‘भीमथडी जत्रा’ - काही प्रश्न
‘भीमथडी जत्रा’ हा बचत गटांना उभारी देणारा उपक्रम आहे यात शंकाच नाही. राज्याच्या सर्व भागातून आलेल्या बचत गटांचे स्टॉल बघून निश्चित बर वाटलं पण काही प्रश्न मात्र पडले.
बचत गटांच्या बरोबरीने मोठ्या व्यावसायिकांना स्टॉल देण्यामागचे प्रयोजन काय? विशेषतः खाद्य जत्रेमध्ये. उदा. वेन्कीज, सुहाना, कुशन चेअर, आईस्क्रीम, मिनरल वॉटर कंपन्या, हुरडा इ.
जालना, लातूर, हिंगोली, सोलापूर इ. ठिकाणच्या दुरून आलेल्या बचत गटाच्या प्रतिनिधींकडून चांगला अनुभव मिळाला आणि काही ठिकाणी छापील किमतीपेक्षाही कमी किमतीला उत्पादने मिळत होती.
पण बऱ्याच स्टॉल वर अवाजवी किमती होत्या. त्यातही असे जाणवत होते की व्यावसायिक स्टॉल वर असे प्रकार जास्त होते(उदा. एक्वा रंग मिनरल वॉटर, एस.एस. फिश, हुरडा, साठे नाचणी लाडू).
व्यावसायिकांच्या बरोबरीने जाहिरात/बॅनर लावणे बचत गटांना परवडणारे नाही. मग एकीकडे बचत गटांच्या सबलीकरणा बरोबर दुसरीकडे व्यावसायिकांची स्पर्धा का निर्माण केली जातेय? अशाने ‘बचत गटांना व्यासपीठ देणे’ ह्या उद्दिष्टाला हरताळ फासला जात नाही का?
आता याला असा प्रतिवाद होऊ शकेल की बचत गटांच्या मानाने व्यावसायिकांचे स्टॉल कमी होते. पण जर दोघांची उलाढाल बघितली तर व्यावसायिकांची उलाढाल लक्षणीय होती.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे
थोर समाज सेविका सुप्रियाताई
'आपण ह्यांच्या बचत गटा कडुन
बचत गट
बचत गट
बहुदा त्यामागे अर्थकारण असावे
हम्म..
बाकी सकाळमध्ये अलिकडे
सकाळ
सकाळ ≈ सामना
समाजवाद , राष्ट्रवाद , हिंदुत्ववाद , मराठी अस्मिता.
ते एखाद्या विस्तारवादी भांडवलशाही अमराठी किंवा नावापुरत्या मराठी समूहाच्या ताब्यात गेले असते.हया कशाचेही साहेबांना वावडे नाही. सत्ता आणि खुर्ची असेल तर काहीही चालतय.नाहीतर ते एखाद्या विस्तारवादी
तुम्ही खुप भाबड्या आहात राही
"भीमथडी जत्रा' हा महिला बचत
+१
सहमत
- आपण नमूद केलेले पदार्थ बचत गटांच्या स्टॉलसोबतच इतर काही व्यावसायिक स्टॉलवर होते. आणि किमती अवाजवी होत्या. एस.एस.फिश च्या स्टॉलवर सुरमईचा एक तुकडा(अक्षरशः) १५० रुपयाला होता.
- पाण्याच्या बाटल्या एका कंपनीमार्फत बहुधा थेट विक्री करण्यात येत होत्या. १५ रु. एम.आर.पी. असताना २० रु. ऐकल्यावर मी उडालोच. थोडी हुज्जत घातल्यावर म्हणे की बर्फ घालून थंड करायचे ५ रु!!! दिवसाला शेकडो बॉक्स विक्री करणाऱ्यांकडून अशी लूट अपेक्षित नाही ना!
- याच्या ऐवजी २-४ बचत गटांना एकत्र करून एखादा मिनरल वॉटर चा प्लांट टाकणे शक्य होईल का? मग त्यांनी थेट विक्री करून वाजवी दरात विक्री केल्यास सगळेच साध्य होईल! (यातील आर्थिक गणित माहित नाहीत, कदाचित एवढ सोप नसेल, पण प्लांट/कारखाना नसला तरी बचत गट एजन्सी घेऊन १५ रु. ला निश्चित विक्री करू शकला असता, नफ्या सहित; असा माझा अंदाज.)
वरती लिहिलच आहे, की असे प्रकार व्यावसायिक स्टॉलवर जास्त होते. बचत गटांच्या स्टॉलवर चांगला अनुभव होता, तो नाकारत नाहीच, उलट चांगले वाटले. ता.क. खाली एवढे रणकंदन माजेल असे वाटले नव्हते! २ दिवसांनी पहिले आणि चाट पडलो :) आमच्या आडनाव बंधूंच्या विरोधातील मोहिमेत सहभागी व्हायची इच्छा असली तरी धागाकर्ता असल्यामुळे गप्प बसावे हेच बरे ;-)सहमत....
छे !!
पाणी,पर्यावरण,पवार इ.
सगळेच श्रेय त्यांना?
धाग्याची बारामती
स्वसंपादन!
छान..
तुमचे सगळेच मुद्दे पटत नसले
धन्यवाद, मैत्र आणि शैलेन्द्र.
या प्रतिसादाशी पुर्ण सहमत.
"लोकशाहीमध्ये स्वजनांशी फटकून
हिंजवडी ची आयटी पार्क ही युती
अरे वाह.....
महाराष्ट्राने एक विनोबाजी आणि दुसरे शरद पवार यांचे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले महत्त्व कधी जाणलेच नाहीकाय पण हिरे -माणके शोधली आहेत. विनोबाजी - आणीबाणी लागू असताना हया महात्य्माचे रूप साऱ्या महाराष्ट्राला दिसले आणि मी तरी दिपून गेलो. शरदरावजी - बुद्धिमान , कार्यकुशल , विचारवंत , संवाद साधक हे सगळे गुण आहेत. स्वार्थ आणि दगाबाजी हे दोन गुण नसते राजीब गांधी नंतर चे रिक्त पद नरसिंहराव यांचेकडे न जाता साहेबांकडे आले असते. आज १५ /२० वर्षे देशाचे प्रधानमंत्री टिकून - असते.नशीब माना की राव प्रधानमंत्री झाले
राही एकदम सहमत...
पवार हे महाराष्ट्रातील
सार्वजनिक माणसाला काळी बाजू असताच कामा नये.
तद्दन भाबडी अपेक्षा. किमान
कमीतकमी अपेक्षा तरी ठेवा
ब्वॉर्र्र्र...
कमीत कमी अपेक्षा ठेवल्यातर ५०
पन ओम शांती ओमात आम्चा शारुक
संपादकानु ...वरल्या समद्या
या समाजगटाचा नेता (अथवा अनेक
बघा आता. धाग्याचा विशय काये