावर आहे या पेक्षा ती आपल्या मनातील कुठल्या भावना जागृत करते यातच त्या कवितेचा अर्थ दडलेला असतो असे वाटते मला.. " हे मला आवडले. त्यामुळे प्राजु, पैसा, माझीही शॅम्पेन, तुम्हाला (आणि खरे तर सर्वांनाच) लागलेले सर्व अर्थ चालू शकावे. सहज, मुक्तसुनीत आणि मेघवेडा यांना बिलबोर्डाचा भास झाला, तोही चालेल. आणि स्त्रियांची जी जी रूपे नजरेसमोर आली तीही चालावीत. (माझ्या मनात दुसर्‍या कडव्यात सर्व भोग भोगून त्यातून बाहेर पडलेल्या प्रौढेचेही रूप होते. )

चित्रगुप्त 14/06/2022 - 20:05
या कवितेतले पहिले कडवे वाचून मनःचक्षुंसमोर एक 'बेदरकार' मुक्त, अवखळ अशी तरुणी तरळली, तर नंतरच्या कडव्यात पुढे अनेक वर्षांनंतरची तीच स्त्री, पण आता एकाकी पडलेली, वृद्ध, रुग्ण, अशी असलेली वाटली. तरुणपणी ऐन तारुण्याच्या भरात "कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे? अशी बेदरकार वृत्ती, तर वृद्धपणी हताशा, उद्विग्नता यामुळे "कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे?" ही स्थिती. चित्रः Angelo Caroselli - Allegory of Youth and Old Age (१६०० - १६१५) .

कवीता वाचली, थोडी कळाली,प्रतीसाद वाचले मग दोन तीन वेगवेगळ्या रूपात दिसली. छायाचित्रे परदेशातली दिसतात. एकूण काय कवीता आवडली.
प्रियकरामागून जातेस नीऑन रंगांच्या दरवाज्यातून बेदरकारपणे - होतेस स्वार - गार वार्‍यावर, मागे उडणारी रंगीत वस्त्रे सावरण्याची शुद्ध नाही तुला कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे? * एकटीच असतेस पांढर्‍या गजांच्या खिडकीसमोर निर्विकारपणे - शहारतेस - गार वार्‍याने, पारदर्शक वस्त्रांतून काटकुळे अंग दिसू नये याची शुद्ध नाही तुला कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे? *

आठवणी ... !!

प्रकाश१११ ·

ज्ञानराम 16/03/2011 - 12:12
खूप छान आपले जुने मातिचे घर आठवणीतून अलगद येते वर ती श्रावणातील सकाळ परीक्षेचा पेपर.... तो कोंबडा छाप ब्लोटिंग पेपर नव्या पुस्तकांचा करकरीत वास आपल्या अंतरंगात झीरपतात मृदुगंधासारख्या ...!! विशेश आवडले..

चित्रा 18/03/2011 - 07:32
आवडली कविता.. खूप मनापासून आतून आली आहे हे प्रत्येक शब्दातून कळते आहे.

ज्ञानराम 16/03/2011 - 12:12
खूप छान आपले जुने मातिचे घर आठवणीतून अलगद येते वर ती श्रावणातील सकाळ परीक्षेचा पेपर.... तो कोंबडा छाप ब्लोटिंग पेपर नव्या पुस्तकांचा करकरीत वास आपल्या अंतरंगात झीरपतात मृदुगंधासारख्या ...!! विशेश आवडले..

चित्रा 18/03/2011 - 07:32
आवडली कविता.. खूप मनापासून आतून आली आहे हे प्रत्येक शब्दातून कळते आहे.
आठवणी असतात मनात दडलेल्या येतात अचानक नकळत मनाच्या काठावर अलगद पावलांनी नि येतात समोर अनाहुतपणे..... आठवणी कधीकधी भासाच्या कधीकधी त्रासाच्या मनात रुजलेल्या पिंपळाच्या झाडासारख्या खोल पसरलेल्या घट्ट खोल मुळांच्या काही आठवणी नाजूक प्रेमाच्या अलगद मोरपिसी आठवणीच्या अल्लड पाउस नि तिच्या सोबत चिंब चिंब भीजल्याच्या गरमागरम चहाच्या आठवणी नाही होत कधी शिळ्या नाही उडत त्याचा रंग त्या असतात रंगीत आंबट चिंबट मस्त चवीच्या …! आपले जुने मातिचे घर आठवणीतून अलगद येते वर ती श्रावणातील सकाळ परीक्षेचा पेपर....

दु:ख

पद्मश्री चित्रे ·

ज्ञानराम 14/03/2011 - 09:40
खुपच सुंदर फुलवा.."दु:ख माझे देखणे , द्रिष्ट त्या लावू नका " दु:ख अस पण व्यक्त करता येतं ना !!

टारझन 14/03/2011 - 10:46
छाण गं मस्त गं ... :) - अद्भुत गुत्ते अग फुलवा तु फुलवायचं || की नुस्तंच झुलवायचं || शिंगरु मेलं हेलपाट्यानं ||असं नाही चालायचं || तुका म्हणे ||धृ||

वाळवंटासारखा -निष्पर्ण मी, निष्प्राण मी मॄगजळाची ओढ माझ्या , अंतरी उजळू नका वाह... एकेक कडवे सुंदरच.... मांडणी निट केलीत तर अजुनही परीणामकारक होईल.

गणेशा 15/03/2011 - 17:49
सुंदर कविता .. प्रत्येक शेर जबरदस्त दु:ख माझे देखणे , द्रिष्ट त्या लावू नका एकटा आहे सुखी मी, सोबती होवू नका.. चांदण्यांचा हा पसारा ,चंद्र तरीही एकटा शल्य घेवूनी फिरे तो, तेजावरी जावू नका.. एकदम छानच

राघव 24/06/2011 - 19:22
वाळवंटासारखा -निष्पर्ण मी, निष्प्राण मी मॄगजळाची ओढ माझ्या , अंतरी उजळू नका... क्लास! फार दिवसांनी वाचले! राघव

मायमराठी 22/11/2019 - 23:27
शल्य घेऊनी फिरे तो, तेजावर जाऊ नका वेदनेची आग उरली ती तरी मागू नका फक्त अशा एकेक ओळी घेऊन लिहायचे ठरवले तरी कित्येक तरुण हिरव्या पानांचा वृद्ध पाचोळा होईपर्यंत लिहिता येईल. वरवर जरी वैयक्तिक भावना वाटली तरी ह्यांत प्रत्येक मानव डुंबलेलाही दिसतोय. किंबहुना हे दुःख फार वैश्विक वाटतंय मला. काहीतरी मिरवावं ह्या धाटणीचे धीट शब्द नेमकेपणे काळजात उतरतात. लिहिणारी व्यक्ती व वाचक यांच्या मनामनांतील अंतर मिटवून टाकून दोघे एकाच कट्ट्यावर बाजूबाजूला बसवून टाकलं या रचनेने. इतकं की आपणच कोणी गुप्तहेर कवी नेमून त्याला स्वतःवरच पाळत ठेवायला सांगितली. त्याने आपलं यथोचित केलेलं वर्णनाचं आपल्याला नवल वाटावं. आणि मग त्या दुःखाचं कौतुक जाणवू लागून ते कोणालाही सांगायचंच नाही, या जाणीवेने ते आपल्याच मुखावाटे नकळत बाहेर पडावं. एकंदरीत हवंहवंसं वाटावं असं हे वेदनेचे शब्दचित्र खूपच भावलं. एव्हाना कविता आवडली हे वेगळ्याने सांगायला हवंच का? त्या आवडलेपणाच्या भरात वर काहीबाही बरळलो; त्याबद्दल माफ करा.

ज्ञानराम 14/03/2011 - 09:40
खुपच सुंदर फुलवा.."दु:ख माझे देखणे , द्रिष्ट त्या लावू नका " दु:ख अस पण व्यक्त करता येतं ना !!

टारझन 14/03/2011 - 10:46
छाण गं मस्त गं ... :) - अद्भुत गुत्ते अग फुलवा तु फुलवायचं || की नुस्तंच झुलवायचं || शिंगरु मेलं हेलपाट्यानं ||असं नाही चालायचं || तुका म्हणे ||धृ||

वाळवंटासारखा -निष्पर्ण मी, निष्प्राण मी मॄगजळाची ओढ माझ्या , अंतरी उजळू नका वाह... एकेक कडवे सुंदरच.... मांडणी निट केलीत तर अजुनही परीणामकारक होईल.

गणेशा 15/03/2011 - 17:49
सुंदर कविता .. प्रत्येक शेर जबरदस्त दु:ख माझे देखणे , द्रिष्ट त्या लावू नका एकटा आहे सुखी मी, सोबती होवू नका.. चांदण्यांचा हा पसारा ,चंद्र तरीही एकटा शल्य घेवूनी फिरे तो, तेजावरी जावू नका.. एकदम छानच

राघव 24/06/2011 - 19:22
वाळवंटासारखा -निष्पर्ण मी, निष्प्राण मी मॄगजळाची ओढ माझ्या , अंतरी उजळू नका... क्लास! फार दिवसांनी वाचले! राघव

मायमराठी 22/11/2019 - 23:27
शल्य घेऊनी फिरे तो, तेजावर जाऊ नका वेदनेची आग उरली ती तरी मागू नका फक्त अशा एकेक ओळी घेऊन लिहायचे ठरवले तरी कित्येक तरुण हिरव्या पानांचा वृद्ध पाचोळा होईपर्यंत लिहिता येईल. वरवर जरी वैयक्तिक भावना वाटली तरी ह्यांत प्रत्येक मानव डुंबलेलाही दिसतोय. किंबहुना हे दुःख फार वैश्विक वाटतंय मला. काहीतरी मिरवावं ह्या धाटणीचे धीट शब्द नेमकेपणे काळजात उतरतात. लिहिणारी व्यक्ती व वाचक यांच्या मनामनांतील अंतर मिटवून टाकून दोघे एकाच कट्ट्यावर बाजूबाजूला बसवून टाकलं या रचनेने. इतकं की आपणच कोणी गुप्तहेर कवी नेमून त्याला स्वतःवरच पाळत ठेवायला सांगितली. त्याने आपलं यथोचित केलेलं वर्णनाचं आपल्याला नवल वाटावं. आणि मग त्या दुःखाचं कौतुक जाणवू लागून ते कोणालाही सांगायचंच नाही, या जाणीवेने ते आपल्याच मुखावाटे नकळत बाहेर पडावं. एकंदरीत हवंहवंसं वाटावं असं हे वेदनेचे शब्दचित्र खूपच भावलं. एव्हाना कविता आवडली हे वेगळ्याने सांगायला हवंच का? त्या आवडलेपणाच्या भरात वर काहीबाही बरळलो; त्याबद्दल माफ करा.
दु:ख माझे देखणे , द्रिष्ट त्या लावू नका एकटा आहे सुखी मी, सोबती होवू नका.. चांदण्यांचा हा पसारा ,चन्द्र तरीही एकटा शल्य घेवूनी फिरे तो, तेजावरी जावू नका.. पापण्यांच्या आड पाणी, सागराला लाजवी हासरा चेहरा बघूनी, गोडवे गावू नका... साद मिटते अन्तरी, शब्द सारे पोरके वेदनेची आग उरली, ती तरी मागू नका.. घाव आहे जीवघेणा , तरी ही जिव्हारी राखतो बेगडी या सान्त्वनाची ,आस मज दावू नका... वाळवंटासारखा -निष्पर्ण मी, निष्प्राण मी मॄगजळाची ओढ माझ्या , अंतरी उजळू नका...

विचित्र मन......

किरन वनारे ·
मन हे असे का विचित्र विचारात गुन्तते, दिवसा ढ्वळा पड्ल्या शुन्य स्वप्नात रमते, ए़़कान्त एकान्त शोधत नुसते स्वतातच रमते, रस्तातल्या गर्दित सुध्दा स्वतालाच शोधते, मन मन करतो पण बरे कुठे हे असते, शरिरातला कुठ्ला कोपरा धरुन हे बसते, काहितरि नुसते नविन सविन शोधत फिरते, जे नाहि अस्तित्वात चुकुन त्यालाच का शोधते, समजावले कितिदा आरे....

स्त्री सूक्त

योगप्रभू ·

Pearl 08/03/2011 - 17:03
खूपच छान कविता. >> सक्षमीकरण शब्द अवघड वाटला तरी सक्षमीकरणाचा सोपा आहे अर्थ पुरुषातील कोमल स्त्री जागवा आणि स्त्रीमधला पुरुषार्थ >> हे कडवे विशेष आवडले :-)

योगप्रभू 09/03/2011 - 09:54
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद... या तीन स्वतंत्र चारोळ्या कविता आहेत. तिसरी कविता बहुतेकांना आवडली. पण मला वाटते, की दुसरीही कविता अंतर्मुख करणारी ठरावी. कारण महाराष्ट्र टाइम्समध्ये अलिकडेच एक बातमी वाचली, की विवाहानंतर ३ ते ५ वर्षांतच घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढते आहे. जोडप्याला मूल असले तरी त्याचा विचार न करता इगो हा मुद्दा प्रभावी ठरतो आहे आणि त्यातूनच सहजगत्या विभक्त होण्याचे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. ही स्थिती अस्वस्थ करणारी आहे. 'पहावे आपणासी आपण' एवढेच या कवितेतून सांगायचे आहे.

In reply to by योगप्रभू

गणेशा 09/03/2011 - 13:05
[:)] तिनही वेगवेगळ्या कोणातून छान मेसेज देणार्‍या कविता आहेत. मला दुसरीच कविता जास्त आवडली होती... आणि तुम्ही म्हणता तसाच अर्थ लावला होता त्यामुळे तुमच्या स्पष्टीकरनानंतर आनखिनच छान वाटले .. लिहित रहा .. वाचत आहे

Pearl 09/03/2011 - 11:07
>>दुसरीही कविता अंतर्मुख करणारी ठरावी. कारण महाराष्ट्र टाइम्समध्ये अलिकडेच एक बातमी वाचली, की विवाहानंतर ३ ते ५ वर्षांतच घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढते आहे. जोडप्याला मूल असले तरी त्याचा विचार न करता इगो हा मुद्दा प्रभावी ठरतो आह>>>> दुसरी कविता आता खूपच जास्त भावली. म्हणजे तुम्ही अर्थ स्पष्ट केल्यानंतर. मला असं वाटत की 'स्त्री-सूक्त' नावाखाली सर्व कविता अस्ल्याने बहुतेक सर्व वाचकांना 'नाजूक सुंदर फुल म्हणजे स्त्री' असं वाटलं असावं. किंवा निदान मला तरी तसं वाटलं होतं :-) पण आता तुम्ही जो context दिला, त्यावरून ती कविता आत्ता खरी भावते आहे. लेखकाचा /कविचा view कळणे नेहमीच फायद्याचे असते. त्यामुळे लेखन जास्त कळते असं मला वाटतं. e.g. एखाद्या नाटककाराने स्वतः लिहिलेले नाटक बसवले तर ते जास्त प्रभावी ठरते. तेच नाटक जर इतरांनी (नाटक वाचून) बसवले तर बर्‍याच वेळा तितके प्रभावी होत नाही. कारण 'Reading between the lines' योग्य प्रकारे होत नाही. I mean लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे, नेमका मतितार्थ काय आहे, context काय आहे हे फक्त लेखकच नीट सांगू शकतो (निदान कविता/नाटक यांच्या बाबतीत तरी.) सो दुसरी कविता पण खूप आवडेश :-)

Pearl 08/03/2011 - 17:03
खूपच छान कविता. >> सक्षमीकरण शब्द अवघड वाटला तरी सक्षमीकरणाचा सोपा आहे अर्थ पुरुषातील कोमल स्त्री जागवा आणि स्त्रीमधला पुरुषार्थ >> हे कडवे विशेष आवडले :-)

योगप्रभू 09/03/2011 - 09:54
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद... या तीन स्वतंत्र चारोळ्या कविता आहेत. तिसरी कविता बहुतेकांना आवडली. पण मला वाटते, की दुसरीही कविता अंतर्मुख करणारी ठरावी. कारण महाराष्ट्र टाइम्समध्ये अलिकडेच एक बातमी वाचली, की विवाहानंतर ३ ते ५ वर्षांतच घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढते आहे. जोडप्याला मूल असले तरी त्याचा विचार न करता इगो हा मुद्दा प्रभावी ठरतो आहे आणि त्यातूनच सहजगत्या विभक्त होण्याचे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. ही स्थिती अस्वस्थ करणारी आहे. 'पहावे आपणासी आपण' एवढेच या कवितेतून सांगायचे आहे.

In reply to by योगप्रभू

गणेशा 09/03/2011 - 13:05
[:)] तिनही वेगवेगळ्या कोणातून छान मेसेज देणार्‍या कविता आहेत. मला दुसरीच कविता जास्त आवडली होती... आणि तुम्ही म्हणता तसाच अर्थ लावला होता त्यामुळे तुमच्या स्पष्टीकरनानंतर आनखिनच छान वाटले .. लिहित रहा .. वाचत आहे

Pearl 09/03/2011 - 11:07
>>दुसरीही कविता अंतर्मुख करणारी ठरावी. कारण महाराष्ट्र टाइम्समध्ये अलिकडेच एक बातमी वाचली, की विवाहानंतर ३ ते ५ वर्षांतच घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढते आहे. जोडप्याला मूल असले तरी त्याचा विचार न करता इगो हा मुद्दा प्रभावी ठरतो आह>>>> दुसरी कविता आता खूपच जास्त भावली. म्हणजे तुम्ही अर्थ स्पष्ट केल्यानंतर. मला असं वाटत की 'स्त्री-सूक्त' नावाखाली सर्व कविता अस्ल्याने बहुतेक सर्व वाचकांना 'नाजूक सुंदर फुल म्हणजे स्त्री' असं वाटलं असावं. किंवा निदान मला तरी तसं वाटलं होतं :-) पण आता तुम्ही जो context दिला, त्यावरून ती कविता आत्ता खरी भावते आहे. लेखकाचा /कविचा view कळणे नेहमीच फायद्याचे असते. त्यामुळे लेखन जास्त कळते असं मला वाटतं. e.g. एखाद्या नाटककाराने स्वतः लिहिलेले नाटक बसवले तर ते जास्त प्रभावी ठरते. तेच नाटक जर इतरांनी (नाटक वाचून) बसवले तर बर्‍याच वेळा तितके प्रभावी होत नाही. कारण 'Reading between the lines' योग्य प्रकारे होत नाही. I mean लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे, नेमका मतितार्थ काय आहे, context काय आहे हे फक्त लेखकच नीट सांगू शकतो (निदान कविता/नाटक यांच्या बाबतीत तरी.) सो दुसरी कविता पण खूप आवडेश :-)
राणीच्या राज्यात ब्रिटिशांसारखी आमच्याकडेही एक गोष्ट अगदी सेम असते प्रत्येक घरात एक राणी असते आणि कुटूंबाचे तिच्यावर प्रेम असते *** फुलांसाठी अहंकारांचे भेदक बाण सुटण्यापूर्वीच खुडून टाका नाजूक, सुंदर फुलांसाठी धनुष्य फेकून खाली वाका *** सक्षमीकरण शब्द अवघड वाटला तरी सक्षमीकरणाचा सोपा आहे अर्थ पुरुषातील कोमल स्त्री जागवा आणि स्त्रीमधला पुरुषार्थ ***

गण: देव गौरीनंदन आधी वंदुया

पाषाणभेद ·

In reply to by प्राजु

पाषाणभेद 10/03/2011 - 09:43
मी अन गावून दाखवू? काय चेष्टा करताय काय माझी. मी गाण्याचा आव आणू शकतो फक्त. तूनळीवर मागे दोन तीन लावण्या गायल्या होत्या मी. आपल्या येथील 'निल्या' नावाचे जे भाऊ आहेत ते चांगले गातात. त्यांनी माझे एक नाट्यगीत अगदी छान गायले होते. तूनळीवरही आहे. त्यांचा आवाज मस्त आहे अन विशेष म्हणजे ते संगीतही स्वत: देतात. (आजकाल ते दिसत नाही पण :-( ) दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अवांतर: बरीच जुनी मंडळीही दिसत नाही येथे आजकाल. कामाचा व्याप की अजून काही कारणे?

In reply to by प्राजु

पाषाणभेद 10/03/2011 - 09:43
मी अन गावून दाखवू? काय चेष्टा करताय काय माझी. मी गाण्याचा आव आणू शकतो फक्त. तूनळीवर मागे दोन तीन लावण्या गायल्या होत्या मी. आपल्या येथील 'निल्या' नावाचे जे भाऊ आहेत ते चांगले गातात. त्यांनी माझे एक नाट्यगीत अगदी छान गायले होते. तूनळीवरही आहे. त्यांचा आवाज मस्त आहे अन विशेष म्हणजे ते संगीतही स्वत: देतात. (आजकाल ते दिसत नाही पण :-( ) दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अवांतर: बरीच जुनी मंडळीही दिसत नाही येथे आजकाल. कामाचा व्याप की अजून काही कारणे?
गण: देव गौरीनंदन आधी वंदुया (चाल पारंपरीक)
देव गौरीनंदन आधी वंदुया शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ|| रसीक जमले आम्हांसमोरी तुझेच रूप जणू शेंदरी उशीर नका लावू देवा झडकरी या या शुभ कार्याची सुरूवात करूया ||१|| रिद्धी सिद्धीचा तु रे स्वामी तुज पुजीतो कलावंत आम्ही मंगल कार्याआधी गणाला गावूया शुभ कार्याची सुरूवात करूया ||२|| देव गौरीनंदन आधी वंदुया शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०८/०३/२०११

((मालवून टाक दीप))

बट्ट्याबोळ ·

५० फक्त 07/03/2011 - 11:58
बट्ट्याबोळ, नावाप्रमाणेच एका खुप चांगल्या गाण्याचा व्यवस्थित बट्याबोळ केला आहे. विडंबन करु नये असं नाही, गाणं पण छान आहे विडंबनासाठी आणि प्रसंग पण बरा, पण एक सांगु का क ला क आणि ट ला ट लावुन विडंबन होत नाही. ते भाईकाकांचे रावसाहेब मधला एक संदर्भ देतो, बघा पटतंय का ते. ' बदल की रे चाल्, कॉण नाही म्हणतंय का रे, पण कोण तर गुरु गिरु कर की रे, ते दिनानाथ मंगेशकर बदललं नाही कारे चाल, पण त्याचं ते अधिकार होतं की रे,..... - इति रावसाहेब. रागावलात तरी हरकत नाही पण विडंबन असलं तरी ते किमान मुळ गाण्याच्या मिटर मध्ये बसलं पाहिजे, मु़ळ गाण्याच्या चालीत म्हणता यावं ही अपेक्षा. शुद्धलेखन पाळु नका, हरकत नाही पण ते ' दोसता' डोक्यात जातंय. आणि काय आहे कळत्या नकळत्या वयात प्रत्यक्ष मा. सुरेश भटांच्या पायावर डोकं टेकवलं आहे, त्यामुळं हा प्रतिसाद.

५० फक्त 07/03/2011 - 11:58
बट्ट्याबोळ, नावाप्रमाणेच एका खुप चांगल्या गाण्याचा व्यवस्थित बट्याबोळ केला आहे. विडंबन करु नये असं नाही, गाणं पण छान आहे विडंबनासाठी आणि प्रसंग पण बरा, पण एक सांगु का क ला क आणि ट ला ट लावुन विडंबन होत नाही. ते भाईकाकांचे रावसाहेब मधला एक संदर्भ देतो, बघा पटतंय का ते. ' बदल की रे चाल्, कॉण नाही म्हणतंय का रे, पण कोण तर गुरु गिरु कर की रे, ते दिनानाथ मंगेशकर बदललं नाही कारे चाल, पण त्याचं ते अधिकार होतं की रे,..... - इति रावसाहेब. रागावलात तरी हरकत नाही पण विडंबन असलं तरी ते किमान मुळ गाण्याच्या मिटर मध्ये बसलं पाहिजे, मु़ळ गाण्याच्या चालीत म्हणता यावं ही अपेक्षा. शुद्धलेखन पाळु नका, हरकत नाही पण ते ' दोसता' डोक्यात जातंय. आणि काय आहे कळत्या नकळत्या वयात प्रत्यक्ष मा. सुरेश भटांच्या पायावर डोकं टेकवलं आहे, त्यामुळं हा प्रतिसाद.
संपवून टाक पेग स्वर्गीय सुरेश भट यांची माफी मागून समस्त मद्यपी मित्र-मैत्रिणीना सप्रेम अर्पण "मालवून टाक दीप" ..

(कसं काय टार्‍या बरं हाय का?)

अवलिया ·

सुहास.. 05/03/2011 - 15:19
काय नाना ? आज सकाळीच का ? असो ... खुप छान कवीता (मुद्दयाला सोडुन लिहीत येत नाही म्हणुन ;) )

प्रास 05/03/2011 - 15:26
तसं आम्हालाही कळलं तर बरं, नेमका वांदा काय झालाय...... बरेच रीप्लाय डिलिटलेत, बोंबाबोंबही झालीय पण टारझनरावांची नेमकी कोणती प्रतिक्रिया झोंबली ते कळलं असतं तर आणखी भारी मजा आली असती..... अवलियांना कुर्निसात.....

सुहास.. 05/03/2011 - 15:19
काय नाना ? आज सकाळीच का ? असो ... खुप छान कवीता (मुद्दयाला सोडुन लिहीत येत नाही म्हणुन ;) )

प्रास 05/03/2011 - 15:26
तसं आम्हालाही कळलं तर बरं, नेमका वांदा काय झालाय...... बरेच रीप्लाय डिलिटलेत, बोंबाबोंबही झालीय पण टारझनरावांची नेमकी कोणती प्रतिक्रिया झोंबली ते कळलं असतं तर आणखी भारी मजा आली असती..... अवलियांना कुर्निसात.....
प्रेरणा - ओळखा की वाईच... कसं काय टार्‍या बरं हाय का, अहो बरं हाय का ? काल काय ऐकलं, ते खरं हाय का ? अहो राव तुम्ही, ते नाही तुम्ही, बाईकवाले तुम्ही न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय, बॉडीवाले तुम्ही सांगा काय ऐकलं ते खरं हाय का ? काल म्हनं तुम्ही सायटीवर गेला, कामेंट इडंबन करुन आला खरं काय हो पाटील ? कुनाची खेचली, कळलं का न्हाई, आज तरि परतिसाद देनार का ? काल म्हनं तुम्ही रागावुन गेला, खरडीचा दरवाजा बंदच केला आरंरं केली साठमारी, चावडीच्या दारी, आज काय करायचं ऱ्हायलंय का ? काल म्हनं तुम्ही जाब इचारला, अन्‌ फुकाट शो देऊन बसला आगं बया बया काय झालं पुढं, सांगा तरि थोडं, पालिशीप्रमाने समदं चाललंय का

समर्थ रामदासांनी वन-बागा निर्मितीसाठी केलेले काव्य...

शशिकांत ओक ·

मृगनयनी 02/03/2011 - 13:13
:) समर्थांची खूप सुन्दर रचना! :) स्वगत : ह्म्म! तरीच पूर्वी "लाल महाला" भोवती खूप सारे औषधी वनस्पती होते... अनेक फळबागा, फुलबागा होत्या... असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते! ;) ;) पण पुढे पेशव्यांनी शनवारवाडा थोडासा "एक्सटेन्ड" केला.. तेव्हा त्या लाल महाला'च्या बागांमधले काही प्लॅन्ट्स त्यांनी ऑफिशियली "अ‍ॅडॉप्ट" केले.. जे की आजही शनवारवाड्याच्या दुसर्‍या मजल्यावरच्या बागेत पाहायला मिळतात! ;) जय जय रघुवीर समर्थ! ओम नम: शिवाय | :)

पाषाणभेद 02/03/2011 - 22:54
खरोखर उत्तम माहिती दिली ओक काका तुम्ही. समर्थांनी हा विदा गोळा करायला अन तो काव्यबद्ध करायला किती मेहनत घेतली हे कळून येते. शेवटी त्यांचा विनयही किती मोठा आहे बघा : "अल्प बोलिलो श्रोतीं | क्षमा केली पाहिजे ||" असल्या समर्थाचरणी वंदन. जय जय रघुवीर समर्थ ||

नंदू 03/03/2011 - 09:43
सुंदर माहिती! समर्थांना बागकामाची नाडी अचूक सापडली होती असं म्हणायला वाव आहे तर :)

मृगनयनी 02/03/2011 - 13:13
:) समर्थांची खूप सुन्दर रचना! :) स्वगत : ह्म्म! तरीच पूर्वी "लाल महाला" भोवती खूप सारे औषधी वनस्पती होते... अनेक फळबागा, फुलबागा होत्या... असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते! ;) ;) पण पुढे पेशव्यांनी शनवारवाडा थोडासा "एक्सटेन्ड" केला.. तेव्हा त्या लाल महाला'च्या बागांमधले काही प्लॅन्ट्स त्यांनी ऑफिशियली "अ‍ॅडॉप्ट" केले.. जे की आजही शनवारवाड्याच्या दुसर्‍या मजल्यावरच्या बागेत पाहायला मिळतात! ;) जय जय रघुवीर समर्थ! ओम नम: शिवाय | :)

पाषाणभेद 02/03/2011 - 22:54
खरोखर उत्तम माहिती दिली ओक काका तुम्ही. समर्थांनी हा विदा गोळा करायला अन तो काव्यबद्ध करायला किती मेहनत घेतली हे कळून येते. शेवटी त्यांचा विनयही किती मोठा आहे बघा : "अल्प बोलिलो श्रोतीं | क्षमा केली पाहिजे ||" असल्या समर्थाचरणी वंदन. जय जय रघुवीर समर्थ ||

नंदू 03/03/2011 - 09:43
सुंदर माहिती! समर्थांना बागकामाची नाडी अचूक सापडली होती असं म्हणायला वाव आहे तर :)
मित्र हो, खालील फोटो पहाण्यात आला. त्यातील संत रामदासांनी परळीच्या मठस्थापने करता बागा व वने निर्माण करण्यासाठी विविध २६० ( प्रत्येक ओवीत सरसकट १० नावे असे धरले तर २६ ओव्यात) झाडांची माहिती देऊन केलेले मार्गदर्शन रंजक वाटले. मिसळपावच्या खाऊभाऊंना हा काव्य-फलाहार आवडेल. त्यातील सध्या ज्ञात नसलेल्या वनस्पतींची माहिती काही मिपाकर देतील तर काहींना त्यातील दुर्मिळ वनस्पतींचे फोटो सादर करायला प्रेरणा मिळेल असे वाटून डॉ.

वेध

गुड्डु ·

टारझन 01/03/2011 - 14:03
गुड्डी चा लाडाने गुड्डु झालाय का ? :) असो .. लग्नाला बोलवा , आणि (किमान आमच्यासाठी ) टिपाडभर गुलाबजामं ठेवा :) माझे आशिर्वाद आहेतंच ! - बुंदीलाडू

टारझन 01/03/2011 - 14:03
गुड्डी चा लाडाने गुड्डु झालाय का ? :) असो .. लग्नाला बोलवा , आणि (किमान आमच्यासाठी ) टिपाडभर गुलाबजामं ठेवा :) माझे आशिर्वाद आहेतंच ! - बुंदीलाडू
काय मग यंदा लाडु आहेत का जे ते विचरु लागले आई ला म्हंट्ले सगळ्यांनाच कसे एकदम वेड लागले आता कुठे अभ्यास संपला डोके हलके झाले इतक्यातच सगळ्यांना लाडुचे वेध लागले आई फक्त हसली उत्तर नाहि काही मिळाले एके दिवशी फोन आला मुलीला बघायला येतो बाबांचे तयार होण्याचे फर्मान आले आणि डोकेच फिरले तीथे कांदे पोहे तयार झाले इथे साडीत मि अवघडले रागा रगात चहा पोहे घेउन बाहेर गेले नजरानजर होताच जणु विरघळुनच गेले ते काहितरि विचारत होते पण माझे शब्द फुटत नव्ह्ते बैठक संपली पाहुणे गेले पण मी काहि बोलले नाहि म्हणुन बाबा मात्र रागवले मात्र होकार नजरेतुनच समजले होते तरी मन हुरहुरत होते दुसर्‍याच दिवशि फोन आला आणि ह