मी पाहिलेले नाहीये ...
अवांतर निष्कर्ष : बालगंधर्वांना आदर्श मानणार्या पुरुष कलावंताची शोकांतिका आहे.
आळेकरांचे नाटक इतके कळले पुष्कळ झाले की .....
_____________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
च्यायला.... परिक्षण लिहायचं तर आधी ते नाटक समजायला तर पाहिजे ना? परिक्षण काय लिहिणार डोंबलाचं?
खुद के साथ बाता: परिक्षणं जनरली अशी नाटक / सिनेमा न समजताच लिहितात की काय?
बिपिन कार्यकर्ते
मनिष, तूच या धाग्यात नाटकाच्या गोष्टीपासून सारे सविस्तर लिहावेस अशी विनंती करतो...
आता तुलाच काय ती समजलेली असणार ती बेगम...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
मी १९९२ का १९९३ मध्ये पाहिले होते.
थोडेसे दुर्बोधपणाकडे झुकणारे असले, तरी मला आवडले होते. "स्वतःची पुरुष/स्त्री म्हणून ओळख" आणि "पुरुष-पुरुष संबंधांतील वेगवेगळ्या छटा" असे वेगवेगळे धागे होते, असे अंधुक स्मरते.
त्यात दोन तशी वैशिष्ट्य नसलेली (म्हणजे सुरुवातीला असे वाटते) अविवाहित पुरुष-पात्रे आहेत, पैकी एकाचे लग्न ठरते, त्यातून त्या दोघांमध्ये काही विचित्र वितुष्ट येते, ते उपकथानकही विचार करण्यासारखे आहे.
दिवस राहाणे हे सांकेतिक आहे की बर्वे/नलावडे बाईंचा बुद्धिभ्रम... दोन्ही प्रकारे कथानकाचा अर्थ लावून घेता येतो.
तेव्हा मला नाटकाबद्दल दोन वेगवेगळे विचार मनात आले : (१) विषय खूपच स्फोटक असल्यामुळे नाटककाराने तो मुद्दामून दुर्बोध केला आहे "समझनेवाले समझ जाएंगे, अनाड़ी चुप बैठेंगे" (असा थोडासा क्षम्य भ्याडपणा), किंवा
(२) एकाच वेळी अनेक अर्थ लागू शकतील अशी कथानके विणणे हे नाटककाराला अभिप्रेतच होते. म्हणजे "राशोमोन" चित्रपटाचा अर्थ लागला नाही, कोणी कुणाचा खून केला, ते शेवटपर्यंत कळले नाही, तर ठीकच असते. आयुष्यात काहीकाही घटनांचा अर्थ आपल्याला लागतो-लागतो असे वाटता-वाटता लागतच नाही, असा त्या चित्रपटाचा मथितार्थ आहे.
आता मला ते नाटक फारसे आठवत नाही. त्यानंतर कित्येक वर्षे मी त्या नाटकाची संहिता शोधत होतो. मिळाल्यास वाचायला आवडेल.
नंबर एकचे चमत्कारिक नाटक आहे. ह्या नाटकाने कुठल्याही प्रकारचे
मनोरंजन वा समाज प्रबोधन होत नाही. असली घाणेरडी स्टोरी कुठल्याही सुसंस्कृत व सभ्य माणसाला आवडेल असे वाटत नाही. अतिशय किळसवाणी भाषा आहे, उदा. "बेगमः 'आज गुरूवार, श्री दत्ताचा वार..' ह्यावर मोहन आगाशेंची बसलेल्या आवाजात आरोळी: 'मग उदबत्त्या कोण आणणार? दत्तापुढे तुझे झ्याट जाळायचे का?' इ. इ.
आम्हांस हे नाटक पाहतांना मळमळू लागले व स्टेजवर जाऊन भडाभडा ओकावेसे वाटू लागले म्हणून आम्ही उठून आलो.
घरी येऊन (ह्या भिकार नाटकाच्या नावाने) स्वच्छ आंघोळ करून दगडूशेटचे दर्शन घेतल्यावर बरे वाटले. उत्साहाने आणलेले बेगम बर्वेचे स्क्रिप्टही रस्त्यावर फेकून दिले
व त्यावरून एक ऑटोरिक्षा गेला तेंव्हा समाधान वाटले. तो ऑटोरिक्षाही पुढे जाऊन कोलमडला म्हणे..
थोडक्यात पुलंच्या राघूनाना सोमणांना प्रा. चक्रदेवांचा उदासबोध वाचल्यावर जे वाटले तेच आमचे झाले.
आमचे पैसे वाया गेले, तुम्ही कोणी घालवू नका !
प्रत्येक नाटक सगळंच सोप्प करून सांगत नाही.
या नाटकातली प्रत्येक गोष्ट ही आपल्या दृष्टीने वास्तवात घडत नाही पण नाटकातल्या व्यक्तिरेखा ह्या सतत वास्तव जग आणि कल्पनेचं, अदभुतातलं जग अश्या दोन पातळ्यांवर जगत असतात. प्रत्येकाच्या मारल्या गेलेल्या आशा आकांक्षा अश्या रितीने प्रगट होतात.
बाकी बरंच आहे या नाटकाबद्दल सांगण्यासारखं पण आत्ता वेळ नाही.
आणि जनोबा रेगे.. अहो तुम्ही खर्या नावाने जरी बोंबाबोंब केलीत ना तरी आळेकरांना आणि इतर कुणालाही काही फरक पडत नाही वा नाटकाचे महत्व कमी होत नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
>>आणि जनोबा रेगे.. अहो तुम्ही खर्या नावाने जरी बोंबाबोंब केलीत ना तरी आळेकरांना आणि इतर कुणालाही काही फरक पडत नाही वा नाटकाचे महत्व कमी होत नाही.
=)) सहमत आहे.
>>आणि जनोबा रेगे.. अहो तुम्ही खर्या नावाने जरी बोंबाबोंब केलीत ना तरी आळेकरांना आणि इतर कुणालाही काही फरक पडत नाही वा नाटकाचे महत्व कमी होत नाही.
=))
आज बाई ख-या अर्थाने मिपाकर झाल्या.. खणखणीत.. :)
--अवलिया
खरोखर नाटकाबद्दल समजून घ्यायचे असल्यास गौरी रामनारायण ने नाटकाबद्दल जे लिहिलंय ते इथे वाचा.
http://www.hinduonnet.com/thehindu/2001/06/17/stories/09170352.htm
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
मला खरच समजावून घ्यायचे होते हे नाटक... (आणी दुर्बोध असले तरी मला किळसवाणे नाही वाटले, आणि माझ्या बायकोलाही नाही. काही वेळेस उग्र भाषा ही त्या संहितेची गरज असते.) दुव्यबद्दल शतशः धन्यवाद 'नी' (नाव नाही माहित मला). पुस्तकही मिळवून वाचेन ह्या वीकांताला. (भारतात रहायचे काही फायदे! :))
प्रतिक्रिया
पास
मी
अवांतर
मनिष.... मला
सारखं मास्तर....मास्तर करु नका रे!
च्यायला....
पाहिलेलं
या
कोणी समजावून सांगेल का?...
हे नाटक
>>मिळाल्यास
विकृतांसाठी विकृतांनी लिहिलेले विकृत माणसांचे नाटक!
प्रत्येक
=))
>>आणि जनोबा
खरोखर
शतशः धन्यवाद...