शत्रुघ्न
इतिहास मोठा क्रूर आहे. काही लोकांना त्याने देव पदी पोचवले तर काही जणांना उपेक्षेने मारले. ज्याव्यक्तिरेखांची इतिहासाने उपेक्षा केली त्यांत शत्रुघ्नाचे नाव फार वरती आहे. किंबहुना सर्वात वरती तेच आहे. वटवृक्षांच्या सावलीत एखादे रोप कोमेजुन जावे तशी शत्रुघ्नाची व्यक्तिरेखा कोमेजुन गेल्यागत भासते. राम तर देवपदी पोचला. लक्ष्मण अजरामर झाला. भरत भ्रातृप्रेमावर आणि निस्पृहतेवर गाजला. शत्रुघ्नाच्या वाट्याला मात्र ते मोमेंट्स ऑफ फेम आलेच नाहीत.
नाही म्हणायला तसे महाभारतातले नकुल सहदेव देखील उपेक्षित. पण त्यांच्याबद्दल निदान काही कौतुकास्पद शब्द लिहिले गेले. नकुलाची अश्वपरीक्षा आणि सहदेवाची भविष्यपरीक्षा यांवर काही मिथके तरी वाचायला मिळाली आहेत. नकुल / सहदेव म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर महाभारतातले नकुल सहदेवच येतात. शत्रुघ्न म्हटल्यावर मात्र आपल्या डोळ्यासमोर "खामोश" "जली को आग कहते है बुझी को राख कहते है" वगैरे म्हणणारा शत्रुघ्न सिन्हा येतो. (तोच तो सोनाक्षी सिन्हा चा बाप. काही वर्षांनी तो केवळ दगडीचा बाप म्हणुनच देखील ओळखला जाउ शकतो. द्गडी म्हणजे सोनाक्षी. अंदर की खबर आहे की तिचे मूळ नाव सोनाक्षी नसुन 'स्टोना'क्षी आह'. तिच्या डो़ळ्यात आणि दगडात एकच भाव असतात. कधीकधी दगडही सुंदर दिसतो तशी स्टोनाक्षीही सुंदर दिसते. साम्यस्थळे एवढ्यात संपतात. बाकी दगडाचा अपमान करण्याचा काही हेतू नाही. असो. विषय बदलला. त्या शत्रुघ्नाचे दुर्दैव. लेखाचा विषय आहे शत्रुघ्न आणि लिहितो आहे सिन्हांच्या दगडीवर.)
पण आज शत्रुघ्नाबद्दल विचारले तर आपल्यापैकी कितीजण धाडधाड १० ओळी म्हणुन दाखवु शकतील. राम बोला लक्ष्मण बोला, अर्जुन म्हणा कर्ण म्हणा लोक अधिकारवाणीने थोडेफार बोलतील. महाभारतातल्या खलनायकांबद्दलही लोकांना माहिती आहे पण रामायणातल्या बंधुनिष्ठ शत्रुघ्नाबद्दल नाही. कारण मुळात त्याचे आख्खे जीवनच अळणी आहेत. त्यात काही माल मसाला नाही, मेलोड्रामा नाही. तो रामासारखा वलयांकित नाही, लक्ष्मणासारखा पराक्रमी आणि सेवाव्रती नाही. भरतासारखा उदार आणि त्यागी नाही कारण मुळात त्याला कधी तो चान्सच मिळाला नाही. भरतासारखे रामाच्या पादुका सिंहासनावर ठेउन त्याने कधी राज्य केले नाही कारण मुळात त्या राजपदाचे मापच त्याच्या पदरी पडले नाही. शत्रुघ्नाचे आख्खे आयुष्यच आपल्यासाठी केवळ भरताचा धाकला भाऊ इतपतच सिमीत आहे. आणि हीच मुळी प्रचंड मोठी शोकांतिका आहे कारण तो भरताचा सख्खा धाकटा भाऊ नसुन लक्ष्मणाचा जुळा भाऊ आहे. शत्रुघ्न मुळात कोण होता हेच जर माहिती नसेल तर त्याचे कार्य काय माहिती असणार?
शत्रुघ्न म्हणजे शत्रुंचा नाश करणारा. दशरथ आणि सुमित्रेचा मुलगा. लक्ष्मणाचा जुळा भाऊ, राम आणी भरताचा सावत्रभाऊ आणि चार भावंडांमधला सर्वात धाकटा (जुळा असुनही). पण शत्रुघ्नाची खरी ओळख याहुनही खुप मोठी आहे. त्याच्या आयुष्यातला प्रसिद्धीचा एकमेव क्षण लवणासुराच्या वधात आला. लवणासुर म्हणजे मधु राक्षसाचा मुलगा. या मधुच्या नावावरुनच मथुरा हे नाव आले. या मधुने देव दानव मनुष्य या सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. प्रजाहितदा होता. त्यावर खुष होउन साक्षात शिवाने त्याला स्वतःचा त्रिशूळ दिला. जो मधुच्या मृत्युन्ंतर लवणासुराकडे आला. लवणासुर स्वत: पराक्रमी आणि अस्त्रनिपुण होता. मात्र ऋषीमुनींना आणि मनुष्यांना त्रास देणारा होता. प्रजानन त्रासले आणि रामाकडे आले आणि रामाने याकामी भरताला लावुन दिले. पराक्रम गाजवण्याचा हा एक क्षणही वाट्याला येत नाही हे बघुन अखेर शत्रुघ्नाने रामाकडे या कामगिरीची मागणी केली आणि मिळवली. रामाने खास विष्णुने दिलेले अस्त्र शत्रुघ्नाकडे देउन त्याला लवणासुराकडे धाडले. आख्यायिका अशी आहे की लवणासुराच्या महालात अनेक दैवी अस्त्रे होती जी जवळ असेतो तो अजेय होता. त्यामुळे शत्रुघ्नाने भक्ष्याचे आमिष दाखवुन त्याला महालापासु दूर नेले आणि मग युध्दाचे आव्हाने दिले. याबाबत त्याने त्याच्या जुळ्या भावाचा कित्ता गिरवला. त्यानेही इंद्रजिताला असेच अजेय अस्त्रांपासुन दूर ठेवले होते. अखेर लवणासूर मेला. मथुरेचे राज्य त्यानंतर शत्रुघ्नाकडे आणि मग त्याच्या मुलांकडे गेले. लवणासुर वधाने आणि अश्वमेध दिग्विजयाने त्याने मिळवलेले किर्ती अखेरच्या क्षणी त्याच्या पुतण्यांनी त्याला हरवुन त्याच्यापासुन हिरावुन नेली.
पण शत्रुघ्नाचा मोठेपणा लवणासुर वधात किंवा अश्वमेधाच्या दिग्विजयात नाहिच मुळी. त्याचा मोठेपणा इतिहासाने कधी अधोरेखितच केला नाही. त्याचा मोठेपणा आहे राम - लक्ष्मण वनवासात गेलेले असताना आणि भरत रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवुन अयोध्येबाहेर कुटीत राहत असताना निरपेक्ष, नि:स्पृह वृत्तीने अयोध्येच रक्षण करण्यात आहे. १४ वर्षाच्या काळात अयोध्या कधी नव्हे इतकी सजली, नटली, बहरली, समृद्ध झाली. याचे श्रेय सर्वांच्या अनुपस्थितीत राज्य योग्यप्रकारे सांभाळणार्या शत्रुघ्नाकडेच जाते. याबदल्यात त्याच्या पदरात कुठलेच कीर्तीचे माप पडले नाही. १४वर्षांनी राम परतल्यावर लोक म्हणाले भरताने रामाला राज्य परत केले. पण ते राज्य भरताने तरी कुठे केले होते. ते शत्रुघ्नानेच तर केले.
वास्तविक पाहता लक्ष्मणाने जी सेवा रामाची केली तशीच शत्रुघ्नाने भरताची केली. लक्ष्मण रामाची सावली बनुन राहिला तर शत्रुघ्न भरताचे प्रतिरुप बनुन. दोन्ही जुळ्या भावंडांनी निरपेक्षपणे आपल्या सावत्र भावांची सेवा करण्यात धन्यता मानली. परंतु इंद्रजित वधामुळे असेल कदाचित किंवा वनवास भोगल्यानेही असेल पण लक्ष्मणाची प्रतिमा एका वटवृक्षा एवढी मोठी झाली तर शत्रुघ्न त्या वटवृक्षाची केवळ एक सावली बनुन राहिला. लक्ष्मणाच्या मृत्युनंतर रामापाठोपाठ भरतानेही जलसमाधी घेतली तसे कायम त्या दोघांबरोबर सावली सारखा राहिलेला शत्रुघ्नही सरयूत विलीन झाला. बंधुप्रेमाचे याहुन उदात्त उदाहरण इतिहासात नाही.
राम उदात्ततेचे प्रतीक आहे तर लक्ष्मण बंधुप्रेमाचे, भरत त्यागाचे आणि उदारपणाचे प्रतीक आहे तर शत्रुघ्न निरपेक्ष आणि नि:स्पृह व्रुत्तीचे. त्याच्या या नीरक्षीरसमान वृतीला सलाम करण्यासाठी हा लेखनप्रपंच.
वर्गीकरण
नवीन माहिती
वाचनिय, मस्त लेख...
सर्व प्रतिसादकर्त्यांना
In reply to सर्व प्रतिसादकर्त्यांना by मृत्युन्जय
आभारी आहे
उत्तम
मृत्यंजय , प्रतिसाद वाचणेस त्रास होतोय म्हणुन इथे लिहतो!
In reply to मृत्यंजय , प्रतिसाद वाचणेस त्रास होतोय म्हणुन इथे लिहतो! by अग्निकोल्हा
तुमच्या दोघांपैकी कुणी थकणार
In reply to तुमच्या दोघांपैकी कुणी थकणार by विश्वनाथ मेहेंदळे
वैचारीक मैथुनात कुणीही थकत
In reply to तुमच्या दोघांपैकी कुणी थकणार by विश्वनाथ मेहेंदळे
मला लेच उत्साह आहे. किमान
In reply to मला लेच उत्साह आहे. किमान by मृत्युन्जय
तसे आधी सांगितले असते तर
In reply to मला लेच उत्साह आहे. किमान by मृत्युन्जय
तसे आधी सांगितले असते तर
In reply to तसे आधी सांगितले असते तर by विश्वनाथ मेहेंदळे
सांगायचे काय त्यात ?
In reply to सांगायचे काय त्यात ? by अग्निकोल्हा
लैच पेटला आहात !!! योग्य वेळ
In reply to लैच पेटला आहात !!! योग्य वेळ by विश्वनाथ मेहेंदळे
मग इतका वेळ जागा चुकत होती काय ?
In reply to मग इतका वेळ जागा चुकत होती काय ? by अग्निकोल्हा
जाउद्या विमे माझ्या वाक्यांचा राग मानु नका.. हवं तर क्षमा मागतो
In reply to सांगायचे काय त्यात ? by अग्निकोल्हा
फिल्टर लावुन घ्या म्हणजे जंक
In reply to फिल्टर लावुन घ्या म्हणजे जंक by मृत्युन्जय
म्हणे फिल्टर लावा... त्यापेक्षा चश्मा काढा.
In reply to म्हणे फिल्टर लावा... त्यापेक्षा चश्मा काढा. by अग्निकोल्हा
हरकत नाही. चष्मा काढलात तरी
In reply to हरकत नाही. चष्मा काढलात तरी by मृत्युन्जय
डोक्यातुन मेंदु काढण्यापेक्षा
In reply to डोक्यातुन मेंदु काढण्यापेक्षा by मृत्युन्जय
अरे मित्रांनो.. बास की आता..
In reply to अरे मित्रांनो.. बास की आता.. by गवि
@गवि तुमच्या नुसत्या शब्दातच वजन आहे राव... मानलं तुम्हाला.
In reply to मृत्यंजय , प्रतिसाद वाचणेस त्रास होतोय म्हणुन इथे लिहतो! by अग्निकोल्हा
आता क्रेडीट चुकांना द्यायचा
In reply to आता क्रेडीट चुकांना द्यायचा by मृत्युन्जय
त्रागा करुन हा लेख जस्टिफाय करण्याचा का प्रयत्न चालु आहे ?
In reply to त्रागा करुन हा लेख जस्टिफाय करण्याचा का प्रयत्न चालु आहे ? by अग्निकोल्हा
आता आदर्श वागणुकीलाही क्रेडिट
In reply to आता आदर्श वागणुकीलाही क्रेडिट by अग्निकोल्हा
अदखलपात्र वागणुक आदर्श अथवा
In reply to अदखलपात्र वागणुक आदर्श अथवा by मृत्युन्जय
:)
In reply to :) by अग्निकोल्हा
मी नीटच वाचले आहे हो. तुम्हीच
In reply to मी नीटच वाचले आहे हो. तुम्हीच by मृत्युन्जय
शिवाय मी शत्रुघ्नाबद्दल
In reply to शिवाय मी शत्रुघ्नाबद्दल by अग्निकोल्हा
शत्रुघ्नाची पुरेशी नोंद घेतली
In reply to शत्रुघ्नाची पुरेशी नोंद घेतली by अग्निकोल्हा
नाहीच करू शकत, कारण रामायण
In reply to नाहीच करू शकत, कारण रामायण by विश्वनाथ मेहेंदळे
शत्रुघ्नाने तुमचे काहीतरी
In reply to त्रागा करुन हा लेख जस्टिफाय करण्याचा का प्रयत्न चालु आहे ? by अग्निकोल्हा
जरुर. त्रुटी असतील तर त्या
शत्रुघ्नाला क्रेडीट दिले नाही
सर्व प्रतिसादकर्त्यांचे
In reply to सर्व प्रतिसादकर्त्यांचे by मृत्युन्जय
वा वा वा अभिनंदन हो....
ह्ह्पुवा.
अरेच्चा!
आवडला लेख
आज...
In reply to आज... by विकास
हम्म..