✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माहेरचा अव्हेर!

आ
आजानुकर्ण यांनी
Tue, 03/12/2013 - 20:26  ·  लेख
लेख
भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्‍या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच. काही दिवसांपूर्वी इटलीच्या दोन सैनिकांना निरपराध भारतीय कोळ्यांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केल्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार या सैनिकांना चार आठवड्यांसाठी मायदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ही सुटी संपल्यानंतर त्यांनी खटल्याचे कामकाज सुरु ठेवण्यासाठी परतणे अपेक्षित होते. मात्र आता इटालियन सरकारने हे सैनिक भारतात येणार नाहीत हे जाहीर केले आहे. नेहमीच्या नेभळट परंपरेनुसार इथेही आपल्या इज्जतीचे मुस्काट फुटले आहे. मात्र महाराणींच्या माहेरचा घोटाळा असल्याने प्रश्न प्रतिष्ठेचा बनू शकतो. त्यामुळे शक्य तितके प्रयत्न करून भारत सरकार काखा वर करणार असे दिसते आहे. क्वात्रोचीजींचे आणि हेलिकॉप्टर घोटाळ्याचे उदाहरण ताजे आहे. मागेही तंत्रज्ञानक्रांतीसूर्य राजीवजींच्या कारकीर्दीत ह्याच देशाने निकृष्ट हेलिकॉप्टरे भारताच्या गळ्यात मारली आणि नंतर ती नगण्य भावात विकली गेली. पण ते प्रकरणही दडपले गेले असावे. जय सोनियाजी! http://www.thehindubusinessline.com/news/italian-marines-wont-return-to-india-for-trial/article4500009.ece?homepage=true -हुय्या
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
45522 वाचन

💬 प्रतिसाद (203)

प्रतिक्रिया

टेन्शान नाय !!

सचिन
Sat, 03/16/2013 - 12:41 नवीन
पण आता सर्वश्री मनमोहनसिंगांनी इटलीला खडसावले आहे ना! एकदम सज्जड दम !! आता काय बी टेन्शान नाय !!
  • Log in or register to post comments

ईटली पैश्याने सेटेल करणार होती हे प्रकरण

वेताळ
Sat, 03/16/2013 - 18:45 नवीन
जर मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना चांगला मोबदला मिळणार असेल तर उत्तम.
  • Log in or register to post comments

आता राजरोज गुन्हे करून भरपाई

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 03/17/2013 - 10:48 नवीन
आता राजरोज गुन्हे करून भरपाई देऊन सुटणे हळूहळू समाजमान्य होते आहे तर !!! हेच विधान दिल्लीच्या पिडीतेला लावले तर चालेल का तुम्हाला ? भारताच्या हद्दीत दोन कोळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले गेले. गैरसमजातून हल्ला केले हे मान्य केले तरी पूर्ण शिक्षा माफ तर होताच कामा नये. सौम्य करावी एकवेळ पण आर्थिक मोबदला घेऊन सोडणे म्हणजे न्यायाचा बाजार मांडणे आहे असे मला तरी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

भारताच्या हद्दीत दोन

मदनबाण
Sun, 03/17/2013 - 13:08 नवीन
भारताच्या हद्दीत दोन कोळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले गेले. गैरसमजातून हल्ला केले हे मान्य केले तरी पूर्ण शिक्षा माफ तर होताच कामा नये. सौम्य करावी एकवेळ पण आर्थिक मोबदला घेऊन सोडणे म्हणजे न्यायाचा बाजार मांडणे आहे असे मला तरी वाटते. अगदी सहमत ! आता एक प्रश्न मला विचारावासा वाटतो... इटलीच्या हद्दीत २ कोळ्यांवर हल्ला करुन,त्यांना ठार मारल्यावर हिंदुस्थानच्या नौसैनिकांना इटलीने अशाच पद्धतीने हिंदुस्थानात परत जाउ दिले असते का ? (या प्रश्नावर विचार करा आणि बघा काय उत्तर तुमच्या मनात येते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मेहेंदळे साहेब माझे म्हणणे असे आहे कि

वेताळ
Sun, 03/17/2013 - 16:16 नवीन
केरळ मधील मृत मच्छीमार जे ह्या सैनिकांच्या हल्ल्यात मरण पावले ते काही सधन घरातील नव्हते. त्याच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबियाची होणारी परवड त्या इटलीच्या सैनिकाना शिक्षा झालेवर कमी होणार असेल तर ठिक आहे. परंतु न्याय मिळाला तरी त्याचा काहीएक फायदा त्यांना होईल असे वाटत नाही. मागील महिन्यात १० पंजाबी युवकानी दुबई मध्ये एका पाकिस्तानी युवकाची हत्या केली. तेथिल प्रचलित कायद्या प्रमाणे त्याना मृत्युदंडाची शिक्षा झाली. परंतु शरियत कायद्यानुसार त्याच्या वतीने एका पंजाबी उद्योगपतीने काही करोड रुपये ब्लडमनी मोजुन त्याना भारतात परत आणले.त्या युवकानी जाणिवपुर्वक त्याची हत्या केली होती. इथे जाणिवपुर्वक हत्या केली असे म्हणता येणार नाही. मग त्या कुटुंबियाचा फायदा कशात आहे तो निर्णय घेतला तर काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मग उद्या ईटलीतले बाकी चे

श्री गावसेना प्रमुख
Sun, 03/17/2013 - 18:30 नवीन
मग उद्या ईटलीतले बाकी चे नागरीक जे की इथे टुरीष्ट व्हिसा घेउन आलेत त्यांनी बंदुका घेउन वाट्टेल तितके मुडदे पाडावे मग ईटलीने पैश्याने भरपाइ करावी ,कशी मस्त आयडीया आहे ना गरीब घरातल्या मानसांनी ह्याचा लाभ घ्यावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

खुपच अभ्यासु प्रतिसाद दिलात

वेताळ
Sun, 03/17/2013 - 18:38 नवीन
बंदुक घेवुन आपण कोण कोणत्या देशात प्रवेश करु शकतो ह्याची माहिती दिलीत तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

भारतात बंदुक सहज उपलब्ध होतात

श्री गावसेना प्रमुख
Sun, 03/17/2013 - 18:40 नवीन
भारतात बंदुक सहज उपलब्ध होतात म्हणुन म्हटले वेताळ राव्,तुम्ही का मानगुटीवर बसताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

नाही हो सेना प्रमुख

वेताळ
Sun, 03/17/2013 - 18:44 नवीन
मुळात हि घटना घडली आहे ते ठिकाण भर समुद्रात आहे.त्यामुळे तिथे भारताची हद्द होती का ? कि ती हद्दी बाहेर झाली ह्याचा निकाल लागला नाही आहे.त्यामुळे तिथे कोणते नियम लागु होतात हे आपण सर्वसामान्य लोक सांगु शकत नाही.आयुष्यात सगळेच निर्णय भावनेच्या भरात घेवुन चालत नाहीत. थोडा व्यावहारिक विचार केला तर बरे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

वेताळ राव ते ठिकाण भारतीय

श्री गावसेना प्रमुख
Sun, 03/17/2013 - 18:49 नवीन
वेताळ राव ते ठिकाण भारतीय हद्दीत येतय हे भारत सरकारने ठामपणे सांगीतलय.तरीही तुम्हाला शंका असल्यास आपण प्रत्यक्ष घटनास्थळावर जाउन येउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

नक्कीच जावु

वेताळ
Sun, 03/17/2013 - 18:52 नवीन
येताना मला पण एक बंदुक पाहिजे ती पण आणु. तसे आपण दाऊद पाकिस्तानात असल्याचे ठाम पणे सांगत असतोच कि......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

नक्कीच जावु

वेताळ
Sun, 03/17/2013 - 18:52 नवीन
येताना मला पण एक बंदुक पाहिजे ती पण तुमच्या ओळखीने आणु. तसे आपण दाऊद पाकिस्तानात असल्याचे ठाम पणे सांगत असतोच कि......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

प्रकरण

चिरोटा
Sat, 03/16/2013 - 22:03 नवीन
इटलीऐवजी फ्रान्स्,जर्मनी असते तर एवढा गोंधळ झाला नसता एवढे नक्की. घटना घडल्यापासून केरळ काँग्रेसनेते,केंद्रातील काँग्रेस नेत्यांत "आम्ही त्यातले नाही आहोत' दाखवण्याची स्पर्धा चालु आहे.तोंड बंद ठेवले तर विरोधी पक्ष/जनता ह्या घटनेचा सोनिया-इटली असा संबंध लावणार. हे टाळण्यासाठी स्पर्धेत मनमोहनही उतरले आहेत्.सैनिक परतले नाहीत तर 'गंभीर परिणाम' होतील असेही ते म्हणाले आहेत.आपलल्या राजदूतांना बॅगा भरायचे संकेत दोन्ही देशांनी दिले आहेत.सैनिक परतण्याची शक्यता अतिशय कमी वाटते. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचा नेहमी विदूषक का होतो हे कोडे नेहमीच पड्त आलेय.
  • Log in or register to post comments

अमोल उद्गिरकरना

अन्या दातार
Sat, 03/16/2013 - 22:41 नवीन
अमोल उद्गिरकरना पंतप्रधानपदासाठी माझा संपूर्ण पाठिंबा जाहीर करतो. त्यांच्या प्रतिसादावरुन त्यांना सर्वच्या सर्व गोष्टीतली जाण आहे असे माझे मत बनले आहे.
  • Log in or register to post comments

माझाही पाठिंबा

क्लिंटन
Sun, 03/17/2013 - 08:31 नवीन
अमोल उद्गिरकरना पंतप्रधानपदासाठी माझा संपूर्ण पाठिंबा जाहीर करतो.
दे टाळी.अगदी मनातले बोललास बघ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

+१ घ्या टाळी ....

sagarparadkar
Sun, 03/17/2013 - 14:30 नवीन
आजपर्यंत "सोनियापादत्राणतलवसुंधराविहारधन्य" असे सुमार संपादक महिती होते ... हे अमोलरत्न बहुतेक त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता स्वतःच्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करत असावे ... कारण आता युवराजांचे आणि त्यांच्या पुढील पिढीचे गोडवे गाण्यासाठी सुमार संपादकांची लेखणी पुरेशी नसणार ... सकलतरतमविचारकर्त्यांचा बुद्धिभेद करायला आता ताज्या दमाचा गडी हवा ना ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

या समासप्रचुरताविलासास येक

बॅटमॅन
Mon, 03/18/2013 - 03:04 नवीन
या समासप्रचुरताविलासास येक खल्लास दाद दिल्या गेली आहे. (समासप्रेमी) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

सहमत

आजानुकर्ण
Fri, 03/22/2013 - 18:11 नवीन
अमोल उद्गिरकर पंतप्रधान होत असल्यास श्रीगुरुजींना किमान नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष किंवा पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी (ब्रजेश मिश्र यांच्याप्रमाणे) करण्यास माझा पाठिंबा आहे. - लिंकन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

जोरदार आहे

सूर्याजीपंत
Sun, 03/24/2013 - 07:31 नवीन
अगदी अगदी.... चर्चा वाचून मनसोक्त करमणूक झालेली आहे.. विशेषत: विमान अपहरणाच्या वेळेला काय रणनीती ठरवायला पाहिजे होती आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये काय करायला पाहिजे तो भाग. खासकरून कोणत विमान कसा न्यायला पाहिजे, आत काय ठेवायला पाहिजे, बाहेर काय सांगायला पाहिजे... हसून हसून पुरेवाट झाली...शाळेत असतानाच्या चर्चा आठवल्या....... बाकी श्रीगुरुजींना +1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

कंदाहार - संसद हल्ला वगैरे

नितिन थत्ते
Sun, 03/17/2013 - 09:36 नवीन
कंदाहार प्रकरणी तत्कालीन सरकारने जो निर्णय घेतला तो ग्राउंड रिअ‍ॅलिटी* पाहून सर्व शक्यता विचारात घेऊन मगच घेतला असावा. तो त्या परिस्थितीत योग्यच असणार. तसेच संसद हल्ल्यानंतर आर या पार लडाईची घोषणा करून नंतर ती केली नाही हा ही सूज्ञपणाचाच निर्णय होता. *ग्राउंड रिअ‍ॅलिटी तशी आहे असे उघडपणे आजवरच्या कुठल्याही राजकीय नेतृत्वाने सांगितले नाही. त्या ऐवजी बोटचेपेपणाचा/कणाहीनतेचा आरोप स्वतःवर घेतला ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

ऑगस्टा प्रकरण दाबण्यासाठी

मदनबाण
Sun, 03/17/2013 - 09:51 नवीन
ऑगस्टा प्रकरण दाबण्यासाठी काही नेते मंडळींनी खेळलेली ही कुटील निती आहे,अशी कॉन्स्पिरसी थेअरी आहे. (कुटिन पत्ते)
  • Log in or register to post comments

बरं आता पुढे काय?

प्रदीप
Sun, 03/17/2013 - 13:20 नवीन
ह्या इटली प्रकरणाचे नक्की पुढे काय होते आहे? सुरूवातीपासूनच भारताबाहेरील माध्यमांनी ह्या प्रकरणाची अजिबात दखल घेतली गेलेली नाही. भारतीय नेतृत्वाच्या 'कणखरपणा'ची जगात काय किंमत आहे, हे ह्यावरून सूचित व्हावे! आणि आतातर भारतीय माध्यमेही ह्याबद्दल काही लिहीतांना दिसत नाहीत. मी फक्त एकदोन इंडिश आणि दोन- तीन मराठी वर्तमानपत्रांच्या संस्थळांपुरते बोलतो, आणि हेही इथे नमूद करतो की हीच वर्तमानपत्रे 'मनमोहनांनी ठणकावले आहे' वगैरे थाटाच्या बातम्या गेल्या आठवड्यातच देत होती. अर्थातच भारतात आता दर बारा तासांना नवे स्कँडल मिळत असल्याने, ह्या प्रकरणाच्या तीव्रतेची धार माध्यमात, व बहुधा जनसामान्यांतही कमी झाली असावी.
  • Log in or register to post comments

इटली म्हणते सुप्रिम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे...

विकास
Sun, 03/17/2013 - 20:52 नवीन
कधीकाळी काश्मीर युनोत नेले आता हे इटालीयन नौसैनिक पण तसेच आंतर्राष्ट्रीय लवादात जाणार... Our decision based on your court ruling: Rome
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

आश्चर्य

तिमा
Sun, 03/17/2013 - 13:49 नवीन
कुठल्याच राजकारण्याला आपल्या देशाच्या इभ्रतीची पर्वा नाहीये आणि इथे देशप्रेमी सदस्यांची वादावादी चालू आहे हे पाहून आश्चर्य वाटले. या प्रकरणाचे पुढे काहीही होणार नाही. त्याचे आणखी एक 'भिजत घोंगडे' होईल. जनताही विसरुन जाईल. फक्त निवडणुकीच्या काळात ही 'कढी' परत गॅसवर चढवली जाईल. आता आख्खा युरोपियन महासंघ इटलीच्या सहाय्याला धावून आलाय. तुमच्याशी व्यापार बंद करतो असे सांगण्याची धमक आहे का सत्ताधार्‍यांमधे?
  • Log in or register to post comments

भारताला

चिरोटा
Sun, 03/17/2013 - 14:21 नवीन
आंतरराष्ट्रीय जगतात भारताचे राजदूत्,दुतावासातले अधिकारी हा चेष्टेचा विषय असतो असे वाचले होते.मंत्रीगण बाजुला ठेवा, ते येतात,जातात्.वर्षानुवर्षे नोकरी करूनसुद्धा ह्या अधिकार्‍यांचा अनेक प्रकरणांत पोपट होतो.ह्या लोकांची वक्तव्ये म्हणजे ambiguity चा उत्तम नमुना असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

हम्म...

दादा कोंडके
Sun, 03/17/2013 - 14:44 नवीन
तुमच्याशी व्यापार बंद करतो असे सांगण्याची धमक आहे का सत्ताधार्‍यांमधे?
आधिच इटलीत भारतीय इल्लीगल एमिग्रंट्स अगणित आहेत. या प्रकरणानंतर इटलीवर सूड घ्यायचा म्हणून आपले मुत्सद्दी राजकारणी इथल्या परिस्थितीमुळे अजुन जास्त लोकांना तिकडे घुसायला उद्युक्त करतील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

>>> आता आख्खा युरोपियन महासंघ

श्रीगुरुजी
Sun, 03/17/2013 - 20:29 नवीन
>>> आता आख्खा युरोपियन महासंघ इटलीच्या सहाय्याला धावून आलाय. तुमच्याशी व्यापार बंद करतो असे सांगण्याची धमक आहे का सत्ताधार्‍यांमधे? हे अजून वाचलेले नाही. पण आख्खा युरोपियन महासंघ भारताशी व्यापार बंद करणे शक्य नाही. भारतावर केवळ शाब्दिक दबाव आणण्यासाठी असे केले असावे. शेवटी देशाचे व्यावसायिक व आर्थिक हितसंबंध हे कोणत्याही नीतिमत्ता किंवा तत्वापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. भारतासारखे प्रचंड लोकसंख्या असणारे वाढते मार्केट कोणताही शहाणा देश दूर ठेवणार नाही. त्यामुळे या फुसक्या धमकीत काहीही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

आता

चिरोटा
Sun, 03/17/2013 - 22:30 नवीन
संऱक्षण क्षेत्रातील काही तज्ञांनी भारताला इटलीशी संबंध तोडणे परवडणारे नाही असा सूर लावला आहे.भारताला संरक्षण सामग्री पुरवण्यात इटली आघाडीवर आहे. DRDO,HAL,NAL,भारतिय नौदल अशा अनेक संस्थांना इटालियन कंपन्या संऱक्षण सामुग्री पुरवतात्.संबंध तोडले तर भारतापेक्षा इटलीचे आर्थिक नुकसान जास्त आहे असे वाटते.म्हणूनच चर्चा करून 'common solution' काढण्यासाठी इटली,युरोप संघ भारताला विनंती करतोय.
  • Log in or register to post comments

थोरल्या आऊसाहेब कडाडल्या!

हुप्प्या
गुरुवार, 03/21/2013 - 02:49 नवीन
भारताच्या नव्या मदर तेरेसा वेळ आल्यास झाशीची राणी बनू शकतात हे त्यांनी पुन्हा सिद्ध केले. भारताच्या अनभिषिक्त, साध्वी सम्राज्ञीने इटलीवर कडाडून टीका केली आहे. इतकी कडक टीका की तमाम इटलीवासी लोकांना दिवसा तारे दिसू लागले म्हणे! ह्या महात्यागी, पराक्रमी, परमबुद्धीवान पुरंध्रीने माहेरचे आहेत म्हणून इटलीची गय केलेली नाही त्यामुळे राजघराण्यावर दात विचकणार्‍यांचे दात घशात गेल्याची चर्चा देशभर सुरु आहे म्हणे! हे वाचा आणि रोमांकित व्हा! असा नेता आपल्या सर्वोच्चपदावर आहे त्याकरता सर्वशक्तिमान परमेश्वराचे आभार माना! http://www.loksatta.com/desh-videsh-news/italian-marines-row-sonia-gandhi-warns-italy-no-country-should-take-india-for-granted-84396/
  • Log in or register to post comments

थोरल्या आऊसाहेब कडाडल्या!

हुप्प्या
गुरुवार, 03/21/2013 - 02:50 नवीन
http://www.loksatta.com/desh-videsh-news/italian-marines-row-sonia-gandhi-warns-italy-no-country-should-take-india-for-granted-84396/
  • Log in or register to post comments

ओ त्यांनी

इरसाल
गुरुवार, 03/21/2013 - 10:25 नवीन
फक्त पक्षाच्या सभेतच ठणकावले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

काय

चिरोटा
गुरुवार, 03/21/2013 - 11:21 नवीन
काय त्रास आहे रा॑व? सोनिया गांधींनी हे इटलीमध्ये जावून सांगायचे की काय ? आम्ही वाट बघतोय कोणीतरी 'पेटून' उठेल- पिझा खावू नका म्हणून सांगेल,फियाट कंपनीत जावून राडा करायची भाषा करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

+१

नितिन थत्ते
गुरुवार, 03/21/2013 - 12:06 नवीन
मी तर सचिन तेंडुलकरची फेरारीच जाळावी म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

पण आता तर ती त्याने विकूनही

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 03/21/2013 - 12:26 नवीन
पण आता तर ती त्याने विकूनही टाकली म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

हहपुवा

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/21/2013 - 12:09 नवीन
"थोरल्या आऊसाहेब कडाडल्या!", "मनमोहन सिंगांनी पाकला ठणकावून सांगितले" . . . अशी वाक्ये वाचली हसू आवरत नाही. असे म्हणणे म्हणजे "मांजरीने डरकाळी फोडली" किंवा "सशाने फुत्कार टाकले" असे वाचण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

नितिन थत्ते
गुरुवार, 03/21/2013 - 12:25 नवीन
सहमत आहे. म्हणून अखिल भारतीय संतप्त तरुण संघटनेच्या वतीने श्रीगुरुजी यांना त्या खलाशांना घेऊन येण्यासाठी इटलीस पाठवण्याचे ठरले आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. सर्व संतप्त तरुणांनी वर्गणी म्हणून एक एक सुतळी बॉम्ब श्रीगुरुजी यांच्याकडे जमा करावा. (त्या बॉम्बवर जय श्रीगुरुजी असे लिहिलेले असावे). धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

लाहौलविलाकुवत!

धमाल मुलगा
Fri, 03/22/2013 - 08:05 नवीन
चचाजान, कम से कम अपनी उमर का तो लिहाज़ किया होता। आपजैसे बुजु़र्ग से ये उम्मीद़ ना थी। इसतरह की बात करना तो निहायत ही बेहयां और नामकुल इन्सानों की फि़तरत होती है जो कब से देखी भी गये है। जनाब-ए-आला आप कब से इस नियत पे उतर आये? -(शरमिंदा) मिर्झा धमालुद्दिन बेग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

च्यामारी ज्या ज्या घटनांच्या

खबो जाप
गुरुवार, 03/21/2013 - 12:42 नवीन
च्यामारी ज्या ज्या घटनांच्या मध्ये इटली चा सम्बंध येतो तिथे सरकार माती का तेच काळात नाही. माझे असे स्पष्ट मत आहे कि भारताने इटली ला १५ दिवसाची मुदत दिली पाहिजे आणि जर १५ दिवसत ते दोघे परत आले नाहीत तर भारतीय सागरी हद्द इटलीच्या सगळ्या जहाजांना ( सैनिकी किव्हा गैर सैनिकी) निषिद्ध म्हणून घोषित करु असा दम द्यावा आणि तरी पण कोणते जहाज आलेच तर ते देशाला धोका समजून बुडवू असा दम द्यावा. तेव्हडा फुकाचा दम तर देवून बघू शकतोच.
  • Log in or register to post comments

>>च्यामारी ज्या ज्या

नितिन थत्ते
गुरुवार, 03/21/2013 - 13:13 नवीन
>>च्यामारी ज्या ज्या घटनांच्या मध्ये इटली चा सम्बंध येतो तिथे सरकार माती का तेच काळात नाही. च्यामारी आम्ही तर ऐकलं की पाकिस्तानचा संबंध येतो तिथे पण सरकार माती खातं. श्रीलंकेचा संबंध येतो तिथे पण सरकार माती खातं.....................................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप

+१.

बॅटमॅन
गुरुवार, 03/21/2013 - 14:11 नवीन
+१. सगळीकडे माती खाणार्‍या सरकारला योग्य ती जीवनसत्वे मिळत नसल्याचेच हे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

हे सर्कारसाठी

इरसाल
गुरुवार, 03/21/2013 - 14:56 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अप्रतिम....

नाखु
Fri, 03/22/2013 - 09:14 नवीन
आणि चपखल प्रतिसादाबद्दल आप्ल्याला दंडवत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आखिर ,तुम्हे आना हे जरा देर

निनाद मुक्काम …
Fri, 03/22/2013 - 03:52 नवीन
आखिर ,तुम्हे आना हे जरा देर लगेगी. हे नगमा व संजय वर चित्रित झालेल्या गाण्याचे शब्द आजच्या घडीला खरे ठरले. येणार नाही म्हणणारे इटालियन मरीन आता भारतात परत येत आहेत, व आर्थर रोड जामिनावर सुटलेल्या संजय दत्त ला म्हणत होता. आखिर ,तुम्हे आना हे जरा देर लगेगी.
  • Log in or register to post comments

इटालियन मरीन आता भारतात परत येत आहेत

अर्धवटराव
Fri, 03/22/2013 - 04:06 नवीन
हेच अपेक्षीत होतं. सोनीया गांधींनी अदरवाईज कडाडुन वगैरे स्टेटमेण्ट दिलं नसतं. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

दाल में काला

आजानुकर्ण
Fri, 03/22/2013 - 05:25 नवीन
नेटाने पाठपुरावा करुन इटालियन मरीन परत आणण्याचे काम करणाऱ्या थोरल्या आऊसाहेबांचे आणि मनमोहन सिंग यांचे अभिनंदन करवत नाही. नक्कीच यात काहीतरी काळेबेरे आहे. हा मोठाच अपेक्षाभंग आहे. राहूल गांधी यांना पुढच्या निवडणुकीत मार्ग सुकर करण्यासाठी इटालियन सरकारशी शय्यासोबत करून भारत सरकार आणि आऊसाहेब यांनी कॉन्स्पिरसी करुन काँग्रेस आणि राजपुत्र यांची प्रतिमा उजळ करण्यासाठी हा मोठा कट रचला असावा असे वाटते. - श्रीशिक्षक
  • Log in or register to post comments

आता

विकास
Fri, 03/22/2013 - 07:43 नवीन
आता हेलीकॉप्टरचे लफडे पण असेच सोडवा म्हणजे झाले. या सगळ्या गोंधळात त्याकडे जनतेचे आणि सरकारचे दुर्लक्षच झाले आहे म्हणा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

युनो

आजानुकर्ण
Fri, 03/22/2013 - 18:13 नवीन
कधीकाळी काश्मीर युनोत नेले आता हे बोफोर्स आणि हेलिकॉप्टर पण तसेच आंतर्राष्ट्रीय लवादात जाणार... -झकास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

कर्णा, मला का हाक मारलीस???

झकासराव
Sat, 03/23/2013 - 10:01 नवीन
कर्णा, मला का हाक मारलीस??? बाकी चालु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

आता हेलीकॉप्टरचे लफडे पण असेच

बंडा मामा
Sun, 03/24/2013 - 18:31 नवीन
आता हेलीकॉप्टरचे लफडे पण असेच सोडवा म्हणजे झाले.
हेलीकॉप्ट्रचे लफडे सोडवायला युपीए नक्कीच धावपळ करणार कारण ही ड्झनभर हेलीकॉप्टरे वाजपेयींच्या कार्यकाळात घेतली होती. आता बोला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

"नक्कीच यात काहीतरी काळेबेरे

श्रीगुरुजी
Fri, 03/22/2013 - 12:16 नवीन
"नक्कीच यात काहीतरी काळेबेरे आहे. " नक्कीच. यात जे काळंबेरं आहे ते काही काळातच स्पष्ट होईल. ईटली इतक्या सहजासहजी आपले नौसैनिक परत पाठवेल असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा