मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

जाधव सर

प्रमेय ·
पल्या आयुष्यात अनेक मार्गदर्शक/शिक्षक असतात. पण थोडेच जण असे काही भक्कम असतात की कितीही झाले तरी दीपस्तंभाप्रमाने सतत ध्येयाची/मार्गाची आठवण करून देतात. माझ्या आजपर्यंतच्या प्रवासातील एक महत्वाची व्यक्ती, ज्यामुळे माझ्या सरळ धोपट अभ्यासाला चांगला मार्ग मिळाला, ती व्यक्ती म्हणजे सोलापूरचे 'जाधव सर’. माझ्या मोठ्या भावाची ७वी. या वयातल्या मुलांसाठी सर्वात मोठी परीक्षा म्हणजे ' ७वी स्कॉलरशिप'. पप्पांनी आधीच 'जाधव सरांची' भेट घेउन अमेयाचा प्रवेश पक्का केलेला. क्लासचा पहिला दिवस अणि अमेयाला सर खूप आवडून गेले.

कंपूबाजी

घाटावरचे भट ·
पूर्वसूचना : हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्‍या व्यक्तीवर राहील.

शिवाजी महाराजांची "लुटी" मागची भुमिका.

सुभाष ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शिवाजी महाराजांची "लुटी" मागची भुमिका. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संवर्धनासाठी,स्वराज्य बळकट बनविण्यासाठी बर्याच वेळा शत्रूच्या प्रदेशामध्ये लुटी केल्या.या लुटी त्यांच्या वैयक्तिक चैनीसाठी,विलासामध्ये जिवन घालविण्यासाठी नव्हत्या, त्या फक्त स्वराज्य बळकट करण्यासाठीच होत्या.या लूटीच्यावेळीहि कांही नियम,पथ्ये कटाक्षाने पाळली जात असत.कोणाच्याहि मनाला येईल,मर्जी होईल तशी लुट करण्याची कोणालाहि परवानगी नव्हती.याबाबतीत महाराज फार दक्ष असत.लूटींच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे नां याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे.या नियमांचे उल्लंघन करणार्याला ते कडक शिक्षा फर्मावित असत.ही सर्व लुट राज्याच्या

हाती ज्यांच्या शून्य होते

विकास ·
लेखनप्रकार
जैनांची कथा वाचली, मंदी वरील लेख/चर्चा वाचतोय त्यातून अचानक खालील पुस्तकाची आठवण झाली. म्हणून हा पुस्तक परीचयाचा उपद्व्याप. मध्यंतरी भारतात असताना एक आधी माहीत नसलेले पुस्तक हातात पडले. त्या पुस्तकाची नावाप्रमाणेच असलेली कल्पना मला आवडली आणि संग्राह्य वाटल्याने घेयचे ठरवले. तसे त्याची प्रथमावृत्ती २००५ च्या शेवटात झालेली पण ही द्वितियावृत्ती २००८ मधली मला विकत घेताना मिळाली... पुस्तकाचे नाव आहे: हाती ज्यांच्या शून्य होते. संपादक - अरूण शेवते, ऋतुरंग प्रकाशन. किंमत २०० रुपये.

स्थलांतरे - घाऊक आणि किरकोळ

सुनील ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लहानपणची गोष्ट आहे. कुठल्याशा सुटीत एका कौटुंबिक सहलीसाठी लोणावळ्याला जाणे झाले होते. विविध स्थलदर्शनांच्या यादीत "कार्ले" येथिल लेण्यांचा समावेश होताच. तेथिल एकविरा देवीच्या मंदिरात गेल्यावर माहिती कळली की, ही कोळी समाजातील लोकांची देवता. मला कुतुहल वाटले. कोळी समाज हा समुद्रकिनार्‍यावरील. मग त्यांची देवता अशी समुद्रकिनार्‍यापासून इतकी दूर, अगदी घाटापलिकडे देशावर कशी? वडिलधार्‍यांना विचारले पण कोणाकडेच समाधानकारक उत्तर नव्हते. आजही नाही. अनेक अनुत्तरीत प्रश्नांच्या ढिगार्‍याखाली ते कुतुहल आजदेखिल पडून आहे! मिपावर मराठीच्या अनेक बोलींतील लेखन वाचायला मिळते. त्यात एक आहे आगरी बोली.

अमराठी भाषिकांनाहि प्रेरणा देणारे शिवराय !!! 1

सुभाष ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अमराठी भाषिकांनाहि प्रेरणा देणारे शिवराय !!! छत्रपति शिवाजी महाराजांचे कार्य,शौर्य,राजनिती,मुत्सद्दीपणा हे सर्व केवळ महाराष्ट्राच्या चौकटीमध्ये बंदिस्त रहाणे शक्यच नाही.महाराजांचे स्वराज्याचे उद्दीष्ट,त्यामागची भुमिका,येथे एतद्देशियांचे समतेचे ,ममतेचे, सुखाचे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे ही तो प्रभुचीच इच्छा हे महाराजांचे मनोगत महाराष्ट्राबाहेरचे विचारवंतानाहि उमगले होते,आहे.शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नेते नव्हते तर ते सर्व भारताचे आदर्श राष्ट्रपुरुष होते अशी भावना भारतीय विचारवंत अन प्रतिभावंत यांच्या मनात शिवकालात अन नंतरहि निर्माण झाली होती अन आजही ती कायम आहे.म्हणुनच मराठी बरोब

चंद्रशेखर आजाद - २७ फ्रेब. १९३१

दशानन ·
लेखनविषय:
असा शुर ना झाला कधी ना होईल ! चंद्रशेखर आजाद ह्यांनी आजच्या दिवशीच देशासाठी आपले प्राण दिले.. ! ज्याचे नाव घेताच अंगावर रोम उभे राहतात.... च्या मृत्यु नंतर देखील इंग्रजांना त्यांच्या पार्थिव देहाला हात लावायची हिंमत होत नव्हती असा हा मर्द गडी फक्त फितुरी मुळे जिवानिशी गेला... !

तालिबानीस्तान !

भोचक ·
भारताची राजधानी दिल्लापासून दीडशे किलोमीटर पलीकडच्या प्रांतात भारतीय कायदे चालू शकणार नाहीत, असे सरकारनेच जाहीर केले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? चकीत होऊन पहायची गरज नाही. भारतात असे कधी होणार नाही. पण भारताचे कधी भले न पाहिलेल्या पाकिस्तानमध्ये मात्र असे होतेय. राजधानी इस्लामाबादपासून दीडशे किलोमीटरवर असलेल्या 'स्वात' प्रांतात आता पाकिस्तानी कायदे चालणार नाहीत. पाकिस्तानी सरकार आणि या भागात वर्चस्व असलेल्या तालिबान्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता या भागात न्यायदानाच्या प्रक्रियेसाठी 'शरीया' कायदे लागू होतील.

तु राजा की राजदुलारी मै....

दशानन ·
लेखनप्रकार
तु राजा की राजदुलारी मै.. सिर्फ लंगोटे आला सुं ! भांग रगड के पिया करु....मै.. मुंडी सोटि याआला सुं ! तु राजा की छोरी से... मेरे एक भी दासी दास नही ! साधुसा आले ओढण आली म्हारा कंबल तक पास नही ! नवीन चित्रपट ओय लकी लकी ओये मधील हे एक गाणं ! हरयाणवी लोक संगितावर आधारलेले हे एके नितांत सुंदर गाणे आहे... ! हरयाणवी शब्दांमुळे ह्या गाण्याची गोडी एकदम अप्रतिम वाढते... ! एकदा प्ले करा.... तुम्हाला देखील आवडेल नक्कीच !!

आपले दुरावलेले बांधव - रोमा

भास्कर केन्डे ·
आजच ही बातमी झळकली अन पुन्हा एकदा रोमांवरील पूर्वी कधितरी केलेल्या वाचनातील आठवणी जाग्या झाल्या. देशोदेशांत लढाया-युद्धे झाली त्या त्या वेळी तिकडून भारतात स्थलांतरीत झालेल्या लोकांना कायमचा आश्रय मिळाला. भारतीयांनी जगातल्या जवळपास प्रत्येक मुख्य भागातल्या लोकांना आश्रीत म्हणून येथे आल्यावर आपल्यात सामावून घेतले. मात्र खूप कमी वेळा भारतातून जीव वाचवून लोकांना बाहेरच्या जगाचा आश्रय घ्यावा लागला. त्या अपवादांमधले विषेश लक्षात घेण्यासारखे हे रोमा.