मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मांडणी

विनिपेग डायरीज-३

राजेंद्र मेहेंदळे ·

तुमचे लेखन विस्तृतरित्या येऊ द्या. तीनही भाग खूप वाचनीय झाले आहेत. मी झरझर वाचून संपवले आणि ते लगेच संपले म्हणून खंतावलो. असे अनुभव, उगाचच भावनाबंबाळ आणि शब्दबंबाळ न करणारे, काय घडलं कसं घडलं ते सरळ सांगत राहणारे. मी असे लेखन वाचण्यासाठी आतुर असतो. कृपया लिहित राहा.

सुक्या 11/06/2022 - 08:38
नॉस्टेलॉजीक लेखमाला. भारतातुन १९९० - २००० च्या दशकात इथे आलेल्या बहुतेक माहीती तंत्रज्ञाची कहानी कमी अधिक अशीच आहे. कधी कधी कामापेक्षा राजकारण वीट आणते. सगळे जण आपल्या जागी बरोबर असतात. नोकरी गमावणे कुणालाच नको असते मग लोक राजकारणाचा आधार घेतात. तीनही भाग खूप वाचनीय झाले आहेत.

वाचकांच्या प्रतिक्रियांमुळे एक एक भाग लिहायला हुरुप येत आहे. कामाच्या गडबडीत थोडे थोडे लिहुन काढतोय. पुरेसे लिखाण झाले की पुढचा भाग टाकेन.

सौंदाळा 13/06/2022 - 12:13
हा भागही मस्तच. अशाच अनुभवातून गेलो होतो. अमेरिकेतुन काम ऑट्सोर्स होणार होते. त्यांनी सुरुवातीला ट्रायल म्हणून काही काम दिले होते. ते व्यवस्थित झाले. कारण त्यात दोन्ही बाजूचे मॅनेजमेंटचे लोक होते. नंतर ट्रेनिंगसाठी ओनसाईट गेल्यावर मात्र तिकडच्या एंड युजर्स बरोबर काम करताना त्यांनी पण खूप त्रास दिला होता. मुद्दाम चुकीची किंवा अपुरी माहिती देणे जेणेकरुन कामात चुका होतील आणि नंतर त्या चुका त्यांच्या मॅनेजमेंटसमोर हायलाईट करणे वगैरे. शेवटी आम्ही पण तयार झालो. आधी त्यांनी केलेल्या कामाचे रेफरन्सेस मागायचो, ओरल कम्युनिकेशन झाले असेल तरी त्यातले मुद्दे ईमेल करायचो. काम पूर्ण झाल्यावर दोन्ही साईडच्या मॅनेजमेंटसमोरच प्रेझेंट करायचो. असे करुन करुन शेवटी घडी बसली आणि त्यांचे काम इकडे यायला लागले. ते दिवस खूपच तणावपूर्ण होते. तुमचा लेख वाचून सगळे आठवले. लेख नेहमीप्रमाणेच मस्त. प्रवासवर्णन, जागेचा शोध, ऑफिसच्या घडामोडी, कौटुंबिक असे वेगवेगळे पैलू लेखातुन वाचताना खूपच छान वाटतय. पुभाप्र

तुमचे लेखन विस्तृतरित्या येऊ द्या. तीनही भाग खूप वाचनीय झाले आहेत. मी झरझर वाचून संपवले आणि ते लगेच संपले म्हणून खंतावलो. असे अनुभव, उगाचच भावनाबंबाळ आणि शब्दबंबाळ न करणारे, काय घडलं कसं घडलं ते सरळ सांगत राहणारे. मी असे लेखन वाचण्यासाठी आतुर असतो. कृपया लिहित राहा.

सुक्या 11/06/2022 - 08:38
नॉस्टेलॉजीक लेखमाला. भारतातुन १९९० - २००० च्या दशकात इथे आलेल्या बहुतेक माहीती तंत्रज्ञाची कहानी कमी अधिक अशीच आहे. कधी कधी कामापेक्षा राजकारण वीट आणते. सगळे जण आपल्या जागी बरोबर असतात. नोकरी गमावणे कुणालाच नको असते मग लोक राजकारणाचा आधार घेतात. तीनही भाग खूप वाचनीय झाले आहेत.

वाचकांच्या प्रतिक्रियांमुळे एक एक भाग लिहायला हुरुप येत आहे. कामाच्या गडबडीत थोडे थोडे लिहुन काढतोय. पुरेसे लिखाण झाले की पुढचा भाग टाकेन.

सौंदाळा 13/06/2022 - 12:13
हा भागही मस्तच. अशाच अनुभवातून गेलो होतो. अमेरिकेतुन काम ऑट्सोर्स होणार होते. त्यांनी सुरुवातीला ट्रायल म्हणून काही काम दिले होते. ते व्यवस्थित झाले. कारण त्यात दोन्ही बाजूचे मॅनेजमेंटचे लोक होते. नंतर ट्रेनिंगसाठी ओनसाईट गेल्यावर मात्र तिकडच्या एंड युजर्स बरोबर काम करताना त्यांनी पण खूप त्रास दिला होता. मुद्दाम चुकीची किंवा अपुरी माहिती देणे जेणेकरुन कामात चुका होतील आणि नंतर त्या चुका त्यांच्या मॅनेजमेंटसमोर हायलाईट करणे वगैरे. शेवटी आम्ही पण तयार झालो. आधी त्यांनी केलेल्या कामाचे रेफरन्सेस मागायचो, ओरल कम्युनिकेशन झाले असेल तरी त्यातले मुद्दे ईमेल करायचो. काम पूर्ण झाल्यावर दोन्ही साईडच्या मॅनेजमेंटसमोरच प्रेझेंट करायचो. असे करुन करुन शेवटी घडी बसली आणि त्यांचे काम इकडे यायला लागले. ते दिवस खूपच तणावपूर्ण होते. तुमचा लेख वाचून सगळे आठवले. लेख नेहमीप्रमाणेच मस्त. प्रवासवर्णन, जागेचा शोध, ऑफिसच्या घडामोडी, कौटुंबिक असे वेगवेगळे पैलू लेखातुन वाचताना खूपच छान वाटतय. पुभाप्र
क्रिसकडे रहायची सोय झाल्यामुळे एक मोठा प्रश्न सुटला होता. आता ऑफिसमध्ये कामाकडे लक्ष देणे भाग होते. खरेतर मला घाईने विनिपेगहुन इथे बोलावण्याचे कारणच ते होते. रेव्हेन्युच्या हिशोबाने आमच्या प्रोजेक्ट्चा एक पंचमांश हिस्सा असलेला टेल्को म्हणजे टेलिफोनी किंवा व्हॉइसचा जो भाग होता त्याचा क्लायंटच्या टीमकडून हॅन्ड ओव्हर घ्यायचा होता. आणि त्याची कोणालाच नीट कल्पना नव्हती. खरेतर मलासुद्धा.... झाले असे की जेव्हा आम्हाला प्रोजेक्ट मिळाला तेव्हा सगळ्यांना असे वाटले की हे काहीतरी टेक्निकल फोन्स, इ पी बी एक्स मेंटेनन्स, व्हॉइस रेकॉर्डिंग अशा प्रकारचे काम आहे.

ताजमहाल, लालकिल्ला यासंदर्भातील मुगल शैलीच्या पेंटिंगवर भाष्य

शशिकांत ओक ·

निनाद 01/06/2022 - 06:52
म्हणून मी जस्टिन यांच्या प्रत्येक आक्षेपाला उत्तर देऊन गोडबोले पक्षी पुना ओक कसे बरोबर आहेत ते दाखवून दिले. यावर एक वेगळे ई-बुक सादर केले आहे. तुम्ही ग्रेट कार्य करत आहात. असे स उदाहरण आणि संदर्भासहीत पुरावे तयार करणे हेच आवश्यक आहे. तथापि,
याशिवाय आणखी काही सूचना असतील तर स्वागत आहे.
लेख वाचतांना त्यातून सज्जड असे निष्कर्ष हाती लागले नाहीत असे वाटले. म्हणजे पुरावे जुळवत जुळवत कथा पुर्ण व्हायला हवी आणि निष्कर्ष विधान तयार व्हायला हवे. उदा, हे आणि हे पुरावे पाहता/ एकत्र जुळवता असे म्हणता येते की, (विधान) विस्तृत उदाहरण लाल किल्यातील चित्र क्र. क्ष पाहून असे ठाम विधान करता येते की, शहाजहान वर हिंदू संस्कार होते आणि त्याचे पालन करतांना तो चित्र क्र. क्ष मध्ये दिसत आहे. लाल किल्यातील चित्र क्र. य पाहून असे दिसून येते की, मोगल राज्यात हिंदू वाद्ये वाजवली जात होती त्या अर्थी येथे हिंदू पद्धती पाळल्या जात होत्या. वरील पुरावे पाहता असे म्हणता येईल की औरंग्या पापी याची राजवट येई पर्यंत बादशहा मुसलमान असला तरी राज्य हिंदूच चालवत होते. -- हे इ पुस्तक प्रकाशित व्हायला हवे. याला International Standard Book Number (ISBN) पण घ्या असे म्हणतो.

In reply to by निनाद

शशिकांत ओक 02/06/2022 - 08:58
लेख वाचतांना त्यातून सज्जड असे निष्कर्ष हाती लागले नाहीत असे वाटले. म्हणजे पुरावे जुळवत जुळवत कथा पुर्ण व्हायला हवी आणि निष्कर्ष विधान तयार व्हायला हवे.
आपण सादर केलेले काही मुद्दे पटायला हवेत असे आहेत. मिपावर फक्त एक झलक दाखवली आहे. 'मुद्दे'माल ईबुकचे वाचन केले तर समजून घ्यायला सोपे जाईल. तिथे पॉइंट बाय पॉइंट उत्तरे सादर केलेली आहेत. त्यातल्या एका चित्रातून काय काय भानगडी निर्माण होतात ते दाखवायला हा धागा मराठीत सादर केला आहे. १ दिवसात ४०० टिचक्या बरा पळाला धागा... १. नगारखाना मुगलांच्या साठी देखील हवा होता. कारण जिथे लढाई चालते तिथे कोलाहल निर्माण करणे हे अपेक्षित आहे. जोपर्यंत मागे रणवाद्ये वाजत आहेत तोपर्यंत लढणाऱ्या सैन्याला आपला सेनापती मागे आहे असे मानसिक बळ मिळते. म्हणून मुस्लिम धर्मात संगीताला मान्यता नाही पण रणांगणात ती सिग्नल किंवा इशारे म्हणून महत्वपूर्ण ठरतात. २. ISBN घेणे आवश्यक आहे असे मला वाटत नाही. ते हार्डकॉपीसाठी प्रकाशकांच्या सोईसाठी असेल. माझी सर्व पुस्तके ईबुक माध्यमातून अल्प किमतीत उपलब्ध आहेत. लोकांनी ती (जशीच्यातशी) कॉपी पेस्ट करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला हवीत. माझा मजकूर का लाटला? असे मी म्हणणार नाही उलट तो वापरून त्यांनी माझ्या विचारांना चालना द्यावी हीच अपेक्षा आहे.

In reply to by निनाद

शशिकांत ओक 03/06/2022 - 13:05
पुस्तक Amazon वर विकायला आहे का?
नाही. हे किंवा इतर ११० पुस्तके तिथे सादर केलेली नाहीत. किंमत फक्त १०, २०, ५० अशी असल्याने त्यांना कमिशन देऊन मिळणारे पैसे नगण्य असतात. माझ्या पुस्तकाचे कव्हर त्यांच्या नियमात बसत नाही वगैरे कारणे आहेत. असो. इन्टामोजो किंवा डॉटपे (व्हॉट्स अॅपला जोडलेले आहे) मला सोईचे वाटतात. ते पूर्ण ₹१०/२० /५०रुपये माझ्या खात्यात जमा करतात. असो. मिसळपाव सारखी संस्थळे आज आहे उद्या नाहीत. माझे लेखन येता बराच काळ वाचायला उपलब्ध राहावीत म्हणून ईबुक मधे सादर करायचा निर्णय घेतला. या शिवाय अधिक सोईचे व कमी पैशात काही सोई असतील तर जरूर सुचवावे. मार्गदर्शन करावे.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 13/02/2024 - 10:11
प्रिय निनाद जी, या धाग्यावर आधारित नवे ई-बुक १३८ प्रकाशित झाले आहे. आपण पूर्वी आवर्जून पुस्तक रूपाने वाचायला मिळावे असे सुचवले होते. म्हणून हा धागा वर काढून प्रतिसाद देत आहे. १३८ ताज महाल विषयावरील पुस्तकात अनेक नवे पुरावे सादर केले आहेत मिपा ३८ या शिवाय या धाग्यावरील प्रतिसादात कै. वि. वा. मिराशींनी बटेश्वर मंदिर शिलालेखाच्या संदर्भात जे म्हटले होते त्याची शहानिशा करण्यासाठी लेखन करत आहे.

कंजूस 01/06/2022 - 09:56
जे काही दाखवले आहे ते आवडले. दिल्लीचा लाल किला हा हाफ डे टुअरमधे ओझरता पाहिला. किंवा कुतुबही. दिल्लीत राहणाऱ्यांनी तिथे जाऊन सावकाश पाहून फोटो आणले तर उपकार होतील. गर्दी नसताना ते जाऊ शकतात.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक 03/06/2022 - 13:13
दिल्लीत राहणाऱ्यांनी तिथे जाऊन सावकाश पाहून फोटो आणले तर उपकार होतील
कंजूसजी, आपणास तिथे न जाता घरी बसून अब दिल्ली दूर नहीं अशी परिस्थिती आहे ... इतके यूट्यूबर लोक कामाला लागलेले आहेत. ते पाहून सगळी स्थळे समजायला सोपे पडते. शिवाय अनेक ठिकाणे प्रत्यक्ष तिथे गेले की ओं फस्स झाल्याची अनुभूती आणतात.

तुमच्या नजरेतुन चित्रे पहायला आवडली. या विषयात फारशी गती नाही पण तुमची धडपड आणि चिकाटी मात्र वाखाणण्याजोगी आहे. तुमच्या मेहनतीला लवकरच यश मिळो ही सदिच्छा. पैजारबुवा,

इरसाल 01/06/2022 - 12:03
मिपावर येणार्‍या कॉन्स्पिरन्सी थेअरीज पहाता..... १३ च्या चित्रात खाली दोन जणांच्या हातात बादशाह खुष असल्याने दिलेले चेक आहेत अस वाटतय, आणी ते दोघ ते चेक हवेत फडफडवत आहेत. असा हि मुद्दा कधी येवु शकेल.

In reply to by इरसाल

शशिकांत ओक 02/06/2022 - 09:41
असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीत खरा प्रकार महाराजांच्या त्राग्याने बाजूला पडला... राजगडापासून कौतुक व आदराने नेलेल्या नजराणा, भेटवस्तू औरंगजेबाला ५०व्या वाढदिवसानिमित्त सादर करून संभाजी महाराज यांच्या नावाने ५ हजारी मांडलिक सरदारकी तुम्हाला (सिवांना) दिली असा हुकूमनामा मिळवायचा हा खरा उद्देश मागे पडला. महाराजांनी बरोबर नेलेल्या मुत्सद्दी मंडळींची पंचाईत झाली. मग नंतर एका खाजगी बैठकीत ते नजराणे सादर केले. एखाद्या उच्च घरात त्यांना देण्यासाठी आपल्याला परवडेल अशा भेट वस्तू देणार्‍या कर्मचाऱ्यांकडे जसे वरवर पाहून ते स्वीकारले जाते असेच काहीसे तिथे घडले. हुकूमनामा बनून तयार होईपर्यंत जयसिंहाच्या मुलाकडे सिवाला राहू दिले जावे ही विनंती औरंगजेबाच्या दरबारातील वजीरे आझम (स्टाफ) केली गेली. नंतर सिवा पळून गेला. तो हुकूमनामा तसाच पडून राहिला. तो नंतर अमलात आणला गेला व संभाजी महाराज मुगलांच्या दख्खन दरबारात रूजू झाले. (त्यांच्या वतीने प्रताप राव गुर्जर, निराजी रावजी (जे महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटका करताना सिवा म्हणून महिनाभर धिटाईने राहिले होते ते) ५ हजार सैनिक घेऊन हजर असत.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 10/06/2022 - 15:03
राजगडापासून कौतुक व आदराने नेलेल्या नजराणा, भेटवस्तू औरंगजेबाला ५०व्या वाढदिवसानिमित्त सादर करून संभाजी महाराज यांच्या नावाने ५ हजारी मांडलिक सरदारकी तुम्हाला (सिवांना) दिली असा हुकूमनामा मिळवायचा हा खरा उद्देश मागे पडला.
आणि औरंगजेबाने नजरकैदेत टाकले. कुठून इथे आलो असे महाराजांना झाले! 'सिवाला मारून टाकणे गरजेचे आहे' असे कितीतरी दरबारी सरदारांचे मत होते पण मिर्झा राजे जयसिंह यांनी सिवाला दिलेल्या वाचनामुळे त्यांचा मान राखून महाराजांच्या वर्तणुकीवर कडक नजर ठेवून बंदोबस्त ठेवण्यात आला. संभाजी राजे यांना छळ करून मारणाऱ्या औरंगजेबाने मुलगा शाहू व पत्नी यांना चांगली वर्तणूक दिली. याचे कारण मराठेशाहीला दुफळीत गुंतवून भविष्यात यांच्या शक्तीला खच्चीकरण करण्याचा डाव होता. जे आपल्या मुगल सत्तेला जमले नाही ते मराठेच आपापल्यात वैर धरून अस्थिर होतील...! नंतर जे घडले ते साधारण तसेच झाले...

In reply to by इरसाल

शशिकांत ओक 02/06/2022 - 10:19
तुम्ही म्हणता तसे एक चित्र आहे जे इथे सादर केलेले नाही. त्यात सैनिक हातात लांब दांडे असलेल्या शस्त्राने हत्तीला हुलकावण्या देत आहेत. त्या भालेनुमा शस्त्राला काही तरी लटकावले आहे ते काय असावे असा प्रश्न उपस्थित होतो. तिथे तुम्हाला तुमच्या थिअरीचा वापर करता येईल. मनोज भाई दाणींनी पण त्यावर त्वरित प्रकाश टाकावा.

गामा पैलवान 01/06/2022 - 13:27
शशिकांत ओक, तुमच्यात जबर्दस्त तळमळ आणि चिकाटी आहे. तुमच्यासारखी लोकंच हिंदूंचा हरवलेला ठेवा परत मिळवून देणार आहेत. दंडवत! आ.न., -गा.पै.

मदनबाण 01/06/2022 - 17:27
लुटारु,बलात्कारी आणि हिंदूंचा नरसंहार करणारे आणि त्यांना धर्मांतरीत करणारे पाशवी वृत्तीचे आक्रमक होते. ताजमहाल असो वा लाल किल्ला किंवा कुतुब मिनार यांनी यातले काहीही बांधले असण्याची शक्यता माझ्या लेखी शून्य आहे कारण जे विध्वंसक असतात ते अशी उच्चकोटीची निर्मीती करुच शकत नाही असा माझा ठाम विश्वास आहे. हल्लीच ज्ञानवापी देवळाच्या बाबतीत [ ती मशीद नाहीच. ] जो काही कल्लोळ दिसुन येतोय त्यावर आणि अधिक वाचताना ताजमहालवर देखील एक व्हिडियो पाहिला तो इथे देत आहे. हा व्हिडियो पाहिल्यामुळे मला पहिल्यांदाच कळले की लोक जो ताजमहाल पाहतात ती ताजमहाल ची मागची बाजु आहे आणि यमुनेच्या बाजुला त्याची समोरची बाजु असुन तिथुनच ताज महाल [ तेजोमहाल ] मध्ये प्रवेश केला गेला आहे. असाच लालकिल्ल्याच्या बाबतीत देखील व्हिडियो पाहण्यात आला होता तो देखील इथे देउन जातो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- विश्लेषण : ‘नव्वद’ची पिढी नि ‘केके’चे गारूड… काय होते हे समीकरण?

In reply to by Bhakti

शशिकांत ओक 05/06/2022 - 23:48
चित्र माला पाहून त्यात सिंह आणि गाय यांच्या बदलत्या चित्रांचा उद्देश काय असेल? ती चौकट दर वेळी बदलते चित्र दर्शवून चित्रकाराने आपल्यासाठी ती तयार केलेली आहे का? मौलवींना उभे करून त्यांना राजसत्तेतील त्यांचे उच्च स्थान दर्शवायचे असावे का? आपल्या सह मिपाकरांची मते समजून घ्यायला आवडेल. मोबाईलवर ते तपशील नीट दिसतात कि नाही माहित नाही.

शशिकांत ओक 02/06/2022 - 10:07
आपल्याला इतके भावनाशील व्हायला हवे का? आपण असे चित्र रंगवू कि नरेंद्र मोदी, गुजरात दंगलकर्ते, मुस्लिम धर्म द्वेष्टा व्यक्ती पाकिस्तानच्या वझीरे आझम गादीवर बसलेले आहेत. पाकिस्तानची निर्मिती नंतरच्या काळात तिथे असलेल्या नव्या व जुन्या वास्तू, हिंदूनी तयार केल्या होत्या. म्हणून मुस्लिमांनी त्यांचे अपहरण केले होते असे सरसकट मानले तर तर ते काही वस्तूंसाठी चुकीचे ठरेल. कारण १५२६ ते १७०७ पर्यंत जवळ जवळ २शे वर्षे राज सत्ता राबवताना नविन वास्तू निर्माण करायला लागणार होत्या. त्या तयार करण्यात कुशल मनुष्यबळ आणि साधन संपत्ती हस्तगत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले. अरबी फारशी कॅलिग्राफी याची उदाहरणे आहेत. असो. ताजमहालाच्या मागील दरवाजे हे यमुनेच्या पात्रातून यायला सोय म्हणून केले होते. वेळ पडल्यास तिथून सटकायची ती चोरवाट पण होती. मुख्य प्रवेशद्वार ज्याला श्री दरवाजा म्हणून आजही मान्यताप्राप्त आहे. तो कुठे व कसा दिसतो यावर एबा-कोच-ताज-महाल-भाग-१ मधे पूर्वी चर्चा झाली आहे. असो...

In reply to by शशिकांत ओक

मदनबाण 02/06/2022 - 19:22
आपल्याला इतके भावनाशील व्हायला हवे का? बाकीच्यांचे ठाऊक नाही, लेकीन अपुन ऐसाइच हय. आपण असे चित्र रंगवू कि नरेंद्र मोदी, गुजरात दंगलकर्ते, मुस्लिम धर्म द्वेष्टा व्यक्ती पाकिस्तानच्या वझीरे आझम गादीवर बसलेले आहेत. कल्पना चांगली आहे, पण आधी जे देशातच पाकिस्तान तयार होता आहेत त्याचे चित्र स्पस्ट दिसत असुन सुद्धा आपण आधंळे आहोत की काय ते कळत नाही. पाकिस्तानची निर्मिती नंतरच्या काळात तिथे असलेल्या नव्या व जुन्या वास्तू, हिंदूनी तयार केल्या होत्या. म्हणून मुस्लिमांनी त्यांचे अपहरण केले होते असे सरसकट मानले तर तर ते काही वस्तूंसाठी चुकीचे ठरेल. कारण १५२६ ते १७०७ पर्यंत जवळ जवळ २शे वर्षे राज सत्ता राबवताना नविन वास्तू निर्माण करायला लागणार होत्या. त्या तयार करण्यात कुशल मनुष्यबळ आणि साधन संपत्ती हस्तगत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले. अरबी फारशी कॅलिग्राफी याची उदाहरणे आहेत. माझे म्हणणे इतकेच होते की तेजोमहाल सारखी भव्य वास्तु आणि त्याचे असलेले स्थापत्यशात्र हे अत्यंत कौशल्याचे सामर्थ हे आक्रमक मुघलांचे असुन शकत नाही,हे स्वतः ओसाड वातावरण असणार्‍या देशातुन इथे आले तेव्हा असे कौशल्य त्यांच्यात असण्याची शक्यता ०. ताजमहालाच्या मागील दरवाजे हे यमुनेच्या पात्रातून यायला सोय म्हणून केले होते. वेळ पडल्यास तिथून सटकायची ती चोरवाट पण होती. मुख्य प्रवेशद्वार ज्याला श्री दरवाजा म्हणून आजही मान्यताप्राप्त आहे. लोक जी बघतात ती ताजमहालची मागची बाजु आहे, त्याचा समोरचा भाग यमुनेच्या बाजुला असणेचे मुख्य कारण त्या नदीचे विहंगम दृष्य त्या महालातुन पहाता यावे असे मला सांगायचे होते. कशास मान्यता आहे किंवा नाही या बद्धल मला काहीच माहिती नाही. असो... जाता जाता :- तेजोमहालचा आकाशातुन टॉप व्हू जालावर पाहत होतो... तर कुठुन तरी अजुन एक अप्रतिम टॉप व्हू माझ्या पाहण्यात आला, तो इथे देऊन जातो. P1 श्रीपुरम (स्वर्ण मंदिर) :- श्री लक्ष्मी नारायणी मंदीर

In reply to by मदनबाण

शशिकांत ओक 03/06/2022 - 12:51
यमुनेच्या बाजुला (मुख्य द्वार) असणेचे मुख्य कारण त्या नदीचे विहंगम दृष्य त्या महालातुन पहाता यावे असे मला सांगायचे होते.
ताज महाल इमारत - वास्तू पहायला लोक जातात. यमुनानदी पहायला ताजमहालात जातात असे असावे असे वाटत नाही. तिथे गेल्यावर यमुनेचे पात्र दिसते इतकेच. ताज महालासमान भव्य वास्तू तामिळनाडूमधे वेल्लोरला २०१७ मधे निर्माण झाली आहे 15 हजार किलो सोने से बना महालक्ष्मी मंदिर | Sripuram Sri MahaLakshmi Temple

In reply to by शशिकांत ओक

मदनबाण 03/06/2022 - 15:39
ताज महाल इमारत - वास्तू पहायला लोक जातात. यमुनानदी पहायला ताजमहालात जातात असे असावे असे वाटत नाही. तिथे गेल्यावर यमुनेचे पात्र दिसते इतकेच. मी ताजमहाल ही वास्तु बांधणार्‍या दृष्टीकोनातुन सांगत असुन पर्यटकांच्या नव्हे ! मुळात ती वास्तु यमुनेच्या किनारी बांधलीच गेली नसती जर मूळ मालकाला त्या वास्तु मधुन यमुना दर्शन घ्यावयाचे नसते. याचमुळे फार कठीण जागी असुन देखील वास्त्युशास्त्राचा कमाल वापर करुन हा महाल बांधला गेला. ताजमहाल प्रमाणे त्याचा पाया हा देखील रोचक विषय असुन या बद्धल एक चित्र खाली देतो. P1 नदी काठाशी असल्याने निर्म्यात्यांनी पाया बांधणार्‍यावर किती विचार आणि कष्ट घेतले असतील याचा अंदाज वरील चित्र पाहुन कळते. :) जाता जाता :- लोक समुद्र किनारी बंगले, इमारती आणि हॉटेल्स का बांधतात ? कारण यात राहणार्‍यांना समुद्र पाहता यावा. हेच कारण ताजमहालसाठी आणि त्याच्या समोरील नदीसाठी देखील सत्य आहे. त्यामुळेच वास्तुचा समोरचा भाग हा नदीला सामोरा बांधला गेला आहे आणि मुख्य प्रवेशद्वार याच बाजुला आहे. वास्तु म्हणुन समोरची बाजु कोणती हे या निम्मित्याने कळते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- परिस्थिती १९९० पेक्षाही भयनाक असल्याचं सांगत काश्मीर खोऱ्यातून सरकारी कर्मचारी, स्थानिकांचं मध्यरात्री पलायन

In reply to by मदनबाण

शशिकांत ओक 03/06/2022 - 19:17
ताजमहाल प्रमाणे त्याचा पाया हा देखील रोचक विषय असुन या बद्धल एक चित्र खाली देतो.
फार कठीण जागी असुन देखील वास्त्युशास्त्राचा कमाल वापर करुन हा महाल बांधला गेला.
आपण जे चित्र सादर केले आहे ते मी शोधतोय. बांधकाम करताना पाया कसा तयार केला गेला असावा यावर प्रकाश टाकणारे चित्र बांधकाम करणाऱ्या लोकांनी यावर अभ्यास करावा.

In reply to by शशिकांत ओक

मदनबाण 03/06/2022 - 21:38
आपण जे चित्र सादर केले आहे ते मी शोधतोय. संदर्भ :- Losing the Taj: Fighting a monumental neglect याच लेखातील दिलेले चित्र :- https://akm-img-a-in.tosshub.com/indiatoday/images/misc/CS-TAJ-Jul30_Part_3.jpg

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- परिस्थिती १९९० पेक्षाही भयनाक असल्याचं सांगत काश्मीर खोऱ्यातून सरकारी कर्मचारी, स्थानिकांचं मध्यरात्री पलायन

In reply to by निनाद

आनन्दा 02/06/2022 - 11:37
https://alkaoaksebookshoppy.online/product/26741951/%E0%A4%8F%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9A-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7--E-Book-52- एक मिळालं. इथे बाकी पण आहेत.

sunil kachure 03/06/2022 - 13:45
त्याची मालकी फक्त केंद्र सरकार ची हवी . मग लाल किल्ला असू किंवा ताज महल .ही सर्व देशाची संपत्ती आहे. .ह्या वर कोणत्याच धर्माचा हक्क नसेल. भारतीय पुरातत्व खाते बकवास,नालायक आहे ..फक्त पगार घेणे इतकेच काम करते एक खास अधिकारी नेमून देश भरातील प्राचीन इमारती,मंदिर , मशीद त्यांच्या ताब्यात द्यावे .आणि त्या वास्तू ल काही हानी झाली तर ज्याला जबाबदारी दिली आहे त्या अधिकाऱ्याला फाशी च ध्या.

sunil kachure 03/06/2022 - 13:45
त्याची मालकी फक्त केंद्र सरकार ची हवी . मग लाल किल्ला असू किंवा ताज महल .ही सर्व देशाची संपत्ती आहे. .ह्या वर कोणत्याच धर्माचा हक्क नसेल. भारतीय पुरातत्व खाते बकवास,नालायक आहे ..फक्त पगार घेणे इतकेच काम करते एक खास अधिकारी नेमून देश भरातील प्राचीन इमारती,मंदिर , मशीद त्यांच्या ताब्यात द्यावे .आणि त्या वास्तू ल काही हानी झाली तर ज्याला जबाबदारी दिली आहे त्या अधिकाऱ्याला फाशी च ध्या.

In reply to by sunil kachure

शशिकांत ओक 03/06/2022 - 19:34
त्याची मालकी फक्त केंद्र सरकारची हवी
भारतीय पुरातत्व खाते बकवास,नालायक आहे
मित्रा, भारतीय पुरातत्वखाते होते म्हणून निदान आज इतक्या वास्तू सध्याच्या स्थितीत आहेत. खाते वाईट नाही. त्यात काम करणारे वाईट नाहीत. फक्त मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

In reply to by शशिकांत ओक

मदनबाण 03/06/2022 - 23:07
फक्त मानसिकता बदलणे गरजेचे आहे. जाता जाता :- जगातील आश्चर्यां पैकी एक असलेली वास्तू पण त्या वास्तु बद्धल ज्या देशात ती उभी आहे त्याच देशातील लोकांपासुन सगळी लपवा छपवी ! काय खजाना दडवलाय का ? :))) बादवे... महादेवास धोत्र्याचे फळ आणि फुल अर्पित केले जाते ते त्यांस विशेष प्रिय आहेत आणि हीच धोत्र्यांची फुले ताज महालवर कोरलेली दिसुन येतात. मुघल आणि धोत्र्याचे फुल ? :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- परिस्थिती १९९० पेक्षाही भयनाक असल्याचं सांगत काश्मीर खोऱ्यातून सरकारी कर्मचारी, स्थानिकांचं मध्यरात्री पलायन

लोल, हे ओकलोक ताजमहालात महाशिवरात्री साजरी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत! मी पु. ना. ओक, डॉ. विद्याधर ओक, श्री शशिकांत ओक या सर्वांचा फॅन होण्याच्या मार्गावर आहे. सर्व लोकांत एक तरी ओक, तेजोमहालयाचे महत्कार्य पार पाडण्यास अस्तित्त्वात असणार याविषयी माझ्या मनात जराही संदेह नाही. - एक ओकप्रेमी

In reply to by हणमंतअण्णा शंक…

शशिकांत ओक 03/06/2022 - 19:26
मी पु. ना. ओक, डॉ. विद्याधर ओक, श्री शशिकांत ओक या सर्वांचा फॅन होण्याच्या मार्गावर आहे.
ताज महाल किंवा अन्य वास्तू कोणी बांधल्या यापेक्षा कशा बांधल्या यावर भर दिला गेला पाहिजे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

हे ओकलोक ताजमहालात महाशिवरात्री साजरी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत!
प्रतिसाद लिहायला आलोच होतो की आता 'ताजमहाल कधी उकरायचा' म्हणून पण तुमचा प्रतिसाद पाहिला आणि हसुन हसुन पार मेलो. वाट लागली. आई गं....! =)) बाय द वे, आता वळुया तेजोमहालाकडे. ’ताजमहाल हे तेजोमहालय आहे” पृ. क्र. १६१ वर चला. आले का सगळे त्या पानावर ? ओके. आता त्या पानावरच्या शेवटच्या ओळींकडे येऊ या. त्यात उल्लेख केल्याप्रमाणे घुमटाचा कळस पाहा. गुगलवरुन सर्च केले तरी चालेल.पाहिलं का चित्र. (झुम करुन चित्र बघा ) आता जो कळस आहे तो कळस खरं तर मंदिराचा सुवर्ण कलश आहे, जो पर्यंत तुमच्या नजरेला तो सुवर्ण कळस वाटत नाही तो पर्यंत त्या कलशाकडे पाहात राहा. आता त्यावर एक चंद्रकोर आपणास दिसेल. ’खरं तर ती एक चंद्रकोर आहे. हिंदु स्त्रीया असे कुंकुही लावतात” ( पृ. क्र. १६१ ओळ २७ वी) खरं तर आपल्याला गाईड लोक तो ’चाँद' आहे असे म्हणतात. चांद तिरकस असतो. आजकाल अनेक महिला चंद्रकोर टीकली कपाळाला लावतात त्यामुळे हे सगळे साम्य संदर्भ पाहता मला त्यात हिंदू परंपरेच्या काही खाणाखुणा त्यात प्रथमदर्शनी दिसत आहेत असे दिसते. बाकीचा भागावर अधुन-मधुन वेळ मिळाला की लिहिते राहीन. चुभु क्षमस्व. :) -दिलीप बिरुटे

मनो 04/06/2022 - 10:50
आपली मागे चर्चा झाली त्या वेळी हे चित्र लाहोर येथील आहे असा उल्लेख वाचल्याचे स्मरते, त्यामुळे ताज आणि आग्रा यांचा इथे तसा बादरायण संबंधच आहे. दुसरे, हे चित्र आहे, photograph नव्हे, त्यामुळे निव्वळ चित्रातून काही सिद्ध करणे फार अवघड असते, कित्येकदा मूळ वास्तू चित्रकाराच्या सोयीसाठी हवी तशी हलवून वापरतात, कारण त्याला backdrop एवढेच महत्व असते. चित्रगुप्त तुम्हाला सांगतीलच, आणि तुम्हाला ते माहीतही आहे. पैसे देणार तो राजा महत्वाचा.

In reply to by मनो

शशिकांत ओक 04/06/2022 - 12:17
ते मला पटले. फोटो आणि चित्र, पेंटिंग यात जमीन अस्मानाचा फरक आहे. फोटो कुणाला खूष करण्यासाठी वापरता येत नाही. पण पेंटिंग मधे कल्पना स्वातंत्र्य अभिप्रेत असते. जे पेंटिंग दिल्ली लाल किल्ला दरबारातील आहे असे म्हटले आहे ते १६४० सालातील (लाहोर) लालकिल्यातील दरबारातील आहे असे फूट नोट सुचवते. १६२८ साली राज्य रोहण समारंभातील पेंटिंग त्यातील सोनेरी रंग ठसठशीत उठून दिसतो. असो. ताजमहालाच्या संदर्भात हे चित्र उपरे आहे कारण जिथे याचा उल्लेख केला आहे तो लेख इंग्रजीत सादर केला आहे. Taj Mahal is not a Shiv Temple. (Ebook 110) तिथे जो ओझरता उल्लेख केला आहे त्यावर मिपावर सविस्तर लिहायची संधी घेतली आहे. डॉ दिलीप म्हणतात की तो चांद तारा आहे ते कसे बरोबर आहे हेच त्या ईबुक मधे म्हटले आहे. ते वाचले तर आनंद होईल.

आग्रा शहरात यमुनाकिनारी एखादे मंदीर आहे का? नसल्यास ताजमहाल हा अगोदर एखादे मंदीर असावे असे म्हणता येऊ शकेल. कारण ज्या कुठल्या शहरातुन नदी वाहते अथवा जी शहरे ही नदीच्या काठावर वसली आहेत तिथे एखादे मंदीर असतेच असते. आणि अश्या गावांना तीर्थक्षेत्र म्हणुन संबोधण्यात येते. आणि आग्र्याला पौराणिक संदर्भ असल्याने नदीकिनारी मंदीर असण्याची शक्यता जास्त आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

sunil kachure 06/06/2022 - 23:03
ताजं महल मंदिर असू नाही तर कबर उत्तम वास्तू शिल्पाचे उदाहरण आहे आणि भारताची संपत्ती आहे. त्या वर वाद उघरून काढण्यात काही अर्थ नाही. त्यांची योग्य निगा राखणे हे महत्वाचे.

In reply to by sunil kachure

गामा पैलवान 07/06/2022 - 02:02
sunil kachure, सर्व इस्लामिक वास्तू थडगी व कबरी कशाकाय? हे मुस्लीम राज्यकर्ते मेलेल्यांसाठी मोठमोठी थडगी उभारतात, तर ते जिवंतपणी कुठे रहात होते? माझ्या मते मूळ हिंदू वास्तूवर थडग्याचा शिक्का मारला की हिंदू तिच्यावरचा हक्क सोडून देतात. म्हणून हिंदूंकडून वास्तू चोरायला हा थडगी व कबरी हे प्रकार अस्तित्वात आले आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by sunil kachure

सुक्या 08/06/2022 - 03:50
सहमत आहे. ताज जिथे आहे तिथे जुने काही असेल असे वाटत नाही. ताज हे उत्तम वास्तू शिल्पाचे उदाहरण आहे आणि भारताची संपत्ती आहे यावर सहमत. (आजचा दिवस कॅलेंडर वर मार्क करुन ठेवला आहे. काचुरे साहेबांशी सहमती होणे हा सटीसामाशी योग)

शशिकांत ओक 10/06/2022 - 20:10
खालील विचार डॉ दिलीप बिरूटे यांच्या संदर्भातील प्रतिक्रियेवर आहेत पण ते स्वतंत्र मांडणे योग्य वाटले...
आता त्यावर एक चंद्रकोर आपणास दिसेल. ’खरं तर ती एक चंद्रकोर आहे. हिंदु स्त्रीया असे कुंकुही लावतात” ( पृ. क्र. १६१ ओळ २७ वी) खरं तर आपल्याला गाईड लोक तो ’चाँद' आहे असे म्हणतात. चांद तिरकस असतो. आजकाल अनेक महिला चंद्रकोर टीकली कपाळाला लावतात त्यामुळे हे सगळे साम्य संदर्भ पाहता मला त्यात हिंदू परंपरेच्या काही खाणाखुणा त्यात प्रथमदर्शनी दिसत आहेत असे दिसते. बाकीचा भागावर अधुन-मधुन वेळ मिळाला की लिहिते राहीन. चुभु क्षमस्व. :) -दिलीप बिरुटे
बिरुटे सर, हा धागा एका मुगलकालीन पेंटींग वरील दिनांकामुळे चर्चेस घेतला आहे. इलस्ट्रेटेड वीकलीत हे चित्र कृष्ण धवल रंगात प्रकाशित झाले होते. त्याच्या खालील भागात हे चित्र सन १६२८ मधे दिल्लीतील लालकिल्ला यावास्तूत इराणी वकिल भेटायला आला होता असे म्हटले होते. त्याचा आधार घेऊन पुना ओकांच्या पुस्तकात 'जर लालकिल्ला व त्यातील दरबार १६२८ सालात बांधून तयार होता असे दिसते. पण मग आर्किऑलॉजिची पाटी लालकिल्ला १६३९ मधे बांधून तयार झाला असे सांगते ते खोटे ठरते' . या गौडबंगालाची उकल करण्यासाठी सादर केला आहे. कळसावर चांदतारा आहे कि काही दुसरे प्रतीक आहे याची चर्चा पूर्वी एका धाग्यावर केली आहे.
ओकलोक ताजमहालात महाशिवरात्री साजरी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत!
ज्यांना तसे वाटते ते वाटू दे मला व्यक्तिशः तसे वाटत नाही. सध्याच्या घडीला जी वास्तू ज्या अवस्थेत आहे. त्या कबरीच्या रूपातच ती पर्यटकांना पहायला हवी. त्यातील कॅलिग्राफी, संगमरवरातील पच्चीकारी याचा आस्वाद घेता यावा. आहे ती वास्तू मोडा, फोडा ही मानसिकता अत्यंत प्रतिगामी आहे. प्रश्न उरतो तो या वास्तुचे बदलते रूप होते यावर प्रकाश टाकला जावा. एकेकाळी ती कशी होती नंतर तिचात कशी स्थित्यंतरे होत गेली. याचा विचार इतिहासकारांनी न करता सिव्हिल इंजिनियरिंग मार्व्हल म्हणून बांधकाम जगातील मान्यवर वास्तू तज्ज्ञांनी एकत्र येऊन करावे. इतिहासकारांच्या आणि अनुषंगाने धार्मिकतेच्या आवरणातून बाहेर ठेवण्यात शहाणपण आहे.

In reply to by शशिकांत ओक

'आहे ती वास्तू मोडा, फोडा ही मानसिकता अत्यंत प्रतिगामी आहे' हं ओके. बाय द वे, आपणास उकरा-उकरीत इंट्रेष्ट आहे की काय असे वाटले. पण आपले विचार पाहता तसे काही दिसत नाही. विषयांतर केल्यामुळे आपण हर्ट झाला तर असाल तर दिलगिरी व्यक्त करतो. आयाम सॉरी. -दिलीप बिरुटे

sunil kachure 10/06/2022 - 20:41
एका ठिकाणी वाचनात आले ताजमहाल ज्या जागेवर उभा आहे तिथे राजपूत राजाचा महाल होता.शहाजन नी तो मागून घेतला आणि त्या बदल्यात त्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा दिली. खरे खोटे माहीत नाही.

मी पु. ना. ओकांना सिरीयसली घेतले नव्हते. पण विद्याधर ओकांना मात्र घेतले. ( विद्याधर ओकांमुळे मला शास्त्रीय संगीतातल्या श्रुती खूप स्पष्टपणे कळाल्या आणि शास्त्रीय संगीतातले 'शास्त्र', यमनासारखे ठराविक राग मला इतके का आवडतात यांचा सुस्पष्ट उलगडा झाला. तत्पूर्वी मला समजेल असे फ्रीक्वेन्सी-टेम्पो या शास्त्रीय भाषेत संगीतविचार कुणीही समजावून सांगितला नव्हता. विद्याधर ओक एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे म्हणजे काय याचे उदाहरण ठरावे हे माझे मत आहे. अशी माणसे दुर्मिळ होत आहेत.) विद्याधर ओक जेव्हा तेजोमहालाला हात घालतील तेव्हा ते उगाचच खोडसाळपणा करण्यासाठी असणार नाही याची एक मिनिमम ग्यारंटी मला आहे. एखाद्या माणसाला त्यात जेन्युइन इंटरेस्ट तयार होऊ शकतो आणि तो सत्यापर्यंत जायचा त्याच्या परीने प्रयत्न करू शकतोच की. पु. ना. ओक हे सर्वस्वी चुकीचे नव्हते. शाहजहानने ताजमहाल पहिल्या विटेपासून चांदपर्यंत सगळाच्या सगळा नव्याने बांधलेला नाही. त्याने ती जागा आणि तिथे जे काही होते ते एका राजपूत राजाकडून घेतले आहे असे तो स्वतःच म्हणतोय. सध्याच्या स्वरूपातला ताजमहाल करायला त्याने २० टक्के पदरचे बांधकाम केले आहे की ८० टक्के ते मला ठाऊक नाही. अर्थात बांधकामाचे स्केल पाहता ताजमहालापूर्वीचा तेजोमहालय ही काय सिक्रेट गोष्ट नसणार. म्हणजे अशा भव्य आणि सुंदर वास्तुचे वर्णन समकालीन साहित्यात, गाण्यांत, म्हणींत अंकित झालेले असायला पाहिजे. तसा सबळ पुरावा मिळत नाही. म्हणजे शाहजहानने आधीच्या वास्तूचे मूळ स्वरूप पूर्णपणे पालटले असावे. सगळ्यात महत्त्वाचा मानावा असा पुरावा म्हणजे ताजमहालाच्या पायाशी असलेल्या एका दरवाजाचे कार्बन डेटिंग. परंतू नेहमीप्रमाणे असे शुद्धा शास्त्रीय पुरावे गोळा करू देणे सुद्धा आपल्या कोर्टांना जमत नाही. कुणीतरी काही वर्षांपूर्वी चोरून गोळा केलेल्या तुकड्यावर आपण समाधान मानतो. त्यातला मार्जिन ऑफ एरर पाहिला तर हाही पुरावा भरवशाचा आहे का हे ठाउक नाही. परंतु असा पुरावा आता गोळा करणे अवघड नसावे. दुसरा पुरावा म्हणजे थर्मोल्युमिनेसेन्स. (म्हणजे काय ते ठाउक नाही). हिंदू चिन्हांचा वास्तूवर उपयोग हा काही खरा पुरावा नव्हे. मुघल स्थापत्यशैली आणि चित्रशैली मध्ये इस्लामला मान्य नसलेल्या शेकडो गोष्टी आहेत. त्यामुळे मला ते दुय्यम पुरावे म्हणून घ्यायला हरकत नाही असे वाटते. उरला सामाजिक प्रश्न. आपल्याला ऐतिहासिक वास्तूंमध्ये आणि मिथकांमध्ये, कथांमध्ये आजच्या प्रश्नांना काही ऑबजेक्टीव्ह उत्तर मिळते का हे तपासण्याचा मोठा भ्रमित करणारा रोग जडला आहे. सगळेजण असे भंजाळल्यासारखे का करत आहेत हे झरथुष्ट् जाणे. ऐतिहासिक वास्तू ही मूर्त गोष्ट आहे. ती पूर्वी काय होती आणि आता काय आहे हा इतिहासाचाच भाग आहे. ते ऑब्जेक्टिव्हली घेऊन संशोधन करणारे संशोधन करू देत. इतरांनी त्यावरून न्यूनगंड आणि अहंगंड तयार करून पब्लिक मालमत्ता, साधने, आणि उर्जा वेठीस धरू नये. सत्य समोर आले पाहिजे समोर आले पाहिजे असे म्हणताना आपल्याला फक्त सत्याचीच चाड आहे का त्यावरून अजून नॅरेटिव्ह रचून आपण आपलीच पाठ थोपटवून स्वचुतिया बनत आहोत आणि इतरांना बनवत आहोत हे वेळीच ध्यानात यायला हवे. मनोरंजन म्हणून कॉन्स्पिरसी थेर्‍या एन्जॉय कराव्यात आणि स्वतःला फार सिरेसली घेऊ नये. चुकून एखादी कॉन्स्पिरसी थेरी खरी निघालीच तर तोंडाचा चंबू करून थेरी मांडणार्‍या महामानवास दाद द्यावी आणि शांत पडावे. शिवाय अशा थेर्‍यांमुळेच जग इंट्रेस्टिंग होत असते. समजा सगळेच लोक सुबोध खर्‍यांसारखे सर्वज्ञ स्थितप्रज्ञ झाले तर जग महाबोअरिंग होऊ शकते. असो. कधी कधी सुनील कचुरे शुड मेक मोअर सेन्स!! पु. ना.ओक तेजोमहालयाच्या बाबतीत खरे ठरले तर काही हरकत नाही. मला फक्त एकच भिती आहे की पृथ्विवर मानव उपराच ठरू नये याची!!

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गामा पैलवान 11/06/2022 - 11:29
हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर, पु.ना.ओकांना सिरीयसली घ्याच म्हणतो मी. शाहजहाननामा हे शाहजहानचं अधिकृत दरबारी वार्तापत्र म्हणजे हल्लीच्या भाषेत कोर्ट क्रॉनिकल वा ग्याझेट होतं. त्यात ताजमहाल बांधल्याची इवलीशीही नोंद नाही. हे तथ्य पु.ना.ओकांनी पहिल्यांदा उघडपणे मांडलं. केवळ या कामगिरीसाठी तरी का होईना, त्यांना सिरीयसली घ्यावं म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

शशिकांत ओक 11/06/2022 - 21:51
मला व्यक्तिशः तसे वाटत नाही. सध्याच्या घडीला जी वास्तू ज्या अवस्थेत आहे. त्या कबरीच्या रूपातच ती पर्यटकांना पहायला हवी. त्यातील कॅलिग्राफी, संगमरवरातील पच्चीकारी याचा आस्वाद घेता यावा. आहे ती वास्तू मोडा, फोडा ही मानसिकता अत्यंत प्रतिगामी आहे. प्रश्न उरतो तो या वास्तुचे बदलते रूप होते यावर प्रकाश टाकला जावा. एकेकाळी ती कशी होती नंतर तिचात कशी स्थित्यंतरे होत गेली. याचा विचार इतिहासकारांनी न करता सिव्हिल इंजिनियरिंग मार्व्हल म्हणून बांधकाम जगातील मान्यवर वास्तू तज्ज्ञांनी एकत्र येऊन करावे. इतिहासकारांच्या आणि अनुषंगाने धार्मिकतेच्या आवरणातून बाहेर ठेवण्यात शहाणपण आहे.
गा पै आपले विचार जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by शशिकांत ओक

गामा पैलवान 12/06/2022 - 12:33
शःसिकांत ओक, याबाबत प्राडॉ आणि माझे विचार प्रचंड विभिन्न आहेत. फक्त मी ते त्यांच्यासमोर उघडपणे मांडीत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by मदनबाण

शशिकांत ओक 12/06/2022 - 10:03
एक कहावत है कि जिस को सजा होनी है वह केस को जल्दी निपटने के लिए कोशिश कर रहा है. पर जिसके सबूतों के आधार पर आरोप सिद्ध हो सकता है वह आदमी गवाही याने प्रमाण देने के लिए बडा सुस्त, ढीला, या देना नहीं चाहता. ताजमहाल या अन्य प्रापर्टी जयपुर घरानों के पूर्वजों की रही थी. उन्होंने अपने को दफ्तर खानों में से दस्तावेजों खंगालना चाहिए. यह काम आजकल की महिला सांसद दिया कुमारी ने करने की बात तो की पर उसके बाद इतने दिन गुजरे कुछ हुआ नहीं. सही कहते हैं मुद्दई चुस्त गवाह सुस्त...!

sunil kachure 11/06/2022 - 22:58
ताज महाल सारख्या अतिशय महत्वाच्या वास्तू चे खरे खोटे करायचे असेल तर. उथळ विचारांच्या लोकांना electronic मीडिया किंवा प्रिंट मीडिया किंवा अगदी यूट्यूब सारख्या मीडिया वर विचार व्यक्त करण्यास निर्बंध असावेत चुकीची मत,कोणाशी तरी बांधिलकी असल्या मुळे व्यक्त केली जाण्याची शक्यता जास्त असते. इतिहास तज्ञ,किंवा आता जे पुरावे आहेत त्या वर योग्य प्रयोग करून काढलेले निष्कर्ष हेच प्रसारित केले जावेत.

विजुभाऊ 12/06/2022 - 00:24
ताज महाल पहाताना बरीच हिंदू प्रतिके दिसतात. या बद्दल गाईडला विचारले तर ते सांगतात की ताजमहाल बाम्धताना हिंदू कारागीर ही होते त्यांच्यामुळे ती प्रतिके आपल्या दिसतात. क्षणभर हे तर्कट पटते पण कोणतेही बांधकाम करताना ते प्लॅन नुसार केले जाते. ताजमहाल सारखे बांधकाम ज्यात भूमितीच्या अनेक बारकाव्यांचा विचार केलेला आहे. ते बांधकाम करताना एखादा हिंदू कारागीर आराखड्यात स्वतःच्या मनाने बदल करू शकणार नाही. उदा " धोतर्‍याची फुले, कमळाची फुले , कळसाचा आकार ( हा तर बांधकामाचा शीर्ष बिंदू) , मुसलमान शासकांनी तो मूळचा कोणतातरी हिम्दू राजाचा महाल घेऊन त्यावर काही कलाकुसर केली असेल. शिवाजी महाराज आग्र्यात होते त्यावेळेस त्यांच्या भेटीत ताजमहाल बद्दल काहीच वर्णन कुठेच येत नाही. ( आग्र्यातल्या हवेल्यांचे वर्णन आहे मात्र ताजमहालाचे नाही) आणखी एक म्हणजे. ताजमहालात मुमताज ची कबर आहे त्याखाली एक मजला आहे. खाली जायला जिना देखील आहे.(पण तेथे प्रवेश बंद केलेला आहे.) हे कसे शक्य आहे. सामान्यतः कबर ही जमिनीवर असते. हे कोणालाच कसे खटकत नाही.

शशिकांत ओक 12/06/2022 - 09:24
शिवाजी महाराज आग्र्यात होते त्यावेळेस त्यांच्या भेटीत ताजमहाल बद्दल काहीच वर्णन कुठेच येत नाही. ( आग्र्यातल्या हवेल्यांचे वर्णन आहे मात्र ताजमहालाचे नाही)
आपण म्हणता त्यात बरेच तत्थ आहे. हा घागा लालकिल्ल्यावरील घटनेच्या संदर्भातील पेंटींग वर आहे म्हणून इथे मत प्रदर्शन करणे थोडे अनुचित होईल. आग्ऱ्याहून सुटका या घाग्यावर यावर संदर्भात लिहिलेले आहे.
आणखी एक म्हणजे. ताजमहालात मुमताज ची कबर आहे त्याखाली एक मजला आहे. खाली जायला जिना देखील आहे.(पण तेथे प्रवेश बंद केलेला आहे.) हे कसे शक्य आहे. सामान्यतः कबर ही जमिनीवर असते. हे कोणालाच कसे खटकत नाही.
ती खालच्या मजल्यावरील कबर खरी व वरच्या मजल्यावरील (खोटी असे न म्हणता) दर्शनी असे म्हटले जाते. दोन कबरी (खरेतर बऱ्हाणपूरची धरून) तीन कबरी एकाच व्यक्तीला असू शकतात का? असतील तर तसे कुठे पहायला मिळतात? वगैरे प्रश्न निर्माण होतो...

In reply to by शशिकांत ओक

विजुभाऊ 12/06/2022 - 12:48
बर्‍हाणपूर मधे आत अकबर नाही. ती तेथून आग्र्याला हलवली. एखाद्याची कबर एका ठिकाणहून हलवून इतरत्र नेण्याचे हे एकमेव उदाहरण असेल.

sunil kachure 12/06/2022 - 09:51
मुघल साम्राज्य जावून अनेक राज्य आली.अगदी मराठे पण पानिपत पर्यंत गेले होते. दिल्लीवर काही काळ मराठी सत्तेचे वर्चस्व होते. नंतर इंग्रज आले .इंग्रज तसे चोकस वृत्तीचे . त्यांना पण ताज महाल चा अभ्यास करावासा वाटला नाही.. हे पण थोडे विपरीत च आहे. ताजं महाल ह्या इमारतीला प्रसिध्दी स्वतंत्र नंतर दिली गेली का? कारण त्या वास्तू ची दाखल अगोदर कोणी घेतली च नाही. खुप प्रश्न आहेत.

शशिकांत ओक 13/06/2022 - 15:41
इंग्रज आले .इंग्रज तसे चोकस वृत्तीचे . त्यांना पण ताज महाल चा अभ्यास करावासा वाटला नाही.. हे पण थोडे विपरीत च आहे. ताजं महाल ह्या इमारतीला प्रसिध्दी स्वतंत्र नंतर दिली गेली का? कारण त्या वास्तू ची दाखल अगोदर कोणी घेतली च नाही.
इंग्रज सरकारने देशभरातील वास्तूंवर जितके अभ्यासपूर्ण काम केले तितके आपल्या देशात अन्य राजसत्ता कडून झाले नसावे. मुगल बादशाह आपल्या सत्ता काळातील घटना व पत्र व्यवहार वगैरे व्यवस्थित ठेवत. आपल्या सत्ता काळात ते आधीच्या बादशाहांनी त्यांच्या पुढच्या पिढीला उद्देशून केलेले वाईट किंवा निंदानालस्ती चे उल्लेख बदलले जाणे स्वाभाविक आहे. तरीही ते 'नामे' खूप माहिती सांगतात. त्यात अतिशयोक्ती, राजाची स्तुती किंवा बढाया वगैरे असणे स्वाभाविक आहे. फारसी भाषाेतील मजकुरात विराम चिन्हे नसणे, क्लिष्टता, आणि फाफटपसारा जास्त असे गुण अनेक अभ्यासकांनी दाखवून दिले आहेत. असो. इंग्रजी भाषेत, तपशीलवार वर्णन, नकाशे, पुराव्यानिशी माहिती, मुद्देसूद मांडणीतून घटनांचा अर्थ अचुक समजून घ्यायला सोपे जाते. असो त्यांच्यात अनेक सेनाधिकारी भारतीय संस्कृती, भाषा वगैरेत पारंगतता मिळवत. आपले थिसीस सादर करत. त्यातूनच कनिंगहॅम सारख्या अधिकार्‍यांच्या परिश्रमातून आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया याची स्थापना झाली. याचे दरवर्षी रेकॉर्डचे स्क्रोल प्रसिद्ध होत. ताजमहाल यावर अभ्यास करून लेखन अस्तित्वात आहे. ताजमहाल मधे सायंकाळी फिरायला व चांदण्या रात्री डीनर डान्स पार्ट्या होत. नंतर ते बंद करण्यात आले. लॉर्ड कर्झन याला ताजमहालाच्या संदर्भात फार आकर्षण होते. त्याच्या पुढाकाराने इजिप्त मधून दोन वजनदार शँडलियर्स मागवले गेले पैकी एक कबरीवर लटकलेला आहे तर दुसरा प्रवेशद्वार इमारतीच्या वरील मजल्यावर लटकत आहे. एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल पुस्तक परिचयात यांचे उल्लेख दिले आहेत. बागेतील झाडे, मशागत, बदलून ती युरोपियन पद्धतीने, झाडे लावली गेली. यात तत्परतेने लक्ष घालून विविध नाम्यांचा इंग्रजी तर्जुमा करण्यात आला. फक्त शाहजहां च्या बादशाह नामा राहून गेला. म्हणून आता निर्माण झालेल्या राजकीय व धार्मिक परिस्थिती मुळे त्यातील फारसी भाषांतर करायला व योग्य अर्थ काढायला फारसे कोणी उत्सुक नाहीत. मला तसा दोन जणांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. राहिला प्रश्न तळघरातील काही खोल्यांना विटांच्या बांधकामाने बंद केले आहे ते इंग्रजी सत्ता असताना का उघडून पाहिले गेले नाही यावर नेमके उत्तर मिळत नाही. इंग्रज इतकी उचक पाचक करत पण ताजमहालाच्या लांबी रुंदी, डिझाईन, याचे नकाशे आर्किऑलॉजिकल रेकॉर्ड मधे नाहीत. कनिंगहॅम कदाचित स्वतः ते काम करणार असावा, जसे कुतुबमिनार चे त्यांनी केले, पण नंतर राहून गेले. असो... डॉ वासुदेव गोडबोले यांच्या मते त्यात इंग्रजांची कॉन्स्पिरसी होती. यावर त्यांचे पुस्तकातून माहिती थक्क करणारी आहे.

तर्कवादी 15/06/2022 - 17:01
आज युट्युबवर बर्मुडा ट्रँगल संबंधित चित्रफिती बघत असताना ध्रुव राठी नावाच्या एका युवकाची चित्रफीत विशेष आवडली. कुठलाही अभिनिवेष नसलेली , अभ्यासपुर्वक बनवलेली चित्रफीत होती. मग चांगला युट्युबर दिसत आहे असा विचार करता त्याच्या आणखी चित्रफिती बघू लागलो तेव्हा ताजमहालचे रहस्य उलगडणारी चित्रफीत समोर आली. ही चित्रफीतही अभ्यासपुर्वक बनवलेली आहे. पु ना अओक यांच्या संशोधनावरही त्यात भाष्य आहे. जिज्ञासूंनी ही चित्रफीत आवर्जुन पहावी.

In reply to by तर्कवादी

शशिकांत ओक 15/06/2022 - 18:48
पुना ओक यांच्या म्हणण्यानुसार ताजमहाल चे वास्तव नाही असे म्हणणारे अनेक विचारक होते, आहेत. महामहोपाध्याय वा वि मिराशी, ग ह खरे, वाकणकर वगैरे नावे मला आठवतात. ध्रुव यांनी पुरावा म्हणून जे पुरातत्व विभागाने नुकतेच प्रसिद्ध केलेले फोटो दाखवले आहेत यावर असाही विचार करता येईल. १ . नव्याने चकाचक टाईल्स लावून आधीच्या डागाळलेल्या भिंतींना लपवण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटते. जर २२ खोल्यांना साफसफाई करून नकाशा काढून त्यावर त्या २२ खोल्या खरोखरच कुठे आहेत ते दाखवून देणे आवश्यक होते. २.जर एका खोलीला असे जणू आपल्या घरात ओल येणाऱ्या भिंतांना टाईल्स लावून लिपापोती करून दृष्टि आड सृष्टि करून लपवले जाते. तसेच काहीसे इथे केलेले आहे का अशी शंका घ्यायला जागा आहे. ३. बाकीच्या २१ खोल्यांचे फोटो सादर केले आहेत असे पुरातत्व विभाग म्हणत असेल तर ते फोटो कुठे आहेत? ४. पुरातन वास्तूंवर असे टाईल्स चे गिलावे करायला परवानगी कोणी कधी, कोणाच्या अखत्यारीत दिली? टेंडर केंव्हा निघाले? इतर बांधकाम व्यावसायिकांना ते कसे माहित झाले नाही? खर्चाचा तपशील कोणी ते पास केले. ५. हे फोटो प्रसिद्ध करावे अशी ऑर्डर कुणी कधी काढली या बाबतचे सर्व फाईल मधील नोटिंग व पत्रव्यवहार अभ्यासांना पहायला मिळाला पाहिजे. ६. तळघरातील बंद खोल्या अभ्यासकांना व सामान्य जनतेला पहायला मिडिया आणि कोर्टचे अधिकारात उघडून पहा म्हणून गेली कित्येक वर्षे कोर्ट कचेऱ्यांचे दरवाजे ठोठावत लाखो लोक तिष्ठत आहेत. त्यांना सर्वा समक्ष पुराव्यानिशी सिद्ध करायचे सोडून गुपचूप अशी उठाठेव करणारे कोण आहेत?

In reply to by शशिकांत ओक

गामा पैलवान 16/06/2022 - 01:18
शशिकांत ओक, ASI चा काही भरवसा नाही. माझ्या माहितीप्रमाणे आजवर ताजमहालचं अधिकृत सर्वेक्षण ( official survey ) प्रकाशित झालेला नाहीये. लपवाछपवी जोरात चालू दिसते आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by तर्कवादी

गामा पैलवान 16/06/2022 - 01:42
तर्कवादी, पु.ना.ओक हे इतिहासकार नाहीत अशी मल्लीनाथी ध्रुव राठी करतात. ताजमहाल वगैरे मीमांसा ( थियरी ) त्यांनी स्वत:च्या डोक्यातनं उत्पन्न केली असं राठींचं म्हणणं आहे. राठींच्या या मतास छेद देणारा एक ढळढळीत प्रसंग उपलब्ध आहे. कर्णावती येथील जामा मशिदीच्या जवळ एका हिंदूने ( कांतीचंद्र ब्रदर्स ) आपल्या स्वत:च्या जागेवर एक टोलेजंग इमारत बांधायला घेतली. मशिदीचा इमाम ( का आजून कोणी ) पिसाळला. माशिदिपेक्षा उंच काहीही बांधकाम असता कामा नये म्हणून त्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावून उंच वास्तू बांधण्यावर निर्बंध आणले. शिवाय त्याला ही हिंदूंची वास्तू पाडून टाकायची होती. हिंदू मालकाची हालत खराब झाली. कोणीतरी त्यास ओकांचं नाव सुचवलं. त्याने व्यथित मानाने अतिशय करूण असं पत्र ओकांना पाठवलं. काही करता येईल का याची पृच्छा केली. ओक म्हणाले की सरळ जामा मशीदीवर दावा ठोका की ते भद्रकाली देवीचं मंदिर आहे म्हणून. जाउद्या कोर्टाची माणसं आत तपासणी करायला. इमामाने ताबडतोब आपला दावा मागे घेतला. ओक आणि ताजमहाल यांच्या बाबतीत ध्रुव राठी यांचं मत पार गंडलेलं आहे. पु.ना.ओक बकवास लिहितात की मुद्देसूद, हे वाचक ठरवतील. ध्रुव राठी नव्हे. आ.न., -गा.पै.

मदनबाण 16/06/2022 - 12:39
जाता जाता :- ध्रुव राठी चा व्हिडियो मी आधीच पाहिला होता, तो एक प्रसिद्ध व्ह्लॉगर / युट्युबर आहे. परंतु माझा व्यक्तिगत मता नुसार त्याला कोणाचे तरी मजबुत फंडिंग असुन माहिती देताना उत्तम दिशाभूल करणे हे त्याचे विशेष कौशल्य आहे. त्याच्या अनेक व्हिडियोज मधले प्रतिसादांचे निरिक्षण केल्यास साधारण एकाच आशयाचे / प्रकारचे प्रतिसाद त्याला दिले जातात हे उघड होते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Michael Jackson's Drummer Jonathan Moffett Performs "Smooth Criminal"

In reply to by शशिकांत ओक

मदनबाण 16/06/2022 - 23:34
धन्यवाद ओक काका. _/\_ पायर्‍या :- ताज महाल चे अनेक फोटो पाहताना, मला एक वेगळा फोटो दिसला तो मी खाली देत आहे :- P1 या फोटोत २ स्त्रियांच्या मध्ये पायर्‍या आहेत. त्या पायर्‍या कुठे जातात ? त्या कुठे जात नसतील तर मग त्या तिथे का आहेत ? इंजिनिअरिंग मार्व्हल असलेल्या इमारतीत अशी चूक तर असुच शकत नाही, मग त्या पायर्‍या तिथे का आहेत ? हे समजण्यास वाव नाही. अजुन एक फोटो :- P2 अशाच अजुन पायर्‍या आहेत ज्याच्यावर पाय देऊन लोक आत जातात, या नंतर तिथे लावल्या गेल्या असाव्यात. पायर्‍यांच्या मागचे नक्षिकाम हे स्पष्ट करते की ते संपूर्ण नक्षिकाम असुन त्याच्या पुढे नंतर पायर्‍या बसवल्या गेल्या आहेत. खुल जा सिम सिम ? P3 बादवे... याही पायर्‍या नंतरच्याच असाव्यात काय ? [ संपूर्ण नक्षिकामावरच त्या असुन, पायर्‍यांचे जोड चांगल्या प्रतीचे नाहीत आणि दोन्ही पायर्‍यांवर वेगवेगळे आहेत. ] जरासे अवांतर :- केरळ मधल्या पद्मनाभस्वामी मंदिरातील अशाच्या गुप्त तळघरातुन सुमारे २ लाख कोटी ची संपती बाहेर काढण्यात आली होती. [ साल बहुतेक २०११ ] आता मला पडलेले प्रश्न :- १] ती संपत्ती आता कुठे आहे ? मागच्या सरकारने ती कुठे ठेवली आहे ? २] जर मंदीरा खालची भुयारे उघडली जाऊ शकतात तर मग ताज महालची उघडुन ती का पाहिली जाऊ शकत नाहीत ? ३] पद्मनाभस्वामी मंदिरातील एक गुप्त दालन आजही उघडण्यात आलेले नाही, त्याला विरोध केला गेलेला आहे. या मागे नक्की काय कारण आहे ? [ त्याचा दारावर कालसर्पाचे चिन्ह इं असुन विशिष्ठ सर्प मंत्र म्हणुनच तो बंद करण्यात आलेला असुन तश्याच प्रकारे कोणा सिद्धा कडुन तो त्याच प्रकारे उघडला गेला पाहिजे इइइ. फार पूर्वी वाचनात आले होते,पण तेच खरं का ? हे मात्र ठावूक नाही. ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Michael Jackson's Drummer Jonathan Moffett Performs "Smooth Criminal"

In reply to by मदनबाण

शशिकांत ओक 24/06/2022 - 00:06
या फोटोत २ स्त्रियांच्या मध्ये पायर्‍या आहेत. त्या पायर्‍या कुठे जातात ? त्या कुठे जात नसतील तर मग त्या तिथे का आहेत ? इंजिनिअरिंग मार्व्हल असलेल्या इमारतीत अशी चूक तर असुच शकत नाही, मग त्या पायर्‍या तिथे का आहेत ? हे समजण्यास वाव नाही.
Taj Mahal is not a Shiv Temple या पुस्तकात हाच फोटो मी पण माझ्या उत्तरात दिला आहे. ताज कबरींच्या बाजूला असलेल्या मशीद इमारतीत गालिचा बिछान्या प्रमाणे नमाज पढायला डिझाईन केले आहे. तिथे खुदबा पढायला एक ३ पायऱ्यांचा उंचवटा बनवला जातो. तो कार्पेटवर स्टूल ठेवल्या प्रमाणे दिसतो कारण तो नंतर लावला गेला आहे. असे दिसते.
बादवे... याही पायर्‍या नंतरच्याच असाव्यात काय ? [ संपूर्ण नक्षिकामावरच त्या असुन, पायर्‍यांचे जोड चांगल्या प्रतीचे नाहीत आणि दोन्ही पायर्‍यांवर वेगवेगळे आहेत. ]
पायऱ्यांचे फिनिशिंग गलथान आहे हे आपले निरीक्षण बरोबर आहे.

In reply to by मदनबाण

तर्कवादी 25/06/2022 - 16:45
परंतु माझा व्यक्तिगत मता नुसार त्याला कोणाचे तरी मजबुत फंडिंग असुन माहिती देताना उत्तम दिशाभूल करणे हे त्याचे विशेष कौशल्य आहे

In reply to by तर्कवादी

गामा पैलवान 16/06/2022 - 19:59
तर्कवादी, 'तुमचं बोटंच वाकडं' अशा अर्थीचे अनेक आरोप ओकांवर झाले आहेत. ते आपापल्या परीने खरे असतीलही. पण वाकड्या बोटाने ओक जो चांदोबा दाखवताहेत तो कोणी पहायचा? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तर्कवादी 17/06/2022 - 19:08
पण वाकड्या बोटाने ओक जो चांदोबा दाखवताहेत तो कोणी पहायचा?
ठीक आहे .. पुरातत्च विभाग केंद्र सरकारच्याच अखत्यारीत येतो. त्या विभागानेही मंदिर असण्याची शक्यता फेटाळली होतीच पण तरीहि पुन्हा एकदा एखादी समिती स्थापन करुन सरकारने एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावायला हरकत नाही. बाकी मंदिर असेल नाहीतर कबर .. मी तरी अजून ताजमहाल बघितला नाही आणि जेव्हा बघेन तेव्हा तो फक्त एक प्रेक्षणीय स्थळ, एक जागतिक आश्चर्य म्हणूनच.

निनाद 01/06/2022 - 06:52
म्हणून मी जस्टिन यांच्या प्रत्येक आक्षेपाला उत्तर देऊन गोडबोले पक्षी पुना ओक कसे बरोबर आहेत ते दाखवून दिले. यावर एक वेगळे ई-बुक सादर केले आहे. तुम्ही ग्रेट कार्य करत आहात. असे स उदाहरण आणि संदर्भासहीत पुरावे तयार करणे हेच आवश्यक आहे. तथापि,
याशिवाय आणखी काही सूचना असतील तर स्वागत आहे.
लेख वाचतांना त्यातून सज्जड असे निष्कर्ष हाती लागले नाहीत असे वाटले. म्हणजे पुरावे जुळवत जुळवत कथा पुर्ण व्हायला हवी आणि निष्कर्ष विधान तयार व्हायला हवे. उदा, हे आणि हे पुरावे पाहता/ एकत्र जुळवता असे म्हणता येते की, (विधान) विस्तृत उदाहरण लाल किल्यातील चित्र क्र. क्ष पाहून असे ठाम विधान करता येते की, शहाजहान वर हिंदू संस्कार होते आणि त्याचे पालन करतांना तो चित्र क्र. क्ष मध्ये दिसत आहे. लाल किल्यातील चित्र क्र. य पाहून असे दिसून येते की, मोगल राज्यात हिंदू वाद्ये वाजवली जात होती त्या अर्थी येथे हिंदू पद्धती पाळल्या जात होत्या. वरील पुरावे पाहता असे म्हणता येईल की औरंग्या पापी याची राजवट येई पर्यंत बादशहा मुसलमान असला तरी राज्य हिंदूच चालवत होते. -- हे इ पुस्तक प्रकाशित व्हायला हवे. याला International Standard Book Number (ISBN) पण घ्या असे म्हणतो.

In reply to by निनाद

शशिकांत ओक 02/06/2022 - 08:58
लेख वाचतांना त्यातून सज्जड असे निष्कर्ष हाती लागले नाहीत असे वाटले. म्हणजे पुरावे जुळवत जुळवत कथा पुर्ण व्हायला हवी आणि निष्कर्ष विधान तयार व्हायला हवे.
आपण सादर केलेले काही मुद्दे पटायला हवेत असे आहेत. मिपावर फक्त एक झलक दाखवली आहे. 'मुद्दे'माल ईबुकचे वाचन केले तर समजून घ्यायला सोपे जाईल. तिथे पॉइंट बाय पॉइंट उत्तरे सादर केलेली आहेत. त्यातल्या एका चित्रातून काय काय भानगडी निर्माण होतात ते दाखवायला हा धागा मराठीत सादर केला आहे. १ दिवसात ४०० टिचक्या बरा पळाला धागा... १. नगारखाना मुगलांच्या साठी देखील हवा होता. कारण जिथे लढाई चालते तिथे कोलाहल निर्माण करणे हे अपेक्षित आहे. जोपर्यंत मागे रणवाद्ये वाजत आहेत तोपर्यंत लढणाऱ्या सैन्याला आपला सेनापती मागे आहे असे मानसिक बळ मिळते. म्हणून मुस्लिम धर्मात संगीताला मान्यता नाही पण रणांगणात ती सिग्नल किंवा इशारे म्हणून महत्वपूर्ण ठरतात. २. ISBN घेणे आवश्यक आहे असे मला वाटत नाही. ते हार्डकॉपीसाठी प्रकाशकांच्या सोईसाठी असेल. माझी सर्व पुस्तके ईबुक माध्यमातून अल्प किमतीत उपलब्ध आहेत. लोकांनी ती (जशीच्यातशी) कॉपी पेस्ट करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला हवीत. माझा मजकूर का लाटला? असे मी म्हणणार नाही उलट तो वापरून त्यांनी माझ्या विचारांना चालना द्यावी हीच अपेक्षा आहे.

In reply to by निनाद

शशिकांत ओक 03/06/2022 - 13:05
पुस्तक Amazon वर विकायला आहे का?
नाही. हे किंवा इतर ११० पुस्तके तिथे सादर केलेली नाहीत. किंमत फक्त १०, २०, ५० अशी असल्याने त्यांना कमिशन देऊन मिळणारे पैसे नगण्य असतात. माझ्या पुस्तकाचे कव्हर त्यांच्या नियमात बसत नाही वगैरे कारणे आहेत. असो. इन्टामोजो किंवा डॉटपे (व्हॉट्स अॅपला जोडलेले आहे) मला सोईचे वाटतात. ते पूर्ण ₹१०/२० /५०रुपये माझ्या खात्यात जमा करतात. असो. मिसळपाव सारखी संस्थळे आज आहे उद्या नाहीत. माझे लेखन येता बराच काळ वाचायला उपलब्ध राहावीत म्हणून ईबुक मधे सादर करायचा निर्णय घेतला. या शिवाय अधिक सोईचे व कमी पैशात काही सोई असतील तर जरूर सुचवावे. मार्गदर्शन करावे.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 13/02/2024 - 10:11
प्रिय निनाद जी, या धाग्यावर आधारित नवे ई-बुक १३८ प्रकाशित झाले आहे. आपण पूर्वी आवर्जून पुस्तक रूपाने वाचायला मिळावे असे सुचवले होते. म्हणून हा धागा वर काढून प्रतिसाद देत आहे. १३८ ताज महाल विषयावरील पुस्तकात अनेक नवे पुरावे सादर केले आहेत मिपा ३८ या शिवाय या धाग्यावरील प्रतिसादात कै. वि. वा. मिराशींनी बटेश्वर मंदिर शिलालेखाच्या संदर्भात जे म्हटले होते त्याची शहानिशा करण्यासाठी लेखन करत आहे.

कंजूस 01/06/2022 - 09:56
जे काही दाखवले आहे ते आवडले. दिल्लीचा लाल किला हा हाफ डे टुअरमधे ओझरता पाहिला. किंवा कुतुबही. दिल्लीत राहणाऱ्यांनी तिथे जाऊन सावकाश पाहून फोटो आणले तर उपकार होतील. गर्दी नसताना ते जाऊ शकतात.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक 03/06/2022 - 13:13
दिल्लीत राहणाऱ्यांनी तिथे जाऊन सावकाश पाहून फोटो आणले तर उपकार होतील
कंजूसजी, आपणास तिथे न जाता घरी बसून अब दिल्ली दूर नहीं अशी परिस्थिती आहे ... इतके यूट्यूबर लोक कामाला लागलेले आहेत. ते पाहून सगळी स्थळे समजायला सोपे पडते. शिवाय अनेक ठिकाणे प्रत्यक्ष तिथे गेले की ओं फस्स झाल्याची अनुभूती आणतात.

तुमच्या नजरेतुन चित्रे पहायला आवडली. या विषयात फारशी गती नाही पण तुमची धडपड आणि चिकाटी मात्र वाखाणण्याजोगी आहे. तुमच्या मेहनतीला लवकरच यश मिळो ही सदिच्छा. पैजारबुवा,

इरसाल 01/06/2022 - 12:03
मिपावर येणार्‍या कॉन्स्पिरन्सी थेअरीज पहाता..... १३ च्या चित्रात खाली दोन जणांच्या हातात बादशाह खुष असल्याने दिलेले चेक आहेत अस वाटतय, आणी ते दोघ ते चेक हवेत फडफडवत आहेत. असा हि मुद्दा कधी येवु शकेल.

In reply to by इरसाल

शशिकांत ओक 02/06/2022 - 09:41
असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीत खरा प्रकार महाराजांच्या त्राग्याने बाजूला पडला... राजगडापासून कौतुक व आदराने नेलेल्या नजराणा, भेटवस्तू औरंगजेबाला ५०व्या वाढदिवसानिमित्त सादर करून संभाजी महाराज यांच्या नावाने ५ हजारी मांडलिक सरदारकी तुम्हाला (सिवांना) दिली असा हुकूमनामा मिळवायचा हा खरा उद्देश मागे पडला. महाराजांनी बरोबर नेलेल्या मुत्सद्दी मंडळींची पंचाईत झाली. मग नंतर एका खाजगी बैठकीत ते नजराणे सादर केले. एखाद्या उच्च घरात त्यांना देण्यासाठी आपल्याला परवडेल अशा भेट वस्तू देणार्‍या कर्मचाऱ्यांकडे जसे वरवर पाहून ते स्वीकारले जाते असेच काहीसे तिथे घडले. हुकूमनामा बनून तयार होईपर्यंत जयसिंहाच्या मुलाकडे सिवाला राहू दिले जावे ही विनंती औरंगजेबाच्या दरबारातील वजीरे आझम (स्टाफ) केली गेली. नंतर सिवा पळून गेला. तो हुकूमनामा तसाच पडून राहिला. तो नंतर अमलात आणला गेला व संभाजी महाराज मुगलांच्या दख्खन दरबारात रूजू झाले. (त्यांच्या वतीने प्रताप राव गुर्जर, निराजी रावजी (जे महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटका करताना सिवा म्हणून महिनाभर धिटाईने राहिले होते ते) ५ हजार सैनिक घेऊन हजर असत.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 10/06/2022 - 15:03
राजगडापासून कौतुक व आदराने नेलेल्या नजराणा, भेटवस्तू औरंगजेबाला ५०व्या वाढदिवसानिमित्त सादर करून संभाजी महाराज यांच्या नावाने ५ हजारी मांडलिक सरदारकी तुम्हाला (सिवांना) दिली असा हुकूमनामा मिळवायचा हा खरा उद्देश मागे पडला.
आणि औरंगजेबाने नजरकैदेत टाकले. कुठून इथे आलो असे महाराजांना झाले! 'सिवाला मारून टाकणे गरजेचे आहे' असे कितीतरी दरबारी सरदारांचे मत होते पण मिर्झा राजे जयसिंह यांनी सिवाला दिलेल्या वाचनामुळे त्यांचा मान राखून महाराजांच्या वर्तणुकीवर कडक नजर ठेवून बंदोबस्त ठेवण्यात आला. संभाजी राजे यांना छळ करून मारणाऱ्या औरंगजेबाने मुलगा शाहू व पत्नी यांना चांगली वर्तणूक दिली. याचे कारण मराठेशाहीला दुफळीत गुंतवून भविष्यात यांच्या शक्तीला खच्चीकरण करण्याचा डाव होता. जे आपल्या मुगल सत्तेला जमले नाही ते मराठेच आपापल्यात वैर धरून अस्थिर होतील...! नंतर जे घडले ते साधारण तसेच झाले...

In reply to by इरसाल

शशिकांत ओक 02/06/2022 - 10:19
तुम्ही म्हणता तसे एक चित्र आहे जे इथे सादर केलेले नाही. त्यात सैनिक हातात लांब दांडे असलेल्या शस्त्राने हत्तीला हुलकावण्या देत आहेत. त्या भालेनुमा शस्त्राला काही तरी लटकावले आहे ते काय असावे असा प्रश्न उपस्थित होतो. तिथे तुम्हाला तुमच्या थिअरीचा वापर करता येईल. मनोज भाई दाणींनी पण त्यावर त्वरित प्रकाश टाकावा.

गामा पैलवान 01/06/2022 - 13:27
शशिकांत ओक, तुमच्यात जबर्दस्त तळमळ आणि चिकाटी आहे. तुमच्यासारखी लोकंच हिंदूंचा हरवलेला ठेवा परत मिळवून देणार आहेत. दंडवत! आ.न., -गा.पै.

मदनबाण 01/06/2022 - 17:27
लुटारु,बलात्कारी आणि हिंदूंचा नरसंहार करणारे आणि त्यांना धर्मांतरीत करणारे पाशवी वृत्तीचे आक्रमक होते. ताजमहाल असो वा लाल किल्ला किंवा कुतुब मिनार यांनी यातले काहीही बांधले असण्याची शक्यता माझ्या लेखी शून्य आहे कारण जे विध्वंसक असतात ते अशी उच्चकोटीची निर्मीती करुच शकत नाही असा माझा ठाम विश्वास आहे. हल्लीच ज्ञानवापी देवळाच्या बाबतीत [ ती मशीद नाहीच. ] जो काही कल्लोळ दिसुन येतोय त्यावर आणि अधिक वाचताना ताजमहालवर देखील एक व्हिडियो पाहिला तो इथे देत आहे. हा व्हिडियो पाहिल्यामुळे मला पहिल्यांदाच कळले की लोक जो ताजमहाल पाहतात ती ताजमहाल ची मागची बाजु आहे आणि यमुनेच्या बाजुला त्याची समोरची बाजु असुन तिथुनच ताज महाल [ तेजोमहाल ] मध्ये प्रवेश केला गेला आहे. असाच लालकिल्ल्याच्या बाबतीत देखील व्हिडियो पाहण्यात आला होता तो देखील इथे देउन जातो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- विश्लेषण : ‘नव्वद’ची पिढी नि ‘केके’चे गारूड… काय होते हे समीकरण?

In reply to by Bhakti

शशिकांत ओक 05/06/2022 - 23:48
चित्र माला पाहून त्यात सिंह आणि गाय यांच्या बदलत्या चित्रांचा उद्देश काय असेल? ती चौकट दर वेळी बदलते चित्र दर्शवून चित्रकाराने आपल्यासाठी ती तयार केलेली आहे का? मौलवींना उभे करून त्यांना राजसत्तेतील त्यांचे उच्च स्थान दर्शवायचे असावे का? आपल्या सह मिपाकरांची मते समजून घ्यायला आवडेल. मोबाईलवर ते तपशील नीट दिसतात कि नाही माहित नाही.

शशिकांत ओक 02/06/2022 - 10:07
आपल्याला इतके भावनाशील व्हायला हवे का? आपण असे चित्र रंगवू कि नरेंद्र मोदी, गुजरात दंगलकर्ते, मुस्लिम धर्म द्वेष्टा व्यक्ती पाकिस्तानच्या वझीरे आझम गादीवर बसलेले आहेत. पाकिस्तानची निर्मिती नंतरच्या काळात तिथे असलेल्या नव्या व जुन्या वास्तू, हिंदूनी तयार केल्या होत्या. म्हणून मुस्लिमांनी त्यांचे अपहरण केले होते असे सरसकट मानले तर तर ते काही वस्तूंसाठी चुकीचे ठरेल. कारण १५२६ ते १७०७ पर्यंत जवळ जवळ २शे वर्षे राज सत्ता राबवताना नविन वास्तू निर्माण करायला लागणार होत्या. त्या तयार करण्यात कुशल मनुष्यबळ आणि साधन संपत्ती हस्तगत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले. अरबी फारशी कॅलिग्राफी याची उदाहरणे आहेत. असो. ताजमहालाच्या मागील दरवाजे हे यमुनेच्या पात्रातून यायला सोय म्हणून केले होते. वेळ पडल्यास तिथून सटकायची ती चोरवाट पण होती. मुख्य प्रवेशद्वार ज्याला श्री दरवाजा म्हणून आजही मान्यताप्राप्त आहे. तो कुठे व कसा दिसतो यावर एबा-कोच-ताज-महाल-भाग-१ मधे पूर्वी चर्चा झाली आहे. असो...

In reply to by शशिकांत ओक

मदनबाण 02/06/2022 - 19:22
आपल्याला इतके भावनाशील व्हायला हवे का? बाकीच्यांचे ठाऊक नाही, लेकीन अपुन ऐसाइच हय. आपण असे चित्र रंगवू कि नरेंद्र मोदी, गुजरात दंगलकर्ते, मुस्लिम धर्म द्वेष्टा व्यक्ती पाकिस्तानच्या वझीरे आझम गादीवर बसलेले आहेत. कल्पना चांगली आहे, पण आधी जे देशातच पाकिस्तान तयार होता आहेत त्याचे चित्र स्पस्ट दिसत असुन सुद्धा आपण आधंळे आहोत की काय ते कळत नाही. पाकिस्तानची निर्मिती नंतरच्या काळात तिथे असलेल्या नव्या व जुन्या वास्तू, हिंदूनी तयार केल्या होत्या. म्हणून मुस्लिमांनी त्यांचे अपहरण केले होते असे सरसकट मानले तर तर ते काही वस्तूंसाठी चुकीचे ठरेल. कारण १५२६ ते १७०७ पर्यंत जवळ जवळ २शे वर्षे राज सत्ता राबवताना नविन वास्तू निर्माण करायला लागणार होत्या. त्या तयार करण्यात कुशल मनुष्यबळ आणि साधन संपत्ती हस्तगत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले. अरबी फारशी कॅलिग्राफी याची उदाहरणे आहेत. माझे म्हणणे इतकेच होते की तेजोमहाल सारखी भव्य वास्तु आणि त्याचे असलेले स्थापत्यशात्र हे अत्यंत कौशल्याचे सामर्थ हे आक्रमक मुघलांचे असुन शकत नाही,हे स्वतः ओसाड वातावरण असणार्‍या देशातुन इथे आले तेव्हा असे कौशल्य त्यांच्यात असण्याची शक्यता ०. ताजमहालाच्या मागील दरवाजे हे यमुनेच्या पात्रातून यायला सोय म्हणून केले होते. वेळ पडल्यास तिथून सटकायची ती चोरवाट पण होती. मुख्य प्रवेशद्वार ज्याला श्री दरवाजा म्हणून आजही मान्यताप्राप्त आहे. लोक जी बघतात ती ताजमहालची मागची बाजु आहे, त्याचा समोरचा भाग यमुनेच्या बाजुला असणेचे मुख्य कारण त्या नदीचे विहंगम दृष्य त्या महालातुन पहाता यावे असे मला सांगायचे होते. कशास मान्यता आहे किंवा नाही या बद्धल मला काहीच माहिती नाही. असो... जाता जाता :- तेजोमहालचा आकाशातुन टॉप व्हू जालावर पाहत होतो... तर कुठुन तरी अजुन एक अप्रतिम टॉप व्हू माझ्या पाहण्यात आला, तो इथे देऊन जातो. P1 श्रीपुरम (स्वर्ण मंदिर) :- श्री लक्ष्मी नारायणी मंदीर

In reply to by मदनबाण

शशिकांत ओक 03/06/2022 - 12:51
यमुनेच्या बाजुला (मुख्य द्वार) असणेचे मुख्य कारण त्या नदीचे विहंगम दृष्य त्या महालातुन पहाता यावे असे मला सांगायचे होते.
ताज महाल इमारत - वास्तू पहायला लोक जातात. यमुनानदी पहायला ताजमहालात जातात असे असावे असे वाटत नाही. तिथे गेल्यावर यमुनेचे पात्र दिसते इतकेच. ताज महालासमान भव्य वास्तू तामिळनाडूमधे वेल्लोरला २०१७ मधे निर्माण झाली आहे 15 हजार किलो सोने से बना महालक्ष्मी मंदिर | Sripuram Sri MahaLakshmi Temple

In reply to by शशिकांत ओक

मदनबाण 03/06/2022 - 15:39
ताज महाल इमारत - वास्तू पहायला लोक जातात. यमुनानदी पहायला ताजमहालात जातात असे असावे असे वाटत नाही. तिथे गेल्यावर यमुनेचे पात्र दिसते इतकेच. मी ताजमहाल ही वास्तु बांधणार्‍या दृष्टीकोनातुन सांगत असुन पर्यटकांच्या नव्हे ! मुळात ती वास्तु यमुनेच्या किनारी बांधलीच गेली नसती जर मूळ मालकाला त्या वास्तु मधुन यमुना दर्शन घ्यावयाचे नसते. याचमुळे फार कठीण जागी असुन देखील वास्त्युशास्त्राचा कमाल वापर करुन हा महाल बांधला गेला. ताजमहाल प्रमाणे त्याचा पाया हा देखील रोचक विषय असुन या बद्धल एक चित्र खाली देतो. P1 नदी काठाशी असल्याने निर्म्यात्यांनी पाया बांधणार्‍यावर किती विचार आणि कष्ट घेतले असतील याचा अंदाज वरील चित्र पाहुन कळते. :) जाता जाता :- लोक समुद्र किनारी बंगले, इमारती आणि हॉटेल्स का बांधतात ? कारण यात राहणार्‍यांना समुद्र पाहता यावा. हेच कारण ताजमहालसाठी आणि त्याच्या समोरील नदीसाठी देखील सत्य आहे. त्यामुळेच वास्तुचा समोरचा भाग हा नदीला सामोरा बांधला गेला आहे आणि मुख्य प्रवेशद्वार याच बाजुला आहे. वास्तु म्हणुन समोरची बाजु कोणती हे या निम्मित्याने कळते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- परिस्थिती १९९० पेक्षाही भयनाक असल्याचं सांगत काश्मीर खोऱ्यातून सरकारी कर्मचारी, स्थानिकांचं मध्यरात्री पलायन

In reply to by मदनबाण

शशिकांत ओक 03/06/2022 - 19:17
ताजमहाल प्रमाणे त्याचा पाया हा देखील रोचक विषय असुन या बद्धल एक चित्र खाली देतो.
फार कठीण जागी असुन देखील वास्त्युशास्त्राचा कमाल वापर करुन हा महाल बांधला गेला.
आपण जे चित्र सादर केले आहे ते मी शोधतोय. बांधकाम करताना पाया कसा तयार केला गेला असावा यावर प्रकाश टाकणारे चित्र बांधकाम करणाऱ्या लोकांनी यावर अभ्यास करावा.

In reply to by शशिकांत ओक

मदनबाण 03/06/2022 - 21:38
आपण जे चित्र सादर केले आहे ते मी शोधतोय. संदर्भ :- Losing the Taj: Fighting a monumental neglect याच लेखातील दिलेले चित्र :- https://akm-img-a-in.tosshub.com/indiatoday/images/misc/CS-TAJ-Jul30_Part_3.jpg

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- परिस्थिती १९९० पेक्षाही भयनाक असल्याचं सांगत काश्मीर खोऱ्यातून सरकारी कर्मचारी, स्थानिकांचं मध्यरात्री पलायन

In reply to by निनाद

आनन्दा 02/06/2022 - 11:37
https://alkaoaksebookshoppy.online/product/26741951/%E0%A4%8F%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9A-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7--E-Book-52- एक मिळालं. इथे बाकी पण आहेत.

sunil kachure 03/06/2022 - 13:45
त्याची मालकी फक्त केंद्र सरकार ची हवी . मग लाल किल्ला असू किंवा ताज महल .ही सर्व देशाची संपत्ती आहे. .ह्या वर कोणत्याच धर्माचा हक्क नसेल. भारतीय पुरातत्व खाते बकवास,नालायक आहे ..फक्त पगार घेणे इतकेच काम करते एक खास अधिकारी नेमून देश भरातील प्राचीन इमारती,मंदिर , मशीद त्यांच्या ताब्यात द्यावे .आणि त्या वास्तू ल काही हानी झाली तर ज्याला जबाबदारी दिली आहे त्या अधिकाऱ्याला फाशी च ध्या.

sunil kachure 03/06/2022 - 13:45
त्याची मालकी फक्त केंद्र सरकार ची हवी . मग लाल किल्ला असू किंवा ताज महल .ही सर्व देशाची संपत्ती आहे. .ह्या वर कोणत्याच धर्माचा हक्क नसेल. भारतीय पुरातत्व खाते बकवास,नालायक आहे ..फक्त पगार घेणे इतकेच काम करते एक खास अधिकारी नेमून देश भरातील प्राचीन इमारती,मंदिर , मशीद त्यांच्या ताब्यात द्यावे .आणि त्या वास्तू ल काही हानी झाली तर ज्याला जबाबदारी दिली आहे त्या अधिकाऱ्याला फाशी च ध्या.

In reply to by sunil kachure

शशिकांत ओक 03/06/2022 - 19:34
त्याची मालकी फक्त केंद्र सरकारची हवी
भारतीय पुरातत्व खाते बकवास,नालायक आहे
मित्रा, भारतीय पुरातत्वखाते होते म्हणून निदान आज इतक्या वास्तू सध्याच्या स्थितीत आहेत. खाते वाईट नाही. त्यात काम करणारे वाईट नाहीत. फक्त मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

In reply to by शशिकांत ओक

मदनबाण 03/06/2022 - 23:07
फक्त मानसिकता बदलणे गरजेचे आहे. जाता जाता :- जगातील आश्चर्यां पैकी एक असलेली वास्तू पण त्या वास्तु बद्धल ज्या देशात ती उभी आहे त्याच देशातील लोकांपासुन सगळी लपवा छपवी ! काय खजाना दडवलाय का ? :))) बादवे... महादेवास धोत्र्याचे फळ आणि फुल अर्पित केले जाते ते त्यांस विशेष प्रिय आहेत आणि हीच धोत्र्यांची फुले ताज महालवर कोरलेली दिसुन येतात. मुघल आणि धोत्र्याचे फुल ? :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- परिस्थिती १९९० पेक्षाही भयनाक असल्याचं सांगत काश्मीर खोऱ्यातून सरकारी कर्मचारी, स्थानिकांचं मध्यरात्री पलायन

लोल, हे ओकलोक ताजमहालात महाशिवरात्री साजरी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत! मी पु. ना. ओक, डॉ. विद्याधर ओक, श्री शशिकांत ओक या सर्वांचा फॅन होण्याच्या मार्गावर आहे. सर्व लोकांत एक तरी ओक, तेजोमहालयाचे महत्कार्य पार पाडण्यास अस्तित्त्वात असणार याविषयी माझ्या मनात जराही संदेह नाही. - एक ओकप्रेमी

In reply to by हणमंतअण्णा शंक…

शशिकांत ओक 03/06/2022 - 19:26
मी पु. ना. ओक, डॉ. विद्याधर ओक, श्री शशिकांत ओक या सर्वांचा फॅन होण्याच्या मार्गावर आहे.
ताज महाल किंवा अन्य वास्तू कोणी बांधल्या यापेक्षा कशा बांधल्या यावर भर दिला गेला पाहिजे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

हे ओकलोक ताजमहालात महाशिवरात्री साजरी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत!
प्रतिसाद लिहायला आलोच होतो की आता 'ताजमहाल कधी उकरायचा' म्हणून पण तुमचा प्रतिसाद पाहिला आणि हसुन हसुन पार मेलो. वाट लागली. आई गं....! =)) बाय द वे, आता वळुया तेजोमहालाकडे. ’ताजमहाल हे तेजोमहालय आहे” पृ. क्र. १६१ वर चला. आले का सगळे त्या पानावर ? ओके. आता त्या पानावरच्या शेवटच्या ओळींकडे येऊ या. त्यात उल्लेख केल्याप्रमाणे घुमटाचा कळस पाहा. गुगलवरुन सर्च केले तरी चालेल.पाहिलं का चित्र. (झुम करुन चित्र बघा ) आता जो कळस आहे तो कळस खरं तर मंदिराचा सुवर्ण कलश आहे, जो पर्यंत तुमच्या नजरेला तो सुवर्ण कळस वाटत नाही तो पर्यंत त्या कलशाकडे पाहात राहा. आता त्यावर एक चंद्रकोर आपणास दिसेल. ’खरं तर ती एक चंद्रकोर आहे. हिंदु स्त्रीया असे कुंकुही लावतात” ( पृ. क्र. १६१ ओळ २७ वी) खरं तर आपल्याला गाईड लोक तो ’चाँद' आहे असे म्हणतात. चांद तिरकस असतो. आजकाल अनेक महिला चंद्रकोर टीकली कपाळाला लावतात त्यामुळे हे सगळे साम्य संदर्भ पाहता मला त्यात हिंदू परंपरेच्या काही खाणाखुणा त्यात प्रथमदर्शनी दिसत आहेत असे दिसते. बाकीचा भागावर अधुन-मधुन वेळ मिळाला की लिहिते राहीन. चुभु क्षमस्व. :) -दिलीप बिरुटे

मनो 04/06/2022 - 10:50
आपली मागे चर्चा झाली त्या वेळी हे चित्र लाहोर येथील आहे असा उल्लेख वाचल्याचे स्मरते, त्यामुळे ताज आणि आग्रा यांचा इथे तसा बादरायण संबंधच आहे. दुसरे, हे चित्र आहे, photograph नव्हे, त्यामुळे निव्वळ चित्रातून काही सिद्ध करणे फार अवघड असते, कित्येकदा मूळ वास्तू चित्रकाराच्या सोयीसाठी हवी तशी हलवून वापरतात, कारण त्याला backdrop एवढेच महत्व असते. चित्रगुप्त तुम्हाला सांगतीलच, आणि तुम्हाला ते माहीतही आहे. पैसे देणार तो राजा महत्वाचा.

In reply to by मनो

शशिकांत ओक 04/06/2022 - 12:17
ते मला पटले. फोटो आणि चित्र, पेंटिंग यात जमीन अस्मानाचा फरक आहे. फोटो कुणाला खूष करण्यासाठी वापरता येत नाही. पण पेंटिंग मधे कल्पना स्वातंत्र्य अभिप्रेत असते. जे पेंटिंग दिल्ली लाल किल्ला दरबारातील आहे असे म्हटले आहे ते १६४० सालातील (लाहोर) लालकिल्यातील दरबारातील आहे असे फूट नोट सुचवते. १६२८ साली राज्य रोहण समारंभातील पेंटिंग त्यातील सोनेरी रंग ठसठशीत उठून दिसतो. असो. ताजमहालाच्या संदर्भात हे चित्र उपरे आहे कारण जिथे याचा उल्लेख केला आहे तो लेख इंग्रजीत सादर केला आहे. Taj Mahal is not a Shiv Temple. (Ebook 110) तिथे जो ओझरता उल्लेख केला आहे त्यावर मिपावर सविस्तर लिहायची संधी घेतली आहे. डॉ दिलीप म्हणतात की तो चांद तारा आहे ते कसे बरोबर आहे हेच त्या ईबुक मधे म्हटले आहे. ते वाचले तर आनंद होईल.

आग्रा शहरात यमुनाकिनारी एखादे मंदीर आहे का? नसल्यास ताजमहाल हा अगोदर एखादे मंदीर असावे असे म्हणता येऊ शकेल. कारण ज्या कुठल्या शहरातुन नदी वाहते अथवा जी शहरे ही नदीच्या काठावर वसली आहेत तिथे एखादे मंदीर असतेच असते. आणि अश्या गावांना तीर्थक्षेत्र म्हणुन संबोधण्यात येते. आणि आग्र्याला पौराणिक संदर्भ असल्याने नदीकिनारी मंदीर असण्याची शक्यता जास्त आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

sunil kachure 06/06/2022 - 23:03
ताजं महल मंदिर असू नाही तर कबर उत्तम वास्तू शिल्पाचे उदाहरण आहे आणि भारताची संपत्ती आहे. त्या वर वाद उघरून काढण्यात काही अर्थ नाही. त्यांची योग्य निगा राखणे हे महत्वाचे.

In reply to by sunil kachure

गामा पैलवान 07/06/2022 - 02:02
sunil kachure, सर्व इस्लामिक वास्तू थडगी व कबरी कशाकाय? हे मुस्लीम राज्यकर्ते मेलेल्यांसाठी मोठमोठी थडगी उभारतात, तर ते जिवंतपणी कुठे रहात होते? माझ्या मते मूळ हिंदू वास्तूवर थडग्याचा शिक्का मारला की हिंदू तिच्यावरचा हक्क सोडून देतात. म्हणून हिंदूंकडून वास्तू चोरायला हा थडगी व कबरी हे प्रकार अस्तित्वात आले आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by sunil kachure

सुक्या 08/06/2022 - 03:50
सहमत आहे. ताज जिथे आहे तिथे जुने काही असेल असे वाटत नाही. ताज हे उत्तम वास्तू शिल्पाचे उदाहरण आहे आणि भारताची संपत्ती आहे यावर सहमत. (आजचा दिवस कॅलेंडर वर मार्क करुन ठेवला आहे. काचुरे साहेबांशी सहमती होणे हा सटीसामाशी योग)

शशिकांत ओक 10/06/2022 - 20:10
खालील विचार डॉ दिलीप बिरूटे यांच्या संदर्भातील प्रतिक्रियेवर आहेत पण ते स्वतंत्र मांडणे योग्य वाटले...
आता त्यावर एक चंद्रकोर आपणास दिसेल. ’खरं तर ती एक चंद्रकोर आहे. हिंदु स्त्रीया असे कुंकुही लावतात” ( पृ. क्र. १६१ ओळ २७ वी) खरं तर आपल्याला गाईड लोक तो ’चाँद' आहे असे म्हणतात. चांद तिरकस असतो. आजकाल अनेक महिला चंद्रकोर टीकली कपाळाला लावतात त्यामुळे हे सगळे साम्य संदर्भ पाहता मला त्यात हिंदू परंपरेच्या काही खाणाखुणा त्यात प्रथमदर्शनी दिसत आहेत असे दिसते. बाकीचा भागावर अधुन-मधुन वेळ मिळाला की लिहिते राहीन. चुभु क्षमस्व. :) -दिलीप बिरुटे
बिरुटे सर, हा धागा एका मुगलकालीन पेंटींग वरील दिनांकामुळे चर्चेस घेतला आहे. इलस्ट्रेटेड वीकलीत हे चित्र कृष्ण धवल रंगात प्रकाशित झाले होते. त्याच्या खालील भागात हे चित्र सन १६२८ मधे दिल्लीतील लालकिल्ला यावास्तूत इराणी वकिल भेटायला आला होता असे म्हटले होते. त्याचा आधार घेऊन पुना ओकांच्या पुस्तकात 'जर लालकिल्ला व त्यातील दरबार १६२८ सालात बांधून तयार होता असे दिसते. पण मग आर्किऑलॉजिची पाटी लालकिल्ला १६३९ मधे बांधून तयार झाला असे सांगते ते खोटे ठरते' . या गौडबंगालाची उकल करण्यासाठी सादर केला आहे. कळसावर चांदतारा आहे कि काही दुसरे प्रतीक आहे याची चर्चा पूर्वी एका धाग्यावर केली आहे.
ओकलोक ताजमहालात महाशिवरात्री साजरी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत!
ज्यांना तसे वाटते ते वाटू दे मला व्यक्तिशः तसे वाटत नाही. सध्याच्या घडीला जी वास्तू ज्या अवस्थेत आहे. त्या कबरीच्या रूपातच ती पर्यटकांना पहायला हवी. त्यातील कॅलिग्राफी, संगमरवरातील पच्चीकारी याचा आस्वाद घेता यावा. आहे ती वास्तू मोडा, फोडा ही मानसिकता अत्यंत प्रतिगामी आहे. प्रश्न उरतो तो या वास्तुचे बदलते रूप होते यावर प्रकाश टाकला जावा. एकेकाळी ती कशी होती नंतर तिचात कशी स्थित्यंतरे होत गेली. याचा विचार इतिहासकारांनी न करता सिव्हिल इंजिनियरिंग मार्व्हल म्हणून बांधकाम जगातील मान्यवर वास्तू तज्ज्ञांनी एकत्र येऊन करावे. इतिहासकारांच्या आणि अनुषंगाने धार्मिकतेच्या आवरणातून बाहेर ठेवण्यात शहाणपण आहे.

In reply to by शशिकांत ओक

'आहे ती वास्तू मोडा, फोडा ही मानसिकता अत्यंत प्रतिगामी आहे' हं ओके. बाय द वे, आपणास उकरा-उकरीत इंट्रेष्ट आहे की काय असे वाटले. पण आपले विचार पाहता तसे काही दिसत नाही. विषयांतर केल्यामुळे आपण हर्ट झाला तर असाल तर दिलगिरी व्यक्त करतो. आयाम सॉरी. -दिलीप बिरुटे

sunil kachure 10/06/2022 - 20:41
एका ठिकाणी वाचनात आले ताजमहाल ज्या जागेवर उभा आहे तिथे राजपूत राजाचा महाल होता.शहाजन नी तो मागून घेतला आणि त्या बदल्यात त्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा दिली. खरे खोटे माहीत नाही.

मी पु. ना. ओकांना सिरीयसली घेतले नव्हते. पण विद्याधर ओकांना मात्र घेतले. ( विद्याधर ओकांमुळे मला शास्त्रीय संगीतातल्या श्रुती खूप स्पष्टपणे कळाल्या आणि शास्त्रीय संगीतातले 'शास्त्र', यमनासारखे ठराविक राग मला इतके का आवडतात यांचा सुस्पष्ट उलगडा झाला. तत्पूर्वी मला समजेल असे फ्रीक्वेन्सी-टेम्पो या शास्त्रीय भाषेत संगीतविचार कुणीही समजावून सांगितला नव्हता. विद्याधर ओक एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे म्हणजे काय याचे उदाहरण ठरावे हे माझे मत आहे. अशी माणसे दुर्मिळ होत आहेत.) विद्याधर ओक जेव्हा तेजोमहालाला हात घालतील तेव्हा ते उगाचच खोडसाळपणा करण्यासाठी असणार नाही याची एक मिनिमम ग्यारंटी मला आहे. एखाद्या माणसाला त्यात जेन्युइन इंटरेस्ट तयार होऊ शकतो आणि तो सत्यापर्यंत जायचा त्याच्या परीने प्रयत्न करू शकतोच की. पु. ना. ओक हे सर्वस्वी चुकीचे नव्हते. शाहजहानने ताजमहाल पहिल्या विटेपासून चांदपर्यंत सगळाच्या सगळा नव्याने बांधलेला नाही. त्याने ती जागा आणि तिथे जे काही होते ते एका राजपूत राजाकडून घेतले आहे असे तो स्वतःच म्हणतोय. सध्याच्या स्वरूपातला ताजमहाल करायला त्याने २० टक्के पदरचे बांधकाम केले आहे की ८० टक्के ते मला ठाऊक नाही. अर्थात बांधकामाचे स्केल पाहता ताजमहालापूर्वीचा तेजोमहालय ही काय सिक्रेट गोष्ट नसणार. म्हणजे अशा भव्य आणि सुंदर वास्तुचे वर्णन समकालीन साहित्यात, गाण्यांत, म्हणींत अंकित झालेले असायला पाहिजे. तसा सबळ पुरावा मिळत नाही. म्हणजे शाहजहानने आधीच्या वास्तूचे मूळ स्वरूप पूर्णपणे पालटले असावे. सगळ्यात महत्त्वाचा मानावा असा पुरावा म्हणजे ताजमहालाच्या पायाशी असलेल्या एका दरवाजाचे कार्बन डेटिंग. परंतू नेहमीप्रमाणे असे शुद्धा शास्त्रीय पुरावे गोळा करू देणे सुद्धा आपल्या कोर्टांना जमत नाही. कुणीतरी काही वर्षांपूर्वी चोरून गोळा केलेल्या तुकड्यावर आपण समाधान मानतो. त्यातला मार्जिन ऑफ एरर पाहिला तर हाही पुरावा भरवशाचा आहे का हे ठाउक नाही. परंतु असा पुरावा आता गोळा करणे अवघड नसावे. दुसरा पुरावा म्हणजे थर्मोल्युमिनेसेन्स. (म्हणजे काय ते ठाउक नाही). हिंदू चिन्हांचा वास्तूवर उपयोग हा काही खरा पुरावा नव्हे. मुघल स्थापत्यशैली आणि चित्रशैली मध्ये इस्लामला मान्य नसलेल्या शेकडो गोष्टी आहेत. त्यामुळे मला ते दुय्यम पुरावे म्हणून घ्यायला हरकत नाही असे वाटते. उरला सामाजिक प्रश्न. आपल्याला ऐतिहासिक वास्तूंमध्ये आणि मिथकांमध्ये, कथांमध्ये आजच्या प्रश्नांना काही ऑबजेक्टीव्ह उत्तर मिळते का हे तपासण्याचा मोठा भ्रमित करणारा रोग जडला आहे. सगळेजण असे भंजाळल्यासारखे का करत आहेत हे झरथुष्ट् जाणे. ऐतिहासिक वास्तू ही मूर्त गोष्ट आहे. ती पूर्वी काय होती आणि आता काय आहे हा इतिहासाचाच भाग आहे. ते ऑब्जेक्टिव्हली घेऊन संशोधन करणारे संशोधन करू देत. इतरांनी त्यावरून न्यूनगंड आणि अहंगंड तयार करून पब्लिक मालमत्ता, साधने, आणि उर्जा वेठीस धरू नये. सत्य समोर आले पाहिजे समोर आले पाहिजे असे म्हणताना आपल्याला फक्त सत्याचीच चाड आहे का त्यावरून अजून नॅरेटिव्ह रचून आपण आपलीच पाठ थोपटवून स्वचुतिया बनत आहोत आणि इतरांना बनवत आहोत हे वेळीच ध्यानात यायला हवे. मनोरंजन म्हणून कॉन्स्पिरसी थेर्‍या एन्जॉय कराव्यात आणि स्वतःला फार सिरेसली घेऊ नये. चुकून एखादी कॉन्स्पिरसी थेरी खरी निघालीच तर तोंडाचा चंबू करून थेरी मांडणार्‍या महामानवास दाद द्यावी आणि शांत पडावे. शिवाय अशा थेर्‍यांमुळेच जग इंट्रेस्टिंग होत असते. समजा सगळेच लोक सुबोध खर्‍यांसारखे सर्वज्ञ स्थितप्रज्ञ झाले तर जग महाबोअरिंग होऊ शकते. असो. कधी कधी सुनील कचुरे शुड मेक मोअर सेन्स!! पु. ना.ओक तेजोमहालयाच्या बाबतीत खरे ठरले तर काही हरकत नाही. मला फक्त एकच भिती आहे की पृथ्विवर मानव उपराच ठरू नये याची!!

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गामा पैलवान 11/06/2022 - 11:29
हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर, पु.ना.ओकांना सिरीयसली घ्याच म्हणतो मी. शाहजहाननामा हे शाहजहानचं अधिकृत दरबारी वार्तापत्र म्हणजे हल्लीच्या भाषेत कोर्ट क्रॉनिकल वा ग्याझेट होतं. त्यात ताजमहाल बांधल्याची इवलीशीही नोंद नाही. हे तथ्य पु.ना.ओकांनी पहिल्यांदा उघडपणे मांडलं. केवळ या कामगिरीसाठी तरी का होईना, त्यांना सिरीयसली घ्यावं म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

शशिकांत ओक 11/06/2022 - 21:51
मला व्यक्तिशः तसे वाटत नाही. सध्याच्या घडीला जी वास्तू ज्या अवस्थेत आहे. त्या कबरीच्या रूपातच ती पर्यटकांना पहायला हवी. त्यातील कॅलिग्राफी, संगमरवरातील पच्चीकारी याचा आस्वाद घेता यावा. आहे ती वास्तू मोडा, फोडा ही मानसिकता अत्यंत प्रतिगामी आहे. प्रश्न उरतो तो या वास्तुचे बदलते रूप होते यावर प्रकाश टाकला जावा. एकेकाळी ती कशी होती नंतर तिचात कशी स्थित्यंतरे होत गेली. याचा विचार इतिहासकारांनी न करता सिव्हिल इंजिनियरिंग मार्व्हल म्हणून बांधकाम जगातील मान्यवर वास्तू तज्ज्ञांनी एकत्र येऊन करावे. इतिहासकारांच्या आणि अनुषंगाने धार्मिकतेच्या आवरणातून बाहेर ठेवण्यात शहाणपण आहे.
गा पै आपले विचार जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by शशिकांत ओक

गामा पैलवान 12/06/2022 - 12:33
शःसिकांत ओक, याबाबत प्राडॉ आणि माझे विचार प्रचंड विभिन्न आहेत. फक्त मी ते त्यांच्यासमोर उघडपणे मांडीत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by मदनबाण

शशिकांत ओक 12/06/2022 - 10:03
एक कहावत है कि जिस को सजा होनी है वह केस को जल्दी निपटने के लिए कोशिश कर रहा है. पर जिसके सबूतों के आधार पर आरोप सिद्ध हो सकता है वह आदमी गवाही याने प्रमाण देने के लिए बडा सुस्त, ढीला, या देना नहीं चाहता. ताजमहाल या अन्य प्रापर्टी जयपुर घरानों के पूर्वजों की रही थी. उन्होंने अपने को दफ्तर खानों में से दस्तावेजों खंगालना चाहिए. यह काम आजकल की महिला सांसद दिया कुमारी ने करने की बात तो की पर उसके बाद इतने दिन गुजरे कुछ हुआ नहीं. सही कहते हैं मुद्दई चुस्त गवाह सुस्त...!

sunil kachure 11/06/2022 - 22:58
ताज महाल सारख्या अतिशय महत्वाच्या वास्तू चे खरे खोटे करायचे असेल तर. उथळ विचारांच्या लोकांना electronic मीडिया किंवा प्रिंट मीडिया किंवा अगदी यूट्यूब सारख्या मीडिया वर विचार व्यक्त करण्यास निर्बंध असावेत चुकीची मत,कोणाशी तरी बांधिलकी असल्या मुळे व्यक्त केली जाण्याची शक्यता जास्त असते. इतिहास तज्ञ,किंवा आता जे पुरावे आहेत त्या वर योग्य प्रयोग करून काढलेले निष्कर्ष हेच प्रसारित केले जावेत.

विजुभाऊ 12/06/2022 - 00:24
ताज महाल पहाताना बरीच हिंदू प्रतिके दिसतात. या बद्दल गाईडला विचारले तर ते सांगतात की ताजमहाल बाम्धताना हिंदू कारागीर ही होते त्यांच्यामुळे ती प्रतिके आपल्या दिसतात. क्षणभर हे तर्कट पटते पण कोणतेही बांधकाम करताना ते प्लॅन नुसार केले जाते. ताजमहाल सारखे बांधकाम ज्यात भूमितीच्या अनेक बारकाव्यांचा विचार केलेला आहे. ते बांधकाम करताना एखादा हिंदू कारागीर आराखड्यात स्वतःच्या मनाने बदल करू शकणार नाही. उदा " धोतर्‍याची फुले, कमळाची फुले , कळसाचा आकार ( हा तर बांधकामाचा शीर्ष बिंदू) , मुसलमान शासकांनी तो मूळचा कोणतातरी हिम्दू राजाचा महाल घेऊन त्यावर काही कलाकुसर केली असेल. शिवाजी महाराज आग्र्यात होते त्यावेळेस त्यांच्या भेटीत ताजमहाल बद्दल काहीच वर्णन कुठेच येत नाही. ( आग्र्यातल्या हवेल्यांचे वर्णन आहे मात्र ताजमहालाचे नाही) आणखी एक म्हणजे. ताजमहालात मुमताज ची कबर आहे त्याखाली एक मजला आहे. खाली जायला जिना देखील आहे.(पण तेथे प्रवेश बंद केलेला आहे.) हे कसे शक्य आहे. सामान्यतः कबर ही जमिनीवर असते. हे कोणालाच कसे खटकत नाही.

शशिकांत ओक 12/06/2022 - 09:24
शिवाजी महाराज आग्र्यात होते त्यावेळेस त्यांच्या भेटीत ताजमहाल बद्दल काहीच वर्णन कुठेच येत नाही. ( आग्र्यातल्या हवेल्यांचे वर्णन आहे मात्र ताजमहालाचे नाही)
आपण म्हणता त्यात बरेच तत्थ आहे. हा घागा लालकिल्ल्यावरील घटनेच्या संदर्भातील पेंटींग वर आहे म्हणून इथे मत प्रदर्शन करणे थोडे अनुचित होईल. आग्ऱ्याहून सुटका या घाग्यावर यावर संदर्भात लिहिलेले आहे.
आणखी एक म्हणजे. ताजमहालात मुमताज ची कबर आहे त्याखाली एक मजला आहे. खाली जायला जिना देखील आहे.(पण तेथे प्रवेश बंद केलेला आहे.) हे कसे शक्य आहे. सामान्यतः कबर ही जमिनीवर असते. हे कोणालाच कसे खटकत नाही.
ती खालच्या मजल्यावरील कबर खरी व वरच्या मजल्यावरील (खोटी असे न म्हणता) दर्शनी असे म्हटले जाते. दोन कबरी (खरेतर बऱ्हाणपूरची धरून) तीन कबरी एकाच व्यक्तीला असू शकतात का? असतील तर तसे कुठे पहायला मिळतात? वगैरे प्रश्न निर्माण होतो...

In reply to by शशिकांत ओक

विजुभाऊ 12/06/2022 - 12:48
बर्‍हाणपूर मधे आत अकबर नाही. ती तेथून आग्र्याला हलवली. एखाद्याची कबर एका ठिकाणहून हलवून इतरत्र नेण्याचे हे एकमेव उदाहरण असेल.

sunil kachure 12/06/2022 - 09:51
मुघल साम्राज्य जावून अनेक राज्य आली.अगदी मराठे पण पानिपत पर्यंत गेले होते. दिल्लीवर काही काळ मराठी सत्तेचे वर्चस्व होते. नंतर इंग्रज आले .इंग्रज तसे चोकस वृत्तीचे . त्यांना पण ताज महाल चा अभ्यास करावासा वाटला नाही.. हे पण थोडे विपरीत च आहे. ताजं महाल ह्या इमारतीला प्रसिध्दी स्वतंत्र नंतर दिली गेली का? कारण त्या वास्तू ची दाखल अगोदर कोणी घेतली च नाही. खुप प्रश्न आहेत.

शशिकांत ओक 13/06/2022 - 15:41
इंग्रज आले .इंग्रज तसे चोकस वृत्तीचे . त्यांना पण ताज महाल चा अभ्यास करावासा वाटला नाही.. हे पण थोडे विपरीत च आहे. ताजं महाल ह्या इमारतीला प्रसिध्दी स्वतंत्र नंतर दिली गेली का? कारण त्या वास्तू ची दाखल अगोदर कोणी घेतली च नाही.
इंग्रज सरकारने देशभरातील वास्तूंवर जितके अभ्यासपूर्ण काम केले तितके आपल्या देशात अन्य राजसत्ता कडून झाले नसावे. मुगल बादशाह आपल्या सत्ता काळातील घटना व पत्र व्यवहार वगैरे व्यवस्थित ठेवत. आपल्या सत्ता काळात ते आधीच्या बादशाहांनी त्यांच्या पुढच्या पिढीला उद्देशून केलेले वाईट किंवा निंदानालस्ती चे उल्लेख बदलले जाणे स्वाभाविक आहे. तरीही ते 'नामे' खूप माहिती सांगतात. त्यात अतिशयोक्ती, राजाची स्तुती किंवा बढाया वगैरे असणे स्वाभाविक आहे. फारसी भाषाेतील मजकुरात विराम चिन्हे नसणे, क्लिष्टता, आणि फाफटपसारा जास्त असे गुण अनेक अभ्यासकांनी दाखवून दिले आहेत. असो. इंग्रजी भाषेत, तपशीलवार वर्णन, नकाशे, पुराव्यानिशी माहिती, मुद्देसूद मांडणीतून घटनांचा अर्थ अचुक समजून घ्यायला सोपे जाते. असो त्यांच्यात अनेक सेनाधिकारी भारतीय संस्कृती, भाषा वगैरेत पारंगतता मिळवत. आपले थिसीस सादर करत. त्यातूनच कनिंगहॅम सारख्या अधिकार्‍यांच्या परिश्रमातून आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया याची स्थापना झाली. याचे दरवर्षी रेकॉर्डचे स्क्रोल प्रसिद्ध होत. ताजमहाल यावर अभ्यास करून लेखन अस्तित्वात आहे. ताजमहाल मधे सायंकाळी फिरायला व चांदण्या रात्री डीनर डान्स पार्ट्या होत. नंतर ते बंद करण्यात आले. लॉर्ड कर्झन याला ताजमहालाच्या संदर्भात फार आकर्षण होते. त्याच्या पुढाकाराने इजिप्त मधून दोन वजनदार शँडलियर्स मागवले गेले पैकी एक कबरीवर लटकलेला आहे तर दुसरा प्रवेशद्वार इमारतीच्या वरील मजल्यावर लटकत आहे. एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल पुस्तक परिचयात यांचे उल्लेख दिले आहेत. बागेतील झाडे, मशागत, बदलून ती युरोपियन पद्धतीने, झाडे लावली गेली. यात तत्परतेने लक्ष घालून विविध नाम्यांचा इंग्रजी तर्जुमा करण्यात आला. फक्त शाहजहां च्या बादशाह नामा राहून गेला. म्हणून आता निर्माण झालेल्या राजकीय व धार्मिक परिस्थिती मुळे त्यातील फारसी भाषांतर करायला व योग्य अर्थ काढायला फारसे कोणी उत्सुक नाहीत. मला तसा दोन जणांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. राहिला प्रश्न तळघरातील काही खोल्यांना विटांच्या बांधकामाने बंद केले आहे ते इंग्रजी सत्ता असताना का उघडून पाहिले गेले नाही यावर नेमके उत्तर मिळत नाही. इंग्रज इतकी उचक पाचक करत पण ताजमहालाच्या लांबी रुंदी, डिझाईन, याचे नकाशे आर्किऑलॉजिकल रेकॉर्ड मधे नाहीत. कनिंगहॅम कदाचित स्वतः ते काम करणार असावा, जसे कुतुबमिनार चे त्यांनी केले, पण नंतर राहून गेले. असो... डॉ वासुदेव गोडबोले यांच्या मते त्यात इंग्रजांची कॉन्स्पिरसी होती. यावर त्यांचे पुस्तकातून माहिती थक्क करणारी आहे.

तर्कवादी 15/06/2022 - 17:01
आज युट्युबवर बर्मुडा ट्रँगल संबंधित चित्रफिती बघत असताना ध्रुव राठी नावाच्या एका युवकाची चित्रफीत विशेष आवडली. कुठलाही अभिनिवेष नसलेली , अभ्यासपुर्वक बनवलेली चित्रफीत होती. मग चांगला युट्युबर दिसत आहे असा विचार करता त्याच्या आणखी चित्रफिती बघू लागलो तेव्हा ताजमहालचे रहस्य उलगडणारी चित्रफीत समोर आली. ही चित्रफीतही अभ्यासपुर्वक बनवलेली आहे. पु ना अओक यांच्या संशोधनावरही त्यात भाष्य आहे. जिज्ञासूंनी ही चित्रफीत आवर्जुन पहावी.

In reply to by तर्कवादी

शशिकांत ओक 15/06/2022 - 18:48
पुना ओक यांच्या म्हणण्यानुसार ताजमहाल चे वास्तव नाही असे म्हणणारे अनेक विचारक होते, आहेत. महामहोपाध्याय वा वि मिराशी, ग ह खरे, वाकणकर वगैरे नावे मला आठवतात. ध्रुव यांनी पुरावा म्हणून जे पुरातत्व विभागाने नुकतेच प्रसिद्ध केलेले फोटो दाखवले आहेत यावर असाही विचार करता येईल. १ . नव्याने चकाचक टाईल्स लावून आधीच्या डागाळलेल्या भिंतींना लपवण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटते. जर २२ खोल्यांना साफसफाई करून नकाशा काढून त्यावर त्या २२ खोल्या खरोखरच कुठे आहेत ते दाखवून देणे आवश्यक होते. २.जर एका खोलीला असे जणू आपल्या घरात ओल येणाऱ्या भिंतांना टाईल्स लावून लिपापोती करून दृष्टि आड सृष्टि करून लपवले जाते. तसेच काहीसे इथे केलेले आहे का अशी शंका घ्यायला जागा आहे. ३. बाकीच्या २१ खोल्यांचे फोटो सादर केले आहेत असे पुरातत्व विभाग म्हणत असेल तर ते फोटो कुठे आहेत? ४. पुरातन वास्तूंवर असे टाईल्स चे गिलावे करायला परवानगी कोणी कधी, कोणाच्या अखत्यारीत दिली? टेंडर केंव्हा निघाले? इतर बांधकाम व्यावसायिकांना ते कसे माहित झाले नाही? खर्चाचा तपशील कोणी ते पास केले. ५. हे फोटो प्रसिद्ध करावे अशी ऑर्डर कुणी कधी काढली या बाबतचे सर्व फाईल मधील नोटिंग व पत्रव्यवहार अभ्यासांना पहायला मिळाला पाहिजे. ६. तळघरातील बंद खोल्या अभ्यासकांना व सामान्य जनतेला पहायला मिडिया आणि कोर्टचे अधिकारात उघडून पहा म्हणून गेली कित्येक वर्षे कोर्ट कचेऱ्यांचे दरवाजे ठोठावत लाखो लोक तिष्ठत आहेत. त्यांना सर्वा समक्ष पुराव्यानिशी सिद्ध करायचे सोडून गुपचूप अशी उठाठेव करणारे कोण आहेत?

In reply to by शशिकांत ओक

गामा पैलवान 16/06/2022 - 01:18
शशिकांत ओक, ASI चा काही भरवसा नाही. माझ्या माहितीप्रमाणे आजवर ताजमहालचं अधिकृत सर्वेक्षण ( official survey ) प्रकाशित झालेला नाहीये. लपवाछपवी जोरात चालू दिसते आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by तर्कवादी

गामा पैलवान 16/06/2022 - 01:42
तर्कवादी, पु.ना.ओक हे इतिहासकार नाहीत अशी मल्लीनाथी ध्रुव राठी करतात. ताजमहाल वगैरे मीमांसा ( थियरी ) त्यांनी स्वत:च्या डोक्यातनं उत्पन्न केली असं राठींचं म्हणणं आहे. राठींच्या या मतास छेद देणारा एक ढळढळीत प्रसंग उपलब्ध आहे. कर्णावती येथील जामा मशिदीच्या जवळ एका हिंदूने ( कांतीचंद्र ब्रदर्स ) आपल्या स्वत:च्या जागेवर एक टोलेजंग इमारत बांधायला घेतली. मशिदीचा इमाम ( का आजून कोणी ) पिसाळला. माशिदिपेक्षा उंच काहीही बांधकाम असता कामा नये म्हणून त्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावून उंच वास्तू बांधण्यावर निर्बंध आणले. शिवाय त्याला ही हिंदूंची वास्तू पाडून टाकायची होती. हिंदू मालकाची हालत खराब झाली. कोणीतरी त्यास ओकांचं नाव सुचवलं. त्याने व्यथित मानाने अतिशय करूण असं पत्र ओकांना पाठवलं. काही करता येईल का याची पृच्छा केली. ओक म्हणाले की सरळ जामा मशीदीवर दावा ठोका की ते भद्रकाली देवीचं मंदिर आहे म्हणून. जाउद्या कोर्टाची माणसं आत तपासणी करायला. इमामाने ताबडतोब आपला दावा मागे घेतला. ओक आणि ताजमहाल यांच्या बाबतीत ध्रुव राठी यांचं मत पार गंडलेलं आहे. पु.ना.ओक बकवास लिहितात की मुद्देसूद, हे वाचक ठरवतील. ध्रुव राठी नव्हे. आ.न., -गा.पै.

मदनबाण 16/06/2022 - 12:39
जाता जाता :- ध्रुव राठी चा व्हिडियो मी आधीच पाहिला होता, तो एक प्रसिद्ध व्ह्लॉगर / युट्युबर आहे. परंतु माझा व्यक्तिगत मता नुसार त्याला कोणाचे तरी मजबुत फंडिंग असुन माहिती देताना उत्तम दिशाभूल करणे हे त्याचे विशेष कौशल्य आहे. त्याच्या अनेक व्हिडियोज मधले प्रतिसादांचे निरिक्षण केल्यास साधारण एकाच आशयाचे / प्रकारचे प्रतिसाद त्याला दिले जातात हे उघड होते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Michael Jackson's Drummer Jonathan Moffett Performs "Smooth Criminal"

In reply to by शशिकांत ओक

मदनबाण 16/06/2022 - 23:34
धन्यवाद ओक काका. _/\_ पायर्‍या :- ताज महाल चे अनेक फोटो पाहताना, मला एक वेगळा फोटो दिसला तो मी खाली देत आहे :- P1 या फोटोत २ स्त्रियांच्या मध्ये पायर्‍या आहेत. त्या पायर्‍या कुठे जातात ? त्या कुठे जात नसतील तर मग त्या तिथे का आहेत ? इंजिनिअरिंग मार्व्हल असलेल्या इमारतीत अशी चूक तर असुच शकत नाही, मग त्या पायर्‍या तिथे का आहेत ? हे समजण्यास वाव नाही. अजुन एक फोटो :- P2 अशाच अजुन पायर्‍या आहेत ज्याच्यावर पाय देऊन लोक आत जातात, या नंतर तिथे लावल्या गेल्या असाव्यात. पायर्‍यांच्या मागचे नक्षिकाम हे स्पष्ट करते की ते संपूर्ण नक्षिकाम असुन त्याच्या पुढे नंतर पायर्‍या बसवल्या गेल्या आहेत. खुल जा सिम सिम ? P3 बादवे... याही पायर्‍या नंतरच्याच असाव्यात काय ? [ संपूर्ण नक्षिकामावरच त्या असुन, पायर्‍यांचे जोड चांगल्या प्रतीचे नाहीत आणि दोन्ही पायर्‍यांवर वेगवेगळे आहेत. ] जरासे अवांतर :- केरळ मधल्या पद्मनाभस्वामी मंदिरातील अशाच्या गुप्त तळघरातुन सुमारे २ लाख कोटी ची संपती बाहेर काढण्यात आली होती. [ साल बहुतेक २०११ ] आता मला पडलेले प्रश्न :- १] ती संपत्ती आता कुठे आहे ? मागच्या सरकारने ती कुठे ठेवली आहे ? २] जर मंदीरा खालची भुयारे उघडली जाऊ शकतात तर मग ताज महालची उघडुन ती का पाहिली जाऊ शकत नाहीत ? ३] पद्मनाभस्वामी मंदिरातील एक गुप्त दालन आजही उघडण्यात आलेले नाही, त्याला विरोध केला गेलेला आहे. या मागे नक्की काय कारण आहे ? [ त्याचा दारावर कालसर्पाचे चिन्ह इं असुन विशिष्ठ सर्प मंत्र म्हणुनच तो बंद करण्यात आलेला असुन तश्याच प्रकारे कोणा सिद्धा कडुन तो त्याच प्रकारे उघडला गेला पाहिजे इइइ. फार पूर्वी वाचनात आले होते,पण तेच खरं का ? हे मात्र ठावूक नाही. ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Michael Jackson's Drummer Jonathan Moffett Performs "Smooth Criminal"

In reply to by मदनबाण

शशिकांत ओक 24/06/2022 - 00:06
या फोटोत २ स्त्रियांच्या मध्ये पायर्‍या आहेत. त्या पायर्‍या कुठे जातात ? त्या कुठे जात नसतील तर मग त्या तिथे का आहेत ? इंजिनिअरिंग मार्व्हल असलेल्या इमारतीत अशी चूक तर असुच शकत नाही, मग त्या पायर्‍या तिथे का आहेत ? हे समजण्यास वाव नाही.
Taj Mahal is not a Shiv Temple या पुस्तकात हाच फोटो मी पण माझ्या उत्तरात दिला आहे. ताज कबरींच्या बाजूला असलेल्या मशीद इमारतीत गालिचा बिछान्या प्रमाणे नमाज पढायला डिझाईन केले आहे. तिथे खुदबा पढायला एक ३ पायऱ्यांचा उंचवटा बनवला जातो. तो कार्पेटवर स्टूल ठेवल्या प्रमाणे दिसतो कारण तो नंतर लावला गेला आहे. असे दिसते.
बादवे... याही पायर्‍या नंतरच्याच असाव्यात काय ? [ संपूर्ण नक्षिकामावरच त्या असुन, पायर्‍यांचे जोड चांगल्या प्रतीचे नाहीत आणि दोन्ही पायर्‍यांवर वेगवेगळे आहेत. ]
पायऱ्यांचे फिनिशिंग गलथान आहे हे आपले निरीक्षण बरोबर आहे.

In reply to by मदनबाण

तर्कवादी 25/06/2022 - 16:45
परंतु माझा व्यक्तिगत मता नुसार त्याला कोणाचे तरी मजबुत फंडिंग असुन माहिती देताना उत्तम दिशाभूल करणे हे त्याचे विशेष कौशल्य आहे

In reply to by तर्कवादी

गामा पैलवान 16/06/2022 - 19:59
तर्कवादी, 'तुमचं बोटंच वाकडं' अशा अर्थीचे अनेक आरोप ओकांवर झाले आहेत. ते आपापल्या परीने खरे असतीलही. पण वाकड्या बोटाने ओक जो चांदोबा दाखवताहेत तो कोणी पहायचा? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तर्कवादी 17/06/2022 - 19:08
पण वाकड्या बोटाने ओक जो चांदोबा दाखवताहेत तो कोणी पहायचा?
ठीक आहे .. पुरातत्च विभाग केंद्र सरकारच्याच अखत्यारीत येतो. त्या विभागानेही मंदिर असण्याची शक्यता फेटाळली होतीच पण तरीहि पुन्हा एकदा एखादी समिती स्थापन करुन सरकारने एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावायला हरकत नाही. बाकी मंदिर असेल नाहीतर कबर .. मी तरी अजून ताजमहाल बघितला नाही आणि जेव्हा बघेन तेव्हा तो फक्त एक प्रेक्षणीय स्थळ, एक जागतिक आश्चर्य म्हणूनच.
नमस्कार मित्रांनो, ज्ञानवापी, ताजमहाल, मथुरा श्री कृष्ण मंदिर, कुतुबमिनार वगैरे सध्या चर्चेत आहेत. संगीत ताजमहाल, व डॉ विद्याधर ओक यांनी नव्याने सादर केलेल्या पुराव्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने काही वर्षांपूर्वी कोरा. कॉम वर संपर्क एका चर्चेत जस्टिन नामक व्यक्तीने ताजमहाल शिवमंदिर नाही. पुना ओक किंवा वासुदेवराव गोडबोले यांचे मुद्दे सविस्तरपणे खोडून काढले होते. त्यावर एक ई-बुक सादर केले आहे. जस्टिन यांच्या मुद्यांतून निर्माण झालेल्या वैचारिकतेवर गोडबोले यांनी काही वर्षांपूर्वी उत्तर द्यायला टाळले. मला उत्तर द्यायला सांगता तर मग तुम्हीच का उत्तर देत नाही असे म्हटले होते.

विनिपेग डायरीज-२

राजेंद्र मेहेंदळे ·

सौंदाळा 25/05/2022 - 18:51
तब्बल ५ महिन्यांनी पुढचा भाग लिहिलात पण भारीच झालाय. अति शहाणपणा करुन दुसर्‍याचा अपमान करणारे लोक डोक्यात जातात. मी तुमच्या जागी असतो तरी हेच केले असते. रहायची सोय झाली शेवटी हे बरे झाले. क्रमशः आहे का? पुढचा भाग (लवकर) लिहाच. तुमचे लिखाण ओघवते आहे त्यामुळे वाचायला मजा येते.

Nitin Palkar 30/05/2022 - 18:36
दोन्ही भाग एकापाठोपाठ वाचून काढले. जे अनेक प्रतिसादकांनी लिहिलेय तेच म्हणतो, तुमची लेखनशैली खूपच छान आहे. पुभाप्र.

सौंदाळा 25/05/2022 - 18:51
तब्बल ५ महिन्यांनी पुढचा भाग लिहिलात पण भारीच झालाय. अति शहाणपणा करुन दुसर्‍याचा अपमान करणारे लोक डोक्यात जातात. मी तुमच्या जागी असतो तरी हेच केले असते. रहायची सोय झाली शेवटी हे बरे झाले. क्रमशः आहे का? पुढचा भाग (लवकर) लिहाच. तुमचे लिखाण ओघवते आहे त्यामुळे वाचायला मजा येते.

Nitin Palkar 30/05/2022 - 18:36
दोन्ही भाग एकापाठोपाठ वाचून काढले. जे अनेक प्रतिसादकांनी लिहिलेय तेच म्हणतो, तुमची लेखनशैली खूपच छान आहे. पुभाप्र.
मागचा भाग-- विनिपेग डायरीज मागच्या भागात शेवटी समाप्त असे लिहिले होते. पण विचार करता करता असे लक्षात आले की अजूनही सांगण्यासारखे बरेच काही आहे डोक्यात. शिवाय काही वाचकांनी पुढचा भाग टाकायची सूचना केली होतीच. तेव्हा सर्वांचा मान ठेवून हा भाग टंकायला घेतला. तर मीटिंगमध्ये विनिपेगचा मुक्काम हलवण्याचे ठरले आणि माझ्या डोक्यात भराभर चक्रे हलू लागली. आता ऑफिस आणि घर अशा दोन आघाड्यांवर लढाई चालू झाली. जरी विनिपेग ऑफिसात नसलो तरी मला पुढचे काही दिवस रिमोटली इथे सपोर्ट द्यायचा होताच.

मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना श्रध्दांजली - पुण्यतिथी ३

Trump ·

चौथा कोनाडा 16/05/2022 - 12:01
मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना भावपुर्ण श्रध्दांजली. तात्यांना भेटता आलं नाही याचं कायमच शल्य राहील. हॉटेल मिपा नेहमीच हाऊसफुल्ल राहो!

नगरी 16/05/2022 - 15:08
कोणालातरी आठवण आहे हे पाहून बरे वाटले. भावपूर्ण श्रद्धांजली,खरेच ग्रेटच माणूस होता

सौन्दर्य 17/05/2022 - 22:58
२००८ साली अमेरिकेत आलो आणि माय मराठीचा संपर्क तुटला. घरात जे काही मराठीत बोलायचो तेव्हढेच. मराठीत बोलायची, संवाद साधायची प्रचंड निकड भासत होती आणि माझ्या एका मित्राने (महेश अभ्यंकर) मिपा सुचवले. आधी बिचकत बिचकत नंतर बिनधास्तपणे लिहू लागलो. वाचकांच्या प्रतिक्रियेप्रमाणे लेखनात सुधारणा करू लागलो व आजमितीला ५०-६० लेख कविता लिहून झाल्यात. मिपावरचा वेगवेगळ्या विषयांवरचा लेखकांचा गाढा व्यासंग पाहता इतर कोणत्याही साईटवर जावेसे वाटत नाही. येथे कौतुकाची थाप लाभते तर कधीकधी पाठीत दणका देखील बसतो. कोणताही विषय मिपाला वर्ज्य नाही आणि प्रत्येक विषयावरचे पंडित मिपावर आहेत. कोणतीही नवी वस्तू, तंत्रज्ञान विकत घ्यायचे असो, वापरायचे असो, अचूक असे सल्ले नेहेमी मिळतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे तात्यांनी आपल्यावर मिपा सुरु करून अगणित उपकारच केले आहेत. मी मिपाकर असल्याचा मला अभिमान वाटतो.

मिपासंस्थापक अन मराठी आंतरजालावरचे प्रसिद्ध लेखक स्व. तात्यां अभ्यंकर यांच्या स्मृतीस अभिवादन. तात्या आपल्यात नसले तरी त्यांच्या लेखनाच्या व त्यांनी लावलेल्या मिपाच्या रोपट्याच्या स्वरुपात ते कायमच आपल्यासोबत असतील. सर्व मिपाकरांच्या सहकार्‍याने मिपाची पताका उंचावत ठेवणे ही तात्यांच्या कार्याला उत्तम श्रद्धांजली ठरेल.

तात्यांना सश्रध्द श्रध्दांजली. खादाडी सदर आणि सोबत एका नव्या ललनेचा फोटो व त्यावर "ही आमची अमुक तमुक. हिच्यावर आमचा फार जीव" ही तात्यांची ट्रेडमार्क कॉमेंट नेहेमीच स्मरणात राहिल.

त्यांना कधी भेटायचा योग आला नाही पण माणूस मोठा रसिक आणि दिलदार होता हे त्यांच्या लिखाणातून आणि त्यांच्या बद्दल इतरांनी जे लिहिले आहे त्यातून समजते. पैजारबुवा,

चौथा कोनाडा 16/05/2022 - 12:01
मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना भावपुर्ण श्रध्दांजली. तात्यांना भेटता आलं नाही याचं कायमच शल्य राहील. हॉटेल मिपा नेहमीच हाऊसफुल्ल राहो!

नगरी 16/05/2022 - 15:08
कोणालातरी आठवण आहे हे पाहून बरे वाटले. भावपूर्ण श्रद्धांजली,खरेच ग्रेटच माणूस होता

सौन्दर्य 17/05/2022 - 22:58
२००८ साली अमेरिकेत आलो आणि माय मराठीचा संपर्क तुटला. घरात जे काही मराठीत बोलायचो तेव्हढेच. मराठीत बोलायची, संवाद साधायची प्रचंड निकड भासत होती आणि माझ्या एका मित्राने (महेश अभ्यंकर) मिपा सुचवले. आधी बिचकत बिचकत नंतर बिनधास्तपणे लिहू लागलो. वाचकांच्या प्रतिक्रियेप्रमाणे लेखनात सुधारणा करू लागलो व आजमितीला ५०-६० लेख कविता लिहून झाल्यात. मिपावरचा वेगवेगळ्या विषयांवरचा लेखकांचा गाढा व्यासंग पाहता इतर कोणत्याही साईटवर जावेसे वाटत नाही. येथे कौतुकाची थाप लाभते तर कधीकधी पाठीत दणका देखील बसतो. कोणताही विषय मिपाला वर्ज्य नाही आणि प्रत्येक विषयावरचे पंडित मिपावर आहेत. कोणतीही नवी वस्तू, तंत्रज्ञान विकत घ्यायचे असो, वापरायचे असो, अचूक असे सल्ले नेहेमी मिळतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे तात्यांनी आपल्यावर मिपा सुरु करून अगणित उपकारच केले आहेत. मी मिपाकर असल्याचा मला अभिमान वाटतो.

मिपासंस्थापक अन मराठी आंतरजालावरचे प्रसिद्ध लेखक स्व. तात्यां अभ्यंकर यांच्या स्मृतीस अभिवादन. तात्या आपल्यात नसले तरी त्यांच्या लेखनाच्या व त्यांनी लावलेल्या मिपाच्या रोपट्याच्या स्वरुपात ते कायमच आपल्यासोबत असतील. सर्व मिपाकरांच्या सहकार्‍याने मिपाची पताका उंचावत ठेवणे ही तात्यांच्या कार्याला उत्तम श्रद्धांजली ठरेल.

तात्यांना सश्रध्द श्रध्दांजली. खादाडी सदर आणि सोबत एका नव्या ललनेचा फोटो व त्यावर "ही आमची अमुक तमुक. हिच्यावर आमचा फार जीव" ही तात्यांची ट्रेडमार्क कॉमेंट नेहेमीच स्मरणात राहिल.

त्यांना कधी भेटायचा योग आला नाही पण माणूस मोठा रसिक आणि दिलदार होता हे त्यांच्या लिखाणातून आणि त्यांच्या बद्दल इतरांनी जे लिहिले आहे त्यातून समजते. पैजारबुवा,
तात्या १५ मे २०१९ रोजी वारले. साधारणतः २००७ मध्ये मिपाची स्थापना केली. आपल्या सारख्या अनोळखी लोकांना मन मोकळे करण्याचा आणि उत्तमोत्तम लेखनाचा आस्वाद घेण्याचा मार्गे उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांच्या विषयी इतरांनी भरभरुन लिहिले आहे. मला त्यांना शेवटी भेटता आले नाही आणि कोणतीही मदत करता आली नाही यांची खंत वाटते. मटामधील श्रध्दांजली https://maharashtratimes.com/maharashtra/thane/chandrashekhar-abhyankar-passed-away/articleshow/69346718.cms --------------------------- त्यांचे काही निवडक साहित्य येथे देत आहे, नवीन लोकांना ओळख होण्यास मदत होईल.

ती २५ तारीख

शानबा५१२ ·

व्यक्ती हयात नसली तरी तिचे विचार मात्र निरंतर असतात. जुन्या सामनाच्या अंकांमधुन किंवा अगदी जुन्या मार्मिकच्या अंकांमधून हे विचार वाचू शकाल.

खरं आहे. बाळासाहेबांनी ऊभी केलेली शिवसेना आणी तिचे विचार हिंदूंना एक ताकद देऊन गेली. बाबरी आम्ही पाडली म्हणून दावा करनारे आणी कोर्टात आमचा बाबरीशी काहीही संबंधं नाही सांगनारे भाजपचे नेते पाहीले की हिंदूंना जाणवतं बाळासाहेब काय होते ते.

ह्याचे एक उदाहरण म्हणजे, बाळासाहेब ठाकरे.... संजय दत्तला माफी देणे, Enron च्या बाबतीतली बदलेली भुमिका आणि सर्वात कळस म्हणजे, घराणेशाही राबवली. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात....

In reply to by मुक्त विहारि

त्यांना मुख्यमंत्री ठाकरे घराण्यात नसलेल्या लोकांना केले, आणी म्हणे घराणेशाही. आजकाल लोक केंद्रात मंत्रीपदं पटकावून स्वतच्या मुलांना बीसीसीआय मध्ये घुसवतात.

In reply to by मुक्त विहारि

त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे घराण्यात नसलेल्या लोकांना केले, आणी म्हणे घराणेशाही. आजकाल लोक केंद्रात मंत्रीपदं पटकावून स्वतच्या मुलांना बीसीसीआय मध्ये घुसवतात.

In reply to by मुक्त विहारि

वडील आमदाक, काकू मंत्री, स्वत: मामू, पुतण्याला वृध्दांसाठी राखीव कोट्यातून डबलडोस. ही घराणेशाही असते मुवीकाका.

sunil kachure 04/05/2022 - 19:56
समोर बसलेल्या लाखो लोकांना आपल्या वक्तृत्व शैली ने मंत्रमुग्ध करणारे नेते होते.त्यांच्या एका आवाहन वर हजारो लोक सर्वस्व त्याग करायला तयार होती. महाराष्ट्रात असे अनेक हिरे आहेत.त्या मध्ये बाळासाहेब म्हणजे कोहिनूर. प्रमोद महाजन ह्यांची पण तीव्र बुद्धिमत्ता त्यांची भाषणे ,मुलाखती बघताना दिसते. महाजन,मुंडे गेले आणि bjp Maharashtra मध्ये तरी नेतृत्व हिन झाली.

In reply to by sunil kachure

+१ महाजन,मुंडे ह्यांना मातोश्रीवर मान होता. आजकालच्या भाजपनेत्याना मातोश्राच्या गेट समोरही ऊभे केले जात नाही. भाजपचे किती पतन झालेय हे यावरून लक्षात येते.

व्यक्ती हयात नसली तरी तिचे विचार मात्र निरंतर असतात. जुन्या सामनाच्या अंकांमधुन किंवा अगदी जुन्या मार्मिकच्या अंकांमधून हे विचार वाचू शकाल.

खरं आहे. बाळासाहेबांनी ऊभी केलेली शिवसेना आणी तिचे विचार हिंदूंना एक ताकद देऊन गेली. बाबरी आम्ही पाडली म्हणून दावा करनारे आणी कोर्टात आमचा बाबरीशी काहीही संबंधं नाही सांगनारे भाजपचे नेते पाहीले की हिंदूंना जाणवतं बाळासाहेब काय होते ते.

ह्याचे एक उदाहरण म्हणजे, बाळासाहेब ठाकरे.... संजय दत्तला माफी देणे, Enron च्या बाबतीतली बदलेली भुमिका आणि सर्वात कळस म्हणजे, घराणेशाही राबवली. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात....

In reply to by मुक्त विहारि

त्यांना मुख्यमंत्री ठाकरे घराण्यात नसलेल्या लोकांना केले, आणी म्हणे घराणेशाही. आजकाल लोक केंद्रात मंत्रीपदं पटकावून स्वतच्या मुलांना बीसीसीआय मध्ये घुसवतात.

In reply to by मुक्त विहारि

त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे घराण्यात नसलेल्या लोकांना केले, आणी म्हणे घराणेशाही. आजकाल लोक केंद्रात मंत्रीपदं पटकावून स्वतच्या मुलांना बीसीसीआय मध्ये घुसवतात.

In reply to by मुक्त विहारि

वडील आमदाक, काकू मंत्री, स्वत: मामू, पुतण्याला वृध्दांसाठी राखीव कोट्यातून डबलडोस. ही घराणेशाही असते मुवीकाका.

sunil kachure 04/05/2022 - 19:56
समोर बसलेल्या लाखो लोकांना आपल्या वक्तृत्व शैली ने मंत्रमुग्ध करणारे नेते होते.त्यांच्या एका आवाहन वर हजारो लोक सर्वस्व त्याग करायला तयार होती. महाराष्ट्रात असे अनेक हिरे आहेत.त्या मध्ये बाळासाहेब म्हणजे कोहिनूर. प्रमोद महाजन ह्यांची पण तीव्र बुद्धिमत्ता त्यांची भाषणे ,मुलाखती बघताना दिसते. महाजन,मुंडे गेले आणि bjp Maharashtra मध्ये तरी नेतृत्व हिन झाली.

In reply to by sunil kachure

+१ महाजन,मुंडे ह्यांना मातोश्रीवर मान होता. आजकालच्या भाजपनेत्याना मातोश्राच्या गेट समोरही ऊभे केले जात नाही. भाजपचे किती पतन झालेय हे यावरून लक्षात येते.
आज २१ तारीख, एप्रील २०२२....अगदी अपक्षाच्याही बरोबर नसताना मला २५ तारीख आठवली. त्या व्यक्तीची आठवण आली त्या २५ तारखेवरुन. २५ जानेवरी आहे ती तारीख हे नंतर लक्षात आल. बाळासाहेब ठाकरे, ह्या व्यक्तीत ती जादु, तो प्रभाव होता की, मला कुठल्यही राजकीय पक्षाशी अगदी अपक्ष म्हणुन निवडणनुकीत रस घेणा-या व्यक्तीशीही दुरचे नाते नसताना ह्या एकाच व्यक्तीबद्दल एवढा जिव्हाळा वाटावा, ह्याचे आश्चर्य वाटले. टीव्हीवरती लहान असताना बघितलेले बाळासाहेब ठाकरे आणि नंतर युट्युबच्या सौजन्याने बघितलेले गॉगल व सफेद दाढीत अजुन रुबाबदार, भक्कम दीसणारे बाळासाहेब ठाकरे अजुनही तितकेच माझ्या मनाला भावतात.

तो शहाणा होतोय....

आजी ·

चौथा कोनाडा 28/03/2022 - 12:41
दुसरी बाजू मांडणारा संतुलित सुरेख लेख !

💕

संसाराच्या रामरगाड्यात स्त्रीला स्वतःकडे, स्वतःच्या आवडीनिवडी, छंदाकडे लक्ष द्यायला फुरसत मिळत नाही हे खरे,पण पुरुषांना तरी असा वेळ कुठे मिळतो? नोकरीच्या चक्रात अडकलेला पुरुष त्याची इच्छा असली तरीही आपला विशिष्ट खेळ खेळण्याचा, विशिष्ट वाद्य वाजवण्याचा जोपासू शकतो का? त्याच्याही व्यक्तिमत्त्वाचा विकास रोखला जातोच. त्यालाही करियरकडे लक्ष देता येत नाहीच. दिवसभर काम करून तोही थकून जातो. अगदी शारिरीक श्रम नसलेल्या नोकरीतही लॅपटॉपवर दिवसभर खिळवलेले त्याचेही डोळे दमतातच. त्यानंतर पती येण्याच्या वेळेला सुहास्य वदनाने त्यांचे स्वागत करु न शकणाऱ्या गृहिणी प्रमाणे त्याचीही अवस्था होते. तो पत्नीपुढे हसऱ्या चेहऱ्याने आणि सर्व नीटनेटके आवरलेल्या अवस्थेत नाही जाऊ शकत! तिला जशी रविवारची सुट्टी एन्जॉय करता येत नाही,कारण घरातली कामं असतात. तशी त्यालाही रविवारी घरातली कामं असतात. इलेक्ट्रिशियनला बोलवा,प्लंबरला बोलवा त्यांच्याकडून कामं करून घ्या. त्यांच्यावर लक्ष ठेवा. त्यांना हवं असलेलं सामान मार्केटमध्ये चौकशी करून आणून द्या. पत्नीला, मुलांना संध्याकाळी फिरायला न्या. बाहेरच जेवा. या सगळ्यात रविवारी पूर्ण आराम जशी गृहिणी करु शकत नाही तसाच तोही करु शकत नाही. पत्नीला पसंत नसेल, तिला तिथं कंटाळा येत असेल तर अनेक जणींचे पती आताशा मित्रांकडेही नाही जात असं दिसतं..!
हे विशेष भावलं ! दोन्ही व्यक्ति समजून घेण्यार्‍या असतील, एकमेकाना योग्य ती मदत करत असतील तर तिथे समाधानासह आनंद नांदत असतो !

आजी लेखन आवडलं दोन्हीही बाजू उत्तम आल्या आहेत. एकमेकांना समजून घेण्याचा काळ आहे, तरच एकमेकांच्या हौशी-मौजी करता येतात. एकमेकांचा आदर वाढतो. प्रेम वाढतं. सोबत एकमेकांच्या कामांमुळे वेळ जरी काढता येत नसेल तर काही मिनिटे, बोलणे, येनकेन मार्गे संवाद राहीलाच पाहिजे. आवडीच्या गोष्टी करत राहील्या पाहिजे. बाकी, आजी लिहिते राहा. मराठी जालविश्वातल्या 'तु तु मै मै' च्या काळात आपलं 'संवादी' लेखन अनेकांना भावतं. तेव्हा लिहिते राहावे. -दिलीप बिरुटे

यश राज 28/03/2022 - 18:39
आजच्या काळात दुसरी बाजू सुद्धा समजून घेण्याची आवश्यकता आहे. ती तुम्ही या लेखात मांडली ते खूप भावले. धन्यवाद.

सुबोध खरे 28/03/2022 - 18:54
मागच्या एका पिढीने स्त्रियांना सबळ करण्यात हातभार लावला पण या सबळ झालेल्या स्त्रियांशी कसे वागायचे हे पुरुषांना शिकवलेच गेले नाही. यामुळे आपल्याला संभ्रमित झालेले पुरुष घराघरात पाहायला मिळतात.

In reply to by सुबोध खरे

गवि 28/03/2022 - 19:18
परफ़ेक्ट. क्या बात है. लेख छानच या निमित्ताने पुरुषाच्या केल्या जाणार्या स्टिरीयोटायपिंगचे ढळढ़ळीत उदाहरण म्हणजे कितीही म्युच्युअल समजुतीने पुरुष घरी बसला/ नोकरी न करता घरकाम केले तरी आसपास सर्वच जण त्याच्याबाबत सतत हेच बोलत राहतात. "नवरा काहीच करत नाही ना तिचा. घरी बसून खातो. बिचारी.." किंवा त्याला भेटायला जायचे ते त्याचे मन वळवून त्याला नोकरीसाठी उद्युक्त करणारा उपदेश करायलाच.. "तूच सांगून बघ बाबा आता.." वगैरे. :-))

In reply to by सुबोध खरे

बापूसाहेब 28/03/2022 - 22:31
खरे सर... या सबळ झालेल्या स्त्रियांशी कसे वागायचे हे पुरुषांना शिकवलेच गेले नाही. आणि सबळ झाल्यावर स्त्रियांनी पुरुषांशी कसे वागावे याचादेखील बराच अभाव आहे. बाकी लेख आवडला. बाकी लेख आवडला

छान लेख!
आमच्या काळी आपली मुलं कितवीत आहेत हे वडिलांना माहीत नसायचं
>>याच्यावरून एक किस्सा आठवला. मी जपानला शिकायला आलो होतो तेव्हा एका कुटुंबात होम स्टेला जायचा योग आला. त्यांच्या मुलाचा विषय निघाल्यावर मी त्यांना विचारलं की तुमचा मुलगा केवढा आहे? तर त्यांनी बायकोला फोन करून विचारलं की आपला मुलगा आत्ता किती वर्षांचा आहे 😀

आंबट गोड 31/03/2022 - 11:22
परफेक्ट लेख! सगळ्यांना वाचयला द्यायला हवा... स्त्रियांनाही, पुरुषांनाही!

उपयोजक 31/03/2022 - 23:07
आजकाल IT इंडस्ट्रीत काम करणाऱ्या स्त्रीपुरुषांना रात्री अपरात्री सुद्धा काम करावे लागते. पती-पत्नी निवांतपणे एकमेकांना भेटूही शकत नाहीत. ही कसली प्रगती? बाकी लेख आवडला. वास्तववादी

In reply to by उपयोजक

चौथा कोनाडा 01/04/2022 - 13:10
ही कसली प्रगती?
आर्थिक प्रगती, भौतिक प्रगती, वस्तूरुप प्रगती. कालानुरूप अपरिहार्यता ! मग ... वर्क-लाईफ बॅलन्स, क्वालिटी टाईम अशा शब्दांची आठवण काढायची नसते !

घरी बसुन ऑफिस व (जमेल तसे) घरकाम करणारा पुरुष आणि बाहेर नोकरी करुन कमावणारी स्त्री अशी उदाहरणे करोना काळात बरीच बघायला मिळतात. "जरा आहेस घरी तर हे पण कर की" वगैरे संवाद नेहमीचेच. दोन वर्षे सतत घरातुन काम केल्याने मला तर थेट रिटायर्मेंट घेतल्यासारखे वाटत आहे. सकाळी जॉगिंग वगैरे करुन आलो की उघडला लॅपटॉप. मग मधे अधे पोस्टमन, ईस्त्रीवाला, कामवाल्या बायका, बेल मारणारे शेजारी किवा सेल्समन, वॉशिंग मशीनचे खटले, पाणी भरणे,चहा करणे एक ना दोन. आडुन आडुन चौकशाही सुरु झाल्यात "त्या अमक्याचे ऑफिस कधीच चालु झाले म्हणे, तुमचे काय? निदान आठवड्यातुन एक दोन वेळा तरी?" असो. प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असे म्हणुन चाललेय.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सौंदाळा 01/04/2022 - 15:30
घरी बसुन ऑफिस व (जमेल तसे) घरकाम करणारा पुरुष आणि बाहेर नोकरी करुन कमावणारी स्त्री अशी उदाहरणे करोना काळात बरीच बघायला मिळतात. "जरा आहेस घरी तर हे पण कर की" वगैरे संवाद नेहमीचेच.
चोक्कस, मला समोर ठेवूनच प्रतिसाद लिहिल्यासारखा वाटतोय. आम्ही पण यातलेच. बायको नोकरी निमित्त बाहेर, अस्मादिक घरी. मुलीची शाळेची तयारी, दूध आणणे, कचरा टाकणे, मुलीला स्कूलबस साठी सोडायला / आणयला जाणे. आल्यावर जेवण वाढून देणे, कधी कधी भरवणे वगैरे अनेक कामे नव्याने केली.

महाराष्ट्रात फक्त मुंबई दूरदर्शन होते तेव्हाची गोष्ट. कार्यक्रमाचे नाव लक्षात नाही.पण त्यात बायको कमावणारी आणि नवरा घराकडे पाहणारा अशा जोडप्याची मुलाखत असे. घासकडबी असे नाव असणारे जोडप्यासाठी जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही हि पद्धत का स्वीकारलीत ? तेव्हा त्यांचे उत्तर खालीलप्रमाणे होते. नवराबायको दोघेही नौकरी करत होते.नवर्याची बदली मुंबई बाहेर झाली.बायको रिझर्व ब्यांकेत नोकरीला होती आणि तिला राहण्यासाठी ब्यांकेचे क्वार्टर होते. मुंबईतच रहाण्याचे नक्की होते त्यामुळे क्वार्टर सोडून राहणे परवडणारे नव्हते.त्यामुळे नवऱ्याने घर सांभाळणे सुरु केले आणि बायको नोकरी करत राहिली. दूरदर्शनला मी पत्र लिहून कळवले की श्रीयुत घासकडबी यांनी माझ्याकडे माहेरवासास जरूर यावे. पण ते आजपर्यंत आले नाहीत. दूरदर्शनने ते पत्र दिले नसावे किंवा घासकडबिनी संकोचाने येणे मनावर घेतले नसेल . पण आजही या निमंत्रणास त्यांनी मान द्यावा हि माझी इच्छाआहे. माहेरपणास validity नसते ना !!

वामन देशमुख 01/04/2022 - 19:00
नेहमीप्रमाणेच खुप छान, भावस्पर्शी लिहिलंय. सुदैवाने आजूबाजूला असे अनेक स्त्री-पुरुष दिसतात; दुर्दैवाने याविरुध्दही दिसतात. आज्जी, तू हा लेख लिहून, एक पुरुष म्हणून जणू काही माझ्याच भावभावना, परिस्थिती, विचार acknowledge केलेत असं वाटलं! --- अवांतर: मिपावरचे काही धागालेखक, त्यांचे धागे वाचून झाल्यावर, "मला तर अगदी हेच म्हणायचं होतं", किंवा "मला तर अगदी हे म्हणायचंच होतं" अशी फीलिंग देतात त्यांपैकी तू एक आहेस आज्जी! --- सवांतर: "तो शहाणा होतोय...." हे शीर्षक वाचून, एखाद्या किशोरवयीन मुलाबद्धल काहीतरी असेल असं वाटलं होतं! 😉

Nitin Palkar 03/04/2022 - 12:47
लेख छानच आहे. अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. अवांतर: तुमचं मिपा नाम 'आजी' हे आहे. अनेक प्रतिसादकांनी 'आज्जी' असं लिहिलं आहे. हल्ली अनेक मालिकांमध्येही 'आजीचा' उच्चार, उल्लेख 'आज्जी' असा केला जातो, जो चुकीचा आहे. मराठी शब्द आजी असाच आहे 'आज्जी' असा नाही.

आजी 12/04/2022 - 19:01
Bhakti-धन्यवाद. चौथा कोनाडा-"संतुलित लेख"हा तुमचा अभिप्राय समाधान देऊन गेला. प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे-माझं लेखन"संवादी"आहे हा तुमचा अभिप्राय वाचून बरे वाटले. किसन शिंदे, सस्नेह, अनिंद्य -तुम्हीही बिरुटेंशी सहमत! धन्यवाद. यशराज-"या प्रश्नाची दुसरी बाजूही मांडलीत."हा अभिप्राय वाचून समाधान वाटले. सुबोध खरे-अशा सबळ झालेल्या स्त्रीशी कसं वागावं हे पुरुषांना शिकवलंच गेलं नाही. त्यामुळे पुरुष संभ्रमित झालाय."हा तुमचा अभिप्राय ए वन! गवि-"पुरुष घरी बसला तर त्याला नावं ठेवली जातात आणि त्याच्या बायकोची कीव केली जाते."हे तुम्ही म्हणता तसे होते खरे. मीही अनुभवलं आहे. बापूसाहेब सरिता बांदेकर, धन्यवाद. थँक्यू नचिकेत जवखेडकर-तुमचा जपानमधील अनुभव पुरेसा बोलका आहे. कर्नलतपस्वी-"समाज बदलतो पण स्वभाव नाही."हे तुमचे मत योग्य आहे. सविता ००१-धन्यवाद. आंबटगोड- हा लेख सर्वांना वाचायला द्यायला हवा. स्त्रियांना ही आणि पुरुषांना ही."अभिप्राय वाचून समाधान वाटलं. उपयोजक-"ही कसली प्रगती?"हा तुमचा प्रश्न योग्य. पण हीच वस्तुस्थिती आहे. चौथा कोनाडा-उपयोजकना तुम्ही उत्तर दिलंय. राजेंद्र मेहेंदळे-तुमचा"स्वानुभव"पटला. सौंदाळा-तुमचाही"स्वानुभव"पटण्यासारखाच आहे. देशपांडे विनायक-तुम्ही दिलेले दूरदर्शन च्या मुलाखती मधले उदाहरण विरळाच! वामन देशमुख-"मलाही अगदी असेच म्हणायचे होते"असे फीलिंग तुझे लेख देतात आजी!"अभिप्राय समाधान देऊन गेला. Nitin Palkar-हो"आजी"हेच बरोबर."आज्जी"नव्हे. सर्वांचेच भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार.

संसारातील दुसरी बाजू आवडली आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, संसार म्हणजे फक्त तडजोड ... ऑफिस मध्ये पण तडजोड आणि घरी पण तडजोड,...

चौथा कोनाडा 28/03/2022 - 12:41
दुसरी बाजू मांडणारा संतुलित सुरेख लेख !

💕

संसाराच्या रामरगाड्यात स्त्रीला स्वतःकडे, स्वतःच्या आवडीनिवडी, छंदाकडे लक्ष द्यायला फुरसत मिळत नाही हे खरे,पण पुरुषांना तरी असा वेळ कुठे मिळतो? नोकरीच्या चक्रात अडकलेला पुरुष त्याची इच्छा असली तरीही आपला विशिष्ट खेळ खेळण्याचा, विशिष्ट वाद्य वाजवण्याचा जोपासू शकतो का? त्याच्याही व्यक्तिमत्त्वाचा विकास रोखला जातोच. त्यालाही करियरकडे लक्ष देता येत नाहीच. दिवसभर काम करून तोही थकून जातो. अगदी शारिरीक श्रम नसलेल्या नोकरीतही लॅपटॉपवर दिवसभर खिळवलेले त्याचेही डोळे दमतातच. त्यानंतर पती येण्याच्या वेळेला सुहास्य वदनाने त्यांचे स्वागत करु न शकणाऱ्या गृहिणी प्रमाणे त्याचीही अवस्था होते. तो पत्नीपुढे हसऱ्या चेहऱ्याने आणि सर्व नीटनेटके आवरलेल्या अवस्थेत नाही जाऊ शकत! तिला जशी रविवारची सुट्टी एन्जॉय करता येत नाही,कारण घरातली कामं असतात. तशी त्यालाही रविवारी घरातली कामं असतात. इलेक्ट्रिशियनला बोलवा,प्लंबरला बोलवा त्यांच्याकडून कामं करून घ्या. त्यांच्यावर लक्ष ठेवा. त्यांना हवं असलेलं सामान मार्केटमध्ये चौकशी करून आणून द्या. पत्नीला, मुलांना संध्याकाळी फिरायला न्या. बाहेरच जेवा. या सगळ्यात रविवारी पूर्ण आराम जशी गृहिणी करु शकत नाही तसाच तोही करु शकत नाही. पत्नीला पसंत नसेल, तिला तिथं कंटाळा येत असेल तर अनेक जणींचे पती आताशा मित्रांकडेही नाही जात असं दिसतं..!
हे विशेष भावलं ! दोन्ही व्यक्ति समजून घेण्यार्‍या असतील, एकमेकाना योग्य ती मदत करत असतील तर तिथे समाधानासह आनंद नांदत असतो !

आजी लेखन आवडलं दोन्हीही बाजू उत्तम आल्या आहेत. एकमेकांना समजून घेण्याचा काळ आहे, तरच एकमेकांच्या हौशी-मौजी करता येतात. एकमेकांचा आदर वाढतो. प्रेम वाढतं. सोबत एकमेकांच्या कामांमुळे वेळ जरी काढता येत नसेल तर काही मिनिटे, बोलणे, येनकेन मार्गे संवाद राहीलाच पाहिजे. आवडीच्या गोष्टी करत राहील्या पाहिजे. बाकी, आजी लिहिते राहा. मराठी जालविश्वातल्या 'तु तु मै मै' च्या काळात आपलं 'संवादी' लेखन अनेकांना भावतं. तेव्हा लिहिते राहावे. -दिलीप बिरुटे

यश राज 28/03/2022 - 18:39
आजच्या काळात दुसरी बाजू सुद्धा समजून घेण्याची आवश्यकता आहे. ती तुम्ही या लेखात मांडली ते खूप भावले. धन्यवाद.

सुबोध खरे 28/03/2022 - 18:54
मागच्या एका पिढीने स्त्रियांना सबळ करण्यात हातभार लावला पण या सबळ झालेल्या स्त्रियांशी कसे वागायचे हे पुरुषांना शिकवलेच गेले नाही. यामुळे आपल्याला संभ्रमित झालेले पुरुष घराघरात पाहायला मिळतात.

In reply to by सुबोध खरे

गवि 28/03/2022 - 19:18
परफ़ेक्ट. क्या बात है. लेख छानच या निमित्ताने पुरुषाच्या केल्या जाणार्या स्टिरीयोटायपिंगचे ढळढ़ळीत उदाहरण म्हणजे कितीही म्युच्युअल समजुतीने पुरुष घरी बसला/ नोकरी न करता घरकाम केले तरी आसपास सर्वच जण त्याच्याबाबत सतत हेच बोलत राहतात. "नवरा काहीच करत नाही ना तिचा. घरी बसून खातो. बिचारी.." किंवा त्याला भेटायला जायचे ते त्याचे मन वळवून त्याला नोकरीसाठी उद्युक्त करणारा उपदेश करायलाच.. "तूच सांगून बघ बाबा आता.." वगैरे. :-))

In reply to by सुबोध खरे

बापूसाहेब 28/03/2022 - 22:31
खरे सर... या सबळ झालेल्या स्त्रियांशी कसे वागायचे हे पुरुषांना शिकवलेच गेले नाही. आणि सबळ झाल्यावर स्त्रियांनी पुरुषांशी कसे वागावे याचादेखील बराच अभाव आहे. बाकी लेख आवडला. बाकी लेख आवडला

छान लेख!
आमच्या काळी आपली मुलं कितवीत आहेत हे वडिलांना माहीत नसायचं
>>याच्यावरून एक किस्सा आठवला. मी जपानला शिकायला आलो होतो तेव्हा एका कुटुंबात होम स्टेला जायचा योग आला. त्यांच्या मुलाचा विषय निघाल्यावर मी त्यांना विचारलं की तुमचा मुलगा केवढा आहे? तर त्यांनी बायकोला फोन करून विचारलं की आपला मुलगा आत्ता किती वर्षांचा आहे 😀

आंबट गोड 31/03/2022 - 11:22
परफेक्ट लेख! सगळ्यांना वाचयला द्यायला हवा... स्त्रियांनाही, पुरुषांनाही!

उपयोजक 31/03/2022 - 23:07
आजकाल IT इंडस्ट्रीत काम करणाऱ्या स्त्रीपुरुषांना रात्री अपरात्री सुद्धा काम करावे लागते. पती-पत्नी निवांतपणे एकमेकांना भेटूही शकत नाहीत. ही कसली प्रगती? बाकी लेख आवडला. वास्तववादी

In reply to by उपयोजक

चौथा कोनाडा 01/04/2022 - 13:10
ही कसली प्रगती?
आर्थिक प्रगती, भौतिक प्रगती, वस्तूरुप प्रगती. कालानुरूप अपरिहार्यता ! मग ... वर्क-लाईफ बॅलन्स, क्वालिटी टाईम अशा शब्दांची आठवण काढायची नसते !

घरी बसुन ऑफिस व (जमेल तसे) घरकाम करणारा पुरुष आणि बाहेर नोकरी करुन कमावणारी स्त्री अशी उदाहरणे करोना काळात बरीच बघायला मिळतात. "जरा आहेस घरी तर हे पण कर की" वगैरे संवाद नेहमीचेच. दोन वर्षे सतत घरातुन काम केल्याने मला तर थेट रिटायर्मेंट घेतल्यासारखे वाटत आहे. सकाळी जॉगिंग वगैरे करुन आलो की उघडला लॅपटॉप. मग मधे अधे पोस्टमन, ईस्त्रीवाला, कामवाल्या बायका, बेल मारणारे शेजारी किवा सेल्समन, वॉशिंग मशीनचे खटले, पाणी भरणे,चहा करणे एक ना दोन. आडुन आडुन चौकशाही सुरु झाल्यात "त्या अमक्याचे ऑफिस कधीच चालु झाले म्हणे, तुमचे काय? निदान आठवड्यातुन एक दोन वेळा तरी?" असो. प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असे म्हणुन चाललेय.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सौंदाळा 01/04/2022 - 15:30
घरी बसुन ऑफिस व (जमेल तसे) घरकाम करणारा पुरुष आणि बाहेर नोकरी करुन कमावणारी स्त्री अशी उदाहरणे करोना काळात बरीच बघायला मिळतात. "जरा आहेस घरी तर हे पण कर की" वगैरे संवाद नेहमीचेच.
चोक्कस, मला समोर ठेवूनच प्रतिसाद लिहिल्यासारखा वाटतोय. आम्ही पण यातलेच. बायको नोकरी निमित्त बाहेर, अस्मादिक घरी. मुलीची शाळेची तयारी, दूध आणणे, कचरा टाकणे, मुलीला स्कूलबस साठी सोडायला / आणयला जाणे. आल्यावर जेवण वाढून देणे, कधी कधी भरवणे वगैरे अनेक कामे नव्याने केली.

महाराष्ट्रात फक्त मुंबई दूरदर्शन होते तेव्हाची गोष्ट. कार्यक्रमाचे नाव लक्षात नाही.पण त्यात बायको कमावणारी आणि नवरा घराकडे पाहणारा अशा जोडप्याची मुलाखत असे. घासकडबी असे नाव असणारे जोडप्यासाठी जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही हि पद्धत का स्वीकारलीत ? तेव्हा त्यांचे उत्तर खालीलप्रमाणे होते. नवराबायको दोघेही नौकरी करत होते.नवर्याची बदली मुंबई बाहेर झाली.बायको रिझर्व ब्यांकेत नोकरीला होती आणि तिला राहण्यासाठी ब्यांकेचे क्वार्टर होते. मुंबईतच रहाण्याचे नक्की होते त्यामुळे क्वार्टर सोडून राहणे परवडणारे नव्हते.त्यामुळे नवऱ्याने घर सांभाळणे सुरु केले आणि बायको नोकरी करत राहिली. दूरदर्शनला मी पत्र लिहून कळवले की श्रीयुत घासकडबी यांनी माझ्याकडे माहेरवासास जरूर यावे. पण ते आजपर्यंत आले नाहीत. दूरदर्शनने ते पत्र दिले नसावे किंवा घासकडबिनी संकोचाने येणे मनावर घेतले नसेल . पण आजही या निमंत्रणास त्यांनी मान द्यावा हि माझी इच्छाआहे. माहेरपणास validity नसते ना !!

वामन देशमुख 01/04/2022 - 19:00
नेहमीप्रमाणेच खुप छान, भावस्पर्शी लिहिलंय. सुदैवाने आजूबाजूला असे अनेक स्त्री-पुरुष दिसतात; दुर्दैवाने याविरुध्दही दिसतात. आज्जी, तू हा लेख लिहून, एक पुरुष म्हणून जणू काही माझ्याच भावभावना, परिस्थिती, विचार acknowledge केलेत असं वाटलं! --- अवांतर: मिपावरचे काही धागालेखक, त्यांचे धागे वाचून झाल्यावर, "मला तर अगदी हेच म्हणायचं होतं", किंवा "मला तर अगदी हे म्हणायचंच होतं" अशी फीलिंग देतात त्यांपैकी तू एक आहेस आज्जी! --- सवांतर: "तो शहाणा होतोय...." हे शीर्षक वाचून, एखाद्या किशोरवयीन मुलाबद्धल काहीतरी असेल असं वाटलं होतं! 😉

Nitin Palkar 03/04/2022 - 12:47
लेख छानच आहे. अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. अवांतर: तुमचं मिपा नाम 'आजी' हे आहे. अनेक प्रतिसादकांनी 'आज्जी' असं लिहिलं आहे. हल्ली अनेक मालिकांमध्येही 'आजीचा' उच्चार, उल्लेख 'आज्जी' असा केला जातो, जो चुकीचा आहे. मराठी शब्द आजी असाच आहे 'आज्जी' असा नाही.

आजी 12/04/2022 - 19:01
Bhakti-धन्यवाद. चौथा कोनाडा-"संतुलित लेख"हा तुमचा अभिप्राय समाधान देऊन गेला. प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे-माझं लेखन"संवादी"आहे हा तुमचा अभिप्राय वाचून बरे वाटले. किसन शिंदे, सस्नेह, अनिंद्य -तुम्हीही बिरुटेंशी सहमत! धन्यवाद. यशराज-"या प्रश्नाची दुसरी बाजूही मांडलीत."हा अभिप्राय वाचून समाधान वाटले. सुबोध खरे-अशा सबळ झालेल्या स्त्रीशी कसं वागावं हे पुरुषांना शिकवलंच गेलं नाही. त्यामुळे पुरुष संभ्रमित झालाय."हा तुमचा अभिप्राय ए वन! गवि-"पुरुष घरी बसला तर त्याला नावं ठेवली जातात आणि त्याच्या बायकोची कीव केली जाते."हे तुम्ही म्हणता तसे होते खरे. मीही अनुभवलं आहे. बापूसाहेब सरिता बांदेकर, धन्यवाद. थँक्यू नचिकेत जवखेडकर-तुमचा जपानमधील अनुभव पुरेसा बोलका आहे. कर्नलतपस्वी-"समाज बदलतो पण स्वभाव नाही."हे तुमचे मत योग्य आहे. सविता ००१-धन्यवाद. आंबटगोड- हा लेख सर्वांना वाचायला द्यायला हवा. स्त्रियांना ही आणि पुरुषांना ही."अभिप्राय वाचून समाधान वाटलं. उपयोजक-"ही कसली प्रगती?"हा तुमचा प्रश्न योग्य. पण हीच वस्तुस्थिती आहे. चौथा कोनाडा-उपयोजकना तुम्ही उत्तर दिलंय. राजेंद्र मेहेंदळे-तुमचा"स्वानुभव"पटला. सौंदाळा-तुमचाही"स्वानुभव"पटण्यासारखाच आहे. देशपांडे विनायक-तुम्ही दिलेले दूरदर्शन च्या मुलाखती मधले उदाहरण विरळाच! वामन देशमुख-"मलाही अगदी असेच म्हणायचे होते"असे फीलिंग तुझे लेख देतात आजी!"अभिप्राय समाधान देऊन गेला. Nitin Palkar-हो"आजी"हेच बरोबर."आज्जी"नव्हे. सर्वांचेच भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार.

संसारातील दुसरी बाजू आवडली आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, संसार म्हणजे फक्त तडजोड ... ऑफिस मध्ये पण तडजोड आणि घरी पण तडजोड,...
एक जाहिरात आहे एका खाद्यतेलाची. त्यातल्या आईला नृत्याची आवड,पण संसारात अडकलेल्या तिला नृत्य करायला वेळ मिळत नाही. मुलगी खिन्न होते. आईला मदत कोणी करत नाही पण अमुकतमुक खाद्य तेल ती आई वापरते, आणि लगेच.. कढईभर तेलात साबुदाणा वडे तळते.(ते वडे चक्क कच्चे दिसतात.) एकाच जेवणात साबुदाणे वडे, पुलाव आणि पाच इतर पदार्थ भरुन टेबलवर ठेवते. नंतर फडक्याला हात पुसत, मुलीच्या खोलीत जाऊन नृत्याची पोझ घेते.

१००व्या ईबुकचे लोकार्पण...

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 18/03/2022 - 00:15
एक विचारणा... ओकांच्या स्टाईलप्रमाणे ते एक पत्ता ते खिशात ठेऊन सस्पेन्स तयार करतात कि काय? कार्यक्रम रविवार, दिनांक २० मार्च २०२२रोजी सायंकाळी ५ ते ८ मेहेंदळे गॅरेजपाशी मनोहर बँक्वेट हॉल दुसरा मजला (लिफ्टची सोय आहे) येथे आहे. अल्पोपहारानंतर ओक आपल्या १०० पुस्तकांची ओळख करून देतील आणि एक प्रेझेंटेशन सादर करतील. ही सर्व पुस्तके खरेदी करायला किती खर्च येईल? या विचारणेला उद्या उत्तर मिळेल...

अभिनंदन आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा. मार्च एन्डिंग सुरु असल्याने रविवारी सुध्दा कामावर जावे लागेल असे चिन्ह आहे. पण लवकर कलटी मारायचा प्रयत्न करेन. रच्याकने एक सूचना :- कार्यक्रमाच्या आधी आल्पोपहार ठेवल्यास कार्यक्रम संपेपर्यंत पर्यंत थांबणार्‍या श्रोत्यांच्या संख्येत लक्षणिय घट होउ शकते. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शशिकांत ओक 18/03/2022 - 11:24
पैजार बुवा, किचकट, कटकटीचे हिशोब व्यवस्थापना भावतील असे तयार करण्यात आपण तरबेज आहात. मारा कलटी आणि या..!

In reply to by दुर्गविहारी

शशिकांत ओक 18/03/2022 - 11:28
माझ्या अनेक धाग्यांना आपल्या अनुभवाची आणि ऐतिहासिक वाचनाची जोड मिळाली आहे. महाराणा प्रतापांच्या प्रेझेंटेशन तयार करण्यात आपले योगदान महत्त्वाचे ठरले.

शशिकांत ओक 18/03/2022 - 11:18
बर्फीचा जादा प्रसाद देऊन सत्कार करण्यात येणार आहे... जे या कार्यक्रमावर आधारित धागा मिपावर सादर करतील त्यांना शाल व श्रीफळ देऊन आधीच गौरविण्यात येणार आहे. तेंव्हा सर्व मिपाकरांना आग्रहाने निमंत्रण देत आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

शशिकांत ओक 18/03/2022 - 22:58
आपण ही क्लिप सादर करून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अदभूत घटना प्रत्यक्षात घडतात. श्रद्धा आणि श्रम यांच्या संगमात दिव्य शक्ती पाठीशी उभ्या राहतात. याचे ते प्रतिकात्मक रूप आहे. नातलगांना घरगुती मराठीत पत्रव्यवहारात मराठी वापरणारा मी, एकदम एका रात्री अंधारछाया कादंबरी लिहायला घेतो हे ही मला पडलेले गूढ आहे... ऑटोरायटिंग करताना त्यात ऑटोरायटिंग म्हणजे काय? ते करून काय उपयोग होतो? ते नेमके कोण करतो? 'श्रद्धा भाव नसेल तर बंद कर' हा संबंध असे सांगणारे माझे दिवंगत वडील! वगैरे विषय मला ईबुक माध्यमातून सादर करावेसे वाटले.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 27/03/2022 - 19:16
असे वाटले होते... कदाचित अंनिसची त्याच वेळी सभा असावी. असो. नाडी भविष्य विषयावर पुस्तके उपलब्ध आहेत.

In reply to by शशिकांत ओक

कंटाळा हा एकमेव कारण घडले न येण्याचे. इच्छेवर कंटाळयाने मात केली. तसे ही अशा माहोल मधे आपल येण हे फार औपचारिक होते.

पाषाणभेद 18/03/2022 - 20:45
वा वा! अभिनंदन! आपल्या पुस्तकांचे लवकरच द्विशतक होवो या शुभेच्छा!

शशिकांत ओक 27/03/2022 - 19:23
नमस्कार मित्रांनो, १००व्या ईबुकच्या लोकार्पण कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून एयर मार्शल भूषण गोखल्यांनी, हवाईदलातील वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरील विंग कमांडर शशिकांत ओकांच्या पुस्तकांचा परामर्ष घेतला. २०१० सालच्या मंगलोर विमान अपघातातील चौकशीचे प्रमुख म्हणून सखोल माहिती त्यांनी दिली. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी तरूण वयात काश्मीरातील आतंकवाद्यांचा कसा खातमा केला होता. यावर प्रकाश टाकला. शिवाजी महाराज आणि पेशवेकालीन लढाया यावर मिलिटरी कमांडरच्या दृष्टीने विचार मांडले. ग्रहांकित मासिकामुळे मराठी वाचकांना नाडीग्रंथ भविष्य विषयाची माहिती मिळाली, असे श्री चंद्रकांत दादा शेवाळे यांनी म्हटले. श्री भारवि अवधानी यांनी नाडी ग्रंथावरील अद्भूत घटना सांगून नाडी भविष्याने अंनिसला कसे चक्रावून टाकले होते यावर भाष्य केले. त्या कार्यक्रमात ३७० ई-बुक्स लोकांनी विकत घेतली. १००व्या ईबुकचे वैशिष्ट्य म्हणजे ते गुजराती भाषेत कै. मेधा दिवेकर यांना समर्पित आहे. त्या न्यूझीलंडहून यांच्या हस्ताक्षरातील गुजराती भाषांतर मला पाठवत. ते सुरतेच्या दैनिक सामना टाईम्समधे दर रविवारी धारावाहिक प्रसिद्ध होत असे. आता ते ३२० पानी हस्तलिखित रूपाने प्रकाशित झाले आहे. सर्व ईपुस्तके १०,२०, ५० रुपये किंमतीची आहेत. गूगलपे फोन पे, पेटीएम वरून विकत घेऊन मोबाईलवर वाचायला मिळतात. https://alkaoaksebookshoppy.online

शशिकांत ओक 07/04/2022 - 01:58
सहसा लेखकाच्या हस्ताक्षरातील लेखन पुस्तक रूपाने प्रकाशित झाल्याचे दिसून येत नाही. १००व्या ईबुकचे वैशिष्ट्य म्हणजे ते गुजराती भाषेत कै मेधा दिवेकर यांच्या गुजराती हस्ताक्षरात प्रकाशित झाले आहे. किंमत माफक ₹५० आहे. कोणी गुजराती भाषा जाणकारांनी ते वाचून अभिप्राय जरूर कळवा. म्हणजे तो ही सादर करता येईल.

शशिकांत ओक 18/03/2022 - 00:15
एक विचारणा... ओकांच्या स्टाईलप्रमाणे ते एक पत्ता ते खिशात ठेऊन सस्पेन्स तयार करतात कि काय? कार्यक्रम रविवार, दिनांक २० मार्च २०२२रोजी सायंकाळी ५ ते ८ मेहेंदळे गॅरेजपाशी मनोहर बँक्वेट हॉल दुसरा मजला (लिफ्टची सोय आहे) येथे आहे. अल्पोपहारानंतर ओक आपल्या १०० पुस्तकांची ओळख करून देतील आणि एक प्रेझेंटेशन सादर करतील. ही सर्व पुस्तके खरेदी करायला किती खर्च येईल? या विचारणेला उद्या उत्तर मिळेल...

अभिनंदन आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा. मार्च एन्डिंग सुरु असल्याने रविवारी सुध्दा कामावर जावे लागेल असे चिन्ह आहे. पण लवकर कलटी मारायचा प्रयत्न करेन. रच्याकने एक सूचना :- कार्यक्रमाच्या आधी आल्पोपहार ठेवल्यास कार्यक्रम संपेपर्यंत पर्यंत थांबणार्‍या श्रोत्यांच्या संख्येत लक्षणिय घट होउ शकते. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शशिकांत ओक 18/03/2022 - 11:24
पैजार बुवा, किचकट, कटकटीचे हिशोब व्यवस्थापना भावतील असे तयार करण्यात आपण तरबेज आहात. मारा कलटी आणि या..!

In reply to by दुर्गविहारी

शशिकांत ओक 18/03/2022 - 11:28
माझ्या अनेक धाग्यांना आपल्या अनुभवाची आणि ऐतिहासिक वाचनाची जोड मिळाली आहे. महाराणा प्रतापांच्या प्रेझेंटेशन तयार करण्यात आपले योगदान महत्त्वाचे ठरले.

शशिकांत ओक 18/03/2022 - 11:18
बर्फीचा जादा प्रसाद देऊन सत्कार करण्यात येणार आहे... जे या कार्यक्रमावर आधारित धागा मिपावर सादर करतील त्यांना शाल व श्रीफळ देऊन आधीच गौरविण्यात येणार आहे. तेंव्हा सर्व मिपाकरांना आग्रहाने निमंत्रण देत आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

शशिकांत ओक 18/03/2022 - 22:58
आपण ही क्लिप सादर करून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अदभूत घटना प्रत्यक्षात घडतात. श्रद्धा आणि श्रम यांच्या संगमात दिव्य शक्ती पाठीशी उभ्या राहतात. याचे ते प्रतिकात्मक रूप आहे. नातलगांना घरगुती मराठीत पत्रव्यवहारात मराठी वापरणारा मी, एकदम एका रात्री अंधारछाया कादंबरी लिहायला घेतो हे ही मला पडलेले गूढ आहे... ऑटोरायटिंग करताना त्यात ऑटोरायटिंग म्हणजे काय? ते करून काय उपयोग होतो? ते नेमके कोण करतो? 'श्रद्धा भाव नसेल तर बंद कर' हा संबंध असे सांगणारे माझे दिवंगत वडील! वगैरे विषय मला ईबुक माध्यमातून सादर करावेसे वाटले.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 27/03/2022 - 19:16
असे वाटले होते... कदाचित अंनिसची त्याच वेळी सभा असावी. असो. नाडी भविष्य विषयावर पुस्तके उपलब्ध आहेत.

In reply to by शशिकांत ओक

कंटाळा हा एकमेव कारण घडले न येण्याचे. इच्छेवर कंटाळयाने मात केली. तसे ही अशा माहोल मधे आपल येण हे फार औपचारिक होते.

पाषाणभेद 18/03/2022 - 20:45
वा वा! अभिनंदन! आपल्या पुस्तकांचे लवकरच द्विशतक होवो या शुभेच्छा!

शशिकांत ओक 27/03/2022 - 19:23
नमस्कार मित्रांनो, १००व्या ईबुकच्या लोकार्पण कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून एयर मार्शल भूषण गोखल्यांनी, हवाईदलातील वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरील विंग कमांडर शशिकांत ओकांच्या पुस्तकांचा परामर्ष घेतला. २०१० सालच्या मंगलोर विमान अपघातातील चौकशीचे प्रमुख म्हणून सखोल माहिती त्यांनी दिली. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी तरूण वयात काश्मीरातील आतंकवाद्यांचा कसा खातमा केला होता. यावर प्रकाश टाकला. शिवाजी महाराज आणि पेशवेकालीन लढाया यावर मिलिटरी कमांडरच्या दृष्टीने विचार मांडले. ग्रहांकित मासिकामुळे मराठी वाचकांना नाडीग्रंथ भविष्य विषयाची माहिती मिळाली, असे श्री चंद्रकांत दादा शेवाळे यांनी म्हटले. श्री भारवि अवधानी यांनी नाडी ग्रंथावरील अद्भूत घटना सांगून नाडी भविष्याने अंनिसला कसे चक्रावून टाकले होते यावर भाष्य केले. त्या कार्यक्रमात ३७० ई-बुक्स लोकांनी विकत घेतली. १००व्या ईबुकचे वैशिष्ट्य म्हणजे ते गुजराती भाषेत कै. मेधा दिवेकर यांना समर्पित आहे. त्या न्यूझीलंडहून यांच्या हस्ताक्षरातील गुजराती भाषांतर मला पाठवत. ते सुरतेच्या दैनिक सामना टाईम्समधे दर रविवारी धारावाहिक प्रसिद्ध होत असे. आता ते ३२० पानी हस्तलिखित रूपाने प्रकाशित झाले आहे. सर्व ईपुस्तके १०,२०, ५० रुपये किंमतीची आहेत. गूगलपे फोन पे, पेटीएम वरून विकत घेऊन मोबाईलवर वाचायला मिळतात. https://alkaoaksebookshoppy.online

शशिकांत ओक 07/04/2022 - 01:58
सहसा लेखकाच्या हस्ताक्षरातील लेखन पुस्तक रूपाने प्रकाशित झाल्याचे दिसून येत नाही. १००व्या ईबुकचे वैशिष्ट्य म्हणजे ते गुजराती भाषेत कै मेधा दिवेकर यांच्या गुजराती हस्ताक्षरात प्रकाशित झाले आहे. किंमत माफक ₹५० आहे. कोणी गुजराती भाषा जाणकारांनी ते वाचून अभिप्राय जरूर कळवा. म्हणजे तो ही सादर करता येईल.
मित्रहो, ज्या मिसळपावने मला अनेक वाचक दिले. माझ्या लेखनाचा आस्वाद घेतला. त्या संस्थळाला माझे अभिवादन आणि धन्यवाद. १००वे ईबुक प्रकाशित करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. निमंत्रण आणि कार्यक्रम पत्रिका सोबत देत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून उपस्थित रहा ही आग्रहाची विनंती. ह्या पुस्तिका रुपातील सादरीकरणात ९० टक्के पुस्तकातील विषय मिपावून आधीच सादर झाले आहेत.

हे वाचा: शेष प्रश्न

अनुस्वार ·

In reply to by अर्धवटराव

अनुस्वार 19/03/2022 - 15:19
तुम्हाला सव्यसाची अगोदरच भेटला असेल. नसल्यास तो 'पथेर दाबी' मध्ये भेटेल. पुस्तक मराठीत नाही सापडले परंतु पुष्कळ हिंदी आवृत्त्या 'पथ के दावेदार' या नावाने इ-व्यापार संकेतस्थळांवर अगदी शंभर रूपयांत उपलब्ध आहेत. https://www.amazon.in/Path-Davedar-Hindi-Saratchandra-Chattopadhyay/dp/9389567157/ref=mp_s_a_1_4?qid=1647682831&refinements=p_27%3ASaratchandra+Chattopadhyay&s=books&sr=1-4 https://www.loksatta.com/chaturang/streetvache-rupbandh/article-about-shrchandra-chattopadhyay-novel-pather-dabi-1790827/

In reply to by अनुस्वार

अर्धवटराव 22/03/2022 - 22:05
सव्यसाची नव्हता सापडला. आता हिंदी आवृत्ती बघतो. सव्यसाची शोधताना एका बंगाली डॉन ची कादंबरी हाती लागली होती. प्रत्यक्ष हा डॉन त्या कथेत वावरत नाहि, पण सगळी पात्र त्याच्या भोवती गुंफली होती.. डोन ची मुलगी आणि जावई, मुलीचा बॉयफ्रेण्ड, पोलीस अधिकारी.. भन्नाट होती कथा.

कथा,कवीता,कादंबरी यांचे विषय असतात. मुन्शी प्रेमचंद याचे लेखन गोदान,एक चादर मैलीसी इ. पण त्या वेळच्या कुप्रथांवरच आधारित होते कुठल्याही काळात शेष प्रश्न हा अनुत्तरीतच राहातो फक्त काळा प्रमाणे त्याचे रूप बदलते. छान लिहिलय.

भागो 15/03/2022 - 08:27
शरच्चंद्र ह्यांच्या सर्व लिखाणाचे मराठी भाषांतर श्री मामा वरेरकर यांनी करले होते/आहे. तो संपूर्ण सेट माझ्या बहिणींनी विकत घेतला होता. मला त्यातून विप्रदास आणि श्रीकांत ह्या अत्यंत आवडलेल्या. पणते दिवस गेले. आता खुद्द बंगाल मध्ये कोणी शरच्चंद्र वाचत नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यांंवर अनेक हिंदी चित्रपट झाले. नोबल प्राईज च्या वेळी रवींद्रनाथंच्या बरोबर शरच्चंद्रांचे नावही चर्चेत होते.

अनिंद्य 16/03/2022 - 13:44
समग्र शरदचंद्र वाचलेय - इंग्रजी आणि हिंदी भाषांतर. मराठीत त्यांची काही पुस्तके नक्कीच भाषांतरित झाली आहेत. पण कुणी वाचत असेल असे वाटत नाही. पुढच्या पिढीत शरदचंद्र आणि रवींद्रनाथ वाचणारे कुणी उरेल याची खात्री नाही. 'शेष प्रश्न' चे म्हणाल तर जितके जुने तितकेच प्रासंगिक. सध्या काळाचे चक्र उलटे फिरतेय की काय असे वाटायचे दिवस आहेत.

कंजूस 16/03/2022 - 15:34
कर्नाटकात भैरप्पांचा विषय काय असतो? सध्या मराठी मालिकांत सासू सांगते सुनेला शिक्षण घाल चुलीत. पुन्हा काळ मागे चालला.

In reply to by अर्धवटराव

अनुस्वार 19/03/2022 - 15:19
तुम्हाला सव्यसाची अगोदरच भेटला असेल. नसल्यास तो 'पथेर दाबी' मध्ये भेटेल. पुस्तक मराठीत नाही सापडले परंतु पुष्कळ हिंदी आवृत्त्या 'पथ के दावेदार' या नावाने इ-व्यापार संकेतस्थळांवर अगदी शंभर रूपयांत उपलब्ध आहेत. https://www.amazon.in/Path-Davedar-Hindi-Saratchandra-Chattopadhyay/dp/9389567157/ref=mp_s_a_1_4?qid=1647682831&refinements=p_27%3ASaratchandra+Chattopadhyay&s=books&sr=1-4 https://www.loksatta.com/chaturang/streetvache-rupbandh/article-about-shrchandra-chattopadhyay-novel-pather-dabi-1790827/

In reply to by अनुस्वार

अर्धवटराव 22/03/2022 - 22:05
सव्यसाची नव्हता सापडला. आता हिंदी आवृत्ती बघतो. सव्यसाची शोधताना एका बंगाली डॉन ची कादंबरी हाती लागली होती. प्रत्यक्ष हा डॉन त्या कथेत वावरत नाहि, पण सगळी पात्र त्याच्या भोवती गुंफली होती.. डोन ची मुलगी आणि जावई, मुलीचा बॉयफ्रेण्ड, पोलीस अधिकारी.. भन्नाट होती कथा.

कथा,कवीता,कादंबरी यांचे विषय असतात. मुन्शी प्रेमचंद याचे लेखन गोदान,एक चादर मैलीसी इ. पण त्या वेळच्या कुप्रथांवरच आधारित होते कुठल्याही काळात शेष प्रश्न हा अनुत्तरीतच राहातो फक्त काळा प्रमाणे त्याचे रूप बदलते. छान लिहिलय.

भागो 15/03/2022 - 08:27
शरच्चंद्र ह्यांच्या सर्व लिखाणाचे मराठी भाषांतर श्री मामा वरेरकर यांनी करले होते/आहे. तो संपूर्ण सेट माझ्या बहिणींनी विकत घेतला होता. मला त्यातून विप्रदास आणि श्रीकांत ह्या अत्यंत आवडलेल्या. पणते दिवस गेले. आता खुद्द बंगाल मध्ये कोणी शरच्चंद्र वाचत नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यांंवर अनेक हिंदी चित्रपट झाले. नोबल प्राईज च्या वेळी रवींद्रनाथंच्या बरोबर शरच्चंद्रांचे नावही चर्चेत होते.

अनिंद्य 16/03/2022 - 13:44
समग्र शरदचंद्र वाचलेय - इंग्रजी आणि हिंदी भाषांतर. मराठीत त्यांची काही पुस्तके नक्कीच भाषांतरित झाली आहेत. पण कुणी वाचत असेल असे वाटत नाही. पुढच्या पिढीत शरदचंद्र आणि रवींद्रनाथ वाचणारे कुणी उरेल याची खात्री नाही. 'शेष प्रश्न' चे म्हणाल तर जितके जुने तितकेच प्रासंगिक. सध्या काळाचे चक्र उलटे फिरतेय की काय असे वाटायचे दिवस आहेत.

कंजूस 16/03/2022 - 15:34
कर्नाटकात भैरप्पांचा विषय काय असतो? सध्या मराठी मालिकांत सासू सांगते सुनेला शिक्षण घाल चुलीत. पुन्हा काळ मागे चालला.
कटाक्ष: भाषा- हिंदी (मूळ बंगाली) लेखक- शरच्चंद्र चट्टोपाध्याय प्रकाशन- डायमंड बुक्स प्रथमावृत्ती- १९३१ पृष्ठसंख्या- २०८ किंमत- ₹१५० ISBN : 978-81-7182-917-1 ओळख: कहाणीचा काळ स्वातंत्र्यपूर्व, वीसाव्या शतकाचा पूर्वार्ध. सगळे कथानक आग्र्यातल्या बंगाली वस्तीत घडते. आशु बाबु, अविनाश, हरेन्द्र, अक्षय आणि इतर ही बंगाली भद्र मंडळी. संस्कृतीचे पाईक आणि पूजक अशा या मंडळींची गाठ पडते कथेची नायिका कमल हिच्याशी (कथेला नायक नाही!). कमल आणि तिचा गायक पती शिवनाथ यांच्या विवाहाची वैधता ते कमलचे कुळ, जात इ.

एकोणतीस नव्वे एकसष्ठ दोन.

आजी ·

चौथा कोनाडा 12/03/2022 - 12:27
वा, वा आली म्हणायची झोप ! मस्त खुसखुशीत लिहिलंय ! +१
एकोणतीस अठ्ठे बत्तीस दोन. एकोणतीस नव्वे एकसष्ठ दोन. एकोणतीस दाहे नव्वद दोन.
हे खरे यश :-)) ग्रेट अभिनंदन, आजी !

डोक्यावरचे ओझे खुंटीला टांगतो शयनगृहात जाऊन सुखाने झोप घेतो यमराज जरी म्हणाला मी उद्या येतो उद्याचे उद्या बघू म्हणून सुखाने झोप जातो

डोक्यावरचे ओझे खुंटीला टांगतो शयनगृहात जाऊन सुखाने झोप घेतो यमराज जरी म्हणाला मी उद्या येत आहे उद्याचे उद्या बघू ,मला आता झोप येत आहे

In reply to by मुक्त विहारि

होय पुणेकर आहे दुपारी वामकुक्षी.सुद्धा आणी रात्री आठ तास. सकाळी सहा नंतर झोपत नाही रात्री साडे दहा नंतर जागत नाही.

सौंदाळा 14/03/2022 - 00:05
आजी खूप दिवसांनी लिहिलेत. मजेशीर लेख. आता परत निद्रानाश नको नाहीतर पिरिओडिक टेबल पाठ करावे लागेल. :)

झोप लागण्यासाठीची खटपट प्रेरणा देणारी आहे आजी. :) पाढ्यांसाठी माझी माझ्यापुरती सोपी आयडिया आहे एक. १०-११-१२-१५-२०-२१-२२-२५- ३० हे पाढे सहज पाठ होतात, आहेत. जे होत नाहीत त्यासाठी ह्या पाढ्यांचाच आधार घेऊन थोडी पटकन बेरीज केली तर काम होऊन जाते. उदा., सतरा आठे? पंधरा आठे वीसासे... त्यात सोळा मिसळले की झाले काम. सोळा यासाठी की पंधराच्या पुढे सोळाच्या पाढ्यात आठ मिसळायचे आणि सतरामध्ये आठ दुणे सोळा. मग, सतरा आठे छत्तीसाशे. शिंपल! नाही का? माझ्यासारख्या आळशाला तरी हेच बरे वाटत आलेले आहे. तरीसुद्धा पुढेमागे झोप न लागण्याचा त्रास सुरू झाला तर पाढे पाठ करायला घ्यावेच लागणार! :/ सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

गवि 14/03/2022 - 19:40
शिंपल ? कसले शिंपल हो ? तीनदा वाचले. मेंदूतील तिढा आणखी पिळला गेला इतकेच झाले तुमच्या या युक्तीच्या वर्णनाने. ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.

गवि 14/03/2022 - 19:38
"एकसष्ठ दोन" यावरुन एक रोचक आठवण. अंकलिपीत (अलकंपीत) असलेले पाढे पाठ केले तरी मोठ्या तीन अंकी आकड्यांचे वेगळेच रुप वापरले जाई. मीटरमधे बसावे म्हणून असणार. उदा. विसासे, चव्वेचाळासे, दाहोदर्से (कोणी दुग्गोदर्सेही म्हणत), बावन्नीदोन, एकसष्ठ दोन, नव्वदीदोन.. लेख मजेशीर.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो ना ... मग ती बस असो किंवा प्रेयसी .... कविता, झोप, पण अशाच आढेवेढे घेतात अपवाद म्हणून, बियर, व्हिस्की, रम, ह्या मात्र लगेच येतात....अपवादानेच नियम सिद्ध होतो, असे म्हणतात ....

In reply to by मुक्त विहारि

>>> अपवाद म्हणून, बियर, व्हिस्की, रम, ह्या मात्र लगेच येतात.... कायम 'उन्मनी' अवस्थेत राहून, टपटप पडणा-या प्रतिसादांच्या लेंड्यावरुन ते लक्षात येतंच, कमी करा हो ...! (ह.घ्या) ;) धुरांडीच्या हार्दिक शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपा आधीही अभिव्यक्ति स्वातंत्र्य बाळगून होते आणि आजही आहे... किंबहुना, एकमेकांच्या मतांचा आदर राखणारे आणि व्यक्तीगत द्वेष न बाळगणारे, मिपा हे माझ्या दृष्टीने एकमेव व्यासपीठ आहे ...

आजी 26/03/2022 - 08:46
मुक्तविहारी-झोप येत नसेल तर तुम्ही सुचवलेला उपायही चांगला. चौथा कोनाडा-अभिप्राय वाचून बरे वाटले. खेडुत, सरिता, Bhakti -अभिप्रायाबद्दल धन्यवाद. थॅंक्यू. कर्नलतपस्वी-धन्य आहे तुमची. वेळा पाळण्याच्या बाबतीत अगदी काटेकोर दिसता आहात! सौंदाळा-हो.मी खूप दिवसांनी लिहिले आहे. आता नियमित होईलसं वाटतंय. तुमचा अभिप्राय गंमतीशीर. चांदणे संदीप-तुमचा उपाय भारी. गवि-तुम्ही चांदणे संदीपना उत्तर दिले आहे. लेख आवडला हे वाचून समाधान वाटलं. तुमची आठवणही रोचक. विजुभाऊ-धन्यवाद. जेम्स वांड-थॅंक्स. प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे- ''जेव्हा ती यावी वाटते, तेव्हा ती अजिबात येत नाही. इतकं मात्र कळलं आहे''.. हाहाहा. खरं आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मुक्त विहारी-"मिपा"तुम्ही म्हणता तसेच आहे.

चौथा कोनाडा 12/03/2022 - 12:27
वा, वा आली म्हणायची झोप ! मस्त खुसखुशीत लिहिलंय ! +१
एकोणतीस अठ्ठे बत्तीस दोन. एकोणतीस नव्वे एकसष्ठ दोन. एकोणतीस दाहे नव्वद दोन.
हे खरे यश :-)) ग्रेट अभिनंदन, आजी !

डोक्यावरचे ओझे खुंटीला टांगतो शयनगृहात जाऊन सुखाने झोप घेतो यमराज जरी म्हणाला मी उद्या येतो उद्याचे उद्या बघू म्हणून सुखाने झोप जातो

डोक्यावरचे ओझे खुंटीला टांगतो शयनगृहात जाऊन सुखाने झोप घेतो यमराज जरी म्हणाला मी उद्या येत आहे उद्याचे उद्या बघू ,मला आता झोप येत आहे

In reply to by मुक्त विहारि

होय पुणेकर आहे दुपारी वामकुक्षी.सुद्धा आणी रात्री आठ तास. सकाळी सहा नंतर झोपत नाही रात्री साडे दहा नंतर जागत नाही.

सौंदाळा 14/03/2022 - 00:05
आजी खूप दिवसांनी लिहिलेत. मजेशीर लेख. आता परत निद्रानाश नको नाहीतर पिरिओडिक टेबल पाठ करावे लागेल. :)

झोप लागण्यासाठीची खटपट प्रेरणा देणारी आहे आजी. :) पाढ्यांसाठी माझी माझ्यापुरती सोपी आयडिया आहे एक. १०-११-१२-१५-२०-२१-२२-२५- ३० हे पाढे सहज पाठ होतात, आहेत. जे होत नाहीत त्यासाठी ह्या पाढ्यांचाच आधार घेऊन थोडी पटकन बेरीज केली तर काम होऊन जाते. उदा., सतरा आठे? पंधरा आठे वीसासे... त्यात सोळा मिसळले की झाले काम. सोळा यासाठी की पंधराच्या पुढे सोळाच्या पाढ्यात आठ मिसळायचे आणि सतरामध्ये आठ दुणे सोळा. मग, सतरा आठे छत्तीसाशे. शिंपल! नाही का? माझ्यासारख्या आळशाला तरी हेच बरे वाटत आलेले आहे. तरीसुद्धा पुढेमागे झोप न लागण्याचा त्रास सुरू झाला तर पाढे पाठ करायला घ्यावेच लागणार! :/ सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

गवि 14/03/2022 - 19:40
शिंपल ? कसले शिंपल हो ? तीनदा वाचले. मेंदूतील तिढा आणखी पिळला गेला इतकेच झाले तुमच्या या युक्तीच्या वर्णनाने. ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.

गवि 14/03/2022 - 19:38
"एकसष्ठ दोन" यावरुन एक रोचक आठवण. अंकलिपीत (अलकंपीत) असलेले पाढे पाठ केले तरी मोठ्या तीन अंकी आकड्यांचे वेगळेच रुप वापरले जाई. मीटरमधे बसावे म्हणून असणार. उदा. विसासे, चव्वेचाळासे, दाहोदर्से (कोणी दुग्गोदर्सेही म्हणत), बावन्नीदोन, एकसष्ठ दोन, नव्वदीदोन.. लेख मजेशीर.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो ना ... मग ती बस असो किंवा प्रेयसी .... कविता, झोप, पण अशाच आढेवेढे घेतात अपवाद म्हणून, बियर, व्हिस्की, रम, ह्या मात्र लगेच येतात....अपवादानेच नियम सिद्ध होतो, असे म्हणतात ....

In reply to by मुक्त विहारि

>>> अपवाद म्हणून, बियर, व्हिस्की, रम, ह्या मात्र लगेच येतात.... कायम 'उन्मनी' अवस्थेत राहून, टपटप पडणा-या प्रतिसादांच्या लेंड्यावरुन ते लक्षात येतंच, कमी करा हो ...! (ह.घ्या) ;) धुरांडीच्या हार्दिक शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपा आधीही अभिव्यक्ति स्वातंत्र्य बाळगून होते आणि आजही आहे... किंबहुना, एकमेकांच्या मतांचा आदर राखणारे आणि व्यक्तीगत द्वेष न बाळगणारे, मिपा हे माझ्या दृष्टीने एकमेव व्यासपीठ आहे ...

आजी 26/03/2022 - 08:46
मुक्तविहारी-झोप येत नसेल तर तुम्ही सुचवलेला उपायही चांगला. चौथा कोनाडा-अभिप्राय वाचून बरे वाटले. खेडुत, सरिता, Bhakti -अभिप्रायाबद्दल धन्यवाद. थॅंक्यू. कर्नलतपस्वी-धन्य आहे तुमची. वेळा पाळण्याच्या बाबतीत अगदी काटेकोर दिसता आहात! सौंदाळा-हो.मी खूप दिवसांनी लिहिले आहे. आता नियमित होईलसं वाटतंय. तुमचा अभिप्राय गंमतीशीर. चांदणे संदीप-तुमचा उपाय भारी. गवि-तुम्ही चांदणे संदीपना उत्तर दिले आहे. लेख आवडला हे वाचून समाधान वाटलं. तुमची आठवणही रोचक. विजुभाऊ-धन्यवाद. जेम्स वांड-थॅंक्स. प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे- ''जेव्हा ती यावी वाटते, तेव्हा ती अजिबात येत नाही. इतकं मात्र कळलं आहे''.. हाहाहा. खरं आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मुक्त विहारी-"मिपा"तुम्ही म्हणता तसेच आहे.
मध्यंतरी एक "झोल" म्हणतात तसा झाला. माझं आणि झोपेचं वाजलं. ती काही माझं ऐकेना. माझ्या डोळ्यांत उतरेना. रात्रभर झोप नाही. क्वचित कधीतरी लागलीच तर तास दोन तास. रात्री बारा , बारा,एक, एक वाजेपर्यंत मी तळमळायची.(प्रेमात पडलेली नसतानाही) नंतर जरा झोप येतेय असं वाटायचं तर बाथरुमला लागायची. तिकडं जाऊन आल्यावर पुन्हा झोपेची आराधना. सफल होगी तेरी आराधना, काहेको रोए।असं म्हणून मी माझं समाधान करुन घ्यायची. पण छेः! झोप माझ्याशी फटकूनच वागायची. पहाटे साडेतीन नंतर डोळे जरा जड व्हायचे तर साडेपाच वाजता नेहमीच्या वेळेला मी टक्क जागी. मग उगीचच योगासने प्राणायाम करायची.

(शोध)

गड्डा झब्बू ·

मस्तच, अंतरागांतुन वाहणारे अतंरगाला झोबणारे बोलतो मी गुढ काही सत्य कोणी मानणारे भुवरी या मिळणार नाही

मस्तच, अंतरागांतुन वाहणारे अतंरगाला झोबणारे बोलतो मी गुढ काही सत्य कोणी मानणारे भुवरी या मिळणार नाही
प्रेर्ना :) बाटलीतुन वाहणारे ओतताना लहरणारे सोड्यातून उमलणारे बर्फाशी झुंजणारे चषकाच्या पृष्ठभागी बुडबुडे साकारणारे ढोसतो मी अल्प काही जाणिवेला छेडणारे नेणिवा थिजवणारे मेंदूस व्यापणारे तनूस डुलवणारे ओठांच्या फटीतून अशाश्वत भासणारे बोलतो मी मूढ काही