मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जाहीर विचारणा आणि आवाहन

घाटावरचे भट ·

विसोबा खेचर 24/12/2008 - 09:12
मिपा नुकतंच नवीन सर्व्हरवर गेलंय असं ऐकंलं, त्यामुळे एवढ्या एका रेकार्डसाठी काही मिपाची जागा कमी पडणार नाही, काय? हम्म! चालू द्या.. आम्ही पुन्हा पैशे भरू..!

आपण उल्लेख केलेला लेख हे जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवण्याचं (आमच्या मते!!!!) आदर्श उदाहरण ठरत नाही.... जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवणारा लेख असा असावा की ते प्रतिसाद वेगवेगळ्या लोकांकडून एकदाच मिळालेले असावेत... माफ करा, पण आपण उल्लेख केलेल्या लेखावर काही ठराविक लोकंच पुन्हा पुन्हा प्रतिसाद देऊन (आमच्या मते) वितंडवाद घालताहेत... बाकी समस्त मिपा जनता तिथे प्रतिसाद देण्यापासून अलिप्त राहिलेली दिसतेय असे आम्हाला दिसतेय..... तेंव्हा तुम्हाला सर्वाधिक प्रतिसाद मिळणारा (पक्षी: लोकप्रिय) लेख निवडायचा असेल तर जरूर निवडा पण वरील उल्लेखित लेखाचा त्यात समावेश करण्यापूर्वी ही बाब विचारात घ्यावी ही नम्र विनंती..... आपला, कशातच काहीही न कळणारा, पिवळा डांबिस

विसोबा खेचर 24/12/2008 - 09:12
मिपा नुकतंच नवीन सर्व्हरवर गेलंय असं ऐकंलं, त्यामुळे एवढ्या एका रेकार्डसाठी काही मिपाची जागा कमी पडणार नाही, काय? हम्म! चालू द्या.. आम्ही पुन्हा पैशे भरू..!

आपण उल्लेख केलेला लेख हे जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवण्याचं (आमच्या मते!!!!) आदर्श उदाहरण ठरत नाही.... जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवणारा लेख असा असावा की ते प्रतिसाद वेगवेगळ्या लोकांकडून एकदाच मिळालेले असावेत... माफ करा, पण आपण उल्लेख केलेल्या लेखावर काही ठराविक लोकंच पुन्हा पुन्हा प्रतिसाद देऊन (आमच्या मते) वितंडवाद घालताहेत... बाकी समस्त मिपा जनता तिथे प्रतिसाद देण्यापासून अलिप्त राहिलेली दिसतेय असे आम्हाला दिसतेय..... तेंव्हा तुम्हाला सर्वाधिक प्रतिसाद मिळणारा (पक्षी: लोकप्रिय) लेख निवडायचा असेल तर जरूर निवडा पण वरील उल्लेखित लेखाचा त्यात समावेश करण्यापूर्वी ही बाब विचारात घ्यावी ही नम्र विनंती..... आपला, कशातच काहीही न कळणारा, पिवळा डांबिस
रामराम मंडळी, मिसळपाववर सध्या नमस्ते सदा वत्सले मातृभूमे........ लैच फार्मात आहे. हा लेख लिहायच्या टैमाला हा धागा उघडून बरोब्बर ७ दिवस आणि ६ मिनिटं झालेली आहेत, त्याची ३१६६ वाचनं झालेली आहेत आणि त्यावर १४३ प्रतिसाद आहेत. आता गम्मत अशी आहे की माझा इतिहास थोडासा कच्चा आहे (आणि संस्थळांचा, विशेषतः मिपाचा इतिहास तर बिल्कूल झीरो) म्हणून मला तुमची मदत हवीये.

घरटे -२ : सत्यकथेवर आधारित!!

चेतन१२३प ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
त्यावेळी मी नुकताच सायनरला राहायला आलो होतो. अंजली अजून पाळण्यात होती. नवीन बांधकामाचे व्रण अजून शिल्लक होते. दिवाळीमध्ये रंगकाम केल्यामुळे येणाऱ्या एका वेगळ्याच सुगंधाची अनुभुती तेथे येत होती. नवीन वस्ती, नवीन लोक असल्यामुळे आमची अवस्था गोंधळल्यागत होती. अंजलीच्या आईच्या मदतीने लवकरच सर्वत्र ओळख झाली. जवळपास राहणारे जवळपास लोक मध्यमवर्गीय असल्याने माझ्या खिशाला हिच्या मागण्यांची प्रेमळ "उब" मिळणार नाही या उद्देशाने मी मनोमन खूश होतो. कारण, इतरांजवळ आहे पण आमच्याजवळ नाही अशी एखादीच उंची वस्तू ती शेजारी बघू शकत होती. सायनरमध्ये मी आनंदी होतो.

बाजीरावांची टोलेबाजी: १०: विश्वकोशात कुळकर्णी...

बाजीराव ·

धनंजय 23/12/2008 - 22:26
माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांच्या कविता अशाच एका कवितासंग्रहात प्रसिद्ध झाल्या आहेत. हे असे प्रकाशक खरेखरचे असतात, केवळ टोलेबाजीत नव्हे, हे मला कळले!

झकासराव 24/12/2008 - 00:01
बाजीरावानी बरेच दिवसानी टोलेबाजी केली. :) मस्त जमली आहे ही टोलेबाजी देखील. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

सहज 24/12/2008 - 07:02
नेहमीसारखा मस्त कुरकुरीत लेख. बाजीराव बरेच दिवसांनी टंकलेत. जमल्यास एखादा "फ्रेश" लेखही येउ द्या. :-)

मदनबाण 24/12/2008 - 13:31
बाजीराव...टोलेबाजी आवडली.. :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

त्यातही सदाशिवपेठ पुरातन ग्रंथ पुनर्विकेता संघ, पुणे; साहित्यप्रेमी अडत व्यापारी मंडळ, न्यू मार्केट यार्ड, भुसावळ; शब्दभरारी युवक मंडळ, बेणेवाडी, ता. शिरवळ, जि. सातारा; यांचे पुरस्कार फार मानाचे व प्रतिष्ठेचे असल्याचे तो सांगायचा. हे फार मस्त... तुमचे बाकीचे लेख कसे हुडकायचे? आमच्या सांगलीतले काशिनाथ हरी वाडेकर नावाचे लेखकही तरुण भारतात एक सदर चालवायचे.. पान, चुना, तंबाखू नावाचे... त्याची आठवण झाली..

धनंजय 23/12/2008 - 22:26
माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांच्या कविता अशाच एका कवितासंग्रहात प्रसिद्ध झाल्या आहेत. हे असे प्रकाशक खरेखरचे असतात, केवळ टोलेबाजीत नव्हे, हे मला कळले!

झकासराव 24/12/2008 - 00:01
बाजीरावानी बरेच दिवसानी टोलेबाजी केली. :) मस्त जमली आहे ही टोलेबाजी देखील. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

सहज 24/12/2008 - 07:02
नेहमीसारखा मस्त कुरकुरीत लेख. बाजीराव बरेच दिवसांनी टंकलेत. जमल्यास एखादा "फ्रेश" लेखही येउ द्या. :-)

मदनबाण 24/12/2008 - 13:31
बाजीराव...टोलेबाजी आवडली.. :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

त्यातही सदाशिवपेठ पुरातन ग्रंथ पुनर्विकेता संघ, पुणे; साहित्यप्रेमी अडत व्यापारी मंडळ, न्यू मार्केट यार्ड, भुसावळ; शब्दभरारी युवक मंडळ, बेणेवाडी, ता. शिरवळ, जि. सातारा; यांचे पुरस्कार फार मानाचे व प्रतिष्ठेचे असल्याचे तो सांगायचा. हे फार मस्त... तुमचे बाकीचे लेख कसे हुडकायचे? आमच्या सांगलीतले काशिनाथ हरी वाडेकर नावाचे लेखकही तरुण भारतात एक सदर चालवायचे.. पान, चुना, तंबाखू नावाचे... त्याची आठवण झाली..
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

!! चांडाळ चौकडी !!

अनिल हटेला ·

सगळ्या व्यक्तिरेखा छान सजवाल्या आहेत तुम्ही.. ,"सर्,आपण पॄथ्वीच्या आत रहातो की बाहेर?" हे भारीच.... :-) शेवट पण गोडच असावा असं वाटत होतं...पण.... असो..आता तुम्ही "चौघे " असे म्हणता येणार नाही पण तुम्ही "तिघे" तरी पुन्हा पूर्वीप्रमाणे मनाने एकत्र यावे अशी सदिच्छा व्यक्त करते... शेवटी "मैत्री" या शब्दातच जादु आहे नाही.. -(जीवलग मैत्रिणींच्या आठवणीने व्याकूळ झालेली)स्मिता श्रीपाद

सोनम 23/12/2008 - 13:58
हे लोक अमराठी असण्याचा फायदा की मी नेमका काय करतोये ते कुणालाच कळत नाय ..शिवाय सगळ देवनागरी ह्या लोकाना वाचता येतं पण समजत काहीच नाय....) बरोबर नाहीतरी आमचे घरचे ही म्हणतात दिवसभर काय असते मि.पा.वर? छान आहे लेख.

निखिलराव 23/12/2008 - 14:31
कधी कधी वटतं काळ पून्हा मागे सरकावा.. रम्य ते दिवस परत एकदा जगावेत... प्रत्येक क्षण ,प्रत्येक घटना पून्हा एकदा जगावी. गेले ते दिवस..... राहिल्या त्या आठवणी.......

अवलिया 23/12/2008 - 15:03
पण सत्य फार भयाण असते ,आणी ते स्वीकारावे लागते.... आणि ते स्विकारण्यातच शहाणपण असते. लेख आवडला की नाही हे सांगणे कठीण आहे पण खुपशा स्मृतिंना उजाळा मिळाला, आठवणी परत दाटुन आल्या आठवणींचे एक असते सुखद असो वा दुःखद... डोळे दोन्ही वेळेस भरुन येतात -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

प्राजु 24/12/2008 - 06:06
नाना, आठवणींचे एक असते सुखद असो वा दुःखद... डोळे दोन्ही वेळेस भरुन येतात काय जबरदस्त वाक्य आहे.. अक्षरशः जोरदार टाळ्या द्याव्या असं वाटलं.. अगदी खरं आहे. आपला लेख आवडला. शेवट असा असेल असं वाटलं नव्हतं. देव करो आणि तुम्ही , खरूभाई आणि डिके पुन्हा एकत्र येवो.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सहज 23/12/2008 - 15:34
ट्र्जीक एन्ड वाचुन वाईट वाटले.

मनीषा 23/12/2008 - 16:21
लेख आवडला ... आणी आपण आयुष्यात किमान १० वी फेल असावं असा थोर विचार करुन ह्या प्राण्याने सुद्धा अनुमोदन दिलेलं . ...मस्त >>"आता तुम्ही "चौघे " असे म्हणता येणार नाही पण तुम्ही "तिघे" तरी पुन्हा पूर्वीप्रमाणे मनाने एकत्र यावे अशी सदिच्छा व्यक्त करते..." असच म्हणते ..

झकासराव 23/12/2008 - 16:31
लेख आवडला रे. शेवट :( ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

दिपक 23/12/2008 - 16:33
खरचं आवडला :) शेवट चटका लावणारा. ’रॉक ऑन’ आणि ’दिल चाहता है" आठवला.

अनिल हटेला 23/12/2008 - 17:24
वरील सर्वाना धन्यवाद !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सोहम_व 23/12/2008 - 17:46
जुन्या आठवणिना उजाळा आला. खरोखरच शाळा-कॉलेजातल्या मित्रान्च्या आठवनिनि मन भरुन येत.कहा गये वो दिन??

सुचेल तसं 24/12/2008 - 08:29
छान!!! तुम्ही सर्व जण अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

मदनबाण 24/12/2008 - 13:22
अन्या मस्त लिहले आहेस रे.... पण शेवट वाचुन वाईट वाटलं.. :( मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

मला पण माझे कॉलेजचे दिवस आठवले. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

झेल्या 24/12/2008 - 17:04
"हाक द्यायच्या आधी 'ओ' देणार."चल"म्हटलं की "कुठे "असा कधीच विचारणार नाय.चल म्हणजे चल." असे मित्र मिळायला खरंच नशीब लागतं.... चौकडीच्या कडा अशा निखळ्ल्याचे वाचून हृदयात कालवाकालव झाली.. :( -झेल्या

वाहीदा 24/12/2008 - 17:41
एकच Suggestion खरूभाइ आणी डीके मधील सामन्जस्य तु जुना मीत्र म्हणुन नककीच साधु शकतोस .... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ! गोड शेवट नक्की होउ शकतो ... ~ वाहीदा

अनिल हटेला 25/12/2008 - 09:20
धन्यवाद सर्वाना....... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ! एकदम मान्य.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

शितल 25/12/2008 - 12:09
छान लिहिले आहे. :) पण शेवट वाचुन वाईट वाटले. :(

shweta 25/12/2008 - 14:09
खरच छान लिहलं आहे. पुढे काय होइल ते हि लिहित रहा.

मॅन्ड्रेक 23/01/2009 - 14:41
मैत्रि हि अशिच असते. न बोलता खुप काहि सांगुन जाणरि . आमचा हि एक कम्पु आहे . साडे बाविस जणांचा. सवडिने लिहिन . एक क्षण भाळ्ण्याचा - बाकि सारे सांभाळ्ण्याचे.

सगळ्या व्यक्तिरेखा छान सजवाल्या आहेत तुम्ही.. ,"सर्,आपण पॄथ्वीच्या आत रहातो की बाहेर?" हे भारीच.... :-) शेवट पण गोडच असावा असं वाटत होतं...पण.... असो..आता तुम्ही "चौघे " असे म्हणता येणार नाही पण तुम्ही "तिघे" तरी पुन्हा पूर्वीप्रमाणे मनाने एकत्र यावे अशी सदिच्छा व्यक्त करते... शेवटी "मैत्री" या शब्दातच जादु आहे नाही.. -(जीवलग मैत्रिणींच्या आठवणीने व्याकूळ झालेली)स्मिता श्रीपाद

सोनम 23/12/2008 - 13:58
हे लोक अमराठी असण्याचा फायदा की मी नेमका काय करतोये ते कुणालाच कळत नाय ..शिवाय सगळ देवनागरी ह्या लोकाना वाचता येतं पण समजत काहीच नाय....) बरोबर नाहीतरी आमचे घरचे ही म्हणतात दिवसभर काय असते मि.पा.वर? छान आहे लेख.

निखिलराव 23/12/2008 - 14:31
कधी कधी वटतं काळ पून्हा मागे सरकावा.. रम्य ते दिवस परत एकदा जगावेत... प्रत्येक क्षण ,प्रत्येक घटना पून्हा एकदा जगावी. गेले ते दिवस..... राहिल्या त्या आठवणी.......

अवलिया 23/12/2008 - 15:03
पण सत्य फार भयाण असते ,आणी ते स्वीकारावे लागते.... आणि ते स्विकारण्यातच शहाणपण असते. लेख आवडला की नाही हे सांगणे कठीण आहे पण खुपशा स्मृतिंना उजाळा मिळाला, आठवणी परत दाटुन आल्या आठवणींचे एक असते सुखद असो वा दुःखद... डोळे दोन्ही वेळेस भरुन येतात -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

प्राजु 24/12/2008 - 06:06
नाना, आठवणींचे एक असते सुखद असो वा दुःखद... डोळे दोन्ही वेळेस भरुन येतात काय जबरदस्त वाक्य आहे.. अक्षरशः जोरदार टाळ्या द्याव्या असं वाटलं.. अगदी खरं आहे. आपला लेख आवडला. शेवट असा असेल असं वाटलं नव्हतं. देव करो आणि तुम्ही , खरूभाई आणि डिके पुन्हा एकत्र येवो.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सहज 23/12/2008 - 15:34
ट्र्जीक एन्ड वाचुन वाईट वाटले.

मनीषा 23/12/2008 - 16:21
लेख आवडला ... आणी आपण आयुष्यात किमान १० वी फेल असावं असा थोर विचार करुन ह्या प्राण्याने सुद्धा अनुमोदन दिलेलं . ...मस्त >>"आता तुम्ही "चौघे " असे म्हणता येणार नाही पण तुम्ही "तिघे" तरी पुन्हा पूर्वीप्रमाणे मनाने एकत्र यावे अशी सदिच्छा व्यक्त करते..." असच म्हणते ..

झकासराव 23/12/2008 - 16:31
लेख आवडला रे. शेवट :( ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

दिपक 23/12/2008 - 16:33
खरचं आवडला :) शेवट चटका लावणारा. ’रॉक ऑन’ आणि ’दिल चाहता है" आठवला.

अनिल हटेला 23/12/2008 - 17:24
वरील सर्वाना धन्यवाद !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सोहम_व 23/12/2008 - 17:46
जुन्या आठवणिना उजाळा आला. खरोखरच शाळा-कॉलेजातल्या मित्रान्च्या आठवनिनि मन भरुन येत.कहा गये वो दिन??

सुचेल तसं 24/12/2008 - 08:29
छान!!! तुम्ही सर्व जण अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

मदनबाण 24/12/2008 - 13:22
अन्या मस्त लिहले आहेस रे.... पण शेवट वाचुन वाईट वाटलं.. :( मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

मला पण माझे कॉलेजचे दिवस आठवले. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

झेल्या 24/12/2008 - 17:04
"हाक द्यायच्या आधी 'ओ' देणार."चल"म्हटलं की "कुठे "असा कधीच विचारणार नाय.चल म्हणजे चल." असे मित्र मिळायला खरंच नशीब लागतं.... चौकडीच्या कडा अशा निखळ्ल्याचे वाचून हृदयात कालवाकालव झाली.. :( -झेल्या

वाहीदा 24/12/2008 - 17:41
एकच Suggestion खरूभाइ आणी डीके मधील सामन्जस्य तु जुना मीत्र म्हणुन नककीच साधु शकतोस .... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ! गोड शेवट नक्की होउ शकतो ... ~ वाहीदा

अनिल हटेला 25/12/2008 - 09:20
धन्यवाद सर्वाना....... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ! एकदम मान्य.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

शितल 25/12/2008 - 12:09
छान लिहिले आहे. :) पण शेवट वाचुन वाईट वाटले. :(

shweta 25/12/2008 - 14:09
खरच छान लिहलं आहे. पुढे काय होइल ते हि लिहित रहा.

मॅन्ड्रेक 23/01/2009 - 14:41
मैत्रि हि अशिच असते. न बोलता खुप काहि सांगुन जाणरि . आमचा हि एक कम्पु आहे . साडे बाविस जणांचा. सवडिने लिहिन . एक क्षण भाळ्ण्याचा - बाकि सारे सांभाळ्ण्याचे.
नमस्कार मंडळी !! मिपा म्हणजे आमचा पडीक अड्डा झालाये...बॉस किवा कलीग असोत,सारखे विचारत असतात की काय करत असतोस दिवसभर ह्या साइटवर....(हे लोक अमराठी असण्याचा फायदा की मी नेमका काय करतोये ते कुणालाच कळत नाय ..शिवाय सगळ देवनागरी ह्या लोकाना वाचता येतं पण समजत काहीच नाय....) तर मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यात काही खास मित्र असतात..तसे आम्हाला ही ४ चांगले मित्र लाभले.सारे आमच्या ग्रुपला आवर्जुन चांडाळ चौकडी म्हणत...आणी नावाप्रमाणेच आम्ही होतोही (आहे म्हणनं जास्त सयुक्तीक ठरेन) तर ह्या मित्राशी आज तुमची ओळख करून द्यावी म्हटलं.. १)राजेश पाटीलः हे माननीय महोदय ९वी फेल..पण शिक्षका

घरटे -१ : सत्यकथेवर आधारित!

चेतन१२३प ·

>>डिसेंबरच्या गुलाबी थंडीमध्ये सकाळचे कोवळे ऊन या जठर शरीराने खाण्यात काही औरच मजा! येथे जरठ म्हणायचे आहे का? असो. पुलेशु. पुण्याचे पेशवे Since 1984

पक्या 23/12/2008 - 10:16
छान वाटतीये कथा..पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

In reply to by पक्या

अमोल केळकर 23/12/2008 - 10:29
असेच म्हणतो -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

दिपक 23/12/2008 - 10:50
आवडली :) पुढील भागाच्या प्रतिक्षेत. (चिमणीप्रेमी)दिपक

>>डिसेंबरच्या गुलाबी थंडीमध्ये सकाळचे कोवळे ऊन या जठर शरीराने खाण्यात काही औरच मजा! येथे जरठ म्हणायचे आहे का? असो. पुलेशु. पुण्याचे पेशवे Since 1984

पक्या 23/12/2008 - 10:16
छान वाटतीये कथा..पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

In reply to by पक्या

अमोल केळकर 23/12/2008 - 10:29
असेच म्हणतो -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

दिपक 23/12/2008 - 10:50
आवडली :) पुढील भागाच्या प्रतिक्षेत. (चिमणीप्रेमी)दिपक
लेखनविषय:
लेखनप्रकार
डिसेंबरच्या गुलाबी थंडीमध्ये सकाळचे कोवळे ऊन या जठर शरीराने खाण्यात काही औरच मजा! त्यातही लाडक्या सुनेच्या हातचा कडक, तजेलदार चहा आणि वर्तमानपत्र गॅलरीमध्ये अगदी हातामध्ये आणून मिळावे, म्हणजे माझ्यासारख्या भाद्रपदी विचार करणाऱ्या रिटायर्ड माणसाला स्वर्गसुखच म्हणा. किंबहुना त्याहूनही अधिक! तसा माझ्या सौच्या हातचा चहादेखील अगदी कडक असतो बरका! पण, सुनेच्या हातच्या चहाच्या कडकपणामध्ये "आदरणीयं श्वशुरम ।" ही भावना जाणवते तर आमच्या हिच्या हातच्या चहाच्या कडकपणामध्ये "हाताचा" कडकपणाच अधिक वाटतो.

हारापरी हौतात्म्य हे ज्यांच्या गळा साजे

सर्वसाक्षी ·

प्राजु 19/12/2008 - 03:18
काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन. हेच म्हणते... सर्वसाक्षीजी.. आपलेही अभिनंदन. आपण इतके सुंदर लेख लिहून वेगवेगळ्या क्रांतीकारकांची ओळख करून देत आहात. इतकी माहिती कुठे मिळवता हाच प्रश्न पडतो.. आपला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 19/12/2008 - 10:26
आपण इतके सुंदर लेख लिहून वेगवेगळ्या क्रांतीकारकांची ओळख करून देत आहात. इतकी माहिती कुठे मिळवता हाच प्रश्न पडतो.. मलाही हाच प्रश्न पडतो..! साक्षिदेवा, तुझं खरंच कौतुक वाटतं! आणि या लेखांच्या ऑथेंटिसिटीबद्दलही मला पूर्ण खात्री आहे! सर्व क्रांतिकारांना सलाम..! तात्या.

शितल 19/12/2008 - 03:54
काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन. या चार हुतात्म्यांना आमचे ही विनम्र अभिवादन :)

टग्या 19/12/2008 - 06:26
गाडी काकोरी स्थानक ओलांडुन जाताच या पैकी दोघांनी गार्डला आपले काही सामान स्थानकावर राहिले असल्याचे सांगत गाडी थांबवायची विनंती केली. गार्डने ती अव्हेरताच त्याला बेसावध गाठुन त्यांनी आडवा केला व साखळी खेचून गाडी थांबविली.
या पायरीमागचे कारण नीटसे कळू शकले नाही. गाडी थांबवायचीच होती तर गार्डला गाडी थांबवण्यासाठी विनंती करण्याच्या भानगडीत न पडता कोठल्याही डब्यातून सरळसरळ साखळी ओढणे सहज शक्य होते. गार्डला विनंती करून त्याने ती अव्हेरल्यावर मग त्याला आडवा करून साखळी खेचण्याऐवजी सरळसरळ गार्ड नाही अशा ठिकाणावरून साखळी खेचण्याचा मार्ग अधिक सोपा, सरळ, शक्तीचा कमी व्यय करणारा आणि अहिंसक होता. (पुढे प्रत्यक्ष खजिना लुटताना गार्ड आडवा आल्यास त्याला आडवा करणे कदाचित गरजेचे असावे, परंतु केवळ साखळी खेचण्यासाठी गार्डला आडवा करण्याची काहीच गरज नव्हती.)
काही क्रांतिकारकांनी बाहेरचा ताबा घेतला व पिस्तुलाने हवेत गोळ्या झाडुन घबराट निर्माण केली.
जनतेच्या मनात दहशत माजवणे हे क्रांतिकारकांचे उद्दिष्ट नसावे असे यापुढील वाक्यांवरून वाटते. कारण नाहीतर ''जनतेला काही अपाय होणार नाही" हे ओरडून सांगण्याची काहीच गरज नाही. पण मग अशा परिस्थितीत पिस्तुलाने हवेत गोळ्या झाडून घबराट निर्माण करण्यामागचे प्रयोजन कळत नाही.
अचनक समोरुन एक गाडी भरवेगाने येताना दिसली आणि आता गाडी आपण थांबविलेल्या गाडीवर आदळणार या क्ल्पनेने सगळे धास्तावले.
या वाक्याचे या कथेच्या प्लॉटमधील महत्त्व (सिग्निफिकन्स / रेलेव्हन्स) कळले नाही.
हुतात्मा चंद्रशेर आजाद यांनी सुमारे तीन मण पैशाचे ओझे सायकल वरून २४ मैल वाहुन नेले.
या दाव्याचा काळ-काम-वेगाच्या दृष्टिकोनातून थोड्या बारकाईने अभ्यास करू. तीन मणांच्या अंदाजामागचा आधार काय ही बाब तूर्तास बाजूला ठेवू. तीन मण म्हणजे एकशेवीस शेर. म्हणजे जवळपास तेवढेच किलो. माणसाचे सरासरी वजन सत्तर किलो जरी मानले तरी हे म्हणजे दोघाजणांना डबलसीट (खरे तर ट्रिपलसीट) घेऊन सायकल चालवण्यासारखे. शिवाय गाठोडे (विशेषतः एकशेवीस शेरांचे गाठोडे) हे डबलसीट माणसासारखे सायकलच्या पुढच्या दांडीवर किंवा मागच्या कॅरियरवर व्यवस्थित बसू शकत नाही. (गाठोड्यातल्या ऐवजाची घनता माहीत नाही, त्यामुळे आकारमानाचा अचूक अंदाज बांधणे शक्य नाही, पण तरीही बर्‍यापैकी आकारमान असावे असे वाटते.) म्हणजे थोडक्यात गाठोड्यासकट सायकलवर बसून सायकल चालवणे (पेडल करणे) बहुधा अशक्य. गाठोडे गाढवाच्या पाठीवर लादल्यासारखे सायकलवर लादून सायकल हाताने ढकलत चालत गेले तरच बहुधा शक्य आहे. माणसाचा चालण्याचा सरासरी वेग साधारणतः ताशी चार मैल मानू. हा वेग म्हणजे कोणतेही ओझे न बाळगता चालण्याचा वेग. तीन मण (म्हणजे जवळपास सव्वा क्विंटल म्हणजे पुढच्या दांडीवर एक आणि मागच्या कॅरियरवर एक अशी दोन माणसे सायकलवर बसली तर होईल एवढे) ओझे ढकलत चालत जायचे म्हणजे वेग आणखीही बराच कमी व्हावा. तो जवळपास ताशी दोन मैल मानू. (रस्त्यात चढउतार नाहीत हे गृहीत धरू. चढ असल्यास वेग अर्थात आणखीही कमी व्हावा. उतार असल्यास गुरुत्वाकर्षणाने वेग नैसर्गिकतः वाढण्याची शक्यता जरी असली तरी सायकल आणि सायकलीबरोबर पर्यायाने सायकल ढकलणारा गडगडत जाऊ नये म्हणून सायकल धीरानेच ढकलणे आले.) म्हणजे चोवीस मैलांचे अंतर काटण्यास (अध्येमध्ये विश्रांतीसाठी थांबले नाही तर) किमान बारा तास लागावेत. हा किमान बारा तासांचा अंदाज हा संपूर्ण रस्ता पक्का / डांबरी होता या गृहीतकावर आधारित आहे. रस्ता रानावनातला, काट्याकुट्यांचा असल्यास आणखीही बराच वेळ लागावा. रस्त्यातले काटे टायरात घुसून टायर पंक्चर होण्याची शक्यता येथे विचारात घेतलेली नाही. दरोड्याची घटना संध्याकाळी साधारणतः साडेसातच्या सुमारास घडली असे म्हटले आहे. ही वेळ दरोडा सुरू होण्याची की दरोडा संपण्याची हे स्पष्ट नाही. दरोडा सुरू होण्याची वेळ असावी हे तर्कसुसंगत वाटते. दरोडा पूर्ण होण्यास अर्धा तास लागला असे जर मानले तर दरोडा साधारणतः रात्री आठाच्या सुमारास संपला असावा. तिजोरी फोडण्याचे काम त्यानंतर सुरू झाले की ते त्याआधीच साध्य झाले होते हाही तपशील कळत नाही. तिजोरी फोडून ऐवज गाठोड्यात भरणे आठ वाजेपर्यंत संपले होते असे मानू. तिजोरी फोडून ऐवज गाठोड्यात भरून होऊन क्रांतिकारक घटनास्थळापासून पसार होईपर्यंत आगगाडी तिथल्यातिथे उभी होती की आपली मार्गक्रमणा करायला पुढे गेली होती, पुढे गेली असल्यास पुढच्या स्टेशनावरील अधिकार्‍यांना ताबडतोब सतर्क केले गेले की नाही वगैरे मुद्दे तूर्तास कथेच्या दॄष्टीने गौण म्हणून सोडून देऊ. थोडक्यात, जर गाठोडे घेऊन आज़ादमहोदय सायकल ढकलीत रात्रौ आठ वाजता निघाले असे मानले, तर ते इष्टस्थळी पोहोचेपर्यंत किमान सकाळचे आठ वाजले असावेत असा अंदाज बांधता यावा. रस्ता रानावनातला अथवा काट्याकुट्यांचा असल्यास (याची शक्यता बरीच वाटते.) आणखीही वेळ लागावा. (मध्याह्न झाली नाही तरी सकाळचे किमान दहा तरी वाजावेत.) अशा परिस्थितीत किमान दिवस उजाडल्यानंतर तरी रस्त्यातून एवढे मोठे आणि वजनदार (आणि कदाचित आवाजही करणारे) गाठोडे घेऊन जाताना वाटेत कोणी भेटले नाही, कोणी हटकले नाही किंवा साधी चौकशीसुद्धा केली नाही याचे आश्चर्य वाटते. तपशिलात काहीतरी त्रुटी आहे असे वाटते. वजन, वेळ आणि अंतर यांचा ताळमेळ जमत नाही. एकंदरीत कथा ज्या पद्धतीने सांगितली आहे ती 'द ग्रेट ट्रेन रॉबरी'चा प्लॉट म्हणून मनोरंजक वाटते, परंतु देशभक्तांचा, क्रांतीचा आणि स्वातंत्र्यलढ्याचा आढावा म्हणून उगाच अतिरंजित वाटते. (घटना घडल्याबद्दल शंका नाही, घटनेत भाग घेणार्‍यांच्या हेतूंबद्दल आणि देशभक्तीबद्दलही शंका नाही. आक्षेप आहे तो सांगण्याच्या आणि त्यातून भलतेच काहीतरी ठसवण्याच्या पद्धतीला.) आतापर्यंतच्या मालिकेतून एक समान धागा प्रतीत होतो: १. सशस्त्र क्रांतिकारकांचा मार्ग हाच स्वातंत्र्य मिळवण्याचा एकमेव मार्ग होता. बाकी राजकीय, सनदशीर, शांततामय मार्गांनी प्रयत्न करणार्‍यांमध्ये आणि त्यांच्या चळवळींमध्ये काहीही दम नव्हता, त्यांच्या नेत्यांमध्ये, विशेषतः एका विशिष्ट नेत्यामध्ये, तर नव्हताच नव्हता. २. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांती आणि क्रांतीसाठी खून, बाँबस्फोट आणि दरोडे यांना पर्याय नाही. यांतून आणि केवळ यांतूनच स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकते, बाकी सर्व मिथ्या आहे. अशा अतिरंजित आणि एकांगी कथनातून उलट देशभक्तांचे (आणि ज्या क्रांतिकारकांबद्दल माहिती देण्याचा हा आटापिटा आहे त्यांच्याबद्दलचे) काहीसे विपरित चित्र प्रतीत होते, जे खेदजनक आणि अनावश्यक आहे असे वाटते. थोड्या वस्तुनिष्ठ कथनाची (आणि त्यासाठी इतिहासाकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून बघण्याची) गरज आहे असे सुचवावेसे वाटते.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

वा टगेराव, मानलं बॉ आपल्याला. एटीएस वा रॉ मध्ये आपल्या सारख्या तंत्रशुद्ध विचाराच्या लोकांची नितांत आवश्यकता आहे तेव्हा आपण आपल्या तार्किक गुणांचा उपयोग करायचा विचार करू शकता. ;) एक माझेही निरिक्षण - साधारणपणे तीन मन धान्याचे तीन मोठे गाठोडे होतात. त्यांच्या अकारमानामुळे ते सायकलवरुन टाकून न्यायचे म्हणजे जरा अशक्यच वाटते. पण तीन मन धातूंचे अकारमान हे एका मध्यम अकाराच्या गाठोड्यायेवढे होते. त्यामुळे अकारमानाचा तरी प्रश्न सुटलेला होता हे लक्षात घ्या. बाकी आपले चालू द्या. लेखन हे शुद्धच असायला हवे हे मान्य. कदाचित साक्षीजींच्या वाचनात हे मुद्दे लक्षात आलेले नसावेत. पण त्यांचा हेतू (जो की आपण सर्वांनी आपल्य जाज्वल्या इतिहासाची आठवण व जाण ठेवावी) हा तरी या लेखाने साध्य होत आहे. यापुढील त्यांचे लेखन तुमच्या सारख्या डिटेक्टिवांच्या नजरेतून सुद्धा १००% उत्तीर्ण व्हावे व तुम्हाला त्या लेखाच्या हेतूप्रत जाणे साध्य व्हावे यासाठी त्यांना व तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा! आपला, (गरज नसताना भिंगातून नव्हे तर केवळ उघड्या डोळ्याने व उघड्या मनाने वाचन करणारा) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

चेतन 19/12/2008 - 10:50
दुसर्‍या बाजिरावचं शुध्दलेखन यावर चर्चा करावी बहुतेक :T आतापर्यंतच्या प्रतिसाद मालिकेतून एक समान धागा प्रतीत होतो: १. सशस्त्र क्रांतिकारकांचा मार्ग हे चुकिचे होते व त्यांना फाट्यावर मारावे. भारताला स्वातंत्र्य फक्त अहिंसेमुळे मिळाले. २. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांती आणि क्रांतीसाठी खून, बाँबस्फोट आणि दरोडे हे पर्याय चुकीचे असुन हे सर्व करणार्‍यांना फासावर लटकवावे. यांतून आणि केवळ यांतूनच दहशतवादी निर्माण होतात. बाकी सर्व मिथ्या आहे. अशा अतिरंजित आणि एकांगी कथनातून उलट देशद्रोह्यांचे (आणि ज्या दहशतवादी कारवायंबदल माहिती देण्याचा हा आटापिटा आहे त्यांच्याबद्दलचे) काहीसे विपरित चित्र प्रतीत होते, जे खेदजनक आणि अनावश्यक आहे असे वाटते. थोड्या अहिंसक बुळबुळित कथनाची (आणि त्यासाठी इतिहासाकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून बघण्याची) गरज आहे असे सुचवावेसे वाटते (स्वगत : तिखट मिसळ झेपत नाही). असो.... पुर्वग्रहातुन कोणावरही टिप्पणी करावी भाषण स्वातंत्र्य आहे ना. शिवाय प्रत्येक ठिकाणी मतभेद असायलाच हवेत. ~X( सर्वसाक्षी चांगला लेखं धन्यावाद. (कदाचित इंग्रजांच्या पिलावळीला मिसळ सोसत नाही आहे) चेतन

In reply to by विनायक प्रभू

_समीर_ 21/12/2008 - 20:53
हो का? पण टाइम मशीन नावाचा प्रकार अजुन तरी अस्तित्वातच नाही म्हणतात. तरीही ऐतिहासिक लेखन कसे काय केले जाते मग? की त्या सगळ्याच भाकडकथाच??

In reply to by विनायक प्रभू

_समीर_ 21/12/2008 - 21:13
म्हणजे एक तर टाईम मशीनने प्रत्यक्ष घटना बघुन 'अचूक' लिहिणे अथवा ज्याच्या त्याच्या भावनांवर विसंबुन खयाली पुलाव पकवणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत का?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर 19/12/2008 - 18:11
भगवंता... बरं झालं मला जास्त बुद्धी (अक्कल) नाही दिलीस. हेच म्हणतो! मरणारे मरून गेले, आता फक्त नस्ती ट्यँव ट्यँव करणारे आणि घोड्यापुढे अक्कल धावणारे उरले आहेत! असो, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टग्या 19/12/2008 - 20:53
मरणारे मरून गेले, आता फक्त नस्ती ट्यँव ट्यँव करणारे आणि घोड्यापुढे अक्कल धावणारे उरले आहेत!
खरे आहे. मरणारे मरून गेले, त्यांची नावे पुढे करून आपलीच ट्यँव ट्यँव करणार्‍यांची चलती आहे. असो.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

मस्तच, अगदी मनातील भावना उतरवल्या आहेत. असेच लिहीत रहा. अशीच तुमची प्रतिभा आम्हाला बघायला मिळुद्यात. फुले शु ---- सखाराम गटणे

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 19/12/2008 - 21:24
मरणारे मरून गेले, आता फक्त नस्ती ट्यँव ट्यँव करणारे आणि घोड्यापुढे अक्कल धावणारे उरले आहेत!
सर्वात आवडलेला प्रतिसाद! :) (अतीशय धाडसी प्रतिसाद! आता त्याबद्दल कुणी कीव केली नाही म्हणजे मिळवली!)

In reply to by विसोबा खेचर

_समीर_ 21/12/2008 - 20:47
हा हा हा.. ट्यँव ट्यँव शब्दप्रयोग म्स्त वाटला. अतीशय चपखल. ऐतिहासिक लिखाणाला योग्य संदर्भ दिले नाहीत तर ती लोकांना संदर्भहीन ट्यँव ट्यँवच वाटणार!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

_समीर_ 21/12/2008 - 20:55
भगवंता... बरं झालं मला जास्त बुद्धी (अक्कल) नाही दिलीस. धन्य! तो गणपती बाप्पा आकाशातुन ढसा ढसा रडत असेल हे वाचुन.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 19/12/2008 - 16:48
टगवंतरावांचा प्रतिसाद फार आवडला. सर्व क्रांतीकारकांबाबत आदर आहेच मात्र मनात घोळत असलेलेच विचार टगेरावांनी त्यांच्या शेवटच्या परिच्छेदात दिले आहेत. क्रांतीकारकांना वंदन. आपला, (स्वतंत्र) आजानुकर्ण

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

सर्वसाक्षी 20/12/2008 - 00:12
१) गार्डला पटवुन गाडी थांबवता आली तर ते अधिक सोयीचे असावे. स्वतः साखळी खेचली तर गार्ड व कदाचित उपथित पोलिस साखळी कोणी व का खेचली हे पाहायला जमले असते व तसे होणे अनुकुल नव्हते. २) हवेत गोळया झाडल्या गेल्या त्या प्रतिकारासाठी रकक्षकांनी पुढे येउ नये म्हणुन. मात्र आपल्याच देशबांधवांना इजा होऊ नये यासाठी तसेच कुणी गाडीवर दरोडा आहे असे समजुन प्रतिकारासाठी आले तर नाहक आपल्याच बांधवांवर शस्त्र चालवाचा प्रसंग येऊ नये म्हणुन. आपल्या जिवनातील अखेरच्या संग्रामात आल्फ्रेड पार्क येथे झालेल्या चकमकीत हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांनी पोलिसांना आवाहान केले होते की तुम्ही माझे देशबांधव आहात, माझे तुमचे वैर नाही आणि मला तुमच्यावर शस्र चालवायची इच्छा नाही. या प्रसंगी अनेक विद्यार्थी आजुबाजुला जमले होते तेव्हा त्यांनाही आजादांनी सांगितले होते की त्यांचा जिवाला धोका आहे, इथे प्राणही जाऊ शकतात तेव्हा त्यांनी शक्य तितक्या लवकर दूर जावे. ३) काळ काम वेग गणित. आपल्या शंका रास्त आहेत. मात्र ते हुतात्मा आजाद होते, कुणी लेचापेचा मनुष्य नव्हता. झाशी येथे मोटार मिस्त्री च्या रुपात वावरताना त्यांनी सिराजौद्दीन यांचेकडे नोकरी पत्करली होती. त्यांचा विश्वास जिंकण्यसाठी आजादांनी सिराजऊद्दिन यांच्या मुलीच्या लग्नप्रसंगी प्रांतनिर्यात निर्बंध चुकवुन सायकल वरुन ओरछा येथून शेरभर तुपाची पींपे सायकलवरुन चौदा मैल आणली होती. आजाद झाशी परिसरात असलेल्या किल्ल्यावरील सोजिरांच्या तळात एका विजेचे काम करणार्‍या मिस्त्रीचे ओळखीने जायचे. किल्ल्याला चांगला चढ होता. ज्या चढणीवर सोजिरांची फाफु होत असे व ते सायकली हातात धरुन चढ चढत असत तिथे आजाद रपारप सायकल हाणीत जिद्दीने तो चढ चढुन जायचे. असो. ही माझी माहिती माझ्या वाचनात आलेल्या पुस्तकानुसार. या भाकडकथा वा क्रांतिकारकांना फुकट चढवण्यासाठी रचलेल्या कथा आहेत असे आपण म्हणुन शकता.

In reply to by सर्वसाक्षी

एकलव्य 20/12/2008 - 00:36
सर्वसाक्षी, निरसन आपणच मांडले हे चांगले झाले. टगेदादांविषयी माझ्या मनात अतीव स्नेह आहे आणि आदरही. संदेह निर्माण होणे आणि त्या मांडणे हा जन्मजात स्वभाव आहे. पण शंकांचा फुटकळपणा पाहून आश्चर्य वाटले होते. असो.. तरीही टगेदादांना शेवटच्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे "थोड्या वस्तुनिष्ठ कथनाची" भर टाकता आली तर (टगेदादा प्रेरित नाही!) डायव्हर्जन साठी संधी राहणार नाही. (लहान तोंडी मोठा घास घेणारा) एकलव्य अवांतर - टगेदादांच्या तिसर्‍या शंकेचे निरसन होइल किंवा नाही याचा खुराक एन्जॉय करतो आहे.

In reply to by सर्वसाक्षी

विसोबा खेचर 20/12/2008 - 01:00
या भाकडकथा वा क्रांतिकारकांना फुकट चढवण्यासाठी रचलेल्या कथा आहेत असे आपण म्हणुन शकता. हा डिस्क्लेमर टाकलास ते बाकी बरं केलंस साक्षी! त्यामुळे आता काही शंकेखोर आणि त्यांचे पित्ते चार दिवस मिशीला कोकम लावून तूप तूप म्हणत हिंडत फिरतील! हे डिस्क्लेमर टाकून त्यांचे आत्मे शांत केलेस हे बरेच झाले! तात्या.

In reply to by सर्वसाक्षी

_समीर_ 21/12/2008 - 20:22
ही माझी माहिती माझ्या वाचनात आलेल्या पुस्तकानुसार. या भाकडकथा वा क्रांतिकारकांना फुकट चढवण्यासाठी रचलेल्या कथा आहेत असे आपण म्हणुन शकता. कमाल आहे! मग असा डिस्क्लेमर लेखात घालुन आणि लेखन 'विरंगुळा' सदरात घालणे योग्य नाही का? क्रांतीकारकांविषयी आयुष्यभर लेखन करीन वगैरे म्हणणारर्‍या कडुन हा प्रतिसाद अनपेक्षीत होता. हेच का तुमचे डेडिकेशन? तुम्ही मला ह्या विषयातील अभ्यासू तज्ञ वगैरे वाटलात. असो...

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

टग्यांच्या काळ-काम-वेग गणिताचा प्रतिसाद म्हणजे अगदी अव्वल नंबर. आज आठवण झाली म्हणून मुद्दामून धागा वर आणत आहे. पण टग्या आज मिसळपाववर नाहीत याचेही दु:ख होत आहे.

मदनबाण 19/12/2008 - 07:27
सुरेख लेख... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

रामदास 19/12/2008 - 08:24
आपल्या लिखाणामुळे क्रांतीकारकांच्या कार्याचे स्मरण राहते.आज ज्यांच्यामुळे स्वतंत्र भारतीय राष्ट्राचे नागरीकत्व आपल्याला मिळाले त्या हुतात्म्यांना अभिवादन.

अनिल हटेला 19/12/2008 - 08:25
काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन. साक्षीजी .. लेख आवडला.... (रंग दे बसंती फेम) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

_समीर_ 19/12/2008 - 08:37
तुमचे नाव जरी सर्वसाक्षी असले तरी तुम्ही ह्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होतात असे वाटत नाही. म्हणजेच हा लेख तुम्ही कुठल्यातरी ऐकिव/वाचीव माहितीवर लिहिला आहे असा अर्थ होतो. जेव्हा एखाद्या ऐतिहासिक घटनेचे इतके डिट्टेलवार वर्णन केले जाते तेव्हा त्याचे योग्य ते संदर्भ देणे आवश्यक आहे असे वाटत नाही का? आपला मागच्या लेखात देखिल असे संदर्भ नव्हते. ऐतिहासिक घटनांना योग्य संदर्भ न देता लेख लिहिणे आणि प्रकशित करणे हे काहिसे बेजवाबदारपणाचे वाटते. पडताळून बघण्यास संदर्भ नसतील तर अश्या गोष्टींची विश्वासहर्ता कमी वाटते आणि त्यामुळेच वर टग्या ह्यांनी विचारलेल्या विसंगती अनुत्तरीत राहतात. मागे देखिल इथे असेच एका महाशयांनी कश्मिर मध्ये ३० लाख हिंदू मारले असे वाक्य ठोकुन दिले होते, नंतर लक्षात आणुन दिल्यावर सुधारणा केली. समीर

In reply to by _समीर_

असेच एका महाशयांनी कश्मिर मध्ये ३० लाख हिंदू मारले असे वाक्य ठोकुन दिले होते अहो काय हे समीरशेठ? तुम्ही केलेल्या टंकनात कधी नजरचुका होत नाहीत असे म्हणायचे आहे का आपल्याला? त्या महाशयांकडून तो एक टायपो होता (३ ऐवजी ३०) असे स्पष्टीकरण तिथल्या तिथे मिळालेले असताना पुन्हा तेच ओढायचे म्हणजे उगीच ओढून ताणून काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न वाटतो. किमान तो अकडा तरी कोणी सुजान व्यक्ती ठोकून देऊ शकेल येवढा लहान नव्हाता असे वाटते. आपला, (संमजस) भास्कर

In reply to by भास्कर केन्डे

_समीर_ 21/12/2008 - 21:56
त्याचं काय आहे तीन लाखाचे तीन हजार झाले असते तर टायपो म्हणण्याला वाव होता. पण तीन लाखाचे जेव्हा तीस लाख करण्याचा टायपो होतो तेव्हा तो सोयिस्कर टायपो वाटण्याची शंका येते. असो..माझ्या प्रतिसादातील एकच वाक्याला धरुन उपप्रतिसाद दिलात म्हणजे उरवरीत प्रतिसादाला सहमती समजायची का?

In reply to by _समीर_

धम्मकलाडू 21/12/2008 - 19:48
मागे देखिल इथे असेच एका महाशयांनी कश्मिर मध्ये ३० लाख हिंदू मारले असे वाक्य ठोकुन दिले होते, नंतर लक्षात आणुन दिल्यावर सुधारणा केली.
बाकी इतर विषयावर कधीतरी नंतर, पण वरील वाक्य मात्र एकदम परफेक्ट! (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by _समीर_

सर्वसाक्षी 22/12/2008 - 22:00
तुमचे नाव जरी सर्वसाक्षी असले तरी तुम्ही ह्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होतात असे वाटत नाही. म्हणजेच हा लेख तुम्ही कुठल्यातरी ऐकिव/वाचीव माहितीवर लिहिला आहे असा अर्थ होतो. जेव्हा एखाद्या ऐतिहासिक घटनेचे इतके डिट्टेलवार वर्णन केले जाते तेव्हा त्याचे योग्य ते संदर्भ देणे आवश्यक आहे असे वाटत नाही का? आपला मागच्या लेखात देखिल असे संदर्भ नव्हते. ऐतिहासिक घटनांना योग्य संदर्भ न देता लेख लिहिणे आणि प्रकशित करणे हे काहिसे बेजवाबदारपणाचे वाटते. > महाशय, आपल्या मतानुसार बाबासाहेब पुरंदरे ज्या तळमळीने लिहितात व ज्या तपशिलात लिहितात त्यानुसार ते शिवरायांचे समकालिन असावेत का? आणि त्यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये त्यांनी संदर्भग्रंथांची यादी वा ऐतिहासिक कागदपत्राच्या छायप्रतीही जोडलेल्या नाहीत. मग त्यांचे लेखन काल्पनीक वा खोटे मानावे का? कुठे बाबासाहेब आणि कुठे मी, माझी पात्रता त्यांच्या जोड्याइतकीही नाही पण जे विधान आपण केलेत ते त्यांनाही लागु होते! लिहिणारा प्रत्येक लेखक हा लिहिलेल्या घटनेचा साक्षीदार असतोच असे नाही. इथे गांधीवादावर लिहिणारे कितीजण गांधींबरोबर वावरले आहेत? पण गांधीवादांवरील लेखनात हा प्रश्न तुम्हाला पडला नाही. तुम्ही कोणता संदर्भही मागितला नाहीत. असो, आपली मर्जी. आपल्या म्हणण्याप्रमाणे मी बेजबाबदार आहे. मान्य आहे. मग आपण कोणते जबाबदार वर्तन केलेत? आपण कोणते संदर्भ शोधायचा प्रयत्न केलात वा मी लिहिलेले खरे की खोटे हे पडताळुन पाहिलेत? या विषयी आपण कोणते वाचन केले आहेत ज्यायोगे मी लिहिलेले खरे नाही असे आपल्याला वाटते? प्रश्नाचा रोख पाहता आपण बराच शोध घेतला असावात आणि अशी कुठलिच घटना न घडल्याचे लक्षात आल्याने आपण जाब विचारीत आहात असे वाटते. अहो माझ्या सारख्या बेजबाबदार व खोटे नाटे लिहिणार्‍यांसाठी आपल्या सारख्या विजीगिषु विद्वानांनी खरी घटना शोधुन काढणे आवश्यक आहे. मग आपण आपल्याला ज्ञात झालेली घटना सर्वांना कथित करुन मी कसे खोटे लिहिले आहे ते दाखवुन दिले पाहिजेत. आपणं शोध घ्या, व जर वरील घटना घडलीच नव्हती वा हे लोक दरोडेखोर असून खुन व दरोड्यांसाठी त्यांना फासावर लटकावले असे आपल्याला आढळुन आले तर ते संदर्भ देउन मला जाब विचारा. हा लेख लिहिताना मी नामवंत लेखकांची पुस्तके, जालावरील माहिती तसेच हुतात्मा अशफाकऊल्ला यांच्या जन्मशताब्दी प्रसंगी राष्ट्रपतींनी केलेले भाषण यांचा आधार घेतला आहे. अर्थात आपण ज्या पद्धतिने प्रश्न विचारला आहेत ते पाहता मी आपल्याला कोणताही संदर्भ देऊ इच्छित नाही. आपण आपल्याला सोयिस्कर असा निश्कर्ष काढु शकता.

In reply to by सर्वसाक्षी

टग्या 22/12/2008 - 23:51
आपल्या मतानुसार बाबासाहेब पुरंदरे ज्या तळमळीने लिहितात व ज्या तपशिलात लिहितात त्यानुसार ते शिवरायांचे समकालिन असावेत का? आणि त्यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये त्यांनी संदर्भग्रंथांची यादी वा ऐतिहासिक कागदपत्राच्या छायप्रतीही जोडलेल्या नाहीत. मग त्यांचे लेखन काल्पनीक वा खोटे मानावे का?
बाबासाहेब पुरंदर्‍यांचे लेखन वाचलेले नाही, ते करताना त्यांनी शिवरायांबद्दल किंवा एकंदरीतच त्यांच्या विषयावर किती खोलात जाऊन संशोधन केले आहे याची कल्पना नाही, परंतु आपण म्हणता त्याप्रमाणे जर त्यांनी कोणतेही संदर्भ न देता लेखन केले असेल तर 'पुरंदर्‍यांचे मत अथवा दृष्टिकोन' आणि 'मनोरंजन' यापलिकडे त्याला महत्त्व राहत नाही, 'अधिकृत ऐतिहासिक संदर्भग्रंथ' म्हणून तर निश्चितच नाही, आणि त्यात शंकेला जागा राहतेच. (बाबासाहेबांचे लिखाण काय किंवा 'मृत्युंजय'सारख्या कादंबर्‍या काय, वाङ्मय म्हणून त्यांना निश्चितच अप्रतिम मूल्य आहे, परंतु त्यांना ऐतिहासिक संदर्भग्रंथ म्हणून निश्चितच मानता येणार नाही. अर्थात या लेखकांचा तसा दावाही नसावा, परंतु त्यांमधील तपशिलांत त्रुटी आढळल्यास त्यात वावगे काहीही नसावे.) कदाचित बाबासाहेब आपल्या लेखनाचा उपयोग शिवाजीमहाराजांचे निमित्त करून इतरांवर गरळ ओकायला करत नसावेत आणि म्हणूनच त्यांच्या तपशिलांत चुका आढळल्या तरी त्यांची चिकित्सा करण्याच्या फंदात फारसे कोणी पडत नसावे.
लिहिणारा प्रत्येक लेखक हा लिहिलेल्या घटनेचा साक्षीदार असतोच असे नाही. इथे गांधीवादावर लिहिणारे कितीजण गांधींबरोबर वावरले आहेत? पण गांधीवादांवरील लेखनात हा प्रश्न तुम्हाला पडला नाही. तुम्ही कोणता संदर्भही मागितला नाहीत. असो, आपली मर्जी.
लेखन जेव्हा एखाद्या घटनेबद्दल होते तेव्हा पुराव्याचा, संदर्भांचा प्रश्न येतो. लेखन जेव्हा एखाद्या विचाराबद्दल होते तेव्हा हा प्रश्न सहसा येत नाही, कारण 'मला समजले त्याप्रमाणे विचार' हे सहसा अध्याहृत असते. ('गांधींनी असेअसे कृत्य केले' किंवा) 'गांधींनी असाअसा विचार मांडला' (घटना) म्हटले तर पुराव्याचा, संदर्भाचा प्रश्न येऊ शकतोच. 'अहिंसाविचार/सत्याग्रहविचार/अगदी गांधीविचारसुद्धा असाअसा आहे' (विचार) म्हटले तर त्यात 'लेखकाला हा विचार असाअसा समजला' हा भाग येतो, आणि अर्थात त्याच्यावरही प्रतिवाद अथवा चर्चा होऊ शकतेच, परंतु संदर्भाचा प्रश्न उद्भवत नाही, कारण तो लेखकाचा विचार असतो, गांधींचा नव्हे. गांधी त्या विचाराला चालना मिळण्यासाठी केवळ निमित्तमात्र होते एवढाच त्यात गांधींचा सहभाग असतो. अर्थात 'गांधींनी असा विचार (उदा. अमूकअमूक ठिकाणी, इतक्याइतक्या साली, अमूकअमूक प्रसंगी) मांडला होता' (पुन्हा घटना) असे जर कोणी ठाम विधान केले तर त्याचा पुरावा मागितला जाऊ शकतोच. गांधीवादावर झालेल्या चर्चा या बहुतांशी गांधींच्या कृत्यांवरील ('घटनांवरील') चर्चा नसून गांधींच्या विचारसरणीवरील ('विचारांवरील') आहेत असे वाटते. त्यामुळे संदर्भांचा, पुराव्यांचा मुद्दा गैरलागू असावा. अर्थात विचारांवर उलटसुलट वाद-प्रतिवाद, उहापोह (यातील 'उ' र्‍हस्व की दीर्घ?) होऊ शकतोच. बाकी संदर्भांचा, पुराव्यांचा मुद्दा जेथे लागू होतो तेथेसुद्धा कशाच्या संदर्भाबद्दल प्रश्न उपस्थित करायचे आणि कशाबद्दल नाहीत याचे स्वातंत्र्य पूर्णपणे वाचकास असते. लेखक ते ठरवू शकत नाही. वाचकाने लेखकास लेख लिहिण्यास सांगितलेले नसते, तेव्हा वाचकास लेखकाचे मुद्दे मानण्याची गरज नसते आणि गरज वाटली, शंका आली तर (प्रतिसंदर्भ देऊन किंवा कोणतेही प्रतिसंदर्भ न देतासुद्धा*) प्रश्न उपस्थित करण्याची (आणि तशी गरज आहे की नाही ते ठरवण्याची) मुभा तर निश्चितच असते हा एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा. (*वाचकाची शंका कशी असावी हे वाचकच ठरवतो; लेखक ते वाचकावर लादू शकत नाही.) अर्थात लेखकही वाचकाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास बांधील नसतो, आणि 'मी जे मांडले आहे ते असे आहे; पाहिजे तर घ्या नाहीतर मर्जी तुमची' ही भूमिका घेऊ शकतोच. त्यामुळे कदाचित कधीकधी लेखनाचे स्वरूप 'कन्व्हर्टिंग द ऑलरेडी कन्व्हर्टेड' (मराठी?) अशा प्रकारचे होऊ शकते खरे, पण त्याची पर्वा नसेल तर प्रश्नच मिटला. तेव्हा आपल्या लेखनावर शंका उपस्थित करणारे वाचक गांधीवादावरील लेखनावर तशाच शंका उपस्थित करत नाहीत हा मुद्दा फोल आहे. वाचकांवर तसे कोणतेही बंधन नाही. उलटपक्षी गांधीवादावरील चर्चांत आपल्याला शंका असल्यास त्या तेथे मांडण्यासाठी आपणावर कोणतीही बंदी कोणीही घातलेली नाही हेही नम्रपणे सुचवावेसे वाटते.
आपण कोणते जबाबदार वर्तन केलेत? आपण कोणते संदर्भ शोधायचा प्रयत्न केलात वा मी लिहिलेले खरे की खोटे हे पडताळुन पाहिलेत?
वर म्हटल्याप्रमाणे तसे करण्याचे वाचकावर कोणतेही बंधन नाही. 'आपले लेखन बेजबाबदार नाही' हे सिद्ध करण्याची जबाबदारी लेखकावर आहे, वाचकावर नाही. कारण (पुन्हा एकदा) 'क्रांतिकारकांवर (किंवा कोणत्याही विषयावर) आम्हाला काही माहिती सांगा' असा आग्रह वाचकाने धरला नव्हता, तर आपली सांगण्याची इच्छा असल्यामुळे आपण तो लेख लिहिलात. अर्थात तो वाचण्यास वाचक बांधील नाहीच, पण वाचल्यावर काही शंका आल्यास त्या उपस्थित करण्याचा अधिकार वाचकास निश्चितच आहे. अर्थात त्या शंकांचे निरसन न झाल्यास लेखाबद्दल, लेखातील दाव्यांबद्दल, लेखकाबद्दल, लेखकाच्या हेतूंबद्दल आणि लेखकाच्या मानसिकतेबद्दल योग्य वाटतील ते निष्कर्ष काढण्यास वाचक मुखत्यार असतोच.
आपण आपल्याला सोयिस्कर असा निश्कर्ष काढु शकता.
वर म्हटल्याप्रमाणे आपापल्या समजुतीप्रमाणे निष्कर्ष काढण्यास वाचक मुखत्यार आहेच. त्यासाठी लेखकाच्या परवानगीची गरज नाही. निष्कर्ष काढलेला आहेच. काळजी नसावी.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

_समीर_ 23/12/2008 - 00:27
धन्यवाद टग्याभाऊ. सगळ्या मुद्द्यांचा तुम्ही योग्य समाचार घेतलेला आहेच, त्यात थोडीच भर घालू इच्छीतो. बाबासाहेबांनी लिहिलेली शिवरायांवरील कादंबरी हे ललित लेखन आहे म्हणून त्यात संदर्भसुची दिलेली नसावी कदाचित. पण बाबासाहेब हे स्वतः एक हाडाचे इतिहास संशोधक आहेत.त्यांच्या लिखाणातील तपशीलांविषयी शंका उपस्थित केल्यास ते अक्षरशः शेकडो संदर्भ देउन निरसन करतात.ही माहिती मला त्यांना प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तिकडून मिळाली. "मला वाटले ते मी लिहीले, ज्यांना भाकडकथा वाटतात त्यांना खुश्शाल वाटोत" असले उर्मट उत्तर ते देत नसावेत.

In reply to by सर्वसाक्षी

आजानुकर्ण 23/12/2008 - 00:17
आपल्या मतानुसार बाबासाहेब पुरंदरे ज्या तळमळीने लिहितात व ज्या तपशिलात लिहितात त्यानुसार ते शिवरायांचे समकालिन असावेत का? आणि त्यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये त्यांनी संदर्भग्रंथांची यादी वा ऐतिहासिक कागदपत्राच्या छायप्रतीही जोडलेल्या नाहीत. मग त्यांचे लेखन काल्पनीक वा खोटे मानावे का? बाबासाहेब पुरंदरे यांची शिवाजी महाराजांविषयीची निष्ठा व प्रेम वादातीत आहे. केवळ आडनाव भोसले आहे म्हणून सातारच्या गादीला कुर्निसात करण्याइतका भाबडेपणाही त्यांच्याकडे आहे. मात्र तरीही त्यांनी केलेले लेखन हे संदर्भ म्हणून देता येणे शक्य नाही. त्यांच्या लेखनाला मनोरंजनमूल्य आहे. जाणता राजा सारखी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सर्कस इतकी वर्षे त्यांनी चालवली ही चिकाटी त्यांच्याकडे आहे. मात्र तरीही सरदेसाई, राजवाडे, किंवा शेजवलकरांच्या ग्रंथांना जी विश्वासार्हता आहे ती पुरंदऱ्यांच्या लेखनाला नक्कीच नाही. पुरंदरे यांच्या राजकीय निष्ठाही वादग्रस्त आहेत. मात्र तो प्रतिसादाचा विषय नाही. चौकस यांच्या मनोगतावरील लेखातून साभार शिवसेनेसारख्या राडेबाज पक्षात वीसेक वर्षे काढलेली असल्याने राज ठाकरेंना 'तसल्या' माणसांत वावरायची, नव्हे, त्यांना कसे वापरायचे याची पूर्ण जाण होती. त्या क्षेत्रातील महामहोपाध्याय नारायण तातोबा राणे यांचे राज ठाकर्‍यांशी घट्ट संबंध. या सगळ्याचा परिपाक म्हणून असेल, एकीकडे बाबासाहेब पुरंदरे, वीणा पाटील, अतुल परचुरे अशी मंडळी गोळा करताना विक्रम बोके, विद्यावत्सल अन्नाप्रगाडा अशी झकनाट मंडळीही त्यांनी गोळा केली. विक्रम बोके जरी धडाडीचे पोलिस अधिकारी म्हणून गाजून निवृत्त झाले असले, तरी त्यांची धडाडी खुलण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे जवळचे नातेवाईक शरद पवार हे सगळ्यांनाच माहीत आहे. निवृत्त झाल्यावरचे त्यांचे "सुसंस्कृत" वागणे अनुभवायचे असेल तर पुणे विद्यापीठातले सुरक्षा अधिकारी व्हा! आणि विद्यावत्सल अन्नाप्रगाडा हा भिडू तर गावावरून ओवाळून टाकलेला. मूळच्या आंध्रातल्या या गड्याची पुण्याच्या जवळपास प्रत्येक पोलिस-स्थानकावर नोंद होती. हा हिरा शिवसेनेत कधीच नव्हता. तो पतितपावन संघटनेचा नावापुरता टिळा लावून उंडारत असे. तो मनसेनेत थेट शहर उपाध्यक्ष झाला. सांगलीचा मनसेनेचा अध्यक्ष (दलित अल्पवयीन स्त्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी आत गेलेला) हे अजून एक रत्न. पुण्यात खंडणी गोळा करण्याच्या आरोपात आत गेलेली एक महिला ही मनसेनेची अजून एक पदाधिकारी. असे हे रत्नालय. एक विसंवादी सूर. अशा पक्षाच्या व्यासपीठावरून जाहीरपणे भाषणे ठोकताना बाबासाहेब पुरंदर्‍यांना "रांझ्याच्या पाटलाने एका बाईबरोबर बदकर्म केल्याचे कळताच, छत्रपतींनी त्याचे दोन्ही हात आणि पाय कलम करण्याची आज्ञा केली" हे वाक्य आठवत असेल का? की वाढलेल्या वयाचा परिणाम म्हणून अशा गोष्टी विस्मरणात जात असतील? असो. आपला (ऐतिहासिक) आजानुकर्ण शेजवलकर

खरा डॉन 19/12/2008 - 08:50
ह्यावेळेस मनोगतावर टाकले नाही? कि तिकडे प्रशासकाच्या अनुमतीची भिक्षा मिळण्यासाठी ताटकळले आहे? बाकी चालू द्या.. (कट्टर मिपाकर) खरा डॉन

In reply to by अभिरत भिरभि-या

अघळ पघळ 22/12/2008 - 03:27
मेहनत घेतात हे ऐकले होते. मेहनत देतात म्हणजे नक्की काय? मला मिळाली नाही हो मेहनत. कुठुन आणि कशी घ्यायची ती? अघळ पघळ

काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन. या क्रांतिकारकांना माझे पण कोटी कोटी प्रणाम! साक्षी साहेब, आजकाला आम्हा सर्वांना आमच्या स्वार्थाचेच पडलेले आहे. अशा वेळी आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणाच्या आहुत्या दिल्या त्यांचे स्मरण आम्हाला करुन देऊन त्यांच्या उपकरांची आम्हाला किमान जाण रहावी या निस्वार्थ उद्देशाने आपण वेळोवेळी समयोचित लेखन करत आहात याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! काकोरीचे धाडस या क्रांतिकारकांनी पेलले हे सूर्यप्रकाशायेवढे सत्य आहे. त्यावर ज्याला शोभेल तो तसा कीस पाडेल. माझ्या दृष्टीने असा कीस पाडणे आता गौण आहे. आपल्याला स्वांतंत्र्य हे अनेकानेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या बलिदाणाने मिळालेले आहे व त्याचा आपण योग्य तो आदर व रक्षण केले पाहिजे ही जाणीवच जास्त महत्वाची. ती जाणीव करुन देण्याचे कार्य आपला लेख बजावतो आहे हे नक्की. अभिनंदन! आपला, (नतमस्तक) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by भास्कर केन्डे

सहज 19/12/2008 - 09:53
अशा वेळी आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणाच्या आहुत्या दिल्या त्यांचे स्मरण आम्हाला करुन देऊन त्यांच्या उपकरांची आम्हाला किमान जाण रहावी या निस्वार्थ उद्देशाने आपण वेळोवेळी समयोचित लेखन करत आहात याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! भारताच्या स्वातंत्रासाठी आयुष्य, प्राण वेचलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन. क्रांतीकारकांच्या कार्याचे स्मरण करुन दिल्याबद्दल सर्वसाक्षी यांना धन्यवाद. बर्‍याच गोष्टी काल-परिस्थीती सापेक्ष म्हणता येतील. गांधीवादाच्या कट्टर विरोधकांनी टग्या यांनी शेवटी मांडलेल्या मुद्यांवर थोडा विचार करावा ही अपेक्षा जास्त नसावी.

In reply to by सहज

गांधीवादाच्या कट्टर विरोधकांनी टग्या यांनी शेवटी मांडलेल्या मुद्यांवर थोडा विचार करावा ही अपेक्षा जास्त नसावी. सहजराव, एक स्पष्टीकरण. मी कट्टर बिट्टर विरोधक नाही. स्वतः गांधीजीं बद्दल माझ्याही मनात अथांग आदर आहे. पण चीड येते ती त्यांच्या "वादा"चा अतिरेक करणार्‍यांची. जसे राणा संगा, शिवराय, विवेकानंद, सावरकर, टिळक, बोस, भगतसिंग म्हटले की आदराने शीर झुकते तसेच गांधीसमोरही झुकते. पण "केवळ आणी केवळ गांधींमुळेच स्वातंत्र्य मिळाले", "गांधींनी केले ते सर्वच बरोबरच" , "दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल", "अहिंसा व गांधीवाद हाच सर्व प्रश्नांवरील एकमेव उपाय" या असल्या वल्गनांनी डोके खराब होते. माझ्या अतापर्यंतच्या सर्व प्रतिसादांतून हेच म्हणने आहे. पाच हजार वर्षांचा जाज्वल्य इतिहास असणार्‍या राष्ट्राचा "पिता" काल परवा कसा काय होऊन गेला हेही मला न उमगलेले कोडे आहे. स्वतःला गांधीवादी म्हणवून घेणार्‍यांनी स्वतः विधायक असे काही न करता हे असले टिमटिमे वाजवत राहिल्याने त्यांच्या बद्दल डोक्यात तिडीक आहे. स्वतः गांधींबद्दल नाही. आपला, (सर्वच थोर नेत्यांसमोर नतमस्तक असणारा) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by भास्कर केन्डे

धम्मकलाडू 21/12/2008 - 04:40
जसे राणा संगा, शिवराय, विवेकानंद, सावरकर, टिळक, बोस, भगतसिंग म्हटले की आदराने शीर झुकते तसेच गांधीसमोरही झुकते.
सहज आता जुने प्रतिसाद चाळायला हवे. नव्या प्रतिसादांवर लक्ष ठेवायला हवे. (मसण्याऊद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by भास्कर केन्डे

आजानुकर्ण 21/12/2008 - 23:27
राष्ट्रपिता या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे. "राष्ट्रपिता महात्मा गांधी" या पूर्ण वाक्प्रयोगाचा अर्थ राष्ट्र पित असताना(ही) गांधी महात्मा होते असा आहे. किंबहुना अशोक नायगावकरांनी देशाचे भारत हे नाव बदलून बारत करावे असे म्हटलेच आहे. आपला (प्रोप्रायटर) आजानुकर्ण झमझम बार

झकासराव 19/12/2008 - 10:08
काकोरी पर्वातील हुतात्म्याना सलाम. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

राघव 19/12/2008 - 10:47
काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन! माझेही या सगळ्यांना विनम्र अभिवादन. मुमुक्षु आपल्या क्रांतीकार्याला लागलेली फितुरीची कीड शेवटपर्यंत सुटली नाही. इतके मोठे लोक नाहक अशा हरामखोर लोकांमुळे मारल्या गेलेत. बहुतांश सगळे असेच फासावर गेलेत. कितीतरी मोठी कामे त्यांच्याकडून आणिक झाली असती. फार वाईट वाटते असे आठवले की. या फितुर लोकांना काहीच वाटत नसेल का हो? थोडाही पश्चात्ताप होत नसेल? १८५७ च्या लढ्यातही हेच झालेले दिसते. रायगडावरचे सूर्याजी पिसाळ सर्वत्र पसरले असे वाटायला लागते.

In reply to by राघव

धमाल मुलगा 19/12/2008 - 14:20
काकोरीपर्वातील ह्या हुतात्मांना विनम्र अभिवादन! बाकी, मुमुक्षु ह्यांच्याशी पुर्णतः सहमत! शाप आहे हो हा आपल्या भारतमातेला.... फितुरीशिवाय कोणतंही काम जमतच नाही आपल्याकडे! चालायचंच.

मस्तच, अगदी मनातील भावना उतरवल्या आहेत. असेच लिहीत रहा. अशीच तुमची प्रतिभा आम्हाला बघायला मिळुद्यात. फुले शु ---- सखाराम गटणे

सर्वसाक्षीजी, विस्मृतीत जाणार्‍या क्रांतिकार्याबद्दल सातत्याने लेख लिहित आहात त्या बद्दल तुमचे खूपच कौतुक करावेसे वाटते. असेच लिहित राहा. खरं म्हणजे हे सगळं आम्ही सगळेच शाळेत शिकलोय पण तेव्हा हे सगळं ४-५ मार्कांशी निगडीत होतं आणि नंतर बराच काळ गेला आहे मधे. या निमित्ताने ही नावे आणि घटना परत जाग्या होत आहेत. वर, बरेच आक्षेप वगैरे आले आहेत. मला वाटते की अश्या घटनांबद्दल लिहिताना थोडे नाट्यमय लिहावेच लागते. अर्थात् ते एकांगी होता कामा नये हे पण खरेच. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

धम्मकलाडू 21/12/2008 - 23:10
खरं म्हणजे हे सगळं आम्ही सगळेच शाळेत शिकलोय पण तेव्हा हे सगळं ४-५ मार्कांशी निगडीत होतं आणि नंतर बराच काळ गेला आहे मधे.
मनातले बोललात! (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कलंत्री 19/12/2008 - 19:15
सर्वासाक्षीजी, आपले लेख कालोचित असतातच पण नकळतच आपण रसभंग करुन टाकतात. उदा.
हे चारही हुतात्मे अनेक क्रांतिकारकांप्रमाणेच असहकार आंदोलनात सर्वस्व त्यागुन झोकुन दिलेले. मात्र ’एक वर्षात स्वातंत्र्य देतो, मला सहकार्य द्या’अ से सांगत अनेक तरुणांना सरकारी शाळा सोडुन आंदोलनात भाग घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या गांधींनी अचानक आंदोलन मागे घेतले अणि हे सर्वजण आंदोलने व निषेधघोष यांचे मिथ्यापण लक्षात येऊन अखेर ’रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले या?’
अहिंसेने स्वातंत्र्य मिळणार नाही हे माहित असूनही अथवा १ वर्षात स्वातंत्र्य मिळनार नाही हे मान्य करुनही १९२७ नंतर जवळजवळ २० वर्ष थांबावे लागलेच. सशस्त्र लड्याची प्रेरणा म्हणून गांधीच्या आंदोलन मागे घेण्याच्या घोषणेला का दिले जाऊ नये? असो. स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या सर्वच लोकांबद्दल आदर आणि अभिमानच असायला हवा. संदर्भ ग्रंथाची यादी / नावे दिली तर सामान्य लोकांना त्यात अजूनही भर टाकता येईल. शेवटी किती दिवस आपण एकहाती हे काम करणार आहात? कोणालातरी यात पारंगत करा तर.

In reply to by कलंत्री

सर्वसाक्षी 19/12/2008 - 23:38
द्वारकानाथजी, कुणाला पारंगत करणारा मी कोण? मला स्वतःला असे काय मोठे ज्ञान आहे तर मी काय कुणाला पारंगत करणार. ज्याच्याकडे एखादी गोष्ट करण्याची ईच्छा असेल तो स्वत: त्या विषयावरील माहिती शोधुन काढतो. आपण स्वतः व्यासंगी आहात, आपल्याला ईच्छा असेल तर क्रांतिकारकांवरील भरपूर माहिती आपल्याला वा ज्या कुणाला हवी असेल त्याला पुस्तके व जाल या स्वरुपात सहज मिळवता येइल. बाकी माझे काम एकहाती नाही. अनेकांचे हात माझ्या मस्तकावर व पाठीवर आहेत. आणि मी जिवंत असे पर्यंत ज्यांनी या देशासाठी काही केले आहे आणि जे आजपर्यंत अप्रसिद्ध ठेवले गेले आहेत, उपेक्षिले गेले आहेत त्यांची माहिती जिथे व जशी देता येईल तिथे व तशी मी देतच राहीन. ते महान हुतात्मे काल दिव्य करुन गेले म्हणुन आपण आज आहोत या कृतज्ञतेने त्यांचे ऋण अत्यल्प का होईना पण फेडण्याचा एक प्रामणिक प्रयत्न मी सातत्याने करीत राहीन. कुणी टर उडवली वा धिक्कार केला तरी मला फरक पडत नाही.

In reply to by सर्वसाक्षी

कुणी टर उडवली वा धिक्कार केला तरी मला फरक पडत नाही. केलेल्या संकल्पांना तडीस नेण्याचा बाणा फार कमी लोकांत असतो. तो तुमच्यात दिसत आहे हे पाहून आनंद झाला. आपल्या सारख्यांच्या कष्टाने आम्हा पामरांना आपल्या दैदिप्यमान इतिहासाच्या उपेक्षित पानांची ओळख होत आहे हे आमचे भाग्य. आपला, (कृतज्ञ) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by सर्वसाक्षी

कलंत्री 20/12/2008 - 12:31
प्रिय सर्वसाक्षीजी, आपला प्रतिसाद आवडला. खरेतर आपणाकडुन एक भारतीय म्हणून माझी बरीच अपेक्षा आहे. क्रांतिकारकाचे समग्र वाड्मय प्रसिद्ध व्हावे आणि दुसरे म्हणजे त्यांच्या विचारधारेची ओळख जगाला व्हावी. दुर्दैवाने हे मात्र घडत नाही. आपण हे करण्यासाठी पूर्ण सक्षम आहात. आपण नकळतच गांधीमधे अडकत जातात आणि अकारणच धुरळा उडत जातो. खरेतर हे दैवी असे कार्य आहे आणि माझ्याकडुन तन-मन-धनाने मदत करण्याचे मी आश्वासन देतो. आम्ही तुमच्याकडुन स्नेहाची अपेक्षा करतो आणि आपल्या कार्याचेही महत्व जाणतो. २००९ मध्ये याबाबतीत आपल्याकडुन भरीव असे कार्य व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपला, द्वारकानाथ कलंत्री

शशिधर केळकर 20/12/2008 - 01:55
सर्वार्थाने समयोचित असा हा लेख आला आहे. आत्ता काल परवाच अतिरेक्यांचे थैमान होऊन गेले आहे. तरीही आपण गांधीवादच कुरवाळत बसलो आहोत. या समयी असे काहीतरी जाज्वल्य, स्वाभिमान जागवेल असे, मरगळ झटकणारे विचार प्रेरणादायी नक्कीच आहेत. आम्ही स्वतः क्रांतिकारी विचार करू शकत नाही, कृती उक्ती हे आपल्या आवाक्या बाहेरचे आहे. निदान अगदी नजिकच्या ऐतिहासिक कालखंडाचा थोडा उहापोह करूनही खूप परिणाम साधेल, साधला आहे. शूराला शूराचे मरण प्रिय असते म्हणतात. शूराला शूराकडून कौतुक झाले तर सर्वाधिक समाधान होते. सर्वसाक्षी, तुम्ही लिहिल्यामुळे, त्या हुतात्म्याना ही समाधान होईल, की आपली चेतना आजही जागृत आहे. तुम्हाला, तुमच्या अंतःप्रेरणेला, आणि ती शक्य तितक्या लोकात जागवण्याच्या तुमच्या उद्योगाला शुभेछा! एक मनस्वी.

भिंगरि 20/12/2008 - 02:35
भारतमातेच्या ह्या चार सुपुत्रांना विनम्र श्रध्दांजलि. सर्वसाक्षि, तुमचा हा उपक्रम चालु ठेवा आम्हाला सगळ्यांना त्याचि गरज आहे, हि नम्र विनंति.

पक्या 20/12/2008 - 06:52
सर्वसाक्षीजी, आपल्या इतर क्रांतिकार्यावरील लेखाप्रमाणेच हा ही सुंदर लेख. धन्यवाद. काकोरी क्रांतिकार्यात सहभागी झालेल्या सर्व सुपूत्रांना त्रिवार अभिवादन. स्वातंत्र्यपूर्व काळातील अशा सर्व क्रांतिकारकांचे कार्य सध्याच्या काळात स्फूर्तिदायक ठरो. शब्दांचा किस पाडणारे कितीही किस पाडोत त्याने क्रांतिकारकांच्या कार्याला यत्किंचितही कमीपणा येत नाही. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करून हसतमुखाने फासावर जाणे ही काही सोपी गोष्ट नव्हे.

धम्मकलाडू 20/12/2008 - 23:04
मला हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटना या संघटनेच्या विचारसरणीबद्दल आणखी जाणून घ्यायचे आहे. प्रश्न: हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटना ही हिंदुत्ववादी किंवा सावरकरवादी किंवा संघिष्ट संघटना होती काय? (त्यांची विचारसरणी थोडक्यात सांगावी. डावी की उजवी?) ते प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे गांधींना व मुसुलमानांना हेटाळत असत काय? ते ज्यूंची संख्या रॅशनलाइझ करणार्‍या हिटलरची तारीफ करीत असत काय? अशी हेटाळणी केल्यावर त्यांना त्यांच्या ऑडियन्सकडून टाळ्या आणि शिट्या मिळायच्या का? तूर्तास एवढेच! (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

सर्वसाक्षी 21/12/2008 - 00:21
हिचे रुपांतर पुढे हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेनेत झाले; ही लढाऊ बाजु तर जनसंपर्क व प्रसारासाठी हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक संघटना ही नागरी बाजु. ते कुणालाच हेटाळत नसत. हुतात्मा अशफाकऊल्लांवरुन दिसलेच आहे की मुस्लिमविरोधी नव्हते. गांधी मात्र यांचा द्वेश व निर्भत्सना करीत असत. यांचा कार्यकाल १९२३ ते १९३२ हाच प्रामुख्याने. या काळात हिटलरचा उदय झाला नव्हता. हिटलर जर्मनीचा राष्ट्रप्रपुख झाला १९३३ साली ही संघटना प्रखर राष्ट्रभक्तांची होती. ऑडियन्स जमा करुन टाळ्या शिट्ट्या मिळवणे हे त्यांचे ध्येय नव्हते आणि त्यांना त्यासाठी वेळही नव्हता. आयुष्य असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास अससलेल्या क्रांतिकारकांच्या डोक्यावर सतत मृत्युची तलवार सरकारच्या रुपाने टांगलेली होती त्यांना सभा - अधिवेशने भरवायला स्वास्थ्य आणि वेळ दोन्ही नव्हते. विशीत वा फरतर तिशीत ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्यांना कुणाचा द्वेष करायला वेळ नव्हता आणि इच्छाही नव्हती. त्यांनी फक्त मातृभूमिवर अपार प्रेम केले. धन्यवाद

In reply to by सर्वसाक्षी

विसोबा खेचर 21/12/2008 - 00:39
ही संघटना प्रखर राष्ट्रभक्तांची होती. ऑडियन्स जमा करुन टाळ्या शिट्ट्या मिळवणे हे त्यांचे ध्येय नव्हते आणि त्यांना त्यासाठी वेळही नव्हता. अरे पण साक्षी, तु का अश्या फालतू अन् हेटाळणीपूर्वक प्रश्नांची उत्तरे देत बसल आहेस?

In reply to by सर्वसाक्षी

बगाराम 21/12/2008 - 01:00
गांधींना चार टपल्या मारल्या खेरीज आपल्याला क्रांतीकारकांचे गोडवे गाता येणे अशक्य आहे का? दुसर्‍याला कमी लेखुन मगच एकाचे मोठेपणा सिद्ध करता यावा इतके हलके आपले क्रांतीकारक नव्हते. तुमच्या सारख्या आंधळ्या भक्ती करणार्‍या लोकांमुळे असा मेसेज दिला जातो. स्वातंत्र मिळवुन देण्यार्‍या सर्वांचेच आपण ॠणी राहिले पाहिजे. गांधी मात्र यांचा द्वेश व निर्भत्सना करीत असत. गांधी द्वेष करायचे?? एखाद्या व्यक्तिचे विचार पटले नाहीत म्हणून काहीही??? वर तुमच्या ह्या बालकथा शोभणार्‍या लिखाणाना कसलेही संदर्भ तुम्हाला द्यायचे नाहीत, ते मागीतले तर हे लिखाण खुशाल खोटे आहे समजावे अशी मल्लीनाथी तुम्हीच करता. मग तुम्ह्याल विनाकारण एका महापुरुषावर असे गरळ ओकायचा काय हक्क आहे

In reply to by बगाराम

सर्वसाक्षी 22/12/2008 - 23:05
जी आपण करीत आहात. गांधीप्रेमास्तव लिहिलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त जरा मनाच्या खिड्क्या उघडुन इतर चार पुस्तके वाचा. गांधींनी क्रांतिकारकांचा सातत्याने द्वेष केला हे सत्य आहे जे तुम्ही केवळ स्विकारु शकत नाही . क्रांतिवाद आणि गांधीवाद याच हाच तर फरक आहे. जे जे देशासाठी हौतात्म्य पावले ते सर्व आम्हाला वंद्य त्यांनी महनिय, वंदनिय अशी असामान्य दिव्ये केली म्हणुन ते वंद्य. तुम्हाला गांधी प्रिय म्हणुन त्यांनी केले तेच बरोबर बाकी सगळे चूक हा तुमचा खाक्या. इथे जेव्हा एखादा विशिष्ठ प्रश्न विचारला गेला तेव्हाच गांधींचा उल्लेख केला गेला. मात्र गांधींना चार टपल्या मारल्या खेरीज आपल्याला क्रांतीकारकांचे गोडवे गाता येणे अशक्य आहे का?> असे लिहुन तुम्ही तुमचा सत्यावर व सहिष्णुतेवर कितपत विश्वास आहे ते दाखवुन दिलेत. क्रांतिकारकांचे मोठेपण हे वादातित आहे त्याला कसल्या तुलनेची गरज नाही. गांधी हे क्रांतिकारकांचा मनापासून तिरस्कार करीत होते हे सत्य आहे आणि ते सांगितले तर गांधीभक्तांना झोंबते हेही सत्य आहे.

In reply to by सर्वसाक्षी

बगाराम 23/12/2008 - 06:53
इथे होणार्‍या टिकेमुळे संतापुन जाऊन तुमचा तोल ढळायला लागला आहे. इथे कुणीतरी क्रांतीकारकांना चोर दरोडेखोर म्हंटले आहे का? जी काही टीका आहे ती तुमच्या लेखाविषयी काढलेल्या शंका आहेत. क्रांतीकारकांच्या देशभक्तिविषयी इथे कुणाचेच दुमत नाही. इथे जेव्हा एखादा विशिष्ठ प्रश्न विचारला गेला तेव्हाच गांधींचा उल्लेख केला गेला. कशाला ताकाला जाउन भांडे लपवताय? तुमचा गांधींवरचा आकस सुर्यप्रकाशा इतका स्वच्छ आहे, कुणीही प्रश्न विचारायच्याआधी तो तुमच्या प्रत्येक लेखात डोकावत असतो. आणि डोळ्यावरची झापडे बाजुला केलीत तर असे म्हणणारा मी एकटा नाही हे लक्षात यायला वेळ लागणार नाही.

In reply to by सर्वसाक्षी

प्रियाली 24/12/2008 - 16:22
गांधीप्रेमास्तव लिहिलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त जरा मनाच्या खिड्क्या उघडुन इतर चार पुस्तके वाचा. गांधींनी क्रांतिकारकांचा सातत्याने द्वेष केला हे सत्य आहे जे तुम्ही केवळ स्विकारु शकत नाही .
हा चुकीचा सल्ला तर नव्हे. लोक आपल्याला सातत्याने त्या चार पुस्तकांची नावे द्या असेच सांगत असतात आणि आपण काही पोरकट कारणे काढून ती देण्याचे नाकारता. याचे मुख्य कारण इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांबाहेरचा इतिहास माहित नसलेले लोक डोळ्यांत पाणी आणून नतमस्तक होणार नाहीत हे असावे. चार पुस्तके लोकांनी वाचली तर गोष्टीतील सत्यासत्यता त्यांच्या लक्षात यावी तेव्हा असे सल्ले देण्यापूर्वी कृपया, विचार करावा. आता मूळ लेखाविषयी - काकोरी खटल्याबद्दल नेटावर मला जी जी माहिती मिळाली त्यात एक समान सूत्र सापडते. ते असे की काकोरी खटला सुमारे दिड वर्षे चालला आणि काँग्रेसी नेत्यांनी हा खटला क्रांतिकारकांतर्फे लढवला. त्या माहितीपैकी मला सर्वात विश्वासार्ह वाटलेल्या राष्ट्रपतींच्या भाषणातील काही मुद्दे बघा - The Kakori case trial brought the entire nation together to defend Ashfaqulla and his revolutionary companions. A Defence Committee was formed consisting of eminent Congress leaders like Pandit Motilal Nehru, Ganesh Shankar Vidyarthi, Govind Ballabh Pant and Mohanlal Saxena. Lala Lajpat Rai came to the forefront in expressing his sympathy with the revolutionaries. Many important Congress leaders such as Jawaharlal Nehru and Acharya Narendra Dev remained in touch with the revolutionaries in jail. संदर्भः http://pib.myiris.com/speech/article.php3?fl=010526181829 विकिवरील संदर्भः http://en.wikipedia.org/wiki/Kakori_train_robbery#Trial_and_Reaction इतर: http://www.liveindia.com/freedomfighters/kakori.html आपल्या लेखात हा महत्त्वाचा संदर्भ का गाळला गेला ते जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by सर्वसाक्षी

एकलव्य 21/12/2008 - 01:52
धम्मकलाडूंच्या -- कदाचित अतिअल्लड किंवा मुद्दामहून हलकट -- प्रश्नांना सर्वसाक्षींनी सभ्यपणे दिलेल्या उत्तरांमध्ये भर घालतो आहे. एचआरएने भारतातील डाव्या विचारसरणीला चांगलाच आधार दिलेला आहे. भगतसिंग आणि मित्रमंडळी हे भारतातील आद्य "साथी" आहेत असाही दावा केला जातो. असो... इच्छुकांनी भगतसिंगांचे लिखाण मुळातून वाचावे. दाखला म्हणून एक नमुना येथे देत आहे. असेंब्लिमध्ये स्वतःला अटक करवून घेणार्‍या शहिदांनी उधळलेले खालील पत्रक इच्छुकांनी थोडा वेळ काढून वाचावे. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी म्हणजे काय संघटना होती याचा थोडा अंदाज येईल. ही तरुण मंडळी म्हणजे नुसते दरोडे/ खून करणारी भडक डोक्याचे तरुण हा प्रपोगंडा दूर होण्यास थोडी मदत होईल. तालिबान, दरोडेखोर आणि एचआरए यांतील तुलनेतील फोलपणा लक्षात येईल. Leaflet thrown in the Central Assembly Hall, New Delhi at the time of the throwing voice bombs. On the 8th April, 1929, the Viceroy's proclamation, enacting the two Bills, was to be made, despite the fact that the majority of members were opposed to it, and had rather rejected in earlier. THE HINDUSTAN SOCIALIST REPUBLICAN ARMY (NOTICE) "It takes a loud voice to make the deaf hear, with these immortal words uttered on a similar occasion by Valiant, a French anarchist martyr, do we strongly justify this action of ours." "Without repeating the humiliating history of the past ten years of the working of the reforms (Montague-Chelmsford Reforms) and without mentioning the insults hurled at the Indian nation through this House-the so-called Indian Parliament-we want to point out that, while the people expecting some more crumbs of reforms from the Simon Commission, and are ever quarrelling over the distribution of the expected bones, the Government is thrusting upon us new repressive measures like the Public Safety and the Trade Disputes Bill, while reserving the Press Sedition Bill for the next session. The indiscriminate arrests of labour leaders working in the open field clearly indicate whither the wind blows." "In these extremely provocative circumstances, the Hindustan Socialist Republican Association, in all seriousness, realizing their full responsibility, had decided and ordered its army to do this particular action, so that a stop be put to this humiliating farce and to let the alien bureaucratic exploiters do what they wish, but they must be made to come before the public eve in their naked form." "Let the representatives of the people return to their constituencies and prepare the masses for the coming revolution, and let the Government know that while protesting against the Public Safety and Trade Disputes Bills and the callous murder of Lala Lajpat Rai, on behalf of the helpless Indian masses, we want to emphasize the lesson often repeated by history, that it is easy to kill individuals but you connot kill the ideas Great empires crumbled while the ideas survived. Bourbons and Czars fell. While the revaluation marched ahead triumphantly." "We are sorry to admit that we who attach so great a sanctity to human life, who dream of a glorious future, when man will be enjoying perfect peace and full liberty, have been forced to shed human blood. But the sacrifice of individuals at the altar of the 'Great Revolution' that will bring freedom to all, rendering the exploitation of man by man impossible, is inevitable." "Long Live the Revolution."15 Sd/- Balraj16 Commander-in-Chief - एकलव्य

In reply to by एकलव्य

टग्या 21/12/2008 - 18:38
पत्रक वाचले. त्यात गांधीजींना शिव्या घालणारा, गांधीजींच्या नावाने खडे फोडणारा किंवा गांधीजींची हेटाळणी करणारा एक शब्दही नाही. (खुद्द भगतसिंहांनी सुद्धा आपल्या उभ्या आयुष्यात असे काही केल्याचे ऐकिवात नाही.) भगतसिंहांचे नाव पुढेपुढे करण्यात आपले मोठेपण मानणारे भगतसिंहांचा हा आदर्श का पाळू शकत नाहीत हे एक कोडेच आहे.
मुद्दामहून हलकट
हम्म्म्म्... भगतसिंहांच्या शब्दकोशात हे शब्द नसावेतच किंवा भगतसिंहांना हे शब्द ऐकून माहीत नसावेतच असे म्हणता येणार नाही, परंतु आपल्या विरोधकांबद्दल निदान जाहीररीत्या तरी बोलताना त्यांनी या प्रकारचे शब्द वापरल्याचे ऐकिवात नाही. कदाचित त्यांचे कार्य मोठे असावे आणि त्यांना आपले मोठेपण सिद्ध करत बसण्याची (आणि त्यासाठी दुसर्‍याला हलकट वगैरे म्हणण्याची) गरज नसावी. "मरणारे मरून गेले, आता फक्त (त्यांच्या नावावर) नस्ती ट्यँव ट्यँव करणारे उरले आहेत" हेच खरे वाटू लागले आहे. ("मग ते कोणासाठी मेले" या प्रश्नाचे उत्तर "त्यांचे नाव पुढे करण्यात स्वतःचा मोठेपणा मानणार्‍यांच्या सोयीसाठी" असे असावे की काय ते कळत नाही. आपल्या पश्चात आपल्या स्मृतीचा असा उपयोग होईल हे जर त्या थोर हुतात्म्यांना आधी कळते, तर "त्यापेक्षा आपले बलिदान विस्मृतीत गेलेले बरे" असे त्यांना निश्चित वाटते! असा दुरुपयोग होणार असेल तर आपले बलिदान खरोखरच "वर्थ" आहे काय / "व्यर्थ" तर नाही ना, याचा फेरविचार त्यांनी निश्चितच केला असता, असे वाटते*. [गांधीजींचेही तेच झाले म्हणा! त्यांच्या पश्चात भलत्यांनी त्यांच्या नावावर आपली पोळी भाजून घेतली.]) *पण नसता केला. कारण क्रांतिकारक काय किंवा गांधीजी काय, आपापल्या तत्त्वांसाठी लढत होते. आपल्या पश्चात आपल्या नावाचा / स्मृतीचा भलतेच दुरुपयोग करतील याची त्यांना पर्वा नसावी.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

एकलव्य 21/12/2008 - 20:34
मुद्दामहून हलकट टग्यादादा - धम्मकलाडूंचे प्रश्न मुद्दामहून हलकट याच प्रकारात येतात. त्याला दुसरे काय संबोधन देणार ते सांगावे. (हे प्रामाणिकपणे विचारतो आहे. मनात आकस न ठेवता विश्वास ठेवावा.) माझ्या प्रतिसादावर धम्मकलाडूंनी स्वतःच दिलेले उत्तरानुसार -- जे संपादित झालेले दिसते आहे -- त्यांचा हलकटपणा मुद्दाम नव्हता तर नैसर्गिक होता वगैरे वगैरे. एचआरए बद्दल आणखी थोडी गरळ होतीच. असो...आपण कोणाची भलामण करतो आहोत की कोणाच्या हाती खेळविलो जात आहोत याचा सूज्ञांनी क्षणभर विचार करावा.

In reply to by एकलव्य

धम्मकलाडू 21/12/2008 - 23:06
माझ्या प्रतिसादावर धम्मकलाडूंनी स्वतःच दिलेले उत्तरानुसार -- जे संपादित झालेले दिसते आहे -- त्यांचा हलकटपणा मुद्दाम नव्हता तर नैसर्गिक होता वगैरे वगैरे.
धन्यवाद.
एचआरए बद्दल आणखी थोडी गरळ होतीच.
तुम्ही चर्चेला पुन्हा एक विनोदी वळण देत आहात! (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by एकलव्य

प्रियाली 21/12/2008 - 18:53
धम्मकलाडूंच्या -- कदाचित अतिअल्लड किंवा मुद्दामहून हलकट -- प्रश्नांना सर्वसाक्षींनी सभ्यपणे दिलेल्या उत्तरांमध्ये भर घालतो आहे.
इति एकलव्य
गांधी मात्र यांचा द्वेश व निर्भत्सना करीत असत.
इति सर्वसाक्षी. एकलव्य, क्रांतिकारकांचा विषय निघाला सर्वसाक्षींकडून तारतम्याची अपेक्षा करणे कधीच सोडून दिले आहे. कृपया, आपण आपल्या प्रतिसादांतून नाही नाही त्या खोटारडेपणावर पांघरूण घालू नये ही विनंती. दुर्दैवाने, असे म्हणावेसे वाटते की गांधीजींबद्दल काहीही वाह्यात लिहिले तर ते मिपावर सहज खपून जाते. गांधीद्वेषाचे मुखत्यारपत्र म्हणून मिसळपावाला प्रसिद्ध व्हायचे असल्यास माझे काहीच म्हणणे नाही. (मी कोण काय म्हणणार?) पण आपल्यासारखे डोळस लोक याला बळी पडतात ते पाहून खेद झाला.

In reply to by प्रियाली

एकलव्य 21/12/2008 - 20:37
पांघरूण घालण्याचा माझा बिलकुल मानस नाही. मी सर्वसाक्षी नाही आणि धम्मकलाडूही नाही.

In reply to by प्रियाली

मृण्मयी 22/12/2008 - 07:29
>>>>दुर्दैवाने, असे म्हणावेसे वाटते की गांधीजींबद्दल काहीही वाह्यात लिहिले तर ते मिपावर सहज खपून जाते. सहमत.

In reply to by प्रियाली

धम्मकलाडू 22/12/2008 - 17:42
दुर्दैवाने, असे म्हणावेसे वाटते की गांधीजींबद्दल काहीही वाह्यात लिहिले तर ते मिपावर सहज खपून जाते. गांधीद्वेषाचे मुखत्यारपत्र म्हणून मिसळपावाला प्रसिद्ध व्हायचे असल्यास माझे काहीच म्हणणे नाही.
खरेच. सैंया भये कोतवाल तो डर काहे का? (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by प्रियाली

सर्वसाक्षी 22/12/2008 - 23:15
दुर्दैवाने, असे म्हणावेसे वाटते की गांधीजींबद्दल काहीही वाह्यात लिहिले तर ते मिपावर सहज खपून जाते. गांधीद्वेषाचे मुखत्यारपत्र म्हणून मिसळपावाला प्रसिद्ध व्हायचे असल्यास माझे काहीच म्हणणे नाही. > इथे नकी वाह्यात काय लिहिले गेले आहे? निदान माझ्या लेखात तरी असे काही नाही. मात्र हे सांगताना क्रांतिकारकांना तालिबानी अतिरेकी म्हणणे वा दरोडेखोर म्हणणे कुठल्या संकेतस्थळाची शोभा वाढवते का तेही सांगा. इथे गांधींनी क्रांतिकारकांचा द्वेष केला असे लिहिलेले आहे आणि यात गांधीद्वेष कुठे आला? अगदी हुतात्मा मदनलाल धिंग्रांपासुन ते नेताजींपर्यंत प्रत्येकाचा तिरस्कार गांधींनी केली हे सत्य आहे. ज्यांना बहुमताने निवड्ले आहे त्या नेताजींना गांधींनी आपल्या अहंकारापायी हाकललेच ना? तुम्हाला प्रिय म्हणुन गांधींचे सर्वांनी असलेले आणि नसलेले गोडवे गावेत आणि तसे न केल्यास अशा धमक्या देणे बरे नाही.

In reply to by सर्वसाक्षी

प्रियाली 22/12/2008 - 23:31
तुम्हाला प्रिय म्हणुन गांधींचे सर्वांनी असलेले आणि नसलेले गोडवे गावेत आणि तसे न केल्यास अशा धमक्या देणे बरे नाही.
मला गांधीही प्रिय आहेत आणि क्रांतिकारीही. त्यापैकी कोणासाठीही द्वेषबुद्धी मी पाळलेली नाही. द्वेषबुद्धीने प्रश्न उपस्थित केलेले नाहीत, लेख लिहिलेले नाहीत आणि प्रतिसादही लिहिलेले नाहीत. मात्र आपल्याबद्दल असेच म्हणावेसे मला वाटत नाही. राहीली गोष्ट धमकीची तर मी वरचेच वाक्य पुन्हा लिहिते - क्रांतिकारकांचा विषय निघाला की सर्वसाक्षींकडून तारतम्याची अपेक्षा करणे मी सोडून दिले आहे.

प्राजु 19/12/2008 - 03:18
काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन. हेच म्हणते... सर्वसाक्षीजी.. आपलेही अभिनंदन. आपण इतके सुंदर लेख लिहून वेगवेगळ्या क्रांतीकारकांची ओळख करून देत आहात. इतकी माहिती कुठे मिळवता हाच प्रश्न पडतो.. आपला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 19/12/2008 - 10:26
आपण इतके सुंदर लेख लिहून वेगवेगळ्या क्रांतीकारकांची ओळख करून देत आहात. इतकी माहिती कुठे मिळवता हाच प्रश्न पडतो.. मलाही हाच प्रश्न पडतो..! साक्षिदेवा, तुझं खरंच कौतुक वाटतं! आणि या लेखांच्या ऑथेंटिसिटीबद्दलही मला पूर्ण खात्री आहे! सर्व क्रांतिकारांना सलाम..! तात्या.

शितल 19/12/2008 - 03:54
काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन. या चार हुतात्म्यांना आमचे ही विनम्र अभिवादन :)

टग्या 19/12/2008 - 06:26
गाडी काकोरी स्थानक ओलांडुन जाताच या पैकी दोघांनी गार्डला आपले काही सामान स्थानकावर राहिले असल्याचे सांगत गाडी थांबवायची विनंती केली. गार्डने ती अव्हेरताच त्याला बेसावध गाठुन त्यांनी आडवा केला व साखळी खेचून गाडी थांबविली.
या पायरीमागचे कारण नीटसे कळू शकले नाही. गाडी थांबवायचीच होती तर गार्डला गाडी थांबवण्यासाठी विनंती करण्याच्या भानगडीत न पडता कोठल्याही डब्यातून सरळसरळ साखळी ओढणे सहज शक्य होते. गार्डला विनंती करून त्याने ती अव्हेरल्यावर मग त्याला आडवा करून साखळी खेचण्याऐवजी सरळसरळ गार्ड नाही अशा ठिकाणावरून साखळी खेचण्याचा मार्ग अधिक सोपा, सरळ, शक्तीचा कमी व्यय करणारा आणि अहिंसक होता. (पुढे प्रत्यक्ष खजिना लुटताना गार्ड आडवा आल्यास त्याला आडवा करणे कदाचित गरजेचे असावे, परंतु केवळ साखळी खेचण्यासाठी गार्डला आडवा करण्याची काहीच गरज नव्हती.)
काही क्रांतिकारकांनी बाहेरचा ताबा घेतला व पिस्तुलाने हवेत गोळ्या झाडुन घबराट निर्माण केली.
जनतेच्या मनात दहशत माजवणे हे क्रांतिकारकांचे उद्दिष्ट नसावे असे यापुढील वाक्यांवरून वाटते. कारण नाहीतर ''जनतेला काही अपाय होणार नाही" हे ओरडून सांगण्याची काहीच गरज नाही. पण मग अशा परिस्थितीत पिस्तुलाने हवेत गोळ्या झाडून घबराट निर्माण करण्यामागचे प्रयोजन कळत नाही.
अचनक समोरुन एक गाडी भरवेगाने येताना दिसली आणि आता गाडी आपण थांबविलेल्या गाडीवर आदळणार या क्ल्पनेने सगळे धास्तावले.
या वाक्याचे या कथेच्या प्लॉटमधील महत्त्व (सिग्निफिकन्स / रेलेव्हन्स) कळले नाही.
हुतात्मा चंद्रशेर आजाद यांनी सुमारे तीन मण पैशाचे ओझे सायकल वरून २४ मैल वाहुन नेले.
या दाव्याचा काळ-काम-वेगाच्या दृष्टिकोनातून थोड्या बारकाईने अभ्यास करू. तीन मणांच्या अंदाजामागचा आधार काय ही बाब तूर्तास बाजूला ठेवू. तीन मण म्हणजे एकशेवीस शेर. म्हणजे जवळपास तेवढेच किलो. माणसाचे सरासरी वजन सत्तर किलो जरी मानले तरी हे म्हणजे दोघाजणांना डबलसीट (खरे तर ट्रिपलसीट) घेऊन सायकल चालवण्यासारखे. शिवाय गाठोडे (विशेषतः एकशेवीस शेरांचे गाठोडे) हे डबलसीट माणसासारखे सायकलच्या पुढच्या दांडीवर किंवा मागच्या कॅरियरवर व्यवस्थित बसू शकत नाही. (गाठोड्यातल्या ऐवजाची घनता माहीत नाही, त्यामुळे आकारमानाचा अचूक अंदाज बांधणे शक्य नाही, पण तरीही बर्‍यापैकी आकारमान असावे असे वाटते.) म्हणजे थोडक्यात गाठोड्यासकट सायकलवर बसून सायकल चालवणे (पेडल करणे) बहुधा अशक्य. गाठोडे गाढवाच्या पाठीवर लादल्यासारखे सायकलवर लादून सायकल हाताने ढकलत चालत गेले तरच बहुधा शक्य आहे. माणसाचा चालण्याचा सरासरी वेग साधारणतः ताशी चार मैल मानू. हा वेग म्हणजे कोणतेही ओझे न बाळगता चालण्याचा वेग. तीन मण (म्हणजे जवळपास सव्वा क्विंटल म्हणजे पुढच्या दांडीवर एक आणि मागच्या कॅरियरवर एक अशी दोन माणसे सायकलवर बसली तर होईल एवढे) ओझे ढकलत चालत जायचे म्हणजे वेग आणखीही बराच कमी व्हावा. तो जवळपास ताशी दोन मैल मानू. (रस्त्यात चढउतार नाहीत हे गृहीत धरू. चढ असल्यास वेग अर्थात आणखीही कमी व्हावा. उतार असल्यास गुरुत्वाकर्षणाने वेग नैसर्गिकतः वाढण्याची शक्यता जरी असली तरी सायकल आणि सायकलीबरोबर पर्यायाने सायकल ढकलणारा गडगडत जाऊ नये म्हणून सायकल धीरानेच ढकलणे आले.) म्हणजे चोवीस मैलांचे अंतर काटण्यास (अध्येमध्ये विश्रांतीसाठी थांबले नाही तर) किमान बारा तास लागावेत. हा किमान बारा तासांचा अंदाज हा संपूर्ण रस्ता पक्का / डांबरी होता या गृहीतकावर आधारित आहे. रस्ता रानावनातला, काट्याकुट्यांचा असल्यास आणखीही बराच वेळ लागावा. रस्त्यातले काटे टायरात घुसून टायर पंक्चर होण्याची शक्यता येथे विचारात घेतलेली नाही. दरोड्याची घटना संध्याकाळी साधारणतः साडेसातच्या सुमारास घडली असे म्हटले आहे. ही वेळ दरोडा सुरू होण्याची की दरोडा संपण्याची हे स्पष्ट नाही. दरोडा सुरू होण्याची वेळ असावी हे तर्कसुसंगत वाटते. दरोडा पूर्ण होण्यास अर्धा तास लागला असे जर मानले तर दरोडा साधारणतः रात्री आठाच्या सुमारास संपला असावा. तिजोरी फोडण्याचे काम त्यानंतर सुरू झाले की ते त्याआधीच साध्य झाले होते हाही तपशील कळत नाही. तिजोरी फोडून ऐवज गाठोड्यात भरणे आठ वाजेपर्यंत संपले होते असे मानू. तिजोरी फोडून ऐवज गाठोड्यात भरून होऊन क्रांतिकारक घटनास्थळापासून पसार होईपर्यंत आगगाडी तिथल्यातिथे उभी होती की आपली मार्गक्रमणा करायला पुढे गेली होती, पुढे गेली असल्यास पुढच्या स्टेशनावरील अधिकार्‍यांना ताबडतोब सतर्क केले गेले की नाही वगैरे मुद्दे तूर्तास कथेच्या दॄष्टीने गौण म्हणून सोडून देऊ. थोडक्यात, जर गाठोडे घेऊन आज़ादमहोदय सायकल ढकलीत रात्रौ आठ वाजता निघाले असे मानले, तर ते इष्टस्थळी पोहोचेपर्यंत किमान सकाळचे आठ वाजले असावेत असा अंदाज बांधता यावा. रस्ता रानावनातला अथवा काट्याकुट्यांचा असल्यास (याची शक्यता बरीच वाटते.) आणखीही वेळ लागावा. (मध्याह्न झाली नाही तरी सकाळचे किमान दहा तरी वाजावेत.) अशा परिस्थितीत किमान दिवस उजाडल्यानंतर तरी रस्त्यातून एवढे मोठे आणि वजनदार (आणि कदाचित आवाजही करणारे) गाठोडे घेऊन जाताना वाटेत कोणी भेटले नाही, कोणी हटकले नाही किंवा साधी चौकशीसुद्धा केली नाही याचे आश्चर्य वाटते. तपशिलात काहीतरी त्रुटी आहे असे वाटते. वजन, वेळ आणि अंतर यांचा ताळमेळ जमत नाही. एकंदरीत कथा ज्या पद्धतीने सांगितली आहे ती 'द ग्रेट ट्रेन रॉबरी'चा प्लॉट म्हणून मनोरंजक वाटते, परंतु देशभक्तांचा, क्रांतीचा आणि स्वातंत्र्यलढ्याचा आढावा म्हणून उगाच अतिरंजित वाटते. (घटना घडल्याबद्दल शंका नाही, घटनेत भाग घेणार्‍यांच्या हेतूंबद्दल आणि देशभक्तीबद्दलही शंका नाही. आक्षेप आहे तो सांगण्याच्या आणि त्यातून भलतेच काहीतरी ठसवण्याच्या पद्धतीला.) आतापर्यंतच्या मालिकेतून एक समान धागा प्रतीत होतो: १. सशस्त्र क्रांतिकारकांचा मार्ग हाच स्वातंत्र्य मिळवण्याचा एकमेव मार्ग होता. बाकी राजकीय, सनदशीर, शांततामय मार्गांनी प्रयत्न करणार्‍यांमध्ये आणि त्यांच्या चळवळींमध्ये काहीही दम नव्हता, त्यांच्या नेत्यांमध्ये, विशेषतः एका विशिष्ट नेत्यामध्ये, तर नव्हताच नव्हता. २. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांती आणि क्रांतीसाठी खून, बाँबस्फोट आणि दरोडे यांना पर्याय नाही. यांतून आणि केवळ यांतूनच स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकते, बाकी सर्व मिथ्या आहे. अशा अतिरंजित आणि एकांगी कथनातून उलट देशभक्तांचे (आणि ज्या क्रांतिकारकांबद्दल माहिती देण्याचा हा आटापिटा आहे त्यांच्याबद्दलचे) काहीसे विपरित चित्र प्रतीत होते, जे खेदजनक आणि अनावश्यक आहे असे वाटते. थोड्या वस्तुनिष्ठ कथनाची (आणि त्यासाठी इतिहासाकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून बघण्याची) गरज आहे असे सुचवावेसे वाटते.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

वा टगेराव, मानलं बॉ आपल्याला. एटीएस वा रॉ मध्ये आपल्या सारख्या तंत्रशुद्ध विचाराच्या लोकांची नितांत आवश्यकता आहे तेव्हा आपण आपल्या तार्किक गुणांचा उपयोग करायचा विचार करू शकता. ;) एक माझेही निरिक्षण - साधारणपणे तीन मन धान्याचे तीन मोठे गाठोडे होतात. त्यांच्या अकारमानामुळे ते सायकलवरुन टाकून न्यायचे म्हणजे जरा अशक्यच वाटते. पण तीन मन धातूंचे अकारमान हे एका मध्यम अकाराच्या गाठोड्यायेवढे होते. त्यामुळे अकारमानाचा तरी प्रश्न सुटलेला होता हे लक्षात घ्या. बाकी आपले चालू द्या. लेखन हे शुद्धच असायला हवे हे मान्य. कदाचित साक्षीजींच्या वाचनात हे मुद्दे लक्षात आलेले नसावेत. पण त्यांचा हेतू (जो की आपण सर्वांनी आपल्य जाज्वल्या इतिहासाची आठवण व जाण ठेवावी) हा तरी या लेखाने साध्य होत आहे. यापुढील त्यांचे लेखन तुमच्या सारख्या डिटेक्टिवांच्या नजरेतून सुद्धा १००% उत्तीर्ण व्हावे व तुम्हाला त्या लेखाच्या हेतूप्रत जाणे साध्य व्हावे यासाठी त्यांना व तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा! आपला, (गरज नसताना भिंगातून नव्हे तर केवळ उघड्या डोळ्याने व उघड्या मनाने वाचन करणारा) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

चेतन 19/12/2008 - 10:50
दुसर्‍या बाजिरावचं शुध्दलेखन यावर चर्चा करावी बहुतेक :T आतापर्यंतच्या प्रतिसाद मालिकेतून एक समान धागा प्रतीत होतो: १. सशस्त्र क्रांतिकारकांचा मार्ग हे चुकिचे होते व त्यांना फाट्यावर मारावे. भारताला स्वातंत्र्य फक्त अहिंसेमुळे मिळाले. २. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांती आणि क्रांतीसाठी खून, बाँबस्फोट आणि दरोडे हे पर्याय चुकीचे असुन हे सर्व करणार्‍यांना फासावर लटकवावे. यांतून आणि केवळ यांतूनच दहशतवादी निर्माण होतात. बाकी सर्व मिथ्या आहे. अशा अतिरंजित आणि एकांगी कथनातून उलट देशद्रोह्यांचे (आणि ज्या दहशतवादी कारवायंबदल माहिती देण्याचा हा आटापिटा आहे त्यांच्याबद्दलचे) काहीसे विपरित चित्र प्रतीत होते, जे खेदजनक आणि अनावश्यक आहे असे वाटते. थोड्या अहिंसक बुळबुळित कथनाची (आणि त्यासाठी इतिहासाकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून बघण्याची) गरज आहे असे सुचवावेसे वाटते (स्वगत : तिखट मिसळ झेपत नाही). असो.... पुर्वग्रहातुन कोणावरही टिप्पणी करावी भाषण स्वातंत्र्य आहे ना. शिवाय प्रत्येक ठिकाणी मतभेद असायलाच हवेत. ~X( सर्वसाक्षी चांगला लेखं धन्यावाद. (कदाचित इंग्रजांच्या पिलावळीला मिसळ सोसत नाही आहे) चेतन

In reply to by विनायक प्रभू

_समीर_ 21/12/2008 - 20:53
हो का? पण टाइम मशीन नावाचा प्रकार अजुन तरी अस्तित्वातच नाही म्हणतात. तरीही ऐतिहासिक लेखन कसे काय केले जाते मग? की त्या सगळ्याच भाकडकथाच??

In reply to by विनायक प्रभू

_समीर_ 21/12/2008 - 21:13
म्हणजे एक तर टाईम मशीनने प्रत्यक्ष घटना बघुन 'अचूक' लिहिणे अथवा ज्याच्या त्याच्या भावनांवर विसंबुन खयाली पुलाव पकवणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत का?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर 19/12/2008 - 18:11
भगवंता... बरं झालं मला जास्त बुद्धी (अक्कल) नाही दिलीस. हेच म्हणतो! मरणारे मरून गेले, आता फक्त नस्ती ट्यँव ट्यँव करणारे आणि घोड्यापुढे अक्कल धावणारे उरले आहेत! असो, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टग्या 19/12/2008 - 20:53
मरणारे मरून गेले, आता फक्त नस्ती ट्यँव ट्यँव करणारे आणि घोड्यापुढे अक्कल धावणारे उरले आहेत!
खरे आहे. मरणारे मरून गेले, त्यांची नावे पुढे करून आपलीच ट्यँव ट्यँव करणार्‍यांची चलती आहे. असो.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

मस्तच, अगदी मनातील भावना उतरवल्या आहेत. असेच लिहीत रहा. अशीच तुमची प्रतिभा आम्हाला बघायला मिळुद्यात. फुले शु ---- सखाराम गटणे

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 19/12/2008 - 21:24
मरणारे मरून गेले, आता फक्त नस्ती ट्यँव ट्यँव करणारे आणि घोड्यापुढे अक्कल धावणारे उरले आहेत!
सर्वात आवडलेला प्रतिसाद! :) (अतीशय धाडसी प्रतिसाद! आता त्याबद्दल कुणी कीव केली नाही म्हणजे मिळवली!)

In reply to by विसोबा खेचर

_समीर_ 21/12/2008 - 20:47
हा हा हा.. ट्यँव ट्यँव शब्दप्रयोग म्स्त वाटला. अतीशय चपखल. ऐतिहासिक लिखाणाला योग्य संदर्भ दिले नाहीत तर ती लोकांना संदर्भहीन ट्यँव ट्यँवच वाटणार!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

_समीर_ 21/12/2008 - 20:55
भगवंता... बरं झालं मला जास्त बुद्धी (अक्कल) नाही दिलीस. धन्य! तो गणपती बाप्पा आकाशातुन ढसा ढसा रडत असेल हे वाचुन.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 19/12/2008 - 16:48
टगवंतरावांचा प्रतिसाद फार आवडला. सर्व क्रांतीकारकांबाबत आदर आहेच मात्र मनात घोळत असलेलेच विचार टगेरावांनी त्यांच्या शेवटच्या परिच्छेदात दिले आहेत. क्रांतीकारकांना वंदन. आपला, (स्वतंत्र) आजानुकर्ण

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

सर्वसाक्षी 20/12/2008 - 00:12
१) गार्डला पटवुन गाडी थांबवता आली तर ते अधिक सोयीचे असावे. स्वतः साखळी खेचली तर गार्ड व कदाचित उपथित पोलिस साखळी कोणी व का खेचली हे पाहायला जमले असते व तसे होणे अनुकुल नव्हते. २) हवेत गोळया झाडल्या गेल्या त्या प्रतिकारासाठी रकक्षकांनी पुढे येउ नये म्हणुन. मात्र आपल्याच देशबांधवांना इजा होऊ नये यासाठी तसेच कुणी गाडीवर दरोडा आहे असे समजुन प्रतिकारासाठी आले तर नाहक आपल्याच बांधवांवर शस्त्र चालवाचा प्रसंग येऊ नये म्हणुन. आपल्या जिवनातील अखेरच्या संग्रामात आल्फ्रेड पार्क येथे झालेल्या चकमकीत हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांनी पोलिसांना आवाहान केले होते की तुम्ही माझे देशबांधव आहात, माझे तुमचे वैर नाही आणि मला तुमच्यावर शस्र चालवायची इच्छा नाही. या प्रसंगी अनेक विद्यार्थी आजुबाजुला जमले होते तेव्हा त्यांनाही आजादांनी सांगितले होते की त्यांचा जिवाला धोका आहे, इथे प्राणही जाऊ शकतात तेव्हा त्यांनी शक्य तितक्या लवकर दूर जावे. ३) काळ काम वेग गणित. आपल्या शंका रास्त आहेत. मात्र ते हुतात्मा आजाद होते, कुणी लेचापेचा मनुष्य नव्हता. झाशी येथे मोटार मिस्त्री च्या रुपात वावरताना त्यांनी सिराजौद्दीन यांचेकडे नोकरी पत्करली होती. त्यांचा विश्वास जिंकण्यसाठी आजादांनी सिराजऊद्दिन यांच्या मुलीच्या लग्नप्रसंगी प्रांतनिर्यात निर्बंध चुकवुन सायकल वरुन ओरछा येथून शेरभर तुपाची पींपे सायकलवरुन चौदा मैल आणली होती. आजाद झाशी परिसरात असलेल्या किल्ल्यावरील सोजिरांच्या तळात एका विजेचे काम करणार्‍या मिस्त्रीचे ओळखीने जायचे. किल्ल्याला चांगला चढ होता. ज्या चढणीवर सोजिरांची फाफु होत असे व ते सायकली हातात धरुन चढ चढत असत तिथे आजाद रपारप सायकल हाणीत जिद्दीने तो चढ चढुन जायचे. असो. ही माझी माहिती माझ्या वाचनात आलेल्या पुस्तकानुसार. या भाकडकथा वा क्रांतिकारकांना फुकट चढवण्यासाठी रचलेल्या कथा आहेत असे आपण म्हणुन शकता.

In reply to by सर्वसाक्षी

एकलव्य 20/12/2008 - 00:36
सर्वसाक्षी, निरसन आपणच मांडले हे चांगले झाले. टगेदादांविषयी माझ्या मनात अतीव स्नेह आहे आणि आदरही. संदेह निर्माण होणे आणि त्या मांडणे हा जन्मजात स्वभाव आहे. पण शंकांचा फुटकळपणा पाहून आश्चर्य वाटले होते. असो.. तरीही टगेदादांना शेवटच्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे "थोड्या वस्तुनिष्ठ कथनाची" भर टाकता आली तर (टगेदादा प्रेरित नाही!) डायव्हर्जन साठी संधी राहणार नाही. (लहान तोंडी मोठा घास घेणारा) एकलव्य अवांतर - टगेदादांच्या तिसर्‍या शंकेचे निरसन होइल किंवा नाही याचा खुराक एन्जॉय करतो आहे.

In reply to by सर्वसाक्षी

विसोबा खेचर 20/12/2008 - 01:00
या भाकडकथा वा क्रांतिकारकांना फुकट चढवण्यासाठी रचलेल्या कथा आहेत असे आपण म्हणुन शकता. हा डिस्क्लेमर टाकलास ते बाकी बरं केलंस साक्षी! त्यामुळे आता काही शंकेखोर आणि त्यांचे पित्ते चार दिवस मिशीला कोकम लावून तूप तूप म्हणत हिंडत फिरतील! हे डिस्क्लेमर टाकून त्यांचे आत्मे शांत केलेस हे बरेच झाले! तात्या.

In reply to by सर्वसाक्षी

_समीर_ 21/12/2008 - 20:22
ही माझी माहिती माझ्या वाचनात आलेल्या पुस्तकानुसार. या भाकडकथा वा क्रांतिकारकांना फुकट चढवण्यासाठी रचलेल्या कथा आहेत असे आपण म्हणुन शकता. कमाल आहे! मग असा डिस्क्लेमर लेखात घालुन आणि लेखन 'विरंगुळा' सदरात घालणे योग्य नाही का? क्रांतीकारकांविषयी आयुष्यभर लेखन करीन वगैरे म्हणणारर्‍या कडुन हा प्रतिसाद अनपेक्षीत होता. हेच का तुमचे डेडिकेशन? तुम्ही मला ह्या विषयातील अभ्यासू तज्ञ वगैरे वाटलात. असो...

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

टग्यांच्या काळ-काम-वेग गणिताचा प्रतिसाद म्हणजे अगदी अव्वल नंबर. आज आठवण झाली म्हणून मुद्दामून धागा वर आणत आहे. पण टग्या आज मिसळपाववर नाहीत याचेही दु:ख होत आहे.

मदनबाण 19/12/2008 - 07:27
सुरेख लेख... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

रामदास 19/12/2008 - 08:24
आपल्या लिखाणामुळे क्रांतीकारकांच्या कार्याचे स्मरण राहते.आज ज्यांच्यामुळे स्वतंत्र भारतीय राष्ट्राचे नागरीकत्व आपल्याला मिळाले त्या हुतात्म्यांना अभिवादन.

अनिल हटेला 19/12/2008 - 08:25
काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन. साक्षीजी .. लेख आवडला.... (रंग दे बसंती फेम) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

_समीर_ 19/12/2008 - 08:37
तुमचे नाव जरी सर्वसाक्षी असले तरी तुम्ही ह्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होतात असे वाटत नाही. म्हणजेच हा लेख तुम्ही कुठल्यातरी ऐकिव/वाचीव माहितीवर लिहिला आहे असा अर्थ होतो. जेव्हा एखाद्या ऐतिहासिक घटनेचे इतके डिट्टेलवार वर्णन केले जाते तेव्हा त्याचे योग्य ते संदर्भ देणे आवश्यक आहे असे वाटत नाही का? आपला मागच्या लेखात देखिल असे संदर्भ नव्हते. ऐतिहासिक घटनांना योग्य संदर्भ न देता लेख लिहिणे आणि प्रकशित करणे हे काहिसे बेजवाबदारपणाचे वाटते. पडताळून बघण्यास संदर्भ नसतील तर अश्या गोष्टींची विश्वासहर्ता कमी वाटते आणि त्यामुळेच वर टग्या ह्यांनी विचारलेल्या विसंगती अनुत्तरीत राहतात. मागे देखिल इथे असेच एका महाशयांनी कश्मिर मध्ये ३० लाख हिंदू मारले असे वाक्य ठोकुन दिले होते, नंतर लक्षात आणुन दिल्यावर सुधारणा केली. समीर

In reply to by _समीर_

असेच एका महाशयांनी कश्मिर मध्ये ३० लाख हिंदू मारले असे वाक्य ठोकुन दिले होते अहो काय हे समीरशेठ? तुम्ही केलेल्या टंकनात कधी नजरचुका होत नाहीत असे म्हणायचे आहे का आपल्याला? त्या महाशयांकडून तो एक टायपो होता (३ ऐवजी ३०) असे स्पष्टीकरण तिथल्या तिथे मिळालेले असताना पुन्हा तेच ओढायचे म्हणजे उगीच ओढून ताणून काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न वाटतो. किमान तो अकडा तरी कोणी सुजान व्यक्ती ठोकून देऊ शकेल येवढा लहान नव्हाता असे वाटते. आपला, (संमजस) भास्कर

In reply to by भास्कर केन्डे

_समीर_ 21/12/2008 - 21:56
त्याचं काय आहे तीन लाखाचे तीन हजार झाले असते तर टायपो म्हणण्याला वाव होता. पण तीन लाखाचे जेव्हा तीस लाख करण्याचा टायपो होतो तेव्हा तो सोयिस्कर टायपो वाटण्याची शंका येते. असो..माझ्या प्रतिसादातील एकच वाक्याला धरुन उपप्रतिसाद दिलात म्हणजे उरवरीत प्रतिसादाला सहमती समजायची का?

In reply to by _समीर_

धम्मकलाडू 21/12/2008 - 19:48
मागे देखिल इथे असेच एका महाशयांनी कश्मिर मध्ये ३० लाख हिंदू मारले असे वाक्य ठोकुन दिले होते, नंतर लक्षात आणुन दिल्यावर सुधारणा केली.
बाकी इतर विषयावर कधीतरी नंतर, पण वरील वाक्य मात्र एकदम परफेक्ट! (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by _समीर_

सर्वसाक्षी 22/12/2008 - 22:00
तुमचे नाव जरी सर्वसाक्षी असले तरी तुम्ही ह्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होतात असे वाटत नाही. म्हणजेच हा लेख तुम्ही कुठल्यातरी ऐकिव/वाचीव माहितीवर लिहिला आहे असा अर्थ होतो. जेव्हा एखाद्या ऐतिहासिक घटनेचे इतके डिट्टेलवार वर्णन केले जाते तेव्हा त्याचे योग्य ते संदर्भ देणे आवश्यक आहे असे वाटत नाही का? आपला मागच्या लेखात देखिल असे संदर्भ नव्हते. ऐतिहासिक घटनांना योग्य संदर्भ न देता लेख लिहिणे आणि प्रकशित करणे हे काहिसे बेजवाबदारपणाचे वाटते. > महाशय, आपल्या मतानुसार बाबासाहेब पुरंदरे ज्या तळमळीने लिहितात व ज्या तपशिलात लिहितात त्यानुसार ते शिवरायांचे समकालिन असावेत का? आणि त्यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये त्यांनी संदर्भग्रंथांची यादी वा ऐतिहासिक कागदपत्राच्या छायप्रतीही जोडलेल्या नाहीत. मग त्यांचे लेखन काल्पनीक वा खोटे मानावे का? कुठे बाबासाहेब आणि कुठे मी, माझी पात्रता त्यांच्या जोड्याइतकीही नाही पण जे विधान आपण केलेत ते त्यांनाही लागु होते! लिहिणारा प्रत्येक लेखक हा लिहिलेल्या घटनेचा साक्षीदार असतोच असे नाही. इथे गांधीवादावर लिहिणारे कितीजण गांधींबरोबर वावरले आहेत? पण गांधीवादांवरील लेखनात हा प्रश्न तुम्हाला पडला नाही. तुम्ही कोणता संदर्भही मागितला नाहीत. असो, आपली मर्जी. आपल्या म्हणण्याप्रमाणे मी बेजबाबदार आहे. मान्य आहे. मग आपण कोणते जबाबदार वर्तन केलेत? आपण कोणते संदर्भ शोधायचा प्रयत्न केलात वा मी लिहिलेले खरे की खोटे हे पडताळुन पाहिलेत? या विषयी आपण कोणते वाचन केले आहेत ज्यायोगे मी लिहिलेले खरे नाही असे आपल्याला वाटते? प्रश्नाचा रोख पाहता आपण बराच शोध घेतला असावात आणि अशी कुठलिच घटना न घडल्याचे लक्षात आल्याने आपण जाब विचारीत आहात असे वाटते. अहो माझ्या सारख्या बेजबाबदार व खोटे नाटे लिहिणार्‍यांसाठी आपल्या सारख्या विजीगिषु विद्वानांनी खरी घटना शोधुन काढणे आवश्यक आहे. मग आपण आपल्याला ज्ञात झालेली घटना सर्वांना कथित करुन मी कसे खोटे लिहिले आहे ते दाखवुन दिले पाहिजेत. आपणं शोध घ्या, व जर वरील घटना घडलीच नव्हती वा हे लोक दरोडेखोर असून खुन व दरोड्यांसाठी त्यांना फासावर लटकावले असे आपल्याला आढळुन आले तर ते संदर्भ देउन मला जाब विचारा. हा लेख लिहिताना मी नामवंत लेखकांची पुस्तके, जालावरील माहिती तसेच हुतात्मा अशफाकऊल्ला यांच्या जन्मशताब्दी प्रसंगी राष्ट्रपतींनी केलेले भाषण यांचा आधार घेतला आहे. अर्थात आपण ज्या पद्धतिने प्रश्न विचारला आहेत ते पाहता मी आपल्याला कोणताही संदर्भ देऊ इच्छित नाही. आपण आपल्याला सोयिस्कर असा निश्कर्ष काढु शकता.

In reply to by सर्वसाक्षी

टग्या 22/12/2008 - 23:51
आपल्या मतानुसार बाबासाहेब पुरंदरे ज्या तळमळीने लिहितात व ज्या तपशिलात लिहितात त्यानुसार ते शिवरायांचे समकालिन असावेत का? आणि त्यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये त्यांनी संदर्भग्रंथांची यादी वा ऐतिहासिक कागदपत्राच्या छायप्रतीही जोडलेल्या नाहीत. मग त्यांचे लेखन काल्पनीक वा खोटे मानावे का?
बाबासाहेब पुरंदर्‍यांचे लेखन वाचलेले नाही, ते करताना त्यांनी शिवरायांबद्दल किंवा एकंदरीतच त्यांच्या विषयावर किती खोलात जाऊन संशोधन केले आहे याची कल्पना नाही, परंतु आपण म्हणता त्याप्रमाणे जर त्यांनी कोणतेही संदर्भ न देता लेखन केले असेल तर 'पुरंदर्‍यांचे मत अथवा दृष्टिकोन' आणि 'मनोरंजन' यापलिकडे त्याला महत्त्व राहत नाही, 'अधिकृत ऐतिहासिक संदर्भग्रंथ' म्हणून तर निश्चितच नाही, आणि त्यात शंकेला जागा राहतेच. (बाबासाहेबांचे लिखाण काय किंवा 'मृत्युंजय'सारख्या कादंबर्‍या काय, वाङ्मय म्हणून त्यांना निश्चितच अप्रतिम मूल्य आहे, परंतु त्यांना ऐतिहासिक संदर्भग्रंथ म्हणून निश्चितच मानता येणार नाही. अर्थात या लेखकांचा तसा दावाही नसावा, परंतु त्यांमधील तपशिलांत त्रुटी आढळल्यास त्यात वावगे काहीही नसावे.) कदाचित बाबासाहेब आपल्या लेखनाचा उपयोग शिवाजीमहाराजांचे निमित्त करून इतरांवर गरळ ओकायला करत नसावेत आणि म्हणूनच त्यांच्या तपशिलांत चुका आढळल्या तरी त्यांची चिकित्सा करण्याच्या फंदात फारसे कोणी पडत नसावे.
लिहिणारा प्रत्येक लेखक हा लिहिलेल्या घटनेचा साक्षीदार असतोच असे नाही. इथे गांधीवादावर लिहिणारे कितीजण गांधींबरोबर वावरले आहेत? पण गांधीवादांवरील लेखनात हा प्रश्न तुम्हाला पडला नाही. तुम्ही कोणता संदर्भही मागितला नाहीत. असो, आपली मर्जी.
लेखन जेव्हा एखाद्या घटनेबद्दल होते तेव्हा पुराव्याचा, संदर्भांचा प्रश्न येतो. लेखन जेव्हा एखाद्या विचाराबद्दल होते तेव्हा हा प्रश्न सहसा येत नाही, कारण 'मला समजले त्याप्रमाणे विचार' हे सहसा अध्याहृत असते. ('गांधींनी असेअसे कृत्य केले' किंवा) 'गांधींनी असाअसा विचार मांडला' (घटना) म्हटले तर पुराव्याचा, संदर्भाचा प्रश्न येऊ शकतोच. 'अहिंसाविचार/सत्याग्रहविचार/अगदी गांधीविचारसुद्धा असाअसा आहे' (विचार) म्हटले तर त्यात 'लेखकाला हा विचार असाअसा समजला' हा भाग येतो, आणि अर्थात त्याच्यावरही प्रतिवाद अथवा चर्चा होऊ शकतेच, परंतु संदर्भाचा प्रश्न उद्भवत नाही, कारण तो लेखकाचा विचार असतो, गांधींचा नव्हे. गांधी त्या विचाराला चालना मिळण्यासाठी केवळ निमित्तमात्र होते एवढाच त्यात गांधींचा सहभाग असतो. अर्थात 'गांधींनी असा विचार (उदा. अमूकअमूक ठिकाणी, इतक्याइतक्या साली, अमूकअमूक प्रसंगी) मांडला होता' (पुन्हा घटना) असे जर कोणी ठाम विधान केले तर त्याचा पुरावा मागितला जाऊ शकतोच. गांधीवादावर झालेल्या चर्चा या बहुतांशी गांधींच्या कृत्यांवरील ('घटनांवरील') चर्चा नसून गांधींच्या विचारसरणीवरील ('विचारांवरील') आहेत असे वाटते. त्यामुळे संदर्भांचा, पुराव्यांचा मुद्दा गैरलागू असावा. अर्थात विचारांवर उलटसुलट वाद-प्रतिवाद, उहापोह (यातील 'उ' र्‍हस्व की दीर्घ?) होऊ शकतोच. बाकी संदर्भांचा, पुराव्यांचा मुद्दा जेथे लागू होतो तेथेसुद्धा कशाच्या संदर्भाबद्दल प्रश्न उपस्थित करायचे आणि कशाबद्दल नाहीत याचे स्वातंत्र्य पूर्णपणे वाचकास असते. लेखक ते ठरवू शकत नाही. वाचकाने लेखकास लेख लिहिण्यास सांगितलेले नसते, तेव्हा वाचकास लेखकाचे मुद्दे मानण्याची गरज नसते आणि गरज वाटली, शंका आली तर (प्रतिसंदर्भ देऊन किंवा कोणतेही प्रतिसंदर्भ न देतासुद्धा*) प्रश्न उपस्थित करण्याची (आणि तशी गरज आहे की नाही ते ठरवण्याची) मुभा तर निश्चितच असते हा एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा. (*वाचकाची शंका कशी असावी हे वाचकच ठरवतो; लेखक ते वाचकावर लादू शकत नाही.) अर्थात लेखकही वाचकाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास बांधील नसतो, आणि 'मी जे मांडले आहे ते असे आहे; पाहिजे तर घ्या नाहीतर मर्जी तुमची' ही भूमिका घेऊ शकतोच. त्यामुळे कदाचित कधीकधी लेखनाचे स्वरूप 'कन्व्हर्टिंग द ऑलरेडी कन्व्हर्टेड' (मराठी?) अशा प्रकारचे होऊ शकते खरे, पण त्याची पर्वा नसेल तर प्रश्नच मिटला. तेव्हा आपल्या लेखनावर शंका उपस्थित करणारे वाचक गांधीवादावरील लेखनावर तशाच शंका उपस्थित करत नाहीत हा मुद्दा फोल आहे. वाचकांवर तसे कोणतेही बंधन नाही. उलटपक्षी गांधीवादावरील चर्चांत आपल्याला शंका असल्यास त्या तेथे मांडण्यासाठी आपणावर कोणतीही बंदी कोणीही घातलेली नाही हेही नम्रपणे सुचवावेसे वाटते.
आपण कोणते जबाबदार वर्तन केलेत? आपण कोणते संदर्भ शोधायचा प्रयत्न केलात वा मी लिहिलेले खरे की खोटे हे पडताळुन पाहिलेत?
वर म्हटल्याप्रमाणे तसे करण्याचे वाचकावर कोणतेही बंधन नाही. 'आपले लेखन बेजबाबदार नाही' हे सिद्ध करण्याची जबाबदारी लेखकावर आहे, वाचकावर नाही. कारण (पुन्हा एकदा) 'क्रांतिकारकांवर (किंवा कोणत्याही विषयावर) आम्हाला काही माहिती सांगा' असा आग्रह वाचकाने धरला नव्हता, तर आपली सांगण्याची इच्छा असल्यामुळे आपण तो लेख लिहिलात. अर्थात तो वाचण्यास वाचक बांधील नाहीच, पण वाचल्यावर काही शंका आल्यास त्या उपस्थित करण्याचा अधिकार वाचकास निश्चितच आहे. अर्थात त्या शंकांचे निरसन न झाल्यास लेखाबद्दल, लेखातील दाव्यांबद्दल, लेखकाबद्दल, लेखकाच्या हेतूंबद्दल आणि लेखकाच्या मानसिकतेबद्दल योग्य वाटतील ते निष्कर्ष काढण्यास वाचक मुखत्यार असतोच.
आपण आपल्याला सोयिस्कर असा निश्कर्ष काढु शकता.
वर म्हटल्याप्रमाणे आपापल्या समजुतीप्रमाणे निष्कर्ष काढण्यास वाचक मुखत्यार आहेच. त्यासाठी लेखकाच्या परवानगीची गरज नाही. निष्कर्ष काढलेला आहेच. काळजी नसावी.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

_समीर_ 23/12/2008 - 00:27
धन्यवाद टग्याभाऊ. सगळ्या मुद्द्यांचा तुम्ही योग्य समाचार घेतलेला आहेच, त्यात थोडीच भर घालू इच्छीतो. बाबासाहेबांनी लिहिलेली शिवरायांवरील कादंबरी हे ललित लेखन आहे म्हणून त्यात संदर्भसुची दिलेली नसावी कदाचित. पण बाबासाहेब हे स्वतः एक हाडाचे इतिहास संशोधक आहेत.त्यांच्या लिखाणातील तपशीलांविषयी शंका उपस्थित केल्यास ते अक्षरशः शेकडो संदर्भ देउन निरसन करतात.ही माहिती मला त्यांना प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तिकडून मिळाली. "मला वाटले ते मी लिहीले, ज्यांना भाकडकथा वाटतात त्यांना खुश्शाल वाटोत" असले उर्मट उत्तर ते देत नसावेत.

In reply to by सर्वसाक्षी

आजानुकर्ण 23/12/2008 - 00:17
आपल्या मतानुसार बाबासाहेब पुरंदरे ज्या तळमळीने लिहितात व ज्या तपशिलात लिहितात त्यानुसार ते शिवरायांचे समकालिन असावेत का? आणि त्यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये त्यांनी संदर्भग्रंथांची यादी वा ऐतिहासिक कागदपत्राच्या छायप्रतीही जोडलेल्या नाहीत. मग त्यांचे लेखन काल्पनीक वा खोटे मानावे का? बाबासाहेब पुरंदरे यांची शिवाजी महाराजांविषयीची निष्ठा व प्रेम वादातीत आहे. केवळ आडनाव भोसले आहे म्हणून सातारच्या गादीला कुर्निसात करण्याइतका भाबडेपणाही त्यांच्याकडे आहे. मात्र तरीही त्यांनी केलेले लेखन हे संदर्भ म्हणून देता येणे शक्य नाही. त्यांच्या लेखनाला मनोरंजनमूल्य आहे. जाणता राजा सारखी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सर्कस इतकी वर्षे त्यांनी चालवली ही चिकाटी त्यांच्याकडे आहे. मात्र तरीही सरदेसाई, राजवाडे, किंवा शेजवलकरांच्या ग्रंथांना जी विश्वासार्हता आहे ती पुरंदऱ्यांच्या लेखनाला नक्कीच नाही. पुरंदरे यांच्या राजकीय निष्ठाही वादग्रस्त आहेत. मात्र तो प्रतिसादाचा विषय नाही. चौकस यांच्या मनोगतावरील लेखातून साभार शिवसेनेसारख्या राडेबाज पक्षात वीसेक वर्षे काढलेली असल्याने राज ठाकरेंना 'तसल्या' माणसांत वावरायची, नव्हे, त्यांना कसे वापरायचे याची पूर्ण जाण होती. त्या क्षेत्रातील महामहोपाध्याय नारायण तातोबा राणे यांचे राज ठाकर्‍यांशी घट्ट संबंध. या सगळ्याचा परिपाक म्हणून असेल, एकीकडे बाबासाहेब पुरंदरे, वीणा पाटील, अतुल परचुरे अशी मंडळी गोळा करताना विक्रम बोके, विद्यावत्सल अन्नाप्रगाडा अशी झकनाट मंडळीही त्यांनी गोळा केली. विक्रम बोके जरी धडाडीचे पोलिस अधिकारी म्हणून गाजून निवृत्त झाले असले, तरी त्यांची धडाडी खुलण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे जवळचे नातेवाईक शरद पवार हे सगळ्यांनाच माहीत आहे. निवृत्त झाल्यावरचे त्यांचे "सुसंस्कृत" वागणे अनुभवायचे असेल तर पुणे विद्यापीठातले सुरक्षा अधिकारी व्हा! आणि विद्यावत्सल अन्नाप्रगाडा हा भिडू तर गावावरून ओवाळून टाकलेला. मूळच्या आंध्रातल्या या गड्याची पुण्याच्या जवळपास प्रत्येक पोलिस-स्थानकावर नोंद होती. हा हिरा शिवसेनेत कधीच नव्हता. तो पतितपावन संघटनेचा नावापुरता टिळा लावून उंडारत असे. तो मनसेनेत थेट शहर उपाध्यक्ष झाला. सांगलीचा मनसेनेचा अध्यक्ष (दलित अल्पवयीन स्त्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी आत गेलेला) हे अजून एक रत्न. पुण्यात खंडणी गोळा करण्याच्या आरोपात आत गेलेली एक महिला ही मनसेनेची अजून एक पदाधिकारी. असे हे रत्नालय. एक विसंवादी सूर. अशा पक्षाच्या व्यासपीठावरून जाहीरपणे भाषणे ठोकताना बाबासाहेब पुरंदर्‍यांना "रांझ्याच्या पाटलाने एका बाईबरोबर बदकर्म केल्याचे कळताच, छत्रपतींनी त्याचे दोन्ही हात आणि पाय कलम करण्याची आज्ञा केली" हे वाक्य आठवत असेल का? की वाढलेल्या वयाचा परिणाम म्हणून अशा गोष्टी विस्मरणात जात असतील? असो. आपला (ऐतिहासिक) आजानुकर्ण शेजवलकर

खरा डॉन 19/12/2008 - 08:50
ह्यावेळेस मनोगतावर टाकले नाही? कि तिकडे प्रशासकाच्या अनुमतीची भिक्षा मिळण्यासाठी ताटकळले आहे? बाकी चालू द्या.. (कट्टर मिपाकर) खरा डॉन

In reply to by अभिरत भिरभि-या

अघळ पघळ 22/12/2008 - 03:27
मेहनत घेतात हे ऐकले होते. मेहनत देतात म्हणजे नक्की काय? मला मिळाली नाही हो मेहनत. कुठुन आणि कशी घ्यायची ती? अघळ पघळ

काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन. या क्रांतिकारकांना माझे पण कोटी कोटी प्रणाम! साक्षी साहेब, आजकाला आम्हा सर्वांना आमच्या स्वार्थाचेच पडलेले आहे. अशा वेळी आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणाच्या आहुत्या दिल्या त्यांचे स्मरण आम्हाला करुन देऊन त्यांच्या उपकरांची आम्हाला किमान जाण रहावी या निस्वार्थ उद्देशाने आपण वेळोवेळी समयोचित लेखन करत आहात याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! काकोरीचे धाडस या क्रांतिकारकांनी पेलले हे सूर्यप्रकाशायेवढे सत्य आहे. त्यावर ज्याला शोभेल तो तसा कीस पाडेल. माझ्या दृष्टीने असा कीस पाडणे आता गौण आहे. आपल्याला स्वांतंत्र्य हे अनेकानेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या बलिदाणाने मिळालेले आहे व त्याचा आपण योग्य तो आदर व रक्षण केले पाहिजे ही जाणीवच जास्त महत्वाची. ती जाणीव करुन देण्याचे कार्य आपला लेख बजावतो आहे हे नक्की. अभिनंदन! आपला, (नतमस्तक) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by भास्कर केन्डे

सहज 19/12/2008 - 09:53
अशा वेळी आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणाच्या आहुत्या दिल्या त्यांचे स्मरण आम्हाला करुन देऊन त्यांच्या उपकरांची आम्हाला किमान जाण रहावी या निस्वार्थ उद्देशाने आपण वेळोवेळी समयोचित लेखन करत आहात याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! भारताच्या स्वातंत्रासाठी आयुष्य, प्राण वेचलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन. क्रांतीकारकांच्या कार्याचे स्मरण करुन दिल्याबद्दल सर्वसाक्षी यांना धन्यवाद. बर्‍याच गोष्टी काल-परिस्थीती सापेक्ष म्हणता येतील. गांधीवादाच्या कट्टर विरोधकांनी टग्या यांनी शेवटी मांडलेल्या मुद्यांवर थोडा विचार करावा ही अपेक्षा जास्त नसावी.

In reply to by सहज

गांधीवादाच्या कट्टर विरोधकांनी टग्या यांनी शेवटी मांडलेल्या मुद्यांवर थोडा विचार करावा ही अपेक्षा जास्त नसावी. सहजराव, एक स्पष्टीकरण. मी कट्टर बिट्टर विरोधक नाही. स्वतः गांधीजीं बद्दल माझ्याही मनात अथांग आदर आहे. पण चीड येते ती त्यांच्या "वादा"चा अतिरेक करणार्‍यांची. जसे राणा संगा, शिवराय, विवेकानंद, सावरकर, टिळक, बोस, भगतसिंग म्हटले की आदराने शीर झुकते तसेच गांधीसमोरही झुकते. पण "केवळ आणी केवळ गांधींमुळेच स्वातंत्र्य मिळाले", "गांधींनी केले ते सर्वच बरोबरच" , "दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल", "अहिंसा व गांधीवाद हाच सर्व प्रश्नांवरील एकमेव उपाय" या असल्या वल्गनांनी डोके खराब होते. माझ्या अतापर्यंतच्या सर्व प्रतिसादांतून हेच म्हणने आहे. पाच हजार वर्षांचा जाज्वल्य इतिहास असणार्‍या राष्ट्राचा "पिता" काल परवा कसा काय होऊन गेला हेही मला न उमगलेले कोडे आहे. स्वतःला गांधीवादी म्हणवून घेणार्‍यांनी स्वतः विधायक असे काही न करता हे असले टिमटिमे वाजवत राहिल्याने त्यांच्या बद्दल डोक्यात तिडीक आहे. स्वतः गांधींबद्दल नाही. आपला, (सर्वच थोर नेत्यांसमोर नतमस्तक असणारा) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by भास्कर केन्डे

धम्मकलाडू 21/12/2008 - 04:40
जसे राणा संगा, शिवराय, विवेकानंद, सावरकर, टिळक, बोस, भगतसिंग म्हटले की आदराने शीर झुकते तसेच गांधीसमोरही झुकते.
सहज आता जुने प्रतिसाद चाळायला हवे. नव्या प्रतिसादांवर लक्ष ठेवायला हवे. (मसण्याऊद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by भास्कर केन्डे

आजानुकर्ण 21/12/2008 - 23:27
राष्ट्रपिता या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे. "राष्ट्रपिता महात्मा गांधी" या पूर्ण वाक्प्रयोगाचा अर्थ राष्ट्र पित असताना(ही) गांधी महात्मा होते असा आहे. किंबहुना अशोक नायगावकरांनी देशाचे भारत हे नाव बदलून बारत करावे असे म्हटलेच आहे. आपला (प्रोप्रायटर) आजानुकर्ण झमझम बार

झकासराव 19/12/2008 - 10:08
काकोरी पर्वातील हुतात्म्याना सलाम. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

राघव 19/12/2008 - 10:47
काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन! माझेही या सगळ्यांना विनम्र अभिवादन. मुमुक्षु आपल्या क्रांतीकार्याला लागलेली फितुरीची कीड शेवटपर्यंत सुटली नाही. इतके मोठे लोक नाहक अशा हरामखोर लोकांमुळे मारल्या गेलेत. बहुतांश सगळे असेच फासावर गेलेत. कितीतरी मोठी कामे त्यांच्याकडून आणिक झाली असती. फार वाईट वाटते असे आठवले की. या फितुर लोकांना काहीच वाटत नसेल का हो? थोडाही पश्चात्ताप होत नसेल? १८५७ च्या लढ्यातही हेच झालेले दिसते. रायगडावरचे सूर्याजी पिसाळ सर्वत्र पसरले असे वाटायला लागते.

In reply to by राघव

धमाल मुलगा 19/12/2008 - 14:20
काकोरीपर्वातील ह्या हुतात्मांना विनम्र अभिवादन! बाकी, मुमुक्षु ह्यांच्याशी पुर्णतः सहमत! शाप आहे हो हा आपल्या भारतमातेला.... फितुरीशिवाय कोणतंही काम जमतच नाही आपल्याकडे! चालायचंच.

मस्तच, अगदी मनातील भावना उतरवल्या आहेत. असेच लिहीत रहा. अशीच तुमची प्रतिभा आम्हाला बघायला मिळुद्यात. फुले शु ---- सखाराम गटणे

सर्वसाक्षीजी, विस्मृतीत जाणार्‍या क्रांतिकार्याबद्दल सातत्याने लेख लिहित आहात त्या बद्दल तुमचे खूपच कौतुक करावेसे वाटते. असेच लिहित राहा. खरं म्हणजे हे सगळं आम्ही सगळेच शाळेत शिकलोय पण तेव्हा हे सगळं ४-५ मार्कांशी निगडीत होतं आणि नंतर बराच काळ गेला आहे मधे. या निमित्ताने ही नावे आणि घटना परत जाग्या होत आहेत. वर, बरेच आक्षेप वगैरे आले आहेत. मला वाटते की अश्या घटनांबद्दल लिहिताना थोडे नाट्यमय लिहावेच लागते. अर्थात् ते एकांगी होता कामा नये हे पण खरेच. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

धम्मकलाडू 21/12/2008 - 23:10
खरं म्हणजे हे सगळं आम्ही सगळेच शाळेत शिकलोय पण तेव्हा हे सगळं ४-५ मार्कांशी निगडीत होतं आणि नंतर बराच काळ गेला आहे मधे.
मनातले बोललात! (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कलंत्री 19/12/2008 - 19:15
सर्वासाक्षीजी, आपले लेख कालोचित असतातच पण नकळतच आपण रसभंग करुन टाकतात. उदा.
हे चारही हुतात्मे अनेक क्रांतिकारकांप्रमाणेच असहकार आंदोलनात सर्वस्व त्यागुन झोकुन दिलेले. मात्र ’एक वर्षात स्वातंत्र्य देतो, मला सहकार्य द्या’अ से सांगत अनेक तरुणांना सरकारी शाळा सोडुन आंदोलनात भाग घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या गांधींनी अचानक आंदोलन मागे घेतले अणि हे सर्वजण आंदोलने व निषेधघोष यांचे मिथ्यापण लक्षात येऊन अखेर ’रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले या?’
अहिंसेने स्वातंत्र्य मिळणार नाही हे माहित असूनही अथवा १ वर्षात स्वातंत्र्य मिळनार नाही हे मान्य करुनही १९२७ नंतर जवळजवळ २० वर्ष थांबावे लागलेच. सशस्त्र लड्याची प्रेरणा म्हणून गांधीच्या आंदोलन मागे घेण्याच्या घोषणेला का दिले जाऊ नये? असो. स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या सर्वच लोकांबद्दल आदर आणि अभिमानच असायला हवा. संदर्भ ग्रंथाची यादी / नावे दिली तर सामान्य लोकांना त्यात अजूनही भर टाकता येईल. शेवटी किती दिवस आपण एकहाती हे काम करणार आहात? कोणालातरी यात पारंगत करा तर.

In reply to by कलंत्री

सर्वसाक्षी 19/12/2008 - 23:38
द्वारकानाथजी, कुणाला पारंगत करणारा मी कोण? मला स्वतःला असे काय मोठे ज्ञान आहे तर मी काय कुणाला पारंगत करणार. ज्याच्याकडे एखादी गोष्ट करण्याची ईच्छा असेल तो स्वत: त्या विषयावरील माहिती शोधुन काढतो. आपण स्वतः व्यासंगी आहात, आपल्याला ईच्छा असेल तर क्रांतिकारकांवरील भरपूर माहिती आपल्याला वा ज्या कुणाला हवी असेल त्याला पुस्तके व जाल या स्वरुपात सहज मिळवता येइल. बाकी माझे काम एकहाती नाही. अनेकांचे हात माझ्या मस्तकावर व पाठीवर आहेत. आणि मी जिवंत असे पर्यंत ज्यांनी या देशासाठी काही केले आहे आणि जे आजपर्यंत अप्रसिद्ध ठेवले गेले आहेत, उपेक्षिले गेले आहेत त्यांची माहिती जिथे व जशी देता येईल तिथे व तशी मी देतच राहीन. ते महान हुतात्मे काल दिव्य करुन गेले म्हणुन आपण आज आहोत या कृतज्ञतेने त्यांचे ऋण अत्यल्प का होईना पण फेडण्याचा एक प्रामणिक प्रयत्न मी सातत्याने करीत राहीन. कुणी टर उडवली वा धिक्कार केला तरी मला फरक पडत नाही.

In reply to by सर्वसाक्षी

कुणी टर उडवली वा धिक्कार केला तरी मला फरक पडत नाही. केलेल्या संकल्पांना तडीस नेण्याचा बाणा फार कमी लोकांत असतो. तो तुमच्यात दिसत आहे हे पाहून आनंद झाला. आपल्या सारख्यांच्या कष्टाने आम्हा पामरांना आपल्या दैदिप्यमान इतिहासाच्या उपेक्षित पानांची ओळख होत आहे हे आमचे भाग्य. आपला, (कृतज्ञ) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by सर्वसाक्षी

कलंत्री 20/12/2008 - 12:31
प्रिय सर्वसाक्षीजी, आपला प्रतिसाद आवडला. खरेतर आपणाकडुन एक भारतीय म्हणून माझी बरीच अपेक्षा आहे. क्रांतिकारकाचे समग्र वाड्मय प्रसिद्ध व्हावे आणि दुसरे म्हणजे त्यांच्या विचारधारेची ओळख जगाला व्हावी. दुर्दैवाने हे मात्र घडत नाही. आपण हे करण्यासाठी पूर्ण सक्षम आहात. आपण नकळतच गांधीमधे अडकत जातात आणि अकारणच धुरळा उडत जातो. खरेतर हे दैवी असे कार्य आहे आणि माझ्याकडुन तन-मन-धनाने मदत करण्याचे मी आश्वासन देतो. आम्ही तुमच्याकडुन स्नेहाची अपेक्षा करतो आणि आपल्या कार्याचेही महत्व जाणतो. २००९ मध्ये याबाबतीत आपल्याकडुन भरीव असे कार्य व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपला, द्वारकानाथ कलंत्री

शशिधर केळकर 20/12/2008 - 01:55
सर्वार्थाने समयोचित असा हा लेख आला आहे. आत्ता काल परवाच अतिरेक्यांचे थैमान होऊन गेले आहे. तरीही आपण गांधीवादच कुरवाळत बसलो आहोत. या समयी असे काहीतरी जाज्वल्य, स्वाभिमान जागवेल असे, मरगळ झटकणारे विचार प्रेरणादायी नक्कीच आहेत. आम्ही स्वतः क्रांतिकारी विचार करू शकत नाही, कृती उक्ती हे आपल्या आवाक्या बाहेरचे आहे. निदान अगदी नजिकच्या ऐतिहासिक कालखंडाचा थोडा उहापोह करूनही खूप परिणाम साधेल, साधला आहे. शूराला शूराचे मरण प्रिय असते म्हणतात. शूराला शूराकडून कौतुक झाले तर सर्वाधिक समाधान होते. सर्वसाक्षी, तुम्ही लिहिल्यामुळे, त्या हुतात्म्याना ही समाधान होईल, की आपली चेतना आजही जागृत आहे. तुम्हाला, तुमच्या अंतःप्रेरणेला, आणि ती शक्य तितक्या लोकात जागवण्याच्या तुमच्या उद्योगाला शुभेछा! एक मनस्वी.

भिंगरि 20/12/2008 - 02:35
भारतमातेच्या ह्या चार सुपुत्रांना विनम्र श्रध्दांजलि. सर्वसाक्षि, तुमचा हा उपक्रम चालु ठेवा आम्हाला सगळ्यांना त्याचि गरज आहे, हि नम्र विनंति.

पक्या 20/12/2008 - 06:52
सर्वसाक्षीजी, आपल्या इतर क्रांतिकार्यावरील लेखाप्रमाणेच हा ही सुंदर लेख. धन्यवाद. काकोरी क्रांतिकार्यात सहभागी झालेल्या सर्व सुपूत्रांना त्रिवार अभिवादन. स्वातंत्र्यपूर्व काळातील अशा सर्व क्रांतिकारकांचे कार्य सध्याच्या काळात स्फूर्तिदायक ठरो. शब्दांचा किस पाडणारे कितीही किस पाडोत त्याने क्रांतिकारकांच्या कार्याला यत्किंचितही कमीपणा येत नाही. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करून हसतमुखाने फासावर जाणे ही काही सोपी गोष्ट नव्हे.

धम्मकलाडू 20/12/2008 - 23:04
मला हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटना या संघटनेच्या विचारसरणीबद्दल आणखी जाणून घ्यायचे आहे. प्रश्न: हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटना ही हिंदुत्ववादी किंवा सावरकरवादी किंवा संघिष्ट संघटना होती काय? (त्यांची विचारसरणी थोडक्यात सांगावी. डावी की उजवी?) ते प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे गांधींना व मुसुलमानांना हेटाळत असत काय? ते ज्यूंची संख्या रॅशनलाइझ करणार्‍या हिटलरची तारीफ करीत असत काय? अशी हेटाळणी केल्यावर त्यांना त्यांच्या ऑडियन्सकडून टाळ्या आणि शिट्या मिळायच्या का? तूर्तास एवढेच! (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

सर्वसाक्षी 21/12/2008 - 00:21
हिचे रुपांतर पुढे हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेनेत झाले; ही लढाऊ बाजु तर जनसंपर्क व प्रसारासाठी हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक संघटना ही नागरी बाजु. ते कुणालाच हेटाळत नसत. हुतात्मा अशफाकऊल्लांवरुन दिसलेच आहे की मुस्लिमविरोधी नव्हते. गांधी मात्र यांचा द्वेश व निर्भत्सना करीत असत. यांचा कार्यकाल १९२३ ते १९३२ हाच प्रामुख्याने. या काळात हिटलरचा उदय झाला नव्हता. हिटलर जर्मनीचा राष्ट्रप्रपुख झाला १९३३ साली ही संघटना प्रखर राष्ट्रभक्तांची होती. ऑडियन्स जमा करुन टाळ्या शिट्ट्या मिळवणे हे त्यांचे ध्येय नव्हते आणि त्यांना त्यासाठी वेळही नव्हता. आयुष्य असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास अससलेल्या क्रांतिकारकांच्या डोक्यावर सतत मृत्युची तलवार सरकारच्या रुपाने टांगलेली होती त्यांना सभा - अधिवेशने भरवायला स्वास्थ्य आणि वेळ दोन्ही नव्हते. विशीत वा फरतर तिशीत ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्यांना कुणाचा द्वेष करायला वेळ नव्हता आणि इच्छाही नव्हती. त्यांनी फक्त मातृभूमिवर अपार प्रेम केले. धन्यवाद

In reply to by सर्वसाक्षी

विसोबा खेचर 21/12/2008 - 00:39
ही संघटना प्रखर राष्ट्रभक्तांची होती. ऑडियन्स जमा करुन टाळ्या शिट्ट्या मिळवणे हे त्यांचे ध्येय नव्हते आणि त्यांना त्यासाठी वेळही नव्हता. अरे पण साक्षी, तु का अश्या फालतू अन् हेटाळणीपूर्वक प्रश्नांची उत्तरे देत बसल आहेस?

In reply to by सर्वसाक्षी

बगाराम 21/12/2008 - 01:00
गांधींना चार टपल्या मारल्या खेरीज आपल्याला क्रांतीकारकांचे गोडवे गाता येणे अशक्य आहे का? दुसर्‍याला कमी लेखुन मगच एकाचे मोठेपणा सिद्ध करता यावा इतके हलके आपले क्रांतीकारक नव्हते. तुमच्या सारख्या आंधळ्या भक्ती करणार्‍या लोकांमुळे असा मेसेज दिला जातो. स्वातंत्र मिळवुन देण्यार्‍या सर्वांचेच आपण ॠणी राहिले पाहिजे. गांधी मात्र यांचा द्वेश व निर्भत्सना करीत असत. गांधी द्वेष करायचे?? एखाद्या व्यक्तिचे विचार पटले नाहीत म्हणून काहीही??? वर तुमच्या ह्या बालकथा शोभणार्‍या लिखाणाना कसलेही संदर्भ तुम्हाला द्यायचे नाहीत, ते मागीतले तर हे लिखाण खुशाल खोटे आहे समजावे अशी मल्लीनाथी तुम्हीच करता. मग तुम्ह्याल विनाकारण एका महापुरुषावर असे गरळ ओकायचा काय हक्क आहे

In reply to by बगाराम

सर्वसाक्षी 22/12/2008 - 23:05
जी आपण करीत आहात. गांधीप्रेमास्तव लिहिलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त जरा मनाच्या खिड्क्या उघडुन इतर चार पुस्तके वाचा. गांधींनी क्रांतिकारकांचा सातत्याने द्वेष केला हे सत्य आहे जे तुम्ही केवळ स्विकारु शकत नाही . क्रांतिवाद आणि गांधीवाद याच हाच तर फरक आहे. जे जे देशासाठी हौतात्म्य पावले ते सर्व आम्हाला वंद्य त्यांनी महनिय, वंदनिय अशी असामान्य दिव्ये केली म्हणुन ते वंद्य. तुम्हाला गांधी प्रिय म्हणुन त्यांनी केले तेच बरोबर बाकी सगळे चूक हा तुमचा खाक्या. इथे जेव्हा एखादा विशिष्ठ प्रश्न विचारला गेला तेव्हाच गांधींचा उल्लेख केला गेला. मात्र गांधींना चार टपल्या मारल्या खेरीज आपल्याला क्रांतीकारकांचे गोडवे गाता येणे अशक्य आहे का?> असे लिहुन तुम्ही तुमचा सत्यावर व सहिष्णुतेवर कितपत विश्वास आहे ते दाखवुन दिलेत. क्रांतिकारकांचे मोठेपण हे वादातित आहे त्याला कसल्या तुलनेची गरज नाही. गांधी हे क्रांतिकारकांचा मनापासून तिरस्कार करीत होते हे सत्य आहे आणि ते सांगितले तर गांधीभक्तांना झोंबते हेही सत्य आहे.

In reply to by सर्वसाक्षी

बगाराम 23/12/2008 - 06:53
इथे होणार्‍या टिकेमुळे संतापुन जाऊन तुमचा तोल ढळायला लागला आहे. इथे कुणीतरी क्रांतीकारकांना चोर दरोडेखोर म्हंटले आहे का? जी काही टीका आहे ती तुमच्या लेखाविषयी काढलेल्या शंका आहेत. क्रांतीकारकांच्या देशभक्तिविषयी इथे कुणाचेच दुमत नाही. इथे जेव्हा एखादा विशिष्ठ प्रश्न विचारला गेला तेव्हाच गांधींचा उल्लेख केला गेला. कशाला ताकाला जाउन भांडे लपवताय? तुमचा गांधींवरचा आकस सुर्यप्रकाशा इतका स्वच्छ आहे, कुणीही प्रश्न विचारायच्याआधी तो तुमच्या प्रत्येक लेखात डोकावत असतो. आणि डोळ्यावरची झापडे बाजुला केलीत तर असे म्हणणारा मी एकटा नाही हे लक्षात यायला वेळ लागणार नाही.

In reply to by सर्वसाक्षी

प्रियाली 24/12/2008 - 16:22
गांधीप्रेमास्तव लिहिलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त जरा मनाच्या खिड्क्या उघडुन इतर चार पुस्तके वाचा. गांधींनी क्रांतिकारकांचा सातत्याने द्वेष केला हे सत्य आहे जे तुम्ही केवळ स्विकारु शकत नाही .
हा चुकीचा सल्ला तर नव्हे. लोक आपल्याला सातत्याने त्या चार पुस्तकांची नावे द्या असेच सांगत असतात आणि आपण काही पोरकट कारणे काढून ती देण्याचे नाकारता. याचे मुख्य कारण इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांबाहेरचा इतिहास माहित नसलेले लोक डोळ्यांत पाणी आणून नतमस्तक होणार नाहीत हे असावे. चार पुस्तके लोकांनी वाचली तर गोष्टीतील सत्यासत्यता त्यांच्या लक्षात यावी तेव्हा असे सल्ले देण्यापूर्वी कृपया, विचार करावा. आता मूळ लेखाविषयी - काकोरी खटल्याबद्दल नेटावर मला जी जी माहिती मिळाली त्यात एक समान सूत्र सापडते. ते असे की काकोरी खटला सुमारे दिड वर्षे चालला आणि काँग्रेसी नेत्यांनी हा खटला क्रांतिकारकांतर्फे लढवला. त्या माहितीपैकी मला सर्वात विश्वासार्ह वाटलेल्या राष्ट्रपतींच्या भाषणातील काही मुद्दे बघा - The Kakori case trial brought the entire nation together to defend Ashfaqulla and his revolutionary companions. A Defence Committee was formed consisting of eminent Congress leaders like Pandit Motilal Nehru, Ganesh Shankar Vidyarthi, Govind Ballabh Pant and Mohanlal Saxena. Lala Lajpat Rai came to the forefront in expressing his sympathy with the revolutionaries. Many important Congress leaders such as Jawaharlal Nehru and Acharya Narendra Dev remained in touch with the revolutionaries in jail. संदर्भः http://pib.myiris.com/speech/article.php3?fl=010526181829 विकिवरील संदर्भः http://en.wikipedia.org/wiki/Kakori_train_robbery#Trial_and_Reaction इतर: http://www.liveindia.com/freedomfighters/kakori.html आपल्या लेखात हा महत्त्वाचा संदर्भ का गाळला गेला ते जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by सर्वसाक्षी

एकलव्य 21/12/2008 - 01:52
धम्मकलाडूंच्या -- कदाचित अतिअल्लड किंवा मुद्दामहून हलकट -- प्रश्नांना सर्वसाक्षींनी सभ्यपणे दिलेल्या उत्तरांमध्ये भर घालतो आहे. एचआरएने भारतातील डाव्या विचारसरणीला चांगलाच आधार दिलेला आहे. भगतसिंग आणि मित्रमंडळी हे भारतातील आद्य "साथी" आहेत असाही दावा केला जातो. असो... इच्छुकांनी भगतसिंगांचे लिखाण मुळातून वाचावे. दाखला म्हणून एक नमुना येथे देत आहे. असेंब्लिमध्ये स्वतःला अटक करवून घेणार्‍या शहिदांनी उधळलेले खालील पत्रक इच्छुकांनी थोडा वेळ काढून वाचावे. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी म्हणजे काय संघटना होती याचा थोडा अंदाज येईल. ही तरुण मंडळी म्हणजे नुसते दरोडे/ खून करणारी भडक डोक्याचे तरुण हा प्रपोगंडा दूर होण्यास थोडी मदत होईल. तालिबान, दरोडेखोर आणि एचआरए यांतील तुलनेतील फोलपणा लक्षात येईल. Leaflet thrown in the Central Assembly Hall, New Delhi at the time of the throwing voice bombs. On the 8th April, 1929, the Viceroy's proclamation, enacting the two Bills, was to be made, despite the fact that the majority of members were opposed to it, and had rather rejected in earlier. THE HINDUSTAN SOCIALIST REPUBLICAN ARMY (NOTICE) "It takes a loud voice to make the deaf hear, with these immortal words uttered on a similar occasion by Valiant, a French anarchist martyr, do we strongly justify this action of ours." "Without repeating the humiliating history of the past ten years of the working of the reforms (Montague-Chelmsford Reforms) and without mentioning the insults hurled at the Indian nation through this House-the so-called Indian Parliament-we want to point out that, while the people expecting some more crumbs of reforms from the Simon Commission, and are ever quarrelling over the distribution of the expected bones, the Government is thrusting upon us new repressive measures like the Public Safety and the Trade Disputes Bill, while reserving the Press Sedition Bill for the next session. The indiscriminate arrests of labour leaders working in the open field clearly indicate whither the wind blows." "In these extremely provocative circumstances, the Hindustan Socialist Republican Association, in all seriousness, realizing their full responsibility, had decided and ordered its army to do this particular action, so that a stop be put to this humiliating farce and to let the alien bureaucratic exploiters do what they wish, but they must be made to come before the public eve in their naked form." "Let the representatives of the people return to their constituencies and prepare the masses for the coming revolution, and let the Government know that while protesting against the Public Safety and Trade Disputes Bills and the callous murder of Lala Lajpat Rai, on behalf of the helpless Indian masses, we want to emphasize the lesson often repeated by history, that it is easy to kill individuals but you connot kill the ideas Great empires crumbled while the ideas survived. Bourbons and Czars fell. While the revaluation marched ahead triumphantly." "We are sorry to admit that we who attach so great a sanctity to human life, who dream of a glorious future, when man will be enjoying perfect peace and full liberty, have been forced to shed human blood. But the sacrifice of individuals at the altar of the 'Great Revolution' that will bring freedom to all, rendering the exploitation of man by man impossible, is inevitable." "Long Live the Revolution."15 Sd/- Balraj16 Commander-in-Chief - एकलव्य

In reply to by एकलव्य

टग्या 21/12/2008 - 18:38
पत्रक वाचले. त्यात गांधीजींना शिव्या घालणारा, गांधीजींच्या नावाने खडे फोडणारा किंवा गांधीजींची हेटाळणी करणारा एक शब्दही नाही. (खुद्द भगतसिंहांनी सुद्धा आपल्या उभ्या आयुष्यात असे काही केल्याचे ऐकिवात नाही.) भगतसिंहांचे नाव पुढेपुढे करण्यात आपले मोठेपण मानणारे भगतसिंहांचा हा आदर्श का पाळू शकत नाहीत हे एक कोडेच आहे.
मुद्दामहून हलकट
हम्म्म्म्... भगतसिंहांच्या शब्दकोशात हे शब्द नसावेतच किंवा भगतसिंहांना हे शब्द ऐकून माहीत नसावेतच असे म्हणता येणार नाही, परंतु आपल्या विरोधकांबद्दल निदान जाहीररीत्या तरी बोलताना त्यांनी या प्रकारचे शब्द वापरल्याचे ऐकिवात नाही. कदाचित त्यांचे कार्य मोठे असावे आणि त्यांना आपले मोठेपण सिद्ध करत बसण्याची (आणि त्यासाठी दुसर्‍याला हलकट वगैरे म्हणण्याची) गरज नसावी. "मरणारे मरून गेले, आता फक्त (त्यांच्या नावावर) नस्ती ट्यँव ट्यँव करणारे उरले आहेत" हेच खरे वाटू लागले आहे. ("मग ते कोणासाठी मेले" या प्रश्नाचे उत्तर "त्यांचे नाव पुढे करण्यात स्वतःचा मोठेपणा मानणार्‍यांच्या सोयीसाठी" असे असावे की काय ते कळत नाही. आपल्या पश्चात आपल्या स्मृतीचा असा उपयोग होईल हे जर त्या थोर हुतात्म्यांना आधी कळते, तर "त्यापेक्षा आपले बलिदान विस्मृतीत गेलेले बरे" असे त्यांना निश्चित वाटते! असा दुरुपयोग होणार असेल तर आपले बलिदान खरोखरच "वर्थ" आहे काय / "व्यर्थ" तर नाही ना, याचा फेरविचार त्यांनी निश्चितच केला असता, असे वाटते*. [गांधीजींचेही तेच झाले म्हणा! त्यांच्या पश्चात भलत्यांनी त्यांच्या नावावर आपली पोळी भाजून घेतली.]) *पण नसता केला. कारण क्रांतिकारक काय किंवा गांधीजी काय, आपापल्या तत्त्वांसाठी लढत होते. आपल्या पश्चात आपल्या नावाचा / स्मृतीचा भलतेच दुरुपयोग करतील याची त्यांना पर्वा नसावी.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

एकलव्य 21/12/2008 - 20:34
मुद्दामहून हलकट टग्यादादा - धम्मकलाडूंचे प्रश्न मुद्दामहून हलकट याच प्रकारात येतात. त्याला दुसरे काय संबोधन देणार ते सांगावे. (हे प्रामाणिकपणे विचारतो आहे. मनात आकस न ठेवता विश्वास ठेवावा.) माझ्या प्रतिसादावर धम्मकलाडूंनी स्वतःच दिलेले उत्तरानुसार -- जे संपादित झालेले दिसते आहे -- त्यांचा हलकटपणा मुद्दाम नव्हता तर नैसर्गिक होता वगैरे वगैरे. एचआरए बद्दल आणखी थोडी गरळ होतीच. असो...आपण कोणाची भलामण करतो आहोत की कोणाच्या हाती खेळविलो जात आहोत याचा सूज्ञांनी क्षणभर विचार करावा.

In reply to by एकलव्य

धम्मकलाडू 21/12/2008 - 23:06
माझ्या प्रतिसादावर धम्मकलाडूंनी स्वतःच दिलेले उत्तरानुसार -- जे संपादित झालेले दिसते आहे -- त्यांचा हलकटपणा मुद्दाम नव्हता तर नैसर्गिक होता वगैरे वगैरे.
धन्यवाद.
एचआरए बद्दल आणखी थोडी गरळ होतीच.
तुम्ही चर्चेला पुन्हा एक विनोदी वळण देत आहात! (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by एकलव्य

प्रियाली 21/12/2008 - 18:53
धम्मकलाडूंच्या -- कदाचित अतिअल्लड किंवा मुद्दामहून हलकट -- प्रश्नांना सर्वसाक्षींनी सभ्यपणे दिलेल्या उत्तरांमध्ये भर घालतो आहे.
इति एकलव्य
गांधी मात्र यांचा द्वेश व निर्भत्सना करीत असत.
इति सर्वसाक्षी. एकलव्य, क्रांतिकारकांचा विषय निघाला सर्वसाक्षींकडून तारतम्याची अपेक्षा करणे कधीच सोडून दिले आहे. कृपया, आपण आपल्या प्रतिसादांतून नाही नाही त्या खोटारडेपणावर पांघरूण घालू नये ही विनंती. दुर्दैवाने, असे म्हणावेसे वाटते की गांधीजींबद्दल काहीही वाह्यात लिहिले तर ते मिपावर सहज खपून जाते. गांधीद्वेषाचे मुखत्यारपत्र म्हणून मिसळपावाला प्रसिद्ध व्हायचे असल्यास माझे काहीच म्हणणे नाही. (मी कोण काय म्हणणार?) पण आपल्यासारखे डोळस लोक याला बळी पडतात ते पाहून खेद झाला.

In reply to by प्रियाली

एकलव्य 21/12/2008 - 20:37
पांघरूण घालण्याचा माझा बिलकुल मानस नाही. मी सर्वसाक्षी नाही आणि धम्मकलाडूही नाही.

In reply to by प्रियाली

मृण्मयी 22/12/2008 - 07:29
>>>>दुर्दैवाने, असे म्हणावेसे वाटते की गांधीजींबद्दल काहीही वाह्यात लिहिले तर ते मिपावर सहज खपून जाते. सहमत.

In reply to by प्रियाली

धम्मकलाडू 22/12/2008 - 17:42
दुर्दैवाने, असे म्हणावेसे वाटते की गांधीजींबद्दल काहीही वाह्यात लिहिले तर ते मिपावर सहज खपून जाते. गांधीद्वेषाचे मुखत्यारपत्र म्हणून मिसळपावाला प्रसिद्ध व्हायचे असल्यास माझे काहीच म्हणणे नाही.
खरेच. सैंया भये कोतवाल तो डर काहे का? (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by प्रियाली

सर्वसाक्षी 22/12/2008 - 23:15
दुर्दैवाने, असे म्हणावेसे वाटते की गांधीजींबद्दल काहीही वाह्यात लिहिले तर ते मिपावर सहज खपून जाते. गांधीद्वेषाचे मुखत्यारपत्र म्हणून मिसळपावाला प्रसिद्ध व्हायचे असल्यास माझे काहीच म्हणणे नाही. > इथे नकी वाह्यात काय लिहिले गेले आहे? निदान माझ्या लेखात तरी असे काही नाही. मात्र हे सांगताना क्रांतिकारकांना तालिबानी अतिरेकी म्हणणे वा दरोडेखोर म्हणणे कुठल्या संकेतस्थळाची शोभा वाढवते का तेही सांगा. इथे गांधींनी क्रांतिकारकांचा द्वेष केला असे लिहिलेले आहे आणि यात गांधीद्वेष कुठे आला? अगदी हुतात्मा मदनलाल धिंग्रांपासुन ते नेताजींपर्यंत प्रत्येकाचा तिरस्कार गांधींनी केली हे सत्य आहे. ज्यांना बहुमताने निवड्ले आहे त्या नेताजींना गांधींनी आपल्या अहंकारापायी हाकललेच ना? तुम्हाला प्रिय म्हणुन गांधींचे सर्वांनी असलेले आणि नसलेले गोडवे गावेत आणि तसे न केल्यास अशा धमक्या देणे बरे नाही.

In reply to by सर्वसाक्षी

प्रियाली 22/12/2008 - 23:31
तुम्हाला प्रिय म्हणुन गांधींचे सर्वांनी असलेले आणि नसलेले गोडवे गावेत आणि तसे न केल्यास अशा धमक्या देणे बरे नाही.
मला गांधीही प्रिय आहेत आणि क्रांतिकारीही. त्यापैकी कोणासाठीही द्वेषबुद्धी मी पाळलेली नाही. द्वेषबुद्धीने प्रश्न उपस्थित केलेले नाहीत, लेख लिहिलेले नाहीत आणि प्रतिसादही लिहिलेले नाहीत. मात्र आपल्याबद्दल असेच म्हणावेसे मला वाटत नाही. राहीली गोष्ट धमकीची तर मी वरचेच वाक्य पुन्हा लिहिते - क्रांतिकारकांचा विषय निघाला की सर्वसाक्षींकडून तारतम्याची अपेक्षा करणे मी सोडून दिले आहे.
लेखनप्रकार
दिनांक ९ ऑगस्ट १९२५ रोजी ’८ डाऊन’ गाडीवर लखनौ पासोन सुमारे चौदा मैल अंतरावर काकोरी ते आलमनगर दरम्यान सायंकाळी साडेसातच्या सुमारास हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटनेच्या १० धाडसी शिलेदारांनी दरोडा घालुन सरकारी तिजोरी लुटली आणि साम्राज्य हादरले. हा घाला गाडीतुन वाहुन नेल्या जाणाऱ्या तिजोरीवर नव्हता तर ब्रिटीश साम्राज्यावर होता. या धाडसी क्रांतीकारकांनी जणु सरकारी खजिना लुटुन सरकारला आव्हान दिले होते. हा दरोडा अत्यंत विचार्पूर्वक ठरविलेला व सुनियोजित होता. एकदा हुतात्मा पंडीत रामप्रसाद बिस्मिल शाहजहानपूरहुन लखनौला जात असताना वाटेत त्यांनी या गाडीत सरकारी खजीना चढवताना पाहिला.

गांधीवाद आणि मराठी साहित्य !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

विसोबा खेचर 18/12/2008 - 08:39
सर, गांधीवादात भर घालणार्‍या साहित्यिकात आपण कलंत्रीसाहेबांचं नांव घ्यायचं विसरलेला दिसताहात! असो... तूर्तास, पिसाळलेला कुत्रा कुणाला चावू नये म्हणून त्याला अहिंसावाद कसा शिकवावा यावर विचार करतो आहे! आपला, तात्या गोडसे.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 18/12/2008 - 09:00
अरे हो की! आणि आपल्या पैकी बर्‍याच जणांचे दैवत असणार्‍या भाईकाकांचे गांधीजींविषयी विचार? ते देखिल राहिलेच की. बाकी लेख मात्र प्राध्यापकी थाटात विद्वत्तापुर्ण उतरला आहे. असो.. पिसाळलेल्या कुत्र्यावर गांधीवादाने काही उपाय होइल असे वाटत नाही, त्याला आता अर्धी चड्डी घालुन संचलनाला नेतो आणि बौद्धीकाला बसवतो. चावायचा थांबतो का ते बघुया. आपला, कोलबेर गुरुजी

In reply to by कोलबेर

धम्मकलाडू 18/12/2008 - 10:23
अरे हो की! आणि आपल्या पैकी बर्‍याच जणांचे दैवत असणार्‍या भाईकाकांचे गांधीजींविषयी विचार? ते देखिल राहिलेच की..
खरेच की. गांधीजींविषयीचे भाईकाकांचे विचार तात्याकडून ऐकायला आवडतील.
बाकी लेख मात्र प्राध्यापकी थाटात विद्वत्तापुर्ण उतरला आहे.
हं. लेखातून प्राध्यापकांचे शुद्धलेखनविषक विचार मात्र अगदी स्पष्ट झाले आहेत.
पिसाळलेल्या कुत्र्यावर गांधीवादाने काही उपाय होइल असे वाटत नाही, त्याला आता अर्धी चड्डी घालुन संचलनाला नेतो आणि बौद्धीकाला बसवतो. चावायचा थांबतो का ते बघुया.
चांगला उपाय आहे. करून बघायला हवा. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विकास 18/12/2008 - 09:02
विषय शिर्षक वाचून मला एकदम का कोणास ठाऊक पण "जितना ही जाऊ मै दूर तुझसे, उतनी ही तू पास आए" या अचानक ओळी आठवल्या :-) बाकी माहीतीपूर्ण लेख. यातील काही मला अनोळखी साहीत्य होते त्या मुळे माहीतीबद्दल धन्यवाद. यातील नायक विनायकराव गांधी यांच्या प्रभावाखाली असून ते गांधी यांच्या चळवळीत भाग घेतात, तुरुंगात जातात. तरीही ते पूर्ण गांधीवादी नाहीत. कसे असणार पूर्ण गांधीवादी? नाव "विनायक" आडनाव "गांधी" :-) गांधीवादी लोक कसे दुराग्रही असतात हेही त्यांनी दाखवून दिले आहे. दुराग्रहाची मक्तेदारी काही केवळ गांधीवादींकडेच असते असे मानू नका! जसे एकट्या गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले नाही तसेच एकट्या गांधीवादाने दुराग्रही होता येते असे नाही. "ऑल रोड्स लीड टू रोम" - अर्थात जेंव्हा स्वतःचा अभ्यास, चिंतन, मनन,स्वाध्याय आणि सिंहावलोकन थांबून केवळ कुठल्यातरी विचाराने भारावण्यापेक्षा भारून जाणे होते तेंव्हा दुराग्रहीपणा आपसूक येतो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स. खांडेकर यांच्या 'कांचनमृग' पासून ते 'ययाती' पर्यंत गांधीवादाचा प्रभाव जाणवतो म्हणतात. खांडेकरांनी "सोनेरी स्वप्ने भंगलेली" म्हणून (मला तरी वाटते) एक डिप्रेसिंग कादंबरी लिहीली होती ज्यात गांधीवाद्याची स्वप्ने सत्ताधार्‍यांनी गांधींचे नाव घेत कशी उध्वस्त केली हे स्वातंत्र्यसैनिकाच्या संदर्भातील कथानक होते. बाकी आपण बरेच सांगितले तरी एक नाव राहीले असे वाटले ज्यांनी गांधीवादी साहीत्य लिहीले असावे (कथाकादंबर्‍यांच्या रुपात नाही) ते म्हणजे विनोबा भावे. तसेच गांधींवर लिहीणार्‍यांसंदर्भात पण अजून लिहीता येईल. मधे गांधीवादी असलेल्या अंबरीश मिश्रा यांचे "गंगे मध्ये गगन वितळले" का असेच काही शिर्षक असलेले माहीतीपूर्ण पुस्तक वाचनात आले होते. त्यात म्हणल्याप्रमाणे गांधींकडे सुरवातीस काँग्रेसने दुर्लक्ष केले तेंव्हा गांधीजींनी स्वतःची चळवळ चालू केली. त्याला मिळणारी प्रसिद्धी पाहून आपोआप काँग्रेस मागे आली... असो, लेख आवडला.

नंदन 18/12/2008 - 09:27
लेख, मराठी साहित्यातील गांधीवादाचा घेतलेला मागोवा आवडला. विकास म्हणतात तसे, या विषयावर सरांनी अधिक विस्ताराने लिहिल्यास वाचायला आवडेल. >>> आम्हालाही साहित्यातील गांधीविचारांनी शीळ घातली. - :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

सहज 18/12/2008 - 10:12
गांधीवाद व साहीत्य यावर अजुन लिहा. आम्हालाही साहित्यातील गांधीविचारांनी शीळ घातली. :-)

वेताळ 18/12/2008 - 10:02
गांधीवाद हा एका कालावधी मध्येच समाजात रुजला,वाढला व संपला. कारण तुम्ही वर दिलेच आहे. त्यांचा स्वप्नाळू ध्येयवाद वास्तवाचे रुप लपवितो. हे जसे सानेगुरुजीच्या बाबतीत सत्य होते तसे गांधीवादा बद्दलही म्हणता येईल. अजुन एक मला प्रश्न पडला आहे जर आत्महत्या हे पाप असेल तर गांधीवादा मध्ये आमरण उपोषन करणे ही देखिल एकप्रकारे आत्महत्याच नव्हे का?तसेच यंत्राचा वापर ह्या विषयी गांधीजीचे विचार आजच्या काळात मान्य होणे शक्य नाही. मराठीसाहित्यात गांधीजीचा प्रभाव तितकासा पडला नाही हे खरे आहे.पण मिपासाहित्यात गांधीजीचा खुपच प्रभाव पडला आहे , हे मान्य करावेच लागेल. वेताळ

लिखाळ 18/12/2008 - 16:47
सर, आढावा चांगला घेतला आहे.
यातील नायक विनायकराव गांधी यांच्या प्रभावाखाली असून ते गांधी यांच्या चळवळीत भाग घेतात, तुरुंगात जातात. तरीही ते पूर्ण गांधीवादी नाहीत.
हे वाक्य ''यातील नायक विनायकराव, गांधी यांच्या प्रभावाखाली असून ... '' असे वाचावे काय? 'भेटेन नऊ महिन्यांनी' ही कविता फाशी जाणारा क्रांतिकारक म्हणत आहे वाटते. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

हे वाक्य ''यातील नायक विनायकराव, गांधी यांच्या प्रभावाखाली असून ... '' असे वाचावे काय? हो, असेच वाचायला हवे. दुरुस्ती केली आहे. धन्यवाद !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कलंत्री 18/12/2008 - 20:29
प्रा. डॉ. बिरुटे साहेबांचे धन्यवाद कसे मानावे हे मला समजत नाही. मिपाच्या लोकांना आवडो अथवा न आवडो मी गांधीवादाचे डोस पाजले आहेच. त्याला चौकट देण्याचा सुजाण मान मात्र प्राध्यापक साहेबांना द्यायलाच हवा. १. गांधीवादी विचाराच्या प्रचाराबरोबर त्यांच्या विरोधकाचेही साहित्याचा अभ्यास व्हायला हवा. उदा. सावरकरांचे साहित्य, गोपाल गोडसे यांचे गांधीहत्या आणि मी इत्यादी पुस्तके. २. अनेक भाषेत पुस्तके मराठीत अनुवादीत होत असतात. प्यारेलाल यांचे गांधी एक महामानव हे पुस्तक प्रत्येकानेच वाचले पाहिजे. ३. गांधीवादी विचारावर अनेकांनी डॉक्टरेट केलेल्या आहेत. उदा. भटकळ यांनी गांधीचे समकालिन विरोधक यावर प्रबंध सादर केलेला आहे. ४. वर्तमानपत्रात, पुस्तकात प्रत्येक वर्षी गांधीवादाचा अन्वय नव्या पद्धतीने लावला जातो. एकंदरीतच गांधीविचारावरचे साहित्य हे अफाट या पद्धतीनेच वर्णन करावे लागेल.

In reply to by कलंत्री

लिखाळ 18/12/2008 - 20:41
दा न शिखरे यांनी लिहिलेले गांधीचरित्र कधी वाचायला घेतले होते. पण पूर्ण वाचून झाले नाही. आता संधी मिळाली तर पाहिन. -- लिखाळ.

In reply to by मुक्तसुनीत

लिखाळ 18/12/2008 - 20:49
अम्म ! माझ्या दा न शिखरे असे लक्षात आहे. ते गांधीम्चे जवळचे शिष्य होते (बहुधा). कुणी खुलासा केला तर बरे. -- लिखाळ.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत 18/12/2008 - 21:13
माझा दा. न. शिखरे आणि द. न. गोखले यांच्याबद्दल गोंधळ झाला होता. द. न. गोखले यांचेही गांधींवरचे पुस्तक आहे. ("शोध महामानवाचा"). झालेल्या गोंधळाबद्दल क्षमा.

विसोबा खेचर 18/12/2008 - 08:39
सर, गांधीवादात भर घालणार्‍या साहित्यिकात आपण कलंत्रीसाहेबांचं नांव घ्यायचं विसरलेला दिसताहात! असो... तूर्तास, पिसाळलेला कुत्रा कुणाला चावू नये म्हणून त्याला अहिंसावाद कसा शिकवावा यावर विचार करतो आहे! आपला, तात्या गोडसे.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 18/12/2008 - 09:00
अरे हो की! आणि आपल्या पैकी बर्‍याच जणांचे दैवत असणार्‍या भाईकाकांचे गांधीजींविषयी विचार? ते देखिल राहिलेच की. बाकी लेख मात्र प्राध्यापकी थाटात विद्वत्तापुर्ण उतरला आहे. असो.. पिसाळलेल्या कुत्र्यावर गांधीवादाने काही उपाय होइल असे वाटत नाही, त्याला आता अर्धी चड्डी घालुन संचलनाला नेतो आणि बौद्धीकाला बसवतो. चावायचा थांबतो का ते बघुया. आपला, कोलबेर गुरुजी

In reply to by कोलबेर

धम्मकलाडू 18/12/2008 - 10:23
अरे हो की! आणि आपल्या पैकी बर्‍याच जणांचे दैवत असणार्‍या भाईकाकांचे गांधीजींविषयी विचार? ते देखिल राहिलेच की..
खरेच की. गांधीजींविषयीचे भाईकाकांचे विचार तात्याकडून ऐकायला आवडतील.
बाकी लेख मात्र प्राध्यापकी थाटात विद्वत्तापुर्ण उतरला आहे.
हं. लेखातून प्राध्यापकांचे शुद्धलेखनविषक विचार मात्र अगदी स्पष्ट झाले आहेत.
पिसाळलेल्या कुत्र्यावर गांधीवादाने काही उपाय होइल असे वाटत नाही, त्याला आता अर्धी चड्डी घालुन संचलनाला नेतो आणि बौद्धीकाला बसवतो. चावायचा थांबतो का ते बघुया.
चांगला उपाय आहे. करून बघायला हवा. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विकास 18/12/2008 - 09:02
विषय शिर्षक वाचून मला एकदम का कोणास ठाऊक पण "जितना ही जाऊ मै दूर तुझसे, उतनी ही तू पास आए" या अचानक ओळी आठवल्या :-) बाकी माहीतीपूर्ण लेख. यातील काही मला अनोळखी साहीत्य होते त्या मुळे माहीतीबद्दल धन्यवाद. यातील नायक विनायकराव गांधी यांच्या प्रभावाखाली असून ते गांधी यांच्या चळवळीत भाग घेतात, तुरुंगात जातात. तरीही ते पूर्ण गांधीवादी नाहीत. कसे असणार पूर्ण गांधीवादी? नाव "विनायक" आडनाव "गांधी" :-) गांधीवादी लोक कसे दुराग्रही असतात हेही त्यांनी दाखवून दिले आहे. दुराग्रहाची मक्तेदारी काही केवळ गांधीवादींकडेच असते असे मानू नका! जसे एकट्या गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले नाही तसेच एकट्या गांधीवादाने दुराग्रही होता येते असे नाही. "ऑल रोड्स लीड टू रोम" - अर्थात जेंव्हा स्वतःचा अभ्यास, चिंतन, मनन,स्वाध्याय आणि सिंहावलोकन थांबून केवळ कुठल्यातरी विचाराने भारावण्यापेक्षा भारून जाणे होते तेंव्हा दुराग्रहीपणा आपसूक येतो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स. खांडेकर यांच्या 'कांचनमृग' पासून ते 'ययाती' पर्यंत गांधीवादाचा प्रभाव जाणवतो म्हणतात. खांडेकरांनी "सोनेरी स्वप्ने भंगलेली" म्हणून (मला तरी वाटते) एक डिप्रेसिंग कादंबरी लिहीली होती ज्यात गांधीवाद्याची स्वप्ने सत्ताधार्‍यांनी गांधींचे नाव घेत कशी उध्वस्त केली हे स्वातंत्र्यसैनिकाच्या संदर्भातील कथानक होते. बाकी आपण बरेच सांगितले तरी एक नाव राहीले असे वाटले ज्यांनी गांधीवादी साहीत्य लिहीले असावे (कथाकादंबर्‍यांच्या रुपात नाही) ते म्हणजे विनोबा भावे. तसेच गांधींवर लिहीणार्‍यांसंदर्भात पण अजून लिहीता येईल. मधे गांधीवादी असलेल्या अंबरीश मिश्रा यांचे "गंगे मध्ये गगन वितळले" का असेच काही शिर्षक असलेले माहीतीपूर्ण पुस्तक वाचनात आले होते. त्यात म्हणल्याप्रमाणे गांधींकडे सुरवातीस काँग्रेसने दुर्लक्ष केले तेंव्हा गांधीजींनी स्वतःची चळवळ चालू केली. त्याला मिळणारी प्रसिद्धी पाहून आपोआप काँग्रेस मागे आली... असो, लेख आवडला.

नंदन 18/12/2008 - 09:27
लेख, मराठी साहित्यातील गांधीवादाचा घेतलेला मागोवा आवडला. विकास म्हणतात तसे, या विषयावर सरांनी अधिक विस्ताराने लिहिल्यास वाचायला आवडेल. >>> आम्हालाही साहित्यातील गांधीविचारांनी शीळ घातली. - :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

सहज 18/12/2008 - 10:12
गांधीवाद व साहीत्य यावर अजुन लिहा. आम्हालाही साहित्यातील गांधीविचारांनी शीळ घातली. :-)

वेताळ 18/12/2008 - 10:02
गांधीवाद हा एका कालावधी मध्येच समाजात रुजला,वाढला व संपला. कारण तुम्ही वर दिलेच आहे. त्यांचा स्वप्नाळू ध्येयवाद वास्तवाचे रुप लपवितो. हे जसे सानेगुरुजीच्या बाबतीत सत्य होते तसे गांधीवादा बद्दलही म्हणता येईल. अजुन एक मला प्रश्न पडला आहे जर आत्महत्या हे पाप असेल तर गांधीवादा मध्ये आमरण उपोषन करणे ही देखिल एकप्रकारे आत्महत्याच नव्हे का?तसेच यंत्राचा वापर ह्या विषयी गांधीजीचे विचार आजच्या काळात मान्य होणे शक्य नाही. मराठीसाहित्यात गांधीजीचा प्रभाव तितकासा पडला नाही हे खरे आहे.पण मिपासाहित्यात गांधीजीचा खुपच प्रभाव पडला आहे , हे मान्य करावेच लागेल. वेताळ

लिखाळ 18/12/2008 - 16:47
सर, आढावा चांगला घेतला आहे.
यातील नायक विनायकराव गांधी यांच्या प्रभावाखाली असून ते गांधी यांच्या चळवळीत भाग घेतात, तुरुंगात जातात. तरीही ते पूर्ण गांधीवादी नाहीत.
हे वाक्य ''यातील नायक विनायकराव, गांधी यांच्या प्रभावाखाली असून ... '' असे वाचावे काय? 'भेटेन नऊ महिन्यांनी' ही कविता फाशी जाणारा क्रांतिकारक म्हणत आहे वाटते. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

हे वाक्य ''यातील नायक विनायकराव, गांधी यांच्या प्रभावाखाली असून ... '' असे वाचावे काय? हो, असेच वाचायला हवे. दुरुस्ती केली आहे. धन्यवाद !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कलंत्री 18/12/2008 - 20:29
प्रा. डॉ. बिरुटे साहेबांचे धन्यवाद कसे मानावे हे मला समजत नाही. मिपाच्या लोकांना आवडो अथवा न आवडो मी गांधीवादाचे डोस पाजले आहेच. त्याला चौकट देण्याचा सुजाण मान मात्र प्राध्यापक साहेबांना द्यायलाच हवा. १. गांधीवादी विचाराच्या प्रचाराबरोबर त्यांच्या विरोधकाचेही साहित्याचा अभ्यास व्हायला हवा. उदा. सावरकरांचे साहित्य, गोपाल गोडसे यांचे गांधीहत्या आणि मी इत्यादी पुस्तके. २. अनेक भाषेत पुस्तके मराठीत अनुवादीत होत असतात. प्यारेलाल यांचे गांधी एक महामानव हे पुस्तक प्रत्येकानेच वाचले पाहिजे. ३. गांधीवादी विचारावर अनेकांनी डॉक्टरेट केलेल्या आहेत. उदा. भटकळ यांनी गांधीचे समकालिन विरोधक यावर प्रबंध सादर केलेला आहे. ४. वर्तमानपत्रात, पुस्तकात प्रत्येक वर्षी गांधीवादाचा अन्वय नव्या पद्धतीने लावला जातो. एकंदरीतच गांधीविचारावरचे साहित्य हे अफाट या पद्धतीनेच वर्णन करावे लागेल.

In reply to by कलंत्री

लिखाळ 18/12/2008 - 20:41
दा न शिखरे यांनी लिहिलेले गांधीचरित्र कधी वाचायला घेतले होते. पण पूर्ण वाचून झाले नाही. आता संधी मिळाली तर पाहिन. -- लिखाळ.

In reply to by मुक्तसुनीत

लिखाळ 18/12/2008 - 20:49
अम्म ! माझ्या दा न शिखरे असे लक्षात आहे. ते गांधीम्चे जवळचे शिष्य होते (बहुधा). कुणी खुलासा केला तर बरे. -- लिखाळ.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत 18/12/2008 - 21:13
माझा दा. न. शिखरे आणि द. न. गोखले यांच्याबद्दल गोंधळ झाला होता. द. न. गोखले यांचेही गांधींवरचे पुस्तक आहे. ("शोध महामानवाचा"). झालेल्या गोंधळाबद्दल क्षमा.
मिसळपाववर सध्या वेगवेगळे 'वाद' गाजत आहेत. दहशतवाद, गांधीवाद, अवांतरवाद इत्यादी इत्यादी. सध्या या विचारांनी मिसळपाववरील जनजीवन ढवळून निघाले आहे आणि त्याचा परिणाम मिपावर वावरणार्‍या मंडळींवर होतो, या सर्व विचारांचा परिणाम येथे वावरणार्‍यावर झाला नाही तर नवल वाटावे. आम्हालाही साहित्यातील गांधीविचारांनी शीळ घातली. गांधीविचारांच्या चर्चेवरुन असे दिसते की भारतीय समाजमनावर म. गांधीच्या विचारांचा परिणाम झालेला आहे आणि ती एक मोठी घटना मानलीच पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याला नवचैतन्य देण्याचे श्रेय म. गांधीजींनीचा द्यावे लागेल. म. गांधींनी आपली नीतिमुल्य निश्चित केली होती.

कपॅसिटर आणि इन्व्हर्टर

आनंद घारे ·

मदनबाण 15/12/2008 - 14:25
अप्लाईड इलेट्रॉनिक्स आठवले !!! (सेकंड इयर) :) (सर्किट डायग्राम नेहमी चुकीचेच काढणारा) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

In reply to by मदनबाण

विकेड बनी 16/12/2008 - 02:42
अहो, सर्किट डायग्राम खुद्द देवबाप्पाने चुकीचा काढला. तुम्ही काही वाटून घेऊ नका. ------------- दोन वेगळी मतं असतील तर करा चर्चा. तीन वेगळी मतं असतील तर टाका कौल.

चतुरंग 15/12/2008 - 22:24
तांत्रिक माहिती सोपी करुन सांगण्याची आपली हातोटी आवडली आनंद घारे साहेब. अजून असे लेखन येऊदेत. चतुरंग

धनंजय 15/12/2008 - 23:53
या इंडक्शन ने बारावीत माझी विकेट घेतली होती :-( हा कॅपॅसिटर पूर्ण घराच्या वीजयंत्रणेला समांतर जोडावा, असे अपेक्षित आहे काय - म्हणजे विजेचे मापयंत्र (मीटर) ते न्यूट्रल? (डीसी विद्युतचक्रांत असा जोडावा असे वाटते... पण एसी साठी हा विचार ठीक वाटत नाही.) एसीसाठी कॅपॅसिटर विजेच्या मार्गात (सिरियल) जोडावा काय - म्हणजे मापयंत्राच्या आणि उपकरणांच्या मध्ये? असेच आणखी लेखन येऊ द्या.

In reply to by धनंजय

चतुरंग 16/12/2008 - 02:17
कपॅसिटर बँक संपूर्ण घराच्या वीज यंत्रणेला समांतर जोडणीत टाकावी. ही किती क्षमतेची असावी हे त्या पुढे किती लोड आहे त्यावर ठरते. आदर्श अवस्थेत फक्त इंडक्टिव लोड निर्माण करणार्‍या उपकरणांनाच समांतर असणे जास्त अचूक राहील पण तसे करायचे झाल्यास तशा प्रत्येक उपकरणाला वेगवेगळा छोटा कपॅसिटर जोडावा लागेल. चतुरंग

In reply to by धनंजय

आनंद 16/12/2008 - 10:18
होय, कॅपॅसिटर पूर्ण घराच्या वीजयंत्रणेला समांतर जोडावा, कॅपॅसिटर एसी साठी च जोडावा लागतो. डिसी साठी फेज शिफ्ट ही काही भानगड नसल्यामुळे कॅपॅसिटर ची काही गरज नसते ( रिपल कमी करण्या साठी वापरला जाउ शकतो)

गुळांबा 29/01/2009 - 21:24
पण एसी मधून डीसी आणि परत एसी या परिवरितनात बरीच वीज वाया जाते. त्यामुळे त्यात आपली सोय होत असली तरी त्याचे मूल्य द्यावेच लागते. उपकरणे महाग पडतात. कारण त्याचा छुपा खर्च खुपच येतो. पण माहिती ह्या दृष्टिकोनातुन आपला लेख चांगला आहे. कृपा करुन प्याडल मारुन विज कशी निर्माण करतात आणि ती घरच्या घरी निर्माण कशी करता येईल ते सांगा.

गुळांबा 29/01/2009 - 21:36
एकवेळ चालेल पण विज विकत घेतल्यामुळे आपल्याला जी असहायता येते विज कंपनीच्या लहरी पणावर अवलंबुन राहाण्याची आणि ते सांगतिल ते दर द्यायची ती नको. उत्पादन खर्चात विकत घेतलेली कुठलीही गोष्ट कर भरुन पण स्वस्तातच पडते.

In reply to by झेल्या

पंख्यात म्हणजे त्या रेग्युलेटर कंट्रोल मध्ये रेजिस्टरचा वापर करतात. व्होल्टेज रेग्युलेट करण्यासाठी. रेजिस्टरने काही फरक पडत नसावा. जाणकार अधिक माहिती देतील. चु.क.भु.द्या.घ्या. --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

In reply to by झेल्या

सॉलिड स्टेट रेग्युलेटर वापरलात तर पंखा कमी वेगात फिरवताना कमी वीज लागते. साधा रेग्युलेटर वापरला (रेझिस्टरवाला, जो बराच आकाराने मोठा असतो) तर जाणवण्याइतपत फरक पडत नाही. रेजिस्टर (register) आणि रेझिस्टर (resister) मधे अंमळ फरक असावा. म्हणावं तर शुद्धलेखन म्हणावं तर वेगळीच वस्तू! अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रेजिस्टर (register) आणि रेझिस्टर (resister) मधे अंमळ फरक असावा. म्हणावं तर शुद्धलेखन म्हणावं तर वेगळीच वस्तू! मला रेझिस्टरच म्हणायचे होते. शुद्धलेखनाची चुक. :) अंवातर : कलर कोड आठवायचा प्रयत्न करतोय. ब्लॅक -ब्राऊन-रेड-ऒरेंज-येलो-ग्रीन-ब्लु-... --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

In reply to by मधु मलुष्टे ज्…

दशानन 30/01/2009 - 13:03
>> ब्लॅक -ब्राऊन-रेड-ऒरेंज-येलो-ग्रीन-ब्लु-... मी ओहोम्स आठवण्याचा प्रयत्न करत आहे... ;) कधी काळी टिव्ही रिपेरींग करत होतो तेव्हा ह्या रेझिस्टर आणी कॅपॅसिटरे डोक्याला शॉट लागत असे नेहमी ;) टिव्हीच्या इचटी चा कोणी शॉक खल्ला आहे का ? डिसी करंट... लै जबरा लागतो.... दहा मिनिटे कळतच नाय आपण कोठे आहोत , का आहोत व जिवंत आहोत ते :D मला एकदाच बसला टिव्ही रिपेरिंगचा धंदाच सोडला ! ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.

माझ्या सारख्या 'लेमॅन'साठी (बायकांना 'लेवुमन' म्हणावे का?) बराच माहितीपुर्ण लेख आहे. व्होल्टेज, वॉटेज आणि अँपिअर्स ह्यातील नातेसंबंध दर्शविणारा एक फॉर्म्युला आहे तो कोणी सांगेल का? निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by झेल्या

हा ओहम्स कुठुन आला? हा साऊंड्च्या संदर्भात येतो असे वाटते. (नक्की माहीत नाही). मला वॉटेज, व्होल्टेज आणि अँपिअर्स च्या नात्यासंबंधी माहिती हवी आहे. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by प्रभाकर पेठकर

झेल्या 30/01/2009 - 13:51
साऊंड ची इन्टेन्सिटी मोजतात ती डेसिबल्स मध्ये आणि फ्रिक्वेन्सी (वारंवारता) (नंबर ऑफ सायकल्स पर सेकंद) मोजण्यासाठी हर्ट्झ वापरतात. -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

In reply to by प्रभाकर पेठकर

दिपोटी 30/01/2009 - 14:21
पेठकर काका, झेल्याकाकांच्या फॉर्म्युल्यात खाली थोडी भर घातली आहे, तेव्हा तुम्हाला वॉटेज, व्होल्टेज आणि अँपिअर्स च्या नात्यासंबंधी जी माहिती हवी आहे ती मिळेल. V = IR Wattage (in Watts) = Power dissipated = I * I * R = V*V/R = I * V Where, I = current in Amperes V= Voltage in volts R= Resistance in ohms रामराम ! - दिपोटी

In reply to by दिपोटी

झेल्या 30/01/2009 - 14:29
माझे वय 'काका' चे नसून 'पुतण्या' चे आहे हो... :) फक्त 'झेल्या' किंवा 'हृषीकेश' म्हणा..प्लीज... -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

In reply to by झेल्या

मनिष 30/01/2009 - 14:22
रोजच्या वापरात पुर्ण रेझिस्टिव्ह लोड फारसे नसते. इंड्क्टीव्ह लोड किंवा कॅपॅसिटिव्ह लोड असते. त्याचा फॉर्म्युला आठवत नाही आता (कॉस थिटा आहे बहुतेक त्यात), पण त्यात करंट त्याच फेज मधे नसतो, इंड्क्टीव्ह लोड ला तो मागे (लॅग) करतो तर कॅपॅसिटिव्ह लोडला पुढे (लीड). सहज समजण्यासाठी VA हे युनिट वापरले जाते. साधा व्होल्टेज (व्होल्टस) आणि करंट (ऍम्पीअर) ह्याचा गुणाकार असतो. Wattage = VA हे फक्त रेझिस्टिव्ह लोड साठी लागू होते. - (कधी काळचा ईलेक्ट्रॉनिक्स सर्किट्सचा तज्ञ) मनिष

In reply to by मनिष

नितिन थत्ते 30/01/2009 - 15:20
कॉस फाय म्हणतात. करंट हा व्होल्टेज पेक्षा जितक्या डिग्रीने मागे किंवा पुढे असतो त्या कोनाचा कोसाईन. वॉट = व्होल्ट * करंट * कॉस फाय खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

आनंद घारे 30/01/2009 - 16:43
तांत्रिक शिक्षण ज्यांनी घेतले नसेल त्यांना हे शब्द कदाचित कळणार नाहीत म्हणून सोप्या उदाहरणातून ते मांडत आहे. एसी विजेचा दाब (व्होल्टेज) व प्रवाह (करंट) सतत बदलत असतात. हा दाब शून्यापासून वाढत वाढत सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर तो कमी कमी होत पुन्हा शून्यावर येतो, त्यानंतर उलट दिशेने वाढत वाढत सर्वोच्च पातळी गाठतो आणि पुन्हा कमी कमी होत पुन्हा शून्यावर येऊन दिशा बदलतो आणि विरुध्द दिशेने वाढत वाढत वाहतो. अशा एका आवर्तनाला 'सायकल' म्हणतात आणि एका सेकंदात अशी पन्नास आवर्तने होतात. असे मी लिहिलेले आहे. याचा अर्थ या क्षणी जेवढा दाब असेल तेवढा तो एक पन्नासांश सेकंदाने असतो आणि या क्षणी जेवढा प्रवाह वहात असतो तेवढा तो एक पन्नासांश सेकंदाने वाहतो . मधल्या काळात तो कमी किंवा जास्त आणि उलट किंवा सुलट दिशेने असतो. दाब आणि प्रवाह जर एकाच क्षणी कमी किंवा जास्त झाले तर ते एका फेजमध्ये असतात. निव्वळ रेझिस्टिव्ह लोडमध्ये असे घडते. पण निव्वळ इंडक्टिव्ह आणि निव्वळ कपॅसिटिव्ह लोडमध्ये ज्या क्षणी दाब परमावधीवर असतो तेंव्हा प्रवाह शून्यावर असतो आणि ज्या क्षणी दाब शून्यावर येतो तेंव्हा प्रवाहाची परमावधी असते. असा फरक असल्यास ते वेगवेगळ्या फेजमध्ये आहेत असे म्हणतात. बहुतेक वेळा संमिश्र लोड असतो त्यामुळे एक शून्यावर असतांना दुसरा मध्ये कोठे तरी असतो. या फरकाचे गणित मांडून फेजमधला फरक अंशांत काढला जातो. सूत्रांमध्ये ग्रीक भाषेतले फाय हे अ क्षर त्यासाठी वापरले जाते. कॉस फाय ही त्रिकोणमितीमधली संकल्पना आहे. ती विजेचा दाब आणि प्रवाह यावरून ऊर्जेची खपत काढण्यासाठी वापरण्यात येणा-या सूत्रात उपयोगाला येते. या लेखात सूत्रे आणायची नाहीत असे मी ठरवलेले आहे. खोलात न जाता असे सांगता येईल की रेझिस्टिव्ह लोडमध्ये प्रावाह आणि दाब एकाच वेळी कमी जास्त होत असल्यामुळे त्यांचा गुणाकार जास्त येतो आणि संमिश्र लोडमध्ये एक कमी तर दुसरा जास्त आणि एक एका दिशेने तर दुसरा विरुध्द दिशेने असे होत राहिल्यामुळे त्यांचा एकूण गुणाकार कमी भरतो. यामुळे विजेच्या दाबाचा संपूर्ण उपयोग तिच्यापासून काम करवून घेण्यात होत नाही आणि यासाठी कपॅसिटर व कन्व्हर्टरची गरज पडते. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

मदनबाण 15/12/2008 - 14:25
अप्लाईड इलेट्रॉनिक्स आठवले !!! (सेकंड इयर) :) (सर्किट डायग्राम नेहमी चुकीचेच काढणारा) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

In reply to by मदनबाण

विकेड बनी 16/12/2008 - 02:42
अहो, सर्किट डायग्राम खुद्द देवबाप्पाने चुकीचा काढला. तुम्ही काही वाटून घेऊ नका. ------------- दोन वेगळी मतं असतील तर करा चर्चा. तीन वेगळी मतं असतील तर टाका कौल.

चतुरंग 15/12/2008 - 22:24
तांत्रिक माहिती सोपी करुन सांगण्याची आपली हातोटी आवडली आनंद घारे साहेब. अजून असे लेखन येऊदेत. चतुरंग

धनंजय 15/12/2008 - 23:53
या इंडक्शन ने बारावीत माझी विकेट घेतली होती :-( हा कॅपॅसिटर पूर्ण घराच्या वीजयंत्रणेला समांतर जोडावा, असे अपेक्षित आहे काय - म्हणजे विजेचे मापयंत्र (मीटर) ते न्यूट्रल? (डीसी विद्युतचक्रांत असा जोडावा असे वाटते... पण एसी साठी हा विचार ठीक वाटत नाही.) एसीसाठी कॅपॅसिटर विजेच्या मार्गात (सिरियल) जोडावा काय - म्हणजे मापयंत्राच्या आणि उपकरणांच्या मध्ये? असेच आणखी लेखन येऊ द्या.

In reply to by धनंजय

चतुरंग 16/12/2008 - 02:17
कपॅसिटर बँक संपूर्ण घराच्या वीज यंत्रणेला समांतर जोडणीत टाकावी. ही किती क्षमतेची असावी हे त्या पुढे किती लोड आहे त्यावर ठरते. आदर्श अवस्थेत फक्त इंडक्टिव लोड निर्माण करणार्‍या उपकरणांनाच समांतर असणे जास्त अचूक राहील पण तसे करायचे झाल्यास तशा प्रत्येक उपकरणाला वेगवेगळा छोटा कपॅसिटर जोडावा लागेल. चतुरंग

In reply to by धनंजय

आनंद 16/12/2008 - 10:18
होय, कॅपॅसिटर पूर्ण घराच्या वीजयंत्रणेला समांतर जोडावा, कॅपॅसिटर एसी साठी च जोडावा लागतो. डिसी साठी फेज शिफ्ट ही काही भानगड नसल्यामुळे कॅपॅसिटर ची काही गरज नसते ( रिपल कमी करण्या साठी वापरला जाउ शकतो)

गुळांबा 29/01/2009 - 21:24
पण एसी मधून डीसी आणि परत एसी या परिवरितनात बरीच वीज वाया जाते. त्यामुळे त्यात आपली सोय होत असली तरी त्याचे मूल्य द्यावेच लागते. उपकरणे महाग पडतात. कारण त्याचा छुपा खर्च खुपच येतो. पण माहिती ह्या दृष्टिकोनातुन आपला लेख चांगला आहे. कृपा करुन प्याडल मारुन विज कशी निर्माण करतात आणि ती घरच्या घरी निर्माण कशी करता येईल ते सांगा.

गुळांबा 29/01/2009 - 21:36
एकवेळ चालेल पण विज विकत घेतल्यामुळे आपल्याला जी असहायता येते विज कंपनीच्या लहरी पणावर अवलंबुन राहाण्याची आणि ते सांगतिल ते दर द्यायची ती नको. उत्पादन खर्चात विकत घेतलेली कुठलीही गोष्ट कर भरुन पण स्वस्तातच पडते.

In reply to by झेल्या

पंख्यात म्हणजे त्या रेग्युलेटर कंट्रोल मध्ये रेजिस्टरचा वापर करतात. व्होल्टेज रेग्युलेट करण्यासाठी. रेजिस्टरने काही फरक पडत नसावा. जाणकार अधिक माहिती देतील. चु.क.भु.द्या.घ्या. --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

In reply to by झेल्या

सॉलिड स्टेट रेग्युलेटर वापरलात तर पंखा कमी वेगात फिरवताना कमी वीज लागते. साधा रेग्युलेटर वापरला (रेझिस्टरवाला, जो बराच आकाराने मोठा असतो) तर जाणवण्याइतपत फरक पडत नाही. रेजिस्टर (register) आणि रेझिस्टर (resister) मधे अंमळ फरक असावा. म्हणावं तर शुद्धलेखन म्हणावं तर वेगळीच वस्तू! अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रेजिस्टर (register) आणि रेझिस्टर (resister) मधे अंमळ फरक असावा. म्हणावं तर शुद्धलेखन म्हणावं तर वेगळीच वस्तू! मला रेझिस्टरच म्हणायचे होते. शुद्धलेखनाची चुक. :) अंवातर : कलर कोड आठवायचा प्रयत्न करतोय. ब्लॅक -ब्राऊन-रेड-ऒरेंज-येलो-ग्रीन-ब्लु-... --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

In reply to by मधु मलुष्टे ज्…

दशानन 30/01/2009 - 13:03
>> ब्लॅक -ब्राऊन-रेड-ऒरेंज-येलो-ग्रीन-ब्लु-... मी ओहोम्स आठवण्याचा प्रयत्न करत आहे... ;) कधी काळी टिव्ही रिपेरींग करत होतो तेव्हा ह्या रेझिस्टर आणी कॅपॅसिटरे डोक्याला शॉट लागत असे नेहमी ;) टिव्हीच्या इचटी चा कोणी शॉक खल्ला आहे का ? डिसी करंट... लै जबरा लागतो.... दहा मिनिटे कळतच नाय आपण कोठे आहोत , का आहोत व जिवंत आहोत ते :D मला एकदाच बसला टिव्ही रिपेरिंगचा धंदाच सोडला ! ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.

माझ्या सारख्या 'लेमॅन'साठी (बायकांना 'लेवुमन' म्हणावे का?) बराच माहितीपुर्ण लेख आहे. व्होल्टेज, वॉटेज आणि अँपिअर्स ह्यातील नातेसंबंध दर्शविणारा एक फॉर्म्युला आहे तो कोणी सांगेल का? निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by झेल्या

हा ओहम्स कुठुन आला? हा साऊंड्च्या संदर्भात येतो असे वाटते. (नक्की माहीत नाही). मला वॉटेज, व्होल्टेज आणि अँपिअर्स च्या नात्यासंबंधी माहिती हवी आहे. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by प्रभाकर पेठकर

झेल्या 30/01/2009 - 13:51
साऊंड ची इन्टेन्सिटी मोजतात ती डेसिबल्स मध्ये आणि फ्रिक्वेन्सी (वारंवारता) (नंबर ऑफ सायकल्स पर सेकंद) मोजण्यासाठी हर्ट्झ वापरतात. -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

In reply to by प्रभाकर पेठकर

दिपोटी 30/01/2009 - 14:21
पेठकर काका, झेल्याकाकांच्या फॉर्म्युल्यात खाली थोडी भर घातली आहे, तेव्हा तुम्हाला वॉटेज, व्होल्टेज आणि अँपिअर्स च्या नात्यासंबंधी जी माहिती हवी आहे ती मिळेल. V = IR Wattage (in Watts) = Power dissipated = I * I * R = V*V/R = I * V Where, I = current in Amperes V= Voltage in volts R= Resistance in ohms रामराम ! - दिपोटी

In reply to by दिपोटी

झेल्या 30/01/2009 - 14:29
माझे वय 'काका' चे नसून 'पुतण्या' चे आहे हो... :) फक्त 'झेल्या' किंवा 'हृषीकेश' म्हणा..प्लीज... -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

In reply to by झेल्या

मनिष 30/01/2009 - 14:22
रोजच्या वापरात पुर्ण रेझिस्टिव्ह लोड फारसे नसते. इंड्क्टीव्ह लोड किंवा कॅपॅसिटिव्ह लोड असते. त्याचा फॉर्म्युला आठवत नाही आता (कॉस थिटा आहे बहुतेक त्यात), पण त्यात करंट त्याच फेज मधे नसतो, इंड्क्टीव्ह लोड ला तो मागे (लॅग) करतो तर कॅपॅसिटिव्ह लोडला पुढे (लीड). सहज समजण्यासाठी VA हे युनिट वापरले जाते. साधा व्होल्टेज (व्होल्टस) आणि करंट (ऍम्पीअर) ह्याचा गुणाकार असतो. Wattage = VA हे फक्त रेझिस्टिव्ह लोड साठी लागू होते. - (कधी काळचा ईलेक्ट्रॉनिक्स सर्किट्सचा तज्ञ) मनिष

In reply to by मनिष

नितिन थत्ते 30/01/2009 - 15:20
कॉस फाय म्हणतात. करंट हा व्होल्टेज पेक्षा जितक्या डिग्रीने मागे किंवा पुढे असतो त्या कोनाचा कोसाईन. वॉट = व्होल्ट * करंट * कॉस फाय खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

आनंद घारे 30/01/2009 - 16:43
तांत्रिक शिक्षण ज्यांनी घेतले नसेल त्यांना हे शब्द कदाचित कळणार नाहीत म्हणून सोप्या उदाहरणातून ते मांडत आहे. एसी विजेचा दाब (व्होल्टेज) व प्रवाह (करंट) सतत बदलत असतात. हा दाब शून्यापासून वाढत वाढत सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर तो कमी कमी होत पुन्हा शून्यावर येतो, त्यानंतर उलट दिशेने वाढत वाढत सर्वोच्च पातळी गाठतो आणि पुन्हा कमी कमी होत पुन्हा शून्यावर येऊन दिशा बदलतो आणि विरुध्द दिशेने वाढत वाढत वाहतो. अशा एका आवर्तनाला 'सायकल' म्हणतात आणि एका सेकंदात अशी पन्नास आवर्तने होतात. असे मी लिहिलेले आहे. याचा अर्थ या क्षणी जेवढा दाब असेल तेवढा तो एक पन्नासांश सेकंदाने असतो आणि या क्षणी जेवढा प्रवाह वहात असतो तेवढा तो एक पन्नासांश सेकंदाने वाहतो . मधल्या काळात तो कमी किंवा जास्त आणि उलट किंवा सुलट दिशेने असतो. दाब आणि प्रवाह जर एकाच क्षणी कमी किंवा जास्त झाले तर ते एका फेजमध्ये असतात. निव्वळ रेझिस्टिव्ह लोडमध्ये असे घडते. पण निव्वळ इंडक्टिव्ह आणि निव्वळ कपॅसिटिव्ह लोडमध्ये ज्या क्षणी दाब परमावधीवर असतो तेंव्हा प्रवाह शून्यावर असतो आणि ज्या क्षणी दाब शून्यावर येतो तेंव्हा प्रवाहाची परमावधी असते. असा फरक असल्यास ते वेगवेगळ्या फेजमध्ये आहेत असे म्हणतात. बहुतेक वेळा संमिश्र लोड असतो त्यामुळे एक शून्यावर असतांना दुसरा मध्ये कोठे तरी असतो. या फरकाचे गणित मांडून फेजमधला फरक अंशांत काढला जातो. सूत्रांमध्ये ग्रीक भाषेतले फाय हे अ क्षर त्यासाठी वापरले जाते. कॉस फाय ही त्रिकोणमितीमधली संकल्पना आहे. ती विजेचा दाब आणि प्रवाह यावरून ऊर्जेची खपत काढण्यासाठी वापरण्यात येणा-या सूत्रात उपयोगाला येते. या लेखात सूत्रे आणायची नाहीत असे मी ठरवलेले आहे. खोलात न जाता असे सांगता येईल की रेझिस्टिव्ह लोडमध्ये प्रावाह आणि दाब एकाच वेळी कमी जास्त होत असल्यामुळे त्यांचा गुणाकार जास्त येतो आणि संमिश्र लोडमध्ये एक कमी तर दुसरा जास्त आणि एक एका दिशेने तर दुसरा विरुध्द दिशेने असे होत राहिल्यामुळे त्यांचा एकूण गुणाकार कमी भरतो. यामुळे विजेच्या दाबाचा संपूर्ण उपयोग तिच्यापासून काम करवून घेण्यात होत नाही आणि यासाठी कपॅसिटर व कन्व्हर्टरची गरज पडते. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
लेखनविषय:
लेखनप्रकार
या महत्वाच्या विषयावर झालेली चर्चा वाचून चाळीस वर्षांपूर्वी शिकलेल्या विजेसंबंधीच्या ज्ञानावरला गंज थोडा झटकला गेला. त्यातल्या क्लिष्ट गणिताचा संदर्भ टाळून या विषयीची माहिती सोप्या शब्दात देण्याचा हा एक अल्प प्रयत्न आहे. ते करतांना तपशीलात कांही तांत्रिक त्रुटी आल्या असल्या तरी या विषयाचा मुख्य गाभा शक्य तो शाबूत ठेवण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे. आपल्या घरी जो वीजपुरवठा असतो तो एसी (आल्टर्नेटिंग करंट) या प्रकारचा म्हणजे आलटून पालटून दोन्ही दिशांना वाहणारा असतो.

महाराष्ट्र कोणाचा ? काही तर्क, काही आडाखे ... भाग - १

छोटा डॉन ·

स्वप्निल.. 14/12/2008 - 03:20
डॉन भाऊ, मस्त लेख आहे..माझे पण काँग्रेसबद्दल असेच काहिसे मत आहे..त्यांची जातीयवाद विरोधी इमेज खोटी आहे..सगळ्यात जास्त जातीचे राजकारण मला वाटते काँग्रेसच करते.. >>तसे पहायला गेले तर गेली ८-९ वर्षे सगल मुख्यमंत्री हा कॉग्रेसचाच आहे पण त्यांच्या हातुन लक्षात राहण्यासारखे एकही भरीव काम अजुन झाले नाही. ह्यांचा बहुसंख्य वेळ आपली खुर्ची संभाळाण्यात व मजबुत करण्यात गेला. >>प्रामुख्याने ह्या वर्गातुन "एकगठ्ठा मतदानाचा " प्रभाव दिसतो म्हणुन ह्यांचा उल्लेख केला आहे १००% सहमत!!! स्वप्निल

In reply to by स्वप्निल..

आजानुकर्ण 14/12/2008 - 05:31
प्रत्येक पक्षाच्या जाती ठरलेल्या आहेत. प्रमोद महाजन गेल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे काय होत आहे? छगन भुजबळ, नारायण राणे यांना शिवसेना का सोडावी लागली. राष्ट्रवादी पक्षाचे सगळे नेते कोणत्या जातीचे आहेत? आणि सगळ्यात जास्त जातीचे राजकारण काँग्रेस करते हे आपण कुठे वाचले?

In reply to by आजानुकर्ण

छोटा डॉन 14/12/2008 - 19:00
>> प्रत्येक पक्षाच्या जाती ठरलेल्या आहेत. सहमत आहे ह्या वाक्याशी. आज बहुतांश पक्षांची तशीच इमेज आहे. भाजपा म्हणजे "ब्राम्हणांचा, बनियांचा, उच्च्वर्णीयाम्चा" पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस जरी दावा करत नसले तर बहुसंख्य नेत्यांच्या नावांवरुन तो सरळसरळ "मराठा समाज" डोमीनेटेड पक्ष आहे असे दिसते आहे, शिवसेनाचा तसा अजुन काही "जातीयवादी" चेहरा दिसला नाही, बसपा नेहमीच "बहुजन समजाच्या" मागे उभी राहिली आहे व त्यांनीसुद्धा बसपाला बर्‍यापैकी हात दिला आहे. तसे सध्या बसपाने पुर्वी "४ जुते" मारलेल्या "ब्राम्हण वर्गाला" सुद्धा चुचकारायला सुरवात केली आहे म्हणुन बेहनजींच्या खास गोटात सध्या मिश्रा, शर्मा, त्रिवेदी सारखी नावे प्रामुख्याने समोर येत आहेत, समाजवादी पक्षाचा "मुस्लीम अनुयय" हा काही लपुन राहिलेला नाही पण त्यांनी बर्‍याच वेळा "बहुजन समाजाचा" तारणहार बनण्याचा प्रयत्न केला, दक्षिणेत तर द्रविडी-अद्रवीडी वाद हा खुप जुना आहे व त्यावर अजुन मते मागीतली जातात... राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा, तर ह्यांनी अजुन तरी "सर्वसमावेशक" हा चेहरा टिकवण्यात यश मिळवले आहे पण जेव्हा जेव्हा संधी मिलेल तेव्हा हा पक्ष "जाती आणि धर्माचा" फायदा घेण्याचा चान्स सोडत नाही. आजही गल्लीपासुन ते दिल्लीपर्यंतच्या तिकीटवाटपात बहुसंख्यवेळा या गोष्तींचा विचार होतोच. शिवाय आरक्षण, नामांतरे, खास आयोग, योजना वगैरे ह्या बहुसंख्य वेळा काँग्रेसकडुन प्रमोट केल्या गेल्या आहेत. नुकतेच उठलेले "ओबीसी आरक्षणाचे" वादळ हे काँग्रेसच्याच एका मंत्र्याच्या डोक्यातुन निघालेली पिल्लु आहे व ह्यात सरळ सरळ जातीच्या आधारे आपली "वोट बँक" मजबुत करण्याचे इरादे आहेत हे स्पष्त आहे. >>प्रमोद महाजन गेल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे काय होत आहे? मुंडेंना प्राथमीक अवस्थेत "मागासर्गीय उभरते नेतॄत्व" म्हणुन महाजनांनी प्रोजेक्ट केले ही जरी खरी गोष्त असली तरी जसा काळ गेला तसा मुंडे हे "सर्वांचेच नेते" झाले. त्यांच्यामागे जरी वंजारी समाज मोठ्ठ्या संख्येन उभा असल्याचे खरे असले तरी ही मुंडे सध्या खास करुन त्या वर्गाचे नेते नव्हे तर "सर्वांचेच नेते" म्हणुन प्रोजेक्ट होत आहेत. >>छगन भुजबळ, नारायण राणे यांना शिवसेना का सोडावी लागली. छगन भुजबळ ह्यांच्या शिवसेना सोडण्यामागे "मंडल आयोग" हे एकमेव न्यात कारण असल्याचे मानले जाते. शिवसेनेने कधीही जातीय राजकारण (कमीत कमी समोरासमोर ) केले नाही, ह्याच तत्वाने त्यांनी "मंडल आयोगाला" विरोध केला व भुजबळांचे बाळासाहेबांशी मतभेद होऊन त्यांनी शिवसेना सोडली असा इतिहास ( मलातरी ) ज्ञात आहे. नारायण राणेंची गोष्ट वेगळी आहे. त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर न पटल्याने, पक्षातच स्पर्धक निर्माण झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली असल्याच्या बातम्या आहेत. ह्यात कुठेच "जात" आल्याचे मला ज्ञात नाही. >>राष्ट्रवादी पक्षाचे सगळे नेते कोणत्या जातीचे आहेत? आणि सगळ्यात जास्त जातीचे राजकारण काँग्रेस करते हे आपण कुठे वाचले? दोन्ही प्रश्नाचे उत्तर ( माझ्यामाहितीप्रमाणे ) वर दिले आहे. छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

कलंत्री 14/12/2008 - 08:00
आपली कळकळ आवडते. आपण आपले मत व्यक्त करा. बर्‍याच वेळेस आपल्याला हवी असलेली प्रतिक्रिया येत नाही अथवा विषय भरकटवला जातो. अशा वेळेस मनाची शांती आपल्या उपयोगी येते. मी सर्वसाधारण पणे खालील विचारसरणी स्विकारतो. १. आपला लेख आल्यानंतर अनेक विरुद्ध प्रतिक्रियेचे उत्तर परस्परच दिले जाते. २. काही मुद्दयांचे उत्तर मात्र आपणच द्यायला हवे. ३. पुढील लेखात या सगळ्या मुद्द्यांचा विचार करावयाचा. ४. व्यक्तिश: कोणाबद्दलही द्वेष न ठेवता, आपण प्रबोधनाचे कार्य करित आहोत या वर अबाधित विश्वास ठेवायचा. आपल्या पुढील लेखाची वाट पाहत आहे.

शक्तिमान 14/12/2008 - 10:36
काँग्रेसचे निर्णय अमराठी हायकमांड वर अवलंबून असणे आणि यातून महाराष्ट्राची राष्ट्रीय पातळीवर होणारी गळचेपी थांबवण्यासाठी प्रादेशिक पक्षांना संधी मिळावयास हवी. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष चांगला म्हणायचा या बाबतीत. (इतर पक्ष राज्यपातळीवर म्हणावे एवढे तुल्यबळ नाहीत म्हणून उल्लेख केला नाही.) (जर त्यांनी हे धोरण बदलले नाही तर..) काँग्रेसला अधिक संधी देण्यात काही अर्थ नाही.

विसोबा खेचर 14/12/2008 - 12:08
"राजकारण म्हणजे गटार" असे मानणार्‍या मान्यवरांनी ह्या लेखाला तशा अथवा त्या अर्थाच्या प्रतिक्रीया देण्याची "तसदी घेऊ नये". उत्तम! आम्ही ही तसदी घेत नाही/घेऊ इच्छित नाही..कारण "राजकारण म्हणजे गटार" असेच आमचे मत आहे.. आम्ही आपले ह्याबद्दल आत्ताच आभार मानत आहोत. धन्यवाद. हा चांगला व आम्हाला सोयिस्कर असा डिस्क्लेमर टाकल्यामुळे आम्हीही आपले आभार मानत आहोत.. चालू द्या... तात्या.

कॉन्गेस ची नाव बुडेल असे मला तरी वाटत नाही. एकतर विरोधी पक्षात फारसा जोर नाही. आणि मुबंई-ठाणे जेथील जागा वाढल्या आहेत, तीथले परप्रांतिय कॉन्गेस किंवा राकॉ ला मदत करतील. मला नाही वाटत की राणे मुंबई - कोकणा बाहेर फारसे बिघडवु शकतील आणी मुळात कॉन्गेस कोकणात जीवच किती होता???. जे आता दिसत आहे ते राणेंमुळे. निवडुन येणारात किती जोर आहे, ह्या पेक्षा पाडणारर्‍यात किती जोर आहे ह्यावर पुढचे राजकारण ठरणार आहे. ---- सखाराम गटणे

In reply to by सखाराम_गटणे™

निवडुन येणारात किती जोर आहे, ह्या पेक्षा पाडणारर्‍यात किती जोर आहे ह्यावर पुढचे राजकारण ठरणार आहे. -- दुर्दैवाने हे एक उघड सत्य मागच्या काही निवडणुकांपासून अनुभवाला येत आहे. कळीच मुद्दा.

लिखाळ 15/12/2008 - 18:20
डॉन्या, लेख छान आहे. मुंबईमध्ये झालेली घटना निवडनूकीचे वारे वाहू लागल्यावर झाली आहे. कधी नव्हे तो या घटनेनंतर थेट पाकिस्तानचे नाव घेऊन पंतप्रधान-संरक्षणमंत्री त्यांच्याशी युद्ध करावे न कारावे अशी मते प्रकट करत आहेत. माझ्या मते याचा सरळ संबंध जनतेला तात्पुरते तुष्ट करुन या निवडणूकीमध्ये इतर मुद्दे दाबून स्वदेशप्रेम वगैरे दाखवून हेतू साध्य करणे याच्याशी आहे. आपले केंद्रातले मंत्री लोक अचानक इतके कठोर कसे झाले याचे उत्तर निवडणुका जवळ येत आहेत हेच वाटत आहे. आता स्थानिक जातीय दंगगली, वीज, पाणी यांपेक्षा मोठा व्यापक प्रश्न आयताच मिळाला आहे. याचाच उपयोग महाराष्ट्रात सुद्धा होईल असे वाटते. एकदा का सूनबाई सभेत येऊन म्हणाल्या की या देशासाठी मी माझ्या सासूबाई,.. वगैरे की सगळे वातावरण भारले जाईल. :) पुढचा भाग वाचण्यास उत्सुक. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

सुनील 15/12/2008 - 19:18
मुंबईमध्ये झालेली घटना निवडनूकीचे वारे वाहू लागल्यावर झाली आहे दिल्ली आणि राजस्थानातील निवडणूकांतील मतदान ह्या घटनेनंतर आठवड्याभरात झाले होते. तरीही दोन्ही ठिकाणी काँग्रेस निवडून आली. मला॑ वाटते, विधानसभा निवडणूकीत लोक राष्ट्रीय समस्या आणि स्थानिक (राज्यस्तरावरील) घटनांची फारकत करतात. तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झालाच तर तो सद्यसरकारच्या स्थानिक गैरकारभारामुळे होईल, दहशतवादी हल्ल्याचा थेट संबंध असेलच असे नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

छोटा डॉन 15/12/2008 - 20:26
>> विधानसभा निवडणूकीत लोक राष्ट्रीय समस्या आणि स्थानिक (राज्यस्तरावरील) घटनांची फारकत करतात. असेच म्हणतो ... प्रत्येक पातळीवरच्या निवडणुकांसाठी "विषय आणि मुद्दे" सर्वस्वी भिन्न असतात. त्याचा बहुतेक करुन "इतर पातळीशी" संबंध नसतोच / नसावाच. स्थानीक परिमाण, स्थानीक समस्या, स्थानीक नेतॄत्व, स्थानीक राजकारण ह्यांचा प्रामुख्याने संबंध येतो. तुम्हीच पहा ना, जेव्हा पंचायत समित्यांच्या वगैरे निवडणुका होतात तेव्हा एखाद्या महान / मोठ्ठ्या / बलदंड अशा मंत्री असलेल्या नेत्याच्या पॅनेलला स्थानीक पातळीवरची एखादी "आघाडी / पॅनेल / महासंघ " चक्क धुळ चारतो. कारण त्या मंत्र्याने स्वतः मंत्री म्हणुन केलेल्या कामापेक्षा स्थानीक संदर्भ जास्त वरचढ ठरतात. आपल्या राज्यात तर अशी भरपुर उदाहरणे आहेत, आपल्या मतदारसंघामध्ये येणार्‍या पंचायत समित्यात, बँकात, परसंस्था यांच्या इलेक्शनमध्ये तेथील "आमदार / खासदार" यांचे पॅनेल भुईसपाट होऊन राज्याच्या राजकारणात काडीचे स्थान नसलेली एखादी "विकास आघाडी" निवडुन आली आहे ... >>महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झालाच तर तो सद्यसरकारच्या स्थानिक गैरकारभारामुळे होईल, दहशतवादी हल्ल्याचा थेट संबंध असेलच असे नाही. नक्की सांगता येणे कठीण आहे, अजुन बराच वेळ आहे ना निवडणुकीला. आत्ताच लगेच जर निवडणुका झाल्या असत्या तर कदाचित "दहशतवादी हल्ल्याच्या ओघाने येणारा सुरक्षेचा मुद्दा" महत्वाचा ठरला असता ( असे मी मानतो) . छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by छोटा डॉन

लिखाळ 15/12/2008 - 20:32
बरोबर आहे.. पण मुंबई प्रश्न हा केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरांवर आहे. (मुंबई महाराष्ट्रात आहे म्हणून.)त्यामुळे मराठी माणसांच्या नोकरी प्रश्नाला देशभक्तीचे वातावरण टक्कर देऊ शकेल असे वाटते. काँग्रेसने जर देशभक्तीची लाट आणली तर ते शक्य होईल. पण अशी लाट किती टिकेल आणि खेडोपाडी याचा किती परिणाम होईल ते माहित नाही. ते असो. -- लिखाळ.

अनामिका 15/12/2008 - 19:07
छोटे सरदार! मस्तच जमलाय लेख.सध्या काही भाष्य करत नाही. जरा वेळ घेऊन व विचार पुर्वक मत मांडलेले बरे नाहि का? पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आम्ही सुद्धा! लिखाळ यांच्या मताशी मी सहमत आहे. "अनामिका"

डॉनबा, तुमच्या कल्पनाशक्ती समोर आम्ही नेहमीच चाट पडतो. आपणा सर्वांच्या जीवनावर कमी अधिक प्रमाणात राजकीय पक्ष बदल घडवून आणत असतात. त्यामुळे एक मतदार म्हणून आपणांस त्यांची माहिती असणे आवश्यक आहे. त्रयस्थाच्या नजरेतून आपण एक चांगली लेखमाला उतरवत आहात असे दिसते. अभिनंदन! पुढील भागांच्या प्रतिक्षेत. आपला, (वाचक) भास्कर

स्वप्निल.. 14/12/2008 - 03:20
डॉन भाऊ, मस्त लेख आहे..माझे पण काँग्रेसबद्दल असेच काहिसे मत आहे..त्यांची जातीयवाद विरोधी इमेज खोटी आहे..सगळ्यात जास्त जातीचे राजकारण मला वाटते काँग्रेसच करते.. >>तसे पहायला गेले तर गेली ८-९ वर्षे सगल मुख्यमंत्री हा कॉग्रेसचाच आहे पण त्यांच्या हातुन लक्षात राहण्यासारखे एकही भरीव काम अजुन झाले नाही. ह्यांचा बहुसंख्य वेळ आपली खुर्ची संभाळाण्यात व मजबुत करण्यात गेला. >>प्रामुख्याने ह्या वर्गातुन "एकगठ्ठा मतदानाचा " प्रभाव दिसतो म्हणुन ह्यांचा उल्लेख केला आहे १००% सहमत!!! स्वप्निल

In reply to by स्वप्निल..

आजानुकर्ण 14/12/2008 - 05:31
प्रत्येक पक्षाच्या जाती ठरलेल्या आहेत. प्रमोद महाजन गेल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे काय होत आहे? छगन भुजबळ, नारायण राणे यांना शिवसेना का सोडावी लागली. राष्ट्रवादी पक्षाचे सगळे नेते कोणत्या जातीचे आहेत? आणि सगळ्यात जास्त जातीचे राजकारण काँग्रेस करते हे आपण कुठे वाचले?

In reply to by आजानुकर्ण

छोटा डॉन 14/12/2008 - 19:00
>> प्रत्येक पक्षाच्या जाती ठरलेल्या आहेत. सहमत आहे ह्या वाक्याशी. आज बहुतांश पक्षांची तशीच इमेज आहे. भाजपा म्हणजे "ब्राम्हणांचा, बनियांचा, उच्च्वर्णीयाम्चा" पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस जरी दावा करत नसले तर बहुसंख्य नेत्यांच्या नावांवरुन तो सरळसरळ "मराठा समाज" डोमीनेटेड पक्ष आहे असे दिसते आहे, शिवसेनाचा तसा अजुन काही "जातीयवादी" चेहरा दिसला नाही, बसपा नेहमीच "बहुजन समजाच्या" मागे उभी राहिली आहे व त्यांनीसुद्धा बसपाला बर्‍यापैकी हात दिला आहे. तसे सध्या बसपाने पुर्वी "४ जुते" मारलेल्या "ब्राम्हण वर्गाला" सुद्धा चुचकारायला सुरवात केली आहे म्हणुन बेहनजींच्या खास गोटात सध्या मिश्रा, शर्मा, त्रिवेदी सारखी नावे प्रामुख्याने समोर येत आहेत, समाजवादी पक्षाचा "मुस्लीम अनुयय" हा काही लपुन राहिलेला नाही पण त्यांनी बर्‍याच वेळा "बहुजन समाजाचा" तारणहार बनण्याचा प्रयत्न केला, दक्षिणेत तर द्रविडी-अद्रवीडी वाद हा खुप जुना आहे व त्यावर अजुन मते मागीतली जातात... राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा, तर ह्यांनी अजुन तरी "सर्वसमावेशक" हा चेहरा टिकवण्यात यश मिळवले आहे पण जेव्हा जेव्हा संधी मिलेल तेव्हा हा पक्ष "जाती आणि धर्माचा" फायदा घेण्याचा चान्स सोडत नाही. आजही गल्लीपासुन ते दिल्लीपर्यंतच्या तिकीटवाटपात बहुसंख्यवेळा या गोष्तींचा विचार होतोच. शिवाय आरक्षण, नामांतरे, खास आयोग, योजना वगैरे ह्या बहुसंख्य वेळा काँग्रेसकडुन प्रमोट केल्या गेल्या आहेत. नुकतेच उठलेले "ओबीसी आरक्षणाचे" वादळ हे काँग्रेसच्याच एका मंत्र्याच्या डोक्यातुन निघालेली पिल्लु आहे व ह्यात सरळ सरळ जातीच्या आधारे आपली "वोट बँक" मजबुत करण्याचे इरादे आहेत हे स्पष्त आहे. >>प्रमोद महाजन गेल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे काय होत आहे? मुंडेंना प्राथमीक अवस्थेत "मागासर्गीय उभरते नेतॄत्व" म्हणुन महाजनांनी प्रोजेक्ट केले ही जरी खरी गोष्त असली तरी जसा काळ गेला तसा मुंडे हे "सर्वांचेच नेते" झाले. त्यांच्यामागे जरी वंजारी समाज मोठ्ठ्या संख्येन उभा असल्याचे खरे असले तरी ही मुंडे सध्या खास करुन त्या वर्गाचे नेते नव्हे तर "सर्वांचेच नेते" म्हणुन प्रोजेक्ट होत आहेत. >>छगन भुजबळ, नारायण राणे यांना शिवसेना का सोडावी लागली. छगन भुजबळ ह्यांच्या शिवसेना सोडण्यामागे "मंडल आयोग" हे एकमेव न्यात कारण असल्याचे मानले जाते. शिवसेनेने कधीही जातीय राजकारण (कमीत कमी समोरासमोर ) केले नाही, ह्याच तत्वाने त्यांनी "मंडल आयोगाला" विरोध केला व भुजबळांचे बाळासाहेबांशी मतभेद होऊन त्यांनी शिवसेना सोडली असा इतिहास ( मलातरी ) ज्ञात आहे. नारायण राणेंची गोष्ट वेगळी आहे. त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर न पटल्याने, पक्षातच स्पर्धक निर्माण झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली असल्याच्या बातम्या आहेत. ह्यात कुठेच "जात" आल्याचे मला ज्ञात नाही. >>राष्ट्रवादी पक्षाचे सगळे नेते कोणत्या जातीचे आहेत? आणि सगळ्यात जास्त जातीचे राजकारण काँग्रेस करते हे आपण कुठे वाचले? दोन्ही प्रश्नाचे उत्तर ( माझ्यामाहितीप्रमाणे ) वर दिले आहे. छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

कलंत्री 14/12/2008 - 08:00
आपली कळकळ आवडते. आपण आपले मत व्यक्त करा. बर्‍याच वेळेस आपल्याला हवी असलेली प्रतिक्रिया येत नाही अथवा विषय भरकटवला जातो. अशा वेळेस मनाची शांती आपल्या उपयोगी येते. मी सर्वसाधारण पणे खालील विचारसरणी स्विकारतो. १. आपला लेख आल्यानंतर अनेक विरुद्ध प्रतिक्रियेचे उत्तर परस्परच दिले जाते. २. काही मुद्दयांचे उत्तर मात्र आपणच द्यायला हवे. ३. पुढील लेखात या सगळ्या मुद्द्यांचा विचार करावयाचा. ४. व्यक्तिश: कोणाबद्दलही द्वेष न ठेवता, आपण प्रबोधनाचे कार्य करित आहोत या वर अबाधित विश्वास ठेवायचा. आपल्या पुढील लेखाची वाट पाहत आहे.

शक्तिमान 14/12/2008 - 10:36
काँग्रेसचे निर्णय अमराठी हायकमांड वर अवलंबून असणे आणि यातून महाराष्ट्राची राष्ट्रीय पातळीवर होणारी गळचेपी थांबवण्यासाठी प्रादेशिक पक्षांना संधी मिळावयास हवी. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष चांगला म्हणायचा या बाबतीत. (इतर पक्ष राज्यपातळीवर म्हणावे एवढे तुल्यबळ नाहीत म्हणून उल्लेख केला नाही.) (जर त्यांनी हे धोरण बदलले नाही तर..) काँग्रेसला अधिक संधी देण्यात काही अर्थ नाही.

विसोबा खेचर 14/12/2008 - 12:08
"राजकारण म्हणजे गटार" असे मानणार्‍या मान्यवरांनी ह्या लेखाला तशा अथवा त्या अर्थाच्या प्रतिक्रीया देण्याची "तसदी घेऊ नये". उत्तम! आम्ही ही तसदी घेत नाही/घेऊ इच्छित नाही..कारण "राजकारण म्हणजे गटार" असेच आमचे मत आहे.. आम्ही आपले ह्याबद्दल आत्ताच आभार मानत आहोत. धन्यवाद. हा चांगला व आम्हाला सोयिस्कर असा डिस्क्लेमर टाकल्यामुळे आम्हीही आपले आभार मानत आहोत.. चालू द्या... तात्या.

कॉन्गेस ची नाव बुडेल असे मला तरी वाटत नाही. एकतर विरोधी पक्षात फारसा जोर नाही. आणि मुबंई-ठाणे जेथील जागा वाढल्या आहेत, तीथले परप्रांतिय कॉन्गेस किंवा राकॉ ला मदत करतील. मला नाही वाटत की राणे मुंबई - कोकणा बाहेर फारसे बिघडवु शकतील आणी मुळात कॉन्गेस कोकणात जीवच किती होता???. जे आता दिसत आहे ते राणेंमुळे. निवडुन येणारात किती जोर आहे, ह्या पेक्षा पाडणारर्‍यात किती जोर आहे ह्यावर पुढचे राजकारण ठरणार आहे. ---- सखाराम गटणे

In reply to by सखाराम_गटणे™

निवडुन येणारात किती जोर आहे, ह्या पेक्षा पाडणारर्‍यात किती जोर आहे ह्यावर पुढचे राजकारण ठरणार आहे. -- दुर्दैवाने हे एक उघड सत्य मागच्या काही निवडणुकांपासून अनुभवाला येत आहे. कळीच मुद्दा.

लिखाळ 15/12/2008 - 18:20
डॉन्या, लेख छान आहे. मुंबईमध्ये झालेली घटना निवडनूकीचे वारे वाहू लागल्यावर झाली आहे. कधी नव्हे तो या घटनेनंतर थेट पाकिस्तानचे नाव घेऊन पंतप्रधान-संरक्षणमंत्री त्यांच्याशी युद्ध करावे न कारावे अशी मते प्रकट करत आहेत. माझ्या मते याचा सरळ संबंध जनतेला तात्पुरते तुष्ट करुन या निवडणूकीमध्ये इतर मुद्दे दाबून स्वदेशप्रेम वगैरे दाखवून हेतू साध्य करणे याच्याशी आहे. आपले केंद्रातले मंत्री लोक अचानक इतके कठोर कसे झाले याचे उत्तर निवडणुका जवळ येत आहेत हेच वाटत आहे. आता स्थानिक जातीय दंगगली, वीज, पाणी यांपेक्षा मोठा व्यापक प्रश्न आयताच मिळाला आहे. याचाच उपयोग महाराष्ट्रात सुद्धा होईल असे वाटते. एकदा का सूनबाई सभेत येऊन म्हणाल्या की या देशासाठी मी माझ्या सासूबाई,.. वगैरे की सगळे वातावरण भारले जाईल. :) पुढचा भाग वाचण्यास उत्सुक. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

सुनील 15/12/2008 - 19:18
मुंबईमध्ये झालेली घटना निवडनूकीचे वारे वाहू लागल्यावर झाली आहे दिल्ली आणि राजस्थानातील निवडणूकांतील मतदान ह्या घटनेनंतर आठवड्याभरात झाले होते. तरीही दोन्ही ठिकाणी काँग्रेस निवडून आली. मला॑ वाटते, विधानसभा निवडणूकीत लोक राष्ट्रीय समस्या आणि स्थानिक (राज्यस्तरावरील) घटनांची फारकत करतात. तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झालाच तर तो सद्यसरकारच्या स्थानिक गैरकारभारामुळे होईल, दहशतवादी हल्ल्याचा थेट संबंध असेलच असे नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

छोटा डॉन 15/12/2008 - 20:26
>> विधानसभा निवडणूकीत लोक राष्ट्रीय समस्या आणि स्थानिक (राज्यस्तरावरील) घटनांची फारकत करतात. असेच म्हणतो ... प्रत्येक पातळीवरच्या निवडणुकांसाठी "विषय आणि मुद्दे" सर्वस्वी भिन्न असतात. त्याचा बहुतेक करुन "इतर पातळीशी" संबंध नसतोच / नसावाच. स्थानीक परिमाण, स्थानीक समस्या, स्थानीक नेतॄत्व, स्थानीक राजकारण ह्यांचा प्रामुख्याने संबंध येतो. तुम्हीच पहा ना, जेव्हा पंचायत समित्यांच्या वगैरे निवडणुका होतात तेव्हा एखाद्या महान / मोठ्ठ्या / बलदंड अशा मंत्री असलेल्या नेत्याच्या पॅनेलला स्थानीक पातळीवरची एखादी "आघाडी / पॅनेल / महासंघ " चक्क धुळ चारतो. कारण त्या मंत्र्याने स्वतः मंत्री म्हणुन केलेल्या कामापेक्षा स्थानीक संदर्भ जास्त वरचढ ठरतात. आपल्या राज्यात तर अशी भरपुर उदाहरणे आहेत, आपल्या मतदारसंघामध्ये येणार्‍या पंचायत समित्यात, बँकात, परसंस्था यांच्या इलेक्शनमध्ये तेथील "आमदार / खासदार" यांचे पॅनेल भुईसपाट होऊन राज्याच्या राजकारणात काडीचे स्थान नसलेली एखादी "विकास आघाडी" निवडुन आली आहे ... >>महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झालाच तर तो सद्यसरकारच्या स्थानिक गैरकारभारामुळे होईल, दहशतवादी हल्ल्याचा थेट संबंध असेलच असे नाही. नक्की सांगता येणे कठीण आहे, अजुन बराच वेळ आहे ना निवडणुकीला. आत्ताच लगेच जर निवडणुका झाल्या असत्या तर कदाचित "दहशतवादी हल्ल्याच्या ओघाने येणारा सुरक्षेचा मुद्दा" महत्वाचा ठरला असता ( असे मी मानतो) . छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by छोटा डॉन

लिखाळ 15/12/2008 - 20:32
बरोबर आहे.. पण मुंबई प्रश्न हा केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरांवर आहे. (मुंबई महाराष्ट्रात आहे म्हणून.)त्यामुळे मराठी माणसांच्या नोकरी प्रश्नाला देशभक्तीचे वातावरण टक्कर देऊ शकेल असे वाटते. काँग्रेसने जर देशभक्तीची लाट आणली तर ते शक्य होईल. पण अशी लाट किती टिकेल आणि खेडोपाडी याचा किती परिणाम होईल ते माहित नाही. ते असो. -- लिखाळ.

अनामिका 15/12/2008 - 19:07
छोटे सरदार! मस्तच जमलाय लेख.सध्या काही भाष्य करत नाही. जरा वेळ घेऊन व विचार पुर्वक मत मांडलेले बरे नाहि का? पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आम्ही सुद्धा! लिखाळ यांच्या मताशी मी सहमत आहे. "अनामिका"

डॉनबा, तुमच्या कल्पनाशक्ती समोर आम्ही नेहमीच चाट पडतो. आपणा सर्वांच्या जीवनावर कमी अधिक प्रमाणात राजकीय पक्ष बदल घडवून आणत असतात. त्यामुळे एक मतदार म्हणून आपणांस त्यांची माहिती असणे आवश्यक आहे. त्रयस्थाच्या नजरेतून आपण एक चांगली लेखमाला उतरवत आहात असे दिसते. अभिनंदन! पुढील भागांच्या प्रतिक्षेत. आपला, (वाचक) भास्कर
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

बंगालच्या वाघिणी

सर्वसाक्षी ·

विसोबा खेचर 14/12/2008 - 03:43
सुनिती आणि शांती या वाघिणींना मानाचा मुजरा..! साक्षिदेवा, 'नाही चिरा नाही पणती..' ही उक्ति लागू व्हावी अश्या अनेक क्रांतिकारकांची आम्हाला केवळ तुझ्यामुळेच ओळख होत आहे..! अवघ्या १४व्या वर्षी असा असामान्य पराक्रम करणाऱ्या या मुलींची नावे सुद्धा आपल्याला माहित नाहीत याची खंत वाटते. खरं आहे! एवढंच नव्हे, तर 'भारताला आजादी विना खड्ग, विना ढाल मिळाली हो..!' अशी गीते गाण्यातच आम्ही धन्यता मानतो..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बगाराम 14/12/2008 - 04:30
तात्या, तुमच्या परिचयातील कुणा १४ वर्षाच्या चुणचुणीत मुलीकडुन हे काम करुन घ्याल का? कायदा देखिल १८ वयाच्या खालील मुलींना सज्ञान समजत नाही. त्यांना लग्न करण्याची देखिल परवानगी देत नाही. इथे तर चक्क बंदुक चालवुन जीव धोक्यात घालण्याचे प्रशिक्षण दिले जातेय.काहीतरी चुकतय अस वाटत नाही का? सिस्टमॅटीक ब्रेन वॉशींगच नव्हे का हे?

In reply to by विनायक प्रभू

बगाराम 14/12/2008 - 21:08
एनसीसी मध्ये विद्यार्थ्यांना मिलिटरीची ओळख करुन दिली जाते. भविष्यात त्यांनी सैन्यात भरती व्हावे ह्या अपेक्षेने. एनसीसीत दिलेले प्रशिक्षण घेउन कुणी युद्धावर जीव धोक्यात घालायला जात नाही.

In reply to by विनायक प्रभू

आजानुकर्ण 14/12/2008 - 22:32
एनसीसीचे प्रशिक्षण घेऊन युद्धावर जात नाहीत. सैन्याचे प्रशिक्षण घेऊन युद्धावर जातात हा बगाराम यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. आपला, (सार्जंट) आजानुकर्ण

In reply to by विनायक प्रभू

आजानुकर्ण 14/12/2008 - 22:40
या प्रतिसादाचा चर्चेशी काय संबंध आहे कळला नाही. तसाही मी शांततावादी असल्याने माझ्यासारख्या अल्पवयीन मुलाच्या हातात बॅटन देण्याचा लोकांनी प्रयत्न केला तरी मी ते हातात घेणार नाही. तेवढा मी सुजाण आहे. आपला (हाताची घडी) आजानुकर्ण

In reply to by विनायक प्रभू

बगाराम 14/12/2008 - 23:41
जाऊ द्या हो! एकंदरीत मुद्दे संपलेले दिसतात. असली विधाने यायला लागली की समजुन जायचे.

In reply to by बगाराम

रामपुरी 17/12/2008 - 22:00
म्हणजे त्यांनी काय करायला पाहीजे होते असे तुमचे म्हणणे आहे हे तरी कळू दे. १८ वर्षे पूर्ण होण्याची वाट बघायला हवी होती की सैन्यात जाऊन प्रशिक्षण घेउन यायला हवे होते?

In reply to by बगाराम

टग्या 17/12/2008 - 06:47
काहीतरी चुकतय अस वाटत नाही का? सिस्टमॅटीक ब्रेन वॉशींगच नव्हे का हे?
ब्रेनवॉशिंगचे एक वेळ जाऊ द्या, पण...
५ मार्च १९३१ रोजी बिरेन भटाचार्यच्या नेतृत्वाखाली ब्राहमण बारिया येथील ट्पाल कचेरीतून सरकारी खजिन्यत भरण्यासाठी जाणारी पंचविस हजार रुपयांची थैली लुटली. हे पैसे अखिल नंदीकडे सोपविण्यात आले व याच पैशातुन क्रांतिसाठी पिस्तुले व काडतुसे विकत घेतली गेली.
यह बात कुछ हज़्म नहीं हुई| अर्थात, डेस्परेट (मराठी?) परिस्थितीत, जेव्हा एखादी गोष्ट करायचीच आहे म्हटल्यावर मनुष्य काहीही करू शकतो, पण म्हणून अशा कृत्यांचे समर्थन होऊ शकते काय? प्रस्तुत जिल्हाधिकारी मग्रूर होता, अत्याचारी होता, अमानुष होता आणि म्हणून त्याचा वध करणे गरजेचे / योग्य होते असे जरी (व्यक्तिशः मला जरी पटत नसले तरी) वादाच्या सोयीकरिता मानले, तरी त्याच्या वधाकरिता शस्त्रास्त्रसामग्री आणण्याकरिता पैसे नाहीत म्हणून टपालकचेरी लुटणे हे समर्थनीय होते काय? एकदा "क्रांतीसाठी"म्हटले की काय वाटेल त्याची भलावण होऊ शकते काय? (ही बातमी "टपालकचेरीवर दरोडा" या मथळ्याखाली फिट्ट बसावी. "क्रांतीसाठी" हे लेबल लावल्याने हा दरोडा क्षम्य होतो काय?) मग "शोले"मधला गब्बरसिंग गाववाल्यांना म्हणतो की मी तुमचे संरक्षण करतो आणि त्याच्या बदल्यात जर का मी तुमच्याकडून काही पोती धान्य (जबरदस्तीने) घेतले, तर कोणताही जुलूम करत नाही म्हणून, तर त्याचे लॉजिक नेमके कोठे चुकले? (टपालकचेरीत तरी पैसे येतात ते कोठून? जनतेकडून गोळा केलेल्या महसुलातूनच ना?) आणि हे क्रांतिकारक जर देशासाठी, जनतेसाठी हे सर्व करत होते (म्हणजेच जनतेचे प्रतिनिधित्व करत होते आणि जनतेची त्यांना मान्यता होती), तर जनतेकडून वर्गणी गोळा करून शस्त्रास्त्रांसाठी पैसे गोळा करता आले नसते काय? जनतेने ते दिले नसते काय? (स्वखुशीने की कसे तो नंतरचा प्रश्न.) त्यासाठी दरोडा घालण्याची काय गरज होती आणि दरोडा घालणे हे योग्य होते काय?
क्रूरकर्मा जिल्हाधिकारी स्टिव्हन्स याच्या वधाच्या योजन्या आखल्या जाउ लागल्या. हा शूरवीर आपल्या बंगल्यात जागत्या पहाऱ्यात लपून बसल्याने याला गाठायचा कसा हा प्रश्न भेडसावित होता.
आपल्या हत्येची कारस्थाने रचली जाताहेत, आपला जीव धोक्यात आहे याबद्दल खात्रीलायक कुणकुण लागल्यावर सदर सद्गृहस्थ स्वतःच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेणार नाही काय? आणि सदर सद्गृहस्थ हा सरकारी अधिकारी आहे म्हटल्यावर खुद्द सरकार तशी व्यवस्था करणार नाही काय? स्वातंत्र्योत्तर कालात आजसुद्धा महत्त्वाच्या पदांवरील विविध अधिकारी व्यक्तींना, मंत्र्यांना वगैरे ती काय म्हणतात ती झेड सिक्युरिटी वगैरे देत नाहीत काय? आपल्या सुरक्षिततेला असलेल्या धोक्याबद्दल माहिती असूनही सदर महोदयांनी क्रांतीच्या / क्रांतिकारकांच्या सोयीसाठी आपल्या सुरक्षेची किमान खबरदारीसुद्धा घेऊ नये अशी अपेक्षा होती काय? ("शूरवीर" या शब्दावरून तरी तसे वाटले.) तशी अपेक्षा असेल तर या मुलींना कोणत्याही प्रकारची झडती न घेता लपवलेल्या पिस्तुलांसह जिल्हाधिकार्‍यापर्यंत जाऊ देण्यात आले यातून ती अपेक्षा पूर्णच केली गेली, असे म्हणावे लागेल. (किंवा सुरक्षेच्या खबरदारीमध्ये हलगर्जीपणा झाला असे म्हणावे लागेल - टेक युअर पिक.) एखादी कृती (विशेषतः 'वध' वगैरे) ही क्रांतिकारी कृती कधी होते आणि दहशतवादी/अतिरेकी/गुन्हेगारी कृती कधी होते ही मला कधीही न समजलेली गोष्ट आहे. वरील घटनेची इतर दोन घटनांशी तुलना करू या. १. सदर जिल्हाधिकारी हा मग्रूर असून त्याने सत्याग्रहींवर लाठीमार करून असंख्य सत्याग्रहींना बेदम मारहाण केली म्हणून युगांतरसारख्या क्रांतिकारी संघटनांनी त्याचा वध करण्याचा विडा उचलला / ऑपरेशन ब्लू स्टार नंतर काही शिखांनी इंदिरा गांधींची हत्या करण्याचा विडा उचलला / फाळणीनंतर गांधीजी मुसलमानांचा अनुनय करतात असे वाटल्याने आणि विशेषतः गांधीजींच्या पाकिस्तानला पाकिस्तानचेच पंचावन्न कोटी देण्याच्या आग्रहावर नाराज होऊन नथुराम गोडसे प्रभृतींनी गांधीजींचा वध करण्याचा विडा उचलला. २. जिल्हाधिकार्‍याच्या जिवाला धोका आहे याची कुणकुण असूनही या मुलींना कोणतीही झडती न घेता जिल्हाधिकार्‍यापर्यंत शालीत लपवलेल्या पिस्तुलांसह जाऊ देण्यात आले / आपल्या जिवाला धोका आहे याची पूर्ण माहिती असूनही इंदिरा गांधींनी आपल्या (सशस्त्र) अंगरक्षकांमधून शिखांना वगळण्यास नकार दिला / महात्मा गांधींच्या सुरक्षाव्यवस्थेबद्दल कल्पना नाही, बहुधा तेवढी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवणे शक्यही नसावे आणि गांधीजींचे आपल्या सुरक्षाव्यवस्थेबद्दलचे नेमके विचार काय होते याची कल्पना नाही, परंतु नथुराम गोडसे पिस्तुलासह गांधीजींपर्यंत पोहोचू शकला. ३. पिस्तुलासह जिल्हाधिकार्‍यापर्यंत पोहोचलेल्या मुलींनी जिल्हाधिकार्‍यावर गोळ्या झाडून त्याचा वध केला / इंदिरा गांधींच्या शिख सशस्त्र अंगरक्षकांनी इंदिरा गांधींचा वध केला / पिस्तुलासह गांधीजींपर्यंत पोहोचलेल्या नथुरामने गांधीजींचा वध केला. या तीन घटनांमध्ये नेमका फरक काय? कोणाला तरी आपल्यावर, आपल्या "राष्ट्रा"वर अन्याय आणि जुलूम होतोय असे वाटले, त्याने/तिने त्यासाठी जी व्यक्ती जबाबदार वाटली तिच्या वधाचा पण केला, जिचा वध करायचा त्या व्यक्तीने पुरेशी काळजी न घेतल्यामुळे या व्यक्ती आपापल्या लक्ष्यांपरंत शस्त्रांसह पोहोचू शकल्या आणि त्यांनी आपापल्या लक्ष्यांचा पॉइंट ब्लँक रेंजवर (मराठी?) गोळ्या झाडून वध केला. यातले कोठले कृत्य समर्थनीय आणि कोठले नाही आणि का? यातले "क्रांतिकारक" कोण आणि "दहशतवादी/अतिरेकी/खुनी" कोण आणि कोणत्या निकषांवर? "क्रांतिकारक" म्हणून जेव्हा आपण कोणाचा गौरव करतो, तो पूर्णपणे विचार करून, समजूनउमजून करतो, की केवळ आपल्याला तसे करायला शिकवले गेले आहे म्हणून करतो, हीही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण विचार न करता काहीही केले, तर मग आम्हाला कोणीही (पर्यायाने आमच्या नेत्यांनी) काहीही सांगावे आणि आम्ही ते मागचापुढचा विचार न करता आचरावे, अशी परिस्थिती होते. आणि मग "मुकी बिचारी कुणी हाका रे" ही आमची परिस्थिती होती, हीच आहे, फक्त हाकणारे बदललेत, यापेक्षा तेव्हात आणि आतात काहीही फरक राहत नाही.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 17/12/2008 - 07:21
वा टग्याजी! १००% विचार पटले.
कुठल्याही एकाच दृष्टीकोनाशी आपण स्वतःला बांधून घेतले ("मॅरींग टू अ सर्टन स्कूल ऑफ थॉट") तर एकूण व्यापक अशा सत्याकडे दुर्लक्ष होते याचे , ही चर्चा म्हणजे एक चांगले उदाहरण आहे.
मुक्तसुनित ह्यंच्या ह्या विधानाचे विस्तृत विवेचन वरील प्रतिसादात वाचायला मिळाले. एकदा का 'क्रांतीकारक' 'जाज्वल्य भक्ति' 'देशासाठी बलिदान' वगैरे उल्लेख केले की बहुतेक लोक भावनेच्या भरात वाहुन जातात. आणि भावनिक झाले की तर्कबुद्धी वापरणे अशक्य होउन बसते, त्यामुळे वरील (कडू) व्यापक सत्ये दुर्लक्षली जाऊन त्यावर फक्त विखारी टीका करण्याचे प्रयत्न होतात. 'किव येते', 'हलकट विचार' इ.इ. शेरेबाजी त्यातुनच होते असे वाटते. गांधीवादी असो वा क्रांतीकारक सगळ्यांचे अंतिम ध्येय स्वातंत्र्यच होते, पण म्हणून आंधळेपणाने त्यांच्या कुठल्याही कृतीचे समर्थन वा अभिवादन करण्यापेक्षा चिकित्सक वृत्तीने त्यातले अनुकरणीय तेवढेच वेचुन काढणे अधिक योग्य. (टग्याजींचा पंखा) कोलबेर

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

मूळ मुद्दा इथे हा आहे की बंगालच्या वाघिणी म्हणा किंवा इतरही क्रांतिकारक म्हणा ज्यानी ज्यानी हत्या केल्या त्या ब्रिटीश अधिकार्‍यांच्या किंवा त्या गोष्टीला कारणीभूत ठरलेल्या लोकांच्या केल्या. त्यांच्यातिक कोणीही रेल्वेस्थानकात, बसमधे बॉम्बस्फोट किंवा बेछूट गोळीबार नाही केला. सामान्य जनतेला त्यात वेठीला धरले नाही कोणी. " हनुमंत महाबळी रावणाची लंका जाळी, होते बळ म्हणूनि न जाळि झोपड्या गोरगरीबांच्या" हा फरक लक्षात घ्यावा. आणि क्रांतिकारकानी फक्त खजिन्याचीच लूट केली असं नव्हे. मध्यंतरी तर असे वाचनात आले की क्रांतिकारकानी खंडोबाचे देवस्थान लूटूनही क्रांतिकार्यासाठी पैसा जमा केला होता. आणि त्याबद्दल जनतेने त्याना कदाचित माफ अशासाठी केले असेल कारण त्यांचा त्यामागचा हेतू स्वतःच्या घरचे गल्ले न भरता देश स्वतंत्र व्हावा यासाठी काहीतरी करणे. गांधींनी संरक्षण अथवा शस्त्र जवळ बाळगणे नाकारले असेल तर ते ठीक आहे कारण ते त्यांच्या तत्वानुसार वागत होते. पण इंदिराजी आणि तो ब्रिटीश अधिकारी याना असा अतिरेकी आत्मविश्वास होता की आपल्याला कोण मारू शकत नाही. आणि त्यानेच त्यांचा घात केला. कारण विचार न करता काहीही केले, तर मग आम्हाला कोणीही (पर्यायाने आमच्या नेत्यांनी) काहीही सांगावे आणि आम्ही ते मागचापुढचा विचार न करता आचरावे, अशी परिस्थिती होते. आणि मग "मुकी बिचारी कुणी हाका रे" ही आमची परिस्थिती होती, हीच आहे, फक्त हाकणारे बदललेत, यापेक्षा तेव्हात आणि आतात काहीही फरक राहत नाही. हे बाकी खरे बोललात. ते वारंवार दिसलेच आहे. :) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

टग्या 17/12/2008 - 21:26
मूळ मुद्दा इथे हा आहे की बंगालच्या वाघिणी म्हणा किंवा इतरही क्रांतिकारक म्हणा ज्यानी ज्यानी हत्या केल्या त्या ब्रिटीश अधिकार्‍यांच्या किंवा त्या गोष्टीला कारणीभूत ठरलेल्या लोकांच्या केल्या. त्यांच्यातिक कोणीही रेल्वेस्थानकात, बसमधे बॉम्बस्फोट किंवा बेछूट गोळीबार नाही केला. सामान्य जनतेला त्यात वेठीला धरले नाही कोणी.
इंदिरा गांधींच्या शिख अंगरक्षकांनी इंदिरा गांधींची हत्या केली, सामान्य जनतेवर गोळीबार नाही केला. नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींची हत्या केली, जमलेल्या इतर उपस्थितांवर गोळ्या झाडल्या नाहीत.
आणि क्रांतिकारकानी फक्त खजिन्याचीच लूट केली असं नव्हे. मध्यंतरी तर असे वाचनात आले की क्रांतिकारकानी खंडोबाचे देवस्थान लूटूनही क्रांतिकार्यासाठी पैसा जमा केला होता. आणि त्याबद्दल जनतेने त्याना कदाचित माफ अशासाठी केले असेल कारण त्यांचा त्यामागचा हेतू स्वतःच्या घरचे गल्ले न भरता देश स्वतंत्र व्हावा यासाठी काहीतरी करणे.
जनतेने माफ केले म्हणजे नेमके कोणी माफ केले? खंडोबाचे देवस्थान त्या काळी ज्यांच्या मालकीचे होते (किंवा ट्रस्टखाली असेल तर ज्या ट्रस्टच्या अधिपत्याखाली होते) त्यांच्या किंवा खंडोबाच्या देवस्थानात त्या काळात दर्शनासाठी किंवा श्रद्धेपोटी नित्याने जा-ये करणार्‍या भक्तांच्या मतांची किंवा भावनांची चाचपणी (सर्व्हे वगैरे) कोणी केली होती काय? आणि माफ केले म्हणजे नेमके काय केले? दुसरा काही पर्याय होता काय? की 'पब्लिक मेमरी इज़ शॉर्ट' याचे हे उदाहरण आहे? क्रांतिकारकांचा हेतू स्वतःचे गल्ले भरण्याचा नव्हता हे शतशः मान्य. पण तरीही देवस्थानाची संपत्ती देवस्थानाच्या परवानगीशिवाय वापरणे - ज्या कार्यासाठी वापरायचे ते कितीही उदात्त असले तरी - समर्थनीय होते काय? देवस्थानाच्या मालकांना / विश्वस्तांना ते कार्य रास्त आणि उदात्त वाटून त्यांनी स्वखुशीने ती संपत्ती क्रांतिकारकांना दान दिली असती तर गोष्ट वेगळी. गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन "आपण आपल्या गल्लीसाठी करतो आहोत", "ही आपल्या गल्लीसाठी अभिमानाची गोष्ट आहे", "त्याने आपल्या गल्लीची एकी वाढते" वगैरे कितीही उदात्त हेतूंनी करायचे म्हटले, तरी त्यासाठी वर्गणीची जबरदस्ती करणे किंवा एखाद्याने स्वेच्छेने वर्गणी द्यायचे नाकारले तर "नाही देत काय वर्गणी? गल्लीत ये, मग घेतोच बघून!" असे म्हणणे हे समर्थनीय होते काय? त्याने मूळ कार्याची उदात्तता टिकून राहते काय? हे उदाहरण आणि क्रांतीसाठी देवस्थान लुटणे यात नेमका फरक काय?
पण इंदिराजी आणि तो ब्रिटीश अधिकारी याना असा अतिरेकी आत्मविश्वास होता की आपल्याला कोण मारू शकत नाही. आणि त्यानेच त्यांचा घात केला.
संबंधित ब्रिटिश अधिकार्‍याबाबत कल्पना नाही, परंतु इंदिरा गांधींच्या बाबतीत माझ्या अर्धवट ऐकीव माहितीप्रमाणे (चूभूद्याघ्या!) इंदिरा गांधींना त्यांच्या जिवावरील संभाव्य धोक्याची पूर्वसूचना आणि अंगरक्षकांमध्ये शिखांची नेमणूक न करण्याचा सल्ला गुप्तचरांकडून मिळाला होता, परंतु "हे खरे असले तरीही मी माझ्या अंगरक्षकांच्या नेमणुकीत भेदभाव करू शकत नाही" म्हणून त्यांनी तो नाकारला होता. आधी म्हटल्याप्रमाणे ही ऐकीव माहिती आहे, त्यात कितपत तथ्य आहे याची मला कल्पना नाही, स्वतंत्र वाचनातून याची मी अद्याप खात्री करून घेतलेली नाही, परंतु यात तथ्य असल्यास त्याला अतिरेकी आत्मविश्वास म्हणावा की तत्त्वनिष्ठा की आणखी काही, याचा निर्णय मी करू शकलेलो नाही. अवांतर:
" हनुमंत महाबळी रावणाची लंका जाळी, होते बळ म्हणूनि न जाळि झोपड्या गोरगरीबांच्या"हा फरक लक्षात घ्यावा.
लंकेत गरीब नव्हते का? लंकेतल्या झोपड्यांत राहणार्‍या गरिबांनी सीतेचे हरण केले होते का?

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 17/12/2008 - 21:31
लंकेत गरीब नसावेत. कारण लंका सोन्याची होती. (सोन्या हे रावणाचे लहानपणीचे नाव). त्यामुळे कोणालाही वाटले तर काढ एक सुवर्णवीट आणि वीक असे करु शकत असावेत. आपला, (रावण) आजानुकर्ण

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

एकलव्य 17/12/2008 - 08:20
टगेदादा - आपले भलतेच ब्रेनवॉशिंग झालेले दिसते आहे. चला आम्हीही सामील होतो आणि लिस्ट वाढवितो... सांगा बरे - फरक तो काय?
  1. शिवाजी महाराजांनी लाल महालावर रात्री घातलेली धाड आणि अफजलने केलेला पार्लमेन्टवरील हल्लाबोल
  2. मराठ्यांनी फोडलेले दिल्लीचे तख्त आणि अफगाणिस्तानात तालिबान्यांनी महाबुद्धाचा केलेला ध्वंस
  3. भगतसिंगाने झाडलेल्या गोळ्या आणि जनरल डायरने दिलेला गोळीबाराचा आदेश
  4. सुभाषबाबूंनी इशान्य भारतावर केलेले आक्रमण आणि हिटलरने इंग्रजांवर म्हणून भारताशी पत्करलेले वैर
  5. बांगला मुक्तिसंघर्ष आणि डायरेक्ट ऍक्शन फॉर पाकिस्तान
  6. ...
म्हटले तर फरक आहे आणि नाहीच म्हटले तर काहीही फरक नाही. तर्क चालू देत... त्याने नुकसान काहीही नाही. (मॅझिनी) एकलव्य Intelligence KILLS Judgment... Slowly but Surely!

In reply to by एकलव्य

आजानुकर्ण 17/12/2008 - 09:16
मराठ्यांनी दिल्लीचे तख्त वगैरे काही फोडलेले नाही. दिल्लीपर्यंत गेलेले मराठे हे बिकट परिस्थितीची लागल्याची जाणीव होईपर्यंत बादशहाशीच एकनिष्ठ होते आणि सैनिकांचे पगार द्यायला पैसे नव्हते म्हणून मग पेशव्यांनी सिंहासनाचा चांदीचा पत्रा विकून पैसे गोळा केले. त्यालाच आपण तख्त वगैरे फोडले असे म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेतो. आपला, (वस्तुनिष्ठ) सुमेरसिंग आजानुकर्ण गारदी

In reply to by आजानुकर्ण

कोलबेर 17/12/2008 - 09:47
अजानुकर्ण शेठ, तुमच्यामुळे ही माहिती नविनच कळली. भगतसिंगाने घातलेल्या गोळ्यांमध्ये किती निरपराध मेले आणि डायरबाबाने घातलेल्या गोळ्यांमध्ये किती मेले ह्यांचा ताळमेळ लावला तर ती तुलना देखिल लिष्ट मधुन वगळावी लागेल. सुभाषबाबुंनी केलेले इशान्य भारतावरील (?) आक्रमण ह्या विषयी मात्र फारशी माहिती नाही. -- “The sign of an intelligent people is their ability to control their emotions by the application of reason”

In reply to by कोलबेर

एकलव्य 17/12/2008 - 17:55
भगतसिंगाने निरपराधांवर गोळ्या झाडल्या नाहीत असे आपण म्हणता आहात पण इंग्रज न्यायाधीश तसे म्हणत नाही. डायरचेही तसेच... आपण पाहाल त्याप्रमाणे आहे. शिवाजीला वाट चुकलेला देशभक्त म्हणणारेही कमी नाहीत. ही तुलना वगळायला हवी हे मान्य आहे पण वगळायचीच तर सगळ्याच वगळाव्यात. तसे यादी वाढवणारे बक्कळ आहेतच म्हणा. चीअर्स - एकलव्य

In reply to by एकलव्य

कोलबेर 17/12/2008 - 21:39
ही तुलना वगळायला हवी हे मान्य आहे पण वगळायचीच तर सगळ्याच वगळाव्यात.
टगोबांची उदाहरणे खोडून काढायला (त्यातील फोलपणा दाखवायला) तुम्ही मुद्दामच ही उदाहरणे दिलीत ह्याची कल्पना आहे, पण तरिही सगळ्याच तुलना वगळायच्या म्हंटलं तर हे चिकित्सा करुनच ठरवावे (भगतसिंगांच्या उदाहरणा सारखी) असे वाटते. चीअर्स - कोलबेर

In reply to by आजानुकर्ण

छोटा डॉन 17/12/2008 - 22:42
दिल्लीपर्यंत गेलेले मराठे हे बिकट परिस्थितीची लागल्याची जाणीव होईपर्यंत बादशहाशीच एकनिष्ठ होते आणि सैनिकांचे पगार द्यायला पैसे नव्हते म्हणून मग पेशव्यांनी सिंहासनाचा चांदीचा पत्रा विकून पैसे गोळा केले. त्यालाच आपण तख्त वगैरे फोडले असे म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेतो.
अगदी असेच म्हणतो ... मी जो काही अभ्यास केला आहे त्यातुन हीच परिस्थीती स्पष्ट होतो. मराठ्यांना तख्त फोडले खरे पण ते बहादूरी वगैरे नाही तर "गरज" म्हणुन फोडले हे सत्य आहे. आजानुकर्णाशी सहमत ...! ------ छोटा डॉन

In reply to by एकलव्य

टग्या 17/12/2008 - 20:46
टगेदादा - आपले भलतेच ब्रेनवॉशिंग झालेले दिसते आहे.
स्वतःच्या हातांनी धुवून जितके स्वच्छ करायला जमले तितके केलेय बुवा. आता लाँड्रीत धुतल्यासारखे एकसारखे पांढरेशुभ्र झाले नसेल, एखाददुसरा डाग राहिलाही असेल - चालायचेच. शेवटी स्वावलंबनाचा मार्ग खरा.
सांगा बरे - फरक तो काय?
तेच तर विचारतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय - समजून घ्यायला आवडेल. मला कळलेला नाही. तुम्हाला कळला असेल तर जरा तुम्हीच समजावून सांगा की!
म्हटले तर फरक आहे आणि नाहीच म्हटले तर काहीही फरक नाही.
फरक आहे असे सतत सांगण्यात, ठसवण्यात आले आहे. फक्त नेमका काय फरक आहे ते कोणी स्पष्ट केलेले नाही. आता इतके जण सांगतात म्हणजे कदाचित त्यात तथ्य असूही शकेल. पण नेमके काय ते स्वतःला नीट समजल्याशिवाय केवळ सगळे सांगतात, सांगत आले आहेत म्हणून मानायचे काय? म्हणून तर म्हणतोय की फरक नीट समजावून सांगा; समजला तर मानायला काहीच हरकत नाही. पण न समजता केवळ 'बाबा वाक्यं प्रमाणम्' (किंवा 'संघं शरणं गच्छामि') म्हणून विश्वास ठेवणे माझ्यापुरते मला तरी योग्य वाटत नाही.

In reply to by विसोबा खेचर

कलंत्री 14/12/2008 - 12:31
खरं आहे! एवढंच नव्हे, तर 'भारताला आजादी विना खड्ग, विना ढाल मिळाली हो..!' अशी गीते गाण्यातच आम्ही धन्यता मानतो..! ही अवांतर आणि विषयाला भरकटवणारी प्रतिक्रिया आहे. संपादक मंडळानी यावर टिपण्णी करावी. तात्या : गांधी हलके आहे म्हणून कोणाचे कार्य उत्कट होत नाही असा विचार ठेवावा. शेवटी आपण सर्व एक आहोत आणि आपल्यासारख्या दिग्ग्जाच्या प्रतिक्रिया मूळ विषय अकारणच भरकटवतात.

In reply to by कलंत्री

अवलिया 14/12/2008 - 12:37
ही अवांतर आणि विषयाला भरकटवणारी प्रतिक्रिया आहे. संपादक मंडळानी यावर टिपण्णी करावी. मला अजिबात असे वाटत नाही. उलट भारताला स्वातंत्र्य अहिंसेतुन मिळाले नाही, किंवा क्रांतिकारकांमुळे मिळाले नाही. दुस-या महायुद्धामुळे बेजार झालेल्या आंग्लांना ह्या प्रचंड देशाचा कारभार करणे अशक्य झाले म्हणुन ते निघुन गेले हे जितक्या लवकर आपण समजु तितके आपल्याला चांगले असेल. यात अहिंसावाद्यांचा किंवा क्रांतीकारकांचा अपमान करण्याचा हेतु नाही, पण भावनाविवश होवुन इतिहासाकडे आपण पाहु नये. अर्थात इंग्रजांना अहिंसावाद्यांपेक्षा क्रांतीकारकांचे भय जास्त वाटत होते हे मात्र १०० टक्के नक्कीच. -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by कलंत्री

सर्वसाक्षी 14/12/2008 - 13:13
द्वारकानाथजी, जर स्वातंत्रय्प्राप्तीसाठी सर्व मार्ग अनुसरणीय होते व जर स्वातंत्र्यप्राप्ती ही केवळ घोषणा, आंदोलने व मोर्चे यातुन न होता त्यात असंख्य क्रांतिकारकांचा सिंहाचा वाटा आहे तर सरकारी प्रचार यंत्रणेने दे दी हमे आजादी बीना खड्ग बीना ढाल असा खोटा व स्वतःला सोयीचा व हिताचा प्रचार करणे हे चीड आणणारे आहे, सदर लेख क्रांतिकारकांवर असल्याने या प्रचाराचा निषेध अवांतर ठरत नाही.

शंकरराव 14/12/2008 - 04:14
अवघ्या १४व्या वर्षी असा असामान्य पराक्रम करणाऱ्या या मुलींची नावे सुद्धा आपल्याला माहित नाहीत याची खंत वाटते. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यात त्यांचा वाघिणीचा वाटा आहे. आज त्यांच्या शौर्यकृत्याच्या ७७ व्या स्मरणदिनी त्या दोघींना सादर अभिवादन. आसेच म्हणतो.... स्वातंत्र चळवळीतील सर्व क्रांतिकरकांना व त्यांच्यातील निस्सिम देशभक्तिला शतशः वंदन प्रस्तुत ऍतिहासिक लेखाबद्द्ल सर्वसाक्षी याचे अनेक आभार

बगाराम 14/12/2008 - 04:18
या लहान मुलींनी पिस्तुल प्रथमच हाताळले होते. पैकी सुनिती ही कृश अंगकाठीची, तिची बोटे हडकुळी होती. तिला मागचा चाप अंगठ्याने ओढायला जमत नव्हता, तिने आपल्या प्रशिक्षकाला शक्कल सुचविली की मला अंगठ्या ऐवजी मधल्या बोटाने चाप मागे ओढयला शिकव! ही शक्कल लागु पडली. या दोघींनी दोन दिवस सराव केल. तेवढा पुरेसा होता कारण एक तर वेळ नव्हता व दुसरे म्हणजे गोळ्या अगदी जवळुन झाडायच्या होत्या. अवघ्या १४ वर्षे वयाच्या मुलिंना हातात बंदुकी देउन खून करायला लावणारे आणि तालिबानी अल-कायदा ट्रेनिंग कँपमधले अतिरेकी ह्यांच्यात काय फरक? १४ वर्षाच्या मुलींना काय समज असते की त्यांना आपले जीवित धोक्यात घालुन असले कृत्य करायला भाग पाडावे? वरील वर्णन वाचुन तर अंगावर काटा आला. कोवळ्या मुलिंना शस्त्रास्त्रे चालवायला शिकवुन जीवावर उदार करणारे हे देशभक्त मला तरी आदरस्थनी वाटले नाहीत. आपल्याला ’क’ ऐवजी राजबंद्यांच ’ब’ वर्ग देण्यात यावा यासाठी अन्नस्त्याग्रह केला. आवाज उठवुनही दाद मिळत नाही हे समजल्यावर उपोषणास प्रारंभ केला व अखेर त्याची बदली केली गेली. हे वाचुन गांधीजींची टवाळी करणारे काय म्हणतील ते वाचायला आवडेल.

In reply to by बगाराम

केदार 14/12/2008 - 04:47
बगाराम, ध्येय जेव्हा स्वातंत्र्य असते तेव्हा वयाला मर्यादा नसते. तूमचा तालिबान विषयीचा अभ्यास कच्चा असल्याचे लगेच दिसतेय कारण जेव्हा अफगाण, तालिबान्यांनी स्वतंत्र्य केले तेव्हां अफगाणात दिवाळी साजरी झाली होती हे आपल्याला माहीती नसावे. आजची तालिबान आणि तेव्हांची तालिबान खचितच वेगळी होती, थोडे खोलात शिरा. मग बोलू. तूम्ही फ्क्त आजच्याच तालिबानला खरे समजताय. कूठल्याही चळवळीला सामान्यांची मान्यता लाभली की फ्क्त चळवळ राहत नाही. त्यामूळे उद्य १० वर्षाच्या बालकाची कथा कोणी लिहीली ( भारतीय / अभारतीय) व ते स्वातंत्र्य प्राप्ती साठी बलिदान झाले असेल तर आम्हांस त्या व्यक्तीचा आदरच वाटेल. उपोषन हे गांधीजीनीच अस्तित्वात आणले, आणी उपोशन केले म्हणजेच अहिंसावादी असा सुर जो तूमच्या पोस्ट मध्ये लागतोय तो निश्चीतच चूक आहे. आणि जे अहिसांवादी नसतात (उदा सावरकर, नेताजी, ह्या भगिनी, मी स्वत :) इ इ) त्या सर्वांना 'कूठलाही' मार्ग चालतो. हिंसेंचा वा अहिसेंचा. की फरक पैंदा यारो. ताक. - गाधींजीची टवाळी करानारे हे कोण हे मला अजुन माहीत नाही पण तरीही उत्तर दिले कारण मि ही त्यांचा डोळस विरोधक आहेच.

In reply to by केदार

बगाराम 14/12/2008 - 04:50
माझ्या प्रतिक्रिया उडवल्या जात आहेत. मी कसे काय उत्त्तर देऊ? तालिबानचे समर्थन करणार असाल तर तशीही माझी शरणागतीच आहे.

In reply to by बगाराम

विसोबा खेचर 14/12/2008 - 05:02
सदर लेखावरील आपले मत समजले. आपला अभिप्राय व्यक्त करण्याची संधी आपल्याला दिली गेली आहे. मलाही आपण क्वेश्चन केले आहे. परंतु पक्या किंवा इतर कुणी या लेखाबद्दल त्यांचे मत लिहिल्यास, अथवा अभिवादन केल्यास प्रत्येकालाच आपण जाहीरपणे क्वेश्चन करू शकत नाही. आपण खरड पाठवून त्या विषयासंदर्भात एखाद्याशी चर्चा करू शकता. साक्षींचा सदर लेख हा काय चूक, काय बरोबर यावर भाष्य न करता इतिहासात जे घडलं आणि त्या मुलींनी जे केलं त्यावर भाष्य करणारा आहे.. असो, इथे अधिक विषयांतर न करता या संदर्भात आपण माझ्याशी खरडीतून संपर्क साधू शकता. शक्य झाल्यास व इच्छा असल्यास उत्तर देईन.. तात्या.

In reply to by बगाराम

सर्वसाक्षी 14/12/2008 - 13:06
अवघ्या १४ वर्षे वयाच्या मुलिंना हातात बंदुकी देउन खून करायला लावणारे आणि तालिबानी अल-कायदा ट्रेनिंग कँपमधले अतिरेकी ह्यांच्यात काय फरक> इतिहास जरा नीट वाचा. वयाच्या १४ व्या वर्षी ज्या मुलींनी असिम शौर्य दाखवले त्यात आपल्याला क्रांतिकारकांचे तालिबानी वर्तन दिसले यात आपली मनोवृत्ती दिसुन आली क्रांतिकारक वा त्या वाघिणी यांना यत्किंचितही कमीपणा आला नाही. या वीरांगना ध्येयाने प्रेरित होऊन स्वतःच्या जीवावर उदार झाल्या होत्या, त्याना पढवुन वा बुद्धिभेद करुन तयार केलेल्या नव्हत्या. १४ व्या वर्षी समज नसते हे विधान आपले व्यक्तिगत मत वा आपला अनुभव असू शकतो पण ते जागतिक सत्य नव्हे. जरा भारतिय स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास एकदा वाचा, अनेक शाळकरी हुतात्मे दिसतील. बाकी आपली आदरस्थाने हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे त्यावर माझे काही भाष्य नाही. उपोषणाविषयीचे आपले घोर अज्ञान आपण जाहिर केले आहेत. क्रांतिकारकांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कोणताही मार्ग वर्ज्य नव्हता. तुरुंगात हातापायात बेड्यांनी बद्ध असतानाही आपल्या अधिकारांसाठी आणि स्वाभिमानासाठी क्रांतिकारकांनी तेजस्वी उपोषणे केलेली आहेत. अहो जे फासावर जाणारच होते ते उपोषणाने देहत्याग करायला का भितील? गांधींचा विषय विनाकारण घुसडला आहातच तर ऐका: माझ्या अल्पशा माहितीनुसार सशस्त्र क्रांतिच्या पुरस्कर्त्यांपैकी तीन क्रांतिवीरांनी आपल्या ध्येयाखातर व राष्ट्राभिमानाखातर आमरण उपोषण केले व देहत्यागाने ते अजरामर झाले. ते तीन हुतात्मे आहेतः १) हुतात्मा मणींद्र बॅनर्जी - २० जून १९३४ फतेगढ तुरुंग २) हुतात्मा जतिन दास - १३ सप्टेंबर १९२९ लाहोर तुरुंग ३) हुतात्मा महाविरसिंह - १७ मे १९३३ अंदमान तुरुंग आता जरा आपण प्राणांतिक उपोषणाने हौतात्म्य पावलेल्या तीन गांधीवाद्यांचा तपशिल द्याल का? स्वतः गांधींनी तरअसे काही केले नव्हते.

In reply to by सर्वसाक्षी

सर्वसाक्षी साहेब, जाउ दे. वार झोन म्हणजे काय? आणि वार झोन मधे वय नसते. हे कळणे खूप जणाना कठीण जाते. तालीबान्याबरोबर थोडीशी सुद्दा तुलना हास्यास्पद आहे.

In reply to by विनायक प्रभू

सर्वसाक्षी 14/12/2008 - 18:04
प्रभुशेट, अहो १४ वर्षी समज नसते हे ऐकुन मला तर जाम हसायला आलं. नापास झालेली काही पोरे ९५ टक्के मिळविणार्‍यांबद्दल असेच बोलतात 'मास्तरांचे चमचे आहेत/ कॉपी केली असेल/ मास्तरने पैसे खाऊन पेपर आधीच दिला असेल ..नाहितर इतके गुण मिळुच शकत नाहीत'. चालायचेच, कारण त्यांची कुवत तितपतच असते त्यामुळे त्यांना कुणाला बुद्धी असेल व कुणी कष्ट केले असतील असा विचारच करता येत नाही. किंवा असे कष्ट करायची तयारी नसते. मग अशी मुक्ताफळे उधळण्यापलिकडे ते दुसरे काय करणार? पुढे नोकरीत असेच होते. एखाद्या कर्तबगार मुलीने अल्पावधीत पदोन्नती मिळवली तर अनेक वर्षे खुर्चीत बसून दात कोरणारे छातीवर हात ठोकुन सांगतात की आहो आम्हाला ५ वर्षात मिळत नाही इथे हिला एका वर्षात मिळाले यात हिचे कर्तृत्व नाही तर बॉसचे आहे, तिने त्याला 'खूष' केला असेल. ज्या वयात आपल्याला काही समजत नसते वा काही करायची धमक नसते आणि त्या वयात इतरांनी काही असामान्य कृत्य केले तर ते मान्य न करायची रोगट मानसिकता असलेले नेमेकी हिच प्रतिक्रिया देतात. याना उदाहरणे शोधायचीच म्हटली तर खूप मिळतील, पण शोधणार कोण? आणि कशाला? लहानशी रांगोळी काढायची तरी कष्ट पडतात, मात्र जाता जाता पायाने ती फराटुन टाकायला कष्ट वा बुद्धी लागत नाही. कोणी रांगोळ्या रेखतात, कोणी पाहतात व कौतुक करतात, कुणी नाक मुरडतात तर कुणी त्या फराटुन टाकतात. ज्याची त्याची मानसिकता.

In reply to by विनायक प्रभू

आजानुकर्ण 14/12/2008 - 18:30
दोन प्रश्नः १. हमास, हिजबुल्ला पासून ते तालिबान पर्यंत सगळे आधुनिक क्रांतीकारक लहान मुलांचे ब्रेनवॉशिंग करत राहतात हे वारंवार दिसले आहे. पॅलेस्टिनींवर होणाऱ्या अत्त्याचारांच्या फिती वारंवार दाखवून ज्यू हे डुकरापासून जन्मलेले आहेत, हिंदू माकडाचे वंशज आहेत, हे धर्म घाण आहेत हे लहान मुलांच्या मनांवर बिंबवले जाते. या ब्रेनवॉशिंगमध्ये आणि वरील ब्रेनवॉशिंगमध्ये काय फरक आहे हे मला समजत नाही. २. आजकाल सामनामध्ये हिंदुस्तानचे इस्लामिस्तान होणार वगैरे पेटवापेटवीचे प्रयत्न चालले आहेत. समजा हे इस्लामिस्तान दुर्दैवाने यशस्वी झालेच तर कसाब आणि इतर ९ दहशतवादी हे नव्या इस्लामी राष्ट्रात क्रांतीकारक ठरतील का? हे प्रश्न प्रामाणिकपणे विचारत आहे. माझी कीव वगैरे न करता याची उत्तरे द्यावीत जेणे करून माझ्या संकल्पना अधिक स्पष्ट होतील.

In reply to by आजानुकर्ण

अतिरेकी तयार करुन दुस-या देशात पाठविणे आणि देशभक्तीने प्रेरीत होणे हा एक फरक आहे. आजकाल अतिरेकी तयार करणे हा एक कारखाना आहे. ब्रेन वॉशींग ची प्रोसेस सहा महिने ते एक वर्ष चालते. वरील लेखात स्पाँटेनियस रिऍक्शन दिसते.

In reply to by विनायक प्रभू

बगाराम 14/12/2008 - 21:10
स्वतंत्र कश्मिर साठी लढणार्‍या अतिरेक्यांना क्रांतीवीर म्हणणार का?

In reply to by बगाराम

अभिजीत 14/12/2008 - 21:19
स्वतंत्र कश्मिर साठी लढणार्‍या अतिरेक्यांना क्रांतीवीर म्हणणार का? नाही. त्यांना अतिरेकीच म्हणणार.

In reply to by बगाराम

सर्वसाक्षी 14/12/2008 - 21:40
हा हिंदुस्थानचा भाग आहे. त्या भागाचा लचका तोडण्यासाठी परक्या देशातून शत्रू आक्रमण करीत आहे, दहशतवाद पसरवीत आहे. ही वस्तुस्थिती आहे. आता त्या घूसखोरांना क्रांतिवीर म्हणायचे की अतिरेकी ते आपणच ठरवा.

In reply to by सर्वसाक्षी

बगाराम 14/12/2008 - 21:45
हिंदुस्थानही त्याकाळी ब्रिटीश साम्राज्याचाच भाग होता. हे सगळे आपण नदीच्या कुठल्या तीरावर आहोत ह्यावर ठरते. मी अतिरेक्यांना अतिरेकीच म्हणणार. १४व्या वर्षी अल्लड वयात बंदुका हाती देणे हा अतिरेकच. आणि खुद्द कश्मिर मधील अतिरेकी? त्यांना काय म्हणाल मग?

In reply to by बगाराम

सर्वसाक्षी 14/12/2008 - 22:11
आपण ब्रिटिशधर्जिणे असाल तर तमाम क्रंतिकारक आपल्या नजरते अतिरेकी असणे स्वाभाविक आहे. आम्ही हिंदुस्थानच्या वतीने विचार करीत असल्याने आम्हाले ते क्रांतिकारक वंदनिय हुतात्मे वाटतात.

In reply to by बगाराम

बगाभाऊ, क्रांतिकारक असो वा अहिंसावादी, दोन्ही प्रकारांतल्या स्वातंत्र्यवीरांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपल्या मातृभूमीस स्वतंत्र करण्यासाठी प्राण्याच्या अहुत्या दिल्या. त्यांच्या बलिदानांमुळे आपण येथे अशा मिमांसा करण्याच्या परिस्थितीत आहोत. याचे भान ठेऊन त्या क्रांतिवीरांना मानचा मुजरा करावा... पुढील पिढीसमोर आदर्श सांगत अशा देशभक्तांच्या कथा प्रत्येकाच्या मुखी वदल्या जाऊन पुन्हा देशभक्तीच्या चैतन्याने वातावरण मुग्ध करावे असे मला वाटते. वयाच्या बाबतीत योग्य-अयोग्यचा खल करण्यासाठी एक स्वतंत्र धागा सुरु केलात तर तेथे येऊन आम्ही आपली मते मांडू. पण येथे स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती उद्घृत करताना असले विचार करण्याऐवजी विधायक लेखन करावे अशी नम्र विनंती. त्या खलासाठी आपण अगदी श्रावण बाळ (कोवळ्या वयात आई वडिलांचे ओझे वाहने), अभिमन्यू (बालवयात वडिलांच्या सांगण्यामुळे युद्धात उतरणे) ते बाबू गेणू (कुणाच्या तरी ब्रेनवाशिंग मुळे नीच व कृर इंग्रज अधिकार्‍यांकडून उघड्या छातीवर गोळ्या घेण्यासाठी निशस्त्र सामोरे जाणे) पर्यंत सगळ्या उदाहरणांवर कीस पाडा... आम्ही आपले अनुमोदन करु पण इथे असले काही आमच्याच्याने होणार नाही. वंदे मातरम्! आपला, (देशप्रेमी) भास्कर संपादित आम्ही येथे वसतो.

In reply to by भास्कर केन्डे

बगाराम 16/12/2008 - 06:39
माननीय केंडेमहोदय, आपल्याला न पटलेल्या विचारांना 'हलकट' असे संबोधायला हे काही संघाचे कार्यालय नव्हे. इथल्या संपादक मंडळाने कृपया ह्या जहाल विचारसरणीच्या लोकांच्या भाषेला लगाम घालावा. अश्या शेरेबाजीमुळे चर्चा होणे अशक्य होउन बसते आणि हुल्लडबाजी करणार्‍यांना आपला मुद्दाच पुढे रेटल्याचे समाधान मिळते. -बगाराम

In reply to by सर्वसाक्षी

कलंत्री 14/12/2008 - 20:53
आता जरा आपण प्राणांतिक उपोषणाने हौतात्म्य पावलेल्या तीन गांधीवाद्यांचा तपशिल द्याल का? स्वतः गांधींनी तरअसे काही केले नव्हते. कोणास ठाऊक आज अनेक़जण गांधीवादाचे / विचाराचे समर्थन करण्यास पुढे येत आहेत ही मला सुखावणारी गोष्ट आहे. संकेतस्थळाचे निर्माण झाले तेंव्हा आम्ही गांधीवादावर काही लिहावे आणि सावरकरवादी, क्रांतिकारकवादी आणि संघाच्या विचारसरणीच्या लोकांनी तेच ते प्रश्न विचारावे आणि राष्ट्रीय लढ्याच्या संदर्भात आम्ही यथायोग्य उत्तर द्यावे आणि या लोकांचे परत परत तेच ती प्रश्न यावीत असे ठरलेले असे. आता वरील प्रश्नाचे उत्तर देणे सोपे आहे कारण स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा आणि त्याचे नायकत्व निर्विवादपणे कॉग्रेस आणि गांधीकडेच ( त्याच्या यश-अपयशाबरोबर) जाते. स्वातंत्र्य लढ्याचे अनेक पदर आणि पैलु आहेत, परंतु माझी अपेक्षा अथवा विनंती आहे की, गांधीवादी लोकांनी याविषयावरचा सांगोपांग अभ्यास करावा. सुदैवाने आज अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्षी गांधीवादाचा परामर्ष घेणारी अनेक पुस्तके प्रकाशित होत असतात. आजही गांधीवादाचा अभ्यास असणारी अनेक थोर आणि तज्ज्ञ लोक आहेतच. वरील प्रश्नाचा उपयोग करुन आपण याविचारसरणीचा सांगोपांग अभ्यास करावा. सर्वसामान्य लोकांना गांधीवादाबद्दल परत आस्था आणि विश्वास वाटेल अशी मांडणी करावी. शक्य असल्यास काही प्रश्नेही हाताळावावीत,तरच आपण गांधीवादाला समजावुन घेत आहे असे निष्पन्न होईल. अन्यथा भाषाविलास आणि वाणीविलासा बाहेर आपलेही पाऊल पडणार नाही. बर्‍याच वेळेस अनेक लोकांचा विचार करण्याची पद्धत एका टप्प्यावर येऊन थांबते ते आपल्याबाबतीत घडू नये अशीच माझी प्रार्थना आहे. याबाबतीत माझा जो काही अभ्यास आणि ग्रंथसंग्रह आहे तो आपल्यासाठी खुला आहे. द्वारकानाथ कलंत्री

In reply to by कलंत्री

सर्वसाक्षी 14/12/2008 - 21:43
द्वारकानाथजी, हा लेख दोन क्रांतिकारक कन्यांना समर्पित आहे. त्यावर जे काही लिहायचे ते अवश्य लिहा. पण या लेखात गांधीवाद घुसवु नका. आपण त्या विषयावर एक स्वतंत्र लेख लिहा.

In reply to by सर्वसाक्षी

बगाराम 14/12/2008 - 21:16
माझी कीव केल्याबद्दल धन्यवाद. जहालमतवादी बर्‍याचदा वैयक्तिक शेरेबाजीवर उतरतात हा अनुभव घेतला आहे. असो मी तुम्हाला काहिही विचारणार नाही. कारण तात्यांना माझे साधे क्वेश्चन खटकतात पण तुम्ही विनाकारण माझी केलेली कीव खटकत नाही ह्यावरुन त्यांचा तुमच्या विचारांशी बायस आहे हे स्पष्ट दिसते. आणि ते इथले आणिबाणी काळातील मालक असल्याने मी तुमच्याशी हा वाद वाढवणार नाही.

In reply to by सर्वसाक्षी

ऋषिकेश 14/12/2008 - 21:40
आता जरा आपण प्राणांतिक उपोषणाने हौतात्म्य पावलेल्या तीन गांधीवाद्यांचा तपशिल द्याल का? स्वतः गांधींनी तरअसे काही केले नव्हते.
यामुळे माझी उत्सुकता चाळवली. जालावर बरेच शोधले. "पोट्टी श्रीरामुलु" ही एकमेव भारतीय गांधीवादी उपोषणाने हुतात्मा झाली आहे या निष्कर्षाप्रत येणार तो पर्यंत अजून दोघे नि:शस्त्र क्रांतीकारी मिळाले... मात्र ते गांधीवाअदी होते की नाहि कल्पना नाहि. (अनेक परदेशी गांधीवादी मात्र हुतात्मा झालेले आढळतात)
  • पोट्टी श्रीरामुलु (एकत्र आंध्र प्रदेशसाठी सत्याग्रह, उपोषण आणि त्यातच मृत्यू. कट्टर गांधीवादी)
  • मोहन किशोर नामो दास
  • मोहीत मोईत्रा
(वरील दोन हुतात्मे, हुतात्मा महाविरसिंह बरोबर उपोषण केलेले त्याचे अंदमानमधील मित्र. मला जी थोडीशी माहिती मिळाली त्यानूसार हे सशस्त्र क्रांतीकारी नव्हते, स्वांतंत्र्यलढ्याशी नक्की निगडीत होते. मात्र गांधीवादी होते की नाहि कल्पना नाहि) बाकी तुमचे लेख मला नेहमीच आवडतात. विचारात टाकतात. हा लेखही आवडला. :) -(गोंधळलेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

सर्वसाक्षी 14/12/2008 - 22:03
ऋषिकेशमहाशय, पोट्टी श्रीरामुलु हे गांधीवादी होते व त्यांनी आमरण उपोषण केले होते हे आपले म्हणणे अगदी बरोबर आहे. मात्र हे उपोषण आपल्याच स्वतंत्र भारतात घडले, स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांविरुद्ध नव्हे. अर्थात त्याने पोट्टीजींच्या त्यागाचे महत्व कमी होत नाही. मात्र मी उल्लेख अशासाठी केला की इथे संदर्भ वेगळा होता. उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद. इतर दोन हुतात्म्यांची माहिती शोधायचा प्रयत्न आपण अवश्य करुया, मात्र शांततापूर्ण आंदोलन करणार्‍या गांधीवाद्यांना अंदमानला काळ्या पाण्यावर पाठवले जात नसे, तो मान क्रांतिकारकांनाच मिळायचा त्यावरुन ते क्रांतिकारकच असावेता से अनुमान आहे.

In reply to by सर्वसाक्षी

ऋषिकेश 14/12/2008 - 22:12
वर म्हटल्याप्रमाणे ही माहिती प्रतिवादासाठी म्हणून मुद्दाम न शोधता उत्सुकता म्हणून शोधली. असो.
इतर दोन हुतात्म्यांची माहिती शोधायचा प्रयत्न आपण अवश्य करुया,
जरूर. अंदमानच्या सेल्युलर जेलच्या एका साईटवर या तिघांनी उपोषण केले व त्यांचा मृत्यू झाला. हे कोणालाहि कळू नये म्हणून जेलरने त्यांची प्रेते समुद्रात फेकून दिली होती :( अशी माहिती मिळाली आहे. -(गोंधळलेला) ऋषिकेश

In reply to by सर्वसाक्षी

टग्या 16/12/2008 - 03:59
पोट्टी श्रीरामुलु हे गांधीवादी होते व त्यांनी आमरण उपोषण केले होते हे आपले म्हणणे अगदी बरोबर आहे. मात्र हे उपोषण आपल्याच स्वतंत्र भारतात घडले, स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांविरुद्ध नव्हे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोरारजीभाईंच्या गोळीबाराला बळी पडलेल्या १०५ (की ८०? मोरारजीभाईंच्या मते ८०.) जणांच्या स्मरणार्थ फ्लोरा फाउंटनचे नाव बदलून 'हुतात्मा चौक' केले गेले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ स्वतंत्र भारतात घडली, इंग्रजांविरुद्ध नव्हे, अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. (तसेही मारले गेलेले नि:शस्त्र होते अशी निदान माझी तरी समजूत आहे. चूभूद्याघ्या.) आता हे १०५ (किंवा ८०) हे केवळ स्वातंत्र्योत्तर काळात मारले गेले म्हणजे ते हुतात्मे होत नाहीत काय? मग 'हुतात्मा चौक' हे नामकरण चुकीचे आहे काय? हुतात्मा चौकाचे नाव बदलून पुन्हा 'फ्लोरा फाउंटन' असे (किंवा 'स्व. मीनाताई ठाकरे कारंजे' असे) करण्यासाठी आंदोलन करण्यास शिवसेनेस सांगावे काय?

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 16/12/2008 - 19:25
स्व. मीनाताई ठाकरे कारंजे निषेध निषेध. येथे खरे तर तीन मुद्दे आहेत. तुम्ही स्व. कोणाला म्हटले आहे? कारंज्याला म्हटले असेल तर ठीक. पण मग मीनाताई ठाकरे स्व. कारंजे असे हवे होते. त्यामुळे तुम्ही स्व. हे मीनाताईंबाबत म्हटले आहे हे सिद्ध होते. मराठीत स्व. या शब्दाचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. येथे कै. किंवा वै. चालले असते. (पुण्यश्लोकही म्हणायला हरकत नाही.) मात्र स्व. असे लिहून आपण इतिहासातील चुका पुन्हा करत आहोत असे वाटते मुस्लिम आक्रमकांनी इराणपासून उत्तर आफ्रिकेपर्यंतचा विस्तृत भूभाग १००-१५० वर्षांत पादाक्रांत केला. इराण, अरबस्थान, इजिप्त यासारख्या ठिकाणी त्यापूर्वीच्या संस्कृतीचे पालन करणारा माणूस आता औषधालाही शिल्लक नाही. भारतात त्यांना पहिले यश ७१२ मध्ये मिळाले. पण नंतरच्या काळात बाप्पा रावळसारख्या वीरांनी अगदी सिंध प्रांत पण परत जिंकून घेतला. गझनीच्या महंमदाने लाहोर आणि त्याजवळचा भाग जिंकला ११ व्या शतकाच्या सुरवातीला आणि ते दिल्लीपर्यंत पोहोचले ते १२ व्या शतकाच्या शेवटी म्हणजे जवळजवळ २०० वर्षांनंतर! तेव्हा सिंध प्रांतापासून दिल्लीपर्यंत भूभाग पादाक्रांत करायला त्यांना ७१२ ते ११९२ अशी ४८० वर्षे थांबावे लागले याचे कारण हिंदूंनी (विशेषतः राजपुतांनी) अत्यंत कडवा प्रतिकार केला होता. आणि त्यानंतर राणा प्रताप, शिवाजी महाराज, गुरू गोविंद सिंह आणि दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याने त्या आक्रमणाचा कडवा प्रतिकार केला. या वीरांनी शत्रूला तो प्रसन्न व्हावा म्हणून दक्षिणा दिल्या नाहीत आणि तलवारीचा मुकाबला तलवारीनेच केला म्हणून इराण आणि इजिप्त मध्ये घडले ते भारतात घडले नाही. या वीरांनी तुमचा भाबडा विश्वास उराशी बाळगला असता तर काय झाले असते? वरील आक्रमणासारखेच हे भाषिक आक्रमणही धोक्याचे आहे. मराठीचा वेगळा ठसका आहे. तिथे हिंदाळलेले शब्द वापरून तुम्ही उत्तरेच्या सांस्कृतिक आक्रमणापुढे शरणागती पत्करत आहात. सावरकरांनी केलेल्या भाषाशुद्धीच्या प्रयत्नांची तरी थोडी चाड ठेवा. आपला, (मोनिकाचा प्रियकर) विल्यम जेफरसन आजानुकर्ण हां. आता 'स्व. मीनाताई ठाकरे कारंजे' असे लिहून शिवसेनाच मराठीची कशी वाट लावत आहे हे निर्देशित करण्याचा आपला प्रयत्न असेल तर आम्ही वरील विधाने मागे घेतो. आपला, (टगवंतरावांचा फ्यान) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

क्लिंटन 16/12/2008 - 22:39
धन्यवाद. हुतात्मा स्मारकातील कारंज्याच्या निमित्ताने का होईना आपण मुस्लिम आक्रमण भारतासाठी धोक्याचे होते हे मान्य केलेत ही कमी महत्वाची गोष्ट नाही.मात्र माझा वेगळ्या चर्चेतील वेगळ्या संदर्भातला प्रतिसाद थोडासा बदलून (गांधींचा भाबडा विश्वास ऐवजी तुमचा भाबडा विश्वास असा शब्दप्रयोग करून) इथे आणणे हे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखे आहे असे माझे स्पष्ट मत आहे. मी इतरांइतक्या नियमितपणे मिसळपाववर लिहित नसलो तरी मी मनोगतवर असल्यापासून गेल्या २.५ वर्षांत कमितकमी ५० चर्चांमध्ये तरी भाग घेतला आहे.त्यात कोणाचाही एका चर्चेतला प्रतिसाद उघडउघड किंवा आडवळणाने मी वेगळ्या चर्चेत आणलेला नाही आणि व्यक्तिगत पातळीवर जाऊन चर्चा केलेली नाही. असे प्रकार करणे मिसळपाव सारख्या संकेतस्थळावर निकोप चर्चा होण्यासाठी योग्य नाही असे मला स्वत:ला वाटते. तरी सरपंचांचा निर्णय मान्य. तेव्हा यावर अजून काही लिहित नाही. बाकी या चर्चेत क्रांतिकारकांची तुलना तालिबानींबरोबर करायचा प्रयत्न चालला आहे असे वाटते. वयाच्या १४ व्या वर्षी देशासाठी काही करावे अशी कळकळीची भावना असलेली मुले फारच थोडी आणि त्यापुढे जाऊन स्वत: काहीतरी करणारी मुले म्हणजे लाखांमध्ये हाताच्या बोटावर बघायला मिळतील. आमच्या छत्रपतींनी रांझ्याच्या पाटलाचे एका स्त्रीची बेअब्रू केल्याबद्दल हातपाय १४-१५ वर्षी तोडायचा हुकुम दिला होता.पुढे १६ व्या वर्षी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.सांगा त्यांचा कोणी ब्रेनवॉश केला होता? संत ज्ञानेश्वरांनी १२ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. तसेच ’ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ म्हणणारी मुक्ताबाई वयाने त्यांच्याहूनही लहान होती. सांगा त्यांचा कोणी ब्रेनवॉश केला होता? सावरकरांनी वयाच्या १५ व्या वर्षी स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता झुंजेन अशी प्रतिज्ञा घेतली तेव्हा त्यांचा कोणी ब्रेनवॉश केला होता? श्री. एकलव्य यांनी म्हटल्याप्रमाणे तेजाला वयाचे वलय नसते.आणि तरीही देशासाठी त्याग करणार्‍या क्रांतिकारकांना तालिबान्यांच्या पंगतीत आणून बसवायच्या प्रवृत्तीचा निषेध आणि बंगालच्या वाघिणींना मानाचा मुजरा. ---विल्यम जेफरसन क्लिंटन

In reply to by क्लिंटन

आजानुकर्ण 16/12/2008 - 22:43
इथे वैयक्तिक टीका केलेली नाही. तसे वाटले असल्यास माझा नाईलाज आहे. मला सगळ्या क्रांतीकारकांविषयी संपूर्ण आदर आहे. मुद्दा असा आहे की १४व्या वर्षी मुलांच्या हातात शस्त्र देणे या प्रसंगाचे गौरवीकरण सध्याच्या काळात योग्य आहे का. आपला (सम्यक) आजानुकर्ण

In reply to by बगाराम

बंगाली वाघीणींनी देशबांधवांवर अत्याचार करणार्‍याला मारले. शस्त्रास्त्रे घेऊन निरपराध लोक, ज्यात कोवळी मुले, स्त्रीया यांचा समावेश होतो त्यांना नव्हे. तालीबानी आणी भारताचे स्वातंत्र्य सैनीक ह्यात फरक आहे. जालीयनवाला बागेत निरपराध्यांना मारणारा आणी त्या बद्दल अजीबात खंत न बाळगणार ज. डायर हा तालीबान्यांच्या पठडीतला होता. आपल्या क्रांतीकारकांनी इंग्लंड मध्ये जाऊन, त्यांच्या रेल्वे स्थानकांवर बेछूट गोळीबार केला होता काय? संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

पक्या 14/12/2008 - 04:21
फार सुरेख लेख. बंगालच्या वाघिणींची ओळख करून दिल्याबद्द्ल सर्वसाक्षींना धन्यवाद. शांती आणि सुनिती यांना त्यांच्या अतुलनीय पराक्रमाबद्द्ल अभिवादन. >>कॉंग्रेसने मात्र ’उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणास नाही’ या व्रताला जागुन त्यांचा निषेध केला. कॉंग्रेसचा धिक्कार असो.

बगाराम 14/12/2008 - 05:06
इथल्या सभासदांना क्वेश्चन केल्या बद्दल माझे काही प्रतिसाद उडवल्याचा खुलासा सरपंचांनी केलेला आहे. आणिबाणी असल्याने त्यांचा निर्णय मान्य आहे. मी ह्या धाग्यावर केलेले लेखन कुणीही क्वेश्चन म्हणून घेउ नये, ती फक्त माझी मते आहेत. अभिवादन करण्यापूर्वी, ही आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील काळी पाने आहेत. हुतात्मा भगतसिंह राजगुरू ह्यांनी केली ती खरी सशस्त्र क्रांती. जाणत्या वयात. त्यांनी कधी अवघ्या १४ वर्षाच्या कोवळ्या मुलींना प्रशिक्षण देउन पुढे केले नाही.ह्यावर विचार करावा इतकेच म्हणतो. कसलेही स्पष्टीकरण अपेक्षीत नाही. बगाराम

In reply to by बगाराम

_समीर_ 14/12/2008 - 07:00
हुतात्मा भगतसिंह राजगुरू ह्यांनी केली ती खरी सशस्त्र क्रांती. जाणत्या वयात. त्यांनी कधी अवघ्या १४ वर्षाच्या कोवळ्या मुलींना प्रशिक्षण देउन पुढे केले नाही.ह्यावर विचार करावा इतकेच म्हणतो. हम्म... विचारकरण्याजोगा मुद्दा आहे खरा.

साक्षीजी सुंदर लेख... अप्रतिम लेख. अशा क्रांतिकारी स्त्रियांच्या चरित्राची ओळख करून दिल्याबद्दल आपले आभारी आहोत. पुण्याचे पेशवे

कलंत्री 14/12/2008 - 07:50
बगारामजी, आपले प्रतिसाद वाचले. त्यात तथ्यांश असला तरी कोणत्याही बाबीचा सर्वांगीण विचार व्हावा. १. जिल्हाधिकार्‍यानीच सविनय सत्याग्रहीवर अत्याचार केले. २. पुरुष क्रांतिकारकानी त्या कृत्याचा बदला घेण्याचा विचार केला.त्या साठी त्यांनी आपला अथवा परका असा विचार न करता हम है हिंदुस्थानी असा स्तुत्य विचार केला. ३. परिस्थिती मात्र त्यांना अनुकुल नव्हती. ४. जिल्हाधिकारी भेकडासारखा आपल्या घरातच होता. ५. अश्या वेळेस अपवाद आणि आपदधर्म म्हणून या कोवळ्या मुलींनी हे कृत्य करण्याचे मनावर घेतले आणि पार पाडले. ६. त्यानंतर मात्र सशस्त्र विचारानंतर योग्य वेळी निषेध अथवा सत्याग्रहाचे हत्यार वापरले. असा जर क्रम असेल आणि तो आहे ( सर्वसाक्षीची तशी विश्वासार्हता आहे) तर आपल्याला या भगिनीबद्दल आदरच वाटला पाहिजे. अपवाद म्हणून कोणताही मार्ग त्याज्य नाही. सर्वसाक्षीजी : आपली निष्ठा आम्हास कौतुकास्पदच वाटते. आपल्याकडून आमच्या मोठ्या अपेक्षा आहे. आपण क्रांतिकारकांच्या लढ्याबद्दल एखादे चांगले पुस्तक प्रकाशित करा. भारताच्या इतिहासातले हे पर्व दुर्लक्षितच आहे आणि आपण ठरविले तर त्याला योग्य तो न्याय देऊ शकता. क्रांतिकारकांचे समयोचित स्मरण केल्याबद्दल सर्व मिपाकरातर्फे आपले आभार.

एकलव्य 14/12/2008 - 12:22
पराक्रमाला आणि तेजाला वय नसते. १६ व्या वर्षी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले... त्यांचे सवंगडी आणि महाराजांनीही १४ व्या वर्षीही काही हरामखोरांना यमसदनाला पोहचविले असण्याची दाट शक्यता आहे. दिल्ली हादरविणारा थोरला बाजीराव मराठी दौलतीचा पंतप्रधान झाला तो १७ व्या वर्षी. इंग्रजांना नमविणारा माधवराव तर त्याहूनही लहान असताना सूत्रे सांभाळू लागला. अकबर वयाच्या १४ व्या वर्षी दिल्लीच्या तख्तावर बसला. अनेक नावे देता येतील... स्वतंत्र भारतासाठी कोवळ्या वयात बलिदान देणार्‍या बंगालच्या वाघिणींना प्रणाम. (ऋणी) एकलव्य

In reply to by एकलव्य

विसोबा खेचर 14/12/2008 - 13:06
पराक्रमाला आणि तेजाला वय नसते. एकलव्यराव, वरील अवघ्या पाच शब्दात आपण फार मोठी गोष्ट सांगून गेलात! आपल्याला सलाम..! तात्या.

In reply to by एकलव्य

एकलव्य मी अगदी आणी अगदी ह्याच शब्दात प्रतिक्रिया देणार होतो. माझ्या मनातले शब्द आपण इथे उतरवले आहेत त्या बद्दल शतशः धन्यवाद ! ह्या वाघिणींना आमचा मानाचा मुजरा. सर्वसाक्षी ह्यांचे मनःपुर्वक आभार ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

In reply to by एकलव्य

आजानुकर्ण 14/12/2008 - 18:32
महाराजांविषयीचा आदर त्यांनी कितव्या वर्षी तोरण बांधले यात नसावा. तो त्यांनी आयुष्यभर दिलेला लढा आणि केलेला राज्यकारभार यात आहे. अकबरापासून ते माधवरावांपर्यंत आलेली उदाहरणे ही आधीचा राजा नसणे या तत्कालिक परिस्थितीमुळे आली आहेत. राजांकडे असलेली मार्गदर्शनाची साधणे - वजीर-दिवाण-अमात्य किंवा कारभार चालवणारे राघोबादादांसारखे लोक वेगळेच परंतु नामधारी जबाबदारी त्यांच्याकडे असा प्रकार असावा. त्यामुळे कोणीतरी ब्रेनवॉशिंग केल्याने हल्ले करणे आणि राज्यकारभाराची जबाबदारी लहान वयात अंगावर येणे यात गुणात्मक फरक आहे.

In reply to by आजानुकर्ण

एकलव्य 14/12/2008 - 19:23
कर्णसाहेब, तुलना वरील महापुरुषांच्या आणि बंगालच्या वाघिणींच्या एकूण कर्तबगारीची नाही. १४ व्या वर्षी किती जाण असते याची सर्वांना माहिती असलेली उदाहरणे देण्याचा प्रयत्न आहे. जबाबदारी स्वतःहून घेतली की अंगावर आल्यावर सांभाळली हा किडा निघेल याची खात्री होती. (दिलेली उदाहरणे अंगावर आल्यावर सांभाळली या गटात सरसकटपणे टाकणे हे खूपच ढोबळ होईल हा भाग अलहिदा! ) अकबरापासून ते माधवरावांपर्यंत आलेली उदाहरणे ही आधीचा राजा नसणे या तत्कालिक परिस्थितीमुळे आली आहेत. राजांकडे असलेली मार्गदर्शनाची साधणे - वजीर-दिवाण-अमात्य किंवा कारभार चालवणारे राघोबादादांसारखे लोक वेगळेच परंतु नामधारी जबाबदारी त्यांच्याकडे असा प्रकार असावा. धक्का बसला. आपला आवाका वरील अंदाजदर्शनापेक्षा अधिक असावा अशी अपेक्षा होती. एनिवे... जबाबदारी कशीही आलेली असो... पण आपल्या थोरपणाचा स्पार्क या वीरांनी -- महाराज/बाजीराव/माधवराव/अकबर -- अगदी "कोवळ्या" वयात दाखविला असे वाक्ये आणि दाखले अजरामर आहेत. इतिहास बदलणारी ही माणसे आहेत. अवांतर - वरील उदाहरणे नाममात्र आहेत. पानिपतावर विश्वास गेला तोही कोवळ्या वयात आणि लाखो मराठी वीरांनी प्राण टाकले तेही कोवळ्या वयातीलच असावेत. पण इतक्या दूरवर पल्ला मारण्याची हिंमत त्या वयात त्यांच्याकडे होती इतकाच मुद्दा येथे आहे. (घाईघाईत) एकलव्य

In reply to by एकलव्य

बगाराम 14/12/2008 - 21:21
महाराजांनी जे केले त्याची तुलना इथे होऊ शकत नाही. महाराज कुठतरी जाउन प्रशिक्षण घेउन मुघलांच्या सैन्यात सुसाईड किलर म्हणून गेले नाहीत. त्यांनी स्वराज्य बांधणी केली. केवढी मोठी जिद्द दाखवली. त्यांच्या राज्यात जर १४ वर्षाच्या बालिकांना प्रशिक्षण देउन जीवावर उदार करुन पाठवण्यात आले असते तर त्यांना तरी ते खपले असते का? असला प्रकार करण्यापेक्षा ते स्वतः तलवार घेउन शत्रुच्या छावणीत घुसले असते. हा मोठा फरक इथे आहे.

In reply to by यशोधरा

बगाराम 14/12/2008 - 21:32
होय अर्थातच लहान वयात केले. इथे कधी केले वर नसुन काय केल े त्यावर फरक केला आहे.

In reply to by बगाराम

यशोधरा 14/12/2008 - 21:45
>>इथे कधी केले वर नसुन काय केल... लहान वयात महाराजांनी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली, कारण त्यांच्या आजूबाजूला जे चालले होते ते त्यांच्या संवेदनाशील मनाला रुचत नव्हते. जिजाबाई आणि दादोजी कोंडदेवांचे मार्गदर्शन त्यांना होते (या बाबतही हल्ली वाद आहेत हे ठाऊक आहे, कृपया तो फाटा फोडू नये), भल्यावाईटाची जाण अंगच्या बुद्धीमत्तेमुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे लहान वयातच आली होती, म्हणून त्या काळाला जे सर्वप्रथम करणे योग्य होते, की जसे आपल्या सोबत्यांच्या मनात स्वराज्याची इच्छा जागवणे.. ते त्यांनी केले. लहान वयात मोहीमाही केल्याच ना? (काय केले..) जसे वातावरण असेल, तशी कृती असावी लागते, काही जण वेडे ध्येयवादी तशी कृती करु शकतात,काही जणांना ते जमत नाही. या कन्यकाही तश्याच होत्या म्हणावे लागेल. आजच्या दहशतवाद्यांशी, त्यांच्या मनोवृत्तीशी क्रांतीवीरांचा आणि वीरांगनांचा संबंध जोडणे योग्य वाटत नाही.

In reply to by बगाराम

सर्वसाक्षी 14/12/2008 - 21:48
आपण पुन्हा पुन्हा असे ठसवु पहत आहात की त्या मुलींना स्वतःची अक्कल नव्हती व त्यांना चिथावले गेले. असो. आपण स्वतःला हवे ते निष्कर्शे काढु शकता. मात्र यावरुन आपल्या स्त्री व क्रांतिकारक यांच्या विषयीच्या भावना समजल्या.

In reply to by सर्वसाक्षी

आजानुकर्ण 14/12/2008 - 22:35
बगाराम यांनी स्रीविषयक काहीही वावगे विधान केलेले नाही असे वाटते. शांतपणे पाहिल्यास एका विचारसरणासाठी असलेला क्रांतीकारक हा दुसऱ्या विचारसरणीसाठी अतिरेकी वाटू शकतो. या विचारस्वातंत्र्याला आक्षेप असण्याचे कारण नाही आपला (शांतताप्रेमी) आजानुकर्ण

In reply to by एकलव्य

चतुरंग 14/12/2008 - 21:56
पराक्रमाला आणि तेजाला वय नसते. लाख बोललात!! ह्याच संदर्भात सारेगमप लिटल चँप्स ह्या कार्यक्रमात हृदयनाथांनी सांगितलेला किस्सा चपखल ठरावा. सावरकर बारा वर्षाचे असताना भगूरहून नाशिकला आले एका गाण्याच्या स्पर्धेसाठी. त्यांनी लिहिलेले 'हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा' हे ओजस्वी गाणे ते स्वतः गायले. त्यांना पहिले बक्षीस मिळाले. लोकमान्य टिळक परीक्षक होते. १२ वर्षांचा मुलगा हे ओजस्वी शब्द, हे अलंकार, हे वृत्त पेलू शकत नाही, लिहू शकत नाही ह्या शंकेतून स्पर्धेनंतर छोट्या विनायकाला जवळ बोलावून त्यांनी विचारले "बाळा, आता मला खरंखरं सांग की हे शब्द, हे गाणं तुझंच की तुझ्या वडिलांनी, गुरुजींनी, मोठ्या भावाने कोणी लिहून दिले?" सावरकरांनी वयाच्या १२ व्या वर्षी दिलेल्या उत्तरातून ते असामान्य का होते ह्याची प्रचिती येते - सावरकर लोकमान्यांना म्हणाले "ज्ञानेश्वर वयाच्या १६ व्या वर्षी 'भावार्थदीपिका' ग्रंथ लिहू शकतात तर मी १२ व्या वर्षी हे गाणे का लिहू शकत नाही?" काय तेजस्वी बाणा, केवढा आत्मविश्वास, केवढे सामर्थ्य!! म्हणून सावरकर एकमेवाद्वितीय, म्हणून ते स्वातंत्र्यवीर, म्हणून ते महान!! पराक्रमाला आणि तेजाला वय नसते!!! चतुरंग

या दोन वाघिणींना मानाचा मुजरा. आणि ज्या कोणी स्त्रिया, मुलींना वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांना 'गेट वेल सून'. (समानतावादी) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बगाराम 14/12/2008 - 21:11
इथे कुणीहि लिंगभेद केलेला नाही, १४ वर्षाची मुले असती तरी देखिल मी हेच म्हणालो असतो. आपण मला उद्देशुन गेट वेल सून म्हणत असाल तर आपण निष्कारण हा नविन वाद इथे आणत आहात असे वाटते.

In reply to by बगाराम

तो भेद ज्या कोणी केला होता त्यांच्यासाठी होतं, तुम्ही नाही ना केला भेद (खरं की काय?) तर मग का ते स्वतःवर ओढवून घेत आहात? का खरंच गरज आहे तुम्हाला 'गेट वेल सून'ची? बाकी १४व्या वर्षी मलाही बरीच अक्कल(?) होती असं आठवतं. शाळेत स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास शिकवायचे (वय वर्ष १०-११ पासून) तेव्हाच आम्हा मित्र-मैत्रिणींमधे चर्चा होत असे, "पुन्हा कोणी आपल्या देशावर हल्ला केला तर आपणही असंच क्रांतिकारकांसारखे वागून त्यांना विरोध करु या." आणि या चर्चांमधे कोणाही मोठ्या माणसाचा सहभाग नसे.

लिखाळ 14/12/2008 - 21:15
बंगालच्या वाघिणींना अभिवादन ! लेख छानच. एखाद्या क्रांतीने वातावरण भारले जाते तेव्हा तरल, बुद्धीमान, उत्साही, धैर्यवान लोक आपोआपच त्याकडे आकर्षिले जातात. शिवाजी महाराजांशी अश्यांची तुलना नाही केली तरी महाराजांच्या कार्यामुळे प्रेरित झालेल्या एका १३-१४ वर्षांच्या मुलाने एका मह्त्वाच्या लढाईत ध्वज सांभाळत मोठी चकमक विजयी केली होती असे शिवचरित्रात वाचलेले स्मरते. जेव्हा समाजात मोठी उलाढाल होते तेव्हा लहानाप्सून मोठ्या पर्यंत अनेक जण भारले जातात. मुद्द्महुन ब्रेनवॉश केलेले आणि अश्या वातावरणात वयापेक्षा पोक्त विचार करुन कृती करणार्‍यांत फरक केला पाहिजे असे वाटते. -- लिखाळ.

मुक्तसुनीत 14/12/2008 - 22:02
चर्चा वाचली. काही मते मांडतो. याबद्दल मतभिन्नता होऊ शकते. - क्रांतिकारकांचे काम , त्यांनी दिलेले बलिदान याबद्दल एक भारतीय म्हणून मी ऋणी आहे. त्यांची स्मृती सदैव मनात राहील. - ज्यांनी अत्याचार केले त्यांचे रक्त वहात असेल तर एक माणूस म्हणून मला बरेच वाटते. मात्र कायद्याचे राज्य हवे असणारा एक नागरीक म्हणून या मार्गांबद्दल नेहमीच प्रश्न येत रहातील. - अर्थशास्त्रीय बाबींमुळे इंग्रज हा देश सोडून गेले यात तथ्य आहे. पण या निर्णयात निरनिराळ्या उठावा-आंदोलनांचा मोठा भाग होता हेही बरोबर. इट डीड्न्ट मेक द गव्हर्निंग एनी इझीयर. - कुठल्याही उदात्त हेतूने का होईना , पण लहान मुलांच्या हाती हत्यार देणे हे निश्चितच विवाद्य आहे. कुठल्याही एकाच दृष्टीकोनाशी आपण स्वतःला बांधून घेतले ("मॅरींग टू अ सर्टन स्कूल ऑफ थॉट") तर एकूण व्यापक अशा सत्याकडे दुर्लक्ष होते याचे , ही चर्चा म्हणजे एक चांगले उदाहरण आहे. माझी अशी सभासदाना विनंती आहे की , वैयक्तिक शेरेबाजी , अपशब्द टाळा. दुसरा काय म्हणातो ते पटत नसेल तर तसे सांगा. दुसर्‍याची कीव करणे , कमी लेखणे वगैरे वगैरे गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत.

In reply to by मुक्तसुनीत

आजानुकर्ण 14/12/2008 - 22:38
हा दृष्टिकोण स्वागतार्ह आहे. दुसऱ्याची कीव करणे, किंवा दुसऱ्याचा आवाका मोजणे यामुळे चर्चेत काहीही साध्य होत नाही. लहान मुलांच्या हाती हत्यार देण्याचे कोणत्याही कारणामुळे उदात्तीकरण होऊ नये हे सध्याच्या प्रसंगात सुसंगत आहे. आपला, (सहमत) आजानुकर्ण

विकास 14/12/2008 - 22:03
बंगालच्या या दोन्ही क्रांतीकारींना मानाचा मुजरा! वर बरेच काही लिहून झाले आहे त्यामुळे त्यात परत पडत नाही.

माहितीजालावर शहिदांसाठी, क्रांतिकारकांसाठी एवढे लेखन कुणी केले नसेल आणि एवढी प्रकाशचित्रे कुणी पुरवली नसतील. शहिदांसोबतच सर्वसाक्षींनाही सलाम!

वाचक 14/12/2008 - 22:31
मगच तपासले पाहीजेत - आता एकेक बघू १. हे 'ब्रेनवॉशिंग' आहे अथवा नाही २. असलेच तर 'तालिबानी' करतात त्यात आणि ह्यात फरक आहे का ? असल्यास कोणता? ३. १४ वर्षांची मुले/ली हे समर्थनिय आहे का ? तर शेवटी प्रत्येक गोष्ट आपण कोणत्या 'काँटेक्स्ट' मधे बघतो ह्याच्यावर सर्व अवलंबून आहे. 'मी त्याला आई बहिणीवरुन शिव्या दिल्या' हे एक नुसते वाक्य 'कारण त्याने माझ्या बहीणीची छेड काढली' ह्या वाक्यानंतर लगेच 'समर्थनिय' वाटू शकते. तेव्हा 'साक्षी़जींनी' दिलेला इतर ईतिहास पहाता 'ह्या कन्या' वीरांगनाच ठरतात. आता एकेका प्रश्नाची उत्तरे माझ्या दॄष्टीकोनातून १. हे 'ब्रेनवॉशिंग' आहे अथवा नाही हो - हे ब्रेनवॉशिंगच आहे आणि प्रत्येक असामान्य नेता जेव्हा आपल्यामागे यायला आपल्या अनुयायांना तयार करतो तेव्हा ते एक प्रकारचे ब्रेनवॉशिंगच असते - दुर्दैवाने ह्या शब्दाला एक काळी किनार लाभली आहे पण शब्द्शः अर्थ लक्षात घेतला तर माझे म्हणणे पटावे. आणि कार्य सिद्धिस जाण्यासाठी त्याची गरज असतेच. आजकालच्या युगातल्या 'कॉर्पोरेट' कंपन्या पण 'मिशन स्टेटमेंट' आणि इतर गोष्टींनी हेच साध्य करत असतात. २. असलेच तर 'तालिबानी' करतात त्यात आणि ह्यात फरक आहे का ? असल्यास कोणता? भारता सारख्या आधी स्वतंत्र असलेल्या देशावर ईंग्रजांनी आक्रमण करुन अत्याचार चालविले होते - अशा वेळी ज्याला जसे पटते त्या मार्गाने त्याचा प्रतिकार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच ठरते. त्याचप्रमाणे रशियन आक्रमण असताना 'तालिबान्यांनी' ह्याचाच अवलंब केला आणि त्यांना यशही मिळाले. नंतर आता तशी परिस्थिती उरलेली नसताना ते त्याच मार्गाचा वापर करत आहेत आणि पाकिस्तानही 'दुसर्‍या' सार्वभौम देशात कारवाया घडवून आणण्यासाठी - हे अर्थातच 'समर्थनिय' नाही - माझ्या दॄष्टीकोनातून कारण मी एक देशभक्त भारतीय आहे पण पाकिस्तानी नागरिकांचे मत वेगळे असू शकेल - मी म्हणतो तो 'काँटेक्स्ट' तो हाच. ३. १४ वर्षांची मुले/ली हे समर्थनिय आहे का ? वय किती आहे ह्याला खरे म्हणजे काहीही अर्थ नाही - एकदा आपण करतो आहोत ते कृत्य स्वतःच्या 'काँटेक्स्ट' मधे योग्य आहे ना मग 'साधनं अनेकता...' विचार व्हावा

विसोबा खेचर 14/12/2008 - 03:43
सुनिती आणि शांती या वाघिणींना मानाचा मुजरा..! साक्षिदेवा, 'नाही चिरा नाही पणती..' ही उक्ति लागू व्हावी अश्या अनेक क्रांतिकारकांची आम्हाला केवळ तुझ्यामुळेच ओळख होत आहे..! अवघ्या १४व्या वर्षी असा असामान्य पराक्रम करणाऱ्या या मुलींची नावे सुद्धा आपल्याला माहित नाहीत याची खंत वाटते. खरं आहे! एवढंच नव्हे, तर 'भारताला आजादी विना खड्ग, विना ढाल मिळाली हो..!' अशी गीते गाण्यातच आम्ही धन्यता मानतो..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बगाराम 14/12/2008 - 04:30
तात्या, तुमच्या परिचयातील कुणा १४ वर्षाच्या चुणचुणीत मुलीकडुन हे काम करुन घ्याल का? कायदा देखिल १८ वयाच्या खालील मुलींना सज्ञान समजत नाही. त्यांना लग्न करण्याची देखिल परवानगी देत नाही. इथे तर चक्क बंदुक चालवुन जीव धोक्यात घालण्याचे प्रशिक्षण दिले जातेय.काहीतरी चुकतय अस वाटत नाही का? सिस्टमॅटीक ब्रेन वॉशींगच नव्हे का हे?

In reply to by विनायक प्रभू

बगाराम 14/12/2008 - 21:08
एनसीसी मध्ये विद्यार्थ्यांना मिलिटरीची ओळख करुन दिली जाते. भविष्यात त्यांनी सैन्यात भरती व्हावे ह्या अपेक्षेने. एनसीसीत दिलेले प्रशिक्षण घेउन कुणी युद्धावर जीव धोक्यात घालायला जात नाही.

In reply to by विनायक प्रभू

आजानुकर्ण 14/12/2008 - 22:32
एनसीसीचे प्रशिक्षण घेऊन युद्धावर जात नाहीत. सैन्याचे प्रशिक्षण घेऊन युद्धावर जातात हा बगाराम यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. आपला, (सार्जंट) आजानुकर्ण

In reply to by विनायक प्रभू

आजानुकर्ण 14/12/2008 - 22:40
या प्रतिसादाचा चर्चेशी काय संबंध आहे कळला नाही. तसाही मी शांततावादी असल्याने माझ्यासारख्या अल्पवयीन मुलाच्या हातात बॅटन देण्याचा लोकांनी प्रयत्न केला तरी मी ते हातात घेणार नाही. तेवढा मी सुजाण आहे. आपला (हाताची घडी) आजानुकर्ण

In reply to by विनायक प्रभू

बगाराम 14/12/2008 - 23:41
जाऊ द्या हो! एकंदरीत मुद्दे संपलेले दिसतात. असली विधाने यायला लागली की समजुन जायचे.

In reply to by बगाराम

रामपुरी 17/12/2008 - 22:00
म्हणजे त्यांनी काय करायला पाहीजे होते असे तुमचे म्हणणे आहे हे तरी कळू दे. १८ वर्षे पूर्ण होण्याची वाट बघायला हवी होती की सैन्यात जाऊन प्रशिक्षण घेउन यायला हवे होते?

In reply to by बगाराम

टग्या 17/12/2008 - 06:47
काहीतरी चुकतय अस वाटत नाही का? सिस्टमॅटीक ब्रेन वॉशींगच नव्हे का हे?
ब्रेनवॉशिंगचे एक वेळ जाऊ द्या, पण...
५ मार्च १९३१ रोजी बिरेन भटाचार्यच्या नेतृत्वाखाली ब्राहमण बारिया येथील ट्पाल कचेरीतून सरकारी खजिन्यत भरण्यासाठी जाणारी पंचविस हजार रुपयांची थैली लुटली. हे पैसे अखिल नंदीकडे सोपविण्यात आले व याच पैशातुन क्रांतिसाठी पिस्तुले व काडतुसे विकत घेतली गेली.
यह बात कुछ हज़्म नहीं हुई| अर्थात, डेस्परेट (मराठी?) परिस्थितीत, जेव्हा एखादी गोष्ट करायचीच आहे म्हटल्यावर मनुष्य काहीही करू शकतो, पण म्हणून अशा कृत्यांचे समर्थन होऊ शकते काय? प्रस्तुत जिल्हाधिकारी मग्रूर होता, अत्याचारी होता, अमानुष होता आणि म्हणून त्याचा वध करणे गरजेचे / योग्य होते असे जरी (व्यक्तिशः मला जरी पटत नसले तरी) वादाच्या सोयीकरिता मानले, तरी त्याच्या वधाकरिता शस्त्रास्त्रसामग्री आणण्याकरिता पैसे नाहीत म्हणून टपालकचेरी लुटणे हे समर्थनीय होते काय? एकदा "क्रांतीसाठी"म्हटले की काय वाटेल त्याची भलावण होऊ शकते काय? (ही बातमी "टपालकचेरीवर दरोडा" या मथळ्याखाली फिट्ट बसावी. "क्रांतीसाठी" हे लेबल लावल्याने हा दरोडा क्षम्य होतो काय?) मग "शोले"मधला गब्बरसिंग गाववाल्यांना म्हणतो की मी तुमचे संरक्षण करतो आणि त्याच्या बदल्यात जर का मी तुमच्याकडून काही पोती धान्य (जबरदस्तीने) घेतले, तर कोणताही जुलूम करत नाही म्हणून, तर त्याचे लॉजिक नेमके कोठे चुकले? (टपालकचेरीत तरी पैसे येतात ते कोठून? जनतेकडून गोळा केलेल्या महसुलातूनच ना?) आणि हे क्रांतिकारक जर देशासाठी, जनतेसाठी हे सर्व करत होते (म्हणजेच जनतेचे प्रतिनिधित्व करत होते आणि जनतेची त्यांना मान्यता होती), तर जनतेकडून वर्गणी गोळा करून शस्त्रास्त्रांसाठी पैसे गोळा करता आले नसते काय? जनतेने ते दिले नसते काय? (स्वखुशीने की कसे तो नंतरचा प्रश्न.) त्यासाठी दरोडा घालण्याची काय गरज होती आणि दरोडा घालणे हे योग्य होते काय?
क्रूरकर्मा जिल्हाधिकारी स्टिव्हन्स याच्या वधाच्या योजन्या आखल्या जाउ लागल्या. हा शूरवीर आपल्या बंगल्यात जागत्या पहाऱ्यात लपून बसल्याने याला गाठायचा कसा हा प्रश्न भेडसावित होता.
आपल्या हत्येची कारस्थाने रचली जाताहेत, आपला जीव धोक्यात आहे याबद्दल खात्रीलायक कुणकुण लागल्यावर सदर सद्गृहस्थ स्वतःच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेणार नाही काय? आणि सदर सद्गृहस्थ हा सरकारी अधिकारी आहे म्हटल्यावर खुद्द सरकार तशी व्यवस्था करणार नाही काय? स्वातंत्र्योत्तर कालात आजसुद्धा महत्त्वाच्या पदांवरील विविध अधिकारी व्यक्तींना, मंत्र्यांना वगैरे ती काय म्हणतात ती झेड सिक्युरिटी वगैरे देत नाहीत काय? आपल्या सुरक्षिततेला असलेल्या धोक्याबद्दल माहिती असूनही सदर महोदयांनी क्रांतीच्या / क्रांतिकारकांच्या सोयीसाठी आपल्या सुरक्षेची किमान खबरदारीसुद्धा घेऊ नये अशी अपेक्षा होती काय? ("शूरवीर" या शब्दावरून तरी तसे वाटले.) तशी अपेक्षा असेल तर या मुलींना कोणत्याही प्रकारची झडती न घेता लपवलेल्या पिस्तुलांसह जिल्हाधिकार्‍यापर्यंत जाऊ देण्यात आले यातून ती अपेक्षा पूर्णच केली गेली, असे म्हणावे लागेल. (किंवा सुरक्षेच्या खबरदारीमध्ये हलगर्जीपणा झाला असे म्हणावे लागेल - टेक युअर पिक.) एखादी कृती (विशेषतः 'वध' वगैरे) ही क्रांतिकारी कृती कधी होते आणि दहशतवादी/अतिरेकी/गुन्हेगारी कृती कधी होते ही मला कधीही न समजलेली गोष्ट आहे. वरील घटनेची इतर दोन घटनांशी तुलना करू या. १. सदर जिल्हाधिकारी हा मग्रूर असून त्याने सत्याग्रहींवर लाठीमार करून असंख्य सत्याग्रहींना बेदम मारहाण केली म्हणून युगांतरसारख्या क्रांतिकारी संघटनांनी त्याचा वध करण्याचा विडा उचलला / ऑपरेशन ब्लू स्टार नंतर काही शिखांनी इंदिरा गांधींची हत्या करण्याचा विडा उचलला / फाळणीनंतर गांधीजी मुसलमानांचा अनुनय करतात असे वाटल्याने आणि विशेषतः गांधीजींच्या पाकिस्तानला पाकिस्तानचेच पंचावन्न कोटी देण्याच्या आग्रहावर नाराज होऊन नथुराम गोडसे प्रभृतींनी गांधीजींचा वध करण्याचा विडा उचलला. २. जिल्हाधिकार्‍याच्या जिवाला धोका आहे याची कुणकुण असूनही या मुलींना कोणतीही झडती न घेता जिल्हाधिकार्‍यापर्यंत शालीत लपवलेल्या पिस्तुलांसह जाऊ देण्यात आले / आपल्या जिवाला धोका आहे याची पूर्ण माहिती असूनही इंदिरा गांधींनी आपल्या (सशस्त्र) अंगरक्षकांमधून शिखांना वगळण्यास नकार दिला / महात्मा गांधींच्या सुरक्षाव्यवस्थेबद्दल कल्पना नाही, बहुधा तेवढी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवणे शक्यही नसावे आणि गांधीजींचे आपल्या सुरक्षाव्यवस्थेबद्दलचे नेमके विचार काय होते याची कल्पना नाही, परंतु नथुराम गोडसे पिस्तुलासह गांधीजींपर्यंत पोहोचू शकला. ३. पिस्तुलासह जिल्हाधिकार्‍यापर्यंत पोहोचलेल्या मुलींनी जिल्हाधिकार्‍यावर गोळ्या झाडून त्याचा वध केला / इंदिरा गांधींच्या शिख सशस्त्र अंगरक्षकांनी इंदिरा गांधींचा वध केला / पिस्तुलासह गांधीजींपर्यंत पोहोचलेल्या नथुरामने गांधीजींचा वध केला. या तीन घटनांमध्ये नेमका फरक काय? कोणाला तरी आपल्यावर, आपल्या "राष्ट्रा"वर अन्याय आणि जुलूम होतोय असे वाटले, त्याने/तिने त्यासाठी जी व्यक्ती जबाबदार वाटली तिच्या वधाचा पण केला, जिचा वध करायचा त्या व्यक्तीने पुरेशी काळजी न घेतल्यामुळे या व्यक्ती आपापल्या लक्ष्यांपरंत शस्त्रांसह पोहोचू शकल्या आणि त्यांनी आपापल्या लक्ष्यांचा पॉइंट ब्लँक रेंजवर (मराठी?) गोळ्या झाडून वध केला. यातले कोठले कृत्य समर्थनीय आणि कोठले नाही आणि का? यातले "क्रांतिकारक" कोण आणि "दहशतवादी/अतिरेकी/खुनी" कोण आणि कोणत्या निकषांवर? "क्रांतिकारक" म्हणून जेव्हा आपण कोणाचा गौरव करतो, तो पूर्णपणे विचार करून, समजूनउमजून करतो, की केवळ आपल्याला तसे करायला शिकवले गेले आहे म्हणून करतो, हीही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण विचार न करता काहीही केले, तर मग आम्हाला कोणीही (पर्यायाने आमच्या नेत्यांनी) काहीही सांगावे आणि आम्ही ते मागचापुढचा विचार न करता आचरावे, अशी परिस्थिती होते. आणि मग "मुकी बिचारी कुणी हाका रे" ही आमची परिस्थिती होती, हीच आहे, फक्त हाकणारे बदललेत, यापेक्षा तेव्हात आणि आतात काहीही फरक राहत नाही.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 17/12/2008 - 07:21
वा टग्याजी! १००% विचार पटले.
कुठल्याही एकाच दृष्टीकोनाशी आपण स्वतःला बांधून घेतले ("मॅरींग टू अ सर्टन स्कूल ऑफ थॉट") तर एकूण व्यापक अशा सत्याकडे दुर्लक्ष होते याचे , ही चर्चा म्हणजे एक चांगले उदाहरण आहे.
मुक्तसुनित ह्यंच्या ह्या विधानाचे विस्तृत विवेचन वरील प्रतिसादात वाचायला मिळाले. एकदा का 'क्रांतीकारक' 'जाज्वल्य भक्ति' 'देशासाठी बलिदान' वगैरे उल्लेख केले की बहुतेक लोक भावनेच्या भरात वाहुन जातात. आणि भावनिक झाले की तर्कबुद्धी वापरणे अशक्य होउन बसते, त्यामुळे वरील (कडू) व्यापक सत्ये दुर्लक्षली जाऊन त्यावर फक्त विखारी टीका करण्याचे प्रयत्न होतात. 'किव येते', 'हलकट विचार' इ.इ. शेरेबाजी त्यातुनच होते असे वाटते. गांधीवादी असो वा क्रांतीकारक सगळ्यांचे अंतिम ध्येय स्वातंत्र्यच होते, पण म्हणून आंधळेपणाने त्यांच्या कुठल्याही कृतीचे समर्थन वा अभिवादन करण्यापेक्षा चिकित्सक वृत्तीने त्यातले अनुकरणीय तेवढेच वेचुन काढणे अधिक योग्य. (टग्याजींचा पंखा) कोलबेर

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

मूळ मुद्दा इथे हा आहे की बंगालच्या वाघिणी म्हणा किंवा इतरही क्रांतिकारक म्हणा ज्यानी ज्यानी हत्या केल्या त्या ब्रिटीश अधिकार्‍यांच्या किंवा त्या गोष्टीला कारणीभूत ठरलेल्या लोकांच्या केल्या. त्यांच्यातिक कोणीही रेल्वेस्थानकात, बसमधे बॉम्बस्फोट किंवा बेछूट गोळीबार नाही केला. सामान्य जनतेला त्यात वेठीला धरले नाही कोणी. " हनुमंत महाबळी रावणाची लंका जाळी, होते बळ म्हणूनि न जाळि झोपड्या गोरगरीबांच्या" हा फरक लक्षात घ्यावा. आणि क्रांतिकारकानी फक्त खजिन्याचीच लूट केली असं नव्हे. मध्यंतरी तर असे वाचनात आले की क्रांतिकारकानी खंडोबाचे देवस्थान लूटूनही क्रांतिकार्यासाठी पैसा जमा केला होता. आणि त्याबद्दल जनतेने त्याना कदाचित माफ अशासाठी केले असेल कारण त्यांचा त्यामागचा हेतू स्वतःच्या घरचे गल्ले न भरता देश स्वतंत्र व्हावा यासाठी काहीतरी करणे. गांधींनी संरक्षण अथवा शस्त्र जवळ बाळगणे नाकारले असेल तर ते ठीक आहे कारण ते त्यांच्या तत्वानुसार वागत होते. पण इंदिराजी आणि तो ब्रिटीश अधिकारी याना असा अतिरेकी आत्मविश्वास होता की आपल्याला कोण मारू शकत नाही. आणि त्यानेच त्यांचा घात केला. कारण विचार न करता काहीही केले, तर मग आम्हाला कोणीही (पर्यायाने आमच्या नेत्यांनी) काहीही सांगावे आणि आम्ही ते मागचापुढचा विचार न करता आचरावे, अशी परिस्थिती होते. आणि मग "मुकी बिचारी कुणी हाका रे" ही आमची परिस्थिती होती, हीच आहे, फक्त हाकणारे बदललेत, यापेक्षा तेव्हात आणि आतात काहीही फरक राहत नाही. हे बाकी खरे बोललात. ते वारंवार दिसलेच आहे. :) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

टग्या 17/12/2008 - 21:26
मूळ मुद्दा इथे हा आहे की बंगालच्या वाघिणी म्हणा किंवा इतरही क्रांतिकारक म्हणा ज्यानी ज्यानी हत्या केल्या त्या ब्रिटीश अधिकार्‍यांच्या किंवा त्या गोष्टीला कारणीभूत ठरलेल्या लोकांच्या केल्या. त्यांच्यातिक कोणीही रेल्वेस्थानकात, बसमधे बॉम्बस्फोट किंवा बेछूट गोळीबार नाही केला. सामान्य जनतेला त्यात वेठीला धरले नाही कोणी.
इंदिरा गांधींच्या शिख अंगरक्षकांनी इंदिरा गांधींची हत्या केली, सामान्य जनतेवर गोळीबार नाही केला. नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींची हत्या केली, जमलेल्या इतर उपस्थितांवर गोळ्या झाडल्या नाहीत.
आणि क्रांतिकारकानी फक्त खजिन्याचीच लूट केली असं नव्हे. मध्यंतरी तर असे वाचनात आले की क्रांतिकारकानी खंडोबाचे देवस्थान लूटूनही क्रांतिकार्यासाठी पैसा जमा केला होता. आणि त्याबद्दल जनतेने त्याना कदाचित माफ अशासाठी केले असेल कारण त्यांचा त्यामागचा हेतू स्वतःच्या घरचे गल्ले न भरता देश स्वतंत्र व्हावा यासाठी काहीतरी करणे.
जनतेने माफ केले म्हणजे नेमके कोणी माफ केले? खंडोबाचे देवस्थान त्या काळी ज्यांच्या मालकीचे होते (किंवा ट्रस्टखाली असेल तर ज्या ट्रस्टच्या अधिपत्याखाली होते) त्यांच्या किंवा खंडोबाच्या देवस्थानात त्या काळात दर्शनासाठी किंवा श्रद्धेपोटी नित्याने जा-ये करणार्‍या भक्तांच्या मतांची किंवा भावनांची चाचपणी (सर्व्हे वगैरे) कोणी केली होती काय? आणि माफ केले म्हणजे नेमके काय केले? दुसरा काही पर्याय होता काय? की 'पब्लिक मेमरी इज़ शॉर्ट' याचे हे उदाहरण आहे? क्रांतिकारकांचा हेतू स्वतःचे गल्ले भरण्याचा नव्हता हे शतशः मान्य. पण तरीही देवस्थानाची संपत्ती देवस्थानाच्या परवानगीशिवाय वापरणे - ज्या कार्यासाठी वापरायचे ते कितीही उदात्त असले तरी - समर्थनीय होते काय? देवस्थानाच्या मालकांना / विश्वस्तांना ते कार्य रास्त आणि उदात्त वाटून त्यांनी स्वखुशीने ती संपत्ती क्रांतिकारकांना दान दिली असती तर गोष्ट वेगळी. गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन "आपण आपल्या गल्लीसाठी करतो आहोत", "ही आपल्या गल्लीसाठी अभिमानाची गोष्ट आहे", "त्याने आपल्या गल्लीची एकी वाढते" वगैरे कितीही उदात्त हेतूंनी करायचे म्हटले, तरी त्यासाठी वर्गणीची जबरदस्ती करणे किंवा एखाद्याने स्वेच्छेने वर्गणी द्यायचे नाकारले तर "नाही देत काय वर्गणी? गल्लीत ये, मग घेतोच बघून!" असे म्हणणे हे समर्थनीय होते काय? त्याने मूळ कार्याची उदात्तता टिकून राहते काय? हे उदाहरण आणि क्रांतीसाठी देवस्थान लुटणे यात नेमका फरक काय?
पण इंदिराजी आणि तो ब्रिटीश अधिकारी याना असा अतिरेकी आत्मविश्वास होता की आपल्याला कोण मारू शकत नाही. आणि त्यानेच त्यांचा घात केला.
संबंधित ब्रिटिश अधिकार्‍याबाबत कल्पना नाही, परंतु इंदिरा गांधींच्या बाबतीत माझ्या अर्धवट ऐकीव माहितीप्रमाणे (चूभूद्याघ्या!) इंदिरा गांधींना त्यांच्या जिवावरील संभाव्य धोक्याची पूर्वसूचना आणि अंगरक्षकांमध्ये शिखांची नेमणूक न करण्याचा सल्ला गुप्तचरांकडून मिळाला होता, परंतु "हे खरे असले तरीही मी माझ्या अंगरक्षकांच्या नेमणुकीत भेदभाव करू शकत नाही" म्हणून त्यांनी तो नाकारला होता. आधी म्हटल्याप्रमाणे ही ऐकीव माहिती आहे, त्यात कितपत तथ्य आहे याची मला कल्पना नाही, स्वतंत्र वाचनातून याची मी अद्याप खात्री करून घेतलेली नाही, परंतु यात तथ्य असल्यास त्याला अतिरेकी आत्मविश्वास म्हणावा की तत्त्वनिष्ठा की आणखी काही, याचा निर्णय मी करू शकलेलो नाही. अवांतर:
" हनुमंत महाबळी रावणाची लंका जाळी, होते बळ म्हणूनि न जाळि झोपड्या गोरगरीबांच्या"हा फरक लक्षात घ्यावा.
लंकेत गरीब नव्हते का? लंकेतल्या झोपड्यांत राहणार्‍या गरिबांनी सीतेचे हरण केले होते का?

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 17/12/2008 - 21:31
लंकेत गरीब नसावेत. कारण लंका सोन्याची होती. (सोन्या हे रावणाचे लहानपणीचे नाव). त्यामुळे कोणालाही वाटले तर काढ एक सुवर्णवीट आणि वीक असे करु शकत असावेत. आपला, (रावण) आजानुकर्ण

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

एकलव्य 17/12/2008 - 08:20
टगेदादा - आपले भलतेच ब्रेनवॉशिंग झालेले दिसते आहे. चला आम्हीही सामील होतो आणि लिस्ट वाढवितो... सांगा बरे - फरक तो काय?
  1. शिवाजी महाराजांनी लाल महालावर रात्री घातलेली धाड आणि अफजलने केलेला पार्लमेन्टवरील हल्लाबोल
  2. मराठ्यांनी फोडलेले दिल्लीचे तख्त आणि अफगाणिस्तानात तालिबान्यांनी महाबुद्धाचा केलेला ध्वंस
  3. भगतसिंगाने झाडलेल्या गोळ्या आणि जनरल डायरने दिलेला गोळीबाराचा आदेश
  4. सुभाषबाबूंनी इशान्य भारतावर केलेले आक्रमण आणि हिटलरने इंग्रजांवर म्हणून भारताशी पत्करलेले वैर
  5. बांगला मुक्तिसंघर्ष आणि डायरेक्ट ऍक्शन फॉर पाकिस्तान
  6. ...
म्हटले तर फरक आहे आणि नाहीच म्हटले तर काहीही फरक नाही. तर्क चालू देत... त्याने नुकसान काहीही नाही. (मॅझिनी) एकलव्य Intelligence KILLS Judgment... Slowly but Surely!

In reply to by एकलव्य

आजानुकर्ण 17/12/2008 - 09:16
मराठ्यांनी दिल्लीचे तख्त वगैरे काही फोडलेले नाही. दिल्लीपर्यंत गेलेले मराठे हे बिकट परिस्थितीची लागल्याची जाणीव होईपर्यंत बादशहाशीच एकनिष्ठ होते आणि सैनिकांचे पगार द्यायला पैसे नव्हते म्हणून मग पेशव्यांनी सिंहासनाचा चांदीचा पत्रा विकून पैसे गोळा केले. त्यालाच आपण तख्त वगैरे फोडले असे म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेतो. आपला, (वस्तुनिष्ठ) सुमेरसिंग आजानुकर्ण गारदी

In reply to by आजानुकर्ण

कोलबेर 17/12/2008 - 09:47
अजानुकर्ण शेठ, तुमच्यामुळे ही माहिती नविनच कळली. भगतसिंगाने घातलेल्या गोळ्यांमध्ये किती निरपराध मेले आणि डायरबाबाने घातलेल्या गोळ्यांमध्ये किती मेले ह्यांचा ताळमेळ लावला तर ती तुलना देखिल लिष्ट मधुन वगळावी लागेल. सुभाषबाबुंनी केलेले इशान्य भारतावरील (?) आक्रमण ह्या विषयी मात्र फारशी माहिती नाही. -- “The sign of an intelligent people is their ability to control their emotions by the application of reason”

In reply to by कोलबेर

एकलव्य 17/12/2008 - 17:55
भगतसिंगाने निरपराधांवर गोळ्या झाडल्या नाहीत असे आपण म्हणता आहात पण इंग्रज न्यायाधीश तसे म्हणत नाही. डायरचेही तसेच... आपण पाहाल त्याप्रमाणे आहे. शिवाजीला वाट चुकलेला देशभक्त म्हणणारेही कमी नाहीत. ही तुलना वगळायला हवी हे मान्य आहे पण वगळायचीच तर सगळ्याच वगळाव्यात. तसे यादी वाढवणारे बक्कळ आहेतच म्हणा. चीअर्स - एकलव्य

In reply to by एकलव्य

कोलबेर 17/12/2008 - 21:39
ही तुलना वगळायला हवी हे मान्य आहे पण वगळायचीच तर सगळ्याच वगळाव्यात.
टगोबांची उदाहरणे खोडून काढायला (त्यातील फोलपणा दाखवायला) तुम्ही मुद्दामच ही उदाहरणे दिलीत ह्याची कल्पना आहे, पण तरिही सगळ्याच तुलना वगळायच्या म्हंटलं तर हे चिकित्सा करुनच ठरवावे (भगतसिंगांच्या उदाहरणा सारखी) असे वाटते. चीअर्स - कोलबेर

In reply to by आजानुकर्ण

छोटा डॉन 17/12/2008 - 22:42
दिल्लीपर्यंत गेलेले मराठे हे बिकट परिस्थितीची लागल्याची जाणीव होईपर्यंत बादशहाशीच एकनिष्ठ होते आणि सैनिकांचे पगार द्यायला पैसे नव्हते म्हणून मग पेशव्यांनी सिंहासनाचा चांदीचा पत्रा विकून पैसे गोळा केले. त्यालाच आपण तख्त वगैरे फोडले असे म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेतो.
अगदी असेच म्हणतो ... मी जो काही अभ्यास केला आहे त्यातुन हीच परिस्थीती स्पष्ट होतो. मराठ्यांना तख्त फोडले खरे पण ते बहादूरी वगैरे नाही तर "गरज" म्हणुन फोडले हे सत्य आहे. आजानुकर्णाशी सहमत ...! ------ छोटा डॉन

In reply to by एकलव्य

टग्या 17/12/2008 - 20:46
टगेदादा - आपले भलतेच ब्रेनवॉशिंग झालेले दिसते आहे.
स्वतःच्या हातांनी धुवून जितके स्वच्छ करायला जमले तितके केलेय बुवा. आता लाँड्रीत धुतल्यासारखे एकसारखे पांढरेशुभ्र झाले नसेल, एखाददुसरा डाग राहिलाही असेल - चालायचेच. शेवटी स्वावलंबनाचा मार्ग खरा.
सांगा बरे - फरक तो काय?
तेच तर विचारतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय - समजून घ्यायला आवडेल. मला कळलेला नाही. तुम्हाला कळला असेल तर जरा तुम्हीच समजावून सांगा की!
म्हटले तर फरक आहे आणि नाहीच म्हटले तर काहीही फरक नाही.
फरक आहे असे सतत सांगण्यात, ठसवण्यात आले आहे. फक्त नेमका काय फरक आहे ते कोणी स्पष्ट केलेले नाही. आता इतके जण सांगतात म्हणजे कदाचित त्यात तथ्य असूही शकेल. पण नेमके काय ते स्वतःला नीट समजल्याशिवाय केवळ सगळे सांगतात, सांगत आले आहेत म्हणून मानायचे काय? म्हणून तर म्हणतोय की फरक नीट समजावून सांगा; समजला तर मानायला काहीच हरकत नाही. पण न समजता केवळ 'बाबा वाक्यं प्रमाणम्' (किंवा 'संघं शरणं गच्छामि') म्हणून विश्वास ठेवणे माझ्यापुरते मला तरी योग्य वाटत नाही.

In reply to by विसोबा खेचर

कलंत्री 14/12/2008 - 12:31
खरं आहे! एवढंच नव्हे, तर 'भारताला आजादी विना खड्ग, विना ढाल मिळाली हो..!' अशी गीते गाण्यातच आम्ही धन्यता मानतो..! ही अवांतर आणि विषयाला भरकटवणारी प्रतिक्रिया आहे. संपादक मंडळानी यावर टिपण्णी करावी. तात्या : गांधी हलके आहे म्हणून कोणाचे कार्य उत्कट होत नाही असा विचार ठेवावा. शेवटी आपण सर्व एक आहोत आणि आपल्यासारख्या दिग्ग्जाच्या प्रतिक्रिया मूळ विषय अकारणच भरकटवतात.

In reply to by कलंत्री

अवलिया 14/12/2008 - 12:37
ही अवांतर आणि विषयाला भरकटवणारी प्रतिक्रिया आहे. संपादक मंडळानी यावर टिपण्णी करावी. मला अजिबात असे वाटत नाही. उलट भारताला स्वातंत्र्य अहिंसेतुन मिळाले नाही, किंवा क्रांतिकारकांमुळे मिळाले नाही. दुस-या महायुद्धामुळे बेजार झालेल्या आंग्लांना ह्या प्रचंड देशाचा कारभार करणे अशक्य झाले म्हणुन ते निघुन गेले हे जितक्या लवकर आपण समजु तितके आपल्याला चांगले असेल. यात अहिंसावाद्यांचा किंवा क्रांतीकारकांचा अपमान करण्याचा हेतु नाही, पण भावनाविवश होवुन इतिहासाकडे आपण पाहु नये. अर्थात इंग्रजांना अहिंसावाद्यांपेक्षा क्रांतीकारकांचे भय जास्त वाटत होते हे मात्र १०० टक्के नक्कीच. -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by कलंत्री

सर्वसाक्षी 14/12/2008 - 13:13
द्वारकानाथजी, जर स्वातंत्रय्प्राप्तीसाठी सर्व मार्ग अनुसरणीय होते व जर स्वातंत्र्यप्राप्ती ही केवळ घोषणा, आंदोलने व मोर्चे यातुन न होता त्यात असंख्य क्रांतिकारकांचा सिंहाचा वाटा आहे तर सरकारी प्रचार यंत्रणेने दे दी हमे आजादी बीना खड्ग बीना ढाल असा खोटा व स्वतःला सोयीचा व हिताचा प्रचार करणे हे चीड आणणारे आहे, सदर लेख क्रांतिकारकांवर असल्याने या प्रचाराचा निषेध अवांतर ठरत नाही.

शंकरराव 14/12/2008 - 04:14
अवघ्या १४व्या वर्षी असा असामान्य पराक्रम करणाऱ्या या मुलींची नावे सुद्धा आपल्याला माहित नाहीत याची खंत वाटते. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यात त्यांचा वाघिणीचा वाटा आहे. आज त्यांच्या शौर्यकृत्याच्या ७७ व्या स्मरणदिनी त्या दोघींना सादर अभिवादन. आसेच म्हणतो.... स्वातंत्र चळवळीतील सर्व क्रांतिकरकांना व त्यांच्यातील निस्सिम देशभक्तिला शतशः वंदन प्रस्तुत ऍतिहासिक लेखाबद्द्ल सर्वसाक्षी याचे अनेक आभार

बगाराम 14/12/2008 - 04:18
या लहान मुलींनी पिस्तुल प्रथमच हाताळले होते. पैकी सुनिती ही कृश अंगकाठीची, तिची बोटे हडकुळी होती. तिला मागचा चाप अंगठ्याने ओढायला जमत नव्हता, तिने आपल्या प्रशिक्षकाला शक्कल सुचविली की मला अंगठ्या ऐवजी मधल्या बोटाने चाप मागे ओढयला शिकव! ही शक्कल लागु पडली. या दोघींनी दोन दिवस सराव केल. तेवढा पुरेसा होता कारण एक तर वेळ नव्हता व दुसरे म्हणजे गोळ्या अगदी जवळुन झाडायच्या होत्या. अवघ्या १४ वर्षे वयाच्या मुलिंना हातात बंदुकी देउन खून करायला लावणारे आणि तालिबानी अल-कायदा ट्रेनिंग कँपमधले अतिरेकी ह्यांच्यात काय फरक? १४ वर्षाच्या मुलींना काय समज असते की त्यांना आपले जीवित धोक्यात घालुन असले कृत्य करायला भाग पाडावे? वरील वर्णन वाचुन तर अंगावर काटा आला. कोवळ्या मुलिंना शस्त्रास्त्रे चालवायला शिकवुन जीवावर उदार करणारे हे देशभक्त मला तरी आदरस्थनी वाटले नाहीत. आपल्याला ’क’ ऐवजी राजबंद्यांच ’ब’ वर्ग देण्यात यावा यासाठी अन्नस्त्याग्रह केला. आवाज उठवुनही दाद मिळत नाही हे समजल्यावर उपोषणास प्रारंभ केला व अखेर त्याची बदली केली गेली. हे वाचुन गांधीजींची टवाळी करणारे काय म्हणतील ते वाचायला आवडेल.

In reply to by बगाराम

केदार 14/12/2008 - 04:47
बगाराम, ध्येय जेव्हा स्वातंत्र्य असते तेव्हा वयाला मर्यादा नसते. तूमचा तालिबान विषयीचा अभ्यास कच्चा असल्याचे लगेच दिसतेय कारण जेव्हा अफगाण, तालिबान्यांनी स्वतंत्र्य केले तेव्हां अफगाणात दिवाळी साजरी झाली होती हे आपल्याला माहीती नसावे. आजची तालिबान आणि तेव्हांची तालिबान खचितच वेगळी होती, थोडे खोलात शिरा. मग बोलू. तूम्ही फ्क्त आजच्याच तालिबानला खरे समजताय. कूठल्याही चळवळीला सामान्यांची मान्यता लाभली की फ्क्त चळवळ राहत नाही. त्यामूळे उद्य १० वर्षाच्या बालकाची कथा कोणी लिहीली ( भारतीय / अभारतीय) व ते स्वातंत्र्य प्राप्ती साठी बलिदान झाले असेल तर आम्हांस त्या व्यक्तीचा आदरच वाटेल. उपोषन हे गांधीजीनीच अस्तित्वात आणले, आणी उपोशन केले म्हणजेच अहिंसावादी असा सुर जो तूमच्या पोस्ट मध्ये लागतोय तो निश्चीतच चूक आहे. आणि जे अहिसांवादी नसतात (उदा सावरकर, नेताजी, ह्या भगिनी, मी स्वत :) इ इ) त्या सर्वांना 'कूठलाही' मार्ग चालतो. हिंसेंचा वा अहिसेंचा. की फरक पैंदा यारो. ताक. - गाधींजीची टवाळी करानारे हे कोण हे मला अजुन माहीत नाही पण तरीही उत्तर दिले कारण मि ही त्यांचा डोळस विरोधक आहेच.

In reply to by केदार

बगाराम 14/12/2008 - 04:50
माझ्या प्रतिक्रिया उडवल्या जात आहेत. मी कसे काय उत्त्तर देऊ? तालिबानचे समर्थन करणार असाल तर तशीही माझी शरणागतीच आहे.

In reply to by बगाराम

विसोबा खेचर 14/12/2008 - 05:02
सदर लेखावरील आपले मत समजले. आपला अभिप्राय व्यक्त करण्याची संधी आपल्याला दिली गेली आहे. मलाही आपण क्वेश्चन केले आहे. परंतु पक्या किंवा इतर कुणी या लेखाबद्दल त्यांचे मत लिहिल्यास, अथवा अभिवादन केल्यास प्रत्येकालाच आपण जाहीरपणे क्वेश्चन करू शकत नाही. आपण खरड पाठवून त्या विषयासंदर्भात एखाद्याशी चर्चा करू शकता. साक्षींचा सदर लेख हा काय चूक, काय बरोबर यावर भाष्य न करता इतिहासात जे घडलं आणि त्या मुलींनी जे केलं त्यावर भाष्य करणारा आहे.. असो, इथे अधिक विषयांतर न करता या संदर्भात आपण माझ्याशी खरडीतून संपर्क साधू शकता. शक्य झाल्यास व इच्छा असल्यास उत्तर देईन.. तात्या.

In reply to by बगाराम

सर्वसाक्षी 14/12/2008 - 13:06
अवघ्या १४ वर्षे वयाच्या मुलिंना हातात बंदुकी देउन खून करायला लावणारे आणि तालिबानी अल-कायदा ट्रेनिंग कँपमधले अतिरेकी ह्यांच्यात काय फरक> इतिहास जरा नीट वाचा. वयाच्या १४ व्या वर्षी ज्या मुलींनी असिम शौर्य दाखवले त्यात आपल्याला क्रांतिकारकांचे तालिबानी वर्तन दिसले यात आपली मनोवृत्ती दिसुन आली क्रांतिकारक वा त्या वाघिणी यांना यत्किंचितही कमीपणा आला नाही. या वीरांगना ध्येयाने प्रेरित होऊन स्वतःच्या जीवावर उदार झाल्या होत्या, त्याना पढवुन वा बुद्धिभेद करुन तयार केलेल्या नव्हत्या. १४ व्या वर्षी समज नसते हे विधान आपले व्यक्तिगत मत वा आपला अनुभव असू शकतो पण ते जागतिक सत्य नव्हे. जरा भारतिय स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास एकदा वाचा, अनेक शाळकरी हुतात्मे दिसतील. बाकी आपली आदरस्थाने हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे त्यावर माझे काही भाष्य नाही. उपोषणाविषयीचे आपले घोर अज्ञान आपण जाहिर केले आहेत. क्रांतिकारकांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कोणताही मार्ग वर्ज्य नव्हता. तुरुंगात हातापायात बेड्यांनी बद्ध असतानाही आपल्या अधिकारांसाठी आणि स्वाभिमानासाठी क्रांतिकारकांनी तेजस्वी उपोषणे केलेली आहेत. अहो जे फासावर जाणारच होते ते उपोषणाने देहत्याग करायला का भितील? गांधींचा विषय विनाकारण घुसडला आहातच तर ऐका: माझ्या अल्पशा माहितीनुसार सशस्त्र क्रांतिच्या पुरस्कर्त्यांपैकी तीन क्रांतिवीरांनी आपल्या ध्येयाखातर व राष्ट्राभिमानाखातर आमरण उपोषण केले व देहत्यागाने ते अजरामर झाले. ते तीन हुतात्मे आहेतः १) हुतात्मा मणींद्र बॅनर्जी - २० जून १९३४ फतेगढ तुरुंग २) हुतात्मा जतिन दास - १३ सप्टेंबर १९२९ लाहोर तुरुंग ३) हुतात्मा महाविरसिंह - १७ मे १९३३ अंदमान तुरुंग आता जरा आपण प्राणांतिक उपोषणाने हौतात्म्य पावलेल्या तीन गांधीवाद्यांचा तपशिल द्याल का? स्वतः गांधींनी तरअसे काही केले नव्हते.

In reply to by सर्वसाक्षी

सर्वसाक्षी साहेब, जाउ दे. वार झोन म्हणजे काय? आणि वार झोन मधे वय नसते. हे कळणे खूप जणाना कठीण जाते. तालीबान्याबरोबर थोडीशी सुद्दा तुलना हास्यास्पद आहे.

In reply to by विनायक प्रभू

सर्वसाक्षी 14/12/2008 - 18:04
प्रभुशेट, अहो १४ वर्षी समज नसते हे ऐकुन मला तर जाम हसायला आलं. नापास झालेली काही पोरे ९५ टक्के मिळविणार्‍यांबद्दल असेच बोलतात 'मास्तरांचे चमचे आहेत/ कॉपी केली असेल/ मास्तरने पैसे खाऊन पेपर आधीच दिला असेल ..नाहितर इतके गुण मिळुच शकत नाहीत'. चालायचेच, कारण त्यांची कुवत तितपतच असते त्यामुळे त्यांना कुणाला बुद्धी असेल व कुणी कष्ट केले असतील असा विचारच करता येत नाही. किंवा असे कष्ट करायची तयारी नसते. मग अशी मुक्ताफळे उधळण्यापलिकडे ते दुसरे काय करणार? पुढे नोकरीत असेच होते. एखाद्या कर्तबगार मुलीने अल्पावधीत पदोन्नती मिळवली तर अनेक वर्षे खुर्चीत बसून दात कोरणारे छातीवर हात ठोकुन सांगतात की आहो आम्हाला ५ वर्षात मिळत नाही इथे हिला एका वर्षात मिळाले यात हिचे कर्तृत्व नाही तर बॉसचे आहे, तिने त्याला 'खूष' केला असेल. ज्या वयात आपल्याला काही समजत नसते वा काही करायची धमक नसते आणि त्या वयात इतरांनी काही असामान्य कृत्य केले तर ते मान्य न करायची रोगट मानसिकता असलेले नेमेकी हिच प्रतिक्रिया देतात. याना उदाहरणे शोधायचीच म्हटली तर खूप मिळतील, पण शोधणार कोण? आणि कशाला? लहानशी रांगोळी काढायची तरी कष्ट पडतात, मात्र जाता जाता पायाने ती फराटुन टाकायला कष्ट वा बुद्धी लागत नाही. कोणी रांगोळ्या रेखतात, कोणी पाहतात व कौतुक करतात, कुणी नाक मुरडतात तर कुणी त्या फराटुन टाकतात. ज्याची त्याची मानसिकता.

In reply to by विनायक प्रभू

आजानुकर्ण 14/12/2008 - 18:30
दोन प्रश्नः १. हमास, हिजबुल्ला पासून ते तालिबान पर्यंत सगळे आधुनिक क्रांतीकारक लहान मुलांचे ब्रेनवॉशिंग करत राहतात हे वारंवार दिसले आहे. पॅलेस्टिनींवर होणाऱ्या अत्त्याचारांच्या फिती वारंवार दाखवून ज्यू हे डुकरापासून जन्मलेले आहेत, हिंदू माकडाचे वंशज आहेत, हे धर्म घाण आहेत हे लहान मुलांच्या मनांवर बिंबवले जाते. या ब्रेनवॉशिंगमध्ये आणि वरील ब्रेनवॉशिंगमध्ये काय फरक आहे हे मला समजत नाही. २. आजकाल सामनामध्ये हिंदुस्तानचे इस्लामिस्तान होणार वगैरे पेटवापेटवीचे प्रयत्न चालले आहेत. समजा हे इस्लामिस्तान दुर्दैवाने यशस्वी झालेच तर कसाब आणि इतर ९ दहशतवादी हे नव्या इस्लामी राष्ट्रात क्रांतीकारक ठरतील का? हे प्रश्न प्रामाणिकपणे विचारत आहे. माझी कीव वगैरे न करता याची उत्तरे द्यावीत जेणे करून माझ्या संकल्पना अधिक स्पष्ट होतील.

In reply to by आजानुकर्ण

अतिरेकी तयार करुन दुस-या देशात पाठविणे आणि देशभक्तीने प्रेरीत होणे हा एक फरक आहे. आजकाल अतिरेकी तयार करणे हा एक कारखाना आहे. ब्रेन वॉशींग ची प्रोसेस सहा महिने ते एक वर्ष चालते. वरील लेखात स्पाँटेनियस रिऍक्शन दिसते.

In reply to by विनायक प्रभू

बगाराम 14/12/2008 - 21:10
स्वतंत्र कश्मिर साठी लढणार्‍या अतिरेक्यांना क्रांतीवीर म्हणणार का?

In reply to by बगाराम

अभिजीत 14/12/2008 - 21:19
स्वतंत्र कश्मिर साठी लढणार्‍या अतिरेक्यांना क्रांतीवीर म्हणणार का? नाही. त्यांना अतिरेकीच म्हणणार.

In reply to by बगाराम

सर्वसाक्षी 14/12/2008 - 21:40
हा हिंदुस्थानचा भाग आहे. त्या भागाचा लचका तोडण्यासाठी परक्या देशातून शत्रू आक्रमण करीत आहे, दहशतवाद पसरवीत आहे. ही वस्तुस्थिती आहे. आता त्या घूसखोरांना क्रांतिवीर म्हणायचे की अतिरेकी ते आपणच ठरवा.

In reply to by सर्वसाक्षी

बगाराम 14/12/2008 - 21:45
हिंदुस्थानही त्याकाळी ब्रिटीश साम्राज्याचाच भाग होता. हे सगळे आपण नदीच्या कुठल्या तीरावर आहोत ह्यावर ठरते. मी अतिरेक्यांना अतिरेकीच म्हणणार. १४व्या वर्षी अल्लड वयात बंदुका हाती देणे हा अतिरेकच. आणि खुद्द कश्मिर मधील अतिरेकी? त्यांना काय म्हणाल मग?

In reply to by बगाराम

सर्वसाक्षी 14/12/2008 - 22:11
आपण ब्रिटिशधर्जिणे असाल तर तमाम क्रंतिकारक आपल्या नजरते अतिरेकी असणे स्वाभाविक आहे. आम्ही हिंदुस्थानच्या वतीने विचार करीत असल्याने आम्हाले ते क्रांतिकारक वंदनिय हुतात्मे वाटतात.

In reply to by बगाराम

बगाभाऊ, क्रांतिकारक असो वा अहिंसावादी, दोन्ही प्रकारांतल्या स्वातंत्र्यवीरांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपल्या मातृभूमीस स्वतंत्र करण्यासाठी प्राण्याच्या अहुत्या दिल्या. त्यांच्या बलिदानांमुळे आपण येथे अशा मिमांसा करण्याच्या परिस्थितीत आहोत. याचे भान ठेऊन त्या क्रांतिवीरांना मानचा मुजरा करावा... पुढील पिढीसमोर आदर्श सांगत अशा देशभक्तांच्या कथा प्रत्येकाच्या मुखी वदल्या जाऊन पुन्हा देशभक्तीच्या चैतन्याने वातावरण मुग्ध करावे असे मला वाटते. वयाच्या बाबतीत योग्य-अयोग्यचा खल करण्यासाठी एक स्वतंत्र धागा सुरु केलात तर तेथे येऊन आम्ही आपली मते मांडू. पण येथे स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती उद्घृत करताना असले विचार करण्याऐवजी विधायक लेखन करावे अशी नम्र विनंती. त्या खलासाठी आपण अगदी श्रावण बाळ (कोवळ्या वयात आई वडिलांचे ओझे वाहने), अभिमन्यू (बालवयात वडिलांच्या सांगण्यामुळे युद्धात उतरणे) ते बाबू गेणू (कुणाच्या तरी ब्रेनवाशिंग मुळे नीच व कृर इंग्रज अधिकार्‍यांकडून उघड्या छातीवर गोळ्या घेण्यासाठी निशस्त्र सामोरे जाणे) पर्यंत सगळ्या उदाहरणांवर कीस पाडा... आम्ही आपले अनुमोदन करु पण इथे असले काही आमच्याच्याने होणार नाही. वंदे मातरम्! आपला, (देशप्रेमी) भास्कर संपादित आम्ही येथे वसतो.

In reply to by भास्कर केन्डे

बगाराम 16/12/2008 - 06:39
माननीय केंडेमहोदय, आपल्याला न पटलेल्या विचारांना 'हलकट' असे संबोधायला हे काही संघाचे कार्यालय नव्हे. इथल्या संपादक मंडळाने कृपया ह्या जहाल विचारसरणीच्या लोकांच्या भाषेला लगाम घालावा. अश्या शेरेबाजीमुळे चर्चा होणे अशक्य होउन बसते आणि हुल्लडबाजी करणार्‍यांना आपला मुद्दाच पुढे रेटल्याचे समाधान मिळते. -बगाराम

In reply to by सर्वसाक्षी

कलंत्री 14/12/2008 - 20:53
आता जरा आपण प्राणांतिक उपोषणाने हौतात्म्य पावलेल्या तीन गांधीवाद्यांचा तपशिल द्याल का? स्वतः गांधींनी तरअसे काही केले नव्हते. कोणास ठाऊक आज अनेक़जण गांधीवादाचे / विचाराचे समर्थन करण्यास पुढे येत आहेत ही मला सुखावणारी गोष्ट आहे. संकेतस्थळाचे निर्माण झाले तेंव्हा आम्ही गांधीवादावर काही लिहावे आणि सावरकरवादी, क्रांतिकारकवादी आणि संघाच्या विचारसरणीच्या लोकांनी तेच ते प्रश्न विचारावे आणि राष्ट्रीय लढ्याच्या संदर्भात आम्ही यथायोग्य उत्तर द्यावे आणि या लोकांचे परत परत तेच ती प्रश्न यावीत असे ठरलेले असे. आता वरील प्रश्नाचे उत्तर देणे सोपे आहे कारण स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा आणि त्याचे नायकत्व निर्विवादपणे कॉग्रेस आणि गांधीकडेच ( त्याच्या यश-अपयशाबरोबर) जाते. स्वातंत्र्य लढ्याचे अनेक पदर आणि पैलु आहेत, परंतु माझी अपेक्षा अथवा विनंती आहे की, गांधीवादी लोकांनी याविषयावरचा सांगोपांग अभ्यास करावा. सुदैवाने आज अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्षी गांधीवादाचा परामर्ष घेणारी अनेक पुस्तके प्रकाशित होत असतात. आजही गांधीवादाचा अभ्यास असणारी अनेक थोर आणि तज्ज्ञ लोक आहेतच. वरील प्रश्नाचा उपयोग करुन आपण याविचारसरणीचा सांगोपांग अभ्यास करावा. सर्वसामान्य लोकांना गांधीवादाबद्दल परत आस्था आणि विश्वास वाटेल अशी मांडणी करावी. शक्य असल्यास काही प्रश्नेही हाताळावावीत,तरच आपण गांधीवादाला समजावुन घेत आहे असे निष्पन्न होईल. अन्यथा भाषाविलास आणि वाणीविलासा बाहेर आपलेही पाऊल पडणार नाही. बर्‍याच वेळेस अनेक लोकांचा विचार करण्याची पद्धत एका टप्प्यावर येऊन थांबते ते आपल्याबाबतीत घडू नये अशीच माझी प्रार्थना आहे. याबाबतीत माझा जो काही अभ्यास आणि ग्रंथसंग्रह आहे तो आपल्यासाठी खुला आहे. द्वारकानाथ कलंत्री

In reply to by कलंत्री

सर्वसाक्षी 14/12/2008 - 21:43
द्वारकानाथजी, हा लेख दोन क्रांतिकारक कन्यांना समर्पित आहे. त्यावर जे काही लिहायचे ते अवश्य लिहा. पण या लेखात गांधीवाद घुसवु नका. आपण त्या विषयावर एक स्वतंत्र लेख लिहा.

In reply to by सर्वसाक्षी

बगाराम 14/12/2008 - 21:16
माझी कीव केल्याबद्दल धन्यवाद. जहालमतवादी बर्‍याचदा वैयक्तिक शेरेबाजीवर उतरतात हा अनुभव घेतला आहे. असो मी तुम्हाला काहिही विचारणार नाही. कारण तात्यांना माझे साधे क्वेश्चन खटकतात पण तुम्ही विनाकारण माझी केलेली कीव खटकत नाही ह्यावरुन त्यांचा तुमच्या विचारांशी बायस आहे हे स्पष्ट दिसते. आणि ते इथले आणिबाणी काळातील मालक असल्याने मी तुमच्याशी हा वाद वाढवणार नाही.

In reply to by सर्वसाक्षी

ऋषिकेश 14/12/2008 - 21:40
आता जरा आपण प्राणांतिक उपोषणाने हौतात्म्य पावलेल्या तीन गांधीवाद्यांचा तपशिल द्याल का? स्वतः गांधींनी तरअसे काही केले नव्हते.
यामुळे माझी उत्सुकता चाळवली. जालावर बरेच शोधले. "पोट्टी श्रीरामुलु" ही एकमेव भारतीय गांधीवादी उपोषणाने हुतात्मा झाली आहे या निष्कर्षाप्रत येणार तो पर्यंत अजून दोघे नि:शस्त्र क्रांतीकारी मिळाले... मात्र ते गांधीवाअदी होते की नाहि कल्पना नाहि. (अनेक परदेशी गांधीवादी मात्र हुतात्मा झालेले आढळतात)
  • पोट्टी श्रीरामुलु (एकत्र आंध्र प्रदेशसाठी सत्याग्रह, उपोषण आणि त्यातच मृत्यू. कट्टर गांधीवादी)
  • मोहन किशोर नामो दास
  • मोहीत मोईत्रा
(वरील दोन हुतात्मे, हुतात्मा महाविरसिंह बरोबर उपोषण केलेले त्याचे अंदमानमधील मित्र. मला जी थोडीशी माहिती मिळाली त्यानूसार हे सशस्त्र क्रांतीकारी नव्हते, स्वांतंत्र्यलढ्याशी नक्की निगडीत होते. मात्र गांधीवादी होते की नाहि कल्पना नाहि) बाकी तुमचे लेख मला नेहमीच आवडतात. विचारात टाकतात. हा लेखही आवडला. :) -(गोंधळलेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

सर्वसाक्षी 14/12/2008 - 22:03
ऋषिकेशमहाशय, पोट्टी श्रीरामुलु हे गांधीवादी होते व त्यांनी आमरण उपोषण केले होते हे आपले म्हणणे अगदी बरोबर आहे. मात्र हे उपोषण आपल्याच स्वतंत्र भारतात घडले, स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांविरुद्ध नव्हे. अर्थात त्याने पोट्टीजींच्या त्यागाचे महत्व कमी होत नाही. मात्र मी उल्लेख अशासाठी केला की इथे संदर्भ वेगळा होता. उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद. इतर दोन हुतात्म्यांची माहिती शोधायचा प्रयत्न आपण अवश्य करुया, मात्र शांततापूर्ण आंदोलन करणार्‍या गांधीवाद्यांना अंदमानला काळ्या पाण्यावर पाठवले जात नसे, तो मान क्रांतिकारकांनाच मिळायचा त्यावरुन ते क्रांतिकारकच असावेता से अनुमान आहे.

In reply to by सर्वसाक्षी

ऋषिकेश 14/12/2008 - 22:12
वर म्हटल्याप्रमाणे ही माहिती प्रतिवादासाठी म्हणून मुद्दाम न शोधता उत्सुकता म्हणून शोधली. असो.
इतर दोन हुतात्म्यांची माहिती शोधायचा प्रयत्न आपण अवश्य करुया,
जरूर. अंदमानच्या सेल्युलर जेलच्या एका साईटवर या तिघांनी उपोषण केले व त्यांचा मृत्यू झाला. हे कोणालाहि कळू नये म्हणून जेलरने त्यांची प्रेते समुद्रात फेकून दिली होती :( अशी माहिती मिळाली आहे. -(गोंधळलेला) ऋषिकेश

In reply to by सर्वसाक्षी

टग्या 16/12/2008 - 03:59
पोट्टी श्रीरामुलु हे गांधीवादी होते व त्यांनी आमरण उपोषण केले होते हे आपले म्हणणे अगदी बरोबर आहे. मात्र हे उपोषण आपल्याच स्वतंत्र भारतात घडले, स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांविरुद्ध नव्हे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोरारजीभाईंच्या गोळीबाराला बळी पडलेल्या १०५ (की ८०? मोरारजीभाईंच्या मते ८०.) जणांच्या स्मरणार्थ फ्लोरा फाउंटनचे नाव बदलून 'हुतात्मा चौक' केले गेले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ स्वतंत्र भारतात घडली, इंग्रजांविरुद्ध नव्हे, अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. (तसेही मारले गेलेले नि:शस्त्र होते अशी निदान माझी तरी समजूत आहे. चूभूद्याघ्या.) आता हे १०५ (किंवा ८०) हे केवळ स्वातंत्र्योत्तर काळात मारले गेले म्हणजे ते हुतात्मे होत नाहीत काय? मग 'हुतात्मा चौक' हे नामकरण चुकीचे आहे काय? हुतात्मा चौकाचे नाव बदलून पुन्हा 'फ्लोरा फाउंटन' असे (किंवा 'स्व. मीनाताई ठाकरे कारंजे' असे) करण्यासाठी आंदोलन करण्यास शिवसेनेस सांगावे काय?

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 16/12/2008 - 19:25
स्व. मीनाताई ठाकरे कारंजे निषेध निषेध. येथे खरे तर तीन मुद्दे आहेत. तुम्ही स्व. कोणाला म्हटले आहे? कारंज्याला म्हटले असेल तर ठीक. पण मग मीनाताई ठाकरे स्व. कारंजे असे हवे होते. त्यामुळे तुम्ही स्व. हे मीनाताईंबाबत म्हटले आहे हे सिद्ध होते. मराठीत स्व. या शब्दाचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. येथे कै. किंवा वै. चालले असते. (पुण्यश्लोकही म्हणायला हरकत नाही.) मात्र स्व. असे लिहून आपण इतिहासातील चुका पुन्हा करत आहोत असे वाटते मुस्लिम आक्रमकांनी इराणपासून उत्तर आफ्रिकेपर्यंतचा विस्तृत भूभाग १००-१५० वर्षांत पादाक्रांत केला. इराण, अरबस्थान, इजिप्त यासारख्या ठिकाणी त्यापूर्वीच्या संस्कृतीचे पालन करणारा माणूस आता औषधालाही शिल्लक नाही. भारतात त्यांना पहिले यश ७१२ मध्ये मिळाले. पण नंतरच्या काळात बाप्पा रावळसारख्या वीरांनी अगदी सिंध प्रांत पण परत जिंकून घेतला. गझनीच्या महंमदाने लाहोर आणि त्याजवळचा भाग जिंकला ११ व्या शतकाच्या सुरवातीला आणि ते दिल्लीपर्यंत पोहोचले ते १२ व्या शतकाच्या शेवटी म्हणजे जवळजवळ २०० वर्षांनंतर! तेव्हा सिंध प्रांतापासून दिल्लीपर्यंत भूभाग पादाक्रांत करायला त्यांना ७१२ ते ११९२ अशी ४८० वर्षे थांबावे लागले याचे कारण हिंदूंनी (विशेषतः राजपुतांनी) अत्यंत कडवा प्रतिकार केला होता. आणि त्यानंतर राणा प्रताप, शिवाजी महाराज, गुरू गोविंद सिंह आणि दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याने त्या आक्रमणाचा कडवा प्रतिकार केला. या वीरांनी शत्रूला तो प्रसन्न व्हावा म्हणून दक्षिणा दिल्या नाहीत आणि तलवारीचा मुकाबला तलवारीनेच केला म्हणून इराण आणि इजिप्त मध्ये घडले ते भारतात घडले नाही. या वीरांनी तुमचा भाबडा विश्वास उराशी बाळगला असता तर काय झाले असते? वरील आक्रमणासारखेच हे भाषिक आक्रमणही धोक्याचे आहे. मराठीचा वेगळा ठसका आहे. तिथे हिंदाळलेले शब्द वापरून तुम्ही उत्तरेच्या सांस्कृतिक आक्रमणापुढे शरणागती पत्करत आहात. सावरकरांनी केलेल्या भाषाशुद्धीच्या प्रयत्नांची तरी थोडी चाड ठेवा. आपला, (मोनिकाचा प्रियकर) विल्यम जेफरसन आजानुकर्ण हां. आता 'स्व. मीनाताई ठाकरे कारंजे' असे लिहून शिवसेनाच मराठीची कशी वाट लावत आहे हे निर्देशित करण्याचा आपला प्रयत्न असेल तर आम्ही वरील विधाने मागे घेतो. आपला, (टगवंतरावांचा फ्यान) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

क्लिंटन 16/12/2008 - 22:39
धन्यवाद. हुतात्मा स्मारकातील कारंज्याच्या निमित्ताने का होईना आपण मुस्लिम आक्रमण भारतासाठी धोक्याचे होते हे मान्य केलेत ही कमी महत्वाची गोष्ट नाही.मात्र माझा वेगळ्या चर्चेतील वेगळ्या संदर्भातला प्रतिसाद थोडासा बदलून (गांधींचा भाबडा विश्वास ऐवजी तुमचा भाबडा विश्वास असा शब्दप्रयोग करून) इथे आणणे हे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखे आहे असे माझे स्पष्ट मत आहे. मी इतरांइतक्या नियमितपणे मिसळपाववर लिहित नसलो तरी मी मनोगतवर असल्यापासून गेल्या २.५ वर्षांत कमितकमी ५० चर्चांमध्ये तरी भाग घेतला आहे.त्यात कोणाचाही एका चर्चेतला प्रतिसाद उघडउघड किंवा आडवळणाने मी वेगळ्या चर्चेत आणलेला नाही आणि व्यक्तिगत पातळीवर जाऊन चर्चा केलेली नाही. असे प्रकार करणे मिसळपाव सारख्या संकेतस्थळावर निकोप चर्चा होण्यासाठी योग्य नाही असे मला स्वत:ला वाटते. तरी सरपंचांचा निर्णय मान्य. तेव्हा यावर अजून काही लिहित नाही. बाकी या चर्चेत क्रांतिकारकांची तुलना तालिबानींबरोबर करायचा प्रयत्न चालला आहे असे वाटते. वयाच्या १४ व्या वर्षी देशासाठी काही करावे अशी कळकळीची भावना असलेली मुले फारच थोडी आणि त्यापुढे जाऊन स्वत: काहीतरी करणारी मुले म्हणजे लाखांमध्ये हाताच्या बोटावर बघायला मिळतील. आमच्या छत्रपतींनी रांझ्याच्या पाटलाचे एका स्त्रीची बेअब्रू केल्याबद्दल हातपाय १४-१५ वर्षी तोडायचा हुकुम दिला होता.पुढे १६ व्या वर्षी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.सांगा त्यांचा कोणी ब्रेनवॉश केला होता? संत ज्ञानेश्वरांनी १२ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. तसेच ’ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ म्हणणारी मुक्ताबाई वयाने त्यांच्याहूनही लहान होती. सांगा त्यांचा कोणी ब्रेनवॉश केला होता? सावरकरांनी वयाच्या १५ व्या वर्षी स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता झुंजेन अशी प्रतिज्ञा घेतली तेव्हा त्यांचा कोणी ब्रेनवॉश केला होता? श्री. एकलव्य यांनी म्हटल्याप्रमाणे तेजाला वयाचे वलय नसते.आणि तरीही देशासाठी त्याग करणार्‍या क्रांतिकारकांना तालिबान्यांच्या पंगतीत आणून बसवायच्या प्रवृत्तीचा निषेध आणि बंगालच्या वाघिणींना मानाचा मुजरा. ---विल्यम जेफरसन क्लिंटन

In reply to by क्लिंटन

आजानुकर्ण 16/12/2008 - 22:43
इथे वैयक्तिक टीका केलेली नाही. तसे वाटले असल्यास माझा नाईलाज आहे. मला सगळ्या क्रांतीकारकांविषयी संपूर्ण आदर आहे. मुद्दा असा आहे की १४व्या वर्षी मुलांच्या हातात शस्त्र देणे या प्रसंगाचे गौरवीकरण सध्याच्या काळात योग्य आहे का. आपला (सम्यक) आजानुकर्ण

In reply to by बगाराम

बंगाली वाघीणींनी देशबांधवांवर अत्याचार करणार्‍याला मारले. शस्त्रास्त्रे घेऊन निरपराध लोक, ज्यात कोवळी मुले, स्त्रीया यांचा समावेश होतो त्यांना नव्हे. तालीबानी आणी भारताचे स्वातंत्र्य सैनीक ह्यात फरक आहे. जालीयनवाला बागेत निरपराध्यांना मारणारा आणी त्या बद्दल अजीबात खंत न बाळगणार ज. डायर हा तालीबान्यांच्या पठडीतला होता. आपल्या क्रांतीकारकांनी इंग्लंड मध्ये जाऊन, त्यांच्या रेल्वे स्थानकांवर बेछूट गोळीबार केला होता काय? संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

पक्या 14/12/2008 - 04:21
फार सुरेख लेख. बंगालच्या वाघिणींची ओळख करून दिल्याबद्द्ल सर्वसाक्षींना धन्यवाद. शांती आणि सुनिती यांना त्यांच्या अतुलनीय पराक्रमाबद्द्ल अभिवादन. >>कॉंग्रेसने मात्र ’उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणास नाही’ या व्रताला जागुन त्यांचा निषेध केला. कॉंग्रेसचा धिक्कार असो.

बगाराम 14/12/2008 - 05:06
इथल्या सभासदांना क्वेश्चन केल्या बद्दल माझे काही प्रतिसाद उडवल्याचा खुलासा सरपंचांनी केलेला आहे. आणिबाणी असल्याने त्यांचा निर्णय मान्य आहे. मी ह्या धाग्यावर केलेले लेखन कुणीही क्वेश्चन म्हणून घेउ नये, ती फक्त माझी मते आहेत. अभिवादन करण्यापूर्वी, ही आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील काळी पाने आहेत. हुतात्मा भगतसिंह राजगुरू ह्यांनी केली ती खरी सशस्त्र क्रांती. जाणत्या वयात. त्यांनी कधी अवघ्या १४ वर्षाच्या कोवळ्या मुलींना प्रशिक्षण देउन पुढे केले नाही.ह्यावर विचार करावा इतकेच म्हणतो. कसलेही स्पष्टीकरण अपेक्षीत नाही. बगाराम

In reply to by बगाराम

_समीर_ 14/12/2008 - 07:00
हुतात्मा भगतसिंह राजगुरू ह्यांनी केली ती खरी सशस्त्र क्रांती. जाणत्या वयात. त्यांनी कधी अवघ्या १४ वर्षाच्या कोवळ्या मुलींना प्रशिक्षण देउन पुढे केले नाही.ह्यावर विचार करावा इतकेच म्हणतो. हम्म... विचारकरण्याजोगा मुद्दा आहे खरा.

साक्षीजी सुंदर लेख... अप्रतिम लेख. अशा क्रांतिकारी स्त्रियांच्या चरित्राची ओळख करून दिल्याबद्दल आपले आभारी आहोत. पुण्याचे पेशवे

कलंत्री 14/12/2008 - 07:50
बगारामजी, आपले प्रतिसाद वाचले. त्यात तथ्यांश असला तरी कोणत्याही बाबीचा सर्वांगीण विचार व्हावा. १. जिल्हाधिकार्‍यानीच सविनय सत्याग्रहीवर अत्याचार केले. २. पुरुष क्रांतिकारकानी त्या कृत्याचा बदला घेण्याचा विचार केला.त्या साठी त्यांनी आपला अथवा परका असा विचार न करता हम है हिंदुस्थानी असा स्तुत्य विचार केला. ३. परिस्थिती मात्र त्यांना अनुकुल नव्हती. ४. जिल्हाधिकारी भेकडासारखा आपल्या घरातच होता. ५. अश्या वेळेस अपवाद आणि आपदधर्म म्हणून या कोवळ्या मुलींनी हे कृत्य करण्याचे मनावर घेतले आणि पार पाडले. ६. त्यानंतर मात्र सशस्त्र विचारानंतर योग्य वेळी निषेध अथवा सत्याग्रहाचे हत्यार वापरले. असा जर क्रम असेल आणि तो आहे ( सर्वसाक्षीची तशी विश्वासार्हता आहे) तर आपल्याला या भगिनीबद्दल आदरच वाटला पाहिजे. अपवाद म्हणून कोणताही मार्ग त्याज्य नाही. सर्वसाक्षीजी : आपली निष्ठा आम्हास कौतुकास्पदच वाटते. आपल्याकडून आमच्या मोठ्या अपेक्षा आहे. आपण क्रांतिकारकांच्या लढ्याबद्दल एखादे चांगले पुस्तक प्रकाशित करा. भारताच्या इतिहासातले हे पर्व दुर्लक्षितच आहे आणि आपण ठरविले तर त्याला योग्य तो न्याय देऊ शकता. क्रांतिकारकांचे समयोचित स्मरण केल्याबद्दल सर्व मिपाकरातर्फे आपले आभार.

एकलव्य 14/12/2008 - 12:22
पराक्रमाला आणि तेजाला वय नसते. १६ व्या वर्षी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले... त्यांचे सवंगडी आणि महाराजांनीही १४ व्या वर्षीही काही हरामखोरांना यमसदनाला पोहचविले असण्याची दाट शक्यता आहे. दिल्ली हादरविणारा थोरला बाजीराव मराठी दौलतीचा पंतप्रधान झाला तो १७ व्या वर्षी. इंग्रजांना नमविणारा माधवराव तर त्याहूनही लहान असताना सूत्रे सांभाळू लागला. अकबर वयाच्या १४ व्या वर्षी दिल्लीच्या तख्तावर बसला. अनेक नावे देता येतील... स्वतंत्र भारतासाठी कोवळ्या वयात बलिदान देणार्‍या बंगालच्या वाघिणींना प्रणाम. (ऋणी) एकलव्य

In reply to by एकलव्य

विसोबा खेचर 14/12/2008 - 13:06
पराक्रमाला आणि तेजाला वय नसते. एकलव्यराव, वरील अवघ्या पाच शब्दात आपण फार मोठी गोष्ट सांगून गेलात! आपल्याला सलाम..! तात्या.

In reply to by एकलव्य

एकलव्य मी अगदी आणी अगदी ह्याच शब्दात प्रतिक्रिया देणार होतो. माझ्या मनातले शब्द आपण इथे उतरवले आहेत त्या बद्दल शतशः धन्यवाद ! ह्या वाघिणींना आमचा मानाचा मुजरा. सर्वसाक्षी ह्यांचे मनःपुर्वक आभार ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

In reply to by एकलव्य

आजानुकर्ण 14/12/2008 - 18:32
महाराजांविषयीचा आदर त्यांनी कितव्या वर्षी तोरण बांधले यात नसावा. तो त्यांनी आयुष्यभर दिलेला लढा आणि केलेला राज्यकारभार यात आहे. अकबरापासून ते माधवरावांपर्यंत आलेली उदाहरणे ही आधीचा राजा नसणे या तत्कालिक परिस्थितीमुळे आली आहेत. राजांकडे असलेली मार्गदर्शनाची साधणे - वजीर-दिवाण-अमात्य किंवा कारभार चालवणारे राघोबादादांसारखे लोक वेगळेच परंतु नामधारी जबाबदारी त्यांच्याकडे असा प्रकार असावा. त्यामुळे कोणीतरी ब्रेनवॉशिंग केल्याने हल्ले करणे आणि राज्यकारभाराची जबाबदारी लहान वयात अंगावर येणे यात गुणात्मक फरक आहे.

In reply to by आजानुकर्ण

एकलव्य 14/12/2008 - 19:23
कर्णसाहेब, तुलना वरील महापुरुषांच्या आणि बंगालच्या वाघिणींच्या एकूण कर्तबगारीची नाही. १४ व्या वर्षी किती जाण असते याची सर्वांना माहिती असलेली उदाहरणे देण्याचा प्रयत्न आहे. जबाबदारी स्वतःहून घेतली की अंगावर आल्यावर सांभाळली हा किडा निघेल याची खात्री होती. (दिलेली उदाहरणे अंगावर आल्यावर सांभाळली या गटात सरसकटपणे टाकणे हे खूपच ढोबळ होईल हा भाग अलहिदा! ) अकबरापासून ते माधवरावांपर्यंत आलेली उदाहरणे ही आधीचा राजा नसणे या तत्कालिक परिस्थितीमुळे आली आहेत. राजांकडे असलेली मार्गदर्शनाची साधणे - वजीर-दिवाण-अमात्य किंवा कारभार चालवणारे राघोबादादांसारखे लोक वेगळेच परंतु नामधारी जबाबदारी त्यांच्याकडे असा प्रकार असावा. धक्का बसला. आपला आवाका वरील अंदाजदर्शनापेक्षा अधिक असावा अशी अपेक्षा होती. एनिवे... जबाबदारी कशीही आलेली असो... पण आपल्या थोरपणाचा स्पार्क या वीरांनी -- महाराज/बाजीराव/माधवराव/अकबर -- अगदी "कोवळ्या" वयात दाखविला असे वाक्ये आणि दाखले अजरामर आहेत. इतिहास बदलणारी ही माणसे आहेत. अवांतर - वरील उदाहरणे नाममात्र आहेत. पानिपतावर विश्वास गेला तोही कोवळ्या वयात आणि लाखो मराठी वीरांनी प्राण टाकले तेही कोवळ्या वयातीलच असावेत. पण इतक्या दूरवर पल्ला मारण्याची हिंमत त्या वयात त्यांच्याकडे होती इतकाच मुद्दा येथे आहे. (घाईघाईत) एकलव्य

In reply to by एकलव्य

बगाराम 14/12/2008 - 21:21
महाराजांनी जे केले त्याची तुलना इथे होऊ शकत नाही. महाराज कुठतरी जाउन प्रशिक्षण घेउन मुघलांच्या सैन्यात सुसाईड किलर म्हणून गेले नाहीत. त्यांनी स्वराज्य बांधणी केली. केवढी मोठी जिद्द दाखवली. त्यांच्या राज्यात जर १४ वर्षाच्या बालिकांना प्रशिक्षण देउन जीवावर उदार करुन पाठवण्यात आले असते तर त्यांना तरी ते खपले असते का? असला प्रकार करण्यापेक्षा ते स्वतः तलवार घेउन शत्रुच्या छावणीत घुसले असते. हा मोठा फरक इथे आहे.

In reply to by यशोधरा

बगाराम 14/12/2008 - 21:32
होय अर्थातच लहान वयात केले. इथे कधी केले वर नसुन काय केल े त्यावर फरक केला आहे.

In reply to by बगाराम

यशोधरा 14/12/2008 - 21:45
>>इथे कधी केले वर नसुन काय केल... लहान वयात महाराजांनी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली, कारण त्यांच्या आजूबाजूला जे चालले होते ते त्यांच्या संवेदनाशील मनाला रुचत नव्हते. जिजाबाई आणि दादोजी कोंडदेवांचे मार्गदर्शन त्यांना होते (या बाबतही हल्ली वाद आहेत हे ठाऊक आहे, कृपया तो फाटा फोडू नये), भल्यावाईटाची जाण अंगच्या बुद्धीमत्तेमुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे लहान वयातच आली होती, म्हणून त्या काळाला जे सर्वप्रथम करणे योग्य होते, की जसे आपल्या सोबत्यांच्या मनात स्वराज्याची इच्छा जागवणे.. ते त्यांनी केले. लहान वयात मोहीमाही केल्याच ना? (काय केले..) जसे वातावरण असेल, तशी कृती असावी लागते, काही जण वेडे ध्येयवादी तशी कृती करु शकतात,काही जणांना ते जमत नाही. या कन्यकाही तश्याच होत्या म्हणावे लागेल. आजच्या दहशतवाद्यांशी, त्यांच्या मनोवृत्तीशी क्रांतीवीरांचा आणि वीरांगनांचा संबंध जोडणे योग्य वाटत नाही.

In reply to by बगाराम

सर्वसाक्षी 14/12/2008 - 21:48
आपण पुन्हा पुन्हा असे ठसवु पहत आहात की त्या मुलींना स्वतःची अक्कल नव्हती व त्यांना चिथावले गेले. असो. आपण स्वतःला हवे ते निष्कर्शे काढु शकता. मात्र यावरुन आपल्या स्त्री व क्रांतिकारक यांच्या विषयीच्या भावना समजल्या.

In reply to by सर्वसाक्षी

आजानुकर्ण 14/12/2008 - 22:35
बगाराम यांनी स्रीविषयक काहीही वावगे विधान केलेले नाही असे वाटते. शांतपणे पाहिल्यास एका विचारसरणासाठी असलेला क्रांतीकारक हा दुसऱ्या विचारसरणीसाठी अतिरेकी वाटू शकतो. या विचारस्वातंत्र्याला आक्षेप असण्याचे कारण नाही आपला (शांतताप्रेमी) आजानुकर्ण

In reply to by एकलव्य

चतुरंग 14/12/2008 - 21:56
पराक्रमाला आणि तेजाला वय नसते. लाख बोललात!! ह्याच संदर्भात सारेगमप लिटल चँप्स ह्या कार्यक्रमात हृदयनाथांनी सांगितलेला किस्सा चपखल ठरावा. सावरकर बारा वर्षाचे असताना भगूरहून नाशिकला आले एका गाण्याच्या स्पर्धेसाठी. त्यांनी लिहिलेले 'हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा' हे ओजस्वी गाणे ते स्वतः गायले. त्यांना पहिले बक्षीस मिळाले. लोकमान्य टिळक परीक्षक होते. १२ वर्षांचा मुलगा हे ओजस्वी शब्द, हे अलंकार, हे वृत्त पेलू शकत नाही, लिहू शकत नाही ह्या शंकेतून स्पर्धेनंतर छोट्या विनायकाला जवळ बोलावून त्यांनी विचारले "बाळा, आता मला खरंखरं सांग की हे शब्द, हे गाणं तुझंच की तुझ्या वडिलांनी, गुरुजींनी, मोठ्या भावाने कोणी लिहून दिले?" सावरकरांनी वयाच्या १२ व्या वर्षी दिलेल्या उत्तरातून ते असामान्य का होते ह्याची प्रचिती येते - सावरकर लोकमान्यांना म्हणाले "ज्ञानेश्वर वयाच्या १६ व्या वर्षी 'भावार्थदीपिका' ग्रंथ लिहू शकतात तर मी १२ व्या वर्षी हे गाणे का लिहू शकत नाही?" काय तेजस्वी बाणा, केवढा आत्मविश्वास, केवढे सामर्थ्य!! म्हणून सावरकर एकमेवाद्वितीय, म्हणून ते स्वातंत्र्यवीर, म्हणून ते महान!! पराक्रमाला आणि तेजाला वय नसते!!! चतुरंग

या दोन वाघिणींना मानाचा मुजरा. आणि ज्या कोणी स्त्रिया, मुलींना वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांना 'गेट वेल सून'. (समानतावादी) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बगाराम 14/12/2008 - 21:11
इथे कुणीहि लिंगभेद केलेला नाही, १४ वर्षाची मुले असती तरी देखिल मी हेच म्हणालो असतो. आपण मला उद्देशुन गेट वेल सून म्हणत असाल तर आपण निष्कारण हा नविन वाद इथे आणत आहात असे वाटते.

In reply to by बगाराम

तो भेद ज्या कोणी केला होता त्यांच्यासाठी होतं, तुम्ही नाही ना केला भेद (खरं की काय?) तर मग का ते स्वतःवर ओढवून घेत आहात? का खरंच गरज आहे तुम्हाला 'गेट वेल सून'ची? बाकी १४व्या वर्षी मलाही बरीच अक्कल(?) होती असं आठवतं. शाळेत स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास शिकवायचे (वय वर्ष १०-११ पासून) तेव्हाच आम्हा मित्र-मैत्रिणींमधे चर्चा होत असे, "पुन्हा कोणी आपल्या देशावर हल्ला केला तर आपणही असंच क्रांतिकारकांसारखे वागून त्यांना विरोध करु या." आणि या चर्चांमधे कोणाही मोठ्या माणसाचा सहभाग नसे.

लिखाळ 14/12/2008 - 21:15
बंगालच्या वाघिणींना अभिवादन ! लेख छानच. एखाद्या क्रांतीने वातावरण भारले जाते तेव्हा तरल, बुद्धीमान, उत्साही, धैर्यवान लोक आपोआपच त्याकडे आकर्षिले जातात. शिवाजी महाराजांशी अश्यांची तुलना नाही केली तरी महाराजांच्या कार्यामुळे प्रेरित झालेल्या एका १३-१४ वर्षांच्या मुलाने एका मह्त्वाच्या लढाईत ध्वज सांभाळत मोठी चकमक विजयी केली होती असे शिवचरित्रात वाचलेले स्मरते. जेव्हा समाजात मोठी उलाढाल होते तेव्हा लहानाप्सून मोठ्या पर्यंत अनेक जण भारले जातात. मुद्द्महुन ब्रेनवॉश केलेले आणि अश्या वातावरणात वयापेक्षा पोक्त विचार करुन कृती करणार्‍यांत फरक केला पाहिजे असे वाटते. -- लिखाळ.

मुक्तसुनीत 14/12/2008 - 22:02
चर्चा वाचली. काही मते मांडतो. याबद्दल मतभिन्नता होऊ शकते. - क्रांतिकारकांचे काम , त्यांनी दिलेले बलिदान याबद्दल एक भारतीय म्हणून मी ऋणी आहे. त्यांची स्मृती सदैव मनात राहील. - ज्यांनी अत्याचार केले त्यांचे रक्त वहात असेल तर एक माणूस म्हणून मला बरेच वाटते. मात्र कायद्याचे राज्य हवे असणारा एक नागरीक म्हणून या मार्गांबद्दल नेहमीच प्रश्न येत रहातील. - अर्थशास्त्रीय बाबींमुळे इंग्रज हा देश सोडून गेले यात तथ्य आहे. पण या निर्णयात निरनिराळ्या उठावा-आंदोलनांचा मोठा भाग होता हेही बरोबर. इट डीड्न्ट मेक द गव्हर्निंग एनी इझीयर. - कुठल्याही उदात्त हेतूने का होईना , पण लहान मुलांच्या हाती हत्यार देणे हे निश्चितच विवाद्य आहे. कुठल्याही एकाच दृष्टीकोनाशी आपण स्वतःला बांधून घेतले ("मॅरींग टू अ सर्टन स्कूल ऑफ थॉट") तर एकूण व्यापक अशा सत्याकडे दुर्लक्ष होते याचे , ही चर्चा म्हणजे एक चांगले उदाहरण आहे. माझी अशी सभासदाना विनंती आहे की , वैयक्तिक शेरेबाजी , अपशब्द टाळा. दुसरा काय म्हणातो ते पटत नसेल तर तसे सांगा. दुसर्‍याची कीव करणे , कमी लेखणे वगैरे वगैरे गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत.

In reply to by मुक्तसुनीत

आजानुकर्ण 14/12/2008 - 22:38
हा दृष्टिकोण स्वागतार्ह आहे. दुसऱ्याची कीव करणे, किंवा दुसऱ्याचा आवाका मोजणे यामुळे चर्चेत काहीही साध्य होत नाही. लहान मुलांच्या हाती हत्यार देण्याचे कोणत्याही कारणामुळे उदात्तीकरण होऊ नये हे सध्याच्या प्रसंगात सुसंगत आहे. आपला, (सहमत) आजानुकर्ण

विकास 14/12/2008 - 22:03
बंगालच्या या दोन्ही क्रांतीकारींना मानाचा मुजरा! वर बरेच काही लिहून झाले आहे त्यामुळे त्यात परत पडत नाही.

माहितीजालावर शहिदांसाठी, क्रांतिकारकांसाठी एवढे लेखन कुणी केले नसेल आणि एवढी प्रकाशचित्रे कुणी पुरवली नसतील. शहिदांसोबतच सर्वसाक्षींनाही सलाम!

वाचक 14/12/2008 - 22:31
मगच तपासले पाहीजेत - आता एकेक बघू १. हे 'ब्रेनवॉशिंग' आहे अथवा नाही २. असलेच तर 'तालिबानी' करतात त्यात आणि ह्यात फरक आहे का ? असल्यास कोणता? ३. १४ वर्षांची मुले/ली हे समर्थनिय आहे का ? तर शेवटी प्रत्येक गोष्ट आपण कोणत्या 'काँटेक्स्ट' मधे बघतो ह्याच्यावर सर्व अवलंबून आहे. 'मी त्याला आई बहिणीवरुन शिव्या दिल्या' हे एक नुसते वाक्य 'कारण त्याने माझ्या बहीणीची छेड काढली' ह्या वाक्यानंतर लगेच 'समर्थनिय' वाटू शकते. तेव्हा 'साक्षी़जींनी' दिलेला इतर ईतिहास पहाता 'ह्या कन्या' वीरांगनाच ठरतात. आता एकेका प्रश्नाची उत्तरे माझ्या दॄष्टीकोनातून १. हे 'ब्रेनवॉशिंग' आहे अथवा नाही हो - हे ब्रेनवॉशिंगच आहे आणि प्रत्येक असामान्य नेता जेव्हा आपल्यामागे यायला आपल्या अनुयायांना तयार करतो तेव्हा ते एक प्रकारचे ब्रेनवॉशिंगच असते - दुर्दैवाने ह्या शब्दाला एक काळी किनार लाभली आहे पण शब्द्शः अर्थ लक्षात घेतला तर माझे म्हणणे पटावे. आणि कार्य सिद्धिस जाण्यासाठी त्याची गरज असतेच. आजकालच्या युगातल्या 'कॉर्पोरेट' कंपन्या पण 'मिशन स्टेटमेंट' आणि इतर गोष्टींनी हेच साध्य करत असतात. २. असलेच तर 'तालिबानी' करतात त्यात आणि ह्यात फरक आहे का ? असल्यास कोणता? भारता सारख्या आधी स्वतंत्र असलेल्या देशावर ईंग्रजांनी आक्रमण करुन अत्याचार चालविले होते - अशा वेळी ज्याला जसे पटते त्या मार्गाने त्याचा प्रतिकार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच ठरते. त्याचप्रमाणे रशियन आक्रमण असताना 'तालिबान्यांनी' ह्याचाच अवलंब केला आणि त्यांना यशही मिळाले. नंतर आता तशी परिस्थिती उरलेली नसताना ते त्याच मार्गाचा वापर करत आहेत आणि पाकिस्तानही 'दुसर्‍या' सार्वभौम देशात कारवाया घडवून आणण्यासाठी - हे अर्थातच 'समर्थनिय' नाही - माझ्या दॄष्टीकोनातून कारण मी एक देशभक्त भारतीय आहे पण पाकिस्तानी नागरिकांचे मत वेगळे असू शकेल - मी म्हणतो तो 'काँटेक्स्ट' तो हाच. ३. १४ वर्षांची मुले/ली हे समर्थनिय आहे का ? वय किती आहे ह्याला खरे म्हणजे काहीही अर्थ नाही - एकदा आपण करतो आहोत ते कृत्य स्वतःच्या 'काँटेक्स्ट' मधे योग्य आहे ना मग 'साधनं अनेकता...' विचार व्हावा
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्त्री शक्तिचे प्रतिक असलेल्या देवीची अनेक रुपे आहेत, अनेक अवतार आहेत. मात्र बंगालच्या मुला मुलींना भावलेले देवीचे रुप म्हणजे कालिमाता किंवा दुर्गामाता - हातात शस्त्र घेऊन दैत्याचा वध करणारे हाती शस्त्र धारण केलेले रौद्र रुप. मात्र क्रांतिपर्वात याच देवींचे बालिकारुप पाहायला मिळाले. सरकारी अधिकाऱ्यांनी वा मानकऱ्यांनी उन्मत्त होऊन जनतेवर अत्याचार करायचे हा जणु इंग्रजांचा शिरस्ताच होता. हिंदुस्थानात यायचे ते सत्ता आणि वैभव उपभोगायलाच, जणु आपल्या आजवरच्या कर्तबगारीचा राणीने केलेला सन्मान! मात्र विसाव्या शतकात क्रांतिपर्व उजाडले आणि चित्र पालटले.