स्वलेखनाचे पुनःप्रकाशन कितपत इष्ट?
काही काळापासून हा प्रश्न उपस्थित करावा अथवा करू नये अशा वैचारिक अडचणीमध्ये मी आहे. अखेर विचारूनच टाकावा असे वाटले म्हणून ह्या लेखाचा उद्योग.
अन्य ठिकाणी (छापील अथवा अन्य संस्थळावर) पूर्वप्रकाशित अशा आपल्याच कृतीचे आपणच ’मिसळपाव’ वा अन्य एखाद्या तत्सम संस्थळावर पुन:प्रकाशन करणे कितपत स्वागतार्ह आहे ह्याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. कोठल्याहि संस्थळाच्या ध्येयधोरणात ह्याविषयी काही लिहिले असल्यास माझ्या वाचनात ते आलेले नाही. अशा पुन:प्रकाशनाच्या विरुद्ध आणि बाजूने काही विचार मांडता येतील.
विरुद्ध विचार म्हणजे पुन:प्रकाशन स्वप्रसिद्धीच्या मोहामधून असे केले आहे असा आरोप केला जाऊ शकतो आणि असा आरोप माझ्यावर केला जाणार असल्यास मी तो टाळू इच्छितो. (पुन:प्रकाशानाचे ’पातक’ माझ्या हातूनहि घडले आहे.)
पुन:प्रकाशनाच्या बाजूने असे म्हणता येईल की पुन:प्रकाशन हे छापील पुस्तकाची नवी आवृत्ति काढण्यासारखे आहे. छापलेल्या पुस्तकाच्या प्रथम छापलेल्या प्रती संपल्या आणि तरीहि पुस्तकाला मागणी असली तर पुढची आवृत्ति काढली जाते आणि कोणासहि त्यात वावगे असे काही दिसत नाही. एका संस्थळावर लेख प्रकाशित झाला आणि त्या संस्थळाच्या वाचकांनी - ज्यांची संख्या मर्यादित असते - तो वाचला तरी ज्यांनी तो वाचलेला नाही पण ज्यांना तो वाचायला आवडेल अशा अन्य संस्थळांच्या वाचकासाठी तो पुन:प्रकाशित केला तर अधिक वाचकांपर्यंत तो पोहोचतो ही पुन:प्रकाशनाची जमेची बाजू.
तेव्हा ह्या विषयावर जनतेचा कौल वाचायला आवडेल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काहीच हरकत नाही
वाचक वर्ग
मला चुकीचे वाटत नाही.
इकडे लिहित रहा, तुमचे लेख
काहीच अडचण नाही.
बिनधास्त पुनः प्रकाशित करा...
जे
स्वलेखनाचे पुनःप्रकाशन कितपत इष्ट?
मि>>जनतेचा कौल>>
"ज्या लेखनाचे प्रताधिकार
अजून एक...
हेच म्हणतो
"ज्या लेखनाचे प्रताधिकार
तुमचं लिखाण मिपावर नसतं तर मी
जरूर प्रकाशित करा.
काहीच हरकत नसावी
मिपा धोरण आणि माझं मत.