जाणता राजा
गाव : विदर्भातलं एक खेड
वेळ : सकाळची , स्थळ : गावाची चावडी
पात्र : रामराव आणि शामराव, वय : ५५-६० च्या आसपास.
रामराव : "राम राम ओ शामभौ कुटी चालले इतक्या घाई मदी."
शामराव : "राम राम, ते शेतात गेल्तो जरा सोयाबीन ले पानी द्याचं व्हतं, तुमाले मालूम नाई का रातीची इज देतात ना ते MSEB वाले."
"न आता जरा उमरावातीले जाऊन येतो, ते मावा पडलाय सोआयबीन वर त्यासाठी कीटकनाशक घेऊन येतो जरा. लौकर जा लागते सकायची बस गेली का त वडाप नायतर कोणाच्या तरी गाडीवर जा लगीन मले शहरात."
रारा : "जाशीन ना बे, पण हे बातमी पायली का त्वा, आताच लाईट आली अन टिव्ही लावला तर ते बातमी सुरु होती." " पाह्यलं का किती जंगी उदघाटन झालं स्मारकाचं, आता आपल्या राजाची किर्ती जग भर पोहोचणार पायतच जाय बाबू तू" !!!
शारा : "अबे हो, तुय सारं बरोबर पन त्या साठी तर लैच पैका खर्च झाला म्हने ?"
रारा : "हो मग ३६०० करोड रुपये खर्च होणारे, असं तसं स्मारक नाही जागतिक दर्जाचं स्मारक व्हनार आहे ते तेवढा खर्च किरकोळ आहे बे."
शारा : "त्याले तिथल्या मच्छीमारांचा पन विरोध आहे असं ऐकलं बे म्या खरं व्हय का ते ?"
रारा : "व्हय हुईन त्यायले थोडा प्रॉब्लेम, थोडा त्रास सहन करावाच लागन त्यायले. पण त्यामुळे पर्यटनाले किती हातभार लागीन बाबू याचा इचार कर न तू . जगभरातले लोकं येतीन ते पाहाले."
शारा : " पण मले एक सांग शिवाजी राजाच सारं आयुष्य गडकिल्ल्यावर गेलं. मग हे स्मारक कायले ते गडकिल्ले ते काऊन दुरुस्त नाई करत सरकार त्या पैशातून ? " अन स्मारक शिवाजी राजाने तर जलदुर्ग बांधेल हायेत ना मंग तटी काऊन नाही केल स्मारक.
रारा : "सरकार कुटी-कुटी लक्ष दिन बे. लोकाईन त थोडं काम कराले पाइजे कि नाई ?"
शारा : "तुयी गोस्ट बरोबर हाये, तू म्हणत तसं काई संस्था काम करतात बी जीव वतुन किल्ले बांधाच, पण त्यायले पैका कसा पूरन. सरकार न जर त्या लोकयाले मदत केली किती भारी हुईन ते, स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून काम करणाऱ्या लोकाईले किती हुरूप येईन याचा बी इचार करन तू जरा."
रारा : " हम्म, तुया बोलन्यात पॉईंट हाय थोडा. "
शारा: "आता मले सांग आपल्या अटीच लाईट नसते, यस्टी वेळेवर येत नाई. सकायी सकायी अर्धे लोकं त्या कमानीपाशी रस्त्यावर बसत्यात. गावात नवीन कोणी पावना आला कि त्याले सलामी देत उबे रायतात."
"आता माया शेतात म्या जलयुक्त शिवार अंतर्गत शेततळं करून घेतलं त्यामुळे माया न बाजूच्या सुदाम्या अन सुभानरावाच्या शेतात पाण्याची सोय झाली. पण गावात असे बी कास्तकार हायेत त्यायच्या कडे या साठी पैसा नाई, त्यामुळे त्यायले रब्बीत काय करावं,कास्तकारी सोडून द्यावी का ?"
"हे झाली आपल्या गावाची कंडिशन, तू जरा खाली मेळघाटात जाय बरं तिकडं प्याले पानी नाई, रस्ते नाई, लाईट नाई. त्याहिनं काय करावं ?" आता तू सांग कोणत्या राजाळे आपल्या प्रजेले असा त्रास झालेला आवडीन.
रारा : "अबे पन !!!"
शारा : "पन गिन काई नाई मी काय बोलतो ते बघ आदी. हा स्मारकावर खर्च होणारा पैका थोडा किल्ले दुरुस्त कराले. थोडा जिकडे रस्ते, पानी, लाईट नैत अशा म्हणजे मेळघाट, चंद्रपूर मदल्या दूरच्या खेड्यात थोड्याफार त सोई देता येतीन. "
"अन शिवाजी राजाले 'रयतेचा राजा' म्हटलं जायचं, मग तो पैसा त्याच्या रयतेसाठी वापरला तर त्यायचं कल्याण हुईन ना."
रारा : "लैच चाबऱ्या तोंडाचा होयेस बे तू . देवाले असं एकेरी नावानं बोलतेत का ?"
शारा : "बरं मी निगतो आता, पण त्या आदी व्हॉटसऍप वर माया पोरानं एक 'नरहर कुरुंदकर' म्हणून मोठा माणूस हुन गेला त्याचा म्यासेज पाटवला तो ऐक अन तुया डोक्शात काय प्रकाश पडते का बग."
कुरुंदकर म्हन्तेत, " माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे.""समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो."
वाचने
17363
वाचनखूण
प्रतिक्रिया
62
लिवलं तर चांगलं
In reply to लिवलं तर चांगलं by अनन्त अवधुत
अनन्त अवधुत आपण लेख पुन्हा
In reply to लिवलं तर चांगलं by अनन्त अवधुत
सततच काही तरी नन्नाचा पाढा
In reply to सततच काही तरी नन्नाचा पाढा by महासंग्राम
गाववाले
In reply to गाववाले by बोका-ए-आझम
देवा, सगळे नाही तर काही
In reply to गाववाले by बोका-ए-आझम
ओ माय डीयर फ्रेंड
In reply to गाववाले by बोका-ए-आझम
उद्या लोक चांद्रयान, मंगळयान
In reply to उद्या लोक चांद्रयान, मंगळयान by चिनार
बरोबर! म्हणजेच मंगळयान
In reply to बरोबर! म्हणजेच मंगळयान by हतोळकरांचा प्रसाद
सन असा विचार ते मेमोरियल
In reply to सन असा विचार ते मेमोरियल by फेदरवेट साहेब
चंद्रयानाचा खर्च आणि अपव्यय
सहमत.
छान लेख सहमत. तुमच्या लेखाशी
आले विरोधक आले.metro ला पण
In reply to आले विरोधक आले.metro ला पण by लालगरूड
लालगरूड आपण कोणती तुलना कशाशी
नशीब महाराजांच्या काळी लोकशाही नव्हती
In reply to नशीब महाराजांच्या काळी लोकशाही नव्हती by बोका-ए-आझम
मास्तर, तुमच्याकडून जरा
In reply to मास्तर, तुमच्याकडून जरा by महासंग्राम
तुम्ही कुरुंदकरांचं उदाहरण दिल्यावर माझा उत्साह मावळला.
In reply to तुम्ही कुरुंदकरांचं उदाहरण दिल्यावर माझा उत्साह मावळला. by बोका-ए-आझम
देवा, आमचं सूत्र सबका साथ
In reply to देवा, आमचं सूत्र सबका साथ by महासंग्राम
कुरुंदकर communist होते का?
In reply to तुम्ही कुरुंदकरांचं उदाहरण दिल्यावर माझा उत्साह मावळला. by बोका-ए-आझम
कृ ह घेणे
जर असाच विचार शहाजहानने केला
In reply to जर असाच विचार शहाजहानने केला by ज्योति अळवणी
आपली गल्लत होतेय शिव
In reply to आपली गल्लत होतेय शिव by महासंग्राम
केवळ महाराष्ट्रचं का संपूर्ण
In reply to केवळ महाराष्ट्रचं का संपूर्ण by ज्योति अळवणी
हे माझ्या आपण विषय दुसरीकडे
सही लिहिलंय
In reply to सही लिहिलंय by पैसा
मंदार्भौ, उत्तम लिहिलंय...
In reply to सही लिहिलंय by पैसा
चपखल..
In reply to सही लिहिलंय by पैसा
+१
मग हे स्मारक कायले ते
In reply to मग हे स्मारक कायले ते by मराठी_माणूस
HTTPS://en.wikipedia.org/List
In reply to HTTPS://en.wikipedia.org/List by एस
लिंक ला समस्या आहे
थोडक्यात का्य तर मुंबई
हम्म
In reply to हम्म by वरुण मोहिते
अहो, कॉन्ग्रेसने (खरंतर
In reply to अहो, कॉन्ग्रेसने (खरंतर by संदीप डांगे
हे तेच २००८ वाले विरोधक आहेत
In reply to हे तेच २००८ वाले विरोधक आहेत by हतोळकरांचा प्रसाद
हेच लॉजिक स्मारकाच्या
In reply to हे तेच २००८ वाले विरोधक आहेत by हतोळकरांचा प्रसाद
गल्लत होते आहे का मुद्दा
In reply to गल्लत होते आहे का मुद्दा by संदीप डांगे
त्यांच्याशी स्मारक का असावे
In reply to त्यांच्याशी स्मारक का असावे by हतोळकरांचा प्रसाद
जाऊ द्या हो प्रसादराव.
In reply to जाऊ द्या हो प्रसादराव. by बोका-ए-आझम
कोण काय आहे ह्याचं सर्टीफिकेट
In reply to कोण काय आहे ह्याचं सर्टीफिकेट by संदीप डांगे
२००८ हे वर्ष संपून ८ वर्षे झालेली आहेत.
In reply to २००८ हे वर्ष संपून ८ वर्षे झालेली आहेत. by बोका-ए-आझम
त्या वेळचे सगळे संदर्भ
In reply to जाऊ द्या हो प्रसादराव. by बोका-ए-आझम
तुमचं मत अगदी मान्य. याशिवाय
In reply to त्यांच्याशी स्मारक का असावे by हतोळकरांचा प्रसाद
कसं आहे प्रसादजी, जो
In reply to कसं आहे प्रसादजी, जो by संदीप डांगे
मेगाबायटी प्रतिसाद देणं
हवंयमिळतंय" म्हणायला काही हरकत असावी का?In reply to मेगाबायटी प्रतिसाद देणं by हतोळकरांचा प्रसाद
मेगाबायटी प्रतिसाद आवडत नाही
In reply to मेगाबायटी प्रतिसाद आवडत नाही by संदीप डांगे
अजिंठा वेरूळ ला
In reply to अजिंठा वेरूळ ला by वरुण मोहिते
विदेशी पर्यटकांमध्ये त्याची
In reply to मेगाबायटी प्रतिसाद आवडत नाही by संदीप डांगे
चुत्यागिरी.. किती पण बोंबला
In reply to मेगाबायटी प्रतिसाद आवडत नाही by संदीप डांगे
डांगेंजी, एक खुलासा :
In reply to कसं आहे प्रसादजी, जो by संदीप डांगे
स्मारके ही तरी सरकारची प्राथमिकता नसावी.
<<<<ज्यांना 'स्मारकाचे श्रेय
स्मारक + गड किल्ल्यांचे
स्मारकाचा निर्णय आवडलेला नाही
हे स्मारक व्हायला पाहिजे असं मनापासून वाटतं पण
Which Indian city do foreign
स्मारक होतय हे उत्तमच आहे
In reply to स्मारक होतय हे उत्तमच आहे by अर्धवटराव
+१११११११११११११११११११११११११११
In reply to स्मारक होतय हे उत्तमच आहे by अर्धवटराव
+११११११११११११
In reply to स्मारक होतय हे उत्तमच आहे by अर्धवटराव
स्मारकाच्या टार्गेट
In reply to स्मारकाच्या टार्गेट by महासंग्राम
अजीबात नाहि.
गाव वालं बरुबर बोलल्यात