Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पगला गजोधर on Wed, 09/24/2014 - 12:44
अमावस्येच्या दिवशी मंगळावर भारतीय अंतराळ संशोधकांनी आज ऐतिहासिक कामगिरी करत मंगळ मोहिम यशस्वीरित्या पार करत मंगळाला गवसणी घातली. || मंगलमय दिन || मन:पूर्वक अभिनंदन !!! सर्व शास्त्रज्ञांचे खूप खूप आभार . गर्व आहे तुमच्यावर . पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आधीच्या व आताच्या केंद्र सरकारने त्यांना पूर्ण सहकार्य केल्याबादाल त्यांचेही ही आभार. मिपाकर तुमच्या यावरील बहुमुल्य प्रतिक्रिया मांडा.
  • Log in or register to post comments
  • 15695 views

प्रतिक्रिया

Submitted by एस on Wed, 09/24/2014 - 13:16

Permalink

अभिनंदन!!!

आता मंगल-अमंगल वैग्रे खुळचट कल्पना कमी होतील अशी आशा करायला हरकत नाही. मंगळबिंगळ ज्यांच्या पत्रिकेत शनी होऊन बसलाय त्यांच्या विषयी सहानुभूती! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Wed, 09/24/2014 - 17:39

In reply to अभिनंदन!!! by एस

Permalink

आता मंगल-अमंगल वैग्रे कल्पना

आता मंगल-अमंगल वैग्रे कल्पना कमी होतील अशी खुळचट आशा करायला हरकत नाही. एकिकडे मंगळयान .. दुसरीकडे अर्ज भरायला पितृपक्ष संपण्याची वाट बघणारे उमेदवार !!
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Wed, 09/24/2014 - 13:19

Permalink

अभिनंदन

मोहिम यशस्वी करणार्‍या सर्वांचे अभिनंदन. या सर्वांचा अभिमान वाटतो (गर्व हा शब्द हिंदीत 'अभिमान' या अर्थाने वापरतात. मराठीत गर्व म्हणजे अहंकार,माज, आढ्यता)
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Wed, 09/24/2014 - 14:37

In reply to अभिनंदन by सर्वसाक्षी

Permalink

गर्वसे कहो हम -- है. अशी घोषणा करणार्याना पण, हेच सांगा ह काका !

गर्वसे कहो हम -- है. अशी घोषणा करणार्याना पण, हेच सांगा ह काका !
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 09/24/2014 - 14:57

In reply to गर्वसे कहो हम -- है. अशी घोषणा करणार्याना पण, हेच सांगा ह काका ! by पगला गजोधर

Permalink

विषेशतः त्या घोषणेनंतरच गर्व

विषेशतः त्या घोषणेनंतरच गर्व हा शब्द मराठीत चुकीच्या अर्थाने वापरला जाऊ लागला आहे ! बरेच जण गर्व म्हणजे महाअभिमान (जास्त वजनदार अभिमान ;) )असे समजतात :) हिंदीत "गर्व" = मराठीत "अभिमान" मराठीत "गर्व / घमेंड / अहंकार" = हिंदीत "घमंड / अहंकार"
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Wed, 09/24/2014 - 16:22

In reply to गर्वसे कहो हम -- है. अशी घोषणा करणार्याना पण, हेच सांगा ह काका ! by पगला गजोधर

Permalink

घोषणा

गर्वसे कहो हम -- है
सदर घोषणा हिंदी आहे तेव्हा या घोषणेत गर्व हा शब्द योग्यच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Wed, 09/24/2014 - 17:37

In reply to घोषणा by सर्वसाक्षी

Permalink

सदर घोषणेच्या भाषिक अचूकतेबद्दल, मी कोणतेही भाष्य केलेलं नाही.

सदर घोषणेच्या भाषिक अचूकतेबद्दल, मी कोणतेही भाष्य केलेलं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on Wed, 09/24/2014 - 23:12

In reply to सदर घोषणेच्या भाषिक अचूकतेबद्दल, मी कोणतेही भाष्य केलेलं नाही. by पगला गजोधर

Permalink

ते पण सदर घोषणेबद्दल नव्हे तर

ते पण सदर घोषणेबद्दल नव्हे तर तुम्ही लिहिलेल्या चार ओळीतील चुकिच्या शब्दयोजनेबद्दल भाष्य करत होते. "गर्व आहे तुमच्यावर" हे साफ चुकिचे आहे. हिंदीतून मराठी लिहिण्यापेक्षा मराठीतून मराठी लिहा.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 09/25/2014 - 09:33

In reply to ते पण सदर घोषणेबद्दल नव्हे तर by रामपुरी

Permalink

पुढें कांय तें बोलां !

अऱ, व्हय कि ऱ मर्दा, म्या कुट नाय म्हन्तो. उगा आपल चिंगळ्या कशापाई चापताय म्हन्तो म्या, तस लइ बारीक बगीतलं तर बाईला बी मिसरूड दिसतया. यशस्वी मंगलयांनाविषयी "पुढें कांय तें बोलां" !
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 09/25/2014 - 11:13

In reply to पुढें कांय तें बोलां ! by पगला गजोधर

Permalink

पण काहिही झाले तरी तुम्ही

पण काहिही झाले तरी तुम्ही तुमची चूक मान्य करु"च" नका..टांग उप्परईच होना
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 09/25/2014 - 12:37

In reply to पण काहिही झाले तरी तुम्ही by टवाळ कार्टा

Permalink

क्या मिया, ना दुआ ना सलाम

क्या मिया, ना दुआ ना सलाम, सिद्दा इधरईकोच घेरनेके क्यु बाता करतंई आप ? मई उदरको, 'कोम और पूरी आवाम' के जानिबसे इस्रोका इस्तकबाल करवानेवास्ते तकरीर करवातै, और इदरको, तुमें मेरेकु गल्तिया निकलते, छोटीसी गल्ती करे दिये तो क्या बुरा किये, मिया | सवेरेसवेरे खानसामा दूध की जगह मिर्ची का पावडर पिला दिये क्या !!!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 09/25/2014 - 12:46

In reply to क्या मिया, ना दुआ ना सलाम by पगला गजोधर

Permalink

छोटीसी गल्ती करे दिये तो क्या

छोटीसी गल्ती करे दिये तो क्या बुरा किये, मिया |
खुद की गलतीयां कुबुल करनेके लिये जिगर अऊर बडा दिल और दिमाग लगता...और ये छोटी छोटी गलतीयोंके वजेसेईच "चलता है" अ‍ॅटिट्युड बनता है जिसके वास्ते देश का कचरा हो रहेला है
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 09/25/2014 - 14:10

In reply to छोटीसी गल्ती करे दिये तो क्या by टवाळ कार्टा

Permalink

Miya

'कोम और पूरी आवाम' के जानिबसे इस्रोका इस्तकबाल करवानेवास्तेच इदरको बाता करो मिया.
  • Log in or register to post comments

Submitted by नानासाहेब नेफळे on गुरुवार, 09/25/2014 - 14:55

In reply to Miya by पगला गजोधर

Permalink

माशाल्ला, क्या खुब उर्दु

माशाल्ला, क्या खुब उर्दु जुबान है आपकी गजोधरभाई. मंगल पै तश्करी पहुंचने के इस मौके पर पुरी अवाम ज्योतिष पढके उसे नसीब मानने जैसी मनहुस आदतौ से परहेज करेगी, और ये बेकार रिवाज हमारी दिलोदिमाग से हमेशा के लिए हट जायेगा यहिं अल्लाताला से गुजारीश है.
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on गुरुवार, 09/25/2014 - 15:02

In reply to माशाल्ला, क्या खुब उर्दु by नानासाहेब नेफळे

Permalink

तश्करी नाही तश्तरी.

तश्करी नाही तश्तरी. बाकी उपग्रहाला 'उडन तश्तरी' म्हणतात का हे मला माहीत नाही ब्वा.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 09/25/2014 - 15:26

In reply to तश्करी नाही तश्तरी. by शिद

Permalink

अहो नेफळेबुवांना तश्करीच

अहो नेफळेबुवांना तश्करीच म्हणायचे असावे. एकदा का माणूस तिकडं पोचला की तश्करीच सुरू होणार नायतर काय? तिकडचेही गुंठामंत्री तयार होणार =))
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on गुरुवार, 09/25/2014 - 15:33

In reply to अहो नेफळेबुवांना तश्करीच by बॅटमॅन

Permalink

हा हा हा. (स्मायल्या कुठं

हा हा हा. (स्मायल्या कुठं गायबल्या?) शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Fri, 09/26/2014 - 11:22

In reply to अहो ते महाराष्ट्राला by काळा पहाड

Permalink

हो ना. तरी राने विकुनच यांनी

हो ना. तरी राने विकुनच यांनी करोडो कमावले. एरवी नुसते बसुनच असायचे. एवढी मोठ्ठली जमीन होती म्हणुन कसायचे कष्ट घ्यायचेच असे नाही. अवांतर गंमत म्हणून सांगतो. एका मित्राचे परिचित होते रावेतमध्ये. जागा विकुन प्रचंड पैसा आला हाताशी. जाग विकली तशी गुरेही विकली. एवढा पैसा आल्यावर त्याचे नियोजन करायचे सोडुन साहेबांनी २ ह्मर विकत घेतल्या. ज्या गोठ्यात पुर्वी म्हशी बांधायचा तिथेच मग २ काळ्या कुळकुळीत हमर बांधायला सुरुवात केली. कालांतराने सगळा पैसा उडवला. कसा उडवला देव जाणे. मग हमरही विकल्या. सध्या स्कोर्पियो आहे. ती ट्रॅव्हलच्या धंद्याला लावली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 09/25/2014 - 15:40

In reply to अहो नेफळेबुवांना तश्करीच by बॅटमॅन

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by नानासाहेब नेफळे on गुरुवार, 09/25/2014 - 15:37

In reply to तश्करी नाही तश्तरी. by शिद

Permalink

टायपो मिस्टेक. तश्तरी असे

टायपो मिस्टेक. तश्तरी असे वाचून घ्यावे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 09/24/2014 - 13:20

Permalink

गर्व आहे तुमच्यावर

गर्व आहे तुमच्यावर
आजकाल भलताच फेमस झालाय हा शब्द...लहानपणी आईने चिउताई आणि कावळ्याची गोष्ट नाही सांगितली का??? का तुम्ही इंग्लिश मिडीयमवाले???
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Wed, 09/24/2014 - 13:29

Permalink

सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन

सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि यापुढील सर्व मोहिमेसाठी हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by नानासाहेब नेफळे on Wed, 09/24/2014 - 13:58

Permalink

अभिनंदन!" कडक मंगळा"चा वापर

अभिनंदन!" कडक मंगळा"चा वापर करुन पत्रिकावगैरे थोतांडी तत्वज्ञानाने गोरगरिब समाजाला नाडणार्या पोटार्थी लोकांचा बंदोबस्त या देदिप्यमान कामगिरीने होईल अशी अपेक्षा बाळगुया.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Wed, 09/24/2014 - 15:21

In reply to अभिनंदन!" कडक मंगळा"चा वापर by नानासाहेब नेफळे

Permalink

नाडणार्‍या? गोरगरीब समाजाला

नाडणार्‍या? गोरगरीब समाजाला कुणी जबरदस्तीनं सांगितलंय का ज्योतिषाकडे जा म्हणून? ज्योतिषानं कडक मंगळ सांगितलाय म्हणून त्या गोरगरीब समाजातलं कुणी आत्महत्या केलेलं मी काही ऐकलं नाही. पण गोरगरीब शेतकर्‍यांचे पैसे खावून सिंचनाचे पैसे हडप करून त्यांना आत्महत्या करायला लावणार्‍या दरोडेखोर लोकांचा बंदोबस्त करायला हवा हे खरं.
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Wed, 09/24/2014 - 16:47

In reply to नाडणार्‍या? गोरगरीब समाजाला by काळा पहाड

Permalink

कडक

काप , कडक प्रतिसाद ! काड्या घालू लोकांचा असाच प्रतिवाद करायला हवा.
  • Log in or register to post comments

Submitted by नानासाहेब नेफळे on Wed, 09/24/2014 - 18:45

In reply to नाडणार्‍या? गोरगरीब समाजाला by काळा पहाड

Permalink

शेतकर्यांचे पैसे, सिंचन

शेतकर्यांचे पैसे, सिंचन घोटाळा
अहो आचार्य ,तुमचे लॉजिकच लावले तर सिंचन घोटाळा करणार्याला निवडुण द्यायला कुणी सांगितलं होतं? जनतेने त्याला दिले निवडुण, त्याचा दोष जन्तेचा... सिंचनघोटाळा करणार्याचा नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Wed, 09/24/2014 - 19:03

In reply to शेतकर्यांचे पैसे, सिंचन by नानासाहेब नेफळे

Permalink

दादांच्या धरणात अंघोळ केलेली

दादांच्या धरणात अंघोळ केलेली दिसतेय! सिंचन घोटाळा करण्यासाठी निवडून दिलेलं नाही, कामं करण्यासाठी निवडून दिलंय. ज्योतिषाकडं जाणारे ज्योतिष ऐकण्यासाठीच जातात. ज्योतिषि करप्शन करत नाही, तुम्हाला जायचं नसेल तर जाऊ नका. माझा ज्योतिषावर विश्वास नाही आणि मी जात पण नाही पण तो सांगतो ते विश्वास ठेवायचं नसेल तर तुम्ही तिकडे जावू नका. आता एखादा सिनेमा वाईट निघाला तर तुम्ही त्या दिग्दर्शकानं घोटाळा केला असं म्हणता का? की पैसे मागता परत? सिंचन घोटाळा करणार्रे सांगतात की मी चांगलं गव्हर्न्मेंट देईन आणि भ्रस्टाचार करतात. हा फरक आहे. घुसतंय का गुढघ्यात काही?
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 09/24/2014 - 22:09

In reply to शेतकर्यांचे पैसे, सिंचन by नानासाहेब नेफळे

Permalink

त्यांचे लॉजिक कशाला लावताय.

त्यांचे लॉजिक कशाला लावताय. तुमचे स्वतःचेच लावा की. तुम्हाला नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by वाडीचे सावंत on Wed, 09/24/2014 - 21:26

In reply to नाडणार्‍या? गोरगरीब समाजाला by काळा पहाड

Permalink

सडेतोड उत्तर ..

सडेतोड उत्तर ..
  • Log in or register to post comments

Submitted by सवंगडी on Wed, 09/24/2014 - 14:01

Permalink

एक पुणेरी प्रतिक्रिया

'काय चाललंय'वर सध्या एक पुणेरी प्रतिक्रिया फिरते आहे. कि, "मंगलयानाचा ६४ कोटी कि.मी.चा प्रवास ४५० कोटी रुपयात झाला, आणि पुण्यात अजून १७ रु. प्रती किलोमीटर ने रिक्षा चालते. इस्रो वाल्यांनी जरा इकडे पण संशोधन करा म्हणव."
  • Log in or register to post comments

Submitted by सवंगडी on Wed, 09/24/2014 - 14:05

Permalink

आलिया भट ची प्रतिक्रिया.

"मंगल यान मंगळावर बुधवारी कस काय पोहोचलं ?" - --आलिया भट ची प्रतिक्रिया.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 09/25/2014 - 00:55

In reply to आलिया भट ची प्रतिक्रिया. by सवंगडी

Permalink

हो आणि तेही पित्रुपक्षात !!

हो आणि तेही पित्रुपक्षात !! रच्याकने - मंगळयान मंगळावर उतरलेले नाही तर मंगळाच्या ओर्बिट (मराठी शव्द ?) मध्ये स्थिर झालेय..
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 09/24/2014 - 14:54

Permalink

भारताचे, भारतीयांचे अभिनंदन.

भारताचे, भारतीयांचे अभिनंदन. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आभार. व्हॉट्सअ‍ॅप वर फिरत असलेला एक संदेश डकवतो आहे:
**** पुण्यातील बहुचर्चित बीआरटी प्रोजेक्ट आणि मंगलयान मोहिम यासाठी लागलेला खर्च हा एक समान (४५० कोटी आहे). बीआरटीचे यश (???) हे सर्वज्ञात आहे आणि त्यामुळेच इस्रोचे जरा जास्तच कौतुक करावेसे वाटते आहे. :) ****
बीआरटीच्या नावाखाली पैसे लाटलेले असल्यास, गोरगरिब समाजाला नाडणार्या आणि जनतेच्या पैशाच्या दुरुपयोग करणार्‍या पैसेखाऊ माठ राजकारण्यांना आणि संबंधित अधिकार्‍यांना यामुळे कडक चपराक बसेल अशी अपेक्षा बाळगुया.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 09/24/2014 - 15:02

In reply to भारताचे, भारतीयांचे अभिनंदन. by मृत्युन्जय

Permalink

बीआरटी वर ४५० नाही ११३५ कोटी

बीआरटी वर ४५० नाही ११३५ कोटी खर्च झाले आहेत... फायदे-तोटे काय (आणि कोणाचे) झालेत हे "क्ष्क्ष्क्ष"लाच ठाऊक.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Wed, 09/24/2014 - 15:02

In reply to बीआरटी वर ४५० नाही ११३५ कोटी by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

४५० नाही ११३५ कोटी खर्च झाले

४५० नाही ११३५ कोटी खर्च झाले आहेत & Counting .......
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Wed, 09/24/2014 - 14:55

Permalink

मी भाग्यवान ..

आमच्या पिढीला मी फार भाग्यवान समजतो. ( जे १९५० च्या सुमारास जन्माला आले ते ) १९६९ च्या वर्षात मानव चंद्रावर पोहोचला हे ऑनलाईन अनुभवले. आता ही उपलब्धी. मला वाटते. राजकारण्याची दुषित न केलेले हे एकमेव क्षेत्र असावे. भारतात चांगल्या नागरिकांची वानवा नाही. नाठाळाचे कमरेत लाथ घालण्याची आमची हिंमत नाही . ती आसच नाही हे दुर्दैव. ( ३ कोटी खटले निकालाविना पडून ).भारतीय शास्त्रज्ञानी क्रायोजेनिक नंतर हे आव्हान स्विकारले व पूर्ण केले. अभिवादन त्याना ! फक्त आता मोदी सरकारने भूमीच्या उद्धाराकडे लक्ष द्यावे. आकाशातून भारतीय शेती पहावत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Wed, 09/24/2014 - 15:24

In reply to मी भाग्यवान .. by चौकटराजा

Permalink

ते पण मोदीनीच करायचं का?

ते पण मोदीनीच करायचं का? जाणता राजा आणि त्यांच्या अधिकृत आणि अनधिकृत संघटना कशाला आहेत?
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 09/25/2014 - 10:13

In reply to ते पण मोदीनीच करायचं का? by काळा पहाड

Permalink

जाणता राजा व

आता जाणता राजा व त्यांच्या संघटना शेवा निवृत्त होनार ! दिवाळी काटेवाडीच्या अंगणात !
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Wed, 09/24/2014 - 14:56

Permalink

शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि

शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि यापुढील सर्व मोहिमेसाठी हार्दिक शुभेच्छा! !! अवांतर : चला आता पर-राष्ट्रीय भेटी गाठी झाल्या , यान पण पोचले ..आता जरा ते स्वच्छ भारत अंतर्गत संडासांच पण बघा ..धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Wed, 09/24/2014 - 15:41

In reply to शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि by सुहास..

Permalink

ते २ ऑक्टोबरला आहे.

ते २ ऑक्टोबरला आहे. तेंव्हापासून. स्वच्छ भारत !
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 09/24/2014 - 15:25

Permalink

हा दिवस भारताच्या इतिहासात

हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. "पहिल्या प्रयत्नात मंगळाची सफल सफर" ही अमेरिका, युरोपीय समुदाय, चीन सारख्या सधन / प्रगत देशांना न जमलेली गोष्ट साध्य करून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एक कधिच न मोडला जाणारा विक्रम स्थापन केला आहे. जगात आज भारताची मान खचितच उंचावलेली आहे !!! याकरिता इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे ! या सुवर्णघडीला पंतप्रधान मोदींनीही इस्रोच्या नियंत्रणकक्षात आपली उपस्थिती नोंदवली हे पण लक्षणीय / सूचक आहे. त्यातही, अपयश आले असते तर त्यात सहभागी असल्याची त्यांची टीप्पणी शास्त्रज्ञांना वेगळाच संदेश आणि हुरुप देउन गेला असणार. वरच्या दोन्ही गोष्टींचा बोध इतर शासकीय संशोधन संस्था... विषेशतः डीआरडीओ, इ... घेतील असे वाटते. किंबहुना या गोष्टी त्यांच्यावर अशीच काही कर्तबगारी करण्यासाठी दबाव आणतील असे वाटते. आज इस्रोच्या शास्त्रज्ञांनी भारतिय म्हणून अभिमान वाटावयाची क्वचित मिळणारी संधी दिली हे मात्र खरे ! *good*
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Wed, 09/24/2014 - 15:32

Permalink

अभिनंदन

भारतातील सर्वच शास्त्रज्ञांचे अभिनंदन. भारतात नुसतीच आर्थिक व सामाजिक विषमता नाहीये, तर बौद्धिक विषमता पण आहे हे यावरुन सिद्ध झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Wed, 09/24/2014 - 17:28

In reply to अभिनंदन by तिमा

Permalink

याचे श्रेय पंडित नेहरूंचे आहे, हे निःसंशय

इस्रो’च्या या गरुडभरारीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय अंतराळ संशोधनविश्वाच्या इतिहासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता देशाच्या विज्ञानकुशलतेचे एक तेजस्वी चित्र पहायला मिळते. पंडित जवाहरलाल नेहरू केंब्रिज विद्यापीठात विज्ञानाचे पदवीधर होते, या गोष्टीचा स्वतंत्र भारताच्या वैज्ञानिक आणि तंत्रप्रगतीवर प्रचंड परिणाम झाला. भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यावर त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान विषयक खाती आपल्याकडे ठेवलीच पण एक स्वतंत्र `अवकाश संशोधन विभाग’ निर्माण केला. भारतीय प्रजासत्ताक दहा वर्षांचं व्हायच्या आत अणुशक्ती आणि अवकाश संशोधन या दोन जागतिक महत्त्वाच्या आणि काहीशा भविष्याकडे नजर ठेवून असलेल्या संशोधनासाठी भारताने कंबर कसली आणि याचे श्रेय पंडित नेहरूंचे आहे, हे निःसंशय. सन १९६०मध्ये, अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र आणि प्रायोगिक उपग्रह दळणवळण भूस्थानका्चा श्रीहरीकोटा तळ, तसेच भारतीय उपग्रह मालिका प्रकल्प यांची तयारी झालेली होती. इंकोस्पार (INCOSPAR) या संस्थेची सन १९६२ मध्ये स्थापना हे या दृष्टीने उचललेले पुढचे पाऊल होते. `इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ हे या संस्थेचे पूर्ण नाव. अशा संस्था स्थापन करण्यापूर्वी त्यासाठी माणसे निवडणे हे काम पंडित नेहरूंनी जातीने केले. अणुऊर्जा प्रकल्प आणि संशोधनासाठी त्यांनी होमी भाभा, सेठना यांच्यासारखे तज्ञ शास्त्रज्ञ आणले तर अवकाश संशोधनासाठी विक्रम साराभाई, डॉ. गोवारीकर यांना बोलावून घेतले. विक्रम साराभाई यांना इंकोस्पारचे अध्यक्षपद देण्यात आले. पुढे सन १९६९ मध्ये, विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस आधुनिक रूप मिळाल्यानंतर इस्रो ही संस्था भारतातील सर्व अवकाश कार्यक्रमांचे नियंत्रण करू लागली.
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on गुरुवार, 09/25/2014 - 00:31

In reply to याचे श्रेय पंडित नेहरूंचे आहे, हे निःसंशय by पगला गजोधर

Permalink

विक्रम साराभाई यांना

विक्रम साराभाई यांना इंकोस्पारचे अध्यक्षपद देण्यात आले. पुढे सन १९६९ मध्ये, विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस आधुनिक रूप मिळाल्यानंतर इस्रो ही संस्था भारतातील सर्व अवकाश कार्यक्रमांचे नियंत्रण करू लागली. आमचा जन्मही १९६९ चा, पण हा निव्वळ योगायोग समजावा का? नाही म्हनजे आणखीही एक घटना आहे १९६९लाच गोयंकाजी विपश्यना भारतात घेउन आले.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 09/25/2014 - 09:35

In reply to विक्रम साराभाई यांना by विलासराव

Permalink

दोन चांगल्या गोष्टी देशाला मिळाल्या म्हणायच्या

हां, म्हणजे १९६९ साली इस्रो आणि विपश्यना या दोन चांगल्या गोष्टी देशाला मिळाल्या म्हणायच्या.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Wed, 09/24/2014 - 15:47

Permalink

अभिमान आहे!

सकाळी टिव्ही लावून बसलो होतो डीडी न्यूज वर लाईव्ह चित्रण दाखवत होते, इस्रो मधील. पंतप्रधानही आले होते. सॉलिड अभिमान वाटला शास्त्रज्ञांचा, आणि भारत देशाच्या या यशाचा. अशाच भरा-या होत राहोत.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्न्या on Wed, 09/24/2014 - 16:02

Permalink

अभिनंदन!

आपल्या देशाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो! मोदींची उपस्थिती आणि न वाचता सहज केलेले कौतुकही भावले.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 09/24/2014 - 16:45

Permalink

अभिमान वाटला.

भारतिय शास्त्रज्ञांचे आणि तत्कालीन राज्यकर्त्यांचे हार्दीक अभिनंदन. इस्रो: इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी.....
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Wed, 09/24/2014 - 17:45

In reply to अभिमान वाटला. by प्रभाकर पेठकर

Permalink

पंडित नेहरूंनी,इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू ...

इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी..... भारतीय प्रजासत्ताक दहा वर्षांचं व्हायच्या आत अणुशक्ती आणि अवकाश संशोधन या दोन जागतिक महत्त्वाच्या आणि काहीशा भविष्याकडे नजर ठेवून असलेल्या संशोधनासाठी भारताने कंबर कसली आणि याचे श्रेय पंडित नेहरूंचे आहे, हे निःसंशय.
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Wed, 09/24/2014 - 18:06

Permalink

दोन्ही बाजूंनी पुढे

असणारा भारतासारखा देश क़्वचितच असेल… एकीकडे मंगळावर स्वारी आणि दुसरीकडे दारिद्र्य आणि उपासमारी….कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या !!
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com