१०५( की १०७?) हुतात्मे आणि वेगळा विदर्भ
लेखनप्रकार
पूर्वी १०५ आकडा दिला जाई, हल्ली हल्ली १०७ म्हटले जाते.( एक कोल्हापूरकर नाव आहे, दुसरे माहीत नाही). तर आपण सोयीसाठी १०७ हुतात्मे धरू. त्यांची संख्या इथे महत्वाची नाही तर त्यांच्या हौतात्म्याचे कारण महत्वाचे आहे.
वेगळ्या विदर्भाचा विषय निघाला की एकदम भावनिक मुद्दा काही हळवे मावळे पुढे आणत असतात. ' संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही' या आशयाचे वाक्य फेकले जातात. मी म्हटलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास पाहू जरा.
मराठी विश्वकोश वाचले(विकिपंडित म्हणू नये म्हणून. ;) ) तर कळले की हे बळी मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून गेले होते! विदर्भ महाराष्ट्रात यावा म्हणून नाही. मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती जणू, महागुजरात आणि महाराष्ट्र दोघांनाही पाहिजे होती.
केंद्र सरकारने मुंबईच्या प्रश्नाचा तिढा सोडविण्यासाठी ‘त्रिराज्य योजना’ जाहीर केली. या योजनेत सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ व मराठवाडयासह महाराष्ट्र आणि मुंबई हे शहरराज्य अशा प्रकारची तीन राज्ये स्थापन करण्याचा विचार मांडला. महाराष्ट्रास मुंबई दयावयास केंद्र सरकार तयार नव्हते. या वेळी घडलेल्या हिंसाचारात १५ माणसे ठार झाली.
पुढे केंद्राने जेव्हा मुंबई केंद्रशासित करायचा निर्णय घेतला तेव्हा पुन्हा उद्रेक झाला. या खेपेला ७६ लोकांचा बळी गेला.
तसेच निवडणुकांचे निकाल पाहिले तर महाराष्ट्र एकीकरण समितीला यश फक्त कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्र इलाख्यात मिळाले. मराठवाड्यात किंचित आणि विदर्भात अजिबात नाही. म्हणजे लक्षात येईल की, संयुक्त महाराष्ट्र किंवा मुंबईसह महाराष्ट्र हा विदर्भासाठी मुद्दा कधीच नव्हता! तेव्हा हुतात्मे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा वगैरे भावनिक मुद्दे विदर्भासाठी लागू होऊ शकत नाही. उद्या मुंबई वेगळी करायचे कोणी बोलले तर नक्कीच विरोध व्हावा, बळी मुंबईसाठी गेले आहेत!
या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा व्हावा की नाही हा नाही, तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की पश्चिम महाराष्ट्रातले लोकच जास्त तावातावात बोलतात हा आहे! मी विदर्भातला आहे त्यामुळे एवढे नक्की सांगू शकतो की आम्हाला मुंबई महाराष्ट्रात असावी की नको याचे सोयरसुतक नाही, आधीही नव्हते, आताही नाही. त्यामुळे मुंबईसाठी झालेल्या आंदोलनाचा संबंध विदर्भाशी जोडून उगाच भावनेला हात घालणाऱ्या पोस्टी टाकण्यात आणि भाषणे करण्यात अर्थ नाही. विदर्भ पूर्वी वेगळा होता, विदर्भाच्या लोकांनी महाराष्ट्रात समावेश व्हावा म्हणून आंदोलन केलेलं नव्हतं तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीस बळ मिळावे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विदर्भासोबत नागपूर करार करून त्यांना सोबत घेण्यात आले. आणि विदर्भ वगळता द्वैभाषिक राज्य मान्य होत नव्हते म्हणून समितीने नव्या द्वैभाषिक राज्यात विदर्भाला घेतले अन्यथा विदर्भ वगळून पण ते मुंबईसह द्वैभाषिक राज्याला तेव्हा तयार होते हे लक्षात घेतले पाहिजे. सगळे लफडे मुंबईपायी झालेत, विदर्भासाठी कुणी गोळ्या खाल्ल्या नाहीत तेव्हा.
अजून एक उदाहरण देता येईल ते आंध्रचे. आंध्र वेगळे व्हावे म्हणून पोट्टी श्रीरामुलु या नेत्याने (खरेखुरे) आमरण उपोषण केले. त्यांच्या बलिदानानंतर जे राज्य अस्तित्वात आले त्यात तेलंगण नव्हते. आताचे रायलासीमा आणि सीमांध्र होते. नंतर तेलंगण आले. आता जेव्हा तेलंगण राज्यासाठी चळवळ सुरु होती तेव्हा कोणीही पोट्टी श्रीरामुलु ह्यांच्या बलिदानाची आठवण करून देत बसले नाहीत. सगळे झगडे हैदराबादसाठी होते. हैदराबाद तेलंगणात नसते तर आंध्रच्या नेत्यांनी परत तेलंगण वेगळे करायला विरोधही केला नसता. आम्ही ना मुंबई मागत आहोत ना पुणे! नागपूरात पण असे काही नाही की पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यासाठी गोळ्या खाव्यात! उलट गोंदिया-गडचिरोलीला पोस्टिंग आली की जणू काळ्या पाण्याला पाठवले असे वाटते आणि मंत्रालयात खोके पोचवून ट्रान्सफर करवून घेतात. किती लोक तिकडून इकडे आनंदाने पोस्टींगवर पूर्ण वेळ राहतात? म्हणजे विदर्भावर तुमचे प्रेम उतू चालले आहे असेही नाही! मग वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की एकदम चिडून जाण्यासारखे काय आहे? आपण काहीतरी मोठ्ठे गमावतोय असे का वाटते? विदर्भ हा फक्त तुमच्या इगोला सुखावणारा एक फील गुड फॅक्टर आहे का? की विदर्भ म्हणजे 'प्राइझ्ड पजेशन' आहे तुमचे?
आपने खुल के मुहब्बत नहीं की है हमसे
आप भाई नहीं कहते हैं मियाँ कहते हैं
--मुनव्वर राना
वाचने
27998
वाचनखूण
प्रतिक्रिया
130
In reply to लेखकाच्या मुद्द्यावर माझे म्हणणे by नाना स्कॉच
परत एकदा
In reply to असे चुकीचे शब्द आपणच परत परत by नाना स्कॉच
खिक्क...काय राव...इतक्या लौकर
पूर्वग्रहदूषित विचारांनी लिहिलेला लेख!
In reply to पूर्वग्रहदूषित विचारांनी लिहिलेला लेख! by विद्यार्थी
+1
त्यापेक्षा असं केलं तर -
In reply to त्यापेक्षा असं केलं तर - by घाटावरचे भट
मा गो वैद्य चार राज्ये
In reply to मा गो वैद्य चार राज्ये by प्रकाश घाटपांडे
अहो आपलं उपर एक!
In reply to अहो आपलं उपर एक! by घाटावरचे भट
आम्हाला कोकणाची चार राज्य
हा विचार पण करा
In reply to हा विचार पण करा by पुतळाचैतन्याचा
मनापासून मांडलेय सारे. बर्
स्वाम्या,
In reply to स्वाम्या, by कैलासवासी सोन्याबापु
काहून फडफड करून र्हायले
In reply to काहून फडफड करून र्हायले by ए ए वाघमारे
आपन आपलं चुपचाप कोपर्यात
In reply to आपन आपलं चुपचाप कोपर्यात by कैलासवासी सोन्याबापु
टाईम आला की हळूचकन एक जोर्दार
In reply to स्वाम्या, by कैलासवासी सोन्याबापु
आलास सायच्या!! अब तुम लढो हम
In reply to आलास सायच्या!! अब तुम लढो हम by स्वामी संकेतानंद
लढा बाप्पू. आमी हावोत
In reply to लढा बाप्पू. आमी हावोत by अभ्या..
अभ्या भाऊ
In reply to आलास सायच्या!! अब तुम लढो हम by स्वामी संकेतानंद
लाज वाटते का फोकन्या स्वाम्या
In reply to स्वाम्या, by कैलासवासी सोन्याबापु
सगळे प्रांतवादी आले म्हणून
In reply to सगळे प्रांतवादी आले म्हणून by संदीप डांगे
काय संदीपान्भो. दोन दिस लेट
In reply to काय संदीपान्भो. दोन दिस लेट by अभ्या..
आरं बाबा. हिथं नाशकात हाय
In reply to सगळे प्रांतवादी आले म्हणून by संदीप डांगे
आळवे भांदले सारे ;)
लेख प्रचंड आवडला आहे.
In reply to लेख प्रचंड आवडला आहे. by गॅरी ट्रुमन
प्रचंड सहमत. वेगळा न करताही
In reply to प्रचंड सहमत. वेगळा न करताही by तर्राट जोकर
नको नको. वेगळाच करा काय ते
वेगळा मराठवाडा झालाच पाहिजे.
वेगळा मराठवाडा झालाच पाहिजे!
वेगळे राज्य आणि वेगळे राष्ट्र
In reply to वेगळे राज्य आणि वेगळे राष्ट्र by सातारकर
लावायला हरकत नाही पण
In reply to लावायला हरकत नाही पण by स्वामी संकेतानंद
अस गणित आहे तर
In reply to अस गणित आहे तर by सातारकर
माण्डीखाली दाबणे चुकीचा शब्द
In reply to वेगळे राज्य आणि वेगळे राष्ट्र by सातारकर
हेच तर कन्हैय्या आणि पार्टी
In reply to हेच तर कन्हैय्या आणि पार्टी by सोत्रि
वाहवा!
In reply to वाहवा! by स्वामी संकेतानंद
विषयावर नाना स्काॅच यांनी जे
ह्या स्वामीच्या धाग्यावरच
In reply to ह्या स्वामीच्या धाग्यावरच by कैलासवासी सोन्याबापु
तुले त माहीतच आहे का 'तिकडे'
भावनिक मुद्दे
In reply to भावनिक मुद्दे by मित्रहो
हेच..
एक अडाणी प्रश्न!
In reply to एक अडाणी प्रश्न! by सतीश कुडतरकर
कारण कोंकण 'कोंकण' आहे..