http://www.rediff.com/news/report/chidambaram-cuts-rs-14k-cr-from-defence-budget-plans-hit/20130211.htm
भारताचे संरक्षण बजेट १४००० कोटी रुपये कमी केले. याचा अर्थ सगळीकडे शांतता नांदू लागली काय?
अफझलला फाशी दिल्यानंतर काश्मीर खोर्यात लागू केलेली संचारबंदी काल उठविण्यात आली आहे असे बातम्यांमध्ये बघितले.वास्तविक बरेच पत्रकार अफझलला फाशी दिल्यास मकबूल बटप्रमाणे तो 'हुतात्मा' होईल आणि काश्मीरी युवक यातून अजून दुरावला जाईल असे म्हटले होते.मुळात अफझल हा मकबूल बटप्रमाणे 'नेता' नव्हताच.त्याला फाशीची शिक्षा ठोठावून ६ वर्षे उलटून गेली होती तरी काश्मीरात त्याविरूध्द फारसा विरोध झालेला नव्हता.इतकेच काय तर २००८ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काश्मीरी जनतेने मोठ्या प्रमाणावर भाग घेऊन आपला लोकशाही प्रक्रीयेवरच विश्वास आहे हे दाखवून दिले होते. तरीही अरूंधती रॉय, प्रफुल बिडवाई आणि इतर महामूर्ख विचारजंत/पत्रकार स्वतःचे दुकान चालवायला या अफझलल्याला उगीचच मोठे करायचा विनाकारण प्रयत्न करत होते.यांना माहित आहे की भारतात लोकशाही आहे आणि त्याच लोकशाहीने यांना वाटेल ते बरळायचा अधिकारही दिला आहे.मग आहे काय आणी नाही काय? सोडा तोंडाचा पट्टा, भले अफझल्ल्याचा हात संसदेवरील हल्ल्यात असेल, भले त्याने भारतीय लोकशाहीच्या मुळावर घाला घालायचा प्रयत्न केला असेल यांच्या बापाचे काही जात नव्हते.असल्या महामूर्खांना शक्य झाल्यास कायमचे चंद्रावर का पाठवत नाहीत हेच समजत नाही.
पुण्याचे ववा-साहेब,
अगदी खरे आहे आपले म्हणणे. इथे जकार्तात आमच्या संकुलात तीन वाहिन्या पहायला मिळतात (१) झी न्यूज, (२) NDTV India (३) NDTV 24x7. तीन्ही वाहिन्यांवर या फाशीच्या शिक्षेनंतर जी चर्चासत्रे दाखविली गेली त्यात "अफजल गुरू एक देशद्रोही व्यक्ती होती" हा मुद्दा अधोरेखित झालाच नाहीं. सगळे विद्वान लोक-अगदी 'फाशीची शिक्षाच रद्द करावी'पासून त्याच्या तारखेबद्दलच्या माहितीपर्यंतच्या-कमी महत्वाच्या मुद्द्यांनाच महत्व देताना दिसले. अर्थातच त्यात सरकारने एक मोठी चूक केली होती ती म्हणजे फाशीच्या वेळेबद्दलची माहिती अफजलच्या पत्नीला 'स्पीडपोस्ट'ने कळविणे (काय हा विश्वास आपल्याच स्पीडपोस्ट संस्थेवर!) दुसरी चूक झाली ओमार अब्दुल्लांची. त्यांना आदले दिवशी रात्री आठ वाजता ही माहिती समजल्यावर त्यांनी अफजलच्या पत्नीला कळविण्यात आले आहे काय याची चौकशीच केली नाहीं व स्वतःहूनही त्याच्या पत्नीला फोन केला नाही! एवढे करायला हवे होते.
ओमार अब्दुल्लांचा एक मुद्दा मात्र मला पटला. पूर्वी जेंव्हां राजीव गांधींच्या मारेकर्यांना फाशी द्यायची वेळ आली तेंव्हां तामिळनाडूच्या नेत्यांनी ती शिक्षा न देण्याबद्दल उच्च न्यायालयात (सर्वोच्च नव्हे) अर्ज केला व त्यानुसार त्या शिक्षेची अंमलबजावणी लांबणीवर पडली. त्यावेळी ओमार म्हणाले होते कीं हेच जर आम्ही (काश्मिरींनी) अफजल गुरूबाबत केले असते तर सार्या देशाने काश्मिरींवर ठपका ठेवला असता, पण तामिळनाडूच्या सरकारवर अथवा तिथल्या जनतेवर कुणीच तोंडसुख घेतले नाहीं. तीच कथा बेआंत सिंग यांच्या खुन्याबद्दल. तिथेही अकाली दलाने रदबदली केली व फाशीची तारीख पुढे ढकलली. त्याबद्दलही कुणी अकाली दलावर ठपका ठेवला नाहीं! ओमार म्हणाले की अफजल गुरूला झटपट फाशी दिल्याची घटना एक अपवाद (exception) होता कामा नये. इतर लोकांनासुद्धा राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज नामंजूर केल्याबरोबर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हायला हवी. अफजल गुरूला जशी ताबडतोब फाशी दिली गेली तशी राजीव गांधींच्या मारेकर्यांना, वीराप्पनच्या सहकार्यांना व बेआंत सिंग यांच्या खुन्यालाही झाली पाहिजे असे त्यांना सुचवायचे होते.
ओमार अब्दुल्लांचे हे म्हणणे मला तंतोतंत पटते.
आता अफजल गुरूचे पार्थीव त्याच्या कुटुंबियांना देण्याबाबतही 'कब्बड्डी-कब्बड्डी' सुरू झाली आहे. बघू पुढे काय होते ते!
या दोन्ही वाहिन्या वेगवेगळ्या असून एकाच विषयावर वेगवेगळी चर्चासत्रे दाखवतात काय? की रिपीट टेलिकास्ट असते?
वीरप्पनच्या सहकाऱ्यांची शिक्षा दोनचार दिवसांनी उशीरा होणार असल्याचे वाचले. सर्वांनीच इसकाळ वर वाचले असेलच त्यामुळे दुवे देत नाही.
नजिकच्या भविष्यात अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यावर काश्मीर प्रश्नावर होणारे परिणाम यावर काळेकाकांचे व निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांची मते जाणून घेण्यास उत्सुक आहे...
अंधार होत चाललाय दिवा पाहिजे | या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे ॥ नेते झाले अफ़जलखान,काश्मिरचे झाले स्मशान। शायिस्तेखानची बोटे तोडण्यासयुवा पाहिजे। या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे..॥
काही कळत नाही म्हणत एक प्रतिसाद तुम्हीही दिलातच की.
(असं म्हणून मी ही एक प्रतिसाद दिला. एकदाचे पाचशे पुर्ण होऊद्या. म्हणजे काहीतरी टाईमपास प्रतिसाद देऊन धागा वर आणला जाणार नाही.)
अहो एवढ्या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही असा कसा काय टाईमपास करु शकता धनाजीराव????
आम्ही आपलं प्रांजळपणे कबूल केलं झालं तुम्हाला असं काहीही कसं वाटतं?
टाईमपास करायचाच झाला तर तुम्ही तुमच्या सखूला बोलवा परत एकदा.
प्रतिक्रिया
खारीचा वाटा?
उगीच माझ्यावर "खार" खाऊ नका हं!
प्रकाश पाडा
लोखंडी माणूस मधला संवाद,
अफझलची फाशी
"अफजल गुरू एक देशद्रोही व्यक्ती होती" हा मुद्दा महत्वाचा!
453 वा प्रतिसाद
एक हिंदी व दुसरी इंग्रजी
धन्यवाद
अफगाणिस्तानमधील आगामी घडामोडी
ऱोज १ मिटर नी माघार घेतली तरी
४६२.
काश्मिरचे झाले स्मशान..
यशोधन वाळिंब्यांवरच आता भिस्त
असे हातपाय गाळू नका तुम्ही
नान्या *लकटा
खात्री पटली
म्हणजे त्यांनी दिवा लावावा कि काय?
मी अजून एकही प्रतिसाद दिला
काही कळत नाही म्हणत एक
अहो एवढ्या महत्त्वाच्या
सहमत
अनुमोदन (४७३)
असेच म्हणतो. (४७४)