मनाच्या कुपितले-पडदा पडताना
मनाच्या कुपीतले या सदरातला हा पाचवा लेख
पडदा पडताना !
पार्श्वसंगीत चालू ......... "चालत राहील हे युध्द विचारांचे..........." असं म्हणत सर्व कलाकार स्तब्ध. आवाज वाढत जातो आणि पडदा पडतो, एका प्रयोगाचा शेवट होतो. नाटक ............. मानवी मनाला थेट भिडणारे माध्यम ..... जशी मैफलीतील एखादी चीज काळीज चर्र करते. तसेच नाटकातला एखादा संवाद हृदय फाडून टाकतो. म्हणूनच जशी एखादी शास्त्रीय संगीताची मैफल संपताना सर्वांची समाधी लागते. तशीच अगदी तशीच समाधी एखादा अत्युत्तम प्रयोग संपल्यानंतर होते. असे हे नाटक या नाटकाचा रंगमंचावरचा प्रवास जीतका रंगतदर असतो तितकाच पडद्यामागचा.
कलाकार एकत्र करण्यापासून सुरू होते नाटक निर्मिती. कथा, पटकथा ठरते. संवाद बसू लागतात. रंगीत तालीमी सुरू होतात आणि लेखकाच्या लेखणीतील अपत्य रांगू लागते. हळूहळू संवाद बसतात. चहाच्या साथीने रात्री रंगू लागतात. इकडे बॅकस्टेजवालेही झटत असतात. प्रकाश योजना, ध्वनीयंत्रणा सगळे जोमात काम करत असतात आणि मग सगळे एकत्र येतात आणि अंतिम रंगीत तालमी रंगू लागतात. कलाकार आपल्या भुमिकेत रंगून जातात. सिंक्रोनाईज् होत जाते. प्रकाशझोत, साऊंडची बीट आणि कलाकारांचे शब्द आपोआपच एकत्र होत जातात आणि एकेदिवशी सर्व रचना होऊन, मनोमन रंगदेवतेला स्मरून नाटयप्रयोगास सुरूवात होते.
एक तपश्चर्या शेवटाला येत असते. होय, तपश्चर्याच असते ती. एकाची नाही अख्ख्या संघाची. फक्त शरीराने नाही तर मनाने एकत्र येऊन ऑन स्टेज, बॅक स्टेज, घाम गाळला जातो. एखादे वाक्य यावे म्हणून कलाकार दिवस-रात्र तेच वाक्य घोटतो. नेपथ्यासाठी दिग्दर्शक स्वत: रंधा घेऊन बसतो. तर म्युझिकवाला विशिष्ट भावनिर्मिती व्हावी म्हणून तासन्तास विचार करत बसतो. आणि, सगळे जमले की चुकूनसुध्दा चूक होऊ नये म्हणून हजारदा प्रॅक्टिस ........... एकमेकांना सांभाळून घेणं ही सगळी तपश्चर्याच नाही का आणि ही तपश्चर्या असते त्या एक तासासाठी............ आणि त्या दिवशी मग तिसरी घंटा वाजते ...... प्रयोग सुरू होतो आणि रंगदेवता तपश्चर्येचे फळ देऊ लागते. नाटक रंगत जाते. तेंव्हा कलाकार या विश्वात नसतोच. तो नाटयरंगी रममाण झालेला असतो. तो समाधी अवस्थेत असतो. साक्षात् ईश्वराशी त्याचा संवाद होत असतो आणि प्रेक्षकांनाही तो ईश्वर भेट घडवण्याच्या प्रयत्नात असतो आणि त्याला प्रेक्षकांना भेटणारा ईश्वर देखील दिसतो तो त्यांच्या खळाळत्या हास्यातून वा टपटप गळणाऱ्या आसवातून. समाधी अवस्था वाढत जाते. वाढत जाते आणि तो पृथ्वीवर येतो ते हजारो हातातून अगदी मनापासून वाजणाऱ्या टाळयानंतरच ...... आणि पडदा पडतो.... पडदा पडतानाच कलाकार तयार होतात पुन्हा समावधीव्स्थेत जायला ........ पुढच्या प्रयोगावेळी ....... हेच होतं प्रत्येकवेळी, प्रत्येक ठिकाणी आणि क्षणही तोच असतो पडदा पडतानाचा.
विनायक पाचलग
marathilikhan@in.com
vinayakpachalag@gmail.com
आता या लेखाच्या प्रयोजनाबद्दल थोडेसे
पहिल्यांदा आपण माझ्या मागच्या लेखाला दीलेल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद
उगाचच प्रतिक्रियेमुळे लेख वर येवु नये म्हणुन हे येथे सांगीतले
खरतर आज मी हा लेख लिहिणार नव्हतो दुसरा लेख तयारही होता पण या आठवड्यात असे काही प्रसंग घडले की मी सहजपणे हा छोटेखानी लेख लिहिला
ते प्रसंग म्हणजे
काही दीवसापुर्वी मी "एक युद्ध विचारांचे" या नाटकाला संगीत दीले होते
त्या नाटकाचा प्रयोग परवादीवशी कोवाड या छोट्याशा गावात झाला(रणजीत देसाइंचे हे गाव)
काही कारणामुळे मी गेलो नव्हतो पण मला असे समजले की तेथे जवळजवळ १००० प्रेक्षक हजर होते
माझ्यासाठी ही वेगळी गोष्ट होती
याशिवाय ४ दीवसापुर्वी मला एक उत्क्रुष्ट दीग्दर्शक अतुल पेठे याच्याशी संवास साधता आला नाटक या विषयावर चर्चा करायची संधी मिळाली
आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काल मला शाम मनोहर या दीग्गज लेखकाला भेटण्याची संधी मिळाली जवळ्जवळ २० मिनिटे फक्त मी आणि ते बोलत होतो
याशिवाय त्यानी लिहिलेले नवीन नाटक मला बाहेर प्रकाशीत होण्यापुर्वी वाचायला मिळाले
एकुणात हा आठवडा काही वेगळे अनुभव घेवुन आला त्यानिमित्त हे लिखाण
बघा आवडतय का.........
(आमच्या नाटकाच्या तालमीचे फोटो आपण माझ्या खरडवहीत पाहु शकता.)
अवांतर- पुन्हा एकदा सारेगमपविशयी ..तसे आम्ही सारेगमचे अगदी त्यांच्या पहिल्या कार्यकरमापासुन पंखा आहे .कधीकाळी मी आणि अभिजीत ने एकत्र गाणे म्हटले होते तो जेव्हा या स्पर्धेत गेला तेव्हापासुन आम्ही पंखा झालो आणि आजतागायत आहे आणि त्यात भर पडली ती या कालच्या भागाची ..आम्ही या कार्यक्रमाचे वेडे झालो आहोत्..आहाहा काय कर्यक्रम होता कालचा ..वा..
खरेतर दीवस्भर तेच तेच चित्रपट पाहुन कंटाळलो होतो आज काही राष्ट्रीय सण आहे असे वाटत नव्हते पण त्या कार्यक्रमाने दीवस गाजवल या कार्यक्रमात सगळच अप्रतीम होते त्यामुळे जास्त बोलत नाही नाहेतर एक नवा लेखच तयार होइल बाकी एवढी एकच इच्छा की या कार्यक्रमाची सी डी निघावी खुप छान होइल बाकी याबाबत पण अक्षेप असतीलही(सावरकर प्रेम गांधींचा उल्लेखही नाही वगिअरे वगिअरे) त्यासाठी खरडवहीचा वापर करा कारण मी जरा जास्तच बहकतो सध्या .......बाकी जीयो सा रे ग म पा....
अतिअवांतर- नुकतेच बहुभाषीक ब्राम्हण समेलन झाले मी जावु शकलो नाही पण मला त्यासंबंधी माहिती हवी आहे वाचायला आवडेल कारण नेहमीप्रमाणे सकाळमध्ये फक्त एकांगी लेखच आले आहेत.
खरतर मी कधीकधी बहकतो या विषयावर कारण ४८ साली ब्राम्हणाना उकळत्या गुळाच्या पाकात टाकताना बघीतलेय माझ्या पुर्वजानी अगदी नॉन करप्टेड व निर्व्यसनी व ब्राम्हण म्हणून सरकारी नोकरीत त्रासही भोगलाय
कदाचीत या॑ वातावरणाचा परीणाम असेल पण समतोल राखायचा प्रयत्न करतोय
बाकी समजुन घ्यालच
विनायक
वाचने
5153
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
अप्रतिम
अगायायायाया.....
मागितला नसताना एक सल्ला...
In reply to मागितला नसताना एक सल्ला... by भडकमकर मास्तर
माझी शाळेतली चोपडी
In reply to माझी शाळेतली चोपडी by धनंजय
+१
In reply to +१ by चित्रा
+२
In reply to +२ by सहज
+३
In reply to +३ by अवलिया
+४
In reply to माझी शाळेतली चोपडी by धनंजय
(पण आपणही
In reply to (पण आपणही by भडकमकर मास्तर
एकूण काय तर विनायकाच्या
In reply to एकूण काय तर विनायकाच्या by चतुरंग
हेच म्हणतो
In reply to हेच म्हणतो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
पण
In reply to हेच म्हणतो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
माझी
भडकमकरांशी सहमत
जड पण चांगला
मी लेख
खरतर मी
In reply to खरतर मी by सखाराम_गटणे™
विरामचिन्हांचं महत्त्व...
अग आई ग !
नमस्कार