बुद्धिभेद
आज सकाळी सकाळी, मटा वाचून तोंड कडू झाले. त्याला कारण हा प्रताप आसबे, यांचा बुद्धिभेद करणारा ही लेख!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16934058.cms#write
आज भ्रष्टाचाराविरुद्ध सगळ्या समाजाची एकजूट करण्याची गरज असताना असे जातीय लेख लिहून हे नवपत्रकार आपल्या अकलेचे तारे तोडत आहेत. (किंवा त्यांचा बोलविता धनी ते करवतो आहे, चार तुकडे फेकून).
या लेखात बहुजन नेत्यांची बाजू घेऊन अभिजन कसे त्यांचे चारित्र्यहनन करत आहेत, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. या जाती जातीतील तेढ वाढवणार्या लेखाचा त्रिवार निषेध! आसबे यांनी पूर्वी खूप चांगले लेखलिहिले आहेत. त्यामुळे आश्चर्य वाटले.
'जोशीसरांची ती उद्यमशीलता आणि भुजबळांनी केलेला मात्र भ्रष्टाचार, असे त्यांत एक वाक्य आहे. या वाक्यावरुनच लेखकाच्या खर्या हेतूचा अंदाज येतो. सामान्य माणसाला जातीशी काय देणेघेणे ? तो सगळ्यांना एकाच मापाने मोजतो.
प्रतिक्रिया
आसबे
दुर्लक्ष करता येईल
घाऊक शब्द लेखात घालून
लेखकाशी सहमत आहे. आसबेंचा
पाळलेले विद्वान
कोणाचाही मुलाहिजा बाळगण्याची
त्यात काय नवल. आसबेंची