"माझी आई हाच माझा विश्वास."

लेखनविषय:
लेखनप्रकार
मुलांच पालन-पोषण करण्यासारखं दुसरं कठीण काम नाही.साध्या भाषेत सांगायचं तर "माझी आई हाच माझा विश्वास." ह्यावेळेला मी कोकणात गणपति उत्सवासाठी गेलो होतो.माझ्या आजोळी गणपति आणतात.बरेच वेळी पाच दिवसाचा असतो. कोकण दर्शन ट्रॅव्हल एजन्सी तर्फे मी फार अगोदर तिकीट काढून ठेवलं होतं.दादरच्या ब्रॉडवे सिनीमा समोर ह्या बसचा स्टॉप होता.सकाळीच उठून जावं लागलं.माझ्या शेजारी एक सदगृहस्थ येऊन बसले.बस चालू झाली तसं आम्ही हॅलो,हाय करून बोलायला लागलो. गणपति उत्सवात कोकणात किती गर्दी करून लोक मजा करायला जातात.सगळे नातेवाईक एकत्र येऊन तो दीड दिवस किंवा ते पाच दिवस कसं गाणं वाजवणं,घरातच छोटे छोटे कार्यक्रम करून आपली क

गेले ते दिवस

लेखनविषय:
लेखनप्रकार
"रांव रे, आपा येतां साईट दी" (थांब रे,आपा येतोय साईडला रहा) असले उद्दगार १९३८-४५ च्या दरम्यान सावंतवाडी-बेळगांव किंवा वेंगुर्ले-बेळगांव ह्या प्रवास मार्गावर ऐकायला मिळत असत. त्याचं असं झालं,आपांना-माझ्या काकाना- धंद्या मधे जास्त दिलचस्पी होती.आजोबांच्या लक्ष्यांत आल्यावर त्यांनी अण्णांकडे शब्द टाकला.अण्णा म्हणाले मुंबईवरून मी त्यांच्यासाठी एक नवीन बस -प्यासींजर व्हीएकल- विकत घेतो.त्यावेळी साधारण २०० रुपयाना -म्हणजे आताचे ४० हजार रुपये झाले अर्थात त्यावेळी गाड्या इंपोर्ट होत असत म्हणा-विकत घेतली.अण्णाचं लग्न झालं तेव्हां आपा एक वर्ष्याचे होते.आणि त्यांची आई,म्हणजे आमची आजी निर्वतली होती.

नवजात मुलाबद्दलच्या आईच्या अपेक्षा.

लेखनविषय:
लेखनप्रकार
आज नंदा पेठे आणि तिची मैत्रीण कविता भिडे दोघी तळ्यावर फिरायला आलेल्या दिसल्या.मला पाहिल्यावर नंदा म्हणाली की, " भाऊसाहेबांना आज बरं नसल्याने ते येऊ शकणार नाहित." तसा त्यानी तिच्या जवळ मला निरोप दिला होता. नंदा ही प्रो.देसायांची मधली मुलगी.कविता एका कम्युनीकेशन सेंटरवर काम करते.माझी तिच्याशी ओळख करून दिल्यावर नंदा मला म्हणाली, "कविताला एक लहान मुलगा आहे.ती त्याला आपल्या सासूकडे ठेऊन आली आहे.सहज पाय मोकळे करायला आम्ही तळ्यावर आलो.तुमच्या विषयी हिला भाऊसाहेब नेहमीच सांगत असतात.प्रत्यक्षच तुम्ही दिसला तेव्हा मी तिला म्हणाले मी तुमची ओळख करून देते." मी नंदाला म्हणालो, " तुम्ही दोघं तावातावाने का

लपून रहाण्याची जागा

लेखनविषय:
लेखनप्रकार
आज प्रो.देसाई विशेष खूष दिसले.त्यांना जुन्या आठवणी आल्याने मला काहीतरी सांगावंसं वाटत होतं.मला म्हणाले, " सामंत ईकडे बसा.मी तुम्हाला एक गमतीदार आठवण सांगतो." मी म्हणालो, "भाऊसाहेब,मीच आज तुम्हाला एक गमतीदार गोष्ट सांगतो" तरूण वयांत सैन्यात जाण्याचे खूप मनांत येत असतं.कदाचीत देशप्रेमाच्या आसक्ती पेक्षा युनीफॉर्मचा भप्केपणा, शिस्त आणि मान मिळतो त्याचच आकर्षण जास्त असावसं असं मला वाटतं.त्याचं असं झालं आमचा मोठा भाई,प्रभाकर त्यावेळी पंचवीस एक वर्षाचा होता.

मिसळपाव आणि साबूदाण्याची लापशी

लेखनविषय:
लेखनप्रकार
मुंबईहून न्यूयॉर्कला केलेल्या विमानप्रवासाबद्दल मी चार ओळी लिहिल्या होत्या तेंव्हा या लिखाणावर फारशी चर्चा होईल असे मला वाटले नव्हते. माझा तसा उद्देशही नव्हता. अमेरिकेला गेल्यानंतर तिथला एक मांडीवरला माझ्या तावडीत सापडला तेंव्हा तो कसा चालतो ते पाहण्यासाठी त्याच्याशी चाळा करता करता मिपाचे संकेतस्थळ हाती लागले. समर्थांच्या एका सुप्रसिद्ध ओवीच्या पहिल्या दोन चरणांवरून प्रेरणा घेऊन "जे जे आपणांसी कळावे, ते ते इतरांसी सांगून मोकळे व्हावे" असा विचार मनात आला आणि गारठलेली बोटे कीबोर्डावर बडवून घेतली.

सुप्त राहाणार्‍या प्रतिभेचा इतिहास.

लेखनविषय:
लेखनप्रकार
"मला वाटतं,आपण फक्त आपल्या ऑफिसच्या क्युबिकल्समधेच जखडून ठेवल्यासारखे राहून कसं चालेल? मला वाटतं,आपल्यात परिवर्तन होत असतं आणि आपल्या अंगात असलेल्या रचनात्मकतेचं सामर्थ्य आणि सौंदर्य आपल्याला जोडून ठेवीत असतं.

ती संध्याकाळ...

लेखनविषय:
लेखनप्रकार
संध्याकाळी ८. ३० ची वेळ होती. मी असाच ऑफिस मध्ये कामाच्या गडबडित होतो. तसा इतक्यात नेहमीच ऑफिस मढ़ना घरी जायला उशीर व्हयाचा. काम भरपूर होत. ती दिवसभर माझ्या सोबतच असायची. आम्ही दोघ एकाच मॉड्यूल वर आणि एकाच कंप्यूटर वर काम करायचो. तिच लग्न नुकताच झाला होत हे मला माहीत होत पण तरीही एक अनामिक ओढ़ आमच्यात होती. ती नेहमी म्हणायची की " मी तिला जरा उशीरा भेटलो" मी कामात गुंग असतांना ती माझ्यासाठी काफी आणायची. आम्ही रात्री बर्याच वेळ पर्यंत गप्पा मारायाचो. नंतर मी तिला रात्री तिच्या घरी ड्राप करायचो. तीन चार महीने कसे गेलेत कळलच नाही. दिवस असेच धुंदीत चालले होते.

सीमापाश

फ़ार फ़ार पूर्वी, अगदी सुरवातीला. अमर्याद पसरलेले जंगल होते. सीमा अशी काहीच संकल्पना नव्हती. मात्र वाघ सिंहानी गजबजलेल्या भागात इतर प्राणी जाणे टाळत असायचे. सीमेची ही सुरवात असावी. बुद्धीची देणगी लाभलेली एक प्राणीजात जनावर जातीच्या सीमा सोडून मानवी झुंडीच्या सीमा बनवून राहू लागली. त्या सीमेला गुहा असे नाव पडले. पुढे जसजशा झुंडी वाढू लागल्या गुहेच्या अपुऱ्या सीमा आता टोळ्यांच्या सीमा झाल्या. त्या झाडापासून त्या ओढ्यापर्यंत ह्या किनाऱ्यापासून त्या पर्वतापर्यंत सीमा प्रस्थापित झाल्या. मानवाच्या सीमीत नजरेपासून दूर दूर मानवाला मापणेही शक्य नसलेल्या सीमेच्या पलीकडे त्रीमीती सिमांनी न बांधलेल्या ज

"कढी,सार,ताक असात तां!" (असेल ते)

लेखनविषय:
लेखनप्रकार
आईला नेहमी काळजी वाटायची की पंगत बसल्यावर तिसर्‍या भातावर काय वाढायचं?ताक,कढी की सार?त्याचं असं झालं की रोज जेवताना भाजी,लिंबाची फोड, थोडं मीठ,भात,वरण आणि त्यावर तूप असायचं.

संगीतातला माझा सहकारी.

लेखनविषय:
लेखनप्रकार
"मला वाटतं, आपण आपल्या आतल्याआवाजाच्या पलिकडे जावून शोध घेत मनुष्याच्या स्वभावगुणधर्माच्या लयीमधे आणि कंपनामधे आपली जागा कुठे आहे हे शोधावं." "मला वाटतं मी मनुष्याच्या अंगातल्या अगणीत स्वभावगुणधर्मावर जास्त केंद्रीत असतो." "असं का तू म्हणतोस?" असं मी मला संगीतात मदत करणाऱ्या सहकाऱ्याला विचारल्यावर तो मला म्हणाला, "मी देशाच्या तिन निरनीराळ्या प्रांततल्या रीतिरिवाजात वाढलो आहे.हे माझ्या म्हणण्याचं कारण आहे.माझे आईवडिल कलकत्याचे,मी गुजराथ मधे जन्मलो,आणि महाराष्ट्रात, मुंबई मधे वाढलो. मी ज्यावेळी तरूण होतो,त्यावेळी हे सगळं मला जरा गोंधळात टाकायचं.प्रत्येक प्रांतातले लोक त्यांचे रीतिरिवाज उच्च
Subscribe to लेख