मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजकारण्यांची वैयक्तिक आयुष्य आणि भारतीय जनमानस

पिंपातला उंदीर · · काथ्याकूट
अशात बघण्यात आणि वाचण्यात आलेले दोन प्रसंग - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना वर्तमान पत्रात कुणी राजकुमारी कौल वारल्याची बातमी वाचण्यात आली . त्यांच्या अंतिम संस्काराला अरुण जेटली , ज्योतिरादित्य शिंदे आणि इतर बरेच दिग्गज उपस्थित होते . कोण होत्या या राजकुमारी कौल ? वाचून अनेकाना धक्का बसेल पण दिल्ली च्या राजकारणी वर्तुळात त्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'Constant Companion ' म्हणून प्रसिद्ध होत्या . वाजपेयी यांच्यासोबत एका घरात त्या अनेक वर्षांपासून राहात होत्या .ज्या दिवशी कौल वारल्या त्यादिवशी सोनिया गांधी वाजपेयी यांच सांत्वन करायला त्याना भेटल्या . मनमोहन सिंग यांनी पण दूरध्वनी वरून संपर्क साधला . नंतर बदनाम झालेले वाजपेयी यांचे 'मानलेले' जावई रंजन भट्टाचार्य हे कौल यांच्या मुलीचे श्रीमान . Indian Express ने 'Mrs Kaul, Delhi’s most famous unknown other half, passes away' असा मथळा देऊन हि बातमी छापली . वाजपेयी यांनी 'मै कुंवारा हु , ब्रम्हचारी नही ' असे विधान केले होते तरी हे संबंध कायम सर्व सामान्य लोकांसाठी 'under the wraps ' होते किंबहुना जाणून बुजून ठेवण्यात आले होते . अटलजी ची सर्वसामान्य लोकांमध्ये जी प्रतिमा होती ती ढासळू न देण्यासाठी हा खटाटोप होता . दुसरा प्रसंग - १४ नोव्हे . ला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो . पण त्यादिवशी 'कुजबुज ब्रिगेड ' च्या लोकांनी फेसबुक वर नेहरूंचे सिगरेट शिल्गाव्णारे , मद्याचा चषक हातात असणारे , महिलांसोबत जवळीक दाखवणारे (त्यातले बरेचसे Photo Shopped ) फोटो पसरवायला सुरुवात केली . उद्देश अर्थात नेहरू कसे बदफैली होते हे सिद्ध करण्याचा होता हे उघड होते . पण लेखाचा मुख्य मुद्दा हा नाही . नेहरूंचे सिगारेट पितानाचे फोटो टाकणारे अनेक परिचित स्वतः सिगारेट ओढतात . नेहरूंचे स्त्रियांसोबत फोटो टाकणारे अनेकजण स्त्रियांबद्दल काय 'नजरिया ' बाळगतात हे पण माहित होत . पण त्यांची अपेक्षा नेहरू हे आपले पंतप्रधान होते म्हणून त्यांनी काही गोष्टी करू नये अशी बालिश होती . राजकारणी हि पण माणस असतात आणि सर्वसामान्य लोकांसारखी स्खलनशील असतात हे भारतीय जनमानस का मान्य करत नाही ? धुम्रपान व मद्यपान ह्या जगातले अनेक लोक सहज करत असणारया गोष्टी पण राजकारण्याना चार चौघात करण्याची मुभा नसावी ? काही दिवसांपूर्वी प्रफुल पटेल यांचा एका पार्टी मध्ये हातात कॉकटेल चा ग्लास असणारा फोटो आल्यावर एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने त्यावर गहजब केला होता . म्हणजे वाजपेयी यांनी आजन्म ब्रम्हचारी राहील पाहिजे किंवा कुठल्या मोठ्या पदावरच्या माणसाने धुम्रपान करू नये अशा भाबड्या अपेक्षांचे काय करायचे हा प्रश्न आहे . कुठल्याही नेत्याचे मूल्यमापन करण्याचे निकष काय असावेत ? वैयक्तिक चारित्र्य का तो /ती त्याचे काम किती कुशलतेने करतो हा ? देश अस्थिरतेच्या गर्तेत असताना देशाला एक स्थिर सरकार देणे असो वा अर्थव्यवस्था वाढीचा वेग वाढवणे ; वाजपेयी यांचे हे कर्तुत्व ते एका महिलेसोबत राहतात यामुळे कमी होईल असे तत्कालीन भाजप नेतृत्वाला का वाटले असावे ? देशात लोकशाही रुजवणे , अनेक मुलभूत बदल घडवणे आणि स्वातंत्र्य लढ्यातल कर्तुत्व हे नेहरूंचे 'तसले ' फोटो टाकल्याने झाकोळून जाइल हा आत्मविश्वास त्यांच्या विरोधकांमध्ये कसा येतो . बिल क्लिंटन यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष च्या पहिल्या टर्म मध्ये मोनिका लेविन्स्की प्रकरण उघड झाले आणि मोठा गहजब उडाला . पण अमेरिकन जनतेने दुसऱ्यांदा पुन्हा बिल यांना निवडून दिले कारण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले , अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचा दबदबा पुन्हा प्रस्थापित केला . अमेरिकन जनतेने त्यांच्या देश चालवण्याच्या कौशल्याला दिलेली हि दादच होती . त्यासाठी त्यांनी क्लिंटन यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या त्या 'प्रकरणाकडे ' कानाडोळा' केला . दुटप्पी पणाची मोठी परंपरा असलेल्या आपल्या देशात असे होईल ? भारतीय नेते पण आपली 'Holier than cow ' अशी प्रतिमा बनावी यासाठी धडपडत करत असतात . आपण धुम्रपान /मद्यपान / सुंदर स्त्रियां सोबतचे छायाचित्र प्रसिद्ध होऊ नये यासाठी त्यांची धडपड चालू असते . बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा एखादा दिलदार नेता त्याला अपवाद . आपले हेनिकेन बीअर चे प्रेम बाळासाहेब यांनी कधी लपवले नाही . त्याना सतत ओढायला पाईप लागायचा . तुमच्या आवडी निवडी बद्दल तुम्ही unapologetic असाल तर तुमचे अनुयायी पण तुम्हाला स्वीकारतात ह्याचे बाळासाहेब ठाकरे हे उदाहरण . पण बहुतांश नेते लोकापवादाला घाबरून राहण्यातच धन्यता मानतात . राजकारणी आणि त्यांच्या आयुष्यात येणार्या स्त्रिया हा विषय राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये चवीने चघळला जाणारा विषय . नेहरू आणि लेडी Mountbatten हे याचे उदाहरण . त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबध होते याची चर्चा आपण चवीने करणे हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आपण करत असलेले आक्रमण नाही का ? सध्या मोदींच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा चालू आहे . त्यांनी सोडलेल्या त्यांच्या बायकोपासून ते 'पाठलाग ' करत असणारया स्त्रीपर्यंत अनेक विषयावर चवीने चर्वित चर्वण चालू आहे . हे सगळे जरी खरे आहे असे मानले तरी 'पंतप्रधान ' मोदी यांचे मूल्यमापन करण्याचा हा निकष असू शकतो का ? त्यांचे मूल्यमापन करण्याचा निकष त्यांनी महागाई कशी नियंत्रित केली , परराष्ट्र धोरण कसे राबवले , भ्रष्टाचार कसा नियंत्रित केला हा असायला नको का ? नेत्यांची वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य यांच्यात फरक केला पाहिजे असे माझे मत आहे . (एन . डी . तिवारी सारख्या नेत्याला अपवाद ठेवावे काय ?) अर्थातच हे अवघड आहे . लोकांना मोठ्या लोकांबद्दल आणि एकूणच gossiping करायला आणि ऐकायला आवडत . पण जेंव्हा नेता निवडीची वेळ येते तेंव्हा कुठल्या निकषांना जास्त महत्व देणे गरजेचे आहे हे लोकांनी ठरवायचे आहे . राजकारणी हि कितीही तिरस्करणीय जमात बनली असली तरी त्याना एवढा favor भारतीय जनते ने करावा . (लेखात थोडा preaching चा टोन आला असल्यास क्षमस्व )

वाचने 31009 वाचनखूण प्रतिक्रिया 143

छान धागा रे पिंपातल्या उंदरा.
पण जेंव्हा नेता निवडीची वेळ येते तेंव्हा कुठल्या निकषांना जास्त महत्व देणे गरजेचे आहे हे लोकांनी ठरवायचे आहे
ते तसे ठरवतातच असे आमचे मत.राजकारणि म्हंटले की तुमचे ते पब्लिक लाइफ आलेच ना? मग त्यात खाजगी आयुष्याची चौकशी होणारच.अटलजींचे हे प्रकार अगदी ७०च्या दशकापासून लोकांना परिचित होते.अर्थात ते योग्य की अयोग्य हा ज्याचा त्याचा प्रॉब्लेम. पण लोक चर्चा करणारच, नव्हे ती केलीच पाहिजे. दारूबंदी झालीच पाहिजे म्हणणारा घरी पेग लावत असेल तर आपण त्याचे भाषण ऐकू का? असे हे विचारतात.

आदूबाळ Sun, 11/16/2014 - 14:10
Holier than "cow"!! एकच नंबर. आवडल्या गेले आहे. (आगावपणाची सूचना - धागाकर्त्याने धाग्यात स्वतः प्रतिसाद दिल्यास स्पर्धकांचा उत्साह वाढेल)

एस Sun, 11/16/2014 - 14:26
मोनिका लेवेन्स्की प्रकरणानंतर साप्ताहिक सकाळमध्ये पाश्चिमात्य आणि भारतीय नेत्यांची व्यक्तिगत आयुष्ये आणि त्या-त्या जनतेचा त्याबाबतीतला उदारपणा ह्या विषयावर एक तौलनिक लेख आला होता. त्यामध्ये भारतीय मतदार हा उलट आपल्या नेत्यांच्या व्यक्तिगत आयुष्यांपेक्षा त्यांच्या राजकारणी म्हणून असलेल्या प्रतिमेवर जास्त विश्वास ठेवणारा आहे असे म्हटले होते. वरील उदाहरणांतही जास्त गहजब माजवणारी इंग्रजी प्रसारमाध्यमे होती हे लक्षात घेण्यासारखे आहे.

hitesh Sun, 11/16/2014 - 14:34
भारतीय राजकारणात या सगळ्या प्रकाराची सुरुवात कुजबुज संघाने केली अहे.

गांधीजींचे ब्रह्मचर्य टेस्टींगचे प्रयोग आरेसेसला फार आवडतात, कारण संघि त्याची फार चर्चा करत असतात. नेहरु एडविना हा तर संघिंचा आवडता विषय..........

दिवाकर देशमुख Sun, 11/16/2014 - 16:39
विकृत मानसिकता असणारेच अश्या पध्दतीची कृत्ये करतात. त्याच बरोबर गांधी जयंतीला माथेफिरुचे समर्थन करणारे पोस्टी फिरवणे हे देखील विकृतीच आहे. अश्या लोकांवर सरकारने त्वरीत उपचार चालु करावे. वाजपेयींच्या खाजगी आयुष्याची कोणत्याही पक्षाने अथवा कोणीही खिल्ली उडवली नाही. पण गांधीद्वेषाने भरलेले माथेफिरु लोक जागोजागी इतर पक्षांच्या पुढार्यांची अत्यंत वाईट पध्दतीने खिल्ली उडवत चुकिचा प्रचार करत फिरतात. मानसिकताच अशी असल्याने त्यांच्या डोक्यात असेच विचार येतात.

In reply to by दिवाकर देशमुख

धडपड्या Mon, 11/17/2014 - 12:23
अगदी बरोबर... गांधीद्वेषाने भारुन जाउन वाजपेयी, मोदी यांच्यावर चिखलफेक करणार्या "इतर" पक्षातल्या लोकांवर उपचार करण्यासाठी, सरकारने खास फॅसिलिटीज चालू करायल्या हव्यात... सोबतच गांधीच्या मार्गाने चालणार्या एन डी तिवारी, दिग्विजय यांसारख्या महान नेत्यांसाठी गांधीरत्न, गांधीभूषण वगैरे सारखे पुरस्कार सुरु करावेत...

In reply to by दिवाकर देशमुख

धडपड्या Mon, 11/17/2014 - 12:48
अरे वा! आपल्याला दिसतेही का? वा वा वा... बाकी गांधी म्हणजे नैतिकतेची, शुचितेची, सर्वोत्तम पातळी असे माननार्यांकडून आणखी काय अपेक्षा करणार? सोइचे तेवढेच घ्यायचे, बाकिकडे कानाडोळा करणे याच परंपरेचे सर्व पाईक... चर्चा करा म्हणलं, कि वैयक्तिक पातळीवर येणार... असो..

In reply to by धडपड्या

दिवाकर देशमुख Mon, 11/17/2014 - 13:17
तुमची अपेक्षा काय असते सगळ्यांना माहीत आहे. छत्तीसगड मधे जे झाले त्यावर मोदींना वेळ आहे का काही बोलायला ? एक शब्द नाही तोंडातुन निघाले वेळ देखील नाही का? आणि ऑस्ट्रेलियात जाउन भाषण देत आहे फोटो काढत आहे. त्यासाठी भरमसाठ वेळ आहे

In reply to by दिवाकर देशमुख

धडपड्या Mon, 11/17/2014 - 14:22
छत्तीसगढ़मध्ये जे झाले, त्या प्रकरणाचा इथे काय संबंध? उगाच आपलेच म्हणने रेटायला, नको ते मुद्दे आणू नयेत... असेही, आमच्या अल्पमतीनुसार, संबंधित कंपनीच्या मालकाला, मुलाला अटक झालेली आहे, आणि मुख्यमंत्र्यांच्या जावयाची चौकशी चालू आहे... यापुढे आपल्याला काय भाष्य अपेक्षित आहे मोदींकडून? अवांतर: शिरवळ मध्ये झालेल्या अपघातानंतर मोदींनी, आपला दौरा आटोपता घेउन, सार्वजनिक वाहन व्यवस्थेवर एक पत्रकार परिषद घ्यावी का??

In reply to by धडपड्या

प्यारे१ Mon, 11/17/2014 - 14:27
अवांतराबाबतः मुद्दा कदाचित योग्य असला तरी वाद करताना संवेदनाशून्यता दाखवू नये ही विनंती. शिरवळमध्ये झालेल्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले लोक त्यांच्या कुटुंबांसाठी मोदींपेक्षाही जास्त महत्त्वाचे असणार आहेत. असो!

In reply to by प्यारे१

धडपड्या Mon, 11/17/2014 - 18:04
फक्त मुद्यांची उतरंड पाहून असे टंकले... अपघातातील व्यक्तिंसाठी असंवेदना नाही... अपघातग्रस्त कंटेनरच्या थोडेच मागे आमची गाडी होती... तीथे धावणार्या सुरुवातीच्या लोकांमध्ये माझेही कुटूंब होते. ते दृश्य आठवूनही थरकाप होतोय.. फक्त सांगायचे एवडेच होते, की, काही बाबतीत आपण काहीच करु शकत नसतो. फक्त शब्द तीथे तोकडे असतात.. प्रत्यक्ष कृती महत्वाची असते, आणि ती होते आहे...

In reply to by धडपड्या

दिवाकर देशमुख Mon, 11/17/2014 - 18:05
तेच मोदी कडुन काय अपेक्षा आहे. अंबानीच्या हॉस्पिटलचे उद्घाटन करताना पीएमओ तर्फे ९ ट्विट केले गेले पण छत्तीस गड च्या घडामोडीवर एक ही ट्विट नव्हते? का ? याचा अर्थ सांगायची गरजच नाही म्हणा तरी तुमच्यासारखे भक्त अश्या गोष्टींना शुल्लकच लेखनार कारण तो भाजपाच्या राज्यात झाले आहे. काँग्रेसच्या नाही

In reply to by दिवाकर देशमुख

धडपड्या Mon, 11/17/2014 - 18:19
असुद्यात हो... आहोत आम्हि भक्त.. पण फक्त बोलघेवडेपणा करण्यापेक्षा कृती करणारे आम्हाला जास्त प्रिय आहेत... नाहीतरी सध्या "मोदी" असे दिसले तरी लोकांना उलट्या, जुलाब वगैरे चालू होतात... मुद्दा कोणताही असो, मोदींवर टांग वर केल्याशिवाय बरेच वाटत नाही...

In reply to by धडपड्या

दिवाकर देशमुख Mon, 11/17/2014 - 19:35
ट्विट का आले नाही त्यावर उत्तर नाही वाटते म्हणुन फाटे फोडायला सुरुवात केली वाचुन मात्र करमणुक झाली :)

In reply to by दिवाकर देशमुख

धडपड्या Mon, 11/17/2014 - 21:57
ट्विटर वापरता, की केवळ पेपरमध्ये वाचता? @pmoindia हे ट्विटर हॅंडल चेक करा सहा दिवसांपूर्वीचे... आपल्याला हवी ती ट्वीट मिळेल... करमणूकिचे म्हणाल, तर धन्यवाद... लोकांना हसवणे हे पुण्यकर्म मानले जाते... आज आपल्या गाठीशी भरपूर पुण्य जमा झाले असेल...

In reply to by धडपड्या

आनन्दा Mon, 11/17/2014 - 22:30
आणि अजून एक, ४ दिवसांपूर्वी पेपरमध्ये अशीदेखील बातमी होती की पंतप्रधांनी छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांशी ३० मिनिटे चर्चा केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. पण असो.. तुम्ही ते वाचाल अशी अपेक्षा नाहीच आहे. जाता जाता, तुम्ही खाली माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही, अजूनही.

In reply to by दिवाकर देशमुख

आनन्दा Tue, 11/18/2014 - 11:34
ह्म्म.. म्हणजे तुमची अशी अपेक्षा दिसतेय की त्यांनी ते जी२० वगैरे रद्द करून भारतात मुक्कम ठोकायला होता.. म्हणजे मग तुम्ही उलटे बोम्ब मारायला मोकळे.

In reply to by दिवाकर देशमुख

खटपट्या Tue, 11/18/2014 - 23:23
मोदी फिरायला गेले तरी त्यांचे बारीक लक्ष भारतातील घडामोडींवर आहे. शरद पवारांनी केलेल्या सफाई अभियानाचे त्यांनी फेसबुकवर कौतुक केले.

रामदास Sun, 11/16/2014 - 18:52
हे गृहस्थ वर्‍हाडातील मोठे नेते. यांच्या रंगीत जीवनाबद्दल अनेक किस्से सांगीतले जातात. एका निवडणूकीपूर्वी हे अमेरीकेचा दौरा करून आले होते. त्यांच्या विरोधकांनी एक भुमका मतदार संघात पसरवली ती अशी की साहेब अमेरीकेतून असा गॉगल घेऊन आले आहेत की त्यातून त्यांना आरपार दिसते. तसे हे नेते कायम गॉगल वापरायचे. प्रचाराला बाहेर पडल्यावर एकाही घराचे दार उघडेना. निवडणूकीत पडले.

In reply to by रामदास

@रामदास - भन्नाट किस्सा . ग्रामीण राजकारणात कसले भन्नाट ideas लढवल्या जातील सांगता येत नाही

बोका-ए-आझम Sun, 11/16/2014 - 20:14
मस्तच हो उंदीरमामा! फक्त एक तपशिलाची गफलत आहे - मोनिका लेविन्स्की प्रकरण बिल क्लिंटन यांच्या दुस-या टर्ममध्ये उघडकीला आले - १९९८ साली. क्लिंटनची पहिली टर्म ही जानेवारी १९९३ ते नोव्हेंबर १९९६ होती. मोनिका व्हाईट हाऊसमध्ये १९९५-९७ हा काळ काम करत होती. पण हे झालं तपशिलाबद्दल! मुद्दा एकदम बरोबर आहे!

In reply to by पिंपातला उंदीर

पिवळा डांबिस Mon, 11/17/2014 - 11:35
मी लिहिणार होतो तितक्यात श्री. बोका ए आझम यांनी चूक नजरेस आणून दिलीच आहे. पण श्री. पिपातला उंदीर, ही तुमची केवळ तपशीलातली चूक नाहिये. कारण या चुकीमुळे तुमचं पुढलं सगळं प्रतिपादन,
पण अमेरिकन जनतेने दुसऱ्यांदा पुन्हा बिल यांना निवडून दिले कारण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले , अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचा दबदबा पुन्हा प्रस्थापित केला . अमेरिकन जनतेने त्यांच्या देश चालवण्याच्या कौशल्याला दिलेली हि दादच होती .
हे सगळं चूक ठरतंय. कारण बिल क्लिंटनचं हे वागणं आणि तरीही हिलरीचं त्याला न सोडणं यावर नाराज असलेल्या अनेक अमेरिकन स्त्रिया (डेमोक्रॅट्सचा हुकमी मतदारसंघ) मला माहिती आहेत. क्लिंटनची ती दुसरी आणि अखेरची टर्म होती म्हणून तो आणि डॅमोक्रॅटस निभावले, नाहीतर बिल-हिलरीची खैर नव्हती....

In reply to by पिंपातला उंदीर

पिवळा डांबिस Mon, 11/17/2014 - 11:58
बाकी इतक्या मोकळेपणी तुम्ही मान्य केलेलं पाहून खरोखरच बरं वाटलं. अशा चुका होतात लिहिण्याच्या भरात, पण त्या मोकळेपणाने मान्य करणारे विरळा... त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंद्न!

In reply to by पिवळा डांबिस

विकास Tue, 11/18/2014 - 01:03
क्लिंटनची ती दुसरी आणि अखेरची टर्म होती म्हणून तो आणि डॅमोक्रॅटस निभावले, नाहीतर बिल-हिलरीची खैर नव्हती.... दुसर्‍या टर्मच्या शेवटी हिलरी डेमोक्रॅट्सचा (बर्‍यापैकी) हुकमी मतदारसंघ असलेल्या न्यूयॉर्क राज्यातून सिनेटर म्हणून निवडून आली. त्याच वेळेस अ‍ॅल गोअरला नैतिकतेचा झटका आल्याने, त्याने क्लिंटनला प्रचारापासून लांब ठेवले, परीणामी हरला...त्या उलट नळावरील भांडणापेक्षा कडाक्याची भांडणे प्रायमरीत केल्यावरही बिल आणि हिलरी यांच्याकडून ओबामाने दोन्हीवेळेस प्रचार करवून घेतला आणि दॅट टूक "केअर" ऑफ ओबामा अँड ओबामाकेअर! ;) बाकी जर मियॉ-बिबी राजी असले तर काही प्रश्न नाही. पण त्यातून कुणावर बळजबरी होत असेल तर तो मुद्दा आणणे अयोग्य नाही. तेच एन डी तिवारींसारख्या केसेस बद्दल (विशेष करून पितृत्व नाकारण्यासंदर्भात). तसेच, जर राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकणारी भानगड असेल तर त्याबद्दल त्या संदर्भातूनच मतपरीवर्तन करण्यात काही गैर नाही. या दुसर्‍या मुद्यासंदर्भात शशी थरूर यांची पाकीस्तानी पत्रकार स्त्री बरोबरची कथित मैत्री (संबंध होते का माहीत नाही, तो मुद्दा नाही) आणि त्यावरून बोलल्यावर काही दिवसात झालेला सुनंदा थरूर यांचा गूढ मृत्यू हे कदाचीत एक गंभीर उदाहरण होऊ शकते.

चिरोटा Sun, 11/16/2014 - 21:29
कर्नाटकचे एक माजी मुख्यमंत्रि परदेश दौर्यावर जाताना आपल्याबरोबर मॉडेलसचा ताफा नेत.तामिळनाडूचे करूणानिधी ह्यांना दोन का तीन बायका होत्या.एका तामिळ मित्राच्या सांगण्यानुसार मतदारांनाही ह्याची कल्पना असायची पण त्यांची लोकप्रियता काही घटली नाही.कर्नाटकचे रामकृष्ण हेगडे ह्यांचे एका मोठ्या नर्तकीबरोबर संबंध होते.त्यांनी तिला न्युयॉर्कमध्ये घरही घेऊन दिले होते.पण हेगडे काम करणारे म्हणून प्रसिद्ध होते व त्यांची लोकप्रियता टिकून होती.

हुप्प्या Sun, 11/16/2014 - 23:03
कुठल्याही पुढार्‍याने आपली राजकीय ताकद, आपला प्रभाव ह्याच्या जोरावर संबंधित मुलीला भुलवून, लालूच दाखवून संबंध प्रस्थापित केले असतील तर ते निव्वळ वैयक्तिक म्हणता येत नाही. त्यांच्या राजकीय वजनाचा त्यात सहभाग आहे म्हणून ते लोकांपुढे येणे गैर नाही. आणि पुढार्‍यामधेही हिंमत असायला हवी की तो ठणकावून म्हणू शकला पाहिजे की होय मी लफडे केले. क्लिंटनने ही हिंमत दाखवली नाही. त्याने खोटारडी जबानी दिली. माझे ह्या महिलेशी कोणतेही लैंगिक संबंध नव्हते अशा अर्थाचे वाक्य टिंगल करण्याकरता वारंवार दाखवले जाते. अशा प्रकारे जेव्हा पुढारी आपले लैंगिक उपद्व्याप लपवू पहातो तेव्हा त्याचे लफडे बनते. जिथे लोकशाही असते तिथे ह्या वस्तुस्थितीला महत्त्व द्यायचे का नाही हे लोकांनीच ठरवायचे आहे. त्यांना आपला पुढारी कुटुंबवत्सल, रामाप्रमाणे एका बायकोशी एकनिष्ठ असणारा असावा असे वाटत असेल तर त्यांना तो अधिकार आहे. आता नेहरू व गांधींकडे येऊ. गांधीवाद म्हणून ज्या तत्त्वांचा उदोउदो केला जातो ती तत्त्वे सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य तसेच पंचा प्रकरण घडल्यापासून साधी रहाणी ज्यात व्यसनापासून अलिप्त असणे अभिप्रेत होते. तर अशा गांधीवादाचा टेंभा मिरवणारे नेहरू आणि गांधी जेव्हा स्त्रियांशी लगट करताना दिसतात, सिगरेट वगैरे व्यसने करताना दिसतात तेव्हा ते विसंगत वाटते आणि त्यात ढोंगीपणा दिसतो. गांधीवादात उल्लेखलेली ही तत्त्वे अव्यवहार्य आहेत. त्यांना नको इतके डोक्यावर बसवून लोकांच्या अपेक्षा वाढवणे हे चूक होते.

रमेश आठवले Mon, 11/17/2014 - 00:06
विधुर नेहरूंचे काही स्त्रीयांशी सम्बद्ध होते असे साङ्गतात. हि बाब एरवी त्यांची खासगी बाब मानता येइल. पण आधी viceroy आणि १५ ऑगस्ट १९४७ नंतर governor general (gj) म्हणून नेहरूंचे बॉस असणाऱ्या mountbatten यांच्या पत्नीशी त्यांचे सम्बद्ध असणे हि खाजगी बाबत मानता येत नाहि. गुप्त हेरांनी या भानगडीची माहिती mountbatten यांना दिली नसेल असे वाटत नाहि. फाळणीच्या आधीच्या आणि नंतर जिना यांच्याशी झालेल्या त्रि पक्षीय वाटाघाटीत हे दुखावलेले gj निष्पक्षपाती राहिले असतील का ? फाळणी नंतर viceroy ने gj म्हणून रहावे याची खटपट नेहरूंनी का केली असावी ? पाकिस्तानने तसे केले नाहि. काश्मीरबाबत नेहरूंचे निर्णय gj च्या प्रभावाखाली घेतले गेले नाहीत का ? हे प्रश्न भारताच्या भवितव्याशी निगडीत आहेत.

In reply to by रमेश आठवले

@आठवले - नेत्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यामधील गोष्टी मिळवण्यासाठी आपल्या समाजामधील clout चा वापर करणे सर्वथैव अयोग्यच . वाजपेयी यांच्या सत्ता काळात रंजन भट्टाचार्य हे एक घटनाबाह्य सत्ताकेंद्र बनले होते . मोदी यांनी पण 'त्या ' महिलेचा पाठलाग करताना सरकारी यंत्रणेचा वापर केल्याचे आरोप आहेत . नेहरू हे hardcore गांधीवादी कधीच नवते . त्यांच्यावर पाश्चात्य विचाराचा आणि राहणीचा पगडा होता . लेडी mountbatten यांच्या आणि नेहरू यांच्या संबंधाचा गवगवा झाल्याने mountbatten यांच्या भारताकडे बघण्याच्या दृष्टीकोनात पूर्वग्रह आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तुमच्याशी सहमत . अवांतर - वाजपेयी यांचे राजकुमारी कौल यांच्याशी असणारे संबंध हे दिल्लीच्या वर्तुळात सगळ्याना माहित असले तरी त्याचा वापर प्रचारात कॉंग्रेस यांनी वाजपेयी यांचे प्रतिमा हनन करण्यासाठी कधी केला नाही हे मान्य करावे लागेल . Give devil his due

In reply to by पिंपातला उंदीर

आनन्दा Mon, 11/17/2014 - 11:08
हो.. जिथे नेता प्रामाणिकपणे या गोष्टींची कबुली देतो तेव्हा असे प्रश्न येत नाहीत. वर रमेशसाहेबांनी म्हणल्याप्रमाणे जेव्हा नेत्याची उक्ती आणि कृती यांमध्ये अंतर दिसायला लागते तेव्हाच हे प्रश्न निर्माण होतात. नेहरूंचे पण तसेच आहे - त्यांचे नेमके लेडी माऊंट्बॅटनसोबतच संबंध(?) कसे, प्रश्नचिन्ह अशासठी की ते संबंध नेमके कोणत्या प्रकारचे होते याबद्दल मला माहीत नाही. पण खरेच असेल तर या संबंधांचा गव्हर्नर जनरलने उपयोग करून घेतला नसेलच असे कशावरून? (संबंध असतील तर) याच नेहरूंनी हिंदू मॅरे़ज अ‍ॅक्ट पास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती हे विशेष. गांधींबद्दल असेच आहे - गांधींची मूळ तत्वे कोणती? अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, गांधी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात ब्रह्मचारी होते हे सत्य आहे (असेल असे मी मानतो, पण त्यांचे ब्रह्मचर्याचे प्रयोग कोणाचे तरी शील पणाला लावून चालले होते. ही हिंसा नव्हे का? किंबहुना आपल्या ब्रह्मचर्याची परीक्षा करण्यासाठी नग्न तरूणींना बिचान्यात घेऊन झोपणे हे सामाजिक ब्रह्मचर्याचे उदाहरण होऊच शकत नाही.) असो, कोणीतरी नेहरू/गांधींना ओढले आहे म्हणून लिहावे लागले. इत्यलम. तरीही त्यांच्या जयंतीच्या दिवशी मुद्दाम त्यांच्या चारित्र्यावर चिखलफेक करणे कदाचित अयोग्यही असेल, पण इतर लोकांनाही त्याच दिवशी लोकांना गांधी नेहरूंची आठवण येते हे देखील तितकेच खरे ना?

In reply to by आनन्दा

चिगो Wed, 11/19/2014 - 13:08
गांधीजी ब्रम्हचर्य पाळायचे? ब्रम्हचर्याचा जो साधारण अर्थ आपल्या सर्वांना अभिप्रेत आहे, त्या अर्थाने गांधीजी कधीच ब्रम्हचारी नव्हते. पत्नी आणि मुलेबाळे असणारा गृहस्थ होता तो..
आपल्या ब्रह्मचर्याची परीक्षा करण्यासाठी नग्न तरूणींना बिचान्यात घेऊन झोपणे
हा प्रयोग त्यांनी स्वतःच्या मना-इंद्रियांवरील ताबा तपासण्यासाठी केला होता, असे वाटते. त्याला संबंधित स्त्रियांची सहमती होती, असे वाटते..

In reply to by पिंपातला उंदीर

आनन्दा Mon, 11/17/2014 - 11:10
अवांतर - वाजपेयी यांचे राजकुमारी कौल यांच्याशी असणारे संबंध हे दिल्लीच्या वर्तुळात सगळ्याना माहित असले तरी त्याचा वापर प्रचारात कॉंग्रेस यांनी वाजपेयी यांचे प्रतिमा हनन करण्यासाठी कधी केला नाही हे मान्य करावे लागेल . Give devil his due
असहमत. वाजपेयींनी जाहीर स्वीकृती केली म्हणून काँग्रेसला काही करता आले नाही. नाहीतर मोदींच्या बाबतीत काय झाले ते सार्‍यांना ठाऊक आहे..

In reply to by आनन्दा

दिवाकर देशमुख Mon, 11/17/2014 - 12:13
जाहीर स्वीकृती म्हणजे काय रे भाउ तसे एनडी तिवारी ने देखील जाहीर स्वीकृती दिली म्हणुन बहुदा आशिर्वाद घ्यायला राजनाथ गेले होते ? ;) मोदी चे जासुसी प्रकरण काय होते ते जरा सांगतात का मग ?

In reply to by दिवाकर देशमुख

आनन्दा Mon, 11/17/2014 - 12:54
इथेच वर आलेले आहे - वाजपेयींनी स्वतः मान्य केले- मी अविवाहित आहे, ब्रह्मचारी नाही म्हणून.. हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर. मोदींचे जासूसी प्रकरण हा सरकारचा 'सर्वसामान्यांच्या जीवनातला हस्तक्षेप' या सदरात जाते, वैयक्तिक चारित्र्य या भागात येत नाही. तस्मात इथे पास - वेगळ्या धाग्यावर चर्चा करू. आता उरले एन डी तिवारी - त्यांनी जाहीर स्वीकृती दिलेली नाही - उलट त्यांच्या मुलाने त्यांची जबरदस्ती स्वीकृती घेतली आहे. आता राजनाथ सिंग त्यांना भेटायला का गेले या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही, कारण ते निवडणूकीपूर्वीचे राजकारण आहे आणि मी काही राजनाथ सिंगांचा समर्थक नव्हे. पण मला त्यात काही वावगे देखील वाटत नाही कारण राजकारण म्हणले की अश्या काही गोष्टी येतात. आणि तसेही एखाद्याच्या मित्रपरिवारात चारित्र्यहीन लोक असल्यानुळे तो लगेच चारित्र्यहीन होत नाही. आणि जाता जाता - बहुधा काँग्रेस इतरांच्या (वाईट ?)चारित्र्याचा राजकारणासाठी उपयोग करत नाही असे म्हणण्याचा अधिकार तुम्हीच घालवला आहे. कारण वरील तीनही गोष्टींचा कोंग्रेसने पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे. आणि त्याचे पुरावे तुम्हीच वर दिलेले आहेत.

In reply to by आनन्दा

दिवाकर देशमुख Mon, 11/17/2014 - 13:14
मोदींनी सरकारी व्यवस्था जासुसीसाठी वापरली होती त्यामुळे त्याला हायलाईट केले गेले आहे. तिच्याशी काय संबंध आहे त्यावर कोणत्याही काँग्रेस नेत्याने टिप्पणी केली नाही ( केली असल्यास पुरावा देउन मगच बोलावे ) राहिले तिवारी त्याचा संबंध तर भाजपाबरोबर देखील आहे त्याचे कर्म तो भोगत आहे .

In reply to by दिवाकर देशमुख

आनन्दा Mon, 11/17/2014 - 13:40
हा घ्या.. अजून अहे तर अजून देतो. ही काँग्रेसच्या परपपूज्यांची बातमी आणि मुख्य म्हणजे विषय वैयक्तिक चारित्र्याचा आहे, सरकारच्या वैयक्तिक अवकाशातील घुसखोरीचा नव्हे. मोदींचे स्नूपगेटमध्ये काही पर्सनल इंटरेस्ट (चारित्र्याशी संबंधित) होते का याबद्दल तुमच्याकडे काही पुरावे असतील तर द्या आणि मग आपण मान्य करू की ही चर्चा इथे संयुक्तिक आहे म्हणून.

In reply to by आनन्दा

दिवाकर देशमुख Tue, 11/18/2014 - 11:25
मी आशा करतो की आपणास इंग्रजी वाचता येत असेल आणि त्याच्या शब्दांचा अर्थ देखील लावता येत असेल. धन्यवाद आणि येत नसल्यास मराठी आणि हिंदी वर्तमानपत्रातली बातमी वाचा आणि मग बोला.

In reply to by दिवाकर देशमुख

आनन्दा Tue, 11/18/2014 - 12:04
हा हा हा. चूक झाली खरी. तुमचा वरचा प्रतिसाद वाचला नाही. पण तरीही मला हसू आवरत नाही कारण तुम्ही ती बातमी मोदींच्या चारित्र्याशी जोडली आहे. जर त्या काळातील बातम्या नीट वाचल्या तर तुम्हाला हे कळून येईल की त्यामध्ये मोदींचे पर्सनल इंटरेस्ट नसून राजकीय इंटरेस्ट होते. आणि मी कधीपासून ओरडून हेच सांगतोय की यामध्ये मोदींचे चारित्र्याशी संबंधित पर्सनल इंटरेस्ट आहेत हे सिद्ध करा, आणि मग आपण या गोष्टीवर इथे चर्चा करू, नाहीतर वेगळ्या धाग्यावर चर्चा करू. नाहीतर या धाग्यावर मोदींना ओढून धागा भरकतवू नका. मोदींच्या पत्नीबद्दल इथे चर्चा होऊ शकते, पण तो मुद्दा इथे कोण काढत नाहीये.

In reply to by आनन्दा

दिवाकर देशमुख Tue, 11/18/2014 - 16:13
मी वर आधी काय मुद्दा स्पष्ट केला आहे तो कृपया आधी वाचावा. " जसे त्या लोकांनी गांधी परिवार आणि नेहरुंबद्दलची विषवल्ली जशी लावली तशी काँग्रेस नेत्याने अथवा कार्यकर्त्याने कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अथवा सोशल मिडीयावर लावली आहे नाही" उलट गोडसेवर असणार्‍या नाटकाला देखील काँग्रेसच्या सरकारनेच मंजुरी दिली हे विसरु नये. मोदीच्या पत्नीवर चर्चा करायची काही एक गरज नाही ती त्यांची खाजगी बाब आहे. काँग्रेस ने मुद्दा निवडणुक फॉर्म भरताना जागा मोकळी का सोडली जेव्हा लग्न झाले आहे.केवळ हाच उचललेला" बाकी त्यांचे संबंध कसे आहे वगैरे इतर बाबींची चर्चा पक्षाकडुन कुठे ही जाहीररित्या केलेली नाही.

In reply to by दिवाकर देशमुख

विकास Tue, 11/18/2014 - 17:53
उलट गोडसेवर असणार्‍या नाटकाला देखील काँग्रेसच्या सरकारनेच मंजुरी दिली हे विसरु नये. मी ते नाटक जालावर देखील पहाण्याच्या भानगडीत पडलेलो नाही. फक्त मुद्दा वेगळा आहे म्हणून लिहीत आहे... त्या नाटकावर १९८९ साली प्रथम बंदी घालण्यात आली होती. तेंव्हा मला वाटते काँग्रेसचेच (शरद पवार मुख्यमंत्री) सरकार होते. नंतर केंद्र एनडीए - राज्ययुतीच्या काळात ते नाटक परत आणण्याचा घाट घालण्यात आला. पण तत्कालीन मनोहर जोशी सरकारने त्यावर (केंद्राकडून सुचवल्याप्रमाणे) बंदी घातली. तेंव्हा काँग्रेसचेच राज्यच नव्हते ते मंजुरी कसली देणार? २००१ साली त्या नाटकाला मंजूरी द्यावी लागली कारण कोर्टात ते केस जिंकले. आणि तेंव्हा देखील काँग्रेस सत्तेत नव्हतेच...

In reply to by विकास

मला वाटत इथे घटनाबाह्य censorship चा मुद्दा महत्वाचा आहे . तस्लिमा नसरीन यांच्यावर लज्जा कादंबरी नंतर मुस्लिम धर्मगुरू नि काढलेला फतवा किंवा नर्मदा आंदोलनावर आमिर खान ने भाष्य केल्यावर भाजप ने त्याच्या फना या चित्रपटा चे प्रदर्शन रोखले हि या घटनाबाह्य censorship ची उदाहरण . मराठीपुरत बोलायच झाल्यास हिंदुत्व वादी संघटनांनी 'यदाकदाचित ' किंवा 'माकडाच्या हाती शाम्पेन ' या नाटकाचे बंद पाडलेले प्रयोग . (या संघटनांच्या मागण्या मान्य केल्यावर हे प्रयोग पुन्हा सुरु झाले . तसे कॉंग्रेस ने 'मी नथुराम …' सोबत केल्याच आठवत नाही . काही तुरळक निदर्शन झाली . जितेंद्र आव्हाड यांनी पण प्रयत्न केला पण नाटकाचे प्रयोग सुखनैव चालू राहिले

In reply to by दिवाकर देशमुख

आनन्दा Tue, 11/18/2014 - 19:33
अस्स अस्स.. जरा हे पहा बर.. बाकी काही नाही, काँग्रेसच्या नेत्यांचे पाय पण मातीचेच आहेत..

In reply to by आनन्दा

दिवाकर देशमुख Tue, 11/18/2014 - 20:28
नीट वाचा जरा तुम्ही मराठी या हिंदीच वाचा त्यांच्यातल्या नात्यावर बोलले आहे का? बायको आहे हे का अ‍ॅक्सेप्ट करत नाही ? हाच प्रश्न विचारला आहे. यात चिखलफेक आहे का? अनैतिक बोलले आहे असे वाटत आहे का? फॉर्म मधे स्टेटस लिहित नाही म्हणुन तो प्रश्न विचारलेला आहे. तेच त्यांनी लिहिले असते तर कोणीही विचारले नसते त्यांना. काँग्रेसने असे विचारले का कधी "तुम्ही बायको का सोडली? वगैरे वगैरे चिखलफेक केली का?

In reply to by दिवाकर देशमुख

आनन्दा Tue, 11/18/2014 - 22:12
हायला, याचा अर्थ असा होतो होय?
Modi accepts his marital status. Can women of this country trust a man who stalks a woman, deprives his wife of her right? Vote against Modi.
माझा विंग्रजीचा अभ्यास वाढवावा लागणार म्हणजे..

In reply to by आनन्दा

दिवाकर देशमुख Wed, 11/19/2014 - 12:21
सिंग बरोबर बोलले. उलट सिंग यांनीच प्रकरण लावुन धरल्याने शेवटी मोदींना मान्यच करावे लागले.

In reply to by दिवाकर देशमुख

विकास Wed, 11/19/2014 - 17:37
उलट सिंग यांनीच प्रकरण लावुन धरल्याने शेवटी मोदींना मान्यच करावे लागले. आधीच्या निवडणुकांमधे फॉर्म हाताने (कागदी) भरता येत असे आणि त्यात विवाहीत असण्याचा प्रश्न हा compulsory नव्हता. त्यामुळे त्या प्रश्नाला आधीच्या निवडणुकात "हो अथवा नाही" हे काहीच वापरले नव्हते. पण आता निवडणुक लढवण्याचा फॉर्म संगणकावरच (ऑन लाईन) उपलब्ध केला आहे आणि त्यात ह्या प्रश्नाचे उत्तर compulsory केले आहे. त्यामुळे उत्तर दिले गेले. त्यात सिंग यांचा काही संबंध नाही.

In reply to by विकास

hitesh Wed, 11/19/2014 - 17:50
किती प्रामाणिकपणा तो ! कागदी फॉर्म असला क उत्तर नै लिहिले तरी चालत होते का ?

In reply to by hitesh

प्रदीप Wed, 11/19/2014 - 18:00
जेव्हा एखादे उत्तर लिहीणे जरूरीचे नाही, तेव्हा ते न लिहीणे अप्रामाणिक ठरत नाही.

In reply to by पिंपातला उंदीर

विकास गुरुवार, 11/20/2014 - 00:44
"नरो वा कुंजरोवा" चा हा प्रकार नाही. जे कायद्याने शक्य आहे ते त्यांनी केले - जेंव्हा उत्तर देणे गरजेचे नव्हते तेंव्हा दिले नाही, जेंव्हा आवश्यक होते तेंव्हा खरेच उत्तर दिले, नरो वा कुंजरोवा असे उत्तर दिले नाही. पण या धाग्याच्या बाबतीत मात्र तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे मिळताना दिसत नाहीत - नेहरूंच्या खाजगी जीवनाबद्दल ज्यांचा हिंदू संघटना अथवा विचारांशी काडीचाही संबंध नाही, अशा विचारवंतांना/पत्रकारांना/लेखकांना का लिहावेसे वाटले असावे? त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत गाडी मोदींकडे कशाला वळवत आहात? आणि जर मोदींबद्दलच लिहायचे असेल तर असे भांडे लपवून कशासाठी?

In reply to by विकास

hitesh गुरुवार, 11/20/2014 - 06:52
एका पंतप्रधानाने स्वतःचे विवाहबाह्य संबंध दडवले तर बोलायचे की राष्ट्रहित धोक्यात येते. मग दुसर्‍या पंतप्रधानाने आपली लग्नाची बायको कागदावर न लिहिणे हेही राष्ट्रहिताला घातक ठरु शकतेच की . महत्वाच्या व्यक्तीनी आपले जवळचे नातेवाईक कागदावर जाहिर करावेतच की. पळवाटा आणि सबबी का सांगाव्यात ?

In reply to by hitesh

विकास गुरुवार, 11/20/2014 - 08:40
एका पंतप्रधानाने स्वतःचे विवाहबाह्य संबंध दडवले तर बोलायचे की राष्ट्रहित धोक्यात येते. डूनस्कूल वाल्या करण थापरच्या संदर्भात हे बोलत आहात का? 'Edwina-Nehru affair got Kashmir deal done'

In reply to by विकास

पिंपातला उंदीर गुरुवार, 11/20/2014 - 09:35
माझे प्रतिसाद selective reading न करता वाचणार असाल . वरची मोदी यांच्यावरची चर्चा दुसरे आयडी करत आहेत . माझा त्यात सहभाग नाही . नरो वा कुंजरो वा चा प्रतिसाद दिला आहे फ़क़्त . नेहरू यांच्याबद्दल मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे . तुम्ही selective reading करत असाल पण ती मी पुन्हा पुन्हा मांडायला बाध्य नाही . हे बघा - http://www.misalpav.com/comment/632336#comment-632336. मोदी यांच्यावर ची भूमिका धाग्यात स्पष्ट मांडली आहे - 'पंतप्रधान ' मोदी यांचे मूल्यमापन करण्याचा हा निकष असू शकतो का ? त्यांचे मूल्यमापन करण्याचा निकष त्यांनी महागाई कशी नियंत्रित केली , परराष्ट्र धोरण कसे राबवले , भ्रष्टाचार कसा नियंत्रित केला हा असायला नको का ? नेत्यांची वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य यांच्यात फरक केला पाहिजे असे माझे मत आहे .

In reply to by आनन्दा

दुश्यन्त Mon, 11/17/2014 - 14:23
वाजपेयी यांनी 'मी अविवाहित आहे ब्रह्मचारी नाही' असे विधान इन जनरल केले होते. तर्हि कॉंग्रेसने कधी 'मिसेस कौल' यांचा सरळ/ छुपा उल्लेख करून वाजपेयींना झोडपले नाही हे मान्यच करावे लागेल. आणि शेवटी वाजपेयी आणि कौल यांचे जे काही होते ते परस्पर संमतीने होते. कौल यांचे पती हयात असतानाही त्यांना कल्पना होती मात्र मोदी आणि 'त्या महिलेचे' मात्र सगळे छुपे होते. एखाद्या महिलेवर पाळत ठेवायला सरकारी यंत्रणा कामाला लावणे यावर टीका व्हायलाच हवी.

In reply to by दुश्यन्त

आनन्दा Mon, 11/17/2014 - 14:31
टीका व्हायलाच हवी.. चर्चा व्हायलाच हवी. पण कोणत्या विषयांतर्गत असा प्रश्न आहे. माझ्यामते हे सरकारची व्यक्तिगत आयुष्यातील घुसखोरी आहे. मोदींचे व्यक्तिगत चारित्र्य यामध्ये पणाला लागते असे मला वाटत नाही. म्हणून ही चर्चा इथे अप्रस्तुत आहे असे माझे मत आहे. नसेल तर मोदींचे पर्सनल इन्टरेस्ट (चारित्र्याशी संबंधित) होते याचे पुरावे द्या, चर्चा पुढे चालू करू.

विजुभाऊ Mon, 11/17/2014 - 11:12
संघाचे बहुतेक सर्वत्र आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कारटे असेच असते. बरखा मुंडे प्रकरणात संघाने सोयीस्कर मौन पाळले होते. वाजपेयींबद्दल आदर आहे. मात्र त्यांच्या बद्दल मौनव्रत घेणारा संघ मात्र नेहरुंबद्दल वेगळी भुमीका घेतो. हे अर्थातच सम्घाच्या नेहमीच्या साधनशुचितेचाच भाग आहे. पवाराम्बद्दल भ्रष्टाचारीपणाची टीका करताना येडीयुर्राप्पांचे विस्मरण होते. संघाला कोंग्रेससरखा सुसम्स्कृत विरोधी पक्ष लाभला आहे हे त्यांचे नशीब आहे. कम्दाहार प्रकरणी कोम्ग्रेसने कधीच भाजपवर टीका केली नाही.

In reply to by विजुभाऊ

दिवाकर देशमुख Mon, 11/17/2014 - 12:14
दुटप्पीपणा आणि निर्लज्जपणा दोन्ही भाजपात काठोकाठ भरला आहे त्याचेच प्राशन भक्तगणांनी केल्याने त्यांचे आचारविचार देखील तसेच झाले आहे.

बॅटमॅन Mon, 11/17/2014 - 12:36
एक मजा बघा. इतिहासातल्या नेत्यांचे मूल्यमापन करताना वैयक्तिक चारित्र्य आणि राजकीय कर्तृत्वाची गल्लत करू नका म्हणणार्‍या लोकांची वर्तमानातल्या नेत्यांबद्दल मात्र अशी गल्लत का होते? जो लिबरल दृष्टिकोन इतिहासातल्या नेत्यांबद्दल बाळगला जातो तो वर्तमानात का चालत नाही? ढोंगी कुठले.

In reply to by बॅटमॅन

आनन्दा Mon, 11/17/2014 - 12:57
सोपे आहे - नेता इतिहासात गेला हे तो पूज्य होतो. (समर्थकांच्या दृष्टीने इन्फिनिटी आणि विरोधकांच्या दृष्टीने शून्य :) )

विजुभाऊ Mon, 11/17/2014 - 13:18
इतिहासातल्या नेत्यांचे मूल्यमापन करताना वैयक्तिक चारित्र्य आणि राजकीय कर्तृत्वाची गल्लत करू नका म्हणणार्‍या लोकांची वर्तमानातल्या नेत्यांबद्दल मात्र अशी गल्लत का होते? इतिहासात गेलेल्या नेत्याचा फोटोव्यतिरीक्त तसा फारसा उपयोग नसतो. आपण आपल्या इथल्या कोणत्याच नेत्याच्या इतर सवयी उदा तंबाखू ,दारू याबद्दल कधीच जाहीर चर्चा करत नाही. व्यसने हा वैयक्तीक चारित्र्याचा भाग नसतो का?

कलंत्री Mon, 11/17/2014 - 13:55
सर्वसाधारण समाजमानस हे १० वर्षवयोगटाचेच असते. त्यांना व्यसने, स्त्री-पुरुषातील गुंतांगुत, त्यांच्या आवडीनिवडी, मनोव्यापार समजावुन घ्येण्याचा आवाका तसा कमीच असतो. भारतासारख्या देशात हे पूर्वीपासूनच घडत आलेले आहे. उदा. रामाने सीतेचा अकारणच लोकनिंदेच्या साठी त्याग करणे, संभाजीबद्दल तत्कालीन अनेक प्रवाद उठविले गेले.

विजुभाऊ Mon, 11/17/2014 - 14:29
विजय मल्ल्या हे मात्र या बाबतीत राजकारणी असूनही (राज्यसभेवर आहेत म्हणून राजकारणी) त्या बाबतीत फारच लक्की आहेत. कोणीच त्यांच्या कसल्याही वागणूकीवर कसलीच टीकाटिप्पणी करत नाही

मालोजीराव Mon, 11/17/2014 - 16:25
एफडीआर,जेएफके,क्लिंटन आणि नेहरूंसारखे राष्ट्रप्रमुख पाहिल्यावर त्यांची व्यसने,बदफैलीपणा यांचा त्यांच्या कर्तुत्वाशी घंटा संबंध नसतो हे नक्कीच समजले…बाकी स्वच्च्छ चारित्र्याचे अतिशय निष्क्रिय राष्ट्रप्रमुख आहेतच कि ;)

In reply to by मालोजीराव

आनन्दा Mon, 11/17/2014 - 16:45
हो.. आणि भारतापुरते बोलायचे झाले तर लोक शिवाजी महरांजाबरोबर थोरल्या बाजीरावालादेखील मानतात की.

In reply to by बॅटमॅन

आनन्दा Mon, 11/17/2014 - 18:46
मी कुठे म्हणतोय बदफैली म्हणून? मला एव्हढेच म्हणायचे आहे की कर्तृत्वापुढे चारित्र्य आपण नेहमीच गौण मानले आहे, अर्थात रुचीपालट म्हणून असेल तरच. जनानखाना नव्हे.

In reply to by आनन्दा

तुमच्या आधीच्या सर्व प्रतिसादाशी सहमत फक्त येथे एकच नमूद करू शकतो , बाजीराव ह्यांनी मोगलांच्या सारखा जंगी जनानखाना बाळगला नव्हता , मस्तानी त्यांची पत्नी आता आंतरधर्मीय विवाह हि हिंदू समाजात त्याकाळी व आजही बंडखोर कृती मानली जाते त्यामुळे संबंधित लेखास हे उदाहरण बाद ठरते , तत्कालीन कालखंडात राजांचा जनानखाना हि आम बात होती. अनेक हिंदू , मुस्लिम राजांचे होते. त्यामुळे कर्तुत्व व चारित्र्य हा प्रश्नच त्याकाळात निर्माण झाला नाही ,पेशवाईत नाना ह्यांची चलती कर्तृत्वामुळे होती. हे विसरून चालणार नाही बाकी नेहरू ह्यांचे अनेक मैत्रिणी होत्या , मात्र माउंटबेटन संबंधी प्रकरण वेगळे होते. ह्या दोघांची जवळीक व राजकीय घडामोडी ह्यामुळे ते विवादास्पद बनते. इंग्रजांनी माउंटबेटन वर एक सिनेमा बनवला त्यात माउंटबेटन च्या भारतीय राजांना आव्हान केल्याने त्यातील बहुतांशी भारतात सामील झाले मात्र पुढे आपल्या पत्नीशी असलेल्या नेहरूंच्या संबंधांची आपल्या मित्रात टिंगल टवाळी करणारे माउंटबेटन तसेस चर्चिल ला , नेहरूंना भारताने राष्ट्रकुल मध्ये सामील होण्यास राजी करून अजूनही ब्रिटीश साम्राज्याशी नाते टिकवून धरण्यास फशी पाडल्याची फुशारकी मारतांना दाखवले आहे. त्या काळात हेरगिरी , हनी ट्रेप दुसर्या महायुद्धात युरोपात सर्रास होत होते , नेहरू व एडविना ह्यांची तशीच काहीशी केस होती. सदर सिनेमात जिना हे खलनायक व नेहरू हे सोबर व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व दाखवले आहे मात्र मुस्लिम लीग ने हिंसा सुरु केले तेव्हा गांधी ती थांबविण्यासाठी गावोगावी फिरत असतांना नेहरू ह्यांनी आपल्या घरी मेजवानी दिली असते तेव्हा माउंटबेटन आपल्या परिवारासह तेथे येतो , आणि मग काय घडते ते पहा २.०२ मिनिटानंतर पहा , फाळणी ला विरोध करणारे नेहरू पुढे कसे विरघळले हे ह्या दृश्यांतून दिसते. १,२८ मिनिटात ह्या दृश्यात ७. ४६ पसून पहा. हि संपूर्ण क्लिप पहा गांधीजी ह्यांचे व्यक्तिमत्त्व तसे बरेच संतुलित दाखवले आहे मात्र पुढे त्यांनी स्वातंत्र्यानंतर दंगलीच्या बाबतीत जे वादग्रस्त निर्णय घेतले विशेषतः क्रूरकार्म्यास पाठीशी घातले तो चांगला चित्रित केला आहे. ३.०८ मिनिटात गांधी वधाचा प्रसंग येथे दाखवला आह , नाना पाटेकर ने नथुराम ची भूमिका केली आहे. १.३८ मिनिटात हे असेच घडले असेल अशी १०० खात्री देता येणार नाही पण इंग्रजांचा ह्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिसतो , थरूर व पाकिस्तानी पत्रकार ह्यात शिकार व शिकारी कोण होते हे एक गौडबंगाल आहे , हा इसम संयुक्त राष्ट्रसंघात कार्यरत होता , ललना व हेरगिरी ह्या गोष्टी त्याला नवीन नव्हत्या.

In reply to by hitesh

हितेश भाऊ इतिहास कसा समजून घेतात इतिहासावर लिहिलेले पुस्तक , लेख हे प्रत्येकवेळी तटस्थ होऊन लिहिले जातात का किंवा ते अचूक असल्याची खात्री कोणी देऊ शकतो का , इंग्रजांनी १९८६ साली माउंटबेटन ह्या राजघराण्याच्या संबंधित टीव्ही वर मिनी सिरीज काढली , त्यात त्यांनी नेहरू ह्यांना एडविना च्या प्रेमात बुडालेले दाखवले आहे तर पटेल हे आपल्या मुद्द्यांच्या ठाम असलेले दाखवले आहे. इंग्रज म्हणजे काही मोदी नव्हे की आता त्यांच्यावर पटेल प्रेमाचा आळ घेता येईल. ह्यात त्यांनी जीना ह्यांची भूमिका अत्यंत अहंकारी दाखवली आहे. बाकी दंगली पेटल्यावर गांधी हे गावागावात ती थांबविण्यासाठी प्रयत्न करत असतांना नेहरू मेजवान्या व आपल्या दैनंदिन कामकाजात मग्न दाखवले आहेत. एडविना व नेहरू ह्यांच्या प्रेम्प्रकार्नांचे अनेक दाखले आंजा वर सापडतील, आता एडविना ह्यांच्या विचारांचा नेहरूंवर पगडा असल्याचे इंग्रजांनी दाखवले ,इंग्रजांच्या दृष्टिकोनातून भारतीय स्वातंत्र्य संग्राम पाहून किंवा वाचून त्यांच्याशी भारतीयांच्या दृष्टिकोनातून आजतागायत वाचलेल्या इतिहासाची तुलना केली तर त्यातील सामाईक मुद्दे व विरोधाभासी मुद्दे पाहून तार्किक दृष्ट्या काय झाले असेल ह्याचा अंदाज बांधता येतो , बाबासाहेबांनी शिवरायांचा इतिहास लिहितांना यवनांचे सुद्धा दस्तावेज तपासले आहेत , उद्द लाल शाहिस्तेखानाचे ३ बोट कापल्या गेल्याची घटना लिहितांना त्यांनी शाहिस्तेखानची लिहिलेली डायरी अभ्यासली होती. पाकिस्तान व भारताच्या हद्दी व शहरांचे वाटप झालेले नसतांना स्वतंत्र राष्ट्र होऊन पंतप्रधान मधून मिरवण्यात नेहरू ह्यांनी घोडचूक केली , पुढे लाहोर हातचे गेले व काश्मीर प्रश्नास सुरुवात झाली. त्यापेक्षा शिवसेना परवडली ,खातेवाटपावर सहमती झाल्याशिवाय पाठिंबा न देण्याचे धोरण ठेवले , आधी पाठिंबा देऊन मग चर्चा केली असती तर हाती काहीही लागले नसते.

In reply to by निनाद मुक्काम …

hitesh Wed, 11/19/2014 - 03:35
गांधी सरहद्दीवर काम करत होते तेंव्हा नेहरु दैनंदिन काम करत होते . हे तुम्हीच लिहिले आहे. राहिला प्रश्न पार्टीचा.. तोही त्यांच्या दैनंदिन जीवनाचाच भाग होता. का देशावर संकट आले किंवा घरात सुतक आले तर नेहरुनी हातावर कांदा भाकर खाणे तुम्हाला अपेक्षित होते का ? कोणतीही परिस्थिती असली तरी जो तो त्याचे दैनंदिन जेवण घेत असतो.

In reply to by hitesh

नेहरू ह्यांचे दैनंदिन कामकाज..... त्याकाळात हजारो लोक दोन्ही बाजूने मरत असतांना इंग्रजांनी हस्तक्षेप करावयास नकार दिला तेव्हा जीना ह्यांना एक्शनपेक कृती ला उत्तर देणे गांधी व नेहरू ह्यांना शक्य झाले नाही म्हणूनच नाईलाजाने पाकिस्तान झाला किंबहुना बहुसंख्य हिंदूचे प्रतिनिधित्व करणारे ही लोक अहिंसेच्या बेडीत बांधल्या गेल्याने आपले अल्पसंख्याक हिंसेला सुरुवात करतील त्याला प्रत्युत्तर देणे गांधी व नेहरू ह्यांना जमणार नाही ह्याची जीना ह्यांना खात्री होती .म्हणूनच त्यांनी हिंसेचा जुगार खेळले व त्यात यशस्वी झाले. त्यातल्या त्यात गांधी आपल्या मार्गाने प्रामाणिक प्रयत्न करत होते व त्यांच्या जीवावर ही बांडगुळे मजा मरत होती , काही दिवसांपूर्वी केरळात वृत्तपत्रात जे लिहिल्या गेले त्या धर्तीवर एल लेख मी आधीच मिपावर लिहिला होता , गांधीजीपेक्ष्या खरे तर ... पुढे निदान एकच घराणे भारताच्या बोकांडी बसले नसते.

In reply to by hitesh

करेंगे ह्या मरेंगे अशी स्थिती निर्माण झाली होती , देशात सांप्रदायिक दंगे पेटले हप्ते अश्यावेळी ह्यांच्या प्रणय चेष्टा ऐन भरात होत्या. त्यावरून १९४२ एव स्टोरी हा शिनेमा बनला असावा

In reply to by निनाद मुक्काम …

hitesh Wed, 11/19/2014 - 10:04
आँ.. ! गांधीजी जेंव्हा समाजकार्य करत होते तेंव्हा उर्वरीत भारताचे लोक प्रणयचेष्टा करत होतेच की ! आमचे तुमचे पणजोबा / पणजी यांनी प्रणयचेष्टा थांबवली असती तर तुम्ही आम्ही इथे आलो असतो का ?

In reply to by hitesh

आनन्दा Wed, 11/19/2014 - 10:23
आमचे तुमचे पणजोबा / पणजी यांनी प्रणयचेष्टा थांबवली असती तर तुम्ही आम्ही इथे आलो असतो का ?
बास. माझी तर बाबा सपशेल शरणागती.. यावर काय बोलणार? दंडवत स्वीकारा हितेशभौ. LogaMgaN

In reply to by hitesh

@हितेश आमच्या पणजोबांनी जनतेचे नेतेपद स्वीकारले नव्हते. जनसेवेचा मक्ता घेतला नव्हता व त्यांना सत्तेचा लोभ सुद्धा नव्हता. व विवाहबाह्य संबंधातून आमची पुढली जन्मली नाही , आपण नेहरूंच्या विवाहबाह्य संबंधाचे उदात्तीकरण अश्या प्रकारे करतात जणू काही तुमची पिढी ... असो राजकारणातील लष्करातील किंवा कार्पोरेट क्षेत्रातील मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना हनी ट्रेप वापरून फितूर केल्याची शेकड्याने उदाहरणे मिळतील. भारत पाकिस्तान प्रश्न सुटला नसतांना स्वातंत्र्याची घाई करायला नको होती. फाळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ,दोन्ही भागातून शांततेत स्थलांतर झाल्यावर स्वातंत्र्य घोषित केले असते. तर अनेकांचे प्राण वाचले असते.

In reply to by निनाद मुक्काम …

hitesh Wed, 11/19/2014 - 12:46
जनतेचे नेतृत्व स्वीकारले म्हणजे आहार निद्रा मिथुन या नैसर्गिक गरजा शून्य होतात का ?़की नेता व प्रजा यांची अ‍ॅनोटोमी फिजिओलॉजी वेगळी असते ? विवाहबाह्य संबंधातुन जन्मले म्हणजे ते बाळ गुन्हेगार असते का ? त्याचे आई आणि बाप कायदेशीरच असतात जरी ते नवरा बायको नसतील तरीही. तुमच्या लाडक्या भगवंताने ज्यापुढे गीता सांगितली ते गुणी हिंदु बाळ व त्याची इतर चार ( + एक ) भावंदे ही खर्‍या आई बापांनी जन्माला घातली होती का ?

In reply to by hitesh

आनन्दा Wed, 11/19/2014 - 21:27
याच्यापुढे मी पामर काय बोलणार? महात्मा गांधी काय म्हणतात ते पाहुया -
तुमच्या लाडक्या भगवंताने ज्यापुढे गीता सांगितली ते गुणी हिंदु बाळ व त्याची इतर चार ( + एक ) भावंदे ही खर्‍या आई बापांनी जन्माला घातली होती का ?
यावर मी कमेंट करू इच्छित नाही कारण मग या धाग्याचे काश्मीर होईल, आणि इतरांना पण संयम पाळावा अशी विनंती करतो. जाता जाता एव्हढेच सांगेन की त्यांचा जन्म समाजसंमत मार्गाने झाला होता. नेहरूंचे १९४७च्या वेळचे तथाकथित विवाहबाह्य संबंध समाजसंमत होते असे आपल्याला म्हणयाचे असेल तर मग बोलणेच खुंटले.
जनतेचे नेतृत्व स्वीकारले म्हणजे आहार निद्रा मिथुन या नैसर्गिक गरजा शून्य होतात का ?़की नेता व प्रजा यांची अ‍ॅनोटोमी फिजिओलॉजी वेगळी असते ?
नैसर्गिक गरजा या नैसर्गिक मार्गांनी पूर्ण व्हाव्यात नाही का? भारतीय समाजात अजून तरी विवाहबाह्य संबंध नैसर्गिक मानले जात नाहीत. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा नेहरू त्यांच्या नैसर्गिक गरजांकडे लक्ष देण्यात मग्न होते, तेव्हा गांधीजी दंगली शांत करत फिरत होते, एव्हढी एकच गोष्ट तुम्हाला मुद्दा स्पष्ट करण्यास पुरेशी असावी. पण असो, तेव्हढे सगळे तुम्हाला कळायची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. आणि तुम्ही गुद्द्याच्या पातळीवर उतरल्यामुळे आता चर्चा होऊ शकत नाही असे स्पष्ट करतो.

In reply to by आनन्दा

hitesh गुरुवार, 11/20/2014 - 07:19
गांधीजींबद्दल इतकं चांगलं मिसळपावावर वाचुन ड्वाळे पाणावले. मोदीनी गांधीजींना नमन केल्यानंतर मिसळपावावर गांधीजींबद्दल चांगल्ही लिहिलं जाऊ लागलय. मोदींचे अभिनंदन

In reply to by hitesh

आनन्दा गुरुवार, 11/20/2014 - 09:28
नाही हो, गांधी एक व्यक्ती म्हणून, एक तत्वनिष्ठ म्हणून आम्हाला नेहमीच आवडतात. आम्हाला आवडत नाहीत ती त्यांची काही धोरणे, जी त्यांनी एक राजकारणी म्हणून राबवली, पण ती नंतर त्यागायची वेळ आली तेव्हा देखील त्यांच्च त्याग केला नाही. त्यामुळे एक राजकारणी म्हणून गांधी मला अनुकरणीय नाहीत. तुम्हाला शंका असेल तर माझे इतरत्रचे प्रतिसाद वाचा, आणि मिपावर यापूर्वीही गांधींवर बरच चांगले लिहिले गेले आहे, किंबहुना माझ्या या मताला मिपावरील चर्चांचाच आधार आहे. तुम्हीच अभ्यास वाढवा. नेहरूंबद्दल देखील आदर आहेच, पण स्वतःच्या वैयक्तिक (तुमच्या भाषेत नैसर्गिक)गरजा आणि राष्ट्राच्या गरजा यांमध्ये नेहरूंनी स्वतःच्या गरजांना प्राधान्यक्रम दिला, आणि ते देखील राष्ट्र संकटात असताना असा आक्षेप आहे. असो, तुम्ही खाली आणि इथे पण जी मुक्ताफळे उधळली आहेत ते पाहता तुमच्याकडचपण्मुद्दे संपले आहेत असे समजून येत आहे. तेव्हा इत्यलम|

In reply to by आनन्दा

hitesh गुरुवार, 11/20/2014 - 08:25
जेव्हा नेहरू त्यांच्या नैसर्गिक गरजांकडे लक्ष देण्यात मग्न होते, तेव्हा गांधीजी दंगली शांत करत फिरत होते, एव्हढी एकच गोष्ट तुम्हाला मुद्दा स्पष्ट करण्यास पुरेशी असावी.. .......... नै हो म्हाराजा ! या वाक्यातुन काहीही निष्कर्ष निघत नाही. मी दोन हॉस्पिटलात मिळुन रोज सोळा तास काम करतो. उरलेल्या वेळेत घरी माझ्या गरजाही पूर्ण करतो.. ( याशिवाय अजुन दोन विवाहबाह्य संबंध उपभोगण्याचीही समजा माझी इच्छा आहे.. एक स्त्री व एक पुरुष ). हॉस्पिटलात पेशंट तळमळत असताना मी नैसर्गिक गरजा भागवत फिरतो. असे तुम्ही माझ्याबद्दल लिहिलेत तर ते वरकरणी खरे वाटेल , पण ते पूर्ण सत्य असेल का ? ,.........

In reply to by आनन्दा

hitesh गुरुवार, 11/20/2014 - 08:38
आणि काय अहे . की तुम्हाला काँग्रेसमुक्त भारत करायचा होता. तो आता झाला ना ? मग आनंदाने कारभार करा ना ? आता ते गांधी न्हेरु कशाला चघळत बसलाय ? हॅ म्हणजे खाष्ट सासु मेल्यावरही सुनेने सुखाचा संसार करण्याऐवजी दिवसरात्र तिच्या नावाने बोटं मोडत टाइमपास करण्यासारखे आहे.

In reply to by आनन्दा

काळा पहाड गुरुवार, 11/27/2014 - 12:51
यावर मी कमेंट करू इच्छित नाही कारण मग या धाग्याचे काश्मीर होईल
आम्ही करू इच्छितो पण सध्या तरी करणार नाही. ज्याला तुम्ही उत्तर देताय त्याचा धर्म/जात हिंदूंच्या विरूद्ध आहे. तो असंच बोलणार. शेवटी रक्तच घाणेरडं त्याला तो तरी काय करणार.

In reply to by hitesh

विनोद१८ गुरुवार, 11/20/2014 - 00:25
विवाहबाह्य संबंधातुन जन्मले म्हणजे ते बाळ गुन्हेगार असते का ? त्याचे आई आणि बाप कायदेशीरच असतात जरी ते नवरा बायको नसतील तरीही.
जरा हे अधिक स्पष्ट करशील का ?? कायद्याच्या कुठल्या कलमाने ते 'कायदेशीर आई बाप' असतात ??
तुमच्या लाडक्या भगवंताने ज्यापुढे गीता सांगितली ते गुणी हिंदु बाळ व त्याची इतर चार ( + एक ) भावंदे ही खर्‍या आई बापांनी जन्माला घातली होती का ?
'आमचा लाडका भगवंत' म्हणजे तुझा तो कोणी लागत नाही म्हणजेच ' तु कापुन आलेला बाटगा' काय ?? तुझे खरे स्वरूप उघड झाले याचे भान आहे का तुला. ज्या एका विशिष्ट हिरीरीने व त्वेषाने असे तुझे प्रतिसाद येतायत त्यावरुन तरी असेच दिसते. 'आमचा लाडका भगवंत' तुझा जर कोणीच लागत नसेल तुला त्याची एव्हढी विवंचना का ??

In reply to by निनाद मुक्काम …

दिवाकर देशमुख Wed, 11/19/2014 - 12:26
छत्तीसगड येथे चुकिचे सरकारी उपचार झाल्याने मरण पावलेल्या भारतीयांकडे दुर्लक्ष करुन मोदी विदेश दौरे करत आहेत हे प्रकरण देखील चेष्टा प्रणय वगैरे मधे येतात का ? , देशात सांप्रदायिक दंगे पेटले हप्ते अश्यावेळी ह्यांच्या प्रणय चेष्टा ऐन भरात होत्या. त्यावरून १९४२ एव स्टोरी हा शिनेमा बनला असावा >>. तुम्ही स्वत: तिथे उपस्थित होतात का? कि ऐकिव भगव्यांच्या माहीतीवरुन बोंबलत फिरत आहेत ?

In reply to by निनाद मुक्काम …

चित्रपट असो वा कादंबर्या . हि मनोरंजनाची साधन आहेतच पण ती प्रपोगंडा साधन पण आहेत (काही तुरळक अपवाद वगळता ). निपक्ष विश्लेषणात त्याना आधार मानले जात नाही .

In reply to by पिंपातला उंदीर

आनन्दा Wed, 11/19/2014 - 12:18
ह्म्म.. ही गोष्ट तर खरीच आहे, पण बर्‍याच वेळेस हे चित्रपटवाले खूप रीसर्च पण करतात बर का. केवळ विश्वासार्हतेसाठी

In reply to by पिंपातला उंदीर

सदर टीव्ही मालिका हि इंग्रजी प्रेक्षकासाठी होती भारतीयांसाठी नाही. साल १९८६ आता नेहरूंना वाईट व पटेलांना चांगले दाखवण्यामागे त्यांचा काय बरे हेतू असावा , गांधींचे व्यक्तिमत्त्व संतुलित दाखवले आहे. मुळात मुसलमान हे जीना ह्यांचे ऐकत होते , ते हिंसा करत होते व हिंसेपासून संरक्षण इंग्लिश आर्मी करणार नसेल तर स्वतःचे रक्षण करण्यास गांधी हिंदूंना अहिंसा ,शांती संयमाचा पाठ देत होते , गांधीनी १५ ऑगस्ट दिल्लीत वाजतगाजत म्हणूनच साजरा केला नाही कारण सर्वस्व गेलेली अनेक शीख , हिंदू , मुसलमान कुटुंबे त्यांच्या सभोवताली होती व हि हिंसा रोखण्यास आपले तकलादू तत्त्वे अपयशी ठरल्याची बोचरी जाणीव त्यांना होती.

In reply to by निनाद मुक्काम …

hitesh Wed, 11/19/2014 - 13:33
देशासमोर गांधीजी हे एकच गुरु होते का हो ? रणावीण स्वातंत्र्य कुणाला मिळाले का ? वगैरे वीर गप्पा मारणारे इतर गुरुजी गप्प का बसले होते? हिंदुंना हिंसेचा धडा गिरवायला शिकवण्यासाठी ते का नाही पुढे झाले ?

In reply to by hitesh

आनन्दा गुरुवार, 11/20/2014 - 13:35
ह्म्म.. आता कसे आलात लेव्हलवर. थोडक्यात तुम्हाला गांधींशी काही देणेघेणे नाहीये. तुमचा अजेंडा वेगळाच आहे. आता तुमच्या दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर - भारत स्वतंत्र झाला तेव्हा सत्ता उघड उघड काँग्रेसच्या हातात आली, त्यामुळे त्या सार्‍या लोकांना तुमच्या भाषेत हिंसावादी ठरवले गेले. अर्थात जिथे शिवाजी महारजांना देखील लुटारू म्हटले जाते, तिथे हे असे म्हणणे म्हणजे किस पेड की पत्ती. नाहीतर लोकसंख्या हस्तांतरण वगैरे उपाय मांडलेले होतेच की. फक्त तेव्हा ते कोणी मनावर घेतले नाहीत, आणि आधी स्वतंत्र्य की आधी स्थैर्य यामध्ये आधी स्वातंत्र्य चा जय झाला.

In reply to by आनन्दा

hitesh गुरुवार, 11/20/2014 - 15:21
लोकाना हिंसा शिकवणार्‍याना सत्ताच कशाला हवी होती ? दंगली सुरु असताना स्वतःचे हिंसक मित्र वas हस्त्रे घेउन ते का नाही जनतेला मदत करायला गेले ? का यांचा जहाल मार्ग फक्त कवनं आणि नाटकं लिहिण्यापुरताच होता ? समाजाला हिंसेची गरज होती तर ती गरज जहाल लोकान्नी पुरी करायला हवी होती . स्वतः लपुन बसले आणि नंतर मग गांधींच्या अहिंसेवर सगळे बिल फाडायला कशाला यायचे ?

In reply to by hitesh

आनन्दा गुरुवार, 11/20/2014 - 16:45
ओक.. म्हणजे हिंदूंनी शस्त्रे हातात घ्यायला हवी होती असे तुमचे म्हणने आहे तर. आता दुटप्पी कोण बोलतेय ते तुम्हीच ठरवा. सगळ्या हिंदूंना नव्हे, तर केवळ पोलिसांना जरी शस्त्रांचा वापर करायला परवानगी दिली असती तरी दंगली आटोक्यात राहिल्या असत्या. आणि बाय द वे, त्यावेळेसही हिंदू/शीख संघटनांनी बरेच मदतकार्य केले होते, जालावर शोध घ्या, मिळेल सर्वसामान्य हिंदु समाज कधीच हिंसक नव्हता आणि नाही (बघा, तुम्ही एव्हढी हाणामारी करून देखील मी संयम सोडला आहे का ते? कारण मी सामान्य आहे). (अवांतर) तत्कालीन राज्यकर्ते हिंदूंचे/ निर्वासितांच्या हिताचे रक्षण करण्यात कमी पडले म्हणून हिंदूंनी शस्त्रे हातात घेतली. तरी देखील आतापर्यंतच्या दंगलींचा इतिहास लक्षात घेतलात तर हिंदूंपेक्षा मुस्लिम समाज दंगली>च्या वेळेस अधिक शस्त्रसज्ज होता असे ध्यानात येईल. हिंदू संरक्षणासाठी सरकारवर अवलंबून होते, आणि जिथे हिंदू संरक्षणासाठी शस्त्रे हातात घेतात तिथे त्यांचे पोलिसी बळाद्वारे दमन केले जाते. अर्थात त्यात पोलीसांचादेखील दोष नाही, कारण बहुतांशवेळा हिंदू प्रतिक्रिया म्हणूनच शस्त्रे हातात घेतात, त्यामुळे त्यांना शस्त्रे मिळेपर्यंत पोलीस खाते सावरलेले आणि सज्ज असते. या सगळ्या गोष्टींचा विचार करयचा तर सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय (केवळ शस्त्रसज्ज हिंदूंच्या भरवश्यावर) हिंदूंचे रक्षण होणे शक्य नव्हते. बाय द वे, गांधींच्या अहिंसेला आलेली ही फळे पहा, थोडेसे अवांतर होतेय, पण समजून घ्या. Gandhi started for Noakhali on 6 November and reached Chaumuhani the next day. After spending two nights at the residence of Jogendra Majumdar, he embarked on his tour of Noakhali, barefoot on 9 November. For the next seven weeks he covered 116 miles and visited 47 villages. He set up his base in a half burnt house in the village of Srirampur where he stayed put till 1 January. He organised prayer meetings, met local Muslim leaders and tried to win their confidence. Mistrust between Hindus and Muslims continued to exist, and stray incidents of violence occurred even during his stay in Noakhali. On the evening of 10 November, Sunday, two persons were reported to be murdered on the way while returning home after attending Mohandas Gandhi’s evening prayer at Duttapara relief camp.[60] Gandhi's stay in Noakhali was resented by the Muslim leadership. On 12 February 1947, while addressing a rally at Comilla, A. K. Fazlul Huq stated that Gandhi's presence in Noakhali had harmed Islam enormously.[61] His presence had created a bitterness between the Hindus and the Muslims.[61] The resentment against Gandhi's stay in Noakhali grew day by day. Towards the end of February 1947 it became vulgar. Gandhi's route was deliberately dirtied everyday and the Muslims began to boycott his meetings.[61] Gandhi took a goat from India. He kept that goat with him in noakhali. local Muslims stole that goat and ate it.[35] Mohandas Gandhi discontinued his mission halfway and started for Bihar on 2 March 1947 at the request of the Muslim League leaders of Bengal. On 7 April, more than a month after leaving Noakhali, Gandhi received telegrams from Congress party workers in Noakhali, describing attempts to burn Hindus alive. He stated that the situation in Noakhali demands that the Hindus should either quit or perish.[62] संदर्भ पण मी हे सगळे तुमच्याशी का बोलतोय? सॉरी.

In reply to by आनन्दा

प्यारे१ Mon, 11/17/2014 - 18:04
खुद्द महाराजांच्या ७ राण्या होत्या ना? बाकी आजही गावांमध्ये २-३ लग्नं केलेले (त्यातले २ शिक्षक आहेत.) आणि इतर 'असेच' लोक ठाऊक आहेत. :)

In reply to by hitesh

hitesh Tue, 11/18/2014 - 08:57
जनानखाना बाळ्गला की राज्यकारभार बुडतो, हे तत्व पटत नाही ! आउरंगजेबाच्या जनानखान्यात ८०० बायका होत्या म्हणे !

In reply to by hitesh

hitesh Tue, 11/18/2014 - 09:48
आमच्या बेगमेला आम्ही नेहमी सांगतो...मुअलमान ८०० संभाळण्याप्वेक्षा हिंदुंच्या आठ नै तीनदेखील सांभाळणं मुश्किल असतं !

In reply to by hitesh

इरसाल Wed, 11/19/2014 - 13:59
आ हितेसभाई तो आपलु जागो मोहन प्यारे छे !

In reply to by hitesh

बॅटमॅन Tue, 11/18/2014 - 12:14
सहमत. पण औरंगजेबाच्या जनानखान्याबद्दलचं मत पटत नाही. त्याला ३-४ च बायका होत्या, नाटकशाळांचे तितकेसे व्यसन असल्याचेही कुठे दिसत नाही.

In reply to by आनन्दा

मृत्युन्जय Tue, 11/18/2014 - 12:21
थोरल्या बाजीरावाला मानतात कारण त्याने प्रचंड पराक्रम गाजवला. त्याची उभी हयात त्याने स्वराज्य वाढवण्यात आणि जपण्यात घालवले. महाराजांनी जे उभे केले ते रयतेचे राज्य होते आणि ते राजे होते. तेच राज्य शाहू महाराजांसाठी बाजीरावाने जपले आणि जोपासले. राजांनी आणी सरदार उमरावांनी उपस्त्रिया आणि नाटकशाळा बाळगणे त्या काळात सर्वमान्य होते. बरोबरीच्या घराण्यांमध्ये लग्ने होत असत तर निम्न कुळातील स्त्रिया उपस्त्रिया म्हणून बाळगल्या जात पण बर्‍याचदा त्यांना पत्नीचा दर्जा मिळत असे. जो मस्तानीला मिळाला. चिमाजीअप्प्पा आणि नानासाहेब मस्तानीच्या विरोधात होते पण त्यांनी समशेर बहाद्दराला मात्र योग्य ते शिक्षण दिले आणि सरदारकीही. सांगण्याचा उद्देश हाच की मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावाने तिच्याशी लग्न केले नाही परंतु तिचा दर्जा पत्नीचाच होता. महाराजांनी त्यांच्या कारकीर्दीत आठ लग्ने केली म्हणून त्यांच्या चारित्र्यात खोट येत नाही. संभाजी महाराजांबद्दलही बर्‍याच कथा अस्तित्व्तात आहेत. खरेखोटे देव जाणे. पण इतिहास त्यांना त्याबद्दल लक्षात ठेवत नाही तर त्यांच्या नऊ वर्षांच्या लाढ्यासाठी लक्षात ठेवतो. महाराजांची आणि बाजीरावाची तुलना जरुर करा. दोघांनीही रयतेचे राज्य आणण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले पण तसे करताना मस्तानी प्रकरणामुळे बाजीरावाल तुच्छ लेखणे ("थोरल्या बाजीरावालादेखील मानतात की" असा उल्लेखही तुच्छतापुर्णच वाटतो) हे मात्र चुकीचे होइल.

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा Tue, 11/18/2014 - 15:12
महाराजांची आणि बाजीरावाची तुलना जरुर करा. दोघांनीही रयतेचे राज्य आणण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले पण तसे करताना मस्तानी प्रकरणामुळे बाजीरावाल तुच्छ लेखणे ("थोरल्या बाजीरावालादेखील मानतात की" असा उल्लेखही तुच्छतापुर्णच वाटतो) हे मात्र चुकीचे होइल.
सॉरी.. तुच्छ लेखणे हा हेतू मुळीच नव्हता, उलट बाजीरावाच्या कर्तृत्वापुढे अश्या गोष्टींची दखल देखील घेतली जात नाही असे मला म्हणायचे होते. अर्थात तुम्ही वर दिलेली बरीच माहिती माझ्यासाठी नवीनच आहे. त्याबद्दल धन्यवाद.

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन Tue, 11/18/2014 - 18:47
महाराजांची आणि बाजीरावाची तुलना जरुर करा. दोघांनीही रयतेचे राज्य आणण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले पण तसे करताना मस्तानी प्रकरणामुळे बाजीरावाल तुच्छ लेखणे ("थोरल्या बाजीरावालादेखील मानतात की" असा उल्लेखही तुच्छतापुर्णच वाटतो) हे मात्र चुकीचे होइल.
सहमत, त्यातूनही अंडरलैनशी विशेष सहमत.

मारवा Mon, 11/17/2014 - 16:55
देशहितापुढे त्यांनी वैयक्तीक वासनांचा कायम त्याग करुन दाखविलेला आहे. त्यांच्या संयमी जीवनाच्या तेजापुढे पोळुन व नंतर जळुन काहिंनी त्यांच्या वैयक्तीक त्यागावर विनाकारण च शिंतोडे उडविले आणि उडविणारे तरी कोण स्खलनशील दिग्वीजय आणि अति स्खलनशील शशी थरुर खरा अस्सल भारतीय पठडितला संयम दाखवला तो मोदिंनींच श्रीमान योगी संसार काय चिमण्या कावळे हि करतात अस काहिस कुठल्याशा पोलादि का काय ते वीर नेत्याने म्हटलेल च आहे. परित्यक्ता या शब्दाच मुळ मात्र शोधावस वाटत. काय वाटल असेल मिसेस मोदिंना कोण ते जोडप आल होत चायनीज का कुठल ताजवर तेव्हा सिंगल मोदि त्यांना होस्ट होते. शाळेत किती ७ गाड्या आल्या होत्या निवडणुकीपुर्वी : समजवायला " मिसेस मोदींनी एक मार्मिक प्रश्न विचारला होता मी मिसेस मोदि नसते तर तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आला असतात का ? त्याग कळत च नाहि हो हल्लीच्या सुखलोलुप पिढिला सदभावना ? त्याचा तर पत्ताच नाही पण ते परित्यक्ता म्हणजे टाकलेली बाई अस असत का हो ?

In reply to by मारवा

hitesh Sat, 11/29/2014 - 13:28
मोदीना घरसंसार नाही.. त्यामुळे मोदी निरिच्छ भावनेने काम करतात म्हणे ! असे मोदीभक्त अभिमानाने सांगत होते. पण मोदींच्या सरकारातील बाकीचे लोक घरपरिवारवालेच आहेत ना ? हे म्हणजे भीष्माचार्यासरखे झाले.. मला स्वतःला नको हो , पण आमच्या दोन राजकुमाराना बायका हव्या आहेत , म्हणुन मी अंबा अंबालिका वगैरे पळवतोय ! मला नको हो ! आमच्या पक्षाच्या बाकी लोकांसाठी मी सगळे व्यवसाय पळवतोय हो

In reply to by hitesh

विनोद१८ Mon, 12/01/2014 - 02:29
अरे, एक तर तु डु.आय.डी. तुझे पितळ तर केव्हाच उघडे पडलेय, तुला येथे कोणी हिंग लावुन विचारीत नाही. मग कशासाठी हे चाळे चालविले आहेस तु ?? जरा खुडुक बस आता. ( वैकुंठ्वासी नान्या नेफळाप्रेमी )

तिमा Mon, 11/17/2014 - 18:38
ठराविक नेत्यांबद्दल चर्चा केली आहे आणि काही नेत्यांना साळसूदपणे वगळले आहे. बहुतेक, नंतर होणार्‍या परिणामांच्या भीतिने असावे.

विकास Tue, 11/18/2014 - 01:47
नेहरूंच्या व्यक्तीगत संबंधांच्या संदर्भात बोलणे आणि त्यावरून योग्यता ठरवणे योग्य नाही. तसले ब्लॉग्ज कडे दुर्लक्ष.. पण असे बोलणारे का बोलू शकले हे पाहीले तर काय दिसते? ह्यात कुजबुज ब्रिगेड पेक्षा इतिहास संशोधक ब्रिगेड्स आणि पत्रकारीता अधिक आहे. त्यातही ह्यांना नेहरूंच्या १९४७-४८ च्या काळातील प्रेमसंबंधाबद्दल जास्त पडलेले दिसते. त्याचे कारण देश फाळणीतून होरपळत असताना पहीले पंतप्रधान काय करत होते, हे आहे का केवळ एक गोरी व्यक्ती त्यात असल्याने नकळत असलेले गुलामीवृत्तीतले आकर्षण या संशोधनात आहे, ते त्यांचे त्यांनाच माहीत. पण एडविना प्रमाणेच नेहरू हे पद्मजा नायडू (सरोजिनी नायडूंची कन्या) आणि मृणालीनी साराभाई (विक्रम साराभाई यांच्या "troubled" विवाहातील पत्नी) यांच्या देखील जवळ होते. पण त्याबद्दल विशेष लिहीले गेलेले नाही. वरील चर्चा/लेखात नेहरूंचा संदर्भ देत जणूकाही चार ब्रिगेडी टाळकीच हा विषय चघळतात असे म्हणले गेल्याने जरा पाहीले तर कुठले ब्रिगेड दिसले? खाली काही उदाहरणादाखल... यात नेहरूंचे कुणाशी संबंध होते/नव्हते हा मुद्दा नसून त्यावर लिहीणारे कोण आहेत हे दाखवण्याचा मुद्दा आहे. यांना (आणि अशा अनेकांना) नेहरूंबद्दल का लिहावेसे वाटले असावे? त्याबद्दल आपले काय मत आहे? 'Nehru Was Generally Happy To Be Among Either Mountains Or Interesting Women' - Priyadarshini Sen Interviews Alex von Tunzelmann (आउट्लूक मॅगझिन) अजून एक आउट्लूक मधील लेख... करण थापर, मला नाही वाटत ब्रिगेडी आहेत. ;) ते काय म्हणतात, हे येथे पहा. Edwina Mountbatten: a life of her own - Janet P. Morgan - 1991 - ‎More editions A biography of Edwina Mountbatten describes her childhood of luxury, her marriage to Lord Mountbatten, her extramarital affairs, and her association with Nehru, Churchill, and others Edwina and Nehru: A Novel - लेखिका Catherine Clement Jawaharlal Nehru, a Biography - ब्य Sankar Ghose - 1993 - ‎After coming to know of Nehru's imprisonment she wrote on 16 January 1941, 'Since then I have thought of you constantly. . . . As you ... Of all the notable ladies he came across, Nehru's closest friendship was with Lady Edwina Mountbatten. वगैरे वगैरे...

hitesh Tue, 11/18/2014 - 08:36
नेहरुना शेवटच्या दिवशी चेस्त पेन झाले होत. तंव्हा त्याना दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलात अ‍ॅडम्ट केले होते. तेंव्हा त्याम्च्या बरोबर एक प्रख्यात नटी होती. खरे आहे का हे ?

In reply to by hitesh

hitesh Tue, 11/18/2014 - 08:41
अर्थात तिने मदत करुनही नेहरुना मृत्युवर वैजय मिळवणे शक्य झाले नाही व त्यांची आयुष्य - माला तुटली.

"तेंव्हा त्याम्च्या बरोबर एक प्रख्यात नटी होती. खरे आहे का हे" होय. दिल्लीत तेव्हा असणार्या ह्यांच्या मित्रानेही हे सांगितले.नर्गिसची आई जद्दनबाई ही एक मोठी अभिनेत्री व नर्तकी.हिची तीन लग्ने झाली होती त्याशिवाय ती मोतीलाल की जवाहरलाल नेहरूंबरोबर असायची असे म्हंटले जायचे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आनन्दा Tue, 11/18/2014 - 10:58
हायला माईसाहेब तुमचा टेम्पो आवडला.. आणि ज्या प्रकारे तुम्ही तो कॅरी करत आहात ते आहून तर आपण तुमचे तुमच्या "ह्या"ंच्यापेक्षा फॅन!!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

hitesh Tue, 11/18/2014 - 11:35
नेहरुना चेस्ट पेन मध्यरात्री झाली.. त्यावेळी त्या नटीने त्याना एम्सला अ‍ॅडमिट केले. पण नेहरू गेले. ........ त्यावेळी एका भाजपाच्या नेत्याने टीका केलेअ‍ॅ ... रात्री बारा वाजता ती त्यांच्या घरॅअ‍ॅ काय करात होतेअ‍ॅ ? ........ हे ' अटल ' नेते तेच ज्यानी नंतर अविवाहीत आहोत पण ब्रमचारी नाहेअ‍ॅ याची कबुलेअ‍ॅ दिली .

hitesh गुरुवार, 11/20/2014 - 18:55
या धाग्यावर एकही स्त्री आयडी फिरकली नाही. त्यामुळे ताम्चा जाहिर. णिषेध

hitesh Wed, 11/26/2014 - 19:43
http://www.mtmobile.in/regular/details.php?storyid=2&section=desh बैकोचे नाव जाहिर करायचे नाही. पण तिची सुरक्षा मात्र सर्कारी खर्चातून. वा मोदीजी वा