आई गेल्याचं दु:ख वेगळचं. २००३ पासुन अजुनही निटसं न समजलेले, हलके नाही पण जरा सवयीचे झालेले दु:ख.
आई गेल्यापासुन त्या घराचे घरपण च गेलयं. तिकडे जावेसेच नाही वाटत.
खरं सांगू, आता तर गणित करायला लागतं किती वर्ष झाली ते सांगायला! काळासारखं औषध नाही ... तुमचं लिखाण वाचून मी हे आणि आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही असंच वाटतं.
खूप सुंदर लिहिलं आहेत, एका छोट्या मुलीच्या नजरेतून! ती छोटी मुलगीच फक्त हरवते आईच्या पाठी!!
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
"आई" तुझ्या आठवणीने
आज मन हेलावते....
पण तूच दिलेल्या मायेने
दु:ख माझे सावरते....
हीच प्रार्थना माझी
त्या दयाळु ईश्वराला.....
तुझ्याकडे नेऊ नको
कधी कुणाच्या आईला.....
असेच लिहित रहा...अप्रतिम लेख.....हृदयस्पर्शी !
एका लहानग्या मिनीच्या नजरेतून आईच्या आठवणी आल्याने त्या जाई-जुई-पारिजातकासारख्या नाजूक होऊन आल्या आहेत. आईसाठी आपलं मूल हे नेहेमीच लहान असतं कुठेतरी. आई जाण्यातली एक भीषण पोकळी आणि संपूर्ण व्यक्तिमत्वाचं एकप्रकारे उकलून जाणं फारच चटका लावून गेलं. पोटात खड्डा पडला आणि डोळे भरुन आले.
जियो!!
चतुरंग
बापरे.. हे एकटेपण सहन करण्याचं बळ तुला मिळो..
तू केलेली कविता वाचली होती मागच्या वर्षी.. त्याही पेक्षा जास्त कळवळले हे वाचताना..
:(
http://bhagyashreee.blogspot.com/
प्रतिक्रिया
+१
+१
टेक केयर
खरं सांगू,
>>ती छोटी
लेख आवडला .........
सुंदर मांडणी
कसलं आतून
खरंच
आभार! -
नीरजा..
अतिशय
अत्यंत सुरेख लिखाण नीधप!
ह्म्म.. खूप
बापरे.. हे
भावस्पर्शी
+१