मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पराभव नक्की कोणाचा ?

सुहास पाटील · · काथ्याकूट
आजच्या सकाळ मध्ये एक बातमी आली आहे. दुवा खाली दिलेला आहे. http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4806917519386850610&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20150211&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%20%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87,%20%E0%A4%AE%E0%A4%97%20%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3?-%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE सकाळ ने सामन्या त आलेल्या अग्र लेखाची बातमी छापली आहे. ह्या बातमी वर मी माझे विचार मांडत अहे. ह्यावर मत मांडतान मी हे सांगू इच्छितो कि मी कोणत्याही राजकारणी पार्टीचा पुरस्कार करणार नाही आहे. मला वाटत जे सामन्यात येते ते शिवसेनेच मत असत. ‘सामना‘च्या अग्रलेखात म्हटले आहे, की राजकारणात कधीच काही चिरंतन नसते. देश जिंकला, पण दिल्ली हातातून निसटली. ‘केजरीवाल पाच साल’ हा नारा दिल्लीने स्वीकारला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने शिकावे. जमल्यास चिंतनही करावे आणि पुढे जावे असा दिल्लीचा निकाल आहे. पण इथे शिवसेना म्हणते आहे कि महाराष्ट्रच्या जनतेने चिंतन करावे , पण मला असे वाटते कि शिवसेनेने स्वतः चिंतन करावे. आम आदमी दिल्लित जिंकले कारण जनतेला एक चांगला पर्याय मिळाला. जातीधर्माच्या राजकारणा पलीकडे जाऊन जनतेने इथे मतदान केलेले दिसत आहे. शिवसेना अजूनही जनतेवर आणि भाजप वाट टीका करण्यात धन्यता मानते अहे. पण आप सारखा पर्याय जर सगळ्या राज्यांना मिळाला तर सर्व जनता ह्या बद्दल नक्कीच विचार करेल. मला वाटत हा पराभव ह्या सर्व राजकारणी पक्षांचा आहे जे फक्त जनतेची दिशाभूल करतात आणि खोटी आश्वासने देतात, जातीपातीचे राजकारण करण्यातच धन्यता मानतात. आप चा हा विजय सगळ्या राजकीय पक्षांना एक मोठा धडा आहे.

वाचने 14586 वाचनखूण प्रतिक्रिया 65

In reply to by मदनबाण

मदनबाण गुरुवार, 02/19/2015 - 13:35
इति "नमो कोट" पुराण :- मोदींना ‘तो’ सूट भेट मिळाला होता? 'मोदीसूट'साठी सव्वा कोटीची बोली मोदींच्या भाषण बाजीला आणि प्रत्येक कुठल्या ना कुठल्या नव्या शॉर्ट फॉम करण्याच्या सवईला लोक तर वैतागु लागलेच आहेत पण उध्योग जगताचा पेशन्स पण संपत चालल्याचे चित्र उभे राहत आहे ! पार्टी विथ डिफरर्न्स असे बिरुद मिरवणार्‍या बिजेपी कडुन कुठलाही "डिफरर्न्स" दिसुन येत नाहीये ! हेच चिंतेचे मुख्य कारण आहे ! काही तरी करा ! जनतेचा पेशन्स सुटत चालला आहे ! एक दुवा :- India should open up more to retain foreign interest: Jim Rogers थॅक्स टु जिम रॉजर्स !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?

शिवसेनेला महाराष्ट्रात स्वत:चं असं काही स्थान राहिलंय काय ? भाजपाने सत्ता स्थापन करतांना शिवसेनेचे काय बेक्कार हाल केलेत हे सर्व महाराष्ट्राने पाहिले. आणि आता शिवसेनेला वाटतं आपल्यालाही भविष्यात 'आप' सारखं घवघवीत यश मिळावं... अरे लोकांनी तुम्हाला संधी दिली तुम्ही किती उजेड पाडलाय तो पाहिलाय आम्ही. शिवसेना महाराष्ट्रातुन समुळ नष्ट तर होणार नाही, त्याबद्दल काही आत्मपरिक्षण करता येतं का पाहा म्हणावं...! -दिलीप बिरुटे

विशाल चंदाले Wed, 02/11/2015 - 12:50
मला वाटत हा पराभव ह्या सर्व राजकारणी पक्षांचा आहे जे फक्त जनतेची दिशाभूल करतात आणि खोटी आश्वासने देतात, जातीपातीचे राजकारण करण्यातच धन्यता मानतात. आप चा हा विजय सगळ्या राजकीय पक्षांना एक मोठा धडा आहे. --> +१००

पगला गजोधर Wed, 02/11/2015 - 13:50
आम आदमी दिल्लित जिंकले कारण जनतेला एक चांगला पर्याय मिळाला. जातीधर्माच्या राजकारणा पलीकडे जाऊन जनतेने इथे मतदान केलेले दिसत आहे.
जनतेमध्ये अशीच सकारात्मक विचारपद्धती राहो, आणी देव न करो उद्या आप सुद्धा जातीधर्माच, भाषा प्रांताच राजकारण करू लागलं, तर त्यानाही कोणी सक्षम पर्याय येवो.

चौकटराजा Wed, 02/11/2015 - 13:52
चिंतन बिंतन ही काय भानगड आहे ? शिवसेनेचा व तिचा काय संबंध ? एकवेळ आपल्या चुकांबद्द्ल भाजपा चिंतन करेल पण उधोजीराजे सोळाव्या शतकातून बाहेर पडतील तर... ना ? आजचे युग हे लोकशाहीचे आहे. हे शिवसेनेला पटणेच महा कठीण आहे. यात सार्वजनिक नेतुत्व असलेला पक्षच टिकून रहातो. काही वेळेस लायकी नसतानाही बाकीचे अधिक नालायक म्हणून काही टिकून रहातात. यातून धडा हाच की उद्धव, राज, गांधी कुटंब, लालू , जयललिता, ममता. मुलायम,मोदी, मायावती यांच्या जोखडातून त्या त्या पक्षांची मुक्तता होणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर केजरीवाल यानीही आपल्या योग्यतेची एक मोठी नेत्यांची लाईन तयार करणे गरजेचे आहे. नाहीतर आपची अवस्था कोंग्रेस सारखी दयनीय होईल.

In reply to by चौकटराजा

स्वधर्म Wed, 02/11/2015 - 14:33
पण हे यांना काय कळत नसेल काय? काहीही केलं, आपआपल्या पिलांनाच गादीवर जरी बसवलं, तरी ढिम्म जनता निवडून देते म्हटल्यावर ते तरी काय करणार? दिल्लीतल्या जनतेने कळप वृत्ती सोडली, म्हणूनच आपला विजय मिळाला. - स्वधर्म.

मिडियाचे हे सध्याचे खूळ आहे असे ह्यांचे मत. उद्या पांढरकवड्याला ग्रामपंचायतीची निवडणूक झाली तरी त्याचा संबंध नरेण्द्रशी जोडला जाईल. दिल्लीकरांनी जनादेश दिला आहे.मॅन्डेट का काय म्हणतात ते 'आ.प.' ला आहे.विषय संपला.आता नक्की कोणाचा पराभव हे कटिंग चहा,पॉप्कॉर्न्,सामोसे खात बोलायच्या गोष्टी. अवांतर- संजय(क्षीरसागरांचा) येथे पुन्हा लिहिता होईल अशी अपेक्षा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी Wed, 02/11/2015 - 22:07
>>> अवांतर- संजय(क्षीरसागरांचा) येथे पुन्हा लिहिता होईल अशी अपेक्षा. फक्त संजयच(क्षीरसागरांचा) लिहिता व्हायला हवा का? नानासाहेब(नेफळ्यांचा) नको वाट्टं?

In reply to by श्रीगुरुजी

माई मोड ऑन- श्रीगुर्ज्या. मृतात्मे कधी लिहितं असतात कै रे. नाना जाउन ६-७ महिने झाले की रे. कश्याला मज म्हातारीस रडवतोस. माई मोड ऑफ-

त्सुनामी हि कधीतरी एकदाच येते पण लाटा सारख्या धडकत असतात. संत एकनाथांचे एक भारुड आहे. त्यात एक भावजय आपल्या नणंदेच्या पोराला पटकी होऊ दे , म्हणून देवाला प्रार्थना करते. आजचा अग्रलेख वाचून व कालची परिषद त्याचीच आठवण झाली. मित्राचे वाईट होते आहे, म्हणून ज्याला असुरी विकृत आनंद होतो, तो माणूस पक्ष किती विश्वासपात्र?

विकास Wed, 02/11/2015 - 17:10
गुडीगुडी विधान वाटेल पण मला खरेच वाटते की हा राजकीय पक्षांच्या विजय-पराभवापेक्षा लोकशाही प्रक्रीयेचा विजय आहे. काही अंशी स्थानिक कारणांसाठी स्थानिक राजकारण करू शकणार्‍यांना मते दिली आहेत हे देखील वास्तव आहे. पण जर काम केले नाहीत, नकारात्मक राजकारण केलेत तर जनतेला यापुढे चालणार नाही... म्हणून फेकू म्हणून हिणावले गेलेले मोदी आणि भागोडा म्हणून उगाळले गेलेले केजरीवाल सत्तेवर आले आहेत. ८५च्या राजीव लाटेनंतर राजीव गांधींना देखील प्रामाणिकपणे काहीतरी चांगले करून दाखवायचे होते. काही अंशी त्यांच्या मुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन मोकळे होण्यास सुरवात झाली. ते त्यांचे श्रेय नक्कीच असेल. पण बाकी राजकारणाच्या बाबतीत "सत्तेचे दलाल" असे नुसते म्हणून काही बदलता आले नाही...आज तो पक्ष अक्षरशः रसातळाला गेला आहे. यासंदर्भात मला कायम लक्षात राहीलेली एक जुनी बातमी परत लिहीतो: ३/४ बहुमत असलेल्या लोकसभेत गांधी, मधु दंडवतेंना म्हणाले, पुढच्या निवडणुकीच्या वेळेस उरलेले बेंचेस पण काँग्रेसचेच असतील. दंडवते हसून फक्त एव्हढेच म्हणाले, तुम्ही अजून या क्षेत्रात लहान आहात. :) पुढचा इतिहास माहीत आहेच. आपचे असेच होईल असे म्हणत नाही. पण प्रत्येक राजकीय पक्षास आणि नेत्यास आपण कुठे बैल आहोत आणि कुठे बेडकी याचे भान ठेवत काम करावे लागणार आहे. जे करणार नाहीत ते मार खातील. हा मोठा विजयच आहे.

In reply to by विकास

हाडक्या Wed, 02/11/2015 - 21:04
+१ विकास, अगदी मनातले बोललात. त्याचबरोबर (दुर्दैवाने) व्यक्तिकेंद्रीत राजकारण अजूनही तितकेच प्रबळ आहे असे म्हणावे लागते. तरी अजूनही लोकशाही प्रगल्भ व्हायला बराच वेळ आहे पण वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे असे म्हणू शकतो (हे जगात तसे दुर्मिळच उदाहरण म्हणावे लागेल).

श्रीगुरुजी Wed, 02/11/2015 - 23:11
खरं तर हा पराभव बेदींचा नाही, भाजपचा नाही, अमित शहांचा नाही, मोदींचा तर नाहीच नाही. हा पराभव खर्‍या अर्थाने ओबामांचा आहे. ते बिचारे भाजपला जिंकविण्यासाठी १०००० मैलावरून दिल्लीत आले आणि तब्बल ३ दिवस दिल्लीत तळ ठोकून होते (असं आआपवाले म्हणतात बुवा). तरीही भाजप हरला. म्हणजे कोणाचा खरोखर पराभव झाला? :YAHOO:

In reply to by निनाद मुक्काम …

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 02/12/2015 - 00:05
काय रे हे निनाद्या?सग़ळ काही फुकट पाहिजे ही तर आपली भारतिय मानसिकता आहे.त्यात फक्त दिल्लीकरांना का दोष द्यायचा?खुद्द मिपावरच "जे काही फुकट ते सगळे पौष्टिक" असे अनेक मिपाकर म्हणत असतात.असो. आपच्या विजयाने एक बरे झाले असे हे म्हणतात- नरेण्द्र समर्थकांचे (वोट्स अ‍ॅपी) वन लायनर विनोद महिनाभरतरी येणार नाहीत.

बहुगुणी गुरुवार, 02/12/2015 - 07:00

हा राजकीय पक्षांच्या विजय-पराभवापेक्षा लोकशाही प्रक्रीयेचा विजय आहे.

-सहमत! मला वाटतं आणीबाणीनंतर खूप वर्षांनी 'राजकीय पक्षां'पेक्षा 'सजग मतदार' जिंकायला सुरूवात झाली आहे. १९७७ साली जयप्रकाश नारायण यांनी पटण्यात केलेलं विधान आठवलं: "This is a revolution, friends! We are not here merely to see the Vidhan Sabha dissolved. That is only one milestone on our journey. But we have a long way to go... After 27 years of freedom, people of this country are wracked by hunger, rising prices, corruption... oppressed by every kind of injustice... it is a Total Revolution we want, nothing less!" वरच्या विधानात After 27 years of freedom, ऐवजी After 67 years of freedom,इतकाच बदल केला तर जवळजवळ सगळी विधानं आहे तशी आजच्या दिल्लीतल्या (आणि बहुधा भारतातल्या) मतदारांना लागू पडतात. इथे केजरीवालांची जेपींशी तुलना करण्याचा हेतू नाही [तशी लोकनायक म्हणून करायचीच झाली तर कदाचित अण्णा हजारेंची करता येईल], पण तेंव्हा आणीबाणीच्या वेळी जशी जनता कंटाळून जागृत झाली होती, तशीच परिस्थिती इतक्या वर्षांनी अखेर आली आहे, त्यामुळे Total Revolution व्ह्यायला पोषक वातावरण आहे असं वाटतं.

In reply to by आनन्दा

हाडक्या Fri, 02/13/2015 - 15:20
अहो, ही जागी झालेली पिढी आहे ना ती ४० वर्षांनी आलीये म्हणजे मध्ये आलेल्या पिढ्यांनी घाण केलेली आहे नित्यनेमाने. तेव्हा अति झालं की एक पिढी जागी होतेय. नाहीतर ९० मधल्या बहुतेक पब्लोकने मतदानाच्या दिवशी फिरायला जाणेच केले ना. आणि स्वातंत्र्योत्तर ५० अणि ६० मधल्या लोकांनी तर भ्रष्टाचार हा राजरोस सुरु केला असे ही म्हणू शकतो. बाकी ७० च्या "क्रांती" मधले जे टिकले ते लालू, मुलायम आणि नितिश असावेत ही बाब आपली समाज मानसिकता दर्शवतेय, नाही का ?

In reply to by हाडक्या

सहमत हाडुकराव. आणि हेचं म्हातारे कोतारे नव्या पिढीच्या नावानी हाडं मोडतात...आपलं बोटं मोडतात... =))

शशिकांत ओक गुरुवार, 02/12/2015 - 09:31
आज रेडीयो पर आपकी फर्माइश कार्यक्रम मे बजनेवाले कुछ गाने... किरण बेदी - करवटे बदलते रहे सारी रात हम... 'आप'की कसम.... शाझिया ईल्मी - 'आप' मुझे अच्छे लगने लगे... केजरीवाल - 'आप'की आंखोमे कुछ मेहेके हुएसे ख्वाब है... दिल्ली की जनता - बेकरार करके हमे यूं ना जाईये 'आप'को हमारी कसम लौट आईये... मोदी - दिल मचलता है मेरा.. 'आप'के आ जानेसे.... अमित शाह - 'आप' यहा आए... किसलिये?? और अंतमे पप्पूकी स्पेशल फर्माईश... जीये तो जीये कैसे.... बीन 'आप'के

In reply to by शशिकांत ओक

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 02/12/2015 - 10:58
छान रे शशी. आता देशातील अनेक शहरांतील लोक म्हणत असतील- 'आप' जैसा कोई मेरे जिण्दगी मे आये, तो बात बन जाये.....

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुनील गुरुवार, 02/12/2015 - 11:04
आणि उद्या आपकडे इतर पक्षातील लोकांची रीघ सुरू झालीच तर, आम्ही म्हणू, "आपके कमरेमें कोई रहता है!" ;)

In reply to by शशिकांत ओक

विकास गुरुवार, 02/12/2015 - 17:33
दिल मचलता है मेरा... का दिल "धडकता" है मेरा? ;) आणि 'आप'की आंखोमे कुछ मेहेके हुएसे ख्वाब है...पेक्षा त्यातीलच, "आप की बदमाषियोंके ये नये अंदाज है" हे परत खरे झाले नाही म्हणजे मिळवले! :)

In reply to by शशिकांत ओक

आत्ता च्या कॉंग्रेस चे गाणे -"आप जैसा कोई मेरे जिंन्दगि में आए तो बात बन जांए! :-D आणि मोदी भेटीच्या पार्श्व भूमीवर भाजप चे गाणे -"आप की नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे... :P

हुप्प्या गुरुवार, 02/12/2015 - 23:28
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Raj-Thackeray-cartoon/articleshow/46210861.cms राज ठाकर्‍यांनी हे अत्यंत हीन वृत्तीचे प्रदर्शन करणारे व्यंगचित्र काढले आहे. कितीही प्रतीकात्मक म्हटले तरी अरविंद केजरीवाल हा आत्मघाती अतिरेक्यासारखा मोदी आणि अमित शहाला नष्ट करत आहे हे फारच खालच्या पातळीवरचे व्यंगचित्र आहे. उद्या पाकिस्तानने २६/११ च्या हल्ल्याच्या धरतीवर कसाबच्या रुपात केजरीवाल दाखवला आणि पेटलेल्या ताज आणि सीएस्टी च्या जागी अमित शहा आणि मोदींचे चेहरे असणारे व्यंगचित्र प्रकाशित केले तर कसे वाटेल? ९/११ चा हा तथाकथित विनोद २६/११ ला विनोदविषय करण्याइतका अश्लाघ्य आहे.

In reply to by हुप्प्या

विकास Fri, 02/13/2015 - 00:16
१००% सहमत. विषय निघालाच आहे म्हणून येथे लिहीतो... काही आप्टार्ड्स त्यांच्या चेपूवर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर आप ने भाजपाची आणि काँग्रेसची कशी जिरवली यावरून विनोद पाठवत होते. त्यात काहीच गैर नाही. किंबहूना काही नक्कीच ज्याला "सेन्स ऑफ ह्युमर" म्हणता येतील असे होते जे मला आवडले आणि हसायला देखील आले. मात्र त्यातील एक विनोद अत्यंत आक्षेपार्ह आणि हीन होता: (मला ते शब्द पूर्णपणे लिहवत नाहीत म्हणून जे काही लिहीले आहे त्यावरून समजून घ्या. इंग्रजी होता तो मराठीत सांगत आहे) "कोण म्हणते दिल्लीत ब*** आणि खू* होत नाहीत म्हणून? आज (म्हणजे निकालाच्या दिवशी) भाजपावर ब*** झाला आणि काँग्रेसचा खू* झाला आणो तो देखील आम आदमी कडून" आपल्या विचारसरणीचा/व्यक्तीचा/टीमचा/पक्षाचा विजय झाला अथवा आपल्याला नावडत्या विचारसरणीचा/व्यक्तीचा/टीमचा/पक्षाचा पराभव झाला तर आनंद वाटणे यात काहीच गैर नाही. त्यावर विनोद करणे देखील गैर नाही. पण ज्यामध्ये अनेक मुली, बायकांवर अत्याचार झाले आहेत अशा कृत्याचा अथवा ज्यात काही जणांना हकनाक जीव गमवावे लागले आहेत अशा कृत्याचा विनोद म्हणून वापर करण्यात, संस्कृती जाउंदेत कारण हे आप्टार्डस संस्कृती मानत नसावेतच, पण सर्वसाधारण जनमान्य असलेली सभ्यतापण विसरलेत का? मोदी जिंकल्यावर देखील अथवा आत्ता पण एकेंच्या विरोधात देखील काही विनोद मी बघितलेत ज्यात सेन्स ऑफ ह्युमर वाटला नाही किंबहूना irritating वाटले. पण असला अभिरूचीशून्य, खालच्या पातळीवरचा विनोद मात्र प्रथमच पाहीला आणि पाहून खेद वाटला. असो.

In reply to by कपिलमुनी

हुप्प्या Fri, 02/13/2015 - 19:57
मोदी वा शहांची टिंगल करायला आक्षेप नाही. तो आहे एका अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या हाहा:कारी घटनेचा विनोदाकरता वापर करण्याला. ९/११, २६/११, हिटलरचे होलोकॉस्ट, म्युनिचमधे केले गेलेले इस्रायली खेळाडूंचे अपहरण ह्या काही घटना अशा आहेत की ज्या दीर्घकाळ स्मृतीत रहातील. अनेकांनी आपले आप्त गमावले, कित्येकांचे जन्माचे नुकसान झाले. अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. इतक्या विध्वंसक आणि वेदनाकारक घटनेचा विनोदाकरता वापर करू नये असा संकेत आहे तो राज ठाकरेने पायदळी तुडवून हे असले व्यंगचित्र काढले. आर के लक्ष्मण ह्यांची उणीव जास्त तीव्रतेने जाणवते. मटाने ह्या व्यंगचित्राला इतके डोक्यावर का घ्यावे हे अगम्य आहे.

In reply to by कपिलमुनी

विकास Fri, 02/13/2015 - 21:27
ते पण चुकीचेच होते पण तुर्तास दोघेही नगण्य झाले आहेत. म्हणून केवळ, "मोदी जिंकल्यावर देखील अथवा आत्ता पण एकेंच्या विरोधात देखील काही विनोद मी बघितलेत ज्यात सेन्स ऑफ ह्युमर वाटला नाही किंबहूना irritating वाटले." इतकेच म्हणले. आणि हो मोदींना अथवा भाजपाच्या इतर कुणाला व्यक्तीगत चीपशॉट वापरत काही म्हणले असते अथवा व्यंगचित्र काढले असते तर वाटले नसते. पण वर राज ठाकरेच्या व्यंगचित्रात एकतर ज्यात हजारो माणसे (त्यात भारतीय पण होते) मेली त्याचा वापर केला, एकेंना अतिरेकी ठरवले हे सगळेच अति वाटले. विनोद करण्यास ना नाही. भारतीय मानसिकतेस (विशेष करून स्वतःवर केलेला) सेन्स ऑफ हुमर शिकणे गरजेचे आहे कारण त्यातून फुकाचा अहंकार जाण्याची शक्यता असते. स्त्रीयांवरील अमानुष अत्याचार आणि निर्घॄण हत्या यांचा उपयोग विनोद म्हणून करणे हे तर निचांक गाठणारे आहे असे वाटते. पण करणारे करतात पण त्याला आपण मान्य करणे, अनुमोदन देणे योग्य आहे का? हा प्रश्न आहे. मोदी सोडाच पण सोनिया - मनमोहन अथवा एकेंच्या वर केलेल्या असल्या चीपशॉट ला मी अनुमोदन देणार नाही...

In reply to by विकास

नाखु Fri, 02/13/2015 - 09:03
विनोदाची पातळी वर नेण्यापेक्षा व्याख्याच खालच्या पातळीवर नेऊन ठेवली की "हसे" आणि "हसू" एक्मेकांत अल्गद मिसळून जाते आणि जाणीवा बोथट होऊन आपण पुरोगामी होतो !!!!! जाता जाता : सरकारी/निमसर्कारी/सार्वजनीक जागी जिन्यात लावलेल्या देव देवतांच्या (सर्व धर्माच्या) कोपरा टाइल्सची आठवण झाली. थुंकण्याचा गलीच्छपणा अडवण्याकरीता देवाला त्या पायरीवर आणून ठेवणे आणि संबधीत पाठराखण यात फारसा भेद नाहीच.

ज्योति अळवणी Fri, 02/13/2015 - 08:22
आज राजकीय पक्षांनी विचार करणे आवश्यक आहे की आता जनता जागरूक झाली आहे. केवळ पैशाच्या जीवावर निवडणूक जिंकणे अवघड आहे. तसेच जनतेने देखिल हा विचार करणे आवश्यक आहे की केवळ नविन पर्याय आहे म्हणून तो निवाडावा की ज्यांच्याकडे विकासाचा ठोस आराखडा आहे त्या पक्षाचा विचार करावा. सर्व सामान्य माणसाला जर भ्रष्टाचार मुक्त राजकारण हव आहे तर मुळात त्याने नियमांचे उल्लंघन करणे बंद केले पाहिजे आणि आपल्या पातळीवरील लाच देणे बंद केले पाहिजे. अवघड आहे.... अशक्य नाही!

In reply to by ज्योति अळवणी

विकास Fri, 02/13/2015 - 09:19
सर्व सामान्य माणसाला जर भ्रष्टाचार मुक्त राजकारण हव आहे तर मुळात त्याने नियमांचे उल्लंघन करणे बंद केले पाहिजे आणि आपल्या पातळीवरील लाच देणे बंद केले पाहिजे. सहमतच पण.. सामान्य (पक्षि येथे मतदार) हे केवळ वैयक्तिक आयुष्यात लाच देणारेच नसतात. बर्‍याच वेळेस घेणारे देखील असतात. आता हे बघा ना, अर्ध्या दरात वीज आणि मोफत पाणी देऊ अशी लाच पुढे ठेवल्यावरच जनता मते देण्यास गेली. ;)

In reply to by विकास

>>>>> आता हे बघा ना, अर्ध्या दरात वीज आणि मोफत पाणी देऊ अशी लाच पुढे ठेवल्यावरच जनता मते देण्यास गेली. असंच म्हटलं तर.... विदेशातील काळा पैसा शंभर दिवसात आनु, प्रत्येक भारतीयांच्या खात्यात पंधरा लाख रुपये असतील, ३७० वे कलम रद्द करु, शंभर स्मार्ट शहरं करु. महागाई कमी करु, अशी आमिशं दाखवली आणि जनता मते देण्यास पुढे गेली. काय करायचं ते या स्वप्नाळु जनतेचं करावं लागेल. नुसत्या पोतडीची गाठ सोडायचा अवकाश की भारतीयांची गर्दी जमते. पोतडी उघडली की काय नसतं.... :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हुप्प्या Fri, 02/13/2015 - 10:52
उषःकाल होता होता काळरात्र झाली. आश्वासने उषःकाल असेल तर अंमलबजावणी काळरात्र आहे. पाच वर्षांनी आयुष्याच्या मशाली परत पेटवा आणि पुन्हा तेच नव्याने!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास Fri, 02/13/2015 - 21:54
असंच म्हटलं तर....विदेशातील काळा पैसा शंभर दिवसात आनु, प्रत्येक भारतीयांच्या खात्यात पंधरा लाख रुपये असतील, ३७० वे कलम रद्द करु, शंभर स्मार्ट शहरं करु. महागाई कमी करु, अशी आमिशं दाखवली आणि जनता मते देण्यास पुढे गेली. पहील्या "आमिशा"वरून बोंबाबोंब चालू केलेली आहेच की पब्लीकने. आणि करायलाच हवे. "प्रत्येक भारतीयांच्या खात्यात पंधरा लाख रुपये असतील, .." हे वाक्य मला जरा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वाटत आहे. असे कुठेही आश्वासन दिलेले नाही. भाषणात काळा पैसा किती बाहेर आहे आणि तो असला तर "जनतेचा पैसा" म्हणून दरडोई किती असू शकतो वगैरे म्हणलेले असू शकते... पण मला सांगा पब्लीकला काळा पैसा आणू म्हणून आश्वासन दिले आणि फुकट पाणी-वीज म्हणून आश्वासन दिले तर त्यात जास्त आकर्षक काय आहे? बाकी तुम्ही म्हणलेली आश्वासने झालीत का नाही हे बघायला नक्कीच वेळ द्यावा लागेल. या वेळेस एके पण एक गोष्ट शिकलेत आणि ते चांगले आहे. ती म्हणजे दहा दिवसात अमुक करू वगैरे आश्वासन दिलेले नाही. पब्लीकने मोदींना मते दिली ती पूर्ण पणे नेता म्हणून दिली आणि जे काही गेल्या दहा वर्षात झाले होते त्यापासून सुधारणा करण्यासाठी दिलेली आहेत. केजरीवालांच्या बाबतीत पण दिल्लीपुरते काही अंशी असेच आहे. फक्त आमिशं ही राज्याची आणि ती देखील एखाद्या मोठ्या महापालीकेइतक्या राज्याची आश्वासने ही जनतेला प्रत्यक्ष मदत होणारी अशीच असणार. (त्याची तुलना करायची असेल तर महाराष्ट्रात काय आश्वासने दिली गेली आहेत आणि किती आत्तापर्यंत पाळली जाण्याच्या "मार्गावर" आहेत हे पाहीले पाहीजे.) नुसत्या पोतडीची गाठ सोडायचा अवकाश की भारतीयांची गर्दी जमते. अगदी सहमत. पण कुठेतरी आशा आहे की पब्ली़क शहाणे होयला लागले आहे... :)

In reply to by विकास

>>>> "प्रत्येक भारतीयांच्या खात्यात पंधरा लाख रुपये असतील, .." हे वाक्य मला जरा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वाटत आहे. असे कुठेही आश्वासन दिलेले नाही. नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात असे आश्वासन दिले होते की विदेशातील बँकामधुन पैसे शंभर दिवसात आणुन प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करु असे म्हटले होते. (दै.लोकमत दुवा) ( जाहिरनाम्यात असं नाही, हे मला मान्य) >>>>> पब्लीकला काळा पैसा आणू म्हणून आश्वासन दिले आणि फुकट पाणी-वीज म्हणून आश्वासन दिले तर त्यात जास्त आकर्षक काय आहे ? काळा पैसा. >>>> पब्लीकने मोदींना मते दिली ती पूर्ण पणे नेता म्हणून दिली आणि जे काही गेल्या दहा वर्षात झाले होते त्यापासून सुधारणा करण्यासाठी दिलेली आहेत. अगदी मान्य. आणि अशी सुधारणा झाली नाही तर.. लोक अजुन दुसरा काही पर्याय निवडतील हेही तितकेच सत्य आहे. आणि दिल्लीने ती पायवाट पाडून दिली आहे. भविष्यात बहुमताचे सरकार भाजपाचे असेल असं मला आज तरी सरकारचे पाळण्यातले पाय पाहुन वाटत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास Sat, 02/14/2015 - 10:41
दैनिक लोकमत दुव्यात शहा यांनी म्हणल्याप्रमाणे मोदींचे वक्तव्य हे राजकीय वाक्प्रचार समजला पाहीजे. खालील त्यांचे ते वाक्य पहा. पब्लीकला काळा पैसा आकर्षक वाटत असेल असे मलाच काय इतर कुणालाही वाटेल असे वाटत नाही. किंबहूना दिल्लीवाल्यांना नक्कीच वाटत नाही असे जे काही तिथल्या लोकांकडून ऐकले आहे त्यावरून वाटते. आणि अशी सुधारणा झाली नाही तर.. लोक अजुन दुसरा काही पर्याय निवडतील हेही तितकेच सत्य आहे. आणि तस होयलाच हवे या मताचा मी आहे. माझे याच काय याच्या आधीच्या निवडणुकीच्या आधीचे खणून काढले तरी तेच म्हणलेले दिसेल... :) दिल्लीने ती पायवाट पाडून दिली आहे. नक्कीच आणि ते चांगले देखील झाले आहे. आज प्रथमच काहीतरी राजकीय इर्षेने चांगले काम घडण्याची शक्यता आहे. आत्ता पर्यंत काँग्रेसी संस्कृतीने अशा कशाला भावच दिला नव्हता... पण आत्ता भाजपा आणि आप हे दोघेही परफॉर्मन्सच्या बाबतीत सिरीयस वाटत आहेत. काय होते ते पहायला दोघांनाही वेळ देणे गरजेचे आहे. (आप ला पहील्यांदा देखील मी कधी टिकात्मक लिहीले नव्हते, लिहीणार नव्हतो. पण नंतर त्यांनी जो काही तमाशा चालू केला त्यातून दुसरा पर्यायच ठेवला नाही. असो.) भविष्यात बहुमताचे सरकार भाजपाचे असेल असं मला आज तरी सरकारचे पाळण्यातले पाय पाहुन वाटत नाही. फार दूरच्या भविष्याबाबत बोलत असलात तर कदाचीत मान्य ;) पण पुढच्या १० वर्षांसाठी बोलत असलात तर असहमत. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी Sat, 02/14/2015 - 15:21
>>> नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात असे आश्वासन दिले होते की विदेशातील बँकामधुन पैसे शंभर दिवसात आणुन प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करु असे म्हटले होते. (दै.लोकमत दुवा) ( जाहिरनाम्यात असं नाही, हे मला मान्य) हे असे कोठून पसरवले गेले असावे? मोदींचे वाक्य असे होते, (मूळ वाक्य हिंदीत आहे) "If we bring back black money, each citizen can get Rs.15-20 lakhs." १०० दिवसात विदेशातला काळा पैसा परत आणू आणि परत आणल्यावर प्रत्येकाला १५ लाख रूपये देऊ असे कोठेही आणि कधीही मोदी म्हणाले नव्हते. त्यांच्या या वाक्याचा असा अर्थ होता की प्रत्येक भारतीयाला १५ लाख रूपये मिळतील इतक्या मोठ्या प्रमाणात विदेशात काळा पैसा आहे. समजा हा सर्व काळा परत भारतात आला तरी तो कर चुकविलेला पैसा आहे. करचुकवेगिरीत सापडलेला पैसा असा नागरिकांमध्ये वाटतात का? त्यांचे मूळ वाक्य खालील चित्रफितीत आहे. https://www.youtube.com/watch?v=EbdFJ2vg3ic >>> >>> >>>>> पब्लीकला काळा पैसा आणू म्हणून आश्वासन दिले आणि फुकट पाणी-वीज म्हणून आश्वासन दिले तर त्यात जास्त आकर्षक काय आहे ? >>> काळा पैसा. काळा पैसा परत आणणे तितकेसे सोपे नाही आणि तो परत आणला तरी तो जनतेत वाटला जात नाही हे जनतेला नक्कीच समजत असणार. त्यापेक्षा फुकट वीज-पाणी अशी टँजिबल आश्वासने जास्त आकर्षक असतात. >>> >>> पब्लीकने मोदींना मते दिली ती पूर्ण पणे नेता म्हणून दिली आणि जे काही गेल्या दहा वर्षात झाले होते त्यापासून सुधारणा करण्यासाठी दिलेली आहेत. >>> अगदी मान्य. आणि अशी सुधारणा झाली नाही तर.. लोक अजुन दुसरा काही पर्याय निवडतील हेही तितकेच सत्य आहे. आणि दिल्लीने ती पायवाट पाडून दिली आहे. भविष्यात बहुमताचे सरकार भाजपाचे असेल असं मला आज तरी सरकारचे पाळण्यातले पाय पाहुन वाटत नाही. भविष्याचे आता तरी सांगता येणार नाही. सध्या तरी भाजपला राष्ट्रीय स्तरावर अजिबात समर्थ पर्याय दिसत नाही. डावे पक्ष संपले आहेत, काँग्रेस अत्यंत गलितगात्र अवस्थेत आहे आणि आआपला अजून स्वतःला सिद्ध करायचे आहे. काही राज्यात राज्यस्तरावर मात्र भाजपला पर्याय उपलब्ध आहेत. ओरिसा, तामिळनाडू, आंध्र, तेलंगण इ. राज्यात भाजपला नक्कीच सबळ पर्याय उपलब्ध आहे.

In reply to by श्रीगुरुजी

भाजपाला पर्याय नाही, भविष्यात सक्षम असा कोणताच पक्ष पर्याय नाही, हे सर्व सोडून द्या. विषय काय होता, पराभव नक्की कोणाचा ? दिल्लीत सरळ सरळ भाजपाला फटका बसलाय हा फटका नमोंनाही आहे, तेव्हा हा भाजपाचा पराभव आणि आपचा आणि लोकशाहीचा विजय आहे, विषय संपला. आता उगाच यांनी हे फुकट देऊ म्हटलं, ते फुकट देऊ म्हटलं. अहो, लोकांना माहिती आहे, काय काय फुकट मिळु शकतं. भाजपानेही आम्ही दुनियादारी फुकट देऊ म्हणायचं होतं त्यांना कोणी थांबवलं होतं. भाजपाचा नुसता जाहिरनामा वाचला तरी मी डोक्याला हात लावून बसतो की ही आश्वासनं कोणत्या इसविसनात पूर्ण होणारी आहेत. गुरुजी मी असं म्हणतो म्हणजे मी नमोंच्या किंवा भाजपाच्या विरोधी आहे, असं समजु नका. कुछ तो भाजपा और उनके नेतृत्व को करना पडेगा इतनी तो बात सच है. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी Sat, 02/14/2015 - 20:50
तुम्ही भाजप भविष्यात बहुमत मिळवेल की नाही याविषयी साशंक होता, म्हणून मी भाजपला सध्या तरी राष्ट्रीय स्तरावर पर्याय नाही असे लिहिले होते. धाग्याचा विषय होता पराभव नक्की कोणाचा? पराभव भाजप पक्षाचा व सर्व मुख्य पदाधिकार्‍यांचा आहे हे उघडच आहे. >>> आता उगाच यांनी हे फुकट देऊ म्हटलं, ते फुकट देऊ म्हटलं. अहो, लोकांना माहिती आहे, काय काय फुकट मिळु शकतं. भाजपानेही आम्ही दुनियादारी फुकट देऊ म्हणायचं होतं त्यांना कोणी थांबवलं होतं. नशीब भाजपने आआपच्या वरताण जाऊन आआपपेक्षा जास्त मोफत गोष्टी देण्याचं वचन नाही दिलं. निदान तेवढी तरी प्रभल्भता दाखविली.

In reply to by श्रीगुरुजी

नरेन्द्र मोदी यांच्या सहा सभा आणि भाजपची प्रगल्भता यामुळे भाजपच्या अनमोल अशा तीन सीट्स आल्या हे मला मान्य आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्धवटराव Fri, 02/13/2015 - 22:59
कलम ३७० तर आमिश म्हणुन कुठेच बसत नाहि. स्मार्ट शहरं हे फुकटचं आमिश नसुन ति आधुनीककाळची गरज आहे व त्याच्या फायद्याकरता जनतेला पैसा/श्रम मोजावेच लागणार आहेत. महागाई कमि करणं हि साठवण आणि दळणवळण यातींल त्रुटींचा सफाया करण्याचं वचन आहे, त्यात जनतेला फुकट काहिही मिळणारं नाहि. काळ्या पैशाबाबत वर विकासभौ म्हणतात तसं जुमलेवाली बात आहे असं मला वाटतं. शक्य असल्यास भाजप सरळ बोली लाऊन मतं विकत घ्यायला मागेपुढे पाहाणार नाहि याची मला खात्री आहे. पण लोकसभा आणि मध्यंतरीच्या विधानसभा निवडणुकांमधे मोदींनी भारताच्या अर्थनितीला उदारीकरणाच्या मार्गावर काहि बाधा येईल असं कुठलं वचन वा पाऊल उचलल्याचं फारसं बघण्यात आलं नाहि. इंधनाचे दर निचांकी गेल्यावर सुद्धा देशांतर्गत दर त्या प्रमाणात उतरवले नाहि. कि कुठल्या अनावष्यक सब्सिड्या द्यायच्या बाता झाल्या नाहित. सध्या एकेजींचे फॉलोवर्स त्यांचच लॉजीक वापरुन म्हणतात कि दिल्लीचं बजेट ४० हजार करोडचं आहे, त्यात अमुक एव्हढी सब्सीडी दिली तर काय बिघडलं... पण त्यातल्या बहुतेकांना हेच माहित नसतं कि ४० हजार करोड सर्प्लस पडीक नसुन त्याची विल्हेवाट अगोदरच लागलेली असते. असो. त्यांना समजवण्याच्या भानगडीत मी सहसा पडत नाहि. काहि महिन्यांपुर्वी अशा लोकांना खात्रीने वाटायचं कि एका इलेक्ट्रोनीक ट्रान्स्फरने सगळा काळा पैसा भारतात येऊ शकतो, पण ममो ते मुद्दाम करत नाहि, व समान नागरी कायदा आणणे म्हणजे फक्त मुस्लीमांना भारताच्या "मूळ" कायद्यात आणणे आहे. :)

हुप्प्या Fri, 02/13/2015 - 21:09
ह्या रणधुमाळीत ज्येष्ठ गांधीवंशपूजक कुमार केतकर कुणाची बाजू घेतील ह्याची उत्सुकता होती. त्यांनी आपल्या इमानाला जागून असे विधान केले की: "नीट पाहिले तर असे दिसेल की आपचा विजय हा काँग्रेस विचारांचा विजय आहे. केजरीवाल ह्यांचे बोलणे बारकाईने तपासले तर असे दिसेल की त्यांचे विचार थेट राजमान्य राजश्री राहुलजी गांधीच्या विचारांशी जुळतात.". थोडक्यात वरवर पाहिल्यास हा आपचा विजय आणि भाजपाचा पराभव वाटतो पण केतकरांप्रमाणे दिव्यदृष्टीचा चष्मा घातला तर त्यातून काँग्रेशी विचारांचा (म्हणजेच काँग्रेसचा (म्हणजेच राहुलजींचा)) विजय आहे असे स्पष्ट दिसते! धन्य धन्य त्या इमानी सेवकाची!

बर्‍याच प्रतिसादांतून आपल्या पसंतीच्या नेत्याची पाठराखण सर्वसाधारणपणे "तुमच्या नेत्यांनी असे केलेच होते ना ?" या अर्थांच्या वाक्यांनी केली जात आहे ! सर्वसाधारण शहाणपणा असे सांगतो की, "एकाच्या चुकीचे समर्थन दुसर्‍याच्या चुकीकडे बोट दाखवून करणे शहाणपणाचे नाही. दोन्ही चुका चुकाच असतात आणि दोन्ही सारख्याच असमर्थनिय असतात." बाकी चालू द्या.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आनन्दा Mon, 02/16/2015 - 16:20
अर्थातच.. बहुधा म्हणूनच आता मी एक धाडसी विधान करू इच्छित आहे - ते आहे "एके आता एक परिपूर्ण राजकारणी बनले आहेत". गेल्यावर्षी ते असे होते - "एके एकतर महाधूर्त राजकारणी आहेत किंवा महामूर्ख तरी". रामदेवबाबांनी ज्या चुका राजकारणात उतरताना केल्या त्या तरी एके करत नाहियेत. आणि किमान एकेंच्या राजकारण प्रवेशामुळे भाजपाला आता विकासकेंद्रित राजकारण करावे लागेल अशी अपेक्षा. बाकी ६७/७० एकेंच्या डोक्यात जाऊ नयेत अशी अपेक्षा. जे आत्ता तरी जाताना दिसत नाहियेत. यावेळेसचे एके जरा परिपक्व वाटतात. फायनली इट्स अ पॅकेज. आपण देत असलेले पॅकेज कालसुसंगत नाहिये हे एकेंना लवकरच कळेल. तेव्हा ते काय करतात ते बघायचे.