केंद्रसरकारच्या पैशाने निंदनीय जाहिराती
आंदमानातील काही आदीवासी समाज आहेत, त्याच प्रमाणे पार्सी समाजाची लोकसंख्या देशात आणि विदेशातही वेगाने खालावते आहे. चांगल्या राहणीमानासाठी उशीरा अथवा आंतरधर्मीय विवाह हे त्याचे मुख्य कारण आहे असे म्हटले जाते. पार्सी लोकांना जन्मदर वाढवण्याच्या दृष्टीने केंद्रसरकारच्या अल्पसंख्यांक खात्याने दहाकोटीच्या जाहीराती काढल्या आहेत इथ पर्यंतही ठिक आहे.
पण या जाहीरातीतील काही विधान निश्चितपणे विवाद्य स्वरुपाची आहेत असे वाटते. हिंदू पार्सी असा सद्यकाळात कोणताही संघर्ष अस्तीत्वात नसताना "पारशींनी लग्न करुन मुलांना जन्म दिला नाही तर लवकरच पारशी कॉलनीचे हिंदू कॉलनीत रुपांतर होईल, " अशा पद्धतीच्या समाजात दुही पसरवणार्या विधानांची आणि चित्रांची जाहीरातीत गरज आहे का ? जाहिरातीचे बजेट काँग्रेसकालीन असलेतरीही जाहिराती भाजपासरकारच्या काळात प्रस्तूत होतात हा एक विचीत्र विरोधाभास आहे.
आंतरधर्मीय विवाहामुळे पारसी संस्कृतीचे लोक कमी होत असतील तर सांस्कृतीक जतनासाठी त्यांची चांगली गाणी नृत्य चांगले उत्सव हिंदू बांधवांना अंगिकार करण्यास सांगता येतील, हवेतर पारसी धर्मीयांचे कोण मूळपुरुष होते त्यांना हिंदू धर्मात संत म्हणून स्थान द्या; आंतरधर्मीय विवाह थांबवणे अथवा चुकीच्या जाहिराती करणे हा अल्पसंख्यांकाच्या संस्कृती संवर्धनाचा उपाय नव्हे नाही भारताची आंतरधर्मिय ओळख शाबूत ठेवण्यासाठी आपापसात विश्वास असलेल्या दोन समाजात दुफळी माजवण्याचा प्रकार तेही परकीय नव्हे तर स्वकीय सरकारांनी करणे अथवा असे होताना झोपा काढणे निंदनीय आहे.
संदर्भ लोकसत्तामधील ही बातमी
प्रतिक्रिया
हिंदू कॉलनी/ पारसी कॉलनी
अत्यंत खुल्या दिलाच्या
माहितीगार यांना माझा पाठींबा
पारसी कालनीत बरीच वर्षे घालवलेली आहेत.
हवेतर पारसी धर्मीयांचे कोण
मला वाटते आजचा तरूण हिंदू
आधूनिक काळातील अजून एक संतत्व
चूक माहिती आहे. असुर आणि देव
बरं
.
होना मग हि असली न संपणारी
मी हेच म्हणणार होतो .... जर
३.५....
माहितगार यांचा आयडी नाना ने
काय हो काय झाले, काही चुकले
हो थोडे चुकलेच.
सविस्तर प्रतिसादाची प्रतिक्षा
पारशी लोकांना एक गोष्ट माहित
मी अबसोल्यूट सेक्यूलरीस्ट आहे
पारशी माणसाने गैर पारशी
माहितगार यांच्या विचारांशी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }आक्षेपावर आक्षेप
हो, चालेल, नक्की चालेल...
- भारताच्या जवानांनी पाकिस्तानी सैनिकांवर गोळीबार केला
- पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या जवानांवर गोळीबार केला
यात दोन्हीत (एक भारतीय म्हणून) काही फरक आहे की नाही? की दोन्ही स्वीकारा किंवा दोन्ही नाकारा अशी बायनरी भूमिका घ्यायची?कुठलाही धर्म जात टिकवण्यासाठी