मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देवासाठी काय करावे बरे

देशपांडे विनायक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सचिन तेंडूलकर शेवटच्या रणजी सामन्यात ५ वर त्रिफळा चीत झाले डॉन ब्राड्मन शेवटच्या सामन्यात ० वर बाद झाले सचिनचा प्रवास त्या दिशेने चालू झाला असे वाटू लागले म्हणून विचारतो कि या देवासाठी भक्तगण तर भरपूर आहे पण त्यांची प्रार्थना त्याला शेवटच्या सामन्यात १०० धावा करून देईल का ? हा प्रश्न पडण्याचे कारण सचिनने काढलेल्या प्रत्येक धावेकारता त्याच्याबरोबर खेळपट्टीवर कुणालातरी थांबावे लागे हे विसरले जातेय !! हे विसरणे म्हणजे हा सांघिक खेळ आहे हे विसरणे !!! संघ जिंकतो किव्हा हारतो खेळाडू नव्हे !

वाचने 3133 वाचनखूण प्रतिक्रिया 15

छ्या..... शिवसेना,मनसे, उद्धव, राज आणि सचिन कंटाळा आला राव मला या विषयांचा. कधी एकदा सच्या त्या शिल्लक कसोट्या खेळुन मध्यप्रदेशात कोंग्रेस पक्षाच्या प्रचाराला जातो कोणास ठाऊक ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन Mon, 10/28/2013 - 15:25
+११११११११११११११११११११११११११११११११. अगदी सहमत. गेलाबाजार दिग्गीराजाचा विषय तरी काढायचा. वरील विषयांचा लैच चोथा झालाय राव.

कोणत्याही पक्षाचा प्रचार करावयास सांगणे अशी शिक्षा किंव्हा शाप देण्याइतके वाईट तो खेळला असे मला वाटत नाही १०० व्या शतकासाठी सहनशक्ती तपासली हे मात्र खरे

In reply to by देशपांडे विनायक

>>>>>कोणत्याही पक्षाचा प्रचार करावयास सांगणे अशी शिक्षा किंव्हा शाप देण्याइतके वाईट तो खेळला असे मला वाटत नाही गुडवन... ! :) -दिलीप बिरुटे

विअर्ड विक्स Mon, 10/28/2013 - 15:18
already त्याच्यासाठी मुंबईत सामना ठेवला आहे प्लस समोर दुबळी वेस्ट ईंडीज आहे. ह्या पलीकडे अजून काय fixing करायचे ? शतक ठोकले तरी प्रसिद्धी नाही ठोकले तरी बातमी. आपण खेळाडूला खेळाडू न समजता देव मानतो हेच मला चुकीचे वाटते.

आपण खेळाडूला खेळाडू न समजता देव मानतो हेच मला चुकीचे वाटते.'' खेळाडूला खेळाडू समजण्यासाठी खेळ समजला पाहिजे बाकी एकदा खेळ समजू लागले तर खेळण्याखेरीज काही करावे लागत नाही म्हणे !!!